DNA मराठी

क्राईम

img 20260330 wa0005

Ahilyanagar Crime: गॅस टंचाईत अवैध रिफिलिंगवर कारवाई; 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर शहरात गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस टाक्यांमधून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये अवैधरित्या रिफिलिंग करणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले असून त्याच्याकडून ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहानवाज शौकत सय्यद (वय २४, रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शहरात पेट्रोलिंग करत असताना गुलमोहर रोड परिसरातील पारिजात चौकाजवळील एका पत्र्याच्या गोडाऊनमध्ये अवैध रिफिलिंग सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तत्काळ छापा टाकला असता, एक व्यक्ती घरगुती गॅस टाक्यांमधून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफिलिंग करताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव शहानवाज शौकत सय्यद (वय २४, रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर) असे सांगितले. पोलीसांनी त्याच्या ताब्यातून १० गॅस टाक्या, दोन इलेक्ट्रिक मोटार मशीन तसेच पाच लहान गॅस टाक्या असा एकूण ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. चौकशीत आरोपी हा साद अन्वर खान (रा. मुकुंदनगर, सध्या फरार) यांच्या सांगण्यावरून हे काम करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी कोणताही परवाना न घेता ज्वलनशील पदार्थांची धोकादायक पद्धतीने साठवणूक करून स्वतःचे व नागरिकांचे जीवित धोक्यात घालून हा प्रकार केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Ahilyanagar Crime: गॅस टंचाईत अवैध रिफिलिंगवर कारवाई; 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत Read More »

acid attack

Sangamner News : ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडितेला आर्थिक साहाय्य मंजूर

Sangamner News : संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे ११ वर्षीय मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याच्या घटनेच्या अनुषंगाने “पीडितांना नुकसानभरपाई देण्याबाबत योजना, २०२२” अंतर्गत पीडितेला ३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम यांनी दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांच्या निर्देशानुसार दिनांक १८ मार्च २०२६ रोजी संबंधित समितीची तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पीडितेच्या आईच्या बँक खात्यात तात्काळ १ लाख रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात आली. त्यानंतर दिनांक २४ मार्च २०२६ रोजी समितीची पुढील बैठक घेण्यात आली. या बैठकीत परिवीक्षा अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या गृह चौकशी अहवालाचे परीक्षण करून पीडितेच्या आईच्या खात्यात अतिरिक्त २ लाख रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली. अशा प्रकारे या प्रकरणात पीडितेला एकूण ३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य मंजूर करून वितरित करण्यात आले.

Sangamner News : ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडितेला आर्थिक साहाय्य मंजूर Read More »

Pune Crime: समलैंगिक संबंधांना विरोध अन् 22 वर्षीय तरुणाने दोन अल्पवयीन मुलांची केली हत्या…

Pune Crime: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दहिवडी गावात १७ मार्चला १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलाची हत्या झाली होती . ही हत्या अक्षय दत्तात्रय मांजरे या २२ वर्षांच्या तरुणाने समलैंगिक संबंधना विरोध केल्याने केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. मात्र या हत्येचा तपस करताना आरोपी अक्षय मांजरेने मागीलवर्षी २१ जूनला अशाचप्रकारे समलैंगिक संबंधांना विरोध केल्याने ११ वर्षांच्या मुलाची देखील हत्या केली होती असं तपासात उघड झालंय. विशेष म्हणजे या दोन्ही हत्या केल्यानंतर आरोपी अक्षय मांजरे हा त्याठिकाणी गर्दीचा भाग म्हणून उभा होता. २१ जून २०२५ ला त्याने समलैंगिक संबंधांना विरोध करणाऱ्या ११ वर्षाच्या मुलाचा डोक्यात दगड घालून खून केला मात्र त्या हत्येचा तपास पोलिसांनी व्यवस्थित केला नाही असा ग्रामस्थांचा आरोप आहे. अक्षय मांजरेवर संशय असल्याने त्याची जुजबी चौकशी करून त्यावेळी त्याला सोडून देण्यात आलं. त्यानंतर १७ मार्च २०२६ ला त्याने पुन्हा १२ वर्षाच्या एका मुलावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याही मुलाने विरोध केल्याने अक्षय मांजरेने त्याचाही डोक्यात दगड घालून खून केला. या दोनाही हत्या करून आपला त्या हत्येनशी कोणताही संबंध नाही हे दाखवण्यासाठी तो तपासासाठी पोलीस घटनास्थळी आल्यानंतर तिथे उपस्थित राहत होता. अखेर पोलिसांनी गावातील अनेकांची कसून चौकशी करायचं ठरवलं त्यावेळी अक्षय मांजरेच्या सांगण्यामध्ये पोलिसांना विसंगती जाणवू लागली आणि या दोन हत्येंचा उलगडा झाला.

