DNA मराठी

latest update

Ahmednagar News: व्यापारी धिरज जोशी यांच्यावरील हल्ला करणाऱ्या आरोपीना अटक करा – राष्ट्रवादी काँग्रेस 

Ahmednagar News:  अहमदनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांवर गोळीबार, प्राणघातक हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  अहमदनगर शहरामध्ये गावठी कट्टे, तलवारी अशा प्रकारचे शस्त्रे राजरोसपणे कुठुन उपलब्ध केली जात आहेत. याचा तपास करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगर जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, आज पर्यंत पुणे,मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये घडणाऱ्या गोळीबार, प्राणघातक हल्ले या सारख्या घटनांचे लोन नगर सारख्या शहरापर्यंत पोहचल्याचे दिसुन येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असुन नगर सारख्या शहरामध्ये सर्व सामान्यांना आजपर्यंत अशा प्रकारच्या घटना केवळ मोठया महानगरांमध्ये घडल्याचे माहित असे परंतु अशा घटना नगर शहरात मोठ्या प्रमाणात सातत्याने घडू लागल्या आहे. हा फार मोठा चिंतेचा विषय असुन नगरमध्ये गावठी कट्टे, तलवारी अशा प्रकारचे शस्त्रे राजरोसपणे कुठुन उपलब्ध केली जात आहेत. याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे गंभीर गुन्ह्यात बेकायदेशीर शस्त्रे सापडून देखील गुन्हेगार दोन चार दिवसात जामीनावर बाहेर असतात हे पोलीस प्रशासनाचे अपयश असुन गुन्हेगारांवर गंभीर स्वरुपाची कलमे लावुन त्यांच्याविरुध्द योग्य पध्दतीने गुन्हा दाखल झाल्यास अशा प्रकारचे जामीन होणार नाहीत.  गुन्हेगारांना कायदयाचा धाक राहील अशा उपाययोजना पोलसांनी कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केली. नगर शहरातील व्यापारी धिरज जोशी यांच्यावरील हल्ला करणाऱ्या आरोपीना तातडीने अटक करुन कठोर कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, प्रा. माणिकराव विधाते, कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वैभव ढाकणे, युवकचे अध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, युवती अध्यक्ष अंजली आव्हाड, जॉय लोखंडे, सुमित कुलकर्णी, ऋषिकेश ताठे, संजय सपकाळ आदी उपस्थित होते.

Ahmednagar News: व्यापारी धिरज जोशी यांच्यावरील हल्ला करणाऱ्या आरोपीना अटक करा – राष्ट्रवादी काँग्रेस  Read More »

Ahmednagar News : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विळद यांचामार्फत दिव्यांग सर्वेक्षण व तपासणी शिबिराचे आयोजन

Ahmednagar News: डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विळद घाट अहमदनगर, जिल्हा समाज कल्याण विभाग व ग्रामपंचायत देहरे यांच्या संयुक्त विद्यामाने दि. 10 फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र देहरे येथे दिव्यांगासाठी शिबिर आयोजित करण्यात आले ‍होते. या शिबिरात देहरे व परीसरातील पात्र दिव्यांगाची सहाय्यक साधनांसाठी पुनर्वसन केंद्रांच्या तज्ञाकडून तपासणी व नोंदणी करण्यात आली.   यातील पात्र दिव्यांग व्यक्तीना भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या एडीप 2024 या योजने अंतर्गत नजीकच्या काळात सहाय्यक साधनांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हयातील दिव्यांगांना केंद्र शासनाच्या योजना पोहचविण्यासाठी मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे विशेष प्रयत्न करत आहे. दिव्यांगांच्या तपासणी बरोबरच “अहमदनगर जिल्हा दिव्यांग सर्वक्षण अभियानाचा” शुभारंभ करण्यात आला. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रांने आपले मोबाईल ॲप डीडीआरसीनगर या नावाने तयार केले असुन या ॲपच्या माध्यमातुन जिल्हयातील दिव्यांगांची माहिती संकलीत करण्यात येणार आहे. जेणे करुन विविध योजना त्यांच्यापर्यत पोहचविण्यास मदत होणार आहे.  या शिबिरासाठी पुनर्वसन केंद्राचे संचालक डॉ. अभिजित दिवटे व समन्वयक डॉ. दिपक अनाप यांचे मार्गदर्शन लाभले. या शिबिराप्रसंगी सरपंच सौ. नंदाताई संतोष भगत, उपसरपंच श्री. दिपक जाधव, देहरे सोसायटीचे  संचालक श्री. भानुदास भगत, देहरे सोसायटीचे  खजिनदार श्री. सुभाष, प्राथमिक आरोग्य केंद्र देहरे येथील डॉ. कसबे सर व डॉ. खरे सर उपस्थित होते.

