DNA मराठी

Blog

Your blog category

sawedi land

सावेडी जमीन व्यवहारात पुन्हा सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयावर खरेदीखतासाठी दबाव; ‘लक्ष्मी दर्शन’चे आमिष?

land Scam Sawedi – अहिल्यानगर : सावेडी येथील तब्बल ३५ वर्षांपूर्वीच्या जमिनीच्या संशयास्पद व्यवहारात नवे वळण आले आहे. या प्रकरणात बनावट खरेदीखताच्या आधारे पुन्हा एकदा नवीन खरेदीखत करण्यासाठी सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याची गंभीर माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, यासाठी आर्थिक आमिषाचे – ‘लक्ष्मी दर्शनाचे’ – प्रस्ताव दिल्याचेही समजते. सदर प्रकरणात २४५/ब२ या गट क्रमांकाची ०.६३ हेक्टर क्षेत्राची जमीन चर्चेचा विषय ठरली आहे. या भूखंडावर ३५ वर्षांपूर्वीचे खरेदीखत खरे की बनावट, याचा तपास सुरू असतानाच, त्याच खरेदीखताच्या आधारे नवी नोंदणी करण्याचा प्रयत्न होत आहे. संबंधित पक्षांनी दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन कर्मचारी व अधिकाऱ्यांवर नोंदणीसाठी दबाव आणल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, या नोंदणी प्रक्रियेत अडथळा नको म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांना ‘लक्ष्मी दर्शन’ देण्याचे सुचवले गेल्याचे संकेत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून, सरकारी यंत्रणेवर बाह्य हस्तक्षेपाचा गंभीर प्रकार म्हणून पाहिली जात आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी संबंधित व्यवहाराची चौकशी सुरू केली असून, मंडळ अधिकारी शैलजा देवकते यांनी वादी-प्रतिवादी पक्षांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच या गट नंबरवरील कोणताही व्यवहार चौकशी पूर्ण होईपर्यंत थांबवावा, असे आदेश सहाय्यक दुय्यम निबंधकांना दिले गेले आहेत. या सर्व घडामोडींमुळे भू-माफियांची धडकी भरली असून, प्रशासनावर दबाव आणण्याचे प्रकार आणि त्याला मिळणारी शासकीय यंत्रणांची साथ, या मुद्द्यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पुढील काळात ही चौकशी कुठपर्यंत जाते आणि दोषींवर कारवाई होते का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

सावेडी जमीन व्यवहारात पुन्हा सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयावर खरेदीखतासाठी दबाव; ‘लक्ष्मी दर्शन’चे आमिष? Read More »

land scam sawedi

सावेडी जमीन व्यवहारात गंभीर अनियमितता? — मंडळाधिकाऱ्यांकडून सुनावणीची नोटीस, खरेदी-विक्रीस स्थगिती सूचना

