DNA मराठी

Maharashtra Politics

Ahmednagar News: व्यवसायिक सल्लाउद्दीन शेख (SS)यांचे कडून जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

Ahmednagar News: वसीम गुलाब शेख ,समीर अब्दुल शेख ,तन्वीर निसार शेख ,आरिफ ईस्माईल कुरेशी हे चारही लोकं आर टी ओ कार्यालय जवळ वाहनाला रेडियम लावण्याचे काम करतात तेथेच सल्लाउद्दीन शेख उर्फ SS पण रेडियम लावण्याचे व्यवसाय करतात. सल्लाउद्दीन शेख उर्फ SS हे वारंवार वरील सगळ्यांना धमकी द्यायचे काम करतात तुम्ही इथे काम करायचे नाही मी येथे 25 वर्षा पासून काम करतो इथे माझा राज चालणार इथे काम करायचा तर माझ्याकडे करायचा नाही तर काम करू देणार नाही तुम्हाला जीवे मारून टाकीन माझे नेटवर्क लई मोठे आहे.  तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून अडकवेन माझा कोण काही वाकडं करू शकत नाही पोलिसांबरोबर आणि आर टी ओ बरोबर पण माझे संबंध आहे. राजकारणात पण माझा चांगला वजण आहे. तुम्हाला आयुष्यातून संपून टाकेन अशी धमकी वारंवार दिल्याने वैतागून वरील वसीम गुलाब शेख याने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद 19 एप्रिल 2023 रोजी दिली. या प्रकरणात पोलिसांनी  504,506 प्रमाणे NC दाखल करून घेतले . सल्लाउद्दीन शेख उर्फ SS याने वसीम शेख याला परत रस्त्यात अडवले व सांगितले कि तू जी NC दाखल केली ना त्या NC ने मला काही फरक पडत नाही ते तर बॉण्ड जामीन वर माझा जामीन होऊन जाईल पण मी तुला जिवंत ठेवणार नाही. नंतर काही राजकारणी यांना मध्यस्ती करायला लावून हे वाद मिटवून घेतला परंतु हे वाद मिटलेले असतांना सल्लाउद्दीन शेख उर्फ SS याने 29 डिसेंबर 2023 रोजी परत वसीम गुलाब शेख आणि इतर तिघांना परत जीवे मारण्याची धमकी दिल्याने हे लोक परत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गेले व तेथे सल्लाउद्दीन शेख उर्फ SS याच्यावर  504 , 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Ahmednagar News: व्यवसायिक सल्लाउद्दीन शेख (SS)यांचे कडून जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल Read More »

सनसनाटी आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतः आत्मपरीक्षण करावे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस शेख आरीफ पटेल यांचे प्रत्युत्तर

Ahmednagar News: ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुरोगामी विचार आणि सर्व समाज घटकांना एकत्रित बांधण्याचे विचार महाराष्ट्राला तसेच देशाला माहिती आहेत.‌ माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी मागील 45 वर्षांपासून याच विचारांशी एकनिष्ठ राहून शरद पवार यांना साथ दिली आहे.   त्यांच्या वाढदिवसानिमित्त नगरमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, वंचित बहुजन आघाडी, रिपाइं अशा सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना समक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरमधील स्थानिक राजकारणाबाबत एक ज्येष्ठ आणि प्रगल्भ विचारांचे नेते म्हणून दादाभाऊ कळमकर यांनी काही भूमिका मांडली.  त्याचा विपर्यास करून कॉंग्रेसच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ज्यांना अजिबात जनाधार नाही अशा पदाधिकाऱ्यांनी कळमकर यांच्या विषयी पूर्णतः चुकीचे आणि हेतूपुरस्सर गैरसमज निर्माण करणारी भूमिका मांडली.  भाजपच्या विचारसरणीशी कळमकर कधीही जुळवून घेणार नाही हे निर्विवाद सत्य आहे. अशा वेळी केवळ सनसनाटी निर्माण करून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याच्या हेतूने कळमकर यांच्या विषयी चुकीचे पत्रक काढण्यात आहे. त्यांच्या भूमिकेवर कोणीही विश्वास ठेवणार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शेख आरीफ पटेल यांनी व्यक्त केले आहे. शेख आरीफ पटेल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,  महाराष्ट्राच्या राजकारणाला यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्या सारख्या दिग्गज नेत्यांमुळे प्रगल्भता आलेली आहे. त्यामुळे राजकीय अथवा वैचारिक विरोधक असला तरी वैयक्तिक पातळीवर एकमेकांशी संवाद, सलोखा कायम राखला जातो. हीच परंपरा आदरणीय दादाभाऊ कळमकर यांनी कायम जतन केली आहे. भाजप काय किंवा कोणत्याही विरोधी पक्षाचे नेते, पदाधिकारी असो दादांनी नेहमीच वैयक्तिक स्तरावर चांगले संबंध ठेवले आहेत व अभिषेक कळमकर सुध्दा तेच तत्व पाळत आहे. दादांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अभिष्टचिंतन केले. त्यावेळी त्यांनी स्थानिक परिस्थितीनुसार काही भूमिका मांडली. त्याचा विपर्यास करण्याचं काहीच कारण नाही. परंतु सध्या सनसनाटी वक्तव्य करीत काही जण माध्यमातून हेडलाईन मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. यातून त्यांच्या अर्धवट अभ्यासाची आणि बालिश बुद्वीची प्रचिती येते. आरोप करताना त्यांनी आपल्या राजकीय कोलांट्या उड्यांचा इतिहास तरी आठवायचा. दादाभाऊ कळमकर यांच्या राजकीय, सामाजिक कार्यकीर्दीचि इतिहास पाहिला तर ते कदापिही चुकीच्या विचारसरणीशी तडजोड करणार नाही, हे सर्व समाज घटकांना चांगले माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीत गैरसमज निर्माण करून स्वतः चमकोगिरी करणारांनी आधी आरशात पाहून स्वतःच्या निष्ठा कुठं कुठं वाहिल्या हे पाहावे अशी टीका शेख आरीफ पटेल यांनी केली आहे.

सनसनाटी आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतः आत्मपरीक्षण करावे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस शेख आरीफ पटेल यांचे प्रत्युत्तर Read More »

Ahmednagar News: अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची चौकशी करा – AIMIM  जिल्हाध्यक्ष

Ahmednagar News: अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी कर्तव्यात कसूर केले असल्याने यांची चौकशी करून त्यांना निलंबित करा अशी मागणी डॉ परवेज अशरफी,एम आय एम जिल्हाध्यक्ष ,अहमदनगर यांनी पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे केली आहे.   त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्हा गुन्हेगारी आणि जाती दंगलीचा अड्डा झाले असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. जेव्हा पासून अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक या पदावर राकेश ओला साहेब यांची नियुक्ती झाली आहे तेव्हा पासून अहमदनगरमध्ये एक दिवस असे गेले नाही त्या दिवशी काही गंभीर गुन्हा झाले नाही.  पोलिस अधीक्षक राकेश ओला साहेब हे आल्यापासून जिल्ह्यात जातीय दंगली, दोन समाजात तेढ निर्माण होऊन दंगली, छोट्याशा कारणाने जातीय दंगली, काही कारण नसतांना मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर हल्ले, मुस्लिम अल्पसंख्यांक समजाच्या धार्मिक स्थळांवर हल्ले, धार्मिक ग्रंथाची विटंबना, मुस्लिम महिलांना खोट्या गुन्ह्यात फसवणे, असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे रोज जिल्ह्यात सरास घडत आहे. चोरी, डकैती, महीलाची छेडछाड, छोटे मोठे गुन्हे हे तर  किरकोळ सारख्या होत आहे. जेव्हा पासून राकेश ओला साहेब अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक पदावर विराजमान झाले तेव्हांपासून अहमदनगर येथील काही जातीवादी आतंकी संघटनेला तसेच सरकारच्या जवळीक संघटनेला कायद्या हातात घेण्याचे  जणूकाही प्रमाण पत्र भेटले.  शेवगाव, राहुरी उंब्रा, राहुरी गुहा, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, अकोला, कर्जत, अहमदनगर शहर या सर्व ठिकाणी मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर अत्याचार करण्यात आले.  एकीकडे जातीवादी आतंकी संघटनेने मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर हल्ले करत आहे आणि दुसरी कडे पोलिस प्रशासनाने ज्या प्रकारे मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर गुन्हे दाखल केले जसे सर्व काही पूर्ण नियोजित कट रचण्यात आले आहे. दोन समाजात दंगली झाल्यावर एका समाजावर असे गुन्हे दाखल करायचे की त्यांची ताबडतोब जमीन होईल किंवा न्यायालयात दुसऱ्या दिवशी जामीन होईल आणि त्याच गुन्ह्यात मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर असे गंभीर गुन्हे दाखल करायचे की त्यांची  महिनो जामीन होणार नाही.  आपण अहमदनगर मध्ये झालेल्या सर्व घटनेची चौकशी केली तर आपल्या स्पष्ट दिसेल की पोलिस अधीक्षक साहेब यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग कसे केले आणि आपल्या सोबत पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना कसे चुकीच्या काम करण्याचे आदेश दिले.  अहमदनगर येथील कसूर केलेल्या पोलिस अधिकाऱ्याची चौकशी करण्यात आली असेल तर त्यांनी कितीही गंभीर गुन्हा केले असो, त्यांनी केलेला काम मुस्लिम अल्पसंख्यांक विरोधात केले असेल तर ते कसुरवार नाही किंवा समज देऊन सोडण्यात येते.  याचा उत्तम उदाहरण म्हणजे मागील वर्षी कोटला घास गल्ली येथे दोन समाजात झालेल्या दंगली आणि त्यात त्या वेळची तोफखाना पोलिस निरीक्षक मॅडम यांनी केलेले कार्य हा मुस्लिम अल्पसंख्यांक विरोधी होती.  शेवगाव येथे दर्ग्याचे उर्स दरम्यान कोणताही कारण नसतांना शेवगाव पोलिस निरीक्षक यांनी केलेला लाठीचार्ज. संगमनेर येथे एका जातीवादी संघटनेचा पदाधिकारी आणि एका वृत्तवाहिनीचे संपादक यांनी केलेल्या चीतावनीखोर भाषणं नंतर अकोले येथे झालेल्या एका मुस्लिम अल्पसंख्यांक सामजाच्या तरुणाची हत्या आणि आणि पोलिसांचा मुख्य आरोपी वाचवण्याचा प्रयत्न, राहुरी उंब्रे येथे मुस्लिम धार्मिक स्थळांवर जातीवादी आतंकी संघटनेने हल्ला केल्याने त्या जातीवादी आतंकी संघटनेच्या लोकांना वाचवण्यासाठी फिर्यादीवर दबाव तयार करण्याचा काम पोलिस निरीक्षक यांनी केल्याचे चित्र व त्यांनतर मुस्लिम महीलावर खोटे गुन्हे दाखल करणे.   तसेच राहुरी गुहा गावात काही जातीवादी आतंकी संघटनेच्या लोकांनी मुस्लिम दर्ग्यावर कब्जा करण्याच्या हेतूने बनावट कागदपत्रे तयार करून धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंद केले परंतु सदर दर्गा वक्फ येथे नोंद आहे. तरी देखील पोलिस प्रशासन या जातीवादी संघटनेला पाटबल देत असल्याचे चित्र आहे. गुहा येथील या जातीवादी आतंकी संघटनेच्या लोकांची मजल इतकी झाली की त्यांनी पोलिस अधिकारी, तलाठी,  तहसीलदार यांना हाताशी धरून दर्ग्यामध्ये अनधिकृत मूर्ती बसवली. विशेष म्हणजे या जागेवर कोणतीही धार्मिक विधी करण्याचा न्यायालयाचा मनाई हुकूम असताना पोलिसांच्या मदतीने हा सर्व प्रकार घडला याची कल्पना तातडीने पोलिस अधीक्षक साहेब राकेश ओला यांना दिली तर त्यांनी नेहमी प्रमाणे काहीच केले नाही.  या सर्व बाबी वरून असे दिसते की अहमदनगर पोलिस अधीक्षक साहेब हे  अकार्यक्षम अधिकारी आहे किंवा हे सर्व काही ते अहमदनगरचे पालक मंत्री यांचे आदेशाने करत आहे किंवा पोलिस अधीक्षक राकेश ओला साहेब हे स्वतः या जातीवादी आतंकी संघटनेचे कार्यकर्ते आहे जे पोलिस खात्यात राहून या जातीवादी आतंकी संघटनेला मदत करत आहे. या सर्व बाबींचा आपण घांभिर्यापूर्वक चौकशी करून अहमदनगर पोलिस अधीक्षक राजेश ओला यांच्यावर आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने कारवाई करावी.

Ahmednagar News: अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची चौकशी करा – AIMIM  जिल्हाध्यक्ष Read More »

Mudassar Sheikh : …अन्यथा अंदोलन करण्यात येईल! ‘त्या’ प्रकरणात माजी नगरसेवक मुदस्सर शेख आक्रमक

 Mudassar Sheikh : मुदस्सर शेख माजी नगरसेवक महानगरपालिका अहमदनगर यांनी अहमदनगर जिल्हा अधिकारी निवेदन देऊन ऑनलाइन शिधापत्रिका प्रणाली व्यवस्थित करुन नागरिकांना लाभ मिळून देण्याची मागणी केली आहे.   अहमदनगर अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या गलथ्य कारभारामुळे प्रात्र कुटुंबांना रेशन (धान्य) व आयुष्यमान भारत योजने पासुन वंचित रहावे लागत आहे यामुळे ऑनलाइन शिधापत्रिका प्रणाली व्यवस्थित करुन नागरिकांना लाभ मिळुन द्यावा नाहीतर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.   त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 16 मे 2023 रोजी सामान्य प्रशासन शासन निर्णय अन्वये, ई शिधापत्रिका सुविधा विनामुल्य उपलब्ध करुन देण्याकरीता RCMSmahafood हि प्रणाली उपलब्ध करुन देण्यात आली होती मात्र अन्न धान्य वितरण कार्यालय येथे सदर शासन निर्णयाची अमलबजावणी होत नाही.   जे नागरीक अंत्योदय योजना (AYY), प्राधान्य कुटुंब योजनेचे (PHH) लाभार्थी आहे अश्या नागरीकांचे Public Login वरुन ऑनलाईन प्रकरण सादर करण्यास नागरीकांना शासनाने मुभा करुण दिलेली आहे. तरीही जिल्हा पुरवठा अधिकारी अहमदनगर यांनी सहाय्यक पुरवठा अधिकारी कार्यालय येथे DEO Officer प्रत्येकी 3 अधिकारी, Supply Inspector 3 अधिकारी व TFSO 1 अधिकारी दिलेला असुन सदर कार्यालयत वरिल अधिकारी ऑनलाईन शिधापत्रिकाची नोंदणी करत नाही व रास्त भाव दुकानदार किंवा सेतु कार्यालय येथे पाठतात.  यामुळे नागरिकांची खुप पळापळ होत आहे. जे नागरिक प्राधान्य कुटुंब यांजनाचे लाभार्थी साठी कागदपत्राची पुरतता करतील तर त्यांना PHH योजनेचा लाभ द्यावा कारण PHH योजनेचे शिधापत्रिकाचे नाव हे आयुष्यमान भारत योजने मध्ये येत आहे. यामुळे सदर प्रणाली व्यवस्तीत चालवण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा अंदोलन करण्यात येईल.

Mudassar Sheikh : …अन्यथा अंदोलन करण्यात येईल! ‘त्या’ प्रकरणात माजी नगरसेवक मुदस्सर शेख आक्रमक Read More »

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना धक्का! एकनाथ शिंदेंना दिलासा, आमदारांच्या अपात्रतेवर मोठा निर्णय

Maharashtra Politics :  शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेवर आज निर्णय झाला आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय दिला आहे.  महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या निर्णयात म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांना हटवण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही. शिवसेनेच्या एकाही सदस्याला काढून टाकण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही असे ते म्हणाले. दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत बंडखोरी झाली होती, त्यानंतर शिवसेनेच्या उद्धव गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील 39 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर शिंदे गटानेही उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अपात्रतेचा निर्णय सोपवला होता.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना धक्का! एकनाथ शिंदेंना दिलासा, आमदारांच्या अपात्रतेवर मोठा निर्णय Read More »

Maharashtra News : भाजप पुन्हा देणार अनेकांना धक्का! शिंदे अपात्र ठरल्यास, कोण होणार मुख्यमंत्री?

Maharashtra News:  आज दुपारी चार वाजता महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राज्यातील राजकारणाचा सर्वात मोठा निर्णय देणार आहे. दुपारी चार वाजता विधानसभा अध्यक्ष शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात आपला निकाल देणार आहे. या निकालावर एकनाथ शिंदे यांच्या सरकारचं भवित्व अवलंबून आहे. यामुळे या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. जर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवलं