DNA मराठी

ahmednagar news

Kunal Bhandari

Ahmednagar News: कुणाल भंडारी यांची श्री बागेश्वर धाम सेवा समिती महाराष्ट्र राज्य सहसंयोजक पदी निवड

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याचे बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांची श्री बागेश्वर धाम सेवा समिती महाराष्ट्र राज्य सहसंयोजक पदी निवड करण्यात आली आहे.  मागील महिन्यात कुणाल भंडारी यांची समितीच्या नाशिक विभाग निरीक्षक पदी निवड झालेली होती. त्यांच्या कामगिरीची दखल घेत आता कुणाल भंडारी यांची श्री बागेश्वर धाम सेवा समिती महाराष्ट्र राज्य सहसंयोजक पदी निवड करण्यात आली आहे.  मुंबई येथे बागेश्वर धामचे महंत श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज आणि प्रदेश संयोजक श्री अभिजीत करंजुले यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत श्री कुणाल भंडारी यांची बागेश्वर धाम सेवा समिती महाराष्ट्र राज्य सहसंयोजक पदी बढती केली आहे.  सनातन धर्माच्या रक्षणाचे आणि हिंदू जनजागृतीचे हे उदात्त कार्य आपण सर्वांना सोबत घेऊन अधिक उंचीवर घेऊन जाल अशी आशा यावेळी प्रदेश संयोजक श्री अभिजीत करंजुले यांनी व्यक्त केली.

Ahmednagar News: कुणाल भंडारी यांची श्री बागेश्वर धाम सेवा समिती महाराष्ट्र राज्य सहसंयोजक पदी निवड Read More »

Hit And Run Law 1

Hit And Run Law :  हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालकांचे स्टेअरिंग छोडो आंदोलन सुरू

Hit And Run Law :  केंद्र शासनाने लागू केलेल्या हिट अँड रन या कायद्याचा देशभरात विरोध करण्यात आला होता. त्यामूळे केंद्र शासनाच्या वतीने तूर्तास हा कायदा लागू होणार नाही अशी घोषणा केल्यानंतर चालकांनी संप मागे घेतला होता. मात्र आता पुन्हा केंद्र शासनाच्या वतीने समाधानकारक उत्तर न मिळाल्याने गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने आज बुधवार 10 जानेवारी पासून पुन्हा ‘स्टेअरिंग छोडो’ आंदोलन करत साखळी उपोषणाला  सुरू करण्यात आली आहे.  गोरेगाव तहसिल कार्यालयाच्या पुढे आज बुधवारी जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने केंद्र सरकारने वाहन चालकांच्या विरोधात लागू केलेले हिट अँड रन या कायद्याच्या विरोधात बेमुदत स्टेरिंग छोडो आंदोलन व साखळी उपोषण पुकारलेले आहे.  अपघात झाल्यावर वाहन चालकाला मारहाण करणाऱ्यांवर कठोर कायद्याची तरतूद करा ,हीट अँड रन कायदा रद्द करा, वाहन सुरक्षा कायदा त्वरित लागू करा, इत्यादी मागण्यांना घेऊन हे आंदोलन पुकारण्यात आलेले आहे. आंदोलनाला जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कार्तिक बिसेन विदर्भ मीडिया प्रमुख सुरेश गोंधर्य गोंदिया जिल्हा संघटक रवी पटले, जिल्हा सचिव राजेश ठाकरे गोरेगाव तालुका जय संघर्ष वाहन चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष तालुकाध्यक्ष विजय बळगे तालुका उपाध्यक्ष प्रीतीलाल बिसेन, तालुका सचिव भुमेश्वर गाते ,मयुर नदेश्वर, भारत डोंगरे, खेतराम खोब्रागडे, मुन्ना पटले,दिनेश डोहळे, अभिजीत मेश्राम, उमेश फुन्ने, विवेक शहारे, नितीन दमाहे आदी उपस्थित होते. या आंदोलनाला तालुक्यातील 500 वाहन चालकांनी समर्थन दिले आहे.

Hit And Run Law :  हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालकांचे स्टेअरिंग छोडो आंदोलन सुरू Read More »

BJP

Maharashtra News : भाजप पुन्हा देणार अनेकांना धक्का! शिंदे अपात्र ठरल्यास, कोण होणार मुख्यमंत्री?

Maharashtra News:  आज दुपारी चार वाजता महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राज्यातील राजकारणाचा सर्वात मोठा निर्णय देणार आहे. दुपारी चार वाजता विधानसभा अध्यक्ष शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात आपला निकाल देणार आहे. या निकालावर एकनाथ शिंदे यांच्या सरकारचं भवित्व अवलंबून आहे. यामुळे या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. जर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवलं तर राज्याचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र सध्या  सरकारला कोणताही धोका नाही असं सांगितलं जात आहे.  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी बोलताना निर्णय काहीही आला तरी आमचं सरकार स्थिर राहील अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आला आहे. यामुळे भाजपकडे बी प्लॅन रेडी असल्यास बोललं जात आहे.  आगामी विधानसभा निवडणुका पाहता भाजप पुन्हा एकदा अनेकांना धक्का देण्याची तयारी करत असल्यास राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. यामुळे जर आज एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर अजित पवार यांना भाजप मुख्यमंत्री पद देऊ शकते अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे.  भाजप युतीकडे बहुमत आहे.अजित पवारांचा गट देखील आता भाजपसोबत आला आहे. अजित पवार यांच्याकडे 40 आमदार असल्याचं देखील बोललं जात आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत भाजपने 105 जागा जिंकले होते. त्यात आता अजित पवार गट आणि इतर काही अपक्ष आमदार यांची बेरीज केल्यास भाजपकडे पुन्हा एकदा बहुमत सिद्ध होईल.

Maharashtra News : भाजप पुन्हा देणार अनेकांना धक्का! शिंदे अपात्र ठरल्यास, कोण होणार मुख्यमंत्री? Read More »

Shinde And Thackeray 1

Maharashtra Politics : शिंदे की ठाकरे? सत्ता संघर्षात  कोण मारणार बाजी

Maharashtra Politics: आज महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मागच्या दीड वर्षापासून चर्चेत असणारा शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर निर्णय घेणार आहे. विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण देशाच्या लक्ष लागला आहे.  या निर्णयावर एकनाथ शिंदे यांची सरकार राज्यात राहणार की जाणार याचा देखील निर्णय आज होणार आहे. यामुळे राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे.  20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40  आमदारासह बंड केले होते ज्यामुळे राज्यात असणारी ठाकरे सरकार कोसळली होती. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपला बरोबर घेत राज्यात सरकार स्थापित केली होती.   मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला होता.  यासाठी त्यांनी 31 डिसेंबर 2023 ची डेटलाईन दिली होती मात्र त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवसांची मुदत दिली होती जी आज संपत आहे. तर दुसरीकडे सरकारला कोणताही धोका नसल्याचं भाजपकडून सांगितलं जातय. उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय काहीही आला तरी आमचं सरकार स्थिर राहील अशी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांची सुनावणी घेतली आहे. कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा झालेली आहे. अपात्रतेशी संबंधित याचिकेवर आज संध्याकाळी 4 पर्यंत येऊ शकतो. कायदेतज्ज्ञांनुसार शिंदे गटाविरोधात निकाल गेल्यास मुख्यमंत्री शिंदे, त्यांच्या गटातील मंत्री आणि आमदारांना तातडीनं राजीनामा द्यावा लागेल.   भाजप युतीकडे बहुमत असेल. काही महिन्यांपूर्वीच अजित पवारांचा गट भाजपसोबत आला आणि सत्तेत सहभागी झाला. आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा अजित पवारांचा दावा आहे. विधानसभेच्या एकूण 288 जागा आहे. बहुमतासाठी 145 आमदारांचा पाठिंबा गरजेचा असतो.

Maharashtra Politics : शिंदे की ठाकरे? सत्ता संघर्षात  कोण मारणार बाजी Read More »

IMG 20240109 WA0020

Maharashtra News:  गुटखा विक्री करणाऱ्या 3 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Maharashtra News: राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेली सुगंधी तंबाखु, पानमसाला व गुटखा विक्री करणाऱ्या 3 आरोपींना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने 12,40,000 रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे.  अहमदनगर पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.  पोनि दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, शाहरुख शहा, नदीम शेख व रिजवान शेख (सर्व रा. वार्ड नं.2, ता. श्रीरामपूर) हे त्यांचा हस्तक दानिश सय्यद रा. वार्ड नं.2, ता. श्रीरामपूर व त्याचा साक्षीदार यांचे मार्फतीने सुगंधीत तंबाखु, पानमसाला व गुटखा राजु शेख व वसीम (रा. बीड) यांचेकडुन खरेदी करुन बीड जामखेड मार्गे अहमदनगर शहरात येणार आहे.  या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिचोंडी पाटील येथे सापळा लावून आरोपींना अटक केली आहे. पोलीसांनी या कारवाईत विविध प्रकारची सुगंधी तंबाखु, गुटखा, पानमसाला, एक अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो व एक टाटा इंडीगो कार असा एकुण  12,40,000 रुपये किंमतीचे मुद्देमालासह जप्त केला आहे.  शिवाजी अशोक ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये भादविक 328, 188, 272, 273, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशिर कारवाई नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.

Maharashtra News:  गुटखा विक्री करणाऱ्या 3 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई Read More »

IMG 20240109 WA0013

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील मुंबई दौऱ्यासाठी सज्ज! कोहिनूर मंगल कार्यालयमध्ये बैठक; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावा या मागणी करिता आमरण उपोषणासाठी पायी मुंबईला जाणार आहे.  मनोज जरांगे पाटील या दौऱ्यात अहमदनगर मार्गे मुंबईला जाणार असल्याने आज शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयमध्ये संघटनेकडून जिल्हा नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून अनेकांनी सहभाग नोंदवला.  मनोज जरांगे पाटील यांच्यासह मुंबईला जाणाऱ्यांसाठी श्रीरामपूर तालुक्याकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती संघटने करून देण्यात आली आहे. याच बरोबर इतर तालुके देखील अनेक प्रकारे मदत करणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढण्याची तयारी करणार असल्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे.   या पायी दिंडीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत अंदाजे 25 ते 30 लाखा नागरिक असणार आहे. ही पायी दिंडी पाथर्डी, अहमदनगर शहर मार्गे पुणेकडे जाणार आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील मुंबई दौऱ्यासाठी सज्ज! कोहिनूर मंगल कार्यालयमध्ये बैठक; घेतला ‘हा’ मोठा निर्णय Read More »

Kotwali Police

Ahmednagar News : कोतवाली पोलीसांची मोठी कारवाई, अवघ्या 12 तासात ‘त्या’ प्रकरणात आरोपीला अटक

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील ब्राम्हणगल्ली माळीवाडा येथील शंकर बाबा सावली मठातील अंदाजे २० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल असलेली दानपेटी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती.  या घटनेनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३८०,४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करत आरोपीला अवघ्या बारा तासात अटक केली आहे. पोलीसांनी रोहीदास उर्फ (रोह्या/रावश्या) लक्ष्मण पलाटे याला अटक केली आहे. सदर गुन्हयाचा तपास करत असताना कोतवाली पोलीसांनी मंदीरातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे आरोपीला अटक केली आहे. तसेच चोरलेली दानपेटी आरोपीने गांधी मैदानात एका पडक्या खोलीत लपवुन ठेवली होती. पोलीसांनी चोरी झालेली दानपेटी व त्या मधील रक्कम पंचा समक्ष हस्तगत केली असून आली गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि.विश्वास भान्सी हे करत आहेत.

Ahmednagar News : कोतवाली पोलीसांची मोठी कारवाई, अवघ्या 12 तासात ‘त्या’ प्रकरणात आरोपीला अटक Read More »

IMG 20240106 WA0000

Ahmednagar News : शेतमाल चोरुन नेणारे टोळीकडुन सोयाबिन व तुर जप्त

Ahmednagar News: 28 डिसेंबर 2023 रोजी कोळगाव शिवारातुन सुमारे 1200 किलो शेतकऱ्याने अंगणात जमा करून ठेवलेली तुर अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचा गुन्हा ऋषिकेश देविदार लगड यांनी बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये भादवि.क.379, 342 प्रमाणे गुन्हा दाखल होता.  त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी तपास पथक नेमुन जिल्हयात पथके रवाना केले. त्यावेळी पो.नि.स्थागुशा दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, सदरची चोरी ही जामगाव येथील संदिप उत्तम गोरे व त्याचे सोबत असलेल्या लोकांनी चारचाकी वाहनाचे साहाय्याने केली आहे. या माहितीवरून त्यांनी  पारनेर तालुक्यातील जामगाव येथे स्थागुशा यांनी सापळा रचुन संदिप उत्तम गोरे , वैभव उर्फ बाल्या सुरेश औटी,  अमोल संतोष माळी, रोहीत सुनिल शेळके, आकाश आजिनाथ गोलवड,  विकास विठ्ठल घावटे यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले.  त्यांचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेला शेतमाल 1200 किलो तुर रुपये 96,000 किमतीची जप्त करण्यात आलेली आहे. तसेच तुर वाहतुक करण्यासाठी वापरलेला 8,00,000 रुपये किमतीची टाटा इंट्रा व्ही व नगर तालुक्यातील चोरुन नेलेले सोयाबीन 06 क्विंटल सोयाबिन 30,000 रुपये कि.चे असा एकुण 9,26,000 रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.  स्थागुशा अहमदनगर यांनी आरोपी व मुद्देमाल बेलवंडी पोस्टेस पंचनामा करुन ताब्यात देण्यात आले. आरोपींना बेलवंडी पोस्टेचे गुन्हयात अटक केले व पुढील तपास करिता समन्वय साधून बेलवंडी पोस्टेचे पो.नि.ठेंगे व पोलीस उपनिरीक्षक गाजरे, चाटे, पोहेकाँ खेडकर, पो.हे.कॉ. नंदकुमार पठारे, पोना शेख, पोकाँ पवार, भांडवलकर, दिवटे, शिपनकर, शिंदे यांनी आरोपींकडे अटक मुदतीत अधिक तपास करुन नगर तालुक्यातील शेंडी एम आय डी सी पोलीस स्टेशन येथिल दाखल असलेला गुन्हा रजि.1032/2023 भादवि.क.379 प्रमाणे गुन्हा उघडकीस आणला असुन आरोपीकडुन 08 सोयाबिनचे अर्धवट भरलेले कट्टे जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकाँ खेडकर हे करीत आहेत. 

Ahmednagar News : शेतमाल चोरुन नेणारे टोळीकडुन सोयाबिन व तुर जप्त Read More »

Election

Loksabha Election : महायुतीने वाजवले निवडणुकीचे बिगुल! लोकसभेच्या 45 जागांसाठी मास्टर प्लॅन तयार