अहिल्यानगर – मौजे सावेडी (ता. जि. अहिल्यानगर) येथील स. नं. २४५/ब२ संदर्भात तब्बल ३४ वर्षांपूर्वीचा फेरफार क्रमांक ७३१०७ बेकायदेशीररित्या मंजूर केल्याचा आरोप उघड झाला आहे. याप्रकरणी कोणताही सक्षम न्यायालयाचा आदेश नसताना, कुळकायद्याचा भंग करत तसेच पूर्वी मंजूर झालेल्या फेरफार व खरेदीखत रद्द न करताच हा फेरफार मंजूर करण्यात आल्याचा गंभीर आरोप प्रशासनावर करण्यात आला आहे. या प्रकरणाची सत्यशोधक चौकशी करून संबंधित फेरफार त्वरीत रद्द करण्यात यावा, यासाठी मंडळाधिकारी, सावेडी, अहिल्यानगर यांनी दि. १० जुलै २०२५ रोजी तातडीचा पत्रव्यवहार केला आहे. यामध्ये सह दुय्यम निबंधक अहिल्यानगर (दक्षिण-१, उत्तर-२ आणि अहिल्यानगर-३) यांना निर्देश दिले गेले आहेत. सदर नोटीस महसूल अधिकारी, सावेडी यांचेमार्फत पाठवण्यात आली आहे. संदर्भात उल्लेख केलेले दस्तावेज — दस्त क्र. ४३०/१९९१, दिनांक १५/१०/१९९१ — नुसार, स. नं. २४५/ब१ (क्षेत्र ०.७२ हे.आर.) आणि स. नं. २४५/ब२ (क्षेत्र ०.६३ हे.आर.) या मिळकतींची विक्री झाल्याचे नोंदवले गेले. मात्र, दिनांक १७/०५/२०२५ रोजी फेरफार क्र. ७३१०७ नोंदवून पारसमल मश्रीमल शाह यांचे नाव बेकायदेशीरपणे नोंदवले गेले, असा दावा करण्यात आला आहे. हा फेरफार गैरप्रकाराच्या आधारे मंजूर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, यावर मा. उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील अहिल्यानगर यांच्याकडे चौकशीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. सदर अर्ज दि. ४ जुलै २०२५ रोजी मंडळाधिकारी शैलेजा देवकते याच्या कार्यालयास प्राप्त झाला आहे. चौकशी प्रक्रिया सुरू असून, सर्व संबंधितांनी १६ जुलै २०२५ रोजी आवश्यक कागदपत्रांसह मंडळाधिकारी शैलेजा देवकते सावेडी, तहसिल कार्यालय, अहिल्यानगर येथे उपस्थित राहावे, असे वादी आणि प्रतीवादी यांना स्पष्टपणे कळविण्यात आले आहे. याचबरोबर, अंतिम निर्णय होईपर्यंत कोणताही खरेदी-विक्री दस्त नोंदवू नये, अशी स्पष्ट पत्र मंडलधिकारी  शैलेजा देवकते यांनी सर्व दुय्यम निबंधकांना कळवण्यात आले आहे. त्यामुळे सदर जमिनीवरील कोणतेही प्रांत अधिकारी यांचा निर्णयाय होई पर्यंत सध्या स्थगित ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा प्रकार संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवणारा ठरत असून, जमीन व्यवहारातील पारदर्शकता व महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

सावेडी जमीन व्यवहारात गंभीर अनियमितता? — मंडळाधिकाऱ्यांकडून सुनावणीची नोटीस, खरेदी-विक्रीस स्थगिती सूचना Read More »

सावेडी जमीन संशयास्पद व्यवहार : गुजरातचे येतात, जमीन घेतात… आणि महाराष्ट्राचे अधिकारी बघ्याची भूमिका घेतात!

अहिल्यानगर – अहिल्यानगर शहरातील नगर-मनमाड रोडवरील सावेडी नाक्याच्या पुढे असलेल्या तब्बल १ हेक्टर ३५ आर क्षेत्रफळाच्या जमिनीच्या ३५ वर्षांनंतर झालेल्या संशयास्पद नोंदणीने सध्या शहरवासीयांमध्ये प्रचंड खळबळ उडवली आहे. हा केवळ एक जमीन व्यवहार नाही, तर प्रशासनातील बेजबाबदारपणा, सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त आणि भ्रष्ट यंत्रणेचे दर्शन घडवणारा प्रकार आहे. सावेडी मधील सर्व्हे नंबर २४५/ब १ आणि २४५/ब २ या जमिनीचे व्यवहार अचानक इतक्या वर्षांनी होणे आणि त्याचे खरेदीखत गुपचूप तयार होणे हेच पुरेसे संशय वाढवणारे आहे. इतक्या मोठ्या व्यवहारासाठी कोणतीही जाहिर सूचना नाही, आणि पारदर्शक प्रक्रियेचा लवलेशही नाही! हाडांचा कारखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जमिनीवरील जुन्या भिंती पाडल्या जातात आणि नव्या भिंती उभारण्याचे काम झपाट्याने सुरू होते. हे सगळं लोकांच्या नजरेआड करण्याचा केविलवाणा प्रयत्न नाहीतर काय? आणखी गंभीर बाब म्हणजे गुजरातमधून थेट बाहेरील लोक येऊन बांधकाम सुरू करतात आणि स्थानिक प्रशासन मूकदर्शक बनते. प्रांताधिकारी, तहसीलदार, अप्पर तहसीलदार, सर्कल अधिकारी आणि तलाठी यांच्याकडे तक्रारी गेल्यानंतरही काम थांबत नाही, उलट वेगाने सुरू राहते. यामागे सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त नसेल तर काय असेल? ९० कोटींपेक्षा जास्त किंमतीची जमीन असे सहज ताब्यात घेतली जात असेल, तर सामान्य नागरिकांनी काय करायचे? या प्रकरणात तत्कालीन तलाठी, सर्कल अधिकारी यांची भूमिका सखोल तपासली गेली पाहिजे. त्यांच्या निष्काळजीपणामुळे किंवा संभाव्य संगनमतामुळे इतका मोठा गैरव्यवहार झाला असेल, तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. नागरिकांनी आता जागरूक राहून उच्चस्तरीय चौकशीची मागणी जोर धरायला हवी. प्रशासन आणि सरकारने हे लक्षात घ्यायला हवे की, जमिनीवर भूखंडमाफियाचे सावट निर्माण झाले तर विकासाचे स्वप्न नेहमीच उध्वस्त होईल. आणि यात गरीब मारतो.. कोट्यवधींच्या जमिनीच्या लाटणीसाठी एखादा मोठा अनर्थ व्हावा लागेल का, म्हणजे प्रशासन जागे होईल? हा प्रश्न आज प्रत्येक अहिल्यानगरकराच्या मनात खोलवर टोचतो आहे. आता वेळ आली आहे की, पारदर्शक चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि भूमाफियांना पुन्हा अशा प्रकारची हिंमत करता कामा नये, याची व्यवस्था प्रशासनाने करावी. अन्यथा सावेडी प्रकरण हे भविष्यात अशा भूखंड लाटणाऱ्या टोळ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, आणि नागरी हक्कांचा आणि विकासाचा गळा घोटला जाईल, यात शंका नाही.

सावेडी जमीन संशयास्पद व्यवहार : गुजरातचे येतात, जमीन घेतात… आणि महाराष्ट्राचे अधिकारी बघ्याची भूमिका घेतात! Read More »

land Scam sawedi-हाडांचा कारखान्याच्या जमिनीच्या नोंदणीवरून वाद विवाद; मालकीसाठी दावे-प्रतिदावे.

land Scam Sawedi :- अहिल्यानगर – नगर-मनमाड रोडवरील सावेडी नाक्याच्या पुढे ओढ्यालगत असलेल्या “हाडांचा कारखाना” “bone factory” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील 1 हेक्टर 35 आर क्षेत्रफळाची जमीन सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तब्बल 35 वर्षांनंतर या जमिनीची संशयास्पद नोंदणी झाल्याने, या नोंदणीमुळे विविध दावे-प्रतिदाव्यांनी वातावरण चिघळले आहे. सावेडीतील सर्व्हे नंबर 245/ब 1 (0.72 हेक्टर आर) आणि 245/ब 2 (0.63 हेक्टर आर) या जमिनीची नोंदणी थेट तीन दशकांहून अधिक काळाने झाली. विशेष म्हणजे ही नोंदणी अनेक तर्कवितर्कांना कारणीभूत ठरत असून, अनेकांनी आपल्या मालकीचे दावे पुढे रेटले आहेत. कुणी खरेदीखत, कुणी साठेखात, तर कुणी हिजाबनाम्याचा आधार देत मालकीसाठी जोर लावू लागले आहे. हाडांचा कारखाना” “bone factory” असल्यामुळेपूर्वी या परिसरात भीतीचे सावट असायचे या परिसरात कुणीही फिरकत नव्हते आता या परिसरात इतर जमीन विकसित झाल्यामुळे या जमिनीला आता सोन्याचे मोल आले आहे. परिसराचा झपाट्याने झालेला विकास आणि वाढलेली जमीन किंमत बघता, जमिनीवर हक्क सांगणाऱ्यांची रांगच लागली आहे. दरम्यान, या प्रकरणात तलाठी कार्यालय आणि सर्कल कार्यालयावर गंभीर आरोप होत असून, नोंदणी करताना दाखवलेला बेफिकिरीचा आणि निष्काळजीपणाचा प्रकार धक्कादायक आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. नोंदणी करताना दस्तऐवजांची नीट पडताळणी न करता मंजुरी दिली गेली का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ प्रशासन या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पुढील भागात “सरकारी अधिकार्यान पेक्षा खाजगी लोकांची चालती” आणि त्यांचा या प्रकरणात सहभाग

land Scam sawedi-हाडांचा कारखान्याच्या जमिनीच्या नोंदणीवरून वाद विवाद; मालकीसाठी दावे-प्रतिदावे. Read More »