Pune Crime: समलैंगिक संबंधांना विरोध अन् 22 वर्षीय तरुणाने दोन अल्पवयीन मुलांची केली हत्या… Read More »

raigad police

Raigad Police : नेरळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पाण्याच्या टँकरमधून सुरू असलेली दारू तस्करी उधळली

Raigad Police : रायगड जिल्ह्यातील नेरळ पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध दारू तस्करीचा पर्दाफाश केला आहे. पाण्याच्या टँकरच्या आडून सुरू असलेली ही तस्करी उघडकीस आली असून पोलिसांनी टँकरसह कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नेरळ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वारोटे आणि त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कर्जत–मुरबाड मार्गावरील वारे गाव परिसरात सापळा रचला. कोकण किनारा हॉटेलसमोर संशयित टँकर अडवून तपासणी केली असता या टँकरमध्ये अवैधरित्या गोवा बनावटीची विदेशी दारू वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. राजस्थानमधील गुडामबेरी येथील रहिवासी लाडूराम खियाराम बिश्नोई हा आरोपी ही दारू गोव्याहून गुजरातकडे नेत असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे, कोणालाही संशय येऊ नये म्हणून पाणी वाहून नेणाऱ्या टँकरचा वापर करण्यात आला होता. बाहेरून टँकर पाण्याचा असल्यासारखा दिसत असला तरी आतमध्ये गुप्त कप्पे तयार करून त्यामध्ये दारूचे बॉक्स लपवण्यात आले होते. तपासणीदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात विदेशी दारू जप्त केली असून टँकरसह एकूण १ कोटी १ लाख २७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती राहुल गायकवाड (उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत) यांनी दिली.

Raigad Police : नेरळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पाण्याच्या टँकरमधून सुरू असलेली दारू तस्करी उधळली Read More »

Pune Crime: धक्कादायक! हळदीच्या पाकिटांतून गांजाविक्री; दोघांना अटक

Pune Crime : हळदीच्या पाकिटांच्या आडून गांजाची विक्री करणाऱ्या दोन जणांना बाणेर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत एकूण १६ किलो गांजा तसेच परदेशी चलन जप्त करण्यात आले. अभिषेक बोर्से आणि अक्षय बोर्से (रा. पिंपरी-चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघे शहरातील विविध भागांत गांजाची विक्री करत होते. संशय टाळण्यासाठी त्यांनी गांजा हळदीच्या पाकिटांत लपवून ठेवण्याची युक्ती वापरली होती. तसेच दोघे एका खासगी कंपनीत नोकरी करत असल्याचे भासवत होते. बाणेर परिसरात दुचाकीवरून येऊन ते गांजाविक्री करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्या पिशवीत हळदीची पाकिटे आढळली. तपासणी केल्यावर त्यामध्ये गांजा लपविल्याचे स्पष्ट झाले. या वेळी सुमारे तीन किलो गांजा जप्त करण्यात आला. पुढील चौकशीत आरोपींनी पिंपरी-चिंचवड येथील त्यांच्या घरात आणखी साठा असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी घरावर छापा टाकून १३ किलो गांजा हस्तगत केला. दरम्यान, या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास सुरू करण्यात आला असून गांजा कोठून आणला आणि कोणाला विक्रीसाठी ठेवला होता, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Pune Crime: धक्कादायक! हळदीच्या पाकिटांतून गांजाविक्री; दोघांना अटक Read More »

img 20260316 wa0004

Pune Crime: पुण्यातील कोंढवा-पर्वती परिसरात सराइतांकडून पिस्तुले जप्त, चौघांना अटक

