DNA मराठी

ahmednagar news

Maharashtra News: अवैध जुगार व्यवसाय बंद करा अन्यथा शेवगाव-गेवराई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन…!

Maharashtra News : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव सह ग्रामीण भागात जुगाराचे मोठमोठे फड सुरू आहे. “बिनधास्त या आणि खेळा’ या धर्तीवर काही घरात तर ठिक- ठिकाणी दिवसाढवळ्या, रात्रंदिवस जुगार सुरु असल्याकारणाने गावात अशांतता निर्माण झाली असून व्यसनाधीन लोकांच्या घरात दररोज भांडणतंटे होत असल्याने घराघरात अशांतता पसरली आहे.  तसेच दादागिरी करुन पैशांची मागणी करणे, सट्टा, पत्ता, जुगार खेळण्यासाठी घरातील संसारपयोगी वस्तू व धान्य विकून तसेच एवढ्यावरच न थांबता घरातील महिलांच्या अंगावरील दागदागिने सौभाग्याच लेण मंगळसूत्र मोडून किंवा गहाण ठेवून तसेच शासनमान्य स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य विकून व्यसनपूर्ती करत असून या भागातील सुरू असलेले जुगार व्यवसाय तातडीने बंद करून संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा कुठल्याही क्षणी शेवगाव-गेवराई राज्य महामार्गावर बोधेगाव या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन बोधेगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण यांनी अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना ईमेलद्वारे दिले आहे.  अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना ईमेलद्वारे दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे  की, बोधेगाव येथे बेकायदा जुगाराच्या अड्ड्यामुळे या भागातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. इतर तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील गुन्हेगार प्रवृत्तीचे युवक देखील जुगार खेळण्यासाठी बोधेगावात येत असून यामुळे चोऱ्या होण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे या भागातील सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गावातील 17 ते 24 वर्षातील तरुण मुलांची वर्दळ वाढलेली आहे, पत्ते खेळायला तरुण मुलांची गर्दी व्हायला पाहिजे म्हणून दारू, मटण, सिगारेट इत्यादी सह अन्य आमिषे दिले जात आहे.  अवैध सुरू असलेल्या जुगार व्यवसायामुळे या भागातील गुन्हेगारी देखील बोकाळत चालली आहे. त्यामुळे बोधेगाव परिसरातील तरुण पिढी व्यसनाधीन होऊन त्यांचे भविष्य खराब करण्याचे काम अवैध जुगार व्यवसाय चालवणाऱ्याकडून या भागात सुरू असून सर्वसामान्यांचे संसार वाचविण्यासाठी जुगाराच्या अड्ड्यांवर कारवाई करावी  तसेच पोलिसांकडून यावर कारवाई न झाल्यास जुगाराच्या अड्ड्यावर महिला मोर्चा नेऊन तो बंद पाडू अशी मागणी बोधेगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण यांनी अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना ईमेलद्वारे दिले लेखी निवेदनद्वारे केली आहे.

Maharashtra News: अवैध जुगार व्यवसाय बंद करा अन्यथा शेवगाव-गेवराई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन…! Read More »

Ahmednagar News: अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा, 4,66,140 रुपयाचा मुद्देमाल जप्त

Ahmednagar News: Dysp संदिप मिटके यांच्या पथकाने मोठी कारवाई करत कोपरगाव येथील अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा टाकून तब्बल 4,66,140 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुप्त बातमी धारामार्फत Dysp संदीप मिटके यांना माहिती मिळाली की, कोपरगाव येथील साई कॉर्नर जवळ नगरपालिकेच्या गाळ्यामध्ये साईगंगा मोटर गॅरेज मध्ये मनोज गिरमे हा इसम चार चाकी वाहनांमध्ये अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग करत आहे.  या माहितीवरून संयुक्त कारवाई करण्याकरिता संदीप मिटके यांनी कोपरगाव येथील तहसीलदार यांना कळवून माहिती दिली.   त्यांनी तहसील कार्यालय  येथील पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे यांना संयुक्त कारवाई करण्याकरता पाठवले त्यावर सदर ठिकाणी पथकातील पोलीस अमलदार पाठवुन  पंचासमक्ष छापा टाकुन दोन चार चाकी वाहनांसह गॅस सिलेंडर भरण्याचे रिफिलिंग मशीन व 19 घरगुती गॅस टाक्या तसेच 2 कमर्शियल गॅस टाक्या जप्त करण्यात आले आहेत.  तसेच मनोज चंद्रकांत गिरमे (वय 43 रा. खडकी रोड तालुका कोपरगाव) अल्ताफ बाबू शेख ( वय 48 रा. मनमाड ता. नांदगाव जि. नाशिक) या आरोपिंना ताब्यात घेण्यात आले.  आरोपींच्या ताब्यातून चार चाकी वाहने , गॅस टाक्या, मशीन असा एकूण 4,66,140 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन  येथे अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3,7 आणि भारतीय दंड संहिता 1860 कलम 285 अंतर्गत पोलीस हेडकॉन्स्टेबल इरफान शेख यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.  या कारवाईमुळे कोपरगाव तालुका परिसरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

Ahmednagar News: अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा, 4,66,140 रुपयाचा मुद्देमाल जप्त Read More »

Ahmednagar News : टिपु सुलतानच्या नावापुढे श्री नाव जोडल्याने हिंदुंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवरती कारवाई करा

Ahmednagar News: टिपु सुलतानच्या नावापुढे श्री नाव जोडल्याने हिंदुंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद तर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, 30 डिसेंबर 2023  महाराष्ट्र बॉडी बिल्डर मान्यतेने अहमदनगर डिस्ट्रीक्ट बॉडी बिल्डींग आयोजित टिपू सुलतान श्री शरीर सौष्ठ्य स्पर्धा भरवणारे सय्यद शहा फैजल (शानु), सोहेल शेख व सर्व आयोजकां विरोधात हिंदु धर्माचे आराध्य दैवत गणपती यांचे श्री हे नाव भारतावरती इस्मामिक राज्य आणण्याच्या हेतुने लाखों हिंदुंचे कतलेआम करणाऱ्या व हजारो हिंदु मंदिरे पाडणाऱ्या, हिंदू महिलांवरती बलात्कार करणाऱ्या टिपु सुलतान या इस्लामिक जिहादी आक्रमंताचे नाव जोडुन हिंदु धार्मियांची भावना दुखावुन तसेच रहदारीला अडथळा निर्माण करुन शहरातील पोलिसांच्या दप्तरी नोंद असलेले अति संवेदनशील आशा टॉकीज परिसर ज्या भागातुन कुठल्याही हिंदुंच्या मिरवणुक, मोर्चे काढण्यासाठी पोलिसांचे परवानगीसाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागते.  अशा ठिकाणी ही स्पर्धा भरवुन शहरामध्ये धार्मित तेढ निर्माण करण्याचे ठळक उद्देश दिसून येते.  यामधील सय्यद शहा फैजल (शानु) हा अनेक प्रकारच्या हिंदु मुस्लिम वादामध्ये आरोपी आहे. त्यामुळे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला हे कारस्थान करुन शहर व राज्यासह देशात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.  त्यामुळे पोलिसांनी अतिशीघ्र संबंधीतांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत व हिंदुंच्या भावना दुखावल्या प्रकारणी कठोर स्वरुपाचे गुन्हे दाखल करावे.

Ahmednagar News : टिपु सुलतानच्या नावापुढे श्री नाव जोडल्याने हिंदुंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवरती कारवाई करा Read More »

Manoj Jarange : ‘तीन कोटी मराठे मुंबईकडे कूच करतील, थांबवलं तर…’,मनोज जरांगे यांचा इशारा

Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज पुढील महिन्यात ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर मोठे आंदोलन करणार आहे.  जरांगे येथील शिष्टमंडळ मैदानाची पाहणी करण्यासाठी मुंबईत पोहोचले. दरम्यान, मुंबईत आंदोलनाला परवानगी न मिळाल्यास मुंबईतच आमरण उपोषणाला बसणार असल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.  राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी इशारा दिला आहे. तसेच सकल मराठा समाजाने आंदोलनस्थळी येऊन मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा द्यावा, अशी विनंती जरांगे यांनी केली आहे. मराठा आंदोलन रद्द होणार नाही पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाने दुफळीत पडू नये. सर्वांनी एकत्र यावे. हा गरीब मराठ्यांच्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. जरांगे पुढे म्हणाले की, मराठा आंदोलकांना मोठ्या प्रमाणात मैदान लागणार आहे, त्यासाठी तयारी सुरू आहे.  मराठ्यांचा मुंबईत आंदोलनाचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. 3 कोटी मराठे मुंबईवर हल्ला करणार! तीन कोटींहून अधिक मराठा आंदोलक मुंबईत येतील, असा दावा त्यांनी केला. मुंबई दौरा रद्द होणार नाही. 20 जानेवारीपर्यंत हा मोर्चा मुंबईकडे निघणार आहे.  मराठा समाजातील लोक मोठ्या संख्येने मुंबईत पोहोचणार आहेत. मुंबईतील सर्व मैदाने लागतील. आता मैदान देण्याची जबाबदारी सरकारची आहे. थांबवले तर फडणवीस यांच्या घरावर आंदोलन करतील मनोज जरांगे यांनी इशारा दिला की, “20 जानेवारी रोजी मोठ्या संख्येने मराठा मुंबईत येणार असून सरकारने त्यांची वाहने रोखल्यास थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दारातच आंदोलन करू.  आमची वाहने बंद पडली तर आम्ही आमचे सामान कसे नेणार? मुंबईत राहण्यासाठी तंबू, दैनंदिन जीवनातील गोष्टी हव्या आहेत, ज्या आम्ही ट्रॅक्टर-ट्रॉलीने मुंबईत आणू. आम्ही ते दगडांनी भरून आणणार नाही…” मराठा समाजाला आवाहन करताना जरांगे म्हणाले की, सरकार आमच्यावर कारवाई करेल… त्यामुळे मराठ्यांनी आपली वाहने जप्त होतील, अशी भीती बाळगू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. प्रत्यक्षात मराठा मोर्चादरम्यान लाखो वाहने शहरात येणे अपेक्षित आहे. गेल्या महिन्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी नऊ दिवसांचे बेमुदत उपोषण संपवले. तेव्हा राज्य सरकारने दोन महिन्यात समाजाला आरक्षणाचा लाभ देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही योग्य ती पावले न उचलल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा जरांगे यांनी दिला होता.  दोन महिन्यांत मराठा आरक्षणाबाबत निर्णय न झाल्यास मुंबईवर मोठा मोर्चा काढणार असल्याचे जरंगे यांनी सांगितले होते. महाराष्ट्रातील मराठा समाज शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी करत आहे. या मागणीबाबत जरंगे यांनी बेमुदत उपोषणाची घोषणा केल्यानंतर आंदोलनाला नवी गती मिळाली.  मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान राज्यभरात हिंसाचारही उसळला, अनेक आमदार आणि नेत्यांची घरे, कार्यालये आणि सरकारी मालमत्तांची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली.  मात्र, मुंबईत येणाऱ्या मराठा मोर्चासाठी पोलिसांनी कंबर कसली असून मराठा समाजातील प्रमुख चेहऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

Manoj Jarange : ‘तीन कोटी मराठे मुंबईकडे कूच करतील, थांबवलं तर…’,मनोज जरांगे यांचा इशारा Read More »

Ahmednagar News: गोमांस विक्री करणारे 06 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Ahmednagar News : स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत बोधेगांव व खाटीक गल्ली शेवगांव येथे गोवंश जनावराची कत्तल करुन गोमांस विक्री करणारे 06 आरोपींना 90,200 रुपये किमतीचे मुद्देमालासह अटक केली आहे. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना  जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने माहिती घेवुन कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.  या आदेशानुसार दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/अतुल लोटके, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, पोकॉ/प्रमोद जाधव, किशोर शिरसाठ, शिवाजी ढाकणे, अमृत आढाव,उमाकांत गावडे यांचे पथक नेमुण त्यांना अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेकामी सुचना देवुन पथकास रवाना केले. नमुद आदेशान्वये पथकातील पोलीस अंमलदार हे शेवगांव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना खाटीक गल्ली, शेवगांव व बोधेगांव, ता. शेवगांव या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशीय जनावरांचे कत्तल करण्याची मनाई असतांना गोवंशी जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने आणुन त्यांची कत्तल करत करत आहेत अशी बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी दिनांक 28/12/2023 व दिनांक 29/12/2023 रोजी छापे टाकुन कारवाई करण्यात आली आहे.

Ahmednagar News: गोमांस विक्री करणारे 06 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई Read More »

Ahmednagar News: आरोपी विरोधात कारवाई करा! ‘त्या’ प्रकरणात समस्त मुस्लिम समाजाची मागणी

Ahmednagar News :  मुकुंदनगर परिसरात मौलाना असलम शेख यांना 27 डिसेंबर रोजी मारहाण करण्यात आली होती. या मारहाणी विरोधात परिसरातील नागरिकांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयमध्ये निवेदनाद्वारे आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  या प्रकरणात आरोपी असणाऱ्या अनिस सय्यदने मौलाना असलम शेख यांना गॅस कनेक्शनच्या वादातून जबरी मारहाण केली. या मारहाणीत मौलाना असलम शेख यांच्या उजव्या डोळ्याला मार लागला आहे.  या घटनेनंतर आरोपी विरोधात भिंगार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांनी आरोपी विरोधात आणखी कलम वाढवून योग्य ती कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे.

Ahmednagar News: आरोपी विरोधात कारवाई करा! ‘त्या’ प्रकरणात समस्त मुस्लिम समाजाची मागणी Read More »

Sujay Vikhe News : शेवटच्या गावापर्यंत पाणी सोडले जाईल- खा.डॉ. सुजय विखे पाटील

Sujay Vikhe News: 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होईल आणि निळवंडे मधून राहुरी तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत पाणी सोडले जाईल हे दोनही सण नागरिकांनी मोठ्या उत्साहामध्ये साजरे करावेत. मात्र हे सर्व काही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाले असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.  राहुरी तालुक्यातील कनगर या ठिकाणी खासदार सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते व माजी मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पंचक्रोशीतील नागरिकांना साखर व हरभरा डाळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सरकारच्या माध्यमातून तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दूरदृष्टीकोनातून तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये अनेक विकास कामे मार्गी लागत आहेत. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत ज्या गतीने कामे मार्गी लागली ती कामे विरोधी पक्षाकडे तीन वर्ष सत्ता असूनही लागली नाहीत असे मत यावेळी सुजय विखेंनी मांडले.  तसेच पुढे ते म्हणाले की, साखर व हरभरा डाळ वाटणे ही शासनाची योजना नसून येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यानिमित्ताने हे वाटप केले जात आहे असे त्यांनी सांगितले. हा आपल्यासाठी एक प्रकारे मोठा सण असून या निमित्ताने साखर व डाळीच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबीयांनी लाडू बनवून श्री रामांना वहावे व श्रीरामांची पूजा करावी आणि त्यांना लाडूचा नैवेद्य दाखवावा हा उद्देश यामागे असून आपल्यासाठी ही दुसरी दिवाळी आहे असे मत खासदार सुजय विखेंनी मांडले.  