DNA मराठी

Maharashtra

sunetra pawar dcm

Sunetra Pawar: रेवती सुळे यांच्या रिसेप्शनला सुनेत्रा पवार अनुपस्थित; कारण काय?

Sunetra Pawar: खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या दिल्लीतील लग्नाच्या रिसेप्शनला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अनुपस्थित राहिल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे या कार्यक्रमाला पार्थ पवार आणि जय पवार उपस्थित होते. त्यामुळे सुनेत्रा पवार नेमक्या का गैरहजर राहिल्या? याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले होते. रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाहानंतर सोमवारी दिल्लीत रिसेप्शनचा भव्य कार्यक्रम पार पडला. हा सोहळा राजकीयदृष्ट्या विशेष चर्चेचा ठरला. देशातील अनेक प्रमुख राजकीय नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. पवार कुटुंबातीलही अनेक सदस्य या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पार्थ आणि जय पवार उपस्थित, पण सुनेत्रा पवार गैरहजर रिसेप्शनमध्ये पार्थ पवार आणि जय पवार दोघेही उपस्थित होते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या अनुपस्थितीने विशेष लक्ष वेधून घेतले. सुनेत्रा पवार सोमवारी दिवसभर पुण्यात होत्या आणि त्यानंतर रात्री उशिरा मुंबईत दाखल झाल्या. त्यामुळे त्या दिल्लीला का गेल्या नाहीत, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातही चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यांच्या गैरहजेरीमागे कोणतेही राजकीय कारण असल्याचे स्पष्ट झालेले नाही. अनिल पाटील यांनी दिलं स्पष्टीकरण या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री अनिल पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुनेत्रा पवार यांचे काही कार्यक्रम आधीपासूनच निश्चित होते. त्यामुळे रेवती सुळे यांच्या रिसेप्शनला त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत. अनिल पाटील यांनी विशेषतः सांगितले की, या अनुपस्थितीचा वेगळा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. रेवती सुळे यांच्या लग्नाच्या मुख्य कार्यक्रमाला सुनेत्रा पवार पूर्णवेळ उपस्थित होत्या. कुटुंबातील इतर कार्यक्रमांमध्येही त्या सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे लग्नाला उपस्थित राहिल्यानंतर रिसेप्शनलाही उपस्थित राहणे बंधनकारक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Sunetra Pawar: रेवती सुळे यांच्या रिसेप्शनला सुनेत्रा पवार अनुपस्थित; कारण काय? Read More »

Manoj Jarange Patil Photo

Manoj Jarange Patil : मराठा समाज पुन्हा मुंबईकडे ? मनोज जरांगेंचे मोठे वक्तव्य

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज पुन्हा एकदा मुंबईकडे जाण्याचा विचार करत असल्याचे म्हटले आहे. मुंबईतच आंदोलन करण्याबाबत समाजामध्ये चर्चा सुरू असून, आगामी काळात मुंबईकडे मोठ्या संख्येने मराठा आंदोलक येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मुंबईतच आंदोलन करण्याचा विचार यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजामध्ये पुन्हा मुंबईला जाण्याची चर्चा सुरू आहे. मुंबईत जाऊन आंदोलन करण्याचा निर्णय होऊ शकतो. तसेच समाजातील अनेकजण मुंबईतच आंदोलन करण्याच्या भूमिकेवर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आंदोलनासाठी आपण कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा मोठ्या प्रमाणावर उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राबाहेरूनही आंदोलक येणार? जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे महाराष्ट्राबाहेरील भागांतूनही मराठा समाजाचे लोक मुंबईकडे येऊ शकतात, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुरत, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, बडोदा तसेच गोव्याच्या समुद्रमार्गातूनही काही लोक मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंदोलनाचा विस्तार केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता व्यापक स्वरूप घेऊ शकतो, असा संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळतो. नेमकी मागणी काय? मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या काही वर्षांपासून आंदोलन करत आहेत. विशेषतः मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र आणि त्यातून ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा, हा त्यांच्या आंदोलनातील प्रमुख मुद्दा राहिला आहे. कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरूनही जरांगे यांनी अलीकडे सरकारला इशारा दिला आहे. कुणबी नोंदी रद्द होऊ देणार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी मुंबईत मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाले आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा मुंबईकडे जाण्याचे संकेत दिल्याने सरकारसमोर मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

