DNA मराठी

DNA Marathi News

kirit somaiya

Kirit Somaiya : हिंदू मंदिरांजवळ बांंग्लादेशी मुस्लिम माफियांची अतिक्रमणे; किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप

Kirit Somaiya : महाराष्ट्रात अनेक हिंदू मंदिरांजवळ बांग्लादेशी मुस्लिम माफिया, ड्रग माफिया, फेरीवाले कब्जा घेतात. अडथळे निर्माण करतात. नेवासे येथील घटनाही त्यातील एक भाग आहे. मला याचा राग आला. मी जिल्हा प्रशासनाकडे संताप व्यक्त केला आहे. ठरवून मुस्लिम अतिक्रमणे सुरू आहेत, असे मत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) यांनी व्यक्त केले. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काल (ता. ३०) नेवासे येथे जाणून पैस खांब मंदिराला भेट देत दर्शन घेतले. त्यानंतर नागरिकांनी त्यांना मंदिर परिसरातील अतिक्रमणांबाबत निवेदन दिले. या संदर्भात त्यांनी पोलीस प्रशासनाकडे मागणी केली. या घटनाक्रमाची माहिती त्यांनी प्रसार माध्यमांना देताना हे वक्तव्य केले. ते पुढे म्हणाले की, नगरपालिकेने सरकारी कामात अडथळ्याबाबत तक्रार केली नाही. पोलिसांनीही ज्याला मारहाण झाली त्याची केवळ तक्रार घेतली, स्वतः काहीच केले नाही. म्हणून मी पोलीस व नगरपालिकेला २४ तासांचा इशारा दिला आहे. २४ तासांत सरकारी कामात अडथळा, सरकारी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की, छेडछाड हे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. या मागील माफिया किंगवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. २४ तासांनंतर येथे एक जरी मुस्लिम बांग्लादेशी फेरीवाला बसला तर त्याला नगरपालिका व पोलीस प्रशासनाला जाब द्यावा लागेल. अनेक वर्षांपासून दंगे होतील, अशी शासन-प्रशासनात प्रवृत्ती तयार झाली आहे. मुंबईतही पोलिसांनी अशीच नौटंकी केली. हे आम्हा आता सहन करणार नाही. मुस्लिम फेरीवाल्यांनी हिंदू भक्तांना मारहाण केली, त्यावेळी पोलिसांनी बोटचेपीची भूमिका का घेतली, याबाबत मी पोलीस प्रशासनाला जाब विचारला आहे, असे त्यांनी सांगितले. जर नेवासे येथील मंदिर परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई झाली नाही तर मी स्वतः मंदिर परिसरात येऊन आंदोलन करणार आहे. मंदिर परिसरात एकही मुस्लिम फेरीवाला, बांग्लादेशी माफिया दिसता कामा नये, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

Kirit Somaiya : हिंदू मंदिरांजवळ बांंग्लादेशी मुस्लिम माफियांची अतिक्रमणे; किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप Read More »

team india

AFG vs IND : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियात ‘या’ खेळाडूंना मिळणार संधी

AFG vs IND : आशिया कप आणि आगामी आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाच्या पुढील टी-20 मालिकेकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सप्टेंबरमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार असल्याचे वृत्त आहे. मालिकेतील सामने 13, 15 आणि 17 सप्टेंबर 2026 रोजी खेळवले जाण्याची शक्यता आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसताना संभाव्य संघाबाबत चर्चा सुरू झाली आहे. कोणाला मिळू शकते संधी? संभाव्य संघात अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, जसप्रीत बुमराह यांसारख्या प्रमुख खेळाडूंचा समावेश होऊ शकतो. संभाव्य संघाची चर्चा करताना फलंदाजीसोबतच गोलंदाजी विभागातही अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. अफगाणिस्तानचा संघ जाहीर दरम्यान, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. इब्राहिम झद्रानकडे टी-20 संघाचे पूर्णवेळ कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. दुखापतीनंतर वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकचे संघात पुनरागमन झाले आहे. अफगाणिस्तानच्या संघात राशिद खान, रहमानुल्लाह गुरबाज, नूर अहमद, मोहम्मद नबी, गुलबदीन नायब, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी आणि अजमतुल्लाह उमरझाई यांसारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. आगामी स्पर्धांच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. भारताला आपल्या टी-20 संघातील पर्याय तपासण्याची संधी मिळेल, तर अफगाणिस्तानचा संघ राशिद खानसह आपल्या प्रमुख खेळाडूंच्या जोरावर भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. मात्र टीम इंडियाचा अंतिम संघ BCCI कडून जाहीर झाल्यानंतरच कोणत्या खेळाडूंना प्रत्यक्ष संधी मिळणार हे स्पष्ट होईल.

AFG vs IND : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियात ‘या’ खेळाडूंना मिळणार संधी Read More »

manoj jarange

Manoj Jarange: जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण सुरू; मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार नाही, सरकारला इशारा