Pune Crime: पुण्यातील कोंढवा-पर्वती परिसरात सराइतांकडून पिस्तुले जप्त करत चार जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती परिसरात केलेल्या कारवाईत अजित सागर कसबे याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने तो पिस्तूल बाळगत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार १३ मार्च रोजी पोलिस पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले दरम्यान, गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने कोंढव्यातील काकडे वस्तीमधून प्रकाश तुळशीराम पवार, मुस्ताक इक्राइम शेख आणि ओंकार दयानंद पवार या तिघांना अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आला असल्याची देखील माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Pune Crime: पुण्यातील कोंढवा-पर्वती परिसरात सराइतांकडून पिस्तुले जप्त, चौघांना अटक Read More »

sagar moholkar death

Sagar Moholkar Death : घायवाळच्या कानशिलात लावणाऱ्या सागर मोहोळकराचा गोळीबारानंतर 13 दिवसांनी मृत्यू

Sagar Moholkar Death : जामखेडमध्ये पैलवान सागर मोहोळकरवर गोळीबाराची घटना घडली होती. गोळीबार झालेला पैलवान सागर मोहोळकर याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या 13 दिवसांपासून सागर मोहोळकर हा मृत्यूशी झुंज देत होता. अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये पैलवान सागर मोहोळकर याच्यावर गोळीबार झाल्याची घटना 9 मार्च रोजी घडली होती. त्याच्या तोंडातही गोळी लागल्याची माहिती होती. त्याच्यावर जवळून गोळीबार करण्यात आला होता. त्याच्या शरीरात सहा गोळ्या लागल्या होत्या. सागरला उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले. घटनेचा तपास पोलीस पथकाने सुरू केला व तातडीने तपासाचे चक्र फिरवले. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जामखेड येथील अभिमन्यू याला ताब्यात घेऊन चौकशी केली. यामध्ये गोळीबार करणाऱ्या पुणे येथील चार्ली उर्फ माऊली उर्फ ज्ञानेश्वर साठे, रोहित विठ्ठल आखाडे, चिन्या या आरोपींनी गोळीबार केल्याची माहिती असून यामध्ये दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मोहोळकरवर अनेक गंभीर गुन्हे दाखल नगरच्या जामखेड शहरात पैलवान सागर मोहोळकर याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी जखमीला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केलं होतं. या घटनेचा तपास सुरू केला होता. सागर मोहळकर याने कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या कानाखाली मारल्याची घटना धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात एका जत्रेदरम्यान घडली होती. तेव्हापासून सागर मोहोळकर हा चांगलाच चर्चेत आला होता. तसेच त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्यानुसार नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता.

Sagar Moholkar Death : घायवाळच्या कानशिलात लावणाऱ्या सागर मोहोळकराचा गोळीबारानंतर 13 दिवसांनी मृत्यू Read More »

