DNA मराठी

आरोग्य

उंदीर मारण्याच्या मोहिमेची चौकशी करा, आशिष शेलार यांचे आदेश

Ashish Shelar: गेल्या सहा महिन्यात मुंबईत 2 लाख 50 हजार उंदरांचा खात्मा केल्याचे महापालिका सांगत असली तरी ही बाब अत्यंत संशयास्पद असून गेल्या तीन महिन्यातील मोहीमेची चौकशी करा, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी महापालिका प्रशासनाला दिले. मुंबईत वाढत असलेले डेंग्यू मलेरियाचे रुग्ण आणि त्याबाबतच्या उपाययोजना याबाबतची आढावा बैठक मंत्रालयात आशिष शेलार यांनी घेतली. या बैठकीला महापालिका अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा, अमित सैनी, अभिजीत बांगर महापालिका कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शहा तसेच सरकारच्या आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते मुंबईत मलेरियाचे 1 जून ते 21 जून या कालावधीत 554 रुग्ण आढळून आले असून डेंग्यूचे 71 तर चिकनगुनियाचे 6, लेप्टोस्पायरसिस 24, गॅस्ट्रो 620 रुग्ण आढळून आले आहेत 2024 जानेवारी ते मे या कालखंडात मलेरियाचे 1612 रुग्ण आढळले होते तर यावर्षी 1973 रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूचे 338 रुग्ण मागील वर्षी आढळून आले होते तर जानेवारी ते मे 2025 या कालखंडात 347 रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे महापालिकेने 1 जून ते 21 जून 2025 या कालखंडामध्ये सहा लाख 39 हजार 430 घरांचे सर्वेक्षण केले असून एकूण 30 लाख 56 हजार 528 लोकांचे सर्वेक्षण केल्याचे महापालिकेने सांगितले. एकूण 1 लाख 2 हजार 243 रक्त नमुने गोळा केले असून लेप्टो संशयित रुग्णांची संख्या 62,484 आहे तर यासाठी 37 शिबिरे घेण्यात आली असून विविध कार्यालयाच्या ठिकाणी जाऊन 5,108 ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती दिली. तर गॅस्ट्रोसाठी वितरित केलेल्या ओआरएस गोळ्यांची एकूण संख्या 21,429 असून पाण्याच्या जंतू करण्यासाठी क्लोरीन टॅब चे वितरणाची संख्या 11, 086 आहे 1 जून ते 21 जून या कालावधीत ह्या उपायोजना करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. तसेच मलेरिया नियंत्रणासाठी 17 हजार 82 इमारतींची तपासणी केली केल्याची माहिती दिली. डास मारण्यासाठी 35 हजार 911 इमारतींच्या परिसरात धूर फवारणी करण्यात आली असून 5 लाख 58 हजार 261 झोपडपट्टी विभागात फवारणी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या उपायोजना करूनही रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे येत्या कालखंडामध्ये या सर्व उपाययोजना 25 टक्क्यांनी वाढवा असे निर्देश मंत्री शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिले. महापालिकेने गेल्या सहा महिन्यात 2 लाख 50 हजार उंदरांचा खात्मा केला तर एक जून ते 21 जून या कालखंडामध्ये विषारी गोळ्या वापरून मारलेल्या मूळकांची संख्या 1741 तर पिंजरे लावून पकडलेल्या मोक्षकांची संख्या 2015 आहे. 17 वॉर्ड मध्ये 17 संस्था हे काम करतात तर पिंजरा लावून मुषक पकडण्याचे काम महापालिकेचे कर्मचारी करतात ही सर्व आकडेवारी एकूणच संशयास्पद असून उंदीर किती मारले? कुठे टाकले ? किती विभागात ती कारवाई करण्यात आली ? याचे चित्रीकरण करण्यात आले होते का ? या सर्वांची तीन महिन्याची चौकशी करण्यात यावी गेली अनेक वर्ष महापालिकेत नगरसेवक, विधान परिषदेत आमदार आणि तीन टर्म विधानसभेचा आमदार म्हणून मुंबईत काम करत असून ही आपल्याला अशा प्रकारचे उंदीर कधी मारल्याचे निदर्शनास आलेले नाही. पिंजरा कुठे लावला असे कधी पाहण्यात आलेले नाही. त्यामुळे हे सर्वच प्रकरण संशयास्पद असून याची चौकशी करून अहवाल सादर करा असे निर्देश मंत्री शेलार यांनी यावेळी अतिरिक्त आयुक्तांना दिले.

