DNA मराठी

स्पोर्ट्स

nz vs ind

NZ vs IND 2026 : न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडिया; 6 वर्षांनंतर पुन्हा कसोटी मालिका

NZ vs IND 2026 : भारतीय क्रिकेट संघ यंदा ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 दरम्यान न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असून हा दौरा दोन्ही देशांमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा द्विपक्षीय क्रिकेट दौरा ठरणार आहे. या दौऱ्यात भारत 5 टी-20, 5 वनडे आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. विशेष म्हणजे भारत तब्बल सहा वर्षांनंतर न्यूझीलंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळणार आहे. भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये अखेरची कसोटी मालिका 2019-20 मध्ये खेळली होती. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या माहितीनुसार, एकूण 12 सामन्यांचा हा दौरा त्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय दौरा ठरणार आहे. सामने न्यूझीलंडमधील प्रमुख पाच शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. दौऱ्याचे वेळापत्रक टी-20 मालिका 22 ऑक्टोबर – पहिला टी-20, क्राइस्टचर्च 24 ऑक्टोबर – दुसरा टी-20, क्राइस्टचर्च 27 ऑक्टोबर – तिसरा टी-20, वेलिंग्टन 30 ऑक्टोबर – चौथा टी-20, ऑकलंड 1 नोव्हेंबर – पाचवा टी-20, हॅमिल्टन वनडे मालिका 4 नोव्हेंबर – पहिला वनडे, ऑकलंड 7 नोव्हेंबर – दुसरा वनडे, वेलिंग्टन 10 नोव्हेंबर – तिसरा वनडे, हॅमिल्टन 13 नोव्हेंबर – चौथा वनडे, माउंट माऊंगानुई 15 नोव्हेंबर – पाचवा वनडे, माउंट माऊंगानुई कसोटी मालिका 19 ते 23 नोव्हेंबर – पहिली कसोटी, वेलिंग्टन 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर – दुसरी कसोटी, क्राइस्टचर्च क्रिकेट चाहत्यांसाठी हा दौरा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीसाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार असून न्यूझीलंडच्या वेगवान आणि स्विंगला अनुकूल खेळपट्ट्यांवर भारतीय खेळाडूंची खरी कसोटी लागणार आहे.

NZ vs IND 2026 : न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडिया; 6 वर्षांनंतर पुन्हा कसोटी मालिका Read More »

BCCI on Rohit Sharma: … तर रोहित शर्माचे विश्वचषकाचे स्वप्न धोक्यात: बीसीसीआयसाठी डोकेदुखी वाढली

BCCI on Rohit Sharma: दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणाऱ्या 2027 च्या ICC पुरुष क्रिकेट विश्वचषकापूर्वी एक मोठी अपडेट समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या स्पर्धेसाठी भारतीय संघात रोहित शर्माची निवड होणार नाही. एकदिवसीय (ODI) विश्वचषक जिंकणे हे रोहित शर्माचे नेहमीच एक आयुष्यभराचे स्वप्न राहिले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि दोन टी-20 विश्वचषक जिंकूनही, रोहित शर्माला अद्याप एकदिवसीय विश्वचषकाची ट्रॉफी उंचावता आलेली नाही. रोहित शर्माचे अपूर्ण स्वप्न 2019 आणि 2023 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करूनही, टीम इंडियाला दोन्ही प्रसंगी विजेतेपद पटकावता आले नाही. 2019 मध्ये, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत होऊन स्पर्धेबाहेर झाला त्यानंतर, 2023 मध्ये अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाने त्यांचा पराभव केला. त्यावेळी, रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार होता. यानंतर, रोहित शर्माने 2027 च्या विश्वचषकात खेळण्याची आणि भारतासाठी एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची आपली इच्छा उघडपणे व्यक्त केली होती. आता त्याचा हा मार्ग अधिकाधिक आव्हानात्मक वाटत आहे आणि BCCI ला देखील याविषयी चिंता वाटू लागली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ (TOI) च्या एका अहवालानुसार, BCCI मधील एका सूत्राने सांगितले की, रोहित शर्मा गेल्या तीन आठवड्यांपासून BCCI च्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये (Centre of Excellence) उपस्थित राहिलेला नाही. जरी त्याने आपल्या तंदुरुस्तीवर (फिटनेसवर) काम केले असले आणि काही प्रमाणात वजनही कमी केले असले, तरी उच्च-स्तरीय खेळासाठी आवश्यक असलेला शारीरिक ताण सहन करण्यास त्याचे शरीर सक्षम असेल की नाही, याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. त्याला 50 षटके क्षेत्ररक्षण करणे आवश्यक असते. IPL च्या विपरीत, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ‘इम्पॅक्ट प्लेयर’चा (Impact Player) पर्याय उपलब्ध नसतो. जसजसे एखादी व्यक्ती 40 वर्षांच्या वयाकडे वाटचाल करते, तसतसे शरीराला रिकव्हर होण्यासाठी नैसर्गिकरित्या अधिक वेळ लागतो. तर दुसरीकडे अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या संघात रोहित शर्माला स्थान मिळाले असले, तरी तो प्रत्यक्षात खेळणार की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. 2026 च्या IPL हंगामादरम्यानही, दुखापतींच्या चिंतेमुळे स्पर्धेच्या मध्यातच त्याला अनेक सामन्यांना मुकावे लागले होते. त्यातील बहुतांश सामन्यांमध्ये, तो ‘इम्पॅक्ट प्लेयर’च्या भूमिकेत खेळताना दिसून आला होता.