crime

Dhavalpuri Case : ढवळपुरी प्रकरण; श्रद्धेच्या आवरणामागचे भयावह वास्तव

Dhavalpuri Case: अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे उघडकीस आलेले अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण केवळ एक गुन्हेगारी घटना म्हणून पाहून चालणार नाही ते समाजाच्या नैतिक अध:पतनाचे आणि आंधळ्या श्रद्धेच्या धोकादायक परिणामांचे गंभीर उदाहरण आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा ही संत विचार, नैतिकता, समता आणि मानवतेच्या मूल्यांवर उभी आहे. मात्र, याच परंपरेच्या नावाखाली समाजात प्रतिष्ठा मिळवलेल्या व्यक्तीकडून असा अमानुष प्रकार घडल्याचा आरोप होणे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. या प्रकरणात आरोपीने अल्पवयीन मुलीवर दीर्घकाळ अत्याचार केल्याचा आरोप असून, पीडितेला धमक्या देत गप्प ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. अधिक धक्कादायक म्हणजे, यापूर्वीही त्याच व्यक्तीवर बलात्कारासंदर्भातील गुन्हे दाखल झाले होते. एका प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली असली, तरी दुसरे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती समोर येते. यामुळे प्रश्न केवळ एका आरोपीपुरता मर्यादित राहत नाही तर समाज आणि व्यवस्थेने अशा संकेतांकडे वेळेत गांभीर्याने पाहिले का, हा मूलभूत प्रश्न उपस्थित होतो. भारतीय समाजात धार्मिक व्यक्तींना सहजपणे नैतिक श्रेष्ठत्व बहाल केले जाते. ‘महाराज’, ‘बाबा’, ‘कीर्तनकार’ अशा पदव्या अनेकदा प्रश्न विचारण्याची प्रवृत्तीच नष्ट करतात. परिणामी, पीडितांना आवाज उठवणे अधिक कठीण होते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा पुसली गेली की सत्तेचा गैरवापर सुरू होतो. ढवळपुरी प्रकरण हे त्याचेच उदाहरण मानावे लागेल. या घटनेत पीडित मुलीने अनेक वर्षे भीतीपोटी मौन बाळगल्याचे दिसते. हे मौन समाजाच्या अपयशाचे प्रतीक आहे. कुटुंब, शाळा, ग्रामव्यवस्था आणि स्थानिक समाजरचना या सर्व स्तरांवर मुलांना सुरक्षित वातावरण मिळणे अपेक्षित असते. परंतु जेव्हा प्रभावशाली व्यक्तीविरुद्ध तक्रार करण्याची भीती निर्माण होते, तेव्हा न्यायव्यवस्था उशिरा का होईना, हस्तक्षेप करते पण तोपर्यंत मोठी हानी झालेली असते. या पार्श्वभूमीवर दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. पहिली म्हणजे, धार्मिक किंवा सामाजिक प्रतिष्ठा ही कायद्यापेक्षा मोठी नाही, हा संदेश ठामपणे पोहोचणे आवश्यक आहे. दुसरी म्हणजे, अल्पवयीनांवरील अत्याचार प्रकरणांमध्ये तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया अधिक विश्वासार्ह आणि संवेदनशील बनवणे गरजेचे आहे. पोलिसांनी नागरिकांना पुढे येण्याचे केलेले आवाहन ही सकारात्मक बाब असली, तरी समाजानेही पीडितांच्या बाजूने उभे राहण्याची मानसिकता विकसित करणे तितकेच आवश्यक आहे. वारकरी संप्रदाय हा संत तुकाराम, ज्ञानेश्वरांच्या विचारांनी घडलेला आहे. करुणा, संयम आणि सत्य यांची शिकवण देणारा. त्यामुळे अशा घटनांमुळे संप्रदाय नव्हे, तर त्याच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या व्यक्ती उघडकीस येतात, हे समाजाने लक्षात ठेवले पाहिजे. अन्यथा, काही व्यक्तींच्या कृत्यामुळे संपूर्ण परंपरेवर संशयाची सावली पडण्याचा धोका निर्माण होतो. ढवळपुरी प्रकरण हे केवळ गुन्हेगारी बातमी नाही; ते समाजाला स्वतःकडे पाहण्यास भाग पाडणारे आरसे आहे. श्रद्धा ठेवावी, पण प्रश्न विचारण्याची क्षमता गमावू नये हाच या घटनेतून घ्यायचा सर्वात मोठा धडा आहे.

Dhavalpuri Case : ढवळपुरी प्रकरण; श्रद्धेच्या आवरणामागचे भयावह वास्तव Read More »

utter pradesh crime

Utter Pradesh Crime : सून प्रियकारासोबत ‘बेड’ वर आक्षेपार्ह अवस्थेत, अचानक सासूची एन्ट्री अन् सुनेने केलं असं काही…

Utter Pradesh Crime: मथुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाणखरपूर बसेला गावात, एका सुनेने आपला प्रियकर आदिल याच्याशी संगनमत करून सासूची निर्घृण हत्या केली. ही घटना 3 मार्चच्या रात्री 1 च्या सुमारास घडली. समोर आलेल्या माहितीनुसार, सासूने सुनेला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. यानंतर दोघांनी सासूच्या चेहऱ्यावर उशी दाबून तिचा गुदमरून जीव घेतला. त्यानंतर, सुनेने आपल्या पतीला फोन करून सासूला “सायलेंट हार्ट अटॅक” आल्याचा कट रचला, ज्यामुळे कुटुंबाने मृतदेह दफन केले. मात्र मृत महिलेच्या पतीला संशय आल्याने, पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दफन केलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढला आणि त्यानंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदनात मृत्यूचे कारण मानेचे हाड मोडणे आणि गुदमरणे हे असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी कारवाई करत या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली. प्रियकरासोबत रंगेहाथ पकडल्यानंतर रचला कट पोलिसांच्या चौकशीत असे उघड झाले की, सदर सुनेचे त्याच परिसरात राहणाऱ्या आदिल नावाच्या तरुणाशी अनैतिक संबंध होते. 3 मार्चच्या रात्री जेव्हा आदिल तिला भेटण्यासाठी घरी आला होता, तेव्हा सासूला जाग आली. त्या दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहताच, सासूने यावर आक्षेप घेतला. आपला हा प्रकार उघडकीस येईल या भीतीने, प्रियकर आणि सुनेने संगनमत करून सासूचा जीव घेण्याचे ठरवले त्यांनी सासूच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर उशी दाबून धरली, जोपर्यंत तिचा श्वास पूर्णपणे थांबला नाही. “हार्ट अटॅक”चा बनाव हत्येचा हा प्रकार लपवण्यासाठी सुनेने एक कपटी योजना आखली पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास तिने आपल्या पतीला फोन केला आणि त्याची आईला “सायलेंट हार्ट अटॅक” आल्याचा खोटा दावा केला. कोणताही संशय न आल्याने, कुटुंबाने मृतदेहाचे दफन केले. मात्र, मृत महिलेच्या पतीला नंतर काहीसा संशय आला आणि त्याने पोलिसांना याबद्दल माहिती दिली. मथुराचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) यांच्या माहितीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून दफन केलेली जागा खोदून मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रक्रियेतूनच या खळबळजनक हत्येमागील सत्य समोर आले. सत्य उघडकीस आणि आरोपींची अटक एसएसपी (SSP) यांनी स्पष्ट केले की, शवविच्छेदन अहवालाने सुनेने रचलेली खोटी कहाणी पूर्णपणे खोडून काढली आहे. या अहवालातून हे स्पष्टपणे सिद्ध झाले की, त्या महिलेचा मृत्यू मानेचे हाड मोडल्यामुळे आणि गुदमरल्यामुळे झाला होता. पोलिसांनी तातडीने पावले उचलत खुनाचा गुन्हा दाखल केला आणि सून व तिचा प्रियकर आदिल या दोघांनाही अटक करून, त्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात केली.

Utter Pradesh Crime : सून प्रियकारासोबत ‘बेड’ वर आक्षेपार्ह अवस्थेत, अचानक सासूची एन्ट्री अन् सुनेने केलं असं काही… Read More »

img 20260312 wa0003

Pune Crime : पुणे हादरले! किरकोळ वादातून मारहाण अन् तरुणाची हत्या

Pune Crime : पुण्यातील कॅम्प परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, किरकोळ वादावरून एकाची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात 4 जणांना अटक केली असून 2 आरोपींचा शोध घेत आहे. फैसल खान असं मयत तरुणाचं नाव आहे. तर बजाद अली सय्यद, अली अब्बास अश्रफअली सय्यद, सोहेल युसुफ तांबोली, शाहबाज चांद शेख, तालिब अली सय्यद, अश्रफली सय्यद अशी आरोपींची नावे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शाहबाज शेख आणि मयत फैसल खान दोघे मित्र होते. शहबाज शेख याची मयत फैसल खान याने थटटा मस्करी केली, त्याचा राग आल्याने शहबाज याने मयताचे कानाखाली चापट मारली आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद वाढला. यानंतर शहबाज शेख व त्याच्या बाकीदारांनी धारधार चाकुने मयत फैसल खान याच्या छातीत, पाठीत, हातावर, आणि डोक्यात वार करत त्याची हत्या केली. सध्या या प्रकरणात दोन आरोपी फरार असून सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस त्यांचा शोध घेत आहे. तर दुसरीकडे पुण्यात दिवसेंदिवसे गुन्हेगारीचा आलेख वाढताना दिसत आहे. हत्या, चोरी सारखे गुन्हे दररोज दाखल होत असल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Pune Crime : पुणे हादरले! किरकोळ वादातून मारहाण अन् तरुणाची हत्या Read More »