उंदीर मारण्याच्या मोहिमेची चौकशी करा, आशिष शेलार यांचे आदेश Read More »

लक्ष्मीनगरमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा; नागरिकांनी आयुक्तांना दिले निवेदन

Ahilyanagar News : तपोवन रोडवरील लक्ष्मीनगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या त्रासाला कंटाळून परिसरातील रहिवाशांनी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या बैठकीस माजी नगरसेवक निखील वारे आणि बाळासाहेब पवार हेही उपस्थित होते. सयाजीराव वाव्हळ, नानासाहेब माळवदे, बंडोपंत ढोले, राजेंद्र डहाळे, संजय कांडेकर, रमेश चौधरी, किरण विरकर, संजय धामने, पोपटराव राठोड, प्रशांत फुगनर, सुरेश बोडखे, भानुदास दातीर, अशोक कोरडे, सुर्यकांत झेंडे आणि पत्रकार साहेबराव कोकणे यांनी नागरिकांचे म्हणणे मांडत सविस्तर चर्चा केली. नागरिकांनी यावेळी स्पष्ट केले की, लक्ष्मीनगरमधील जलवाहिनी ही जुनी व गंजलेली आहे, त्यामुळे पुरेसा दाब मिळत नाही. फेज टू पाण्याकरिता सर्वांनी नियमाप्रमाणे शुल्क भरले असून नवीन नळजोडण्या देखील दिल्या गेल्या आहेत, मात्र अपेक्षित पाणीपुरवठा अद्याप मिळत नाही. यावर आयुक्त यशवंत डांगे यांनी दोन दिवसांत प्रत्यक्ष पाहणी करून परिसरात पुरेशा दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत काम लवकर सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

लक्ष्मीनगरमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा; नागरिकांनी आयुक्तांना दिले निवेदन Read More »

वारकऱ्यांना मिळणार विम्याचा लाभ अन् टोल फ्री वाहन; शिंदेंची मोठी घोषणा

Eknath Shinde: आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल, तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. आषाढी वारीनिमित्त केलेल्या उपाययोजना आणि वारकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक पार पडली होती. त्याविषयीची अधिक माहिती प्रसार माध्यमांना देतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे वारी मार्ग कुठेही खराब झाला असल्यास मुरूम, खडी आणि डांबरीकरण करून त्याची तातडीने डागडुजी करावी, वारकऱ्यांना मुबलक पाणी, विजेची जोडणी, पालखी तळावर वॉटरप्रूफ तंबू उपलब्ध करून घ्यावे तसेच वारीसाठी जाणाऱ्या गाड्यांना दरवर्षीप्रमाणे टोलमध्ये सवलत दिली जाईल असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आरोग्य तपासणी गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी आषाढी वारीनिमित्त राज्याच्या आरोग्य विभागाकडून भव्य आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील, वारकऱ्यांसाठी कार्डीएक रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून दिली जाईल, पंढरपुरात तात्पुरती आयसीयू सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी स्वतः पंढरपूरला जाऊन आढावा घ्यावा असे निर्देश शिंदे यांनी यावेळी त्याना दिले. तसेच प्रत्येक जिल्ह्यातून निघणाऱ्या मोठ्या दिड्यांना वारीच्या काळात पूर्णवेळ सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. नोडल अधिकारी नेमणार यासोबतच गतवर्षी वारीदरम्यान झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांना शासनाद्वारे मदत केली जाईल, पोलिसांशी व्यवस्थित समन्वय व्हावा यासाठी नोडल ऑफिसर नेमण्यात येईल. वारकऱ्यांचे भोजन आणि इतर प्रथा परंपरा वेळच्या वेळी पार पाडाव्यात यासाठी वारी कुठे जास्त वेळ खोळंबणार नाही यासाठी प्रयत्न केला जाईल, यंदाची वारीही स्वच्छ वारी, निर्मल वारी हरित वारी म्हणून आपल्याला पार पाडायची असल्याने त्यासाठी लागेल ते सर्व सहकार्य शासनाकडून केले जाईल असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

वारकऱ्यांना मिळणार विम्याचा लाभ अन् टोल फ्री वाहन; शिंदेंची मोठी घोषणा Read More »

जर हृदयविकाराचा झटका आला तर घाबरू नका, ‘या’ 7 टिप्स फॉलो करा

Heart Attack : गेल्या काही वर्षांपासून देशात हृदयविकार एक गंभीर आजार बनत आहे. कोणत्याही वयोगटातील लोकांना आता हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आहे. जिम, शाळा किंवा कामात व्यस्त असतानाही लोकांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. कधीकधी लोक एकटे असतानाही हृदयविकाराचा झटका येतो. जर एखादी व्यक्ती घरी एकटी असेल किंवा एकटी राहत असेल आणि त्याला हृदयविकाराचा झटका आला तर काय करावे? अशा परिस्थितीत, हृदयविकाराच्या वेळी एकटे राहणारे लोक स्वतःचे संरक्षण कसे करू शकतात हे जाणून घ्या. हृदयविकाराची लक्षणे पुरुष आणि महिलांमध्ये हृदयविकाराची लक्षणे वेगवेगळी असू शकतात. आजकाल, हृदयविकाराचा कौटुंबिक हिस्ट्री, चुकीची जीवनशैली, धूम्रपान, ताणतणाव, लठ्ठपणा आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे तरुणांसह अनेक लोकांना हृदयविकाराचा धोका असतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा पहिल्या तासात औषध घेतल्यास त्याचे प्राण वाचू शकतात. छातीत अस्वस्थता – हे दाब, घट्टपणा किंवा जडपणासारखे वाटू शकते. कधीकधी असे वाटते की कोणीतरी तुमच्या छातीवर बसले आहे. वेदना – ही वेदना हात, पाठ, मान, जबडा किंवा पोटात पसरू शकते. श्वास घेण्यास त्रास – तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत आहे. थंड घाम येणे – कोणत्याही कारणाशिवाय अचानक घाम येणे हे देखील एक धोक्याचे लक्षण आहे. चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे – अचानक अशक्त होणे किंवा खूप थकवा जाणवणे हे देखील हृदयविकाराचे लक्षण असू शकते. अचानक हृदयविकाराचा झटका आला तर काय करावे? हृदयविकाराची लक्षणे ओळखा. ताबडतोब आपत्कालीन सेवांना कॉल करा. शांत राहा आणि खोलवर श्वास घेण्याचा प्रयत्न करा. तुमचे कपडे पूर्णपणे सैल करा. अजिबात हालचाल करू नका आणि एकाच ठिकाणी शांतपणे बसा. जर हृदयाचे ठोके जलद असतील तर खोल श्वास घ्या आणि जोरात खोकला. ज्याला खोकला सीपीआर म्हणतात जो हृदयाचे ठोके सामान्य करण्यास मदत करतो. जोपर्यंत कोणी मदत करायला येत नाही तोपर्यंत काहीही खाऊ किंवा पिऊ नका. हृदयविकाराचा झटका प्रथमोपचार छातीत जळजळ होणे, असामान्य ठिकाणी वेदना होणे, सतत उलट्या होणे यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, ही हृदयविकाराची लक्षणे असू शकतात. जर पहिला ईसीजी आणि रक्त तपासणी सामान्य असेल तर डॉक्टर 1-3 तासांनी ती पुन्हा करण्यास सांगतील. जर तुम्ही हे केले नाही तर तुमच्या जीवाला धोका असू शकतो. धूम्रपान करू नका आणि तंबाखू सेवन करू नका

जर हृदयविकाराचा झटका आला तर घाबरू नका, ‘या’ 7 टिप्स फॉलो करा Read More »

सावधान…, चुकूनही आंघोळ करताना ‘ही’ चूक करू नका नाहीतर होणार रक्तदाबावर परिणाम

Bathing Blood Pressure : आजच्या या बिझी लाईफस्टाईलमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. जर आरोग्याकडे लक्ष दिलं नाही तर आपल्याला न कळत वेगवेगळ्या आजारांचा सामना आपल्याला करावा लागतो. त्यामुळे आजच्या काळात आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तर दुसरीकडे गेल्या काही वर्षांपासून भारतात अनेकांना उच्च रक्तदाबाची समस्या होता आहे. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? चुकीच्या पद्धतीने आंघोळ केल्याने रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे आंघोळीच्या पद्धतीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. आंघोळ करताना आपण अनेक चुका करतो, ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोक डोक्यावर पाणी ओतून आंघोळ करायला सुरुवात करतात. कारण बहुतेक लोकांना हे माहित नसते की त्यांनी शरीराच्या कोणत्या भागावर पाणी ओतून आंघोळ करायला सुरुवात करावी. शरीराच्या कोणत्या भागावर प्रथम पाणी ओतावे? तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आंघोळ करताना प्रथम पायांवर पाणी ओतले पाहिजे. पायांवर पाणी ओतल्याने शरीर हळूहळू तापमानातील बदल स्वीकारते आणि या परिस्थितीत हृदय आणि मेंदूला अचानक धक्का बसत नाही आणि रक्ताभिसरण संतुलित राहते. पाणी ओतण्याचा योग्य क्रम जाणून घ्या आंघोळ करण्यासाठी, प्रथम तुमच्या पायांवर पाणी घाला. यानंतर, घोट्यापासून गुडघ्यांपर्यंत आणि मांड्यांपर्यंत हळूहळू पाणी ओता. नंतर हातांवर आणि नंतर खांद्यावर पाणी ओता. शेवटी, डोक्यावर पाणी घाला. या क्रमाने आंघोळ करण्याचा काय फायदा? तज्ञांच्या मते, पायांवर प्रथम पाणी ओतल्याने शरीराला हळूहळू थंड तापमानाशी जुळवून घेण्यास वेळ मिळतो आणि रक्तवाहिन्या अचानक आकुंचन पावत नाहीत, ज्यामुळे रक्तदाब अचानक वाढण्याची शक्यता कमी होते. नंतर हळूहळू वरच्या दिशेने पाणी ओतल्याने रक्ताभिसरण सुरळीत राहते आणि शरीराचे तापमानही हळूहळू बदलते. अशा परिस्थितीत शरीरावर कमी दबाव असतो.

सावधान…, चुकूनही आंघोळ करताना ‘ही’ चूक करू नका नाहीतर होणार रक्तदाबावर परिणाम Read More »

कोट्यवधी नागरिक रोज पितात विष; लहान मुलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचा संशय, राजकीय आशीर्वादाचीही चर्चा

Maharashtra News: राज्यात दूध भेसळीचा प्रश्न केवळ खाद्य सुरक्षा किंवा ग्राहक फसवणूक इतकाच राहिलेला नाही. ही बाब आता थेट सार्वजनिक आरोग्याशी निगडित झाली आहे. दररोजच्या आहाराचा अविभाज्य भाग असलेल्या दुधात रसायनांची भेसळ केल्याचे प्रकार सातत्याने समोर येत असून, याचा सर्वाधिक फटका लहान मुलांच्या आरोग्यावर होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेषतः मुलांमध्ये कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत आहे, ही चिंतेची बाब मानली जात आहे. भेसळयुक्त दूध – आरोग्यावर गंभीर परिणाम राज्यात विविध ठिकाणी अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि आरोग्य खात्याच्या संयुक्त तपासणीत भेसळयुक्त दूधाचे नमुने आढळले आहेत. या दुधात डिटर्जंट, युरिया, स्टार्च, साबण, कृत्रिम रंग तसेच काही वेळा औद्योगिक रसायनांचाही वापर केला जात असल्याचे उघड झाले आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे दूध नियमितपणे सेवन केल्यास पचनाच्या समस्या, त्वचेचे विकार, यकृत आणि मूत्रपिंडावर परिणाम तसेच दीर्घकाळात कर्करोगाचा धोका संभवतो. बालकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद यांसारख्या शहरांतील काही शाळकरी मुलांमध्ये गेल्या काही वर्षांत कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचे आरोग्य विभागाच्या माहितीपत्रकांत नमूद आहे. यामागे दूषित दूध व दूधजन्य पदार्थांमधील भेसळ हे एक कारण असू शकते, असा संशय वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे. कारवाई अपुरी, राजकीय आशीर्वादाचा आरोप या गंभीर समस्येमागे स्थानीक स्तरावर राजकीय पाठबळ लाभलेल्या दूध वितरण साखळ्यांचा हात असल्याचीही चर्चा आहे. भेसळ करणाऱ्या गटांवर वेळोवेळी छापे टाकले जातात, मात्र गुन्हेगारी स्वरूपाच्या या प्रकारांवर अद्याप ठोस आणि धडाकेबाज कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सामान्यांची मागणी – ‘शुद्धतेसाठी कठोर कायदा हवा’ ग्राहक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे की, दूध भेसळीविरोधात खास कायदा आणण्यात यावा, दोषींवर फक्त दंड नव्हे तर तुरुंगवासाची शिक्षा व्हावी. तसेच, दूधाच्या शुद्धतेबाबत नियमित तपासणी व अहवाल सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केला जावा, अशीही मागणी आहे. “भेसळीच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या आरोग्यावर होणारा धोका ही सामाजिक आपत्ती मानली पाहिजे,” असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले असून, या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आता अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे.

कोट्यवधी नागरिक रोज पितात विष; लहान मुलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचा संशय, राजकीय आशीर्वादाचीही चर्चा Read More »

Evangeline Booth Hospital : माजी परिचारिका विद्यार्थी स्नेहसंमेलन सोहळा

Evangeline Booth Hospital: इव्हॅनजलीन बूथ हॉस्पीटल, येथे नर्सिंग स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा थाटात संपन्न झाला. फेब्रुवारी 1943 साली बूथ हॉस्पीटल मध्ये नर्सिंग प्रशिक्षण केंद्र सुरू झाले. दर्जेदार प्रशिक्षणाची परंपरा असलेले या संस्थेतून जवळजवळ 2000 विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले, आणि महाराष्ट्रात, भारतात, आणि जगातील विविध भागात सेवा देत आहेत. आजही येथिल विद्यार्थ्यांची देशात आणि परदेशात अधिक मागणी आहे. काहीं कार्यरत आहेत तर काही निवृत्त झाले आहेत. रूग्ण सेवेचा वारसा असलेल्या बूथ हॉस्पीटल चे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांच्या हस्ते आणि मार्गदर्शनात या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. या स्नेहसंमेलना साठी देशाच्या विविध भागातील आणि परदेशात वास्तव्यास असणारे माजी विद्यार्थी उपस्थित होते. जवळपास 40 वर्षानंतर ते सर्व अशाप्रकारे एकत्र आले होते. एकमेकांना भेटण्याची उत्सुकता, भेटल्यानंतर ओळखता येईल का? असा प्रश्न घेउन आलेले सर्व एकमेकांना पाहून भावूक झाले. त्यांची ती गळाभेट, डोळ्यात तरळलेले अश्रू पाहून पाहणाऱ्यांच्या पापण्याच्या कडा ओल्या झाल्या. कार्यक्रमाची सुरुवात जरी भावनिक वातावरनात झाली तरी पुढे जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आलं. गाणं , नृत्य जुन्या आठवणींना बूथ हॉस्पीटल ची शाळा 40 वर्षानंतर पुन्हा भरली. प्रीती भोजनाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हे स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी माजी परिचारिका विद्यार्थी यांनी मोलाचा सहभाग दिला, त्यात काही स्थानिक विद्यार्थ्यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच नर्सिंग स्कूल च्या प्राध्यापक मल्लिका साबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली. या कार्यक्रमासाठी हॉस्पिटल प्रशासक मेजर देवदान कळकुंबे आणि मेजर ज्योती कळकुंबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच सेवा निवृत्त कमिशनर लहासे आणि त्यांच्या पत्नी कमिशनर कुसुम लहासे, कॅप्टन डेनिसन परमार, कॅप्टन निलम परमार, कॅप्टन सुहास वाघमारे आणि कॅप्टन प्रिया वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Evangeline Booth Hospital : माजी परिचारिका विद्यार्थी स्नेहसंमेलन सोहळा Read More »

Health Tips : जास्त पाणी पिणे किडनीसाठी असते धोकादायक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Health Tips : किडनी या शरीरातील एक महत्त्वाचा भाग आहे. जर किडनीचे आरोग्य बिघडले तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. अनेकदा किडनीचे आजार जीवघेणे ठरतात. त्यामुळे किडनीच्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मतानुसार जर जास्त प्रमाणात पाणी प्यायले तर ते किडनीसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे शरीराला आवश्यक तितकेच पाणी प्यावे. जास्त पाणी पिणे रक्तातील सोडियमची पातळी कमी करते. याच कारणामुळे हायपोनाट्रेमियाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. हृदयरोग असणाऱ्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच हायड्रेशनची पूर्ण काळजी घ्यावी. किती पाणी प्यावे?प्रत्येक व्यक्तीस वेगवेगळ्या प्रमाणात पाण्याची गरज असते, परंतु सामान्यत: प्रौढांनी दररोज 2 ते 3 लिटर पाणी प्यावे. दिवसभर पाण्याचे सेवन करत राहा. एकाच वेळी जास्त पाणी पिऊ नका. आपण सकाळी प्रथम एक ग्लास पाणी प्या, त्यानंतर हळूहळू दिवसभर पाण्याचे सेवन करा.

Health Tips : जास्त पाणी पिणे किडनीसाठी असते धोकादायक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत Read More »