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आज सकाळी 10 वाजता आमरण उपोषणाला सुरुवात केली. हे आपले निर्णायक आणि शेवटचे आमरण उपोषण असल्याचे जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. उद्यापासून बोलणे शक्य होणार नाही, त्यामुळे आजच समाजाशी संवाद साधत असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाजाने मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत दाखल व्हावे आणि आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे प्रमाणपत्रांची मागणी शिंदे समितीला सापडलेल्या 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे तत्काळ कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी जरांगे पाटील यांनी केली. गावागावातील पात्र बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याचे स्पष्ट होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, मात्र अद्याप प्रमाणपत्र मिळालेले नाही, त्यांनी अंतरवाली सराटीत यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच ज्यांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे, पण तो स्वीकारण्यात आलेला नाही, अशांनीही अंतरवालीत यावे, असे त्यांनी सांगितले. कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे, मात्र जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही, अशांनीही आपापल्या नोंदी घेऊन अंतरवाली सराटीत यावे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. संबंधितांकडून अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्याचे आवाहनही त्यांनी केले. ‘कुणबी प्रमाणपत्र पुरेसे नाही, जात वैधता कशी देणार?’ केवळ कुणबी प्रमाणपत्र देऊन प्रश्न सुटणार नाही, तर जात वैधता प्रमाणपत्र कसे दिले जाणार? याची स्पष्ट माहिती सरकारने द्यावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यांच्या जात वैधतेचा प्रश्न तातडीने सोडवावा आणि पात्र असलेल्या सर्व प्रकरणांची वैधता करावी, अशी त्यांची भूमिका आहे. हैदराबाद गॅझेटमधील नोंदींच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करावी आणि त्यानंतर जात वैधता कशी केली जाणार, याची स्पष्ट कार्यपद्धती सरकारने जाहीर करावी, असे ते म्हणाले. ‘फक्त प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन मान्य नाही त्याच्या वैधतेबाबतही स्पष्ट अंमलबजावणी हवी,’ असा इशारा त्यांनी दिला. सातारा, कोल्हापूर आणि औंध संस्थांच्या जीआरची मागणी सातारा संस्था, कोल्हापूर संस्था आणि औंध संस्थांबाबतचे जीआर तातडीने काढून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. या संस्थांच्या माध्यमातून मिळणाऱ्या लाभांसाठी जात वैधता कशी केली जाणार, हेही सरकारने स्पष्ट करावे, असे ते म्हणाले. केवळ जीआर काढून पुन्हा समाजाची फसवणूक करू नये. यापूर्वी मागण्या मान्य करण्यात आल्या, मात्र त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. ‘करू, करू’ म्हणता म्हणता 75 वर्षे गेली, अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली. ‘सरकारवर पूर्णपणे भरोसा ठेवू नका’ मराठा समाजाने यापुढे सरकारवर पूर्णपणे भरोसा ठेवणे बंद करावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. ‘आपला पक्ष, आपला नेता कोणीही नाही; या जगात फक्त जात आपली आहे,’ असे ते म्हणाले. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेला लढा आता विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा त्यांनी केला. ही शेवटची फाईट असून गाफील राहू नका, दगाफटका होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी समाजाला दिला. ‘मी तुमच्या लेकराबाळांसाठी जीव द्यायला तयार’ मराठा समाजाने अंतरवाली सराटीकडे मोठ्या संख्येने धावून यावे, असे भावनिक आवाहन जरांगे पाटील यांनी केले. ‘सगळ्यांनी बाहेर पडा, मी तुमच्या लेकराबाळांसाठी जीव द्यायला तयार आहे,’ असे ते म्हणाले. सलग तीन वर्षे मुलांच्या भविष्यासाठी लढत असल्याचे सांगत त्यांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला त्रास झाल्यानंतर आपण जसे धावून जातो, तसेच अंतरवाली सराटीकडे धावून या, असेही त्यांनी म्हटले. SEBC-EWS मधील नियुक्त्यांवरही ठाम भूमिका SEBC आणि EWSमधून निवड झालेल्यांना नियुक्त्या मिळेपर्यंत आंदोलन थांबवणार नाही, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली. तसेच महामंडळाचे सर्व परतावे देण्याची मागणीही त्यांनी केली. एकूणच, कुणबी प्रमाणपत्रांसोबत जात वैधता, सातारा-कोल्हापूर-औंध संस्थांचे जीआर, SEBC-EWS मधील नियुक्त्या आणि महामंडळाच्या परताव्यांसह विविध मागण्यांवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका घेत जरांगे पाटील यांनी आपले उपोषण निर्णायक असल्याचे स्पष्ट केले आहे.

Manoj Jarange: जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण सुरू; मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार नाही, सरकारला इशारा Read More »

Ahmednagar Court

Ahilyanagar Crime: तहसील कार्यालयात गोळ्यांचा थरार; अॅड. रियाज पठाण हत्या प्रकरणात 7 जणांना मरेपर्यंत जन्मठेप