Loksabha Election :  येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहे. तर ऑक्टोंबर – नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. या दोन्ही निवडणुकांसाठी आता महायुतीने तयारी केली आहे.   मुंबईत महायुतीतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी महाआघाडीत सामील तिन्ही पक्ष-भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आगामी निवडणुकीच्या योजना सांगितल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेना नेते दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली.  राज्यातील लोकसभेच्या 45 हून अधिक जागांवर विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी महायुतीने मेगाप्लॅन केला असून, त्यादृष्टीने कामालाही सुरुवात केली आहे. 14 जानेवारीपासून सर्व जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे होणार आहेत. भाजपचे नेते बावनकुळे म्हणाले, आम्ही 45 हून अधिक जागा जिंकण्याची तयारी केली आहे. पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला यश मिळेल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.  जिल्हा, तालुका आणि बूथ स्तरावर रॅली, सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये तिन्ही पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. फेब्रुवारीमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा जाहीर सभा घेणार आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीला राज्यात मोठे यश मिळेल. राज्यातील 48 पैकी 45 हून अधिक लोकसभेच्या जागा आम्ही जिंकणार आहोत. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्हाला 51 टक्के मते मिळणार आहेत, महायुती आणखी मजबूत करू, असे आमच्या तिन्ही पक्षांनी ठरवले आहे. अनेकांना आमच्या आघाडीत सहभागी व्हायचे आहे. 47 हजार 412 लोकांनी आमच्याशी संवाद साधला असून त्यांना मोदींना पंतप्रधान म्हणून पाहायचे असल्याचे सांगितले आहे. संपूर्ण महाराष्ट्र मोदींच्या पाठीशी उभा आहे. विधानसभेतही विजय निश्चित – बावनकुळे पक्षात येण्यासाठी लोकांची गर्दी झाल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. आगामी काळात महाविकास आघाडीत फक्त नेतेच असतील, कार्यकर्ते उरणार नाहीत. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील तेव्हा महाराष्ट्रातून महायुतीचे 45 खासदार उभे राहतील. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीत महायुती मोठा विजय मिळवेल आणि आम्हाला 225 पेक्षा जास्त जागा मिळतील. अजित पवार गटाचा प्लॅन तयार राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी गेली 10 वर्षे देशाचे यशस्वी नेतृत्व केले आहे. आज राज्यात महायुतीचे सरकार आहे. जानेवारीपासून महायुतीच्या बैठकांना सुरुवात होणार आहे. यासाठी एक हजार प्रमुख कार्यकर्ते असतील. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून आम्ही (अजित पवार गट) जाहीर सभा घेणार आहोत. शिवसेना नेते व मंत्री दादा भुसे म्हणाले, देशपातळीवर अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. महायुतीचे सर्व मोर्चे आम्ही विभाग स्तरावर, गावपातळीवर आयोजित करत आहोत. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या बहुतांश आमदारांनी बंड पुकारले आणि भगवा पक्ष दोन गटात विभागला गेल्याची माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीचे (एमव्हीए) सरकार पडले होते. यानंतर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्याच वेळी, गेल्या वर्षी जुलैमध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हेही राष्ट्रवादीच्या आठ आमदारांसह शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील झाले आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. यानंतर अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेत आपला गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा केला. सध्या दोन्ही गट निवडणूक आयोगापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत वर्चस्वासाठी लढत आहेत.

Loksabha Election : महायुतीने वाजवले निवडणुकीचे बिगुल! लोकसभेच्या 45 जागांसाठी मास्टर प्लॅन तयार Read More »

Screenshot 2024 01 04 15 17 10 53 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

Maharashtra Politics : जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही- कुणाल भंडारी

Maharashtra Politics : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भगवान रामवर केलेल्या विधानावरून आता चांगलेच राजकारण तापलं आहे.  त्यांनी केलेल्या विधानाविरुद्ध आज अहमदनगर शहरात हिंदुत्ववादी नेते कुणाल भंडारी यांनी विरोध दर्शवला आहे. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जितेंद्र आव्हाडावर कठोर कारवाई करण्याचे मागणी केली आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही असे देखील म्हटले आहे.  याच बरोबर जितेंद्र आव्हाड यांची नार्कोटिक्स डिपार्टमेंट करून तपासणी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.  माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भगवान राम हे मांसाहारी होते असं म्हंटले होते. मात्र हा प्रकरण वाढल्यानंतर त्यांनी माफी मागितली.

Maharashtra Politics : जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही- कुणाल भंडारी Read More »