तरी अतिशय शुद्ध हेतूने सदरील उपक्रम राबविण्यात येत असून विरोधकांनी यावर कसलेही राजकारण करू नये असे आवाहन देखील त्यांनी केले. तसेच पुढे त्यांनी निळवंडे संदर्भात भाष्य केले. विखे घराणे निळवंडेचे पाणी येऊन देणार नाही अशी वल्गना नेहमी विरोधकांनी करून घाणेरडे राजकारण केले, मात्र आम्ही सर्व सामान्य नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत. यासाठी आमच्या शासनाने सर्वाधिक निधी मंजूर केला आणि विखे घराण्याचे पालकमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून निळवंडे ला पाणी सोडण्यात आले असे देखील त्यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी यावेळी सांगितले की, येत्या 22 तारखेला निळवंडे कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत राहुरी तालुक्यामध्ये पालकमंत्री पाणी सोडतील. तो अधिकार त्यांचा आहे. तसेच कनगरच्या वर्ग दोनच्या जमिनीचा प्रश्न देखील अगदी कमी कालावधीमध्ये मार्गी लावला जाईल असेही त्यांनी आश्वासन दिले व सत्तेचा वापर हा केवळ जनकल्याणासाठीच केला जाईल. विखे घराने जे काम हाती घेतले ते पूर्णत्वास जातेच त्यामुळे कुणीही काळजी करू नये असे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले की, खासदार डॉ. सुजय विखे पाटील व पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये अनेक विकास कामे मार्गी लागत असून विकासक दृष्टी ठेवणारे हे सर्वसामान्यांचे नेते आहेत असे प्रतिपादन केले.  तसेच त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत विरोधकांची सत्ता असल्यावर कोणतीही विकासकामे करण्यात आली नाही. केवळ सत्तेचा उपभोग घेण्यात आला असे स्पष्ट केले. तसेच महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये जे नामदार झाले त्यांचे काम शून्य असल्याने नागरिकांना आज देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.  विद्युत खाते असताना देखील शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने वीज न देऊ शकणाऱ्यांनी इतरांवर आरोप करणे थांबवावे असे देखील त्यांनी स्पष्ट केले. निधी पालकमंत्री व खासदार आणतात आणि श्रेय घेण्यासाठी त्याचे भूमिपूजन विद्यमान आमदार करतात हे कुठपर्यंत योग्य आहे, असा सवाल विचारून येत्या निवडणुकीमध्ये जनता यांना त्यांची जागा दाखवून देईल अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. तसेच 50 वर्षांपासून रखडलेला निळवंडेचा प्रश्न पंचवीस वर्षे आमदार असणारे का सोडू शकले नाहीत याचे उत्तर त्यांनी शेतकऱ्यांना व समस्त जनतेला द्यावे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये कनगरच्या गावासंदर्भातील वन खात्याचा प्रश्न देखील पालकमंत्री मार्गी लावणार असून प्रत्येकाच्या शेताला पाणी देखील मिळणार आहे.  निळवंडेच्या माध्यमातून परिसरातील तलाव देखील पूर्ण क्षमतेने भरून मिळतील याबाबत सर्वांनी निश्चिंत राहावे असे त्यांनी सांगितले. तसेच निळवंडे बाबत आमचे योगदान नाही असे म्हणणाऱ्यांनी आम्ही निळवंडे साठी काय काय केले हे तपासले पाहिजे. तुम्ही घरी बसून बाता मारता, मात्र आम्ही प्रत्यक्षात नागरिकांसाठी काम करतो. तुमचे 50 वर्षांमध्ये निळवंडेसाठी योगदान काय? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी विरोधकांना विचारला. या कार्यक्रमास भाजपाचे तालुकाध्यक्ष सुरेश दादा बनकर, संदीप गिते, विजय कानडे, दिपक वाबळे, अमोल भनगडे, दादा पाटील हारदे, मयूर हारदे, विजय बलमे, सरपंच सर्जेराव घाडगे, उपसरपंच बाळासाहेब गाढे, बाबासाहेब गाढे, संदीप घाडगे, महमद भाई इनामदार, दत्तू गाढे, सोसायटी चेअरमन दत्तात्रय गाढे, भगवान घाडगे, सुभाष नालकर, भाऊसाहेब घाडगे, राजेद्र दिवे, शंकर राव जाधव, यशवंतराव जाधव, तुषार गाढे, दादासाहेब घाडगे, सुनील शेटे, गोविंदराव दिवे आदी मान्यवर उपस्थित होते.

Sujay Vikhe News : शेवटच्या गावापर्यंत पाणी सोडले जाईल- खा.डॉ. सुजय विखे पाटील Read More »

Priyanka Gandhi:  प्रियांका गांधी यांच्या अडचणीत वाढ? ‘त्या’ प्रकरणात ईडीच्या आरोपपत्रात नाव

Priyanka Gandhi :  काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जमीन खरेदीशी संबंधित प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात प्रियांका गांधींचाही उल्लेख आहे. मात्र या प्रकरणात त्यांना आरोपी करण्यात आलेले नाही. काय प्रकरण आहे हे संपूर्ण प्रकरण हरियाणातील फरीदाबाद येथील जमीन खरेदीशी संबंधित आहे. माहितीनुसार, 2005-2006 दरम्यान, रॉबर्ट वाड्रा यांनी फरिदाबादच्या अमीपूर गावात प्रॉपर्टी डीलर एचएल पाहवा (थम्पीच्या जवळ) मार्फत सुमारे 40.8 एकर जमीन खरेदी केली होती, जी डिसेंबर 2010 मध्ये पाहवा यांना परत विकली गेली. त्याचप्रमाणे एप्रिल 2006 मध्ये याच अमीपूर गावात प्रियंका गांधी वड्रा यांच्या नावावर घर खरेदी करण्यात आले होते, जे फेब्रुवारी 2010 मध्ये पाहवा यांना परत विकण्यात आले. ईडीचे म्हणणे आहे की वाड्रा आणि थंपी यांचे दीर्घ संबंध आहेत आणि समान व्यवसाय करण्याव्यतिरिक्त दोघेही अनेक गोष्टी एकत्र करतात. हा एक मोठा खटला आहे, जो फरारी शस्त्र विक्रेता संजय भंडारीशी संबंधित आहे. रॉबर्ट वड्रा यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत रॉबर्ट वाड्रा यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) एका नवीन प्रकरणात आरोपी केले आहे ज्यात त्यांनी लंडनमधील एका घराचे नूतनीकरण केले आणि त्यात वास्तव्य केले. संजय भंडारी विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात हे घर कथितपणे ‘गुन्ह्याच्या कमाईचा’ भाग आहे. संजय भंडारी 2016 मध्ये ब्रिटनमध्ये पळून गेला आणि यूके सरकारने ईडी आणि केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) च्या कायदेशीर विनंतीवर कारवाई करत, या वर्षी जानेवारीमध्ये त्याच्या भारतात प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली. या प्रकरणात वाड्रा यांचे नाव प्रथमच समोर आले असून ईडीने निवेदन जारी करून ते सार्वजनिक केले आहे. परदेशात कथित अघोषित संपत्ती असलेल्या व्यक्तींवरील मनी लाँड्रिंग आणि करचुकवेगिरीच्या आरोपांची चौकशी करणे हा या तपासाचा मुख्य उद्देश आहे.  ईडीने या प्रकरणी यूएईस्थित अनिवासी भारतीय (एनआरआय) व्यापारी सीसी किंवा चेरुवथुर चकुट्टी थम्पी आणि यूकेचे नागरिक सुमित चड्ढा यांच्याविरुद्ध नवीन आरोपपत्र दाखल केले आहे.

Priyanka Gandhi:  प्रियांका गांधी यांच्या अडचणीत वाढ? ‘त्या’ प्रकरणात ईडीच्या आरोपपत्रात नाव Read More »

Maharashtra News: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ATM मशिन चोरी करणारी टोळी 48 तासांचे आत जेरबंद