Manoj Jarange Patil : मराठा समाज पुन्हा मुंबईकडे ? मनोज जरांगेंचे मोठे वक्तव्य Read More »

ai virus

AI Virus: AI ने तयार केले निसर्गात नसलेले व्हायरस; सुपरबगविरोधात मोठी आशा, पण जैवसुरक्षेचा गंभीर प्रश्न

AI Virus: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI चा वापर आतापर्यंत माहिती-तंत्रज्ञान, औषधनिर्मिती, संशोधन आणि कोडिंगसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत होता. मात्र आता AI ने थेट जीवशास्त्राच्या क्षेत्रातही एक महत्त्वाची झेप घेतली आहे. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी आणि Arc Institute मधील संशोधकांनी AI च्या मदतीने निसर्गात आढळत नसलेले नवीन विषाणू तयार करण्यात यश मिळवले आहे. ही कामगिरी वैद्यकीय संशोधनासाठी मोठी संधी मानली जात असली, तरी त्याच वेळी जैवसुरक्षेबाबत गंभीर प्रश्नही उपस्थित झाले आहेत. नेमके काय तयार करण्यात आले? संशोधकांनी तयार केलेले हे विषाणू बॅक्टेरियोफेजेस (Bacteriophages) आहेत. साध्या भाषेत सांगायचे झाल्यास, हे असे विषाणू आहेत जे मानवी पेशींवर हल्ला करण्याऐवजी विशिष्ट बॅक्टेरियांना संक्रमित करून त्यांचा नाश करतात. या संशोधनातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे विषाणू निसर्गातून जसेच्या तसे घेतलेले नाहीत. AI मॉडेलच्या मदतीने त्यांच्या आनुवंशिक रचनेची म्हणजेच जीनोमची रचना करण्यात आली आणि त्यानंतर प्रयोगशाळेत त्यांची कार्यक्षमता तपासण्यात आली. उपलब्ध अहवालानुसार, तयार करण्यात आलेल्या काही AI-डिझाइन केलेल्या बॅक्टेरियोफेजेसनी प्रयोगशाळेत कार्यक्षम असल्याचे दाखवून दिले. AI ने हे कसे शक्य केले? या संशोधनामागे जीनोमिक AI मॉडेल्स वापरण्याची कल्पना आहे. ज्याप्रमाणे भाषेचे AI मॉडेल मोठ्या प्रमाणात मजकूराचा अभ्यास करून भाषेतील पॅटर्न ओळखते, त्याचप्रमाणे जीनोमवर प्रशिक्षण घेतलेली मॉडेल्स DNA मधील नमुने आणि रचना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. संशोधकांनी अशा मॉडेलच्या मदतीने उपलब्ध जैविक माहितीवरून नवीन जीनोमिक रचना तयार केल्या. त्यातील काही रचना प्रत्यक्ष प्रयोगशाळेत तपासण्यात आल्या आणि काही विषाणू बॅक्टेरियांवर परिणामकारक ठरले. अहवालांनुसार या संशोधनात E. coli या बॅक्टेरियाला लक्ष्य करणाऱ्या बॅक्टेरियोफेजेसवर विशेष लक्ष देण्यात आले. अँटिबायोटिक रेझिस्टन्सविरुद्ध मोठी आशा या संशोधनाचे सर्वात महत्त्वाचे संभाव्य फायदे अँटिबायोटिक रेझिस्टन्सशी संबंधित आहेत. जगभरात अनेक बॅक्टेरिया उपलब्ध अँटिबायोटिक्सना प्रतिसाद देत नाहीत. अशा बॅक्टेरियांना अनेकदा ‘सुपरबग’ असे म्हटले जाते. एखाद्या गंभीर संसर्गावर नेहमीची औषधे काम करत नसतील तर उपचार करणे मोठे आव्हान ठरते. याठिकाणी बॅक्टेरियोफेजेस महत्त्वाचे ठरू शकतात. ते विशिष्ट बॅक्टेरियांना लक्ष्य करू शकतात. त्यामुळे भविष्यात एखाद्या रुग्णाच्या संसर्गाला कारणीभूत असलेल्या विशिष्ट बॅक्टेरियासाठी त्याला लक्ष्य करणारा फेज तयार करण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. AI मुळे अशा नवीन फेजेसची रचना अधिक वेगाने करण्याची क्षमता वाढू शकते. त्यामुळे भविष्यात औषधांना दाद न देणाऱ्या संसर्गांसाठी पर्यायी उपचार विकसित