DNA मराठी

ताज्या बातम्या

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ! नेमकं कारण काय?

Pankaja Munde : दिवसेंदिवस भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाद होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा 19 कोटी रुपयांचा साखरेवरील जीएसटी न भरल्यामुळे नोटीस देण्यात आली होती. आता त्यांना पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली आहे. नेमकं कारण काय? या कारखान्याने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची तब्बल 61 लाख 47 हजार रुपये रक्कम थकवली आहे. ही रक्कम भरली नसल्याने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने त्यांच्या कारखान्याला नोटीस बजावली आहे. मागील काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणाने वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना बंद करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.  कारखाना बंद असल्याने या साखर कारखान्याने कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम संबंधित कार्यालयाकडे भरली नाही. त्यामुळे ही नोटीस दिली आहे. हा पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, जीएसटीची नोटीस आल्यानंतर कार्यकर्त्यांनी पैसे जमा केल्यानंतर पंकजा मुंडे भारावून गेल्या होत्या. पण त्यांनी हे पैसे घेतले नाहीत. “तुमचे प्रेम माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील खात्यात जमा करा. तेच माझ्यासाठी खूप गरजेचे आहे. मला तुमच्याकडून रक्कम घेणं योग्य वाटत नाही. कारण माझा स्वाभिमान मला ते करू देत नाही,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ! नेमकं कारण काय? Read More »

Sujay Vikhe News: 28 व 29 फेब्रुवारी रोजी नगरमध्ये विभागस्तरीय “नमो महारोजगार” मेळावा

Sujay Vikhe News : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत अहमदनगर जिल्ह्यात नाशिक विभागस्तरीय “नमो महारोजगार” मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.  हा मेळावा 28 व 29 फेब्रुवारी रोजी भिस्तबाग महल मैदान, अहमदनगर येथे होणार असून या मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. त्यानुषंगाने नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी बेरोजगार युवक-युवतींची नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच जास्तीत जास्त आस्थापनांनी सहभागी होऊन रोजगार उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.  “नमो महारोजगार मेळावा” संबंधीची पूर्वतयारी आढावा बैठक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुजय विखे पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, कौशल्य विकास विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, जिल्हाधिकारी नाशिक जलज शर्मा, जिल्हाधिकारी अहमदनगर सिद्धराम सालीमाठ, जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी धुळे अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी नंदुरबार सुधीर खांदे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी,  कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे उपायुक्त सुनिल सैंदाणे, उपायुक्त राणी ताटे, तहसिलदार कुंदन हिरे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण नाशिकचे सहसंचालक रविंद्र मुंडासे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, नाशिक इंद्रशाम काकड, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, धुळे मनोजकुमार चकोर दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. महसूल मंत्री श्री.विखे पाटील पुढे म्हणाले की, या रोजगार मेळाव्यासाठी जास्तीत जास्त कंपन्यांनी त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती द्यावी. तसेच जास्तीत जास्त शहरी व ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण-तरुणींपर्यंत या “नमो महारोजगार” मेळाव्याची माहिती पोहोचवावी. त्यांची पोर्टलला नोंदणी करून घ्यावी. हा रोजगार मेळावा सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी संबधित सर्व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे.  जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in  या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी व रिक्त पदे अधिसूचित, जाहीर करणे तसेच उमेदवार नोंदणी व रिक्त पदांसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.  जास्तीत जास्त तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी शासकीय तंत्र निकेतन, विविध औद्योगिक संस्था, नाशिक विभागातील सर्व विद्यापीठे यांचा देखील समावेश करण्यात यावा. तसेच मेळाव्याच्या ठिकाणी तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शन केंद्र तयार करावे. रोजगार मेळाव्याबाबत विविध माध्यमाद्वारे प्रचार प्रसिध्दी करावी व नोंदणीसाठी डिजीटल माध्यमद्वारे नोंदणीसाठी लिंक तयार करणे व सदर लिंक जिल्हा परिषद, महानगरपालिका समाज कल्याण विभाग व इतर विभागाच्या पोर्टलवर लिंक उपलब्ध करुन देण्यात यावी व आपल्या पोर्टलवरील नोंदणीकृत असलेले उमेदवार व उद्योजक/आस्थापना यांना मेळाव्यास सहभागी होणेसाठी प्रोत्साहित करावे असे, असेही श्री विखे-पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी मेळावा यशस्वी होण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करावे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक विभागातील रोजगार मेळव्याच्या तयारीबाबतची माहिती महसूल मंत्री श्री.विखे पाटील यांना सादर केली. यावेळी श्री.गमे यांनी सांगितले की, रोजगार मेळाव्यात एकूण 200 पेक्षा अधिक आस्थापना सहभागी होणार असून 30 हजार उमेदवारांची उपस्थिती अपेक्षित आहे. तसेच प्राथमिक निवड मध्ये 15 हजार उमेदवारांची निवड होऊन 10 हजार उमेदवारांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे. तसेच सर्व जिल्हाधिकारी यांचेशी वेळोवेळी संपर्क साधून मेळव्याच्या नियोजनाबाबत आढावा घेण्यात येत असल्याचे, श्री. गमे यांनी सांगितले. महसूल मंत्री श्री.विखे पाटील यांना विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांनी जिल्हानिहाय मेळाव्याच्या तयारीची माहिती दिली.