Maharashtra News: अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत समशेरपुर, ता. अकोले येथील ए.टी.एम. मशिन चोरी करणारी टोळी 7,52,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह 48 तासांचे आत जेरबंद केली आहे.  23 डिसेंबर 2023 रोजी रात्री 12 ते सकाळी 06.00  चे दरम्यान समशेरपुर फाटा, ता. अकोले  येथील आदिवासी सहकारी सोसायटी कॉम्प्लेक्सचे गाळ्यामधील इंडिया 1 पेमेंट लि. कंपनीचे ए.टी.एम. मशिनला दोरखंड बांधुन ए.टी.एम. मशिन बोलेरो गाडीने बाहेर ओढुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली होती.  फिर्यादी नितीन सखाराम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अकोले पोलीस ठाण्यात भादवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यामध्ये एकुण 90,000 रुपये किमतीचे मशिन व त्यामधील रोख रक्कम चोरी गेलेली होती. या घटनेचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समशेरपुर परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासत असतांना गुन्ह्यातील आरोपी हे केळी रुम्हणवाडी मार्गे गेल्याचे दिसुन आले. पोनि दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमीदारामार्फत सदर गुन्ह्यातील ए.टी.एम. मशिन हे आरोपी भरत लक्ष्मण गोडे व त्याचे इतर साथीदारांनी चोरुन नेले आणि तो त्याचे राहते घरी त्याचे इतर साथीदारांसह थांबलेला असल्याची माहिती मिळाली.  या माहितीवरून सदर ठिकाणी जावुन गुन्हे शाखेच्या पथकाने भरत लक्ष्मण गोडे , सुर्यभान उर्फ काळ्या लक्ष्मण गोडे, अशोक रघुनाथ गोडे ,  सुयोग अशोक दवंगे आणि अजिंक्य लहानु सोनवणे यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून  1,42,000 रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली बोलेरो गाडी, गुन्ह्याचे वेळी वापरलेले मोबाईल व तुटलेले ए.टी.एम. मशिनसह एकुण 7,52,000  रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.  ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासकामी अकोले पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास अकोले पोलीस स्टेशन करीत आहे.

Maharashtra News: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ATM मशिन चोरी करणारी टोळी 48 तासांचे आत जेरबंद Read More »

Ahmednagar News: डोक्यामध्ये हातोडा मारुन जबरी चोरी करणारे 02 आरोपी 5,06,250 रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद

Ahmednagar News:  कार चालकाचे डोक्यामध्ये हातोडा मारुन जबरी चोरी करणारे परराज्यातील 02 आरोपी 5,06,250 रुपये किंमतीचे मुद्देमालासह 24 तासाचे आत जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई.   25 डिसेंबर 2023 रोजी फिर्यादी सचिन बापु पठारे हे सुपा येथे त्यांचे कंपनीचे मॅनेजर यांना सोडुन घरी जात असतांना रस्त्त्याने जाणारे दोन प्रवाशांनी त्यांना हॉटेल अमृत येथे सोडणेबाबत विनंती केली.  यामुळे फिर्यादी यांनी एम. एच.12 व्ही. व्ही. 7336 त्यांच्या गाडीमध्ये  प्रवाशांना बसवुन घेवुन जात असतांना रत्त्याने गाडीमध्ये मागील सिटवर बसलेल्या प्रवाशाने फिर्यादीचे डोक्यामध्ये काहीतरी टणक वस्तुने मारुन त्यांना जखमी केले आणि त्याचेकडील कार, मोबाईल, व रोख रक्कम असा एकुण 5,04,000 रुपये  किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला. सदर घटनेबाबत सुपा पोलीस ठाणे भादवि कलम 394 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.   गुन्ह्याचा सखोल तपास करत असताना पोनि. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारामार्फत सदरची कार व त्यामध्ये दोन आरोपी असे कोपरगांव ते सिन्नर जाणारे रोडलगत एका पेट्रोलपंपाजवळ थांबलेले असल्याची माहिती मिळाली. पोनि दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती त्यांच्या पथकास कळवुन कार व आरोपी ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या.   पथकातील पोलीस अंमलदार हे कोपरगांव ते सिन्नर जाणारे रोडवर चोरी गेलेले कारचा शोध घेत असतांना सदरची कार ही रोडचे कडेला एका पेट्रोलपंपाजवळ उभी असल्याचे दिसुन आल्याने पथकाने सापळा रचुन कारमधील दोन आरोपींना ताब्यात घेतले.   शिवम मातादीन गौतम आणि दुर्जन अनारसिंग गौतम असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. दोन्ही आरोपी उत्तर प्रदेशमधील आहे.  पोलिसांनी त्यांच्या अंगझडतीमध्ये कब्जात गुन्ह्यातील चोरीस गेली कार, मोबाईल, रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेला हातोडा असा एकुण 5,06,250 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आणि आरोपींना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी सुपा पोलीस स्टेशनमध्ये हजर केला आहे.

Ahmednagar News: डोक्यामध्ये हातोडा मारुन जबरी चोरी करणारे 02 आरोपी 5,06,250 रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद Read More »