करण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. पण हे व्हायरस माणसांसाठी धोकादायक आहेत का? सध्या समोर आलेल्या संशोधनानुसार हे AI-डिझाइन केलेले बॅक्टेरियोफेजेस मानवी शरीराला संक्रमित करण्यासाठी तयार केलेले नाहीत. त्यांचा उद्देश बॅक्टेरियांना लक्ष्य करणे हा आहे. म्हणून ‘AI ने माणसांना संक्रमित करणारा व्हायरस तयार केला’ असा अर्थ या संशोधनातून काढणे चुकीचे ठरेल. प्रत्यक्षात हा प्रयोग बॅक्टेरियांना संक्रमित करणाऱ्या विषाणूंवर केंद्रित आहे. मग जगाची चिंता नेमकी कशामुळे? चिंतेचा मुद्दा सध्याच्या तयार झालेल्या विषाणूंपेक्षा AI ची वाढती जैविक क्षमता हा आहे. आज AI च्या मदतीने संपूर्ण विषाणूच्या जीनोमची रचना करण्याची क्षमता प्रयोगशाळेत प्रत्यक्ष दाखवून देण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात याच प्रकारच्या तंत्रज्ञानाचा चुकीच्या उद्देशासाठी वापर होऊ शकतो का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. जैवसुरक्षा तज्ज्ञांची मुख्य चिंता अशी आहे की AI आणि आधुनिक जैवतंत्रज्ञान यांचा संगम भविष्यात अत्यंत शक्तिशाली ठरू शकतो. जर अशा तंत्रज्ञानाचा गैरवापर झाला, तर मानवी आरोग्यासाठी धोकादायक जैविक घटक तयार करण्याची क्षमता काही प्रमाणात वाढू शकते. मात्र सध्याच्या प्रयोगातील विषाणू मानवांसाठी धोकादायक असल्याचे यावरून सिद्ध होत नाही. वैद्यकीय क्रांती की जैवसुरक्षेचा इशारा? या संशोधनाकडे दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. एका बाजूला, अँटिबायोटिक्स निष्प्रभ ठरत असलेल्या काळात AI च्या मदतीने नवीन बॅक्टेरियोफेजेस तयार करता येणे ही वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी संधी आहे. भविष्यात विशिष्ट बॅक्टेरियल संसर्गांसाठी अधिक लक्ष्यित उपचार विकसित होऊ शकतात. दुसऱ्या बाजूला, एकदा AI ला जैविक रचनांमधील गुंतागुंत समजून नवीन रचना तयार करण्याची क्षमता मिळाली की त्याच्या वापरावर योग्य नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरते. त्यामुळे संशोधनासोबतच बायोसेफ्टी, बायोसिक्युरिटी, प्रयोगशाळेतील नियंत्रण आणि AI मॉडेल्सच्या वापराबाबत योग्य नियम तयार करण्याची गरज वाढली आहे. पुढे काय? या तंत्रज्ञानाचा रुग्णांवरील प्रत्यक्ष उपचारांसाठी वापर होण्यासाठी अजून बराच संशोधनाचा टप्पा बाकी आहे. प्रयोगशाळेत एखादा फेज बॅक्टेरिया नष्ट करतो, याचा अर्थ तो लगेच माणसांमध्ये औषध म्हणून वापरता येईल असा होत नाही. त्यासाठी त्याची सुरक्षितता, परिणामकारकता, शरीरातील वर्तन, संभाव्य दुष्परिणाम आणि इतर अनेक बाबींची कठोर तपासणी आवश्यक असेल. त्यामुळे सध्याच्या टप्प्यावर या संशोधनाकडे ‘AI ने व्हायरस तयार करून उपचार सुरू केले’ अशा स्वरूपात न पाहता, AI च्या मदतीने कार्यक्षम बॅक्टेरियोफेज तयार करण्याची वैज्ञानिक क्षमता सिद्ध झाली आहे असे पाहणे अधिक अचूक ठरेल. AI + जीवशास्त्र = मोठी वैज्ञानिक संधी, पण मोठी जबाबदारीही अँटिबायोटिक रेझिस्टन्समुळे निर्माण झालेल्या सुपरबगच्या समस्येवर AI-डिझाइन केलेले बॅक्टेरियोफेज भविष्यात उपयोगी ठरू शकतात. मात्र त्याच तंत्रज्ञानाचा गैरवापर होऊ नये यासाठी जैवसुरक्षा आणि नियमनाला तितकेच महत्त्व द्यावे लागणार आहे. हीच या संशोधनाची सर्वात मोठी शिकवण आहे.