Sujay Vikhe News: 28 व 29 फेब्रुवारी रोजी नगरमध्ये विभागस्तरीय “नमो महारोजगार” मेळावा Read More »

Ahmednagar News : अहमदनगर – छत्रपती संभाजी नगर रोडवर टायर पेटवले, वाहतुकीची कोंडी

Ahmednagar News:  अहमदनगर छत्रपती संभाजी नगर महामार्गावर शेंडी जवळ अज्ञात व्यक्तीने टायर जाळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र अद्याप टायर पेटवणारा कोण? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.  तर दुसरीकडे राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून त्यामुळे टायर पेटवून दिल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.  सध्या मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणी करिता राज्यात अनेक आंदोलने होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याची शक्यता आहे.

Ahmednagar News : अहमदनगर – छत्रपती संभाजी नगर रोडवर टायर पेटवले, वाहतुकीची कोंडी Read More »

Ahmednagar News: व्हाट्सअप ग्रुपवर मराठा समाजाची बदनामी, गुन्हा दाखल

Ahmednagar News:  मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण   मिळावा या मागणी करिता आमरण उपोषण सुरू केला आहे. या उपोषणाला समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाकडून 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला अहमदनगर शहरात देखील प्रतिसाद मिळाला. तर दुसरीकडे शेंडी गावातील सरपंच प्रयागा प्रकाश लोंढे यांना गावातील काही लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना कचरा टाकण्याकरीता खड्डा करण्याच्या वादातून घडली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या घटनेला जातीय रंग देऊन लोंढे यांना झालेली मारहाण ही मराठा ओबीसी वादातून झाली असल्याची पोस्ट एका  व्यक्तीने सोशल मीडियावर टाकली.   आता या प्रकरणात तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये रामदास जरांगे यांच्या फिर्यादीवरून कलम 501 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहे.

Ahmednagar News: व्हाट्सअप ग्रुपवर मराठा समाजाची बदनामी, गुन्हा दाखल Read More »

Maratha Reservation: मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, सरकारने उचलले ‘हे’ पाऊल