BCCI on Rohit Sharma: … तर रोहित शर्माचे विश्वचषकाचे स्वप्न धोक्यात: बीसीसीआयसाठी डोकेदुखी वाढली Read More »

ms dhoni

MS Dhoni IPL 2026 मध्ये ‘या’ दिवशी खेळणार; CSK ने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

MS Dhoni : आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा अद्याप पूर्णपणे मावळलेल्या नाहीत. पण कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयानंतर, संघाचा पुढील मार्ग कठीण झाला आहे. अव्वल चार स्थानांच्या शर्यतीत सध्या कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज हे संघ चेन्नई सुपर किंग्जच्या पुढे असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स आणि CSK या दोन्ही संघांकडे प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची संधी अजूनही आहे मात्र, असे करण्यासाठी त्यांना इतर संघांच्या सामन्यांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल. धोनी कधी खेळणार सध्या CSK आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांचा ‘नेट रन रेट’ (Net Run Rate) निगेटिव्ह आहे, ज्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये आणखीच भर पडली आहे. चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वात निराशाजनक बाब म्हणजे, संपूर्ण हंगामात धोनीला एकही सामना खेळता आलेला नाही. शिवाय, अनेक खेळाडूंना झालेल्या दुखापतींमुळे संघ डिस्टर्ब झाला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा लीग फेरीतील शेवटचा सामना आज, 21 मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यात धोनी खेळणार नाही पण संघाचे फलंदाजी प्रशिक्षक (Batting Coach) माईक हसी यांनी स्पष्ट केले आहे की, जर संघाने प्ले-ऑफसाठी पात्रता मिळवली, तर धोनी पुन्हा संघात सामील होईल आणि कदाचित प्ले-ऑफचे सामने खेळू शकेल. CSK च्या पात्रतेची शक्यता कठीण गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी बोलताना माईक हसी म्हणाले, “मी या गोष्टीची पुष्टी करू शकतो की, तो सध्या संघासोबत नाही. त्याच्या अंगठ्याला किरकोळ दुखापत झाली आहे, परंतु तो वेगाने सावरत आहे. या सामन्यासाठी तो अद्याप पूर्णपणे सज्ज नाही तरीही, जर आम्ही प्ले-ऑफसाठी पात्रता मिळवण्यात यशस्वी झालो, तर तो पुन्हा संघात सामील होईल अशी आम्हाला आशा आहे.” सध्याची परिस्थिती पाहता, चेन्नई सुपर किंग्जपुढील पुढील वाटचाल सोपी दिसत नाही. संघाला केवळ आपला शेवटचा सामना जिंकणेच आवश्यक नाही, तर दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांनी त्यांचे शेवटचे सामने मोठ्या फरकाने गमावावेत, अशीही त्यांना आशा करावी लागेल. जेणेकरून ‘नेट रन रेट’च्या गणितात CSK ला फायदा मिळू शकेल.

MS Dhoni IPL 2026 मध्ये ‘या’ दिवशी खेळणार; CSK ने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी Read More »

shrikant shinde

Shrikant Shinde: जिल्हा परिषद निवडणुका आणि संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय

Shrikant Shinde : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटना अधिक मजबूत, सक्षम आणि बूथस्तरापर्यंत प्रभावी करण्यासाठी शिवसेना संसदीय गटनेते तथा कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा विधानसभा निहाय कार्यकर्ता, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी संवाद दौरा १६ मे २०२६ पासून सुरू होत आहे. १६ मे ते १५ जुलै असे तब्बल दोन महिने चालणाऱ्या या व्यापक दौऱ्यात राज्यातील २२ जिल्हे आणि १०० हून अधिक विधानसभा मतदारसंघ खासदार डॉ.श्रीकांत शिंदे पिंजून काढणार आहेत. शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन या दौऱ्याबाबत सविस्तर माहिती दिली. शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ३० मार्च २०२६ रोजी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे मुंबई आणि ठाणे लोकसभा क्षेत्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नियुक्तीनंतर त्यांनी मुंबई आणि ठाणे परिसरात यशस्वी संवाद दौरे पूर्ण केले असून त्यानंतर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही संघटन बांधणीसाठी दौरे केले होते. विशेष म्हणजे, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्यातील ६५ ते ७० विधानसभा मतदारसंघांचा दौरा करत तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला होता. मोठ्या सभांपेक्षा प्रत्यक्ष भेटींवर भर देत त्यांनी कार्यकर्त्यांकडून सूचना, मते आणि स्थानिक पातळीवरील माहिती जाणून घेत निवडणूक रणनीती आखली होती. पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी अशा संवाद दौऱ्यांना महत्त्वपूर्ण मानले जाते. याच पद्धतीने आता पुन्हा एकदा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे राज्यव्यापी दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी, बूथस्तरावरील पक्षबांधणी, संघटनात्मक रणनीती, तसेच शिवसेनेच्या विविध आघाड्या आणि विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. विशेषतः एसआयआर मोहिमेअंतर्गत बीएलए आणि बूथ प्रमुखांच्या नियुक्त्यांबाबतही सविस्तर चर्चा होणार आहे. या बैठकींमध्ये जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच बूथस्तरावरील शिवसैनिकांशी थेट संवाद साधला जाणार आहे. संघटनात्मक अडचणी, स्थानिक प्रश्न, निवडणुकीतील आव्हाने आणि पुढील नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक वाढवणे, प्रत्येक बूथवर पक्षाची पकड मजबूत करणे आणि तळागाळातील शिवसैनिकांना नव्या उमेदीने सक्रिय करणे, हा या राज्यव्यापी दौऱ्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. दौरा असा असेल – खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याची सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून होत असून पहिल्या टप्प्यात मे महिन्यात नाशिक, धुळे, अहिल्यानगर, बीड, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांमध्ये बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जून महिन्यात जळगाव, नंदुरबार, यवतमाळ, वाशिम, नांदेड, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये संवाद दौरा पार पडणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात जुलै महिन्यात बुलढाणा, जालना, नागपूर, भंडारा, गोंदिया, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे.

Shrikant Shinde: जिल्हा परिषद निवडणुका आणि संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय Read More »

brydon carse

Brydon Carse : SRH ला मोठा धक्का, ब्रायडन कार्स IPL 2026 मधून बाहेर, ‘या’ खेळाडूला संधी

Brydon Carse : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स दुखापतीमुळे 2026 च्या आयपीएलमधून बाहेर पडला आहे. सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने कार्सच्या जागी पर्यायी खेळाडूची घोषणा केली आहे. SRH ने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंका याला कार्सच्या जागी आपल्या संघात समाविष्ट केले आहे. SRH ने या हंगामात आतापर्यंत पाच सामने खेळले असून, त्यापैकी दोन सामन्यांत विजय मिळवला आहे. मात्र, कार्सला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्धच्या हंगामातील पहिल्या सामन्यापूर्वी झालेल्या सराव सत्रादरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाली होती. त्याने अद्याप आयपीएलमध्ये पदार्पण केलेले नाही. 2026 च्या आयपीएल लिलावापूर्वी हैदराबाद संघाने कार्सला संघात कायम (रिटेन) केले होते. त्यावेळी SRH चे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांनी कार्स लवकर बरा होईल अशी आशा व्यक्त केली होती, परंतु तसे घडले नाही. मधुशंका 75 लाखात करारबद्ध आयपीएलने जारी केलेल्या निवेदनानुसार, SRH ने मधुशंकाला 75 लाख रुपयांना आपल्या संघात घेतले आहे. यापूर्वी तो मुंबई इंडियन्स (MI) संघाचा भाग होता, परंतु त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली नव्हती. या 25 वर्षीय वेगवान गोलंदाजाने श्रीलंकेसाठी 1 कसोटी, 28 एकदिवसीय आणि 19 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, एकूण 70 बळी (विकेट्स) मिळवले आहेत. दरम्यान, मंगळवारी SRH चा नियमित कर्णधार पॅट कमिन्स याच्याबाबतही एक महत्त्वाची बातमी समोर आली. हा वेगवान गोलंदाज 17 एप्रिल रोजी पुन्हा हैदराबाद संघात सामील होण्याची शक्यता आहे. SRH चा पुढील सामना 18 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध होणार आहे. पॅट कमिन्सची फिटनेस चाचणी होणार ‘क्रिकबझ’च्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कमिन्स बुधवारी आपल्या घरी फिटनेस चाचणी देणार आहे. हंगामाच्या सुरुवातीपूर्वी, कमिन्सने असे म्हटले होते की, जर सर्व काही सुरळीत पार पडले, तर तो आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात खेळेल. कमिन्स म्हणाला, “मी पुन्हा गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. सध्या मी साधारणपणे दर तिसऱ्या दिवशी गोलंदाजी करत आहे. स्पर्धेच्या मध्यापर्यंत मला पूर्णपणे तंदुरुस्त करण्यासाठी आम्ही एक योजना आखली आहे. त्यामुळे कोणताही अडथळा न आल्यास मी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात खेळू शकेन, अशी आम्हाला आशा आहे.”

Brydon Carse : SRH ला मोठा धक्का, ब्रायडन कार्स IPL 2026 मधून बाहेर, ‘या’ खेळाडूला संधी Read More »

lalit modi

Lalit Modi on BCCI : ललित मोदींचा मोठा दावा; बीसीसीआय आणि आयपीएल संघांना दरवर्षी 2400 कोटी रुपयांचा तोटा

Lalit Modi on BCCI : आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी आयपीएलबाबत एक मोठा दावा केला आहे. ‘आयपीएलचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे ललित मोदी यांचे असे म्हणणे आहे की, आयपीएलच्या कार्यपद्धतीतील एका विशिष्ट त्रुटीमुळे बीसीसीआयला (BCCI) दरवर्षी 1200 कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. केवळ ही लीगच नव्हे, तर आयपीएलमधील प्रत्येक फ्रँचायझीलाही दरवर्षी तितक्याच रकमेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे. ललित मोदी यांचा असा युक्तिवाद आहे की, बीसीसीआय या स्पर्धेसाठी सुरुवातीला निश्चित करण्यात आलेल्या स्वरूपाचे (format) पालन करण्यात अपयशी ठरत आहे. हे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी, बीसीसीआयने पुन्हा एकदा पूर्णपणे ‘होम-अँड-अवे’ (home-and-away) स्वरूपाकडे वळावे, अशी शिफारस त्यांनी केली आहे. तसेच, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि राजस्थान रॉयल्स या दोन फ्रँचायझींचे मूल्यांकन (valuation) सुमारे 31,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे, या गोष्टीबद्दल ललित मोदी यांनी समाधान व्यक्त केले आहे. ललित मोदी यांच्या मते, मूळ नियमानुसार प्रत्येक संघाने इतर प्रत्येक संघाविरुद्ध दोनदा सामने खेळणे बंधनकारक होते. 2022 मध्ये या लीगचा विस्तार होऊन त्यात 10 संघांचा समावेश झाल्यानंतर, निश्चित केलेल्या रचनेनुसार लीग टप्प्यात 90 सामने खेळवले जाणे अपेक्षित होते; त्यानंतर चार बाद फेरीचे (knockout) सामने नियोजित होते. मात्र, ‘होम-अँड-अवे’ पद्धतीत बदल करून, आयपीएलने सामन्यांची संख्या कमी करत केवळ 74 सामन्यांचे वेळापत्रक कायम ठेवले आहे; ज्यामध्ये प्रत्येक संघ सात ‘होम’ (घरच्या मैदानावर) आणि सात ‘अवे’ (प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर) सामने खेळतो. ‘स्पोर्टस्टार’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटले की, “प्रत्येक सामन्यातून मिळणाऱ्या महसुलापैकी 50 टक्के वाटा बीसीसीआयला मिळतो, तर उर्वरित 50 टक्के वाटा संघांमध्ये विभागला जातो. परिणामी, संघांना आता 20 सामन्यांना मुकावे लागत आहे. त्यांनी भरलेल्या फ्रँचायझी शुल्काचा विचार करता, त्यांना ‘होम-अँड-अवे’ सामन्यांचा पूर्ण कोटा मिळणे सुनिश्चित करणे ही एक करारात्मक जबाबदारी (contractual obligation) आहे. या स्पर्धेचे खरे मूल्य हे ‘होम-अँड-अवे’ स्वरूपातच दडलेले आहे. जर क्रिकेटच्या वेळापत्रकात (calendar) पुरेशी जागा उपलब्ध नसेल, तर सरळसरळ संघांची संख्या वाढवू नका. ही गोष्ट अगदी साधी आणि सोपी आहे. आम्ही कधीच अशा पद्धतीचे समर्थन केले नव्हते. सर्वांनी खरोखरच या बदलाला संमती दिली होती का? मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो की, त्यांनी तसे केले नव्हते.” त्यांनी पुढे नमूद केले: “ते ‘होम-अँड-अवे’ (घरच्या आणि प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर) सामने का खेळत नाहीत? यासाठी कदाचित काही सबबी असू शकतात; परंतु संबंधित संघांच्या दृष्टीने, हा एक करारान्वये प्राप्त झालेला अधिकार आणि त्याच वेळी एक व्यावसायिक व्यवहार देखील आहे.” सामन्यांची संख्या कमी झाल्याचा थेट परिणाम फ्रँचायझी आणि लीग या दोघांच्याही मूल्यांकनावर (valuations) होतो, असे मोदी यांचे मानणे आहे. त्यांनी स्पष्ट केले, “जर आज ‘होम-अँड-अवे’ तत्त्वावर 94 सामने खेळले गेले असते आणि प्रत्येक सामन्यातून 118 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असते, तर केवळ प्रसारमाध्यम हक्कांचे (media rights) मूल्यच 2400 कोटी रुपयांनी अधिक झाले असते. याचा अर्थ असा की, बीसीसीआयला 2400 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल प्राप्त झाला असता. या रकमेपैकी 1200 कोटी रुपये 10 संघांमध्ये वितरित केले गेले असते ज्यामुळे प्रत्येक संघाला 120 कोटी रुपये मिळाले असते आणि परिणामी, या संघांचे मूल्यांकन आपोआपच वाढले असते.”