AI Virus: AI ने तयार केले निसर्गात नसलेले व्हायरस; सुपरबगविरोधात मोठी आशा, पण जैवसुरक्षेचा गंभीर प्रश्न Read More »

Sangram Jagtap

मुकुंदनगरमध्ये पालिका कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला; आ. संग्राम जगताप यांच्याकडून घटनेचा निषेध, कारवाईची मागणी

Sangram Jagtap: अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात पथदिव्यांच्या दुरुस्तीचे सार्वजनिक काम करत असताना महानगरपालिकेचे कर्मचारी धीरजसिंग परदेशी यांना काही जणांकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. या मारहाणीत परदेशी गंभीर जखमी झाले असून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप आणि पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन परदेशी यांच्या प्रकृतीची चौकशी केली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. दरम्यान, सार्वजनिक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणारे असे हल्ले निंदनीय असून, पोलिसांनी यापूर्वीच्या घटनांचे गांभीर्य ओळखून अशा जिहादी प्रवृत्तीच्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि अशा प्रवृत्तींना आळा घालावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी माध्यमांशी बोलताना केली. तर जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिस तपास कार्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

मुकुंदनगरमध्ये पालिका कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला; आ. संग्राम जगताप यांच्याकडून घटनेचा निषेध, कारवाईची मागणी Read More »

dattatray bharne

Dattatray Bharne : दोन दिवसांत कर्जमाफीची रक्कम खात्यात; 56 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ

Dattatray Bharne : राज्य सरकारच्या वतीने पहिल्यांदा छोट्या आणि दुसऱ्यांदा साधारण १७ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी जाहीर केली आहे. कर्जमाफीसाठी केवायसी (KYC) चे काम युद्ध पातळीवर सुरू असून आतापर्यंत 12 लाखांच्या आसपास काम पूर्ण झाले आहे. येणाऱ्या एक-दोन दिवसांमध्ये कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात होईल असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या अडचणीच्या काळात माझ्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली आहे. कर्जमाफीचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना होणार असून सरकार 40 हजार कोटींची मदत देणार आहे. निवडणूक डोळ्यासमोर नसताना सुद्धा अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत करणे ही सरकारची जबाबदारी होती. खचलेला शेतकरी पुन्हा कसा उभा राहील यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न आहे. कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचे सिबिल खराब होणार नाही, अशी काळजी घेतली आहे. बँकेला शासनाकडून रक्कम कमी आली तरी उरलेली रक्कम बँकांनी माफ करायची आहे, असा करार झाला आहे. कर्जमाफीनंतर शेतकऱ्याला त्याच दिवशी ‘नील’चा दाखला मिळेल आणि दुसऱ्या दिवसापासून नवीन पीक कर्ज वाटप केले जाईल. शेतकऱ्यांनी संयम ठेवावा, अजून दोन-तीन याद्या लागायच्या बाकी आहेत. शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की, आपण आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे. सोयाबीन बियाणे न उगवल्याबाबत तक्रारी आल्यावर संबंधित कंपन्यांवर थेट एफआयआर दाखल केले आहेत. अशा कंपन्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही आणि शेतकऱ्यांना दुबार बियाणे मिळण्यासाठी सहकार्य करू. कर्तव्यात कसूर करणाऱ्या तालुका कृषी अधिकारी आणि सहाय्यकांना निलंबित करण्यात आले आहे. खतांच्या लिंकिंग बाबत सरकारने जीआर काढला असून लिंकिंग करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाईल. ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांसाठी आहे, इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नाही. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत मी सहमत असून राज्य सरकार त्यांना निश्चित मदत करेल. राज्यात आतापर्यंत साधारणतः 90 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. नाशिक विभागात सर्वाधिक 95 टक्के, तर ठाणे विभागात सर्वात कमी 66 टक्के पेरणी झाली असल्याची देखील माहिती त्यांनी दिली.

Dattatray Bharne : दोन दिवसांत कर्जमाफीची रक्कम खात्यात; 56 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ Read More »

vijay choudhary

Vijay Choudhary: कथित ध्वनीफित प्रकरण, भाजप नेते विजय चौधरी अटकेत..