Guillain-Barre Syndrome: सावधान…, राज्यात गिलेन-बॅरे सिंड्रोमचे 167 रुग्ण

Guillain-Barre Syndrome: राज्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चे एकूण 192 संशयित रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 167 रुग्णांची पुष्टी झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तर या आजारामुळे एकाचा मृत्यू झाला असल्याची देखील माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. पुणे महानगरपालिका (पीएमसी) मधील 39, पीएमसी क्षेत्रातील नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील 91, पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) मधील 29, पुणे ग्रामीणमधील 25 आणि इतर जिल्ह्यांमधील 8 रुग्णांचा समावेश आहे. सध्या 48 रुग्ण अतिदक्षता विभागात (आयसीयू) आहेत, तर 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. यापूर्वी, 6 फेब्रुवारी रोजी, पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) पुणे शहरातील सिंहगड रोडवरील नांदेड गाव, धायरी आणि आसपासच्या परिसरातील 30 खाजगी पाणीपुरवठा प्रकल्प सील केले होते. या भागांना साथीचे केंद्र म्हणून ओळखले गेले आहे. 6 फेब्रुवारी रोजी, पीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की गेल्या दोन दिवसांत या वनस्पतींवर कारवाई करण्यात आली आहे. पिण्यासाठी अयोग्य आढळलेल्या पाण्याचे नमुने गोळा केल्यानंतर पीएमसीने या वनस्पतींवर कारवाई केली होती. काही वनस्पतींना चालवण्यासाठी योग्य परवानग्या नव्हत्या, तर काही एस्चेरिचिया कोलाई बॅक्टेरियाने दूषित होत्या. याव्यतिरिक्त, काही वनस्पती दूषितता नियंत्रित करण्यासाठी जंतुनाशके आणि क्लोरीन वापरत नव्हत्या. जीबीएस म्हणजे काय ते जाणून घ्या3 फेब्रुवारी रोजी, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या प्रमुख आरोग्य आणि वैद्यकीय मंत्र्यांसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली आणि राज्य आरोग्य अधिकाऱ्यांनी हाती घेतलेल्या सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांचा आढावा घेतला, ज्यामध्ये जीबीएसने बाधित रुग्णांची चाचणी आणि उपचार यांचा समावेश होता. गुइलेन-बॅरे सिंड्रोम ही एक स्वयंप्रतिकार स्थिती आहे जिथे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून परिधीय मज्जासंस्थेवर हल्ला करते, ज्यामुळे गंभीर प्रकरणांमध्ये स्नायू कमकुवत होणे आणि पक्षाघात सारखी लक्षणे उद्भवतात.

Guillain-Barre Syndrome: सावधान…, राज्यात गिलेन-बॅरे सिंड्रोमचे 167 रुग्ण Read More »