Ahmednagar News : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विळद यांचामार्फत दिव्यांग सर्वेक्षण व तपासणी शिबिराचे आयोजन Read More »

Ajit Pawar : मोठी बातमी! ‘या’ दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश करणार बाबा सिद्दीकी

Ajit Pawar :  महाराष्ट्र काँग्रेसला मोठा झटका देत गुरुवारी काँग्रेसचे दिग्गज नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.  तर आता समोर आलेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बाबा सिद्दीकी प्रवेश करणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी बाबा सिद्दीकी यांच्या पक्षप्रवेशाची माहिती दिली आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “बाबा सिद्दीकी 10 फेब्रुवारीला संध्याकाळी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.” 11 फेब्रुवारीला आणखी काही लोक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचेही पवार म्हणाले. मुंबईत काँग्रेसला दुहेरी झटका! माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महिनाभरातच मुंबईतील आणखी एक मोठे नेते सिद्दीकी यांनी काँग्रेसला झटका दिला.  वांद्रे येथे 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोण आहेत बाबा सिद्दीकी? सिद्दीकी हे मुंबईतील वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. 1999 मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. यानंतर 2004 आणि 2009 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला. 2004 ते 2008 या काळात त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्रीपद भूषवले.  आमदार होण्यापूर्वी ते दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. बाबा सिद्दीकी हे 1992 मध्ये पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेचे (BMC) नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 1997 च्या बीएमसी निवडणुकीतही त्यांना यश मिळाले. राष्ट्रवादीला कसा फायदा होईल? सिद्दीकी हा मुंबईतील काँग्रेसचा प्रमुख अल्पसंख्याक चेहरा होता. वांद्रे, मुंबई आणि आजूबाजूला अल्पसंख्याक समाजातील लोक मोठ्या संख्येने राहतात, ज्यांमध्ये सिद्दीकी यांचा खोलवर प्रभाव आहे. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी सध्या मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथून काँग्रेसचा आमदार आहे. 66 वर्षीय सिद्दिकी म्हणाले की, जीशान स्वतःची राजकीय वाटचाल ठरवतील. सिद्दीकी म्हणाले की, आपण शनिवारी रॅली काढणार असून त्यात नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य सहभागी होणार आहेत.

Ajit Pawar : मोठी बातमी! ‘या’ दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश करणार बाबा सिद्दीकी Read More »

Sangram Jagtap : अट्टल गुन्हेगारांवर धाडसी कारवाईची गरज – आमदार संग्राम जगताप

Sangram Jagtap :  अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामध्ये काही दिवसापूर्वी वकील दांपत्याचे अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली होती.  यानंतर या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा  काढण्यात आला होता, यात अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप सहभागी झाले होते.  त्यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घेत जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांवर पोलिसांनी धाडसी कारवाईची करण्याची खरी गरज आहे तसेच वकील दांपत्याच्या हत्येचा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवावा आणि सरकारी वकील म्हणून ऍड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली.  तसेच लवकरच वकिलांचा प्रलंबित असलेला वकील संरक्षण कायदा मंजूर करण्यासाठी अधिवेशनात लेखी स्वरूपाचा प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहिती दिली.  सराईत गुन्हेगारांवर यापूर्वीच पोलिसांनी कारवाया केल्या असत्या तर अशा स्वरूपाच्या घटना घडल्या नसत्या, समाजविघातक लोकांना कायद्याचा धाक दाखवणे गरजेचे आहे, या घटनेचा निषेध करत वकिलांच्या तीव्र भावना शासन दरबारी मांडणार असून तुम्ही जिल्ह्याचे प्रमुख असून या घटनेचा अहवाल शासनाकडे पाठवावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली.

Sangram Jagtap : अट्टल गुन्हेगारांवर धाडसी कारवाईची गरज – आमदार संग्राम जगताप Read More »

Health Care Tips:  तुमच्या ‘या’ वाईट सवयींमुळे होऊ शकतो सांधेदुखीचा त्रास, करू नका दुर्लक्ष

Health Care Tips : आज अनेकांना दैनंदिन जीवनातील काही वाईट सवयीमुळे सांधेदुखीची समस्या वाढत चालली आहे.  यामुळे जर या सवयींकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकते. सांधेदुखीच्या समस्येमुळे संपूर्ण शरीरावर दुष्परिणाम होतात. साधारणतः ही समस्या वयोवृद्ध व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात आढळते. पण हल्ली बदलती जीवनशैली, वेळी-अवेळी खाणेपिणे, झोपणे इत्यादी गोष्टींमुळे तरुणांमध्ये सांधेदुखीची समस्या वाढतेय.  या समस्येवर वेळीच वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे, अन्यथा भविष्यात तुम्हाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. बहुतांश लोक सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करतात. जेव्हा वेदना असह्य होऊ लागतात, तेव्हाच लोक स्नायूंच्या वेदनांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांकडे धाव घेतात. पण शरीरात तीव्र स्वरुपातील वेदना अचानक का उद्भवते, यामागील कारणे आपणास माहीत आहेत का? शरीरामध्ये एखादी इजा किंवा दुखापत झाल्यास सांधेदुखीचा त्रास उद्भवू शकतो. तसंच तुमच्या काही वाईट सवयींमुळेही शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेदना निर्माण होऊ शकतात. जाणून घेऊया सविस्तर माहिती. शरीराचे वजन जास्त असणे शरीराचे वजन जास्त असणाऱ्या लोकांना संधिवात होण्याचा धोका अधिक असतो. शरीराचे वजन जास्त वाढल्याने फिटनेससह शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरही वाईट परिणाम होतात. अवयवावर अतिरिक्त दबाव निर्माण झाल्यानं शारीरिक वेदना होऊ लागतात.  शरीराचे वजन वाढल्याने कंबर, पाठ, पाय आणि नितंबांवर अधिक भार येतो व शरीराच्या स्नायूंचे दुखणे वाढते. शारीरिक ताणतणावामुळेही सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. दीर्घकाळापर्यंत एकाच स्थितीमध्ये बसणे जर आपण एकाच ठिकाणी तास-न्-तास बसून काम करत असाल तर यामुळे कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो. यामुळे वारंवार पाठीतही वेदना निर्माण होतात. काही लोकांना स्लिप डिस्कच्या समस्येचाही सामना करावा लागण्याची शक्यता असते. बहुतांश लोक कम्प्युटरसमोर कित्येक तास एकाच स्थितीमध्ये बसून काम करतात. यामुळे पाठीच्या कण्यावर अतिरिक्त ताण येतो. ज्यामुळे तीव्र स्वरुपात पाठ-कंबरदुखी होते. ही समस्या टाळण्यासाठी अधूनमधून विश्रांती घेणे आवश्यक आहे. वजनदार बॅग पाठीवर घेणे वजनदार बॅग खूप वेळ पाठीवर असल्यासही सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. पाठदुखीनंतर हळूहळू कंबरदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळेच वजनदार वस्तू देखील कमी प्रमाणात उचलाव्यात. पाण्याने भरलेली वजनदार बादली उचल्यास हातांच्या स्नायूंवर ताण येतो. ज्यामुळे सांध्यांचे दुखणे वाढू शकते. मोबाइलवर वारंवार चॅटिंग करणे मोबाइन फोनवर वारंवार मेसेज टाइप केल्यानंही सांध्यांचे दुखणे वाढू शकते. चॅटिंगसाठी अंगठ्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यामुळे आपल्या हातांमध्ये वेदना जाणवू शकतात. पोटावर झोपणे तुम्हाला पोटावर झोपण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. कारण यामुळे पाठीचे दुखणे वाढते. पोटावर झोपण्याच्या सवयीमुळे कंबर आणि पाठीच्या कण्यावर वाईट परिणाम होतात. परिणामी पाठदुखीची समस्या वाढत जाते. याव्यतिरिक्त कधी-कधी मान देखील दुखू लागते. हाय हील्सचा वापर करणे कम्फर्टेबल फुटवेअरचा वापर न केल्यासही सांधेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. बहुतांश लोक हाय हील्सचा वापर करतात. यामुळे पायांवर ताण येतो. हाय हील्सच्या वापरामुळे गुडघ्यांपासून ते मांड्यांपर्यंतच्या स्नायूंवर दबाव येतो. ज्यामुळे गुडघ्यांसह पायांचेही दुखणे वाढते. ही समस्या टाळण्यासाठी शक्यतो कम्फर्टेबल फुटवेअरचा वापर करावा.

Health Care Tips:  तुमच्या ‘या’ वाईट सवयींमुळे होऊ शकतो सांधेदुखीचा त्रास, करू नका दुर्लक्ष Read More »

होणार बंपर बचत! आता Maruti Wagon R खरेदी करा अवघ्या 1.15 लाखात; जाणुन घ्या कसं

Maruti Wagon R: येत्या काही दिवसात तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी बाजारात एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही बाजारात धुमाकूळ घालणारी लोकप्रिय कार मारुती वॅगन आर अवघ्या 1.15 लाखात घरी आणू शकता. मारुती वॅगन आरमध्ये तुम्हाला 1061 cc इंजिन मिळते जे 67 bhp पॉवर आणि 34 NM टॉर्क जनरेट करते. ही 5 सीटर कार आहे ज्याच्या व्हील्सचा आकार 13 इंच आहे. याच बरोबर पॉवर स्टीयरिंग, पॉवर विंडो, रीयर सीट हेडरेस्ट आणि कप होल्डर देखील कारमध्ये उपलब्ध आहेत. एअर कंडिशनर, हीटर, इलेक्ट्रॉनिक मल्टी ट्रिप मीटर, फॅब्रिक अपहोल्स्ट्री, ग्लोव्ह कंपार्टमेंट देखील कारमध्ये देण्यात आले आहे. सेफ्टीसाठी  सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड सेफ्टी लॉक, डे नाईट रिअर व्ह्यू मिरर, सीट बेल्ट वॉर्निंग, रियर सीट बेल्ट साइड, इम्पॅक्ट टीम ॲडजस्टेबल सीट्स आणि इंजिन इमोबिलायझर या सुविधाही उपलब्ध आहेत.  cardekho.com वर सेकंड हॅण्ड मारुती वॅगन आर 1.15 लाखात खरेदी करु शकता. आतापर्यंत एकूण ही कार फक्त 26000 किलोमीटर चालली आहे. ही पेट्रोल इंजिन असलेली मॅन्युअल ट्रान्समिशन कार आहे.  जर तुम्ही ही कार बाजारात खरेदी करण्यासाठी गेलात तर तिची ऑन रोड किंमत 3.28 लाख ते 4.06 लाख रुपयांच्या दरम्यान असेल. 

होणार बंपर बचत! आता Maruti Wagon R खरेदी करा अवघ्या 1.15 लाखात; जाणुन घ्या कसं Read More »

Nashik IT Raid : मोठी बातमी! ‘या’ भागात आयटीचा छापा, 8 कोटींची रोकड, तीन कोटींचे सोने जप्त

Nashik IT Raid: एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार आयकर विभागाने मोठी कारवाई करत नाशिकमध्ये अनेक सरकारी कंत्राटदारांवर छापे टाकून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त केली आहे. माहितीनुसार गेल्या चार दिवसांपासून हा छापा सुरू आहे. सुमारे 200 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक या छाप्यात सहभागी आहे. पैशांनी भरलेल्या पुठ्ठ्याचे बॉक्स सापडले आयकर विभागाला 850 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची बेहिशेबी मालमत्ता आणि व्यवहार झाल्याचा संशय आहे. कंत्राटदारांच्या आठहून अधिक ठिकाणी आयटीचे छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या छाप्यात विविध ठिकाणांहून आठ कोटी रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने आणि तीन कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. आयकर विभागाच्या पथकाने नाशिकमध्ये एकाच वेळी डझनहून अधिक ठिकाणी छापे टाकले. शहरातील बड्या सरकारी कंत्राटदारांची निवासस्थाने, कार्यालये आणि इतर परिसरांची झडती घेण्यात आली. त्यांच्याशी संबंधित बँक खाती, संगणक आणि व्यवहार यांची चौकशी सुरू आहे.  छाप्यादरम्यान आयकर विभागाने तपासासाठी कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे, पेन ड्राइव्ह आणि हार्ड डिस्क जप्त केल्या आहेत. छाप्यात अनेक ‘धनकुबेर’ पकडले नाशिकमध्ये आयकर विभागाने सरकारी कंत्राटदारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. महापालिकेच्या 8 कंत्राटदारांवर गेल्या चार-पाच दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई सुरू आहे. आयकर अधिकाऱ्यांना पाहिल्यानंतर काहींनी त्यांची रोकड त्यांच्या कारमध्ये आणि झुडपात लपवून ठेवली, तर काहींनी अधिकाऱ्यांपासून त्यांची बेहिशेबी संपत्ती लपवण्यासाठी छतावर आणि पंख्यांमध्ये व्यवहाराची कागदपत्रे आणि पेनड्राइव्ह लपवून ठेवल्या. काही कंत्राटदारांनी घराच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या मालमत्तेची माहिती असलेली पेन ड्राइव्ह आणि हार्डडिस्क लपवून ठेवली होती. त्यातील एकाने घरातील पंख्यामध्ये बेहिशेबी व्यवहारांची माहिती असलेला 2 जीबीचा पेन ड्राईव्ह लपवून ठेवला होता.  त्याचवेळी गाडीत रोकड ठेवून झुडपात लपवून ठेवली होती. आयकर विभागाची कारवाई अजूनही सुरूच आहे. येत्या काही दिवसांत मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Nashik IT Raid : मोठी बातमी! ‘या’ भागात आयटीचा छापा, 8 कोटींची रोकड, तीन कोटींचे सोने जप्त Read More »