अहिल्यानगरमध्ये 35 वर्षांनंतर जमिनीचा संशयास्पद व्यवहार नोंद

अहिल्यानगरमध्ये 35 वर्षांनंतर जमिनीचा संशयास्पद व्यवहार नोंद; भूमाफियांना प्रशासनाचा हात?

अहिल्यानगरमध्ये 35 वर्षांनंतर जमिनीचा संशयास्पद व्यवहार नोंद; भूमाफियांना प्रशासनाचा हात? land Scam Sawedi :- अहिल्यानगर – सध्या राज्यात अहमदनगर मधील शहरी भागातील जमिनींचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत त्यातच झटपट आणि कमी काळात श्रीमंत होण्याची स्पर्धा जोरात सुरू आहे जे नागरिक हयात नाहीत किंवा पूर्वी शहर सोडून निघून गेले अशा अशा नागरिकांच्या जमिनी आणि प्लॉट शोधून अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या जमिनीचे बनावट खरेदीखत करायचं आणि ती चढ्या भावाने विकायची हा धंद्या सध्या अहिल्यानगर मध्ये जोरात सुरू आहे, अहिल्यानगर (सावेडी) (land Scam Sawedi) येथील सर्वे नंबर 245/ब 1 (क्षेत्रफळ 0.72 हेक्टर आर) व 245/ब 2 (क्षेत्रफळ 0.63 हेक्टर आर), एकूण 1 हेक्टर 35 आर जमिनीचा 35 वर्षांपूर्वीचा खरेदी व्यवहार तब्बल तीन दशकांनंतर सावेडी तलाठी कार्यालयात नोंदवला गेल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. मूळ मालक अब्दुल अजीज डायाभाई (मूळ पत्ता झेंडीगेट, अहिल्यानगर; सध्या वास्तव्य – मुंबई) यांनी 15 ऑक्टोबर 1991 रोजी पारसमल मश्रीमल शहा यांना विकलेली जमीन एवढ्या दीर्घ काळानंतर शासकीय नोंदवहीत दाखल होणं संशयाचे धुके गडद करत आहे.या प्रकरणात भूमाफियांना शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचाराचा आणि राजकीय वरदहस्ताचा आधार मिळाल्याची जोरदार चर्चा आहे. एवढ्या वर्षांनंतर नोंद घेताना मूळ मालकाला कोणतीही नोटीस न देता नोंद प्रक्रिया पूर्ण करण्यात आली, खरेदीखताची मूळ प्रत तपासण्यात आली नाही, यामुळे नोंदवह्यांची शुद्धता आणि शासकीय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. *भूमाफियांचे संगनमताने?बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या किंवा मृत व्यक्तींच्या नावावरील जमिनीवर खोटे दस्तऐवज तयार करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमीन हडप करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. अशा प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना मिळणारा मोठा आर्थिक फायदा, वरिष्ठांचे मूक समर्थन आणि काही राजकीय लोकांचा आशीर्वाद असल्याने हे घोटाळे बेधडक सुरू आहेत, असा आरोप केला जात आहे.उच्चस्तरीय चौकशीची मागणीया संशयास्पद व्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि शासकीय यंत्रणेत पसरलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. अहिल्यानगर परिसरात भूमाफियांचे वाढते धाडस आणि प्रशासनातील संदिग्ध भूमिका यामुळे जनतेत तीव्र संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणामुळे भूमी नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता आणि शासकीय यंत्रणेच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अहिल्यानगरमध्ये 35 वर्षांनंतर जमिनीचा संशयास्पद व्यवहार नोंद; भूमाफियांना प्रशासनाचा हात? Read More »

मोठी बातमी, एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44 टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत मिळणार

ST Workers Salary : गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती मात्र आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44 टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात वित्त सचिवांशी केलेल्या चर्चानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन लवकरच अदा करण्याची त्यांनी तयारी दर्शवली. एसटी कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे फक्त 56 टक्के वेतन मिळाल्याचे वृत्त पसरल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. तर दुसरीकडे सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री शिंदे यांची काही एसटी कर्मचाऱ्यांनी भेट घेऊन आपले उर्वरित वेतन लवकरच देण्याची मागणी केली होती. या मागणीची तत्काळ दखल घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राज्याचे वित्त सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेअंती एसटी कर्मचाऱ्यांचे या महिन्याचे उर्वरित 44 टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत अदा करण्यात येईल असे गुप्ता यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढाकाराने एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यांच्यावरील वेतन कपातीचे संकट दूर होण्यास मदत झाली आहे.

मोठी बातमी, एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44 टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत मिळणार Read More »

Maharashtra Cabinet Expansion :महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, विखे पाटलांसह ‘या’ नेत्यांनी घेतली शपथ

Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारच मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आले आहे. यात 39 आमदार मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. या सोहळ्यात भाजपकडून 19 शिवसेनेकडून 16 राष्ट्रवादी काँग्रेसकडून 11आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पुढील 1-2 दिवसात खाते वाटप होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वप्रथम कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. तर मागच्या सरकारमध्ये असणाऱ्या उदय सामंत, शंभूराजे देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे आणि संजय राठोड या मंत्र्यांना कायम ठेवण्यात आले आहे. या नेत्यांनी घेतली शपथशिवसेना मंत्री1 गुलाबराव पाटील2 दादा भुसे3 संजय राठोड4 उदय सामंत5 शंभुराजे देसाई6 संजय शिरसाट7 प्रताप सरनाईक8 भरतशेठ गोगावले9 प्रकाश अबिटकर राज्यमंत्री10 आशिष जैस्वाल11 योगेश कदम भाजप मंत्री 1 चंद्रशेखर बावनकुळे2 राधाकृष्ण विखे पाटील3 चंद्रकांत पाटील4 गिरीश महाजन5 गणेश नाईक6 मंगलप्रभात लोढा7 जयकुमार रावल8 पंकजा मुंडे9 अतुल सावे10 अशोक उईके11 आशिष शेलार12 शिवेंद्रराजे भोसले13 जयकुमार गोरे14 संजय सावकारे15 नितेश राणे16 आकाश फुंडकर राज्यमंत्री 317 माधुरी मिसाळ18 पंकज भोयर19 मेघना बोर्डीकर राष्ट्रवादी काँग्रेस मंत्री 1 हसन मुश्रीफ2 धनंजय मुंडे3 दत्ता भरणे4 आदिती तटकरे5 माणिकराव कोकाटे6 नरहरी झिरवाळ7 मकरंद पाटील8 बाबासाहेब पाटील राज्यमंत्री9 इंद्रणिल नाईक

Maharashtra Cabinet Expansion :महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, विखे पाटलांसह ‘या’ नेत्यांनी घेतली शपथ Read More »

Amrita Khanwilkar : उत्तम काम सोबतीला आव्हानं 2024 वर्षात अमृताने केल्या ‘या’ खास गोष्टी !