Vijay Choudhary:  उत्तर महाराष्ट्रासह नंदुरबार, जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील राजकारणात कथित ध्वनीफितींमुळे मोठी खळबळ उडालेली असतानाच, या प्रकरणातील मुख्य संशयित आणि गेल्या काही दिवसांपासून फरार असलेले भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांना अखेर नंदुरबार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई करून चौधरी यांना ताब्यात घेतले आणि नंदुरबार शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. गुरुवारी रात्री उशिरा वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना अधिकृतपणे अटक करण्यात आली असून, शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. ॲट्रॉसिटीसह विविध कलमांन्वये तीन गुन्हे दाखल सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने प्रसारित झालेल्या कथित ध्वनीफितीत भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबद्दल आक्षेपार्ह व जातीवाचक विधाने केल्याचा ठपका चौधरी यांच्यावर आहे. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह ॲट्रॉसिटी इतर विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी यांनीही विजय चौधरी यांच्याविरोधात अशाच स्वरूपाची स्वतंत्र तक्रार दाखल केली. सध्या डॉ. हिना गावित, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मालती वळवी आणि आमदार आमश्या पाडवी यांच्याशी संबंधित वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर दाखल गुन्ह्यांनुसार ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. विजय चौधरी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून त्यांच्यावर आतापर्यंत सुमारे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. या तपासादरम्यान प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. विजय चौधरी यांच्या मोबाईलमधील ध्वनीफिती चोरून, त्यांची परस्पर विक्री करून त्या सोशल मीडियावर पसरवल्याचा आरोप झाला. यासंदर्भात चौधरी यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या माजी स्वीय सहाय्यकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी पीएला ताब्यात घेतले होते, मात्र चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याला न्यायालयातून जामीन मंजूर झाला आहे. व्हायरल झालेल्या या कथित ऑडिओ क्लिप्समध्ये मंत्री गिरीश महाजन, मंत्री जयकुमार रावल,आमदार आमश्या पाडवी, राजेश पाडवी आणि अमरीश पटेल यांच्यासह इतर अनेक प्रमुख राजकीय नेत्यांशी झालेले संभाषण असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे राजकीय नेत्यांची बदनामी होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, संबंधित राजकीय नेत्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या ध्वनीफितींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून आवाज आणि संभाषणात छेडछाड आणि फेरफार करण्यात आल्याचा दावा नेत्यांकडून करण्यात आला आहे. नंदुरबारमध्ये दररोज नव्या कथित ध्वनीफिती बाहेर येत असल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. विजय चौधरी यांच्या अटकेनंतर आता पोलीस तपासात काय नवे सत्य समोर येते आणि या प्रकरणाचे धागेधोरे कुठेपर्यंत पोहोचतात, याकडे उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Vijay Choudhary: कथित ध्वनीफित प्रकरण, भाजप नेते विजय चौधरी अटकेत.. Read More »

manoj jarange on eknath shinde

Manoj Jarange on Eknath Shinde : गद्दारीचा डाग पुसणार आम्ही, आता सीट पडणार; जरांगे पाटलांचा एकनाथ शिंदेंना इशारा

Manoj Jarange on Eknath Shinde : मराठवाड्यातील काही मराठा महिला लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्यानंतर मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना जरांगे म्हणाले की, मराठा समाजाने त्यांना साथ दिली होती, परंतु आता समाजाचा विश्वासघात झाल्याची भावना आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही आरक्षणाच्या प्रश्नावर राजकारण केल्याचा आरोप केला. यावेळी जरांगे म्हणाले की, एकनाथ शिंदे तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो. सत्तेत गेलात म्हणून आमच्यावर माज उतरवणार का? शिंदे साहेब, तुम्ही डबल गेम खेळत आहात का? एकीकडून ओबीसी सांभाळत आहात का? परळीच्या टोळीवाल्याच्या नादी लागून तुमच्या ऑफिसला कसे येतात? मराठ्यांचा विरोध करणारे ओबीसी नेते तुमच्या बाळासाहेब भवनमध्ये येतात कसे? मराठ्यांचे काही समन्वयक तुम्ही माझ्या अंगावर घालत आहात. एकीकडे मी पण लागतो. तुमचाच एक नेता ज्याचे संभाजीनगरला कॉलेज आहे. तिथे माझ्या विरोधात बैठका होतात. मैत्री करावी तर ठासून करावी. तुमचा गद्दारीचा डाग पुसायला आम्ही मराठे आहोत. आमच्यावर उद्धव ठाकरे बरे म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका. आम्ही तुमचे सीट पडणार असा इशारा मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला.