Health Tips: रात्री झोपताना मोजे घालण्याचे ‘हे’ आहेत फायदे आणि तोटे

Health Tips: सतत बदलणाऱ्या वातावरणाचा सामना करण्यासाठी स्वतःची खूप काळजी घ्यावी लागते. अशा वातावरणात  प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी डायटवर भर दिला जातो. तर रात्री थंडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी अंगात स्वेटर आणि पायात मायमोजे घातले जातात. ज्यामुळे तुमचे पाय थंड पडत नाहीत आणि शांत झोप लागते. मात्र तुम्हाला रात्री झोपताना मोजे घालण्याची सवयच असेल तर त्याचे तुमच्या शरीरावर चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम होऊ शकतात. यासाठी जाणून घ्या ही महत्त्वाची माहिती. रात्री झोपताना मोजे घालण्याचे फायदेरात्री झोपताना मोजे घालण्याचे अनेक फायदे आहेत जसं की यामुळे तुम्हाला थंडी लागत नाही आणि शांत झोप लागते.  शरीराचे तापमान नियंत्रित राहतेहिवाळ्यात वातावरणात वाढत जाणाऱ्या थंडीमुळे घरातील तापमान हळू हळू कमी होत जाते. याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो आणि शरीरातील तापमान अनियंत्रित होते. ज्यामुळे सर्वात आधी तुमचे हात, पाय आणि नाक थंड होतं. शरीराचे कार्य सुरळीत राहण्यासाठी शरीराला ठराविक तापमानाची गरज असते. यासाठीच जर रात्री झोपताना तुम्ही पायमोजे घातलेले असतील तर रात्रभर तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास  मदत होते. ज्यामुळे बाहेरच्या वातावरणाचा तुमच्या शरीरावर परिणाम होत नाही. रक्तभिसरण सुरळीत होतेरात्री झोपताना पायात मोजे घालण्यामुळे तुमच्या शरीराचे रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होते. कारण मोज्यांमुळे पाय आणि शरीर उबदार राहतं. सहाजिकच यामुळे तुमच्या शरीराला योग्य रक्ताचा पूरवठा आणि ऑक्सिजन मिळते. शरीरातील रक्तपेशी, ह्रदय, रक्तवाहिन्या आणि फुफ्फुसाचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी हे फार आवश्यक आहे. शांत झोप येतेहिवाळ्यात कडाक्याची थंडी पडली की गारव्यामुळे शरीर थंड पडू लागतं आणि त्याचा तुमच्या झोपेवर परिणाम होतो. या काळात नेहमी झोपमोड झाल्यामुळे झोप पूर्ण होत नाही. मात्र जर तुम्ही रात्री झोपताना मोजे घातले असतील तर तुम्हाला रात्री शांत झोप लागते. ज्यामुळे तुमच्या शरीराला पुरेशी झोप मिळते आणि सकाळी तुम्हाला फ्रेश वाटते.  पायाला मुंग्या येत नाहीहिवाळ्यात पाय गार पडल्यामुळे रक्तप्रवाहावर विपरित परिणाम होतो. ज्यामुळे तुमच्या हातापायाला मुंग्या म्हणजेच झिणझिण्या येतात. ज्यामुळे रात्री पाय अचानक बधीर झाल्यासारखा वाटू लागतो. वास्तविक ही हिवाळ्यात सर्वांना जाणवणारी एक सामान्य समस्या आहे. त्यामुळे याबाबत फार चिंता करण्याची गरज नाही. मात्र यामुळे तुमच्या झोपेवर विपरित परिणाम होऊ शकतो आणि निरोगी राहण्यासाठी चांगली झोप गरजेची आहे. रात्री झोपताना मोजे घालण्यामुळे तुमच्या पायांना मुंग्या येत नाहीत.  रात्री झोपताना मोजे घालण्याचे तोटेहिवाळ्यात रात्री पायात मोजे घालण्याचे जसे फायदे आहेत तसेच अनेक तोटेदेखील आहेत. जे तुम्हाला  माहीत असायला हवे. इनफेक्शनचा धोकाझोपताना मोजे घालायचे असतील तर ते प्रत्येकवेळी स्वच्छ करणं गरजेचं आहे. जुने अथवा सतत वापरलेले मोजे घालल्यामुळे तुमच्या शरीराला इनफेक्शनचा धोका वाढतो. कारण पायाला मोजे घातल्यामुळे घाम येतो आणि हा घाम मोज्यांमध्ये मुरतो. जर तुमचे मोजे सुती नसतील तर सतत घाम येण्यामुळे तुमच्या पायाचे आरोग्य बिघडू शकते.  रक्ताभिसरण बिघडण्याची शक्यतारात्री मोजे घातल्यामुळे तुमच्या शरीराचे रक्ताभिसरण सुधारत असले तरी कधी कधी याचा विपरित परिणामही जाणवू शकतो. कारण जर तुम्ही तुमच्या पायापेक्षा घट्ट, हवा खेळती राहणार नाही असे मोजे घातले तर त्यामुळे पायाच्या रक्तप्रवाहात अडथळा येऊ शकतो. याचा परिणाम तुमच्या संपूर्ण शरीराच्या रक्ताभिसरणावर होण्याची शक्यता असते.  शरीराच्या तापमानात बदलहिवाळ्यात मोजे घालणं गरजेचं आहे कारण त्यामुळे तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहते. मात्र जर तुम्ही चुकीचे म्हणजेच हवा खेळती न राहणारे मोजे घातले तर यामुळे तुमच्या पायाचे तापमान अचानक वाढून तुम्हाला ओव्हर हिटिंगचा त्रास होऊ शकतो. कारण शांत झोप येण्यासाठी तुमच्या शरीराचे तापमान अती प्रमाणात कमी अथवा अती प्रमाणात जास्त वाढून चालणार नाही. यासाठीच नेहमी झोपताना सुती, हवेशीर मोजेच घालावे. 

Health Tips: रात्री झोपताना मोजे घालण्याचे ‘हे’ आहेत फायदे आणि तोटे Read More »