Lalit Modi on BCCI : ललित मोदींचा मोठा दावा; बीसीसीआय आणि आयपीएल संघांना दरवर्षी 2400 कोटी रुपयांचा तोटा Read More »

img 20260311 wa0007

Maharashtra Khesari : ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

Maharashtra Khesari : ६८ व्या ‘महाराष्ट्र केसरी २०२५-२६’ कुस्ती स्पर्धेच्या अधिकृत बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण व मानाच्या गदेचे पूजन राज्याचे वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने या भव्य स्पर्धेचे आयोजन दिनांक १८ मार्च ते २२ मार्च २०२६ या कालावधीत वाघोली, पुणे याठिकाणी करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पर्धेच्या नियोजनाची सविस्तर माहिती घेत आयोजक रामकृष्ण सातव पाटील यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले व स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या. सदर स्पर्धेच्या समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण आयोजक रामकृष्ण सातव पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले असून त्यांनी ते स्वीकारले आहे. यंदाच्या महाराष्ट्र केसरी विजेत्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानाची गदा आणि फॉर्च्युनर गाडी देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस पै. योगेश दोडके, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराज कटके, नगरसेवक अनिल सातव पाटील तसेच कृष्णाजी बुचडे, नटराज सातव पाटील, सुनील (चाचा) जाधवराव, राहुल सातव, केतन जाधव, सागर सातव, महेश माने, मुकेश सातव, संदीप वारे, मयूर सातव आदी मान्यवर उपस्थित होते.

Maharashtra Khesari : ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण Read More »

team india

T20 World Cup विजयानंतर, बीसीसीआयची मोठी घोषणा: टीम इंडियाच्या जर्सीवर आता…

T20 World Cup: टी-२० विश्वचषक विजयानंतर, टीम इंडियाच्या जर्सीत मोठा बदल करण्यात आला. आता बीसीसीआयच्या लोगोवर तीन स्टार दिसतील. पूर्वी, जर्सीवर दोन स्टार होते, जे भारताच्या मागील दोन विश्वचषक विजयांचे प्रतिनिधित्व करतात. या वर्षी, जर्सीवर तिसरा स्टार जोडण्यात आला. बीसीसीआयने याची घोषणा करणारा एक व्हिडिओ जारी केला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात, भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करून त्यांचा तिसरा टी-२० विश्वचषक विजेता ठरला. प्रथम फलंदाजी करताना, भारताने ५ बाद २५५ धावा केल्या, जो विश्वचषक अंतिम सामन्यातील विक्रमी धावसंख्या आहे. संजू सॅमसनच्या स्फोटक कामगिरीने भारतीय डावाचा पाया रचला. त्याने फक्त ४६ चेंडूत ८९ धावा केल्या, ज्यामध्ये पाच षटकार आणि आठ चौकारांचा समावेश होता आणि त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. सलामीवीर अभिषेक शर्मा (५२) आणि इशान किशन (५४) यांनीही प्रभावी अर्धशतके झळकावली. शिवम दुबेच्या स्फोटक फलंदाजीने (८ चेंडूत २६*) शेवटच्या षटकांमध्ये भारताला २५० धावांच्या पुढे नेले. प्रत्युत्तरात, न्यूझीलंड भारतीय गोलंदाजीसमोर टिकू शकले नाही आणि १९ षटकांत १५९ धावांवर सर्वबाद झाले. भारताकडून जसप्रीत बुमराहने चार बळी घेतले आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. अक्षर पटेलनेही तीन बळी घेत न्यूझीलंडच्या आशा धुळीस मिळवल्या. या विजयासह, भारत टी२० विश्वचषक विजेतेपद राखणारा पहिला संघ बनला. त्यांनी घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकणारा पहिला देश होण्याचा मानही मिळवला. २००७ आणि २०२४ मधील विजयानंतर हे तिसरे विजेतेपद आता भारतीय जर्सीवर तिसरा स्टार म्हणून चमकत आहे.

T20 World Cup विजयानंतर, बीसीसीआयची मोठी घोषणा: टीम इंडियाच्या जर्सीवर आता… Read More »

team india

IND vs NZ: भारत तिसऱ्यांदा ‘वर्ल्ड चॅम्पियन’! फायनलमध्ये न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव

IND vs NZ : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी भारतीय संघाने इतिहास रचला आहे. भारताने टी 20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव केला. नाणेफेक गमावल्यानंतर आणि प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांच्या धमाकेदार अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने 255 धावांचा मोठा आकडा उभारला. प्रत्युत्तरादाखल, किवीज भारतीय गोलंदाजीसमोर टिकू शकले नाहीत. अभिषेक आणि संजूची आक्रमक फलंदाजी भारतीय सलामीवीरांनी किवी कर्णधार मिशेल सँटनरचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सिद्ध केले. अभिषेक शर्माने सुरुवातीच्या षटकांमध्ये चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला आणि केवळ 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 21 चेंडूत 52 धावांची धमाकेदार खेळी केली. त्याच्या जाण्यानंतर, संजू सॅमसनने मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात फटके मारत संघाची जबाबदारी घेतली. पॉवरप्लेच्या सहा षटकांत भारताने एकही विकेट न गमावता 92 धावा केल्या होत्या. सॅमसन आणि किशनची स्फोटक कामगिरी संजू सॅमसनने स्पर्धेत आपला उत्कृष्ट फॉर्म सुरू ठेवला आणि सलग तिसरा अर्धशतक झळकावला. त्याने 33 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि अखेर 89 धावा केल्या. त्याला इशान किशनने 23 चेंडूत 54 धावा केल्या. कर्णधार सूर्या नाबाद राहिला आणि हार्दिकने 18 धावा केल्या, तरी शिवम दुबेने अखेर फक्त आठ चेंडूत 26 धावा करून संघाचा धावसंख्या 255 पर्यंत नेली. तर दुसरीकडे 256 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात निराशाजनक झाली. संघाने तिसऱ्या षटकात त्यांची पहिली विकेट गमावली. सलामीवीर फिल अॅलन फक्त नऊ धावा करू शकला, तर रचिन रवींद्र फक्त एका धावेवर बाद झाला. ग्लेन फिलिप्स आणि मार्क चॅपमन देखील दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये किवी संघावर इतका दबाव आणला की ते शेवटपर्यंत सावरू शकले नाहीत. सेफर्टने 26 चेंडूत 52 धावांची खेळी किवी संघाकडून टिम सेफर्टने 26 चेंडूत 52 धावांची जलद खेळी केली, परंतु दुसऱ्या टोकाकडून त्याला कोणतीही साथ मिळाली नाही. जसप्रीत बुमराहने आपल्या धारदार गोलंदाजीने किवी फलंदाजीला धक्का दिला. बुमराहने एकूण चार महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या, तर फिरकी गोलंदाज अक्षर पटेलनेही उत्कृष्ट कामगिरी करत तीन विकेट्स घेतल्या. किवी संघ नियमित अंतराने विकेट्स गमावत राहिला आणि 19 षटकांत पूर्णपणे बाद झाला. भारताचे ऐतिहासिक वर्चस्व संपूर्ण किवी संघ 19 षटकांत फक्त 159 धावांतच गुंडाळला गेला. या विजयासह, भारताने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा टी20 विश्वचषक ट्रॉफी जिंकून इतिहास रचला.

IND vs NZ: भारत तिसऱ्यांदा ‘वर्ल्ड चॅम्पियन’! फायनलमध्ये न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव Read More »

eknath shinde

Eknath Shinde : न्यूझीलंडचा दारुण पराभव करीत भारत बनला तिसऱ्यांदा विश्वविजेता; एकनाथ शिंदेंकडून अभिनंदन

Eknath Shinde : अहमदाबाद येथे झालेल्या टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ९६ धावांनी दारुण पराभव करत तिसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत या ऐतिहासिक कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय क्रिकेट संघाचे मनापासून अभिनंदन केले आहे. अंतिम सामन्यात भारतीय खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर जबरदस्त कामगिरी केली. न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाला ९६ धावांच्या मोठ्या फरकाने हरवून भारताने आपले वर्चस्व पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले आहे. या विजयानंतर आनंद व्यक्त करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भारतीय संघाने आज दाखवलेली जिद्द आणि सांघिक खेळ वाखाणण्याजोगा आहे. संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहून फायनलमध्ये मिळवलेला हा विजय प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. या यशाने देशात पुन्हा एकदा दिवाळी साजरी होत आहे. कर्णधार आणि सर्व खेळाडूंचे मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो, असेही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Eknath Shinde : न्यूझीलंडचा दारुण पराभव करीत भारत बनला तिसऱ्यांदा विश्वविजेता; एकनाथ शिंदेंकडून अभिनंदन Read More »