DNA मराठी

Maharashtra

IMG 20240109 WA0020

Maharashtra News:  गुटखा विक्री करणाऱ्या 3 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Maharashtra News: राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेली सुगंधी तंबाखु, पानमसाला व गुटखा विक्री करणाऱ्या 3 आरोपींना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने 12,40,000 रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे.  अहमदनगर पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.  पोनि दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, शाहरुख शहा, नदीम शेख व रिजवान शेख (सर्व रा. वार्ड नं.2, ता. श्रीरामपूर) हे त्यांचा हस्तक दानिश सय्यद रा. वार्ड नं.2, ता. श्रीरामपूर व त्याचा साक्षीदार यांचे मार्फतीने सुगंधीत तंबाखु, पानमसाला व गुटखा राजु शेख व वसीम (रा. बीड) यांचेकडुन खरेदी करुन बीड जामखेड मार्गे अहमदनगर शहरात येणार आहे.  या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिचोंडी पाटील येथे सापळा लावून आरोपींना अटक केली आहे. पोलीसांनी या कारवाईत विविध प्रकारची सुगंधी तंबाखु, गुटखा, पानमसाला, एक अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो व एक टाटा इंडीगो कार असा एकुण  12,40,000 रुपये किंमतीचे मुद्देमालासह जप्त केला आहे.  शिवाजी अशोक ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये भादविक 328, 188, 272, 273, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशिर कारवाई नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.

Maharashtra News:  गुटखा विक्री करणाऱ्या 3 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई Read More »

Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar: धक्कादायक! कारखान्याला भीषण आग, सहा मजुरांचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज मिडक येथील एका कारखान्यात काल रात्री भीषण आग लागली.  या अपघातात सहा मजुरांचा मृत्यू झाला. व्हॅलुज इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये हातमोजे तयार करणाऱ्या सनशाईन एंटरप्रायजेसने मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली.  आग इतकी तीव्र होती की संपूर्ण कंपनी उध्वस्त झाली. अग्निशामक ब्रिगेडला आग विझवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. या आगीमध्ये सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की फॅक्टरीला वाळूज मिडीसी क्षेत्रात आग लागली. रात्री आग लागली तेव्हा कंपनी बंद झाली होती. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक वाहने घटनास्थळी पाठविली गेली. परंतु जेव्हा बचाव कर्मचारी अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचले तेव्हा सर्व काही संपले. असे सांगितले जात आहे की मृतदेह जाळले गेले नाहीत, म्हणून प्रारंभिक अंदाज असा आहे की धुरामुळे कामगार गुदमरल्यासारखे मरण पावले असते. पोलिस आयुक्त मनोज लोहिया म्हणाले, रात्री 1. 15 वाजता छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज मिडीसी भागात कंट्रोल रूममध्ये कंट्रोल रूमची नोंद झाली. रात्री पोलिस एसीपी घटनास्थळी पोहोचले. तपासणी पूर्ण झाल्यानंतर पुढील माहिती उघडकीस येईल. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मृत मुश्ताक शेख (वय 65), कौशर शेख (वय 32), इक्बाल शेख (वय 18), काकांजी (वय 55), रियाझभाई (वय 32), मार्गम शेख (वय 33 वर्षे वय 33 वर्षे) ) घडले. तथापि, मृत व्यक्ती तिथे अडकला की झोपला होता हे अद्याप स्पष्ट झाले नाही. माहिती प्राप्त होताच अग्निशमन दलाने त्वरित घटनास्थळी पोहोचली. ज्या ठिकाणी हे लोक अडकले होते तो रस्ता पूर्णपणे ज्वालांमध्ये गुंतला होता. अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी आग विझविली, परंतु धूर आणि उष्णता इतकी जास्त होती की ते त्वरित वर जाऊ शकले नाहीत. यानंतर शीतकरण ऑपरेशन झाले. यानंतर, ते काळजीपूर्वक वरच्या मजल्यावर पोहोचला. जिथे त्यांना खोलीत हृदय -विखुरलेले दृश्य पाहिले. त्या खोलीत सहा लोक मरण पावले होते. त्यात एक कुत्रा देखील होता.  अधिकाऱ्यांनी सांगितले की ही आग कारखान्याच्या आसपास होती आणि हे लोक पहिल्या मजल्याच्या आत अडकले होते.  अधिकाऱ्यांनी असेही म्हटले आहे की, आग का लागली याची अद्याप माहिती मिळाली नाही, पुढील तपास चालू आहे.