Manoj Jarange on Eknath Shinde : गद्दारीचा डाग पुसणार आम्ही, आता सीट पडणार; जरांगे पाटलांचा एकनाथ शिंदेंना इशारा Read More »

abhijit deepke

Abhijit Deepke : CJP राजकीय पक्ष म्हणून नव्हे, तर दबावगट म्हणून काम करणार

Abhijit Deepke : सीजेपी (CJP) च्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर संस्थापक अभिजीत दीपके यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या सीजेपी निवडणुकीच्या राजकारणात उतरणार नसून लोकांच्या प्रश्नांवर सरकारवर दबाव निर्माण करणारा प्रभावी दबावगट म्हणून काम करेल, असे त्यांनी सांगितले. देशातील युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सध्या सत्तेची नव्हे, तर मजबूत लोकचळवळीची गरज असल्याचे दीपके यांनी नमूद केले. त्यामुळे संघटना आपले आंदोलन आणि जनजागृतीचे काम अधिक व्यापक करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत संघटनेच्या पुढील वाटचालीवर सविस्तर चर्चा झाली. विविध राज्यांतील कार्यकर्ते आणि समर्थकांकडून आलेल्या सूचनांचा आढावा घेण्यात आला. सध्या राजकीय पक्ष स्थापन करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणे आणि सरकारला जबाबदार धरणे, यावरच संघटना लक्ष केंद्रित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, भविष्यातील राजकीय पर्याय पूर्णपणे बंद नसल्याचे संकेत देत, योग्य वेळ आल्यास संघटना पुढील निर्णय घेईल, असेही दीपके यांनी स्पष्ट केले. मात्र, सध्या सीजेपीची प्राथमिकता ही लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणे आणि जनआंदोलन अधिक मजबूत करणे हीच राहणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

Abhijit Deepke : CJP राजकीय पक्ष म्हणून नव्हे, तर दबावगट म्हणून काम करणार Read More »

paneer

Tukaram Munde: राज्यात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई

Tukaram Munde : राज्यातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून महाराष्ट्र सरकारने अॅनालॉग पनीरवर एक वर्षासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) जारी केलेल्या आदेशानुसार ॲनालॉग पनीरचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, विक्री आणि वापर यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग सेवा आणि इतर खाद्य व्यावसायिकांनाही ॲनालॉग पनीर वापरता येणार नाही. ॲनालॉग पनीर हे पारंपरिक दुधाच्या पनीरऐवजी वनस्पतीजन्य तेल, स्टार्च आणि इतर घटकांपासून तयार केले जाते. दिसायला ते पनीरसारखे असले तरी त्याची गुणवत्ता आणि पोषणमूल्ये वेगळी असतात. अनेक ठिकाणी ग्राहकांना याची स्पष्ट माहिती न देता ते पनीर म्हणून विकले जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ग्राहकांची फसवणूक थांबवणे आणि सुरक्षित अन्न उपलब्ध करून देणे हा उद्देश ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. बंदीचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक, विक्रेते किंवा खाद्य व्यावसायिकांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, ग्राहकांनी पनीर खरेदी करताना उत्पादनावरील माहिती, लेबल आणि दर्जा तपासूनच खरेदी करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

Tukaram Munde: राज्यात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई Read More »

img 20260805 wa0000

Vaishali Nagwade राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष

Vaishali Nagwade : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांच्या पदमुक्तीनंतर हे पद रिक्त होते. आज मुंबई येथे पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नागवडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. वैशाली नागवडे या मूळच्या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील असून, अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विश्वासू कार्यकर्त्या म्हणून त्यांची पुणे जिल्ह्यात ओळख आहे. यापूर्वी अजित पवार यांनी त्यांच्यावर महानंदा दूध संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवली होती. पुणे ग्रामीण भागात महिला कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन उभारण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. दरम्यान, पक्षातील विविध घडामोडींमध्ये रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेविरोधात अनेकदा भूमिका घेतल्यामुळे वैशाली नागवडे या चर्चेतही राहिल्या होत्या. त्यांच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीत नव्या राजकीय समीकरणांना चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Vaishali Nagwade राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष Read More »