Ahmednagar News: डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयचा अनोखा अभिनव उपक्रम

Ahmednagar News: दिनांक ३१/०१/२०२४ रोजी  मकारसंक्रांती निमित्त डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयातील सामाजिक आरोग्य विभाग परिचर्या विभाग  व  माहिला सेल ने वडगाव गुप्ता येथील महिलासाठी हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला. या निमित्ताने गावातील १५० महिला करिता हळदी कुंकू व तिळगूळचा कार्यक्रम घेण्यात आला.  प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ग्रामपंचायत सरपंच सौ. सोनुबाई विजय शेवाळे तर प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. सोनाली वाहडणे (स्त्री. रोगतज्ञ) वाहाडणे  हॉस्पिटल, अहमदनगर ह्या होत्या तसेच सौ कविता बबन वाकळे (तलाठी), सौ. निता शिवराम गीरी (साहाय्यक कृषि अधिकारी) डॉ.सुवर्णा कांबळे (सामाजिक आरोग्य अधिकारी) व डॉ. प्रतिभा चांदेकर, प्राचार्या,  परिचर्या महाविद्यलयाच्या व डॉ. योगिता औताडे उप प्राचार्या व सामाजिक आरोग्य विभाग परिचर्या विभाग  प्रमुख उपस्थतीत होत्या.  या निम्मीताने महिल्यासाठी डॉ. सोनाली वाहडणे स्त्री रोग तज्ञ यांनी महिलांमध्ये योनि मुख मार्गाचा कर्करोग व स्तनाचा कर्करोग याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून व चर्चा केली. या प्रसंगी त्या म्हणाल्या कि महिलांनी आपलया ९ ते १४ वर्ष वयोगटातील मुलींचे योनी मार्गाच्या कर्करोग होऊ नये यासाठी  लसीकरण करणे आवश्यक आहे तसेच, समतोल आहार रोज एक तास व्यायाम करणे गरजेचे आहे आणि प्रत्येक महिन्यात मासिक पाळी  नंतर स्व-स्तन परीक्षण करून जर त्यात काही बदल जाणवले तर  त्वरित  डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, वयाच्या ४५ वर्षानंतर स्तनांची सोनोग्राफी (म्यॅमोग्राफी) करणे आवश्यक आहे.  म्हणून महिलांनी स्वतःच्या आरोग्य संदर्भात जागरूक असावे. लवकर निदान  व योग्य उपचारातून कर्करोग बारा होऊ  शकतो व आपले आयुष्य सुखकर होऊ शकते. तसेच परिचर्या महाविद्यालयातील स्त्री रोग विभाग  प्रमुख सौ. कविता भोकनळ व सहायक प्राध्यापक सौ मोहिनी सोनवणे यांनी स्व-स्तन परिक्षण कसे करावे या विषायी प्रात्यक्षिक  दाखवले .या निम्मीताने महिलाना सामाजिक आरोग्य विभागाने पॅम्फ्लेट देण्यात आले. या कार्यक्रमात महिलांनी स्वयंस्फूर्तिने सहभाग नोंदविला तसेच महिलांनी उखाणे घेऊन कार्यक्रमाला उत्सुफुर्त प्रतिसाद दिला.  डॉक्टर वहाडणे यांनी आरोग्य शिक्षणाचा देऊन, जनजागृती केली, आणि अमूल्य असा आरोग्याचा वाण आपल्या सर्वाना दिला असे प्राचार्य डॉ. प्रतिभा चांदेकर  म्हणालया. यावेळी त्यांनी सर्वांचे उपस्थिती बद्दल आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील उप प्राचार्या व सामाजिक आरोग्य परिचर्या विभाग प्रमुख डॉ. योगिता औताडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला.  यासाठी त्यांना सौ. सलोमी तेलधुणे ,बाल आरोग्य विभाग व महिला सेल प्रमुख, सौ. कविता भोकनळ ,स्त्री रोग विभाग प्रमुख तसेच सहहायक प्राध्यापक सौ मोहिनी सोनवणे यांनी सहकार्य केले तसेच पुजा मोरे व सौ. आश्लेषा सुरासे यांनी सूत्र संचालन केले श्री. अमोल शेळके ,सौ रिबिका साळवे ,सौ सोनल बोरडे सौ. ऐश्वर्या पवार आणि श्री. प्रशांत अंबरीत ,यांचे मोलाचे सहकार्य मिळाले व प्रथम वर्ष एम एस्सी नर्सिंग व जीएनएम च्या विद्याथ्यांनी सहभाग घेतला.