Chhatrapati Sambhajinagar: धक्कादायक! कारखान्याला भीषण आग, सहा मजुरांचा मृत्यू Read More »

IMG 20240101 WA0005

Maharashtra News: अवैध जुगार व्यवसाय बंद करा अन्यथा शेवगाव-गेवराई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन…!

Maharashtra News : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव सह ग्रामीण भागात जुगाराचे मोठमोठे फड सुरू आहे. “बिनधास्त या आणि खेळा’ या धर्तीवर काही घरात तर ठिक- ठिकाणी दिवसाढवळ्या, रात्रंदिवस जुगार सुरु असल्याकारणाने गावात अशांतता निर्माण झाली असून व्यसनाधीन लोकांच्या घरात दररोज भांडणतंटे होत असल्याने घराघरात अशांतता पसरली आहे.  तसेच दादागिरी करुन पैशांची मागणी करणे, सट्टा, पत्ता, जुगार खेळण्यासाठी घरातील संसारपयोगी वस्तू व धान्य विकून तसेच एवढ्यावरच न थांबता घरातील महिलांच्या अंगावरील दागदागिने सौभाग्याच लेण मंगळसूत्र मोडून किंवा गहाण ठेवून तसेच शासनमान्य स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य विकून व्यसनपूर्ती करत असून या भागातील सुरू असलेले जुगार व्यवसाय तातडीने बंद करून संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा कुठल्याही क्षणी शेवगाव-गेवराई राज्य महामार्गावर बोधेगाव या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन बोधेगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण यांनी अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना ईमेलद्वारे दिले आहे.  अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना ईमेलद्वारे दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे  की, बोधेगाव येथे बेकायदा जुगाराच्या अड्ड्यामुळे या भागातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. इतर तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील गुन्हेगार प्रवृत्तीचे युवक देखील जुगार खेळण्यासाठी बोधेगावात येत असून यामुळे चोऱ्या होण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे या भागातील सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गावातील 17 ते 24 वर्षातील तरुण मुलांची वर्दळ वाढलेली आहे, पत्ते खेळायला तरुण मुलांची गर्दी व्हायला पाहिजे म्हणून दारू, मटण, सिगारेट इत्यादी सह अन्य आमिषे दिले जात आहे.  अवैध सुरू असलेल्या जुगार व्यवसायामुळे या भागातील गुन्हेगारी देखील बोकाळत चालली आहे. त्यामुळे बोधेगाव परिसरातील तरुण पिढी व्यसनाधीन होऊन त्यांचे भविष्य खराब करण्याचे काम अवैध जुगार व्यवसाय चालवणाऱ्याकडून या भागात सुरू असून सर्वसामान्यांचे संसार वाचविण्यासाठी जुगाराच्या अड्ड्यांवर कारवाई करावी  तसेच पोलिसांकडून यावर कारवाई न झाल्यास जुगाराच्या अड्ड्यावर महिला मोर्चा नेऊन तो बंद पाडू अशी मागणी बोधेगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण यांनी अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना ईमेलद्वारे दिले लेखी निवेदनद्वारे केली आहे.

Maharashtra News: अवैध जुगार व्यवसाय बंद करा अन्यथा शेवगाव-गेवराई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन…! Read More »

Maharashtra Accident

Maharashtra Accident: मोठी बातमी! फायर कँडल कंपनीला भीषण आग, 7 जणांचा होरपळून मृत्यू

 Maharashtra Accident :  पिंपरी-चिंचवड शहरातील मेणबत्ती बनवणाऱ्या कारखान्याला लागलेल्या आगीत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तळवडे, पिंपरी चिंचवड येथे लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या अपघातात किमान सहा जण जखमी झाले आहेत. केकवर लावल्या जाणार्‍या मेणबत्त्या कारखान्यात बनवल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे परिसरात एका कारखान्याला लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत्यू झालेल्या सात जणांपैकी बहुतांश महिला आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तळवडे येथे शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास भीषण आग लागली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने सात जणांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. चिखली व देहूरोड पोलीस तसेच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी हजर आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या आगीत फायर कँडल कंपनी जळून खाक झाली. अजूनही काही लोक अडकले असण्याची भीती आहे. मृत आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ज्वलनशील पदार्थ असल्याने आग वेगाने पसरली असल्याचे सांगण्यात येत आहे. काही वेळातच आगीने संपूर्ण कॉम्प्लेक्सला वेढले. अशा परिस्थितीत तिथं काम करणा-या लोकांना पळून जाण्यास वेळ मिळाला नाही. सध्या आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.

Maharashtra Accident: मोठी बातमी! फायर कँडल कंपनीला भीषण आग, 7 जणांचा होरपळून मृत्यू Read More »