Maratha Reservation :  10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहे. आज या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे.  राज्य सरकारने गेल्या महिन्यात काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास मुंबईत नव्याने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. वृत्तानुसार, मनोज जरांगे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. बुधवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सलाईन द्यावे लागले. मात्र नंतर त्यांनी सलाईन काढून आरक्षण लागू होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याची घोषणा केली. त्यानंतर आज मनोज जरांगे यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे.  गावकरी आणि मराठा कार्यकर्त्यांच्या वारंवार सांगण्यावरून त्यांनी थोडे पाणी प्यायले. दरम्यान, उपोषणस्थळी मोठ्या संख्येने लोक जमा झाले आहेत. मनोज जरांगे यांची प्रकृती चिंताजनक मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा सातवा दिवस आहे. आता त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे, ही चिंतेची बाब आहे. शरीरात पाण्याची तीव्र कमतरता आहे. अशक्तपणामुळे त्याला चक्कर येत आहे. अन्न, पाणी आणि औषधही घेण्यास नकार देणाऱ्या पाटील यांना तातडीने उपचारांची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मराठा आंदोलक त्यांना सतत पाणी पिण्याचा आग्रह करत आहेत.   PM मोदींचा कार्यक्रम थांबवणार – जरांगे मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळत असल्याचे पाहून काल त्यांना पाणी देण्यात आले. यामुळे ते संतप्त झाले आणि म्हणाले, “ज्यांनी मला झोपेत पाणी दिले तेच आता मराठा आरक्षण लागू करण्याची जबाबदारी घेत आहेत.” सरकार गप्प बसू शकत नाही आणि असे मानू शकत नाही की माझेच लोक या मार्गाने माझा मृत्यू रोखतील. जर सरकारने दोन दिवसांत कारवाई केली नाही तर मी पुन्हा मुंबईत उपोषण सुरू करेन. याआधी जरांगे यांनी आंदोलनस्थळावरूनच इशारा दिला होता की, जर आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर पीएम मोदींची एकही रॅली महाराष्ट्रात होऊ दिली जाणार नाही. 20 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला. मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी 20 फेब्रुवारीला विधानसभेचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यास शिंदे सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता 20 फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी अधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे. कुणबी मराठ्यांच्या रक्ताच्या नातेवाइकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतच्या प्रारुप अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. हायकोर्टात सरकार काय म्हणाले? दरम्यान, बुधवारी महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले की, इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गात कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन पात्र मराठ्यांचा समावेश करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत. मराठा समाजाला ओबीसी गटांतर्गत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणाला बसण्याची गेल्या वर्षभरात ही चौथी वेळ आहे.

Maratha Reservation: मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, सरकारने उचलले ‘हे’ पाऊल Read More »

Amit Shah : मिळणार दिलासा? कांदा निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात विखे पिता-पुत्रांची अमित शहांची भेट

Amit Shah: राज्यसभेच्या निवडणुकी नंतर लोकसभा निवडणुकीचे पडघम आता कधीही सुरू होऊ शकतात. अब की बार चारसौ पारची घोषणा केलेल्या भाजपकडून यादृष्टीने उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच विखे परिवाराकडून भाजपचे चाणक्य अमित शहा यांच्या भेटी वाढल्या आहेत.  मागील आठवड्यातच खा.सुजय विखे यांनी कांदा निर्यात आणि दरवाढ प्रश्नी अमित शहा यांची भेट घेतली होती. तर गुरुवारी पुन्हा खा.विखे यांच्यासह महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अमित शहांची भेट घेतली असून ही भेट कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात तसेच यावर तातडीने तोडगा काढण्याची विनंती केली आहे.  तसेच यावेळी शहा यांनी विखे पितापुत्रां सोबत महाराष्ट्रातील एकूण राजकीय घडामोडी आणि परिस्थितीवर महत्वपूर्ण चर्चा केल्याचे समजते. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना कांदा प्रश्नी शेतकऱ्यांची नाराजी अडचणीची ठरणारी आहे. कांद्या संदर्भातील शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि सरकारकडून असलेली अपेक्षा शहा  यांच्यासमोर मांडण्यात आल्या. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असून त्यात नगर,नाशिक,पुणे या कांदा पट्यातील शेतकरी पूर्ण कांदा पिकावर अवलंबून असतो, अशात निर्यात बंदीचा फटका शेतकर्यांना बसत आहे. त्यामुळे तातडीने कांदा निर्यात बंदी उठवावी किंवा नाफेड मार्फत योग्य भावात सरकारने कांदा खरेदी केंद्र सुरू करावेत यावर चर्चा झाली. यावेळी अमितभाई शाह यांनी लवकरात लवकर केंद्र सरकार कांद्याच्या निर्याती संदर्भात निर्णय घेईल, यावर लवकरच केंद्र सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणारा चांगला निर्णय घेईल असे शाह यांनी मंत्री विखे आणि खा.विखे यांना आश्वासीत केले आहे. दरम्यान या भेटी वेळी शहा यांनी राज्यातील चालू राजकीय घडामोडींवर देखील सविस्तर चर्चा करण्यात आली.  विरोधकांप्रमाणे सत्तेत असलेल्या भाजपनेही आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही. मात्र पक्षांतर्गत खात्रीशीर उमेदवारांना लोकसभेच्या तयारीला लागण्याचे संकेत अंतर्गत पातळीवर देण्यात आल्याची माहिती समजते. तसेच उमेदवारांच्या नावांची घोषणा नसल्याने इच्छुकांच्या चुळबुळी सुरूच असल्याचे काही ठिकाणी चित्र आहे.  अशात खा.सुजय विखेंच्या  पक्षाचे महत्वपूर्ण नेतृत्व असलेल्या अमित शहांसोबत सातत्याने भेटी होत असून आज गुरुवारी खा.विखेंच्या सोबतच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शहा यांची भेट घेत कांदा प्रश्नासह राज्यातील विविध विषयांवर तसेच राजकीय घडामोडींवर चर्चा केली.

Amit Shah : मिळणार दिलासा? कांदा निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात विखे पिता-पुत्रांची अमित शहांची भेट Read More »

Maharashtra News: शाळांना मिळणार सोलर पॅनल! खा. डॉ. सुजय विखे पाटलांची मोठी घोषणा

Maharashtra News: दिवसेंदिवस शिक्षण प्रणालीमध्ये बदल होत आहेत. अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून आमूलाग्र बदल घडवत शैक्षणिक दर्जा वाढविण्याचा प्रयत्न आजमितीला होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता ग्रामीण भागामध्ये जितक्या अनुदानित शाळा आहेत अशा शाळांना सोलर पॅनल बसवणार असल्याचा निर्धार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त आहे. नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, करंजी येथे विविध खेळांचे मैदानी व इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त वर्गांचे उद्घाटन खासदार डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी उद्घाटन झाल्यानंतर शाळेत विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसून शिक्षकांचे अध्यापन ऐकले. विशेष म्हणजे बसविण्यात आलेल्या या इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांसाठी शिकणे अधिक सोपे झाले असून या बोर्डच्या मदतीने शिक्षक गुगल तसेच युट्यूबसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. हवी ती माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना दर्जेदार व उत्तम शिक्षण देण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असून शैक्षणिकदृष्ट्या सकारात्मक गोष्टींना प्राधान्य देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांतून ग्रामीण भागातील शिक्षण आज दर्जेदार होत आहे. याच अनुषंगाने गोरगरिबांना उच्चशिक्षित सुविधा मिळण्यासाठी आपण डिजिटल बोर्ड देखील दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून विद्यार्थी अधिक सक्षम कसा बनेल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे मत खासदार सुजय विखेंनी मांडले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मागील वर्षात १०० व यावर्षी २०० डिजिटल बोर्ड आपण जिल्हा परिषद शाळांना दिली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.  यासोबतच विद्यार्थी हा समाजाचा एक महत्वपूर्ण घटक असून उद्याच्या विकसित भारतामध्ये त्यांची भूमिका ही फार महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले आणि सुशिक्षित नेतृत्व निवडून दिल्यानंतर आपण काय विकासरुपी कायापालट करू शकतो याबद्दल विद्यार्थ्यांना सांगणे फार गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.

Maharashtra News: शाळांना मिळणार सोलर पॅनल! खा. डॉ. सुजय विखे पाटलांची मोठी घोषणा Read More »

Maharashtra News: अहमदनगर येथील विशेष मुलांचे राष्ट्रीय पातळीवर निवड

Maharashtra News : अहमदनगरमध्ये  स्पेशल ऑलिम्पिक भारत अहमदनगर यांच्या मार्फत दि. ३० डिसेंबर २०२३ रोजी  जिल्हास्तरीय स्पर्धेतून १० विद्यार्थ्यांची राज्यस्तरिय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती.   दि. ३० जानेवारी ते ०१ फेब्रुवारी २०२४ दरम्यान स्पेशल ओलंपिक भारत  राज्यस्तरीय चॅम्पियनशिप स्पर्धा ही नागपूर येथिल “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ” येथे पार पडल्या असून या  राज्यस्तरीय स्पर्धेत ०४ सुवर्ण, ०५ रोप्य व २ रजत असे एकून ११ पदकांची कमाई केली.  त्यामध्ये वयोगट २२ ते २९  चि. बाबू यांनी ५० मी. व २५  मी फ्रीस्टाईल स्विमिंग या क्रीडा प्रकारात, प्रथम क्रमांक मिळवून 2 सुवर्ण पदकांची कमाई केली.  चि.जयसिंग यादव यांनी वयोगट २२ ते २९ मध्ये २०० मी. धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक पटकावले. चि. दिपक पावरा याने १९  ते २१ या वयोगटात १००  मीटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक मिळविले. तसेच त्याने लांब उडीमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून रौप्य पदकाची कमाई केली. चि. वैभव जाधव यांनी २२ ते २९ या वयोगटात २०० मी. धावणे या  क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवून रोप्य पदकाची कमाई केली.  चि. कृष्णा याने १६ ते १८ या वयोगटात १०० मी. धावणे या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक मिळवून रजत पदकांची कमाई केली. चि. दिपेंद्र ढमाले याने २२ ते २९ या वयोगटातील २५ मी. फ्रीस्टाईल जलतरण या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवून रोप्य पदकाचा मानकरी ठरला. कुमारी मादुरे महंडुळे हिने २२ ते २९ या वयोगटातील १०० मी. धावणे या क्रीडा प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक मिळवून रौप्य पदकाची मानकरी ठरली.  चि. अजय काकडे याने २२ ते २९ या वयोगटातील २०० मी. धावणे या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून रोप्य पदकाचा मानकरी ठरला. चि. रज्जाक गोच्चू याने १६ ते २१ या वयोगटात २०० मी. धावणे या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक मिळवून रजत पदकाचा मान मिळवला. कुमारी प्रेरणा भाटिया हिने १०० मी. धावणे स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवून सहभाग नोंदवला.  या विशेष ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, स्विमिंग, फुटबॉल, हॉलीबॉल, यांसारख्या विविध क्रीडा स्पर्धा होत्या. या स्पर्धेत एकूण ३६ जिल्ह्यांतील एकूण ६००   विद्यार्थ्यांनी व १५० प्रशिक्षकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.  या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचे बक्षीस वितरण करण्यासाठी  डॉ. सौ. मेधा सोमय्या (अध्यक्ष स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र), मा. श्री. डॉ. सिद्धार्थ गायकवाड (प्रादेशिक आयुक्त समाजकल्याण विभाग नागपूर), मा. श्री. भगवान तलवारे (क्षेत्र संचालक महाराष्ट्र), मा. श्री. जितेंद्र ढोले (क्रीडा संचालक SOB), मा. श्री. उदय गोजमगुंडे (संचालक) आदि मान्यवर उपस्थित होते.     अहमदनगर येथील सर्व विजेत्या खेळाडूंचे दक्षिण अहमदनगरचे खासदार मा. डॉ. सुजय विखे पाटील, तसेच मा. श्री. राधाकिसन देवढे  (समाज कल्याण अधिकारी अहमदनगर)     सौ. धनश्रीताई विखे पाटील (अध्यक्ष स्पेशल ऑलिम्पिक भारत अहमदनगर) व मा. श्री. डॉ. अभिजीत दिवटे (उपाध्यक्ष स्पेशल ऑलिम्पिक भारत अहमदनगर), यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.   मार्गदर्शन करणारे मा. श्री. डॉ. दिपक अनाप, मा. श्री. डॉ. अभिजीत मेरेकर, व मा. श्री. डॉ. किरण आहेर यांनीदेखील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.  तसेच या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी या स्पर्धक खेळाडूंना त्यांचे  क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक श्री संदीप राहणे सर, श्री हर्षल वाणी, श्री. अमोल चौधरी,  श्री शिरसाट सर, श्री. दत्तात्रेय कोलते सर, सौ. सुशीला जाधव मॅडम इ. प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही खेळाडूंचे  अभिनंदन केले. या सर्व यशस्वी  विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Maharashtra News: अहमदनगर येथील विशेष मुलांचे राष्ट्रीय पातळीवर निवड Read More »