Ahmednagar News: डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयचा अनोखा अभिनव उपक्रम Read More »

Ahmednagar News: छगन भुजबळ यांना अजित पवार कसे चालतात? ‘त्या’ प्रकरणात मराठा क्रांती मोर्चाकडून खुले आव्हान

Ahmednagar News: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यानंतर आता राज्यात राजकीय वातावरण आणखी तापले आहे.  यातच शनिवारी राज्य सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ( अजित पवार गट) छगन भुजबळ यांनी अहमदनगर येथील ओबीसी एल्गार सभेत नाभिक बांधवांना मराठा समाजावर बहिष्काराचे आवाहन केले आहे. त्यांच्या या विधानाला आता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उत्तर देण्यात आला आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर समाजात तेढ निर्माण करण्याचे आरोप केले आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी छगन भुजबळ हे केवळ सुपारी घेऊन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करत असून त्यांनी कुणाकडून सुपारी घेतली आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत असून अनाजी पंताच्या सुपारीवर छगन भुजबळ यांनी समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करू नयेत. छगन भुजबळ यांना अजित पवार कसे चालतात असं देखील या पत्रकार परिषदेमध्ये संघटनेकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे.  अजित पवार यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे मात्र ते छगन भुजबळ यांना चालतात. केवळ गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणालाच भुजबळ यांचा विरोध असल्याचं देखील या पत्रकार परिषदेमध्ये संघटनेकडून म्हणण्यात आलं आहे. राजीनामा राज्यपालांकडे द्या तर या पत्रकार परिषदेमध्ये छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याबाबत देखील टीका करण्यात आली आहे. भुजबळ यांनी राजीनाम्याबद्दलचे केलेले वक्तव्य संभ्रम निर्माण करत आहे त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे द्यायला पाहिजे होता मात्र अद्याप देखील ते त्याबद्दल सविस्तर बोलायला तयार नाहीत.  तर दुसरीकडे ते सरकारी गाडी, सरकारी सुविधा आणि मंत्र्यांसाठी सगळ्या असलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटचा लाभ घेत आहेत. यामुळे त्यांनी सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असा सल्ला मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे.

Ahmednagar News: छगन भुजबळ यांना अजित पवार कसे चालतात? ‘त्या’ प्रकरणात मराठा क्रांती मोर्चाकडून खुले आव्हान Read More »

Ahmednagar News: 6 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या! कुणाल भंडारी 

Ahmednagar News : 6 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या आणि सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालविण्यात यावा अशी मागणी अहमदनगर जिल्हा बजरंग दल संयोजक कुणाल भंडारी यांनी अहमदनगर पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.  त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, लातुर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील वलांडी भागात अत्यंत गरीब मागासवर्गीय कुटूंबातील 6 वर्षाच्या लहान मुलीवर निर्दयीपणे एका सराईत आरोपीने लैंगिक अत्याचार केला.  त्या आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी व सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालविण्यात यावा.  तसेच सदर पिडीत मुलीला व तिच्या कुटुंबियांना पोलिस संरक्षण देण्यात यावे आणि शासनाच्या वतीने मुलीच्या पुनर्वसनासाठी व तिच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात यावी. अशी मागणी त्यांनी आपल्या निवेदनात अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

Ahmednagar News: 6 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या! कुणाल भंडारी  Read More »