Amrita Khanwilkar : 2025 अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल आहे आणि अश्यातच अभिनेत्री अमृता खानविलकर हिने 2024 वर्ष तिच्या साठी कसं होत हे शेयर केलं ! अमृताने 2024 वर्षात अनेक कमालीचे बॉलिवूड प्रोजेक्ट्स केले आणि त्याला प्रेक्षकांची तितकीच पसंती देखील मिळाली. बॉलिवुड मध्ये अमृताने विविध विषयांवर काम केलं आणि त्या भूमिका खास केल्या आता अर्थात या भूमिका दिसायला सोप्प्या असल्या तरी त्या तितक्याच आव्हानात्मक होत्या ! 2024 मध्ये अमृताने खऱ्या अर्थाने ओटीटी बॉलिवुड गाजवल आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. लुटेरे, चाचा विधायक है हमारे 3, 36 डे बडे हिंदी प्रोजेक्ट्स अमृताने केले. अमृता कायम चर्चेत असलेली अभिनेत्री राहिली आहे आणि तिने हे या वर्षात देखील सिद्ध केल. ” वर्ल्ड ऑफ स्त्री” सारखा शास्त्रीय आणि अर्ध-शास्त्रीय संगीत आणि नृत्याची अनोखी मैफिल तिने या वर्षात प्रेक्षकांना दिली. मराठी सिनेमा आणि अमृताच नात हे अतूट आहे आणि म्हणून 2024 वर्षात तिने वेगळ्या धाटणीच्या भूमिका असलेले चित्रपट केले. लाईक अँड सबस्क्राईब , धर्मरक्षक संभाजी महाराज या चित्रपटातून तिने कमालीच्या भूमिका साकारल्या. अमृताच काम इथेच थांबत नाही तर तिने या वर्षात टेलिव्हीजन विश्वात देखील आपली छाप पाडली नेहमी पेक्षा वेगळ पण तितकच कठीण काम करण्यासाठी ती ड्रामा ज्युनियर्स साठी जज च्या भूमिकेत बसली. कामाच्या दृष्टीने अमृताने अनेक गोष्टी खास प्रोजेक्ट्स तर केले पण तिने मुंबईत स्वतःच हक्काचं घर देखील घेतलं. आगामी वर्षात अमृता आता काय काय प्रोजेक्ट्स करणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

Amrita Khanwilkar : उत्तम काम सोबतीला आव्हानं 2024 वर्षात अमृताने केल्या ‘या’ खास गोष्टी ! Read More »

Woman’s Rights: काही महिलांकडून कायद्याचा गैरवापर, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर

Woman’s Rights: काही महिला कायद्याचा गैरवापर करत आहेत. कुटुंबातील वादविवाद वकील आणि पोलिसांपर्यंत पोहोचणे योग्य नाही, असे मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले. बलात्काराच्या वाढत्या घटनांबाबत बोलताना त्यांनी सरकारने महिलांच्या बाबतीत अधिक संवेदनशील होण्याची गरजही व्यक्त केली. भोपाल येथे जनसुनावणीसाठी आलेल्या रहाटकर यांनी सांगितले की, महिलांवर होणाऱ्या हिंसा आणि अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी कायदे बनवले गेले आहेत. मात्र, काही महिला या कायद्यांचा चुकीचा वापर करत असल्याचे आढळून आले आहे. महिलांवर हिंसा आणि अत्याचार थांबवण्यासाठी हे कायदे तयार करण्यात आले आहेत, पण जर या कायद्यांमुळे पुरुषांवर अन्याय होत असेल, तर ते चुकीचे आहे. काही महिलांच्या चुकीच्या वागण्यामुळे महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या कायद्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी बेंगळुरूमधील इंजिनिअर अतुल सुभाष प्रकरणावर देखील भाष्य केले. या वेळी त्या म्हणाल्या की, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटना घडू नयेत. समाजात घडणाऱ्या घटनांकडे पाहताना असे वाटते की कुठेतरी काहीतरी कमी किंवा चूक आहे. महिलांच्या हिंसा व अत्याचारापासून रक्षणासाठी जे कायदे बनवले गेले आहेत, त्यांचा काही महिला चुकीचा वापर करत असल्याचे दिसते. हे मान्य होऊ शकत नाही. हे कायदे महिलांच्या सन्मानासाठी आहेत. मात्र, जर पुरुषांवर अत्याचार होत असेल, तर ते चुकीचे आहे. काही महिलांच्या या वागण्यामुळे देशातील हजारो महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या कायद्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. असे होणे टाळायला हवे. आम्ही “राष्ट्रीय महिला आयोग तुमच्या दारात” हा उपक्रम सुरू केला आहे. आयोगाकडे देशभरातून तक्रारी येतात. परंतु, गाव-खेड्यांतील महिलांना दिल्लीपर्यंत पोहोचणे अवघड जाते. म्हणून आम्हीच त्यांच्या दारात पोहोचण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय महिला आयोग केंद्राच्या नियमांनुसार कार्य करते, तर राज्य महिला आयोग राज्य सरकारच्या नियमांनुसार कार्य करते. दोघेही आपापल्या स्तरावर काम करत असतात. राष्ट्रीय महिला आयोग महिलांशी संबंधित विषयांवर संशोधन करून त्यांचे अहवाल केंद्र सरकारला सादर करतो, ज्यायोगे नवीन कायदे तयार करण्यात मदत होते. असं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर म्हणाल्या.

Woman’s Rights: काही महिलांकडून कायद्याचा गैरवापर, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर Read More »

Sukanya Samriddhi Yojana:  ‘ही’ योजना मुलींना करणार मालामाल, देते 3 पट परतावा; जाणून घ्या फायदे

Sukanya Samriddhi Yojana :  तुम्ही देखील तुमच्या मुलीच्या भविष्याचा विचार करून गुंतवणूक करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सरकार एक जबरदस्त योजना गेल्या काही वर्षांपासून राबवत आहे.  या योजनेत तुम्ही गुंतवणूक करून तुमच्या मुलीचा भविष्य चांगलं करू शकतात. तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करु शकता.  10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचे वडील आपल्या मुलासाठी या योजनेत गुंतवणूक सुरू करू शकतात. या योजनेत 8.2 टक्के दराने व्याज मिळते. यामध्ये, जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये वार्षिक आणि किमान ठेव मर्यादा 250 रुपये आहे. अशा परिस्थितीत मुलीचे वडील त्यांच्या खिशानुसार या योजनेत रक्कम जमा करू शकतात. सुकन्या समृद्धी योजनेत 15 वर्षे सतत गुंतवणूक करावी लागते. 21 वर्षांनंतर, योजना परिपक्व होते आणि गुंतवणूक केलेली रक्कम आणि व्याजासह संपूर्ण रक्कम परत केली जाते.  तुम्ही त्यात दरवर्षी ठराविक रक्कम जमा केल्यास, मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण गुंतवलेल्या रकमेच्या तिप्पट जास्त रक्कम मिळेल. येथे गणना जाणून घ्या. 1.5 लाख रुपयांच्या वार्षिक ठेवीवर प्रथम गणना जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत वार्षिक 1.5 लाख रुपये जमा केले तर 15 वर्षांत तुम्हाला एकूण 22,50,000 रुपये जमा होतील. 8.2 टक्के व्याजानुसार तुम्हाला 46,77,578 रुपये व्याज मिळेल.  हे व्याज तुमच्या गुंतवलेल्या रकमेच्या दुप्पट आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला गुंतवलेली रक्कम आणि व्याजासह एकूण 69,27,578 रुपये मिळतील, जे एकूण गुंतवलेल्या रकमेच्या तिप्पट आहे. 1 लाख रुपयांच्या वार्षिक ठेवीवर दुसरी गणना तुम्ही SSY मध्ये वार्षिक 1,00,000 रुपये जमा केल्यास, 15 वर्षांत एकूण 15,00,000 रुपये जमा केले जातील. SSY कॅल्क्युलेटरनुसार, तुम्हाला एकूण ठेवीवर 8.2 टक्के व्याजदराने 31,18,385 रुपये व्याज मिळेल. 15 लाखांची दुप्पट रक्कम 30 लाख रुपये असेल.  अशा परिस्थितीत हे व्याज गुंतवलेल्या रकमेच्या दुप्पट आहे. अशा प्रकारे, तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 46,18,385 रुपये मिळतील, जे गुंतवलेल्या रकमेच्या तिप्पट असेल. 50 हजार रुपयांच्या वार्षिक ठेवीवर तिसरी गणना जर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर या योजनेत वार्षिक 50,000 रुपये जमा केले तर तुम्ही मासिक 4,167 रुपये गुंतवाल. तुम्ही 15 वर्षांत एकूण 7,50,000रु.ची गुंतवणूक कराल.  8.2 टक्के व्याजदरानुसार, तुम्हाला एकूण 15,59,193 रुपये फक्त व्याज म्हणून मिळतील, जे दुप्पट आहे.  अशा प्रकारे तुम्हाला मॅच्युरिटीवर रु.7,50,000+15,59,193= रु. 23,09,193 मिळतील. 23,09,193 रुपये हे तुमच्या गुंतवलेल्या रकमेच्या तिप्पट आहे.

Sukanya Samriddhi Yojana:  ‘ही’ योजना मुलींना करणार मालामाल, देते 3 पट परतावा; जाणून घ्या फायदे Read More »