Health Tips 2024 : फणस खात नसाल तर आवडीने खायला सुरू कराल, आहेत ‘इतके’ फायदे

Health Tips 2024 : फणसात असे बरेच पौष्टिक घटक आढळतात जे आपल्या आरोग्यास फायदेशीर असतात. या मध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह सारखे गुणधर्म असतात. या शिवाय ह्यात मुबलक प्रमाणात फायबर देखील आढळतं. आज या लेखात आम्ही  फणसाच्या काही फायद्याबद्द सांगणार आहोत, याची माहिती मिळाल्यावर आपण फणस आवडीने खाऊ लागणार. फणस हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. डोळे आणि त्वचा  फणसात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ए आढळतं जे डोळ्यांचा प्रकाश वाढवतो आणि त्वचेला व्यवस्थित ठेवतो. रक्तदाब या मध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम आणि लोह आढळतं जे रक्तदाबासारखे गंभीर त्रासाला दूर करत आणि शरीरातील रक्त विसरणं वाढवतं. तोंडात छाले झाले असल्यास  ज्या लोकांना तोंडात वारंवार छाले होत असल्यास त्यांनी फणसाची कच्ची पानं चावून थुंकली पाहिजेत. या मुळे तोंडाचे छाले बरे होतात. हृदय विकार फणसात अजिबात कॅलरी नसते. हे हृदयच्या रुग्णांसाठी उपयुक्त असतं.  मजबूत हाडे  हाडांसाठी फणस खूप फायदेशीर मानले जाते. या मधील असलेले मॅग्नेशियम हाडांना बळकट करतं.

Health Tips 2024 : फणस खात नसाल तर आवडीने खायला सुरू कराल, आहेत ‘इतके’ फायदे Read More »

Health Tips: काय सांगता, पेरूची पाने देखील आहे खूपच फायदेशीर, फायदे जाणून व्हाल थक्क

Health Tips: पेरू औषधी गुणधर्माने समृद्ध मानला आहे. याच्या सेवनाने बरेच आरोग्यदायी फायदे मिळतात. याला उलट्या रोखण्यासाठी असरदार मानतात, तसेच हृदयरोगापासून देखील बचाव होतो.  तसे, तर हे भारतात मिळणारे एक साधे फळ आहे, ज्याचे प्राचीन संस्कृत नाव अमृत किंवा अमृत फळ आहे. वाराणसी मध्ये ह्याला लोक अमृत नावानेच संबोधित करतात. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? पेरू प्रमाणेच त्याची पाने ही देखील खूप उपयुक्त असतात.  हे जाणुन घ्या, या मध्ये अँटी ऑक्सीडेन्ट, अँटी बेक्टेरियल आणि अँटी इन्फ्लमेन्टरी गुणधर्म असतात, जे आपल्याला अनेक आजारांपासून संरक्षण करतात. चला जाणून घेऊ या पेरूच्या पानाचे फायदे.  पोट दुखी आणि उलट्या मध्ये देखील आराम देतात पेरूच्या पानात अँटी बेक्टेरियल गुणधर्म असतात, अशा मध्ये त्याच्या पाण्याच्या सेवन केल्याने आपल्या पोटाचे दुखणे दूर होऊ शकतात. तसेच हे आपल्याला उलट्यांपासून देखील आराम देतात. यासाठी आपण पेरूच्या 5 -6 पानांना 10 मिनिटे उकळवून घ्या आणि नंतर गाळून त्याचे पाणी प्या.  सांधे दुखीचा त्रास दूर करतो  सांधे दुखी मध्ये देखील पेरूची पाने फायदेशीर आहे. या साठी आपण पेरूची पाने वाटून त्याचे लेप बनवा आणि त्या लेपाला सांध्यांवर लावावे, या मुळे आपल्याला वेदनेपासून आराम मिळेल. मधुमेहात देखील फायदेशीर पेरूची पाने पाण्यात टाकून प्यायल्याने हे मधुमेहासाठी फायदेशीर मानले जातात. वास्तविक हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करतं. या शिवाय हे शरीरातील जटिल स्टार्च साखरे मध्ये बदलण्यापासून रोखत, ज्यामुळे हे वजन कमी करण्यास मदत करतं. दाताच्या दुखण्यापासून आणि हिरड्यांची सूज कमी करतं पेरूच्या पानाचे पाणी दात दुखणं, हिरड्यांची सूज आणि तोंडाच्या छाला पासून आराम देण्याचे काम करतं. आपण याचे पाने उकळवून त्याचा पाण्याने गुळणे करा. असे केल्यास आपल्याला खूप आराम मिळेल.

Health Tips: काय सांगता, पेरूची पाने देखील आहे खूपच फायदेशीर, फायदे जाणून व्हाल थक्क Read More »