Ahilyanagar Crime: नेवासा तहसील कार्यालयाच्या आवारात भरदिवसा गोळ्या झाडून अॅड. रियाज पठाण यांची हत्या करणाऱ्या सात आरोपींना अखेर न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. तब्बल १३ वर्षांपासून गाजत असलेल्या या बहुचर्चित खून खटल्यात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी सातही दोषींना मरेपर्यंत जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली. तर सबळ पुराव्याअभावी पाच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद या निकालात निर्णायक ठरला. १६ सप्टेंबर २०१३ नेवासा तहसील कार्यालयाचा परिसरात भरदिवसा बंदुकीच्या गोळ्यांचा थरार! अॅड. रियाज पठाण यांच्यावर आरोपी प्रवीण खर्चन याने पिस्तुलातून सलग तीन गोळ्या झाडल्या. त्यावेळी त्याच्या साथीदारांनी पठाण यांचे हात पकडून ठेवल्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीतून समोर आले. या हल्ल्याने नेवासा तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. गोळीबारानंतर गंभीर जखमी अवस्थेत अॅड. पठाण यांना उपचारासाठी नेवासा येथून अहिल्यानगरमधील नोबेल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. घटनेनंतर पोलिसांनी मुख्य आरोपी प्रवीण खर्चन याला पिस्तुलासह ताब्यात घेतले. एका साक्षीचा गैरसमज आणि आखला हत्येचा कट एका खून खटल्यात अॅड. रियाज पठाण यांनी साक्ष दिल्याच्या गैरसमजातून आरोपींनी त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप सरकारी पक्षाने ठेवला होता. नेवासा पोलिसांनी या प्रकरणात एकूण १२ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.खटल्यादरम्यान सरकार पक्षाने तब्बल २९ साक्षीदार तपासले.प्रत्यक्षदर्शी साक्ष, वैद्यकीय अहवाल, शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक पुरावे यांच्या आधारे न्यायालयाने सात आरोपी दोषी ठरवले. निकमांचा युक्तिवाद; आरोपींचे बचावाचे दावे फोल मुख्य आरोपी प्रवीण खर्चन याने घटनेच्या वेळी आपण अज्ञान अर्थात नाबालिक असल्याचा दावा करून खटला चालविण्यास विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी हा दावा सप्रमाण खोडून काढत आरोपी सज्ञान असल्याचे न्यायालयासमोर सिद्ध केले. मोहन लष्करे आणि सादिक शेख यांनी घटनेच्या वेळी आपण नेवासा फाटा येथे असल्याचा दावा केला होता. मात्र, उलटतपासणीत त्यांचा हा दावा टिकला नाही. आरोपींच्या बचावाकडून पठाण गँग आणि गाढे गँगमधील वैमनस्यातून ही हत्या झाली असा युक्तिवाद करण्यात आला मात्र सरकारी पक्षाने हा दावाही पुराव्यांच्या आधारे खोडून काढला. अॅड. उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात केवळ दोषींविरोधातील भक्कम पुराव्यांवरच भर दिला नाही, तर ज्या पाच आरोपींविरोधात कटातील सहभागाचा प्रत्यक्ष व ठोस पुरावा उपलब्ध नाही, त्यांना निर्दोष सोडण्याची भूमिकाही स्पष्टपणे मांडली. न्यायालयाने ही बाब ग्राह्य धरत पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाने प्रवीण खर्चन, मोहन लष्करे, रामेश्वर गाढे, चौरंगीनाथ लष्करे, पवन नरुल्ला, सचिन चव्हाण आणि सादिक बशीर शेख या सात आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली. तर अशोक जगताप, सत्यवान सोनकांबळे, विलास जिरे, सोपान गाढे आणि सुनील ऊर्फ सोन्या परदेशी यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.१७ नोव्हेंबर २०१८ पासून सुरू असलेल्या या प्रदीर्घ खटल्याच्या सुनावणीला अखेर न्यायालयीन पूर्णविराम मिळाला आहे. तब्बल १३ वर्षांपूर्वी तहसील कार्यालयाच्या आवारात झालेल्या त्या थरारक हत्येचा निकाल लागल्याने पठाण कुटुंबीयांसह नेवासा परिसराचे या निकालाकडे लक्ष लागले होते. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना अॅड. परिमल फळे यांनी सहाय्य केले.

Ahilyanagar Crime: तहसील कार्यालयात गोळ्यांचा थरार; अॅड. रियाज पठाण हत्या प्रकरणात 7 जणांना मरेपर्यंत जन्मठेप Read More »

Money 1

EPFO Rules : PF काढण्याची घाई करू नका; 36 महिन्यांपर्यंत थांबल्यास काय फायदा होऊ शकतो? जाणून घ्या नवे नियम

EPFO Rules : नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी PF म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हा भविष्यातील आर्थिक आधार असतो. दर महिन्याला पगारातून काही रक्कम PF खात्यात जमा होते आणि त्यावर व्याजही मिळते. त्यामुळे नोकरी सोडल्यानंतर लगेच PF मधील संपूर्ण रक्कम काढण्याऐवजी ती काही काळ तशीच ठेवणे फायदेशीर ठरू शकते. मात्र, सध्या PF आणि पेन्शनशी संबंधित नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. विशेषतः नोकरी सोडल्यानंतर PF आणि EPS मधील रक्कम काढण्याच्या कालावधीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी EPF आणि EPS यातील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. नोकरी सोडल्यानंतर लगेच संपूर्ण PF काढता येणार नाही नव्या नियमांनुसार, नोकरी सोडल्यानंतर संपूर्ण EPF रक्कम काढण्यासाठी पूर्वीच्या तुलनेत जास्त काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. पूर्वी नोकरी सोडल्यानंतर दोन महिने बेरोजगार राहिल्यानंतर अंतिम PF सेटलमेंट करता येत होते. आता हा कालावधी 12 महिने करण्यात आला आहे. म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी सोडली आणि त्यानंतर लगेच दुसरी नोकरी मिळाली नाही, तरी त्याला संपूर्ण PF रक्कम तातडीने काढता येणार नाही. मात्र, नियमांनुसार काही विशिष्ट कारणांसाठी आंशिक PF काढण्याची सुविधा उपलब्ध राहते. मग 36 महिन्यांचा नियम नेमका कशासाठी? येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 36 महिन्यांचा नियम EPF आणि EPS दोन्हीसाठी सारखा नाही. कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच EPS मधील withdrawal benefit मिळवण्यासाठी प्रतीक्षा कालावधी 36 महिने करण्यात आला आहे. यामागचा उद्देश कर्मचारी आपली पेन्शनची बचत लगेच काढून टाकू नयेत आणि दीर्घकाळासाठी सामाजिक सुरक्षा व पेन्शनचा आधार टिकवून ठेवावा हा आहे. त्यामुळे “PF काढण्यासाठी 36 महिने थांबावे लागेल” असे सरसकट म्हणणे अचूक नाही. पूर्ण EPF काढण्याचा कालावधी 12 महिने, तर EPS withdrawal benefit साठी 36 महिने असा फरक समजून घेणे गरजेचे आहे. PF लगेच न काढल्यास काय फायदा? PF मधील रक्कम न काढता खात्यात ठेवली तर ती दीर्घकाळासाठी बचत म्हणून काम करू शकते. त्यावर लागू असलेल्या नियमांनुसार व्याज मिळत राहू शकते आणि त्यामुळे भविष्यातील निधी वाढू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याच्या PF खात्यात आधीच मोठी रक्कम जमा असेल आणि त्याला पैशांची तातडीची गरज नसेल, तर ती रक्कम लगेच काढण्याऐवजी निवृत्तीपर्यंत किंवा पुढील नोकरीत PF खाते ट्रान्सफर करून ठेवणे अधिक फायदेशीर ठरू शकते. यामुळे निवृत्तीच्या काळासाठी मोठा निधी तयार करण्यास मदत होते. नोकरी बदलली असेल तर PF काढण्याऐवजी ट्रान्सफर करणे चांगले एखाद्या कर्मचाऱ्याने एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत नोकरी स्वीकारली असेल, तर PF काढण्याऐवजी जुना PF नवीन नियोक्त्याच्या खात्यात ट्रान्सफर करणे सामान्यतः अधिक योग्य पर्याय ठरतो. PF ट्रान्सफर केल्यामुळे जुनी बचत कायम राहते आणि पुढील नोकरीदरम्यान त्यात नवीन योगदान जमा होत राहते. यामुळे निवृत्तीच्या वेळी मिळणारा एकूण निधी वाढण्यास मदत होते. PF खात्यात पैसे ठेवले तर व्याज मिळते का? या बाबतीतही एक महत्त्वाचा फरक आहे. फक्त नोकरी सोडली म्हणून PF खाते लगेच बंद किंवा निष्क्रिय होत नाही. मात्र काही परिस्थितींमध्ये खाते inoperative होऊ शकते. EPFOच्या माहितीनुसार, काही निष्क्रिय खात्यांमध्ये व्याज मिळणे थांबू शकते. त्यामुळे जुने PF खाते असल्यास त्याची स्थिती तपासणे आणि आवश्यक असल्यास रक्कम योग्य खात्यात ट्रान्सफर करणे महत्त्वाचे आहे. 36 महिने म्हणजे तीन वर्षे 36 महिने म्हणजे साधारण तीन वर्षे मात्र हा कालावधी पाहताना EPF आणि EPS वेगळे समजणे आवश्यक आहे. EPS मधील withdrawal benefit साठी 36 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे. दुसरीकडे, EPFच्या अंतिम सेटलमेंटसाठी बेरोजगारीनंतर 12 महिन्यांचा कालावधी लागू आहे. सरकारचा उद्देश काय? नव्या नियमांमागचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा देणे हा आहे. नोकरी गेल्यानंतर मिळालेली PFची संपूर्ण रक्कम लगेच खर्च करण्याऐवजी ती भविष्यासाठी सुरक्षित राहावी, तसेच पेन्शनशी संबंधित लाभ कायम राहावेत, यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. विशेषतः EPS मधील रक्कम लवकर काढून टाकल्यास कर्मचाऱ्याच्या भविष्यातील पेन्शन सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सरकारने withdrawal benefit साठी प्रतीक्षा कालावधी वाढवला आहे. कर्मचाऱ्यांनी काय लक्षात ठेवावे? नोकरी सोडल्यावर संपूर्ण PF लगेच काढण्याची घाई करू नका. नवीन नोकरी मिळाल्यास जुना PF नवीन खात्यात ट्रान्सफर करण्याचा पर्याय विचारात घ्या. EPF आणि EPS हे वेगवेगळे घटक आहेत; दोन्हींचे withdrawal नियम एकसारखे नाहीत. EPFच्या अंतिम सेटलमेंटसाठी सध्याच्या नियमांनुसार 12 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी लागू आहे. EPS withdrawal benefit साठी 36 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे. जुन्या किंवा निष्क्रिय PF खात्याची स्थिती तपासा. तातडीची आर्थिक गरज नसल्यास PFची रक्कम दीर्घकाळ बचत म्हणून ठेवणे निवृत्तीसाठी फायदेशीर ठरू शकते.

EPFO Rules : PF काढण्याची घाई करू नका; 36 महिन्यांपर्यंत थांबल्यास काय फायदा होऊ शकतो? जाणून घ्या नवे नियम Read More »

BJP

Loksabha Election: आज लोकसभा निवडणूक झाली तर भाजपला मोठा फायदा? महाराष्ट्र आणि बंगालमध्ये चित्र बदलण्याचा अंदाज

Loksabha Election : देशात आज लोकसभा निवडणूक झाली तर निकाल कसा लागेल, याबाबत नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून भाजप आणि एनडीएसाठी चांगले संकेत मिळाले आहेत. या सर्वेक्षणानुसार, सध्याच्या राजकीय परिस्थितीत भाजपची ताकद 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत वाढलेली दिसत आहे. सर्वेक्षणानुसार भाजपला एकट्याला सुमारे 261 जागा मिळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे काँग्रेसला सुमारे 106 जागा, तर इतर पक्षांना मिळून सुमारे 176 जागा मिळू शकतात. 2024 मध्ये भाजपला 240 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे या अंदाजानुसार भाजपच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रात भाजपला फायदा होण्याचा अंदाज महाराष्ट्र हा देशातील सर्वात महत्त्वाच्या लोकसभा राज्यांपैकी एक आहे. येथे लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला होता. मात्र, त्यानंतर राज्यातील राजकीय परिस्थितीत मोठे बदल झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर तयार झालेल्या वेगवेगळ्या राजकीय आघाड्या, त्यानंतर झालेली विधानसभा निवडणूक आणि सत्तेची बदललेली समीकरणे याचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीच्या राजकारणावर होऊ शकतो. ताज्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात महायुतीला आधीच्या तुलनेत चांगली स्थिती निर्माण होण्याचे संकेत मिळत असल्याचे अहवाल सांगतात. त्यामुळे 2024 मध्ये झालेल्या नुकसानाची काही प्रमाणात भरपाई भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांना करता येऊ शकते, असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे. पश्चिम बंगालमध्येही भाजपसाठी बदलते चित्र पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत. गेल्या काही वर्षांपासून राज्यात भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. 2024 मध्ये तृणमूल काँग्रेसने बंगालमध्ये चांगली कामगिरी केली होती. मात्र, त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र दिसून आले आहे. यामुळे बंगालमध्ये भाजपला आगामी काळात अधिक जागा मिळू शकतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. काही सर्वेक्षणांमध्ये भाजपच्या मतांच्या टक्केवारीत वाढ होण्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र, बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस अजूनही मजबूत पक्ष असल्याचे काही सर्वेक्षणांचे निष्कर्ष सांगतात. त्यामुळे येथे थेट भाजपला मोठा विजय मिळेल असे निश्चितपणे म्हणता येणार नाही. उत्तर प्रदेशात विरोधकांना फायदा? सर्वेक्षणातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उत्तर प्रदेश. देशात सर्वाधिक लोकसभा जागा असलेल्या या राज्यात विरोधकांच्या इंडिया आघाडीला काही प्रमाणात फायदा होण्याचा अंदाज आहे. सर्वेक्षणानुसार उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीला सुमारे 41 जागा, तर एनडीएला सुमारे 38 जागा मिळू शकतात. मतांच्या टक्केवारीतही दोन्ही आघाड्यांमध्ये फार मोठा फरक नसल्याचे या अंदाजातून दिसते. 2024 नंतर भाजपची परिस्थिती बदलली 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वतःच्या बळावर बहुमत मिळाले नव्हते. पक्षाला 240 जागा मिळाल्या होत्या. मात्र, एनडीएमधील मित्रपक्षांच्या मदतीने केंद्रात सरकार स्थापन झाले. त्यानंतर देशातील विविध राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. यापैकी अनेक ठिकाणी भाजपने चांगली कामगिरी केली. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची घसरलेली स्थिती पुन्हा सुधारत असल्याचा दावा भाजप समर्थकांकडून केला जात आहे. सर्वेक्षण म्हणजे अंतिम निकाल नाही या सर्व आकडेवारीकडे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेऊन पाहणे गरजेचे आहे. सर्वेक्षणात लोकांना सध्याच्या परिस्थितीत त्यांचा कल विचारला जातो. प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरतील, कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मतदार पसंती देतील आणि स्थानिक राजकीय समीकरणे कशी बदलतील, यावर अंतिम निकाल अवलंबून असतो. त्यामुळे आजच्या सर्वेक्षणाच्या आधारावर भाजपला 261 जागा मिळतील किंवा एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल, असे निश्चितपणे सांगता येणार नाही.

Loksabha Election: आज लोकसभा निवडणूक झाली तर भाजपला मोठा फायदा? महाराष्ट्र आणि बंगालमध्ये चित्र बदलण्याचा अंदाज Read More »

sushma andhare

Sushma Andhare : ‘महिला सक्षमीकरणाच्या पदावरून पब-बारचा व्यवसाय?’ सुषमा अंधारेंची रुपाली चाकणकरांवर टीका

Sushma Andhare : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माजी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षांचे नाव पब-बारच्या व्यवसायाशी जोडले जात असेल, तर हा नैतिक अधिकाराचा गंभीर प्रश्न असल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे. अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी विविध मुद्द्यांवर सरकार आणि संबंधित व्यक्तींवर टीका केली. रुपाली चाकणकर यांच्या कथित हॉटेल-पब-बार व्यवसायाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी प्रत्येकाला रोजगार करण्याचा अधिकार असल्याचे मान्य केले. पब किंवा बारचा व्यवसाय करणे हा कायद्याच्या चौकटीतील व्यवसाय असेल तर त्याला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असलेल्या व्यक्तीचे नाव बारच्या मालकीण म्हणून चर्चेत येत असेल, तर नैतिकतेच्या दृष्टीने हा प्रश्न निर्माण होतो, असे अंधारे यांनी म्हटले. महिला आयोग ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि महिलांवरील अन्यायाविरोधात काम करणारी संस्था आहे. त्यामुळे या पदावर असलेल्या व्यक्तीबाबत अशा प्रकारच्या चर्चा होणे गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांवरील लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये नाव येण्यापासून ते पब-बार व्यवसायापर्यंतच्या मुद्द्यांचा संदर्भ देत अंधारे यांनी चाकणकरांवर निशाणा साधला. या प्रकरणावरून त्यांनी महिला आयोगाच्या कामकाजाबाबतही प्रश्न उपस्थित केले. रुग्णालयातील घटनेवरून सरकारवर सवाल अमरावतीतील रुग्णालयातील घटनेवरूनही सुषमा अंधारे यांनी सरकारला धारेवर धरले. २०२२ मध्ये याच रुग्णालयात अशाच प्रकारची घटना घडली होती. त्या घटनेचा चौकशी अहवाल अद्याप समोर आलेला नाही, असा दावा त्यांनी केला. रुग्णालयातील विविध कामांसाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी निधीसाठी पाठपुरावा केला होता. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून रुग्णालयाला निधी उपलब्ध करून दिला जातो. या समितीचे प्रमुख पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत. मात्र, रुग्णालयासाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असल्याचा आरोप अंधारे यांनी केला. याच मुद्द्यावरून त्यांनी नवनीत राणा यांच्या हनुमान गढीच्या विकासासाठी देण्यात आलेल्या निधीचा संदर्भ देत सरकारला प्रश्न विचारला. रुग्णालयासाठी निधी उपलब्ध नाही, असे सांगितले जाते; मग हनुमान गढीसाठी १२१ कोटी रुपये कसे उपलब्ध झाले?, असा सवाल त्यांनी केला. हनुमान गढीवर मोठ्या संख्येने नागरिक येत असल्याबाबत पोलिसांनी दिलेल्या अहवालावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. चुकीचा अहवाल देणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. लहान मुलांच्या जीवाशी संबंधित प्रकरण असल्याने हा विषय गंभीरपणे हाताळण्याची गरज असल्याचे अंधारे यांनी सांगितले. औषध निरीक्षक भरती रद्द केल्याचे स्वागत औषध निरीक्षक भरती प्रक्रियेत पेपरफुटीचा आरोप झाल्यानंतर सरकारने भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सुषमा अंधारे यांनी स्वागत केले. मात्र, केवळ परीक्षा रद्द करून प्रश्न सुटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पेपर फुटला कसा? पेपर फोडणारे कोण होते? त्यांना कधी अटक केली जाणार? असे प्रश्न त्यांनी सरकारला विचारले. पेपरफुटीमागील व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. याशिवाय ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी मेहनत घेतली आणि ज्यांची वयोमर्यादा पुढील भरतीच्या वेळी संपणार आहे, त्यांच्या भवितव्याचे काय, असा सवालही अंधारे यांनी उपस्थित केला. पेपरफुटीची जबाबदारी सरकारची असल्याने संबंधित उमेदवारांना न्याय देण्यासाठी सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. बाळांना वाचवणाऱ्या परिचारिकांचा सन्मान करा अमरावतीतील रुग्णालयात घडलेल्या घटनेच्या वेळी बाळांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या परिचारिकांचे अंधारे यांनी कौतुक केले. संकटाच्या काळात या परिचारिकांनी दाखवलेले धैर्य महत्त्वाचे असल्याचे सांगत, त्यांना सरकारी सेवेत कायम करण्यात यावे, पुरस्कार देण्यात यावा आणि शौर्यपदकाने सन्मानित करावे, अशी मागणी त्यांनी केली. रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्था, निधी आणि प्रशासनाच्या कामकाजाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचेही अंधारे यांनी सांगितले. एकूणच, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर केलेली टीका, अमरावतीतील रुग्णालयाच्या निधीचा मुद्दा आणि औषध निरीक्षक भरतीतील पेपरफुटी या तीनही विषयांवरून सुषमा अंधारे यांनी सरकारला लक्ष्य केले. या सर्व प्रकरणांमध्ये सरकारने केवळ घोषणा न करता चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि संबंधितांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Sushma Andhare : ‘महिला सक्षमीकरणाच्या पदावरून पब-बारचा व्यवसाय?’ सुषमा अंधारेंची रुपाली चाकणकरांवर टीका Read More »

Jayant Patil

Jayant Patil : निष्ठा महत्त्वाची; परिस्थिती बदलत असते’, जयंत पाटलांचा भाजप प्रवेशाच्या चर्चेवर सूचक टोला

Jayant Patil : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असून राज्यातील मंत्रिमंडळात त्यांना स्थान देखील भेटणार असल्याची चर्चा जोराने सुरू आहे. तर आता या चर्चांवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांना टोला लावला आहे. निष्ठा महत्त्वाची आहे. परिस्थिती बदलत असते अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. जयंत पाटील म्हणाले की, मी राजकारणात आलो त्यावेळी फार वेगाने होतो. माझ्या राजकारणाच्या सुरवातीला फार संघर्ष होता. मी त्यावेळी एक बॅग घेऊन आलो होतो. त्यावेळी दिलीप तात्या होते. उद्याचा सूर्य जयंत पाटील हायवे च्या सर्व भिंती रंगवल्या होत्या. त्यावेळी मी 21 वर्षाचा होतो. मी ज्यावेळी पुस्तक लिहीन याच्या पेक्षा माझं पुस्तक चांगले असेल. सगळ्यांना घेऊन राजकारण करणे म्हणजे दीर्घकालीन राजकारण आणि म्हणून मी बेरजेचे राजकारण मी सुरू केले. मी राजकारणात आलो अनेक जणांची मन दुखावली. पण बापूच्या निष्ठाई मुले माझा बरोबर राहिले. मी फार चांगले काम केले म्हणून नाही. या सर्वांनी त्याग केला आहे. बदलत गेले ना तर त्या माणसाची व्हॅल्यू कमी होत जाते. त्यामुळे निष्ठा असणे गरजेचे आहे. पण निष्ठा असायला हवी असं जयंत पाटील म्हणाले. भाजप प्रवेशावर काय म्हणाले जयंत पाटील? राजकारण फार महत्वाचे असते. निष्ठा महत्व, पण मागच्या काळात संपले आहे. पण याचे दिवस जात असतात. असे समजू नका. आपण ठाम असले तर परिस्थिती बदलते. निष्ठा बुडल्या सारखी वाटते. पण पूर आला की बुडून जाते पण परिस्थिती नुसार राहायचे असेल तर आम्ही तयार आहे उद्या सकाळी खासदार आणि आमदार.. पण निष्ठा महत्वाची आहे. बाळ कडू नी संघर्ष करण्याचं या ठिकाणाहून शिकवले आहे. कृष्ण काठच्या माणस आम्ही फार वेगळी आहोत. आमच्या मनात काय आहे हे सहजासहज इतरांना कळत नाही. कृष्णा काठच्या लोकांची आपली परंपरा लढाईची आहे असं जयंत पाटील म्हणाले.

Jayant Patil : निष्ठा महत्त्वाची; परिस्थिती बदलत असते’, जयंत पाटलांचा भाजप प्रवेशाच्या चर्चेवर सूचक टोला Read More »

Manoj Jarange Patil

Manoj Jarange : मुंबई आंदोलनावरुन मनोज जरांगे पाटील आक्रमक; सरकारला थेट इशारा

Manoj Jarange : मुंबईतील आंदोलनांवर निर्बंध घालण्याच्या राज्यसरकारच्या निर्णयावरून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. दक्षिण मुंबईतील आझाद मैदान वगळता इतर ठिकाणी आंदोलन, धरणे किंवा मोर्चा काढण्यास निर्बंध घालण्याच्या निर्णयाला त्यांनी तीव्र विरोध केला आहे. मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने येणार असल्यानेच सरकारने हे नवे नियम लागू केल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात. मागण्या मान्य झाल्या तर मुंबईत आंदोलन करण्याची वेळच येणार नाही. मात्र, मागण्या प्रलंबित ठेवून आंदोलनाला परवानगी नाकारली, तरी आपला आंदोलनाचा निर्धार कायम राहील, असा स्पष्ट इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. मुंबईतील आंदोलनांसाठी सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी करताना जरांगे पाटील यांनी आपण कायद्याचा सन्मान करत असल्याचे स्पष्ट केले. आंदोलनासाठी प्रशासनाकडे परवानगीचा अर्ज करण्यात आला आहे. त्यामुळे सरकारने परवानगी द्यावी; मात्र परवानगी दिली नाही तरी आंदोलनापासून माघार घेतली जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. सरकारवर निशाणा साधताना जरांगे पाटील यांनी, जनतेनेआणि विशेषतः मराठा समाजाने सरकारला सत्तेवर बसवले, पण आता त्याच समाजाला मुंबईत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. मुंबईतील आंदोलनांवर निर्बंध घालण्यामागे मराठा समाजाच्या संभाव्य आंदोलनाचीच भीती असल्याचेही त्यांनी म्हटले. मुंबईतील नागरिकांनी आंदोलनाच्या काळात काही दिवस सहकार्य करावे, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले. मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य केल्या, तर मुंबईत येण्याची गरजच भासणार नाही. मात्र, मागण्या मान्य न झाल्यास मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईत दाखल होईल, असा इशारा त्यांनी दिला. “मराठे मुंबईत जाणार आहेत, त्यामुळे मुद्दामून सरकारने हे केलं. यात झाकून ठेवण्यासारखं काहीच नाही… आम्ही कायद्याचा सन्मान करतो. आम्ही तुम्हाला परवानगीचा अर्ज दिला आहे. तुम्ही परवानगी द्या, नाहीतर नका देऊ.” दरम्यान, २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जरांगे पाटील यांनी पुन्हा स्पष्ट केले. या आंदोलनानंतर मुंबईतील आंदोलनाची तारीख निश्चित केली जाईल, असे त्यांनी सांगितले. मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर झाल्यानंतर मराठा समाजाने तयारीत राहावे, वाहनांना किक मारून मुंबईच्या दिशेने निघावे आणि आंदोलनात विजय मिळवूनच परत यायचे, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. फडणवीस सरकारने दादागिरी करू नये, असा थेट इशारा देत जरांगे पाटील यांनी आझाद मैदानासह मुंबईतील विविध ठिकाणी आंदोलन करण्याची भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा आणि आंदोलनाची वेळ येऊ नये, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली आहे. दुसरीकडे, मुंबईतील कायदा सुव्यवस्था आणि आंदोलनांवरील निर्बंधांचा मुद्दा आता पुन्हा चर्चेत आला असून, २९ ऑगस्टच्या अंतरवाली सराटी येथील आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Manoj Jarange : मुंबई आंदोलनावरुन मनोज जरांगे पाटील आक्रमक; सरकारला थेट इशारा Read More »

img 20260826 wa0004

IPS Vaibhav Gaikwad : तेलंगणात IPS वैभव गायकवाड यांच्या कारवाईची गुन्हेगारांमध्ये धास्ती

IPS Vaibhav Gaikwad : महाराष्ट्रातील धडाडीचे अधिकारी म्हणून IAS तुकाराम मुंडे यांची कार्यशैली चर्चेत असताना, अहिल्यानगरच्या मातीतून भारतीय पोलीस सेवेत गेलेल्या एका अधिकाऱ्याने तेलंगणात आपल्या कर्तृत्वाची वेगळी छाप निर्माण केली आहे. पिंपळगाव माळवी येथील मूळ रहिवासी असलेले 2018 बॅचचे IPS अधिकारी वैभव रघुनाथ गायकवाड सध्या हैदराबाद शहरात DCP, Task Force म्हणून जबाबदारी सांभाळत असून संघटित गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी, अवैध धंदे आणि अन्नभेसळीविरोधात त्यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई सुरू आहे. तेलंगणा कॅडरमध्ये नियुक्ती झाल्यानंतर गायकवाड यांच्या सेवेला नालगोंडा जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून सुरुवात झाली. त्यानंतर वरंगळ येथे Assistant Superintendent of Police म्हणून त्यांनी काम पाहिले. याच ठिकाणी Additional DCP Administration आणि Task Force अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही त्यांनी सांभाळल्या. पुढे पेद्दापल्ली आणि नागरकर्नूल जिल्ह्यांचे Superintendent of Police म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. विविध ठिकाणी काम करताना कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण, तपास आणि प्रतिबंधात्मक पोलिसिंगचा व्यापक अनुभव त्यांनी मिळवला. डिसेंबर 2025 पासून ते हैदराबाद शहराच्या Task Forceचे नेतृत्व करत आहेत. हैदराबादमधील Task Forceकडे संघटित गुन्हेगारी, राऊडीशीटर्स, अवैध धंदे, गंभीर गुन्ह्यांचा तपास आणि मालमत्तेविषयक गुन्ह्यांचा छडा लावण्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. संवेदनशील धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीही हे पथक महत्त्वाची भूमिका बजावते. अन्नभेसळीविरोधात H-FASTची धडक मोहीम गायकवाड यांच्या कार्यकाळातील लक्षवेधी उपक्रमांपैकी एक म्हणजे H-FAST — Hyderabad Food Adulteration Surveillance Team. मार्च 2026 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे अन्नभेसळीविरोधात पोलिस आणि अन्नसुरक्षा यंत्रणेचा समन्वय साधत कारवाई केली जात आहे. गुप्त माहिती, नागरिकांच्या तक्रारी आणि क्षेत्रीय माहितीच्या आधारे संशयित ठिकाणे शोधून Food Safety Officers आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या मदतीने संयुक्त छापे टाकले जात आहेत. नमुने संकलित करणे, पुरावे गोळा करणे, भेसळीचा स्रोत शोधणे आणि संपूर्ण पुरवठा साखळीचा मागोवा घेण्यावर भर दिला जात आहे. मार्च 2026 पासून आतापर्यंत 208 गुन्हे दाखल, तर 232 प्रकरणे Food Safety Officersकडे सोपविण्यात आली आहेत. या कारवाईत तब्बल 2 लाख 92 हजार 298 किलो, म्हणजेच सुमारे 292 टन भेसळयुक्त साहित्य जप्त करण्यात आले आहे. मसाले, तूप, दुग्धजन्य पदार्थ, मांसजन्य पदार्थ, चहा, फळे, बेकरी उत्पादने आणि Ginger-Garlic Paste यांसह विविध खाद्यपदार्थांचा त्यात समावेश आहे. तपासात काही ठिकाणी Synthetic Colours, Fabric Dye Colours, Palm Oil, Vanaspati, Starch आणि इतर अपायकारक पदार्थांचा वापर करून खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केली जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे H-FASTची कारवाई केवळ दुकानदारांपुरती मर्यादित न राहता भेसळीच्या मूळ स्रोतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. अमली पदार्थांविरोधातही मोठी कारवाई हैदराबाद City Narcotics Wingची जबाबदारीही वैभव गायकवाड यांच्याकडे आहे. मागील आठ महिन्यांत या विभागाने अमली पदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई केली असून 400 पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवायांमध्ये 25 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. एका मोठ्या कारवाईत सुमारे 3 कोटी रुपयांचे Hash Oil जप्त करण्यात आले. तर दुसऱ्या महत्त्वपूर्ण तपासात झारखंडमधील रांची आणि मुंबई येथून दोन आरोपींना अटक करण्यात आली. Speed Postच्या माध्यमातून देशातील सुमारे 22 राज्यांमध्ये गांजाचा पुरवठा केला जात असल्याचे तपासात समोर आले. मुंबईत लोकल ट्रेनच्या माध्यमातून गांजाची घरपोच डिलिव्हरी केली जात असल्याचाही पर्दाफाश झाला. या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपयांचे ड्रग नेटवर्क उघडकीस आणण्यात आले. अमली पदार्थांच्या व्यवसायात सहभागी असलेल्या तसेच व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या 35 विदेशी नागरिकांना हद्दपार करण्यात आले असून त्यांच्या भारतातील पुनःप्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे. ‘Supply’सोबत ‘Demand’वरही लक्ष नार्कोटिक्सविरोधातील मोहीम केवळ तस्करांना पकडण्यापुरती मर्यादित ठेवण्यात आलेली नाही. अमली पदार्थांची मागणी कमी करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. सरकारी रुग्णालयांमधील De-addiction Centresच्या माध्यमातून व्यसनाधीन व्यक्तींना उपचार आणि पुनर्वसनासाठी पाठविले जात आहे. हैदराबाद शहरात अलीकडच्या काळात सुमारे 2 हजार व्यक्तींची Drug Testing करण्यात आली. त्यापैकी सुमारे 800 जण Drug Positive आढळले असून त्यांना पुढील व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन प्रक्रियेत सहभागी करण्यात आले. विशेष म्हणजे या गटात केवळ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचाच समावेश नसून Street Crimeमध्ये सहभागी व्यक्तींपासून ते IT आणि अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या सुशिक्षित व्यक्तींपर्यंत विविध स्तरांतील नागरिक आढळून आले. त्यामुळे अमली पदार्थांविरोधातील लढ्यात Supply आणि Demand या दोन्ही बाजूंवर एकाचवेळी लक्ष केंद्रित केले जात आहे. तस्करीची साखळी तोडण्यासोबतच व्यसनाधीन व्यक्तींना उपचार आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अहिल्यानगरच्या भूमिपुत्राची तेलंगणात ठसा उमटवणारी कामगिरी पिंपळगाव माळवीसारख्या ग्रामीण भागातून भारतीय पोलीस सेवेत दाखल झालेल्या वैभव गायकवाड यांनी तेलंगणातील विविध आव्हानात्मक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. Task Force, Narcotics Wing आणि H-FASTसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमधून कठोर कारवाईसोबतच intelligence-based policing, तपास आणि प्रतिबंधात्मक पोलिसिंगवर त्यांनी भर दिला आहे. अन्नभेसळ करणारे व्यावसायिक, अमली पदार्थांचे तस्कर, संघटित गुन्हेगारीतील आरोपी आणि अवैध धंदे करणाऱ्यांविरोधातील सातत्यपूर्ण कारवाईमुळे हैदराबादमध्ये कायदा मोडणाऱ्यांवर पोलिसांचा दबाव वाढला आहे. महाराष्ट्राच्या मातीतून घडलेला हा अधिकारी तेलंगणात कर्तव्य बजावत असताना आपल्या कामगिरीने अहिल्यानगरचे नाव उज्ज्वल करत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

IPS Vaibhav Gaikwad : तेलंगणात IPS वैभव गायकवाड यांच्या कारवाईची गुन्हेगारांमध्ये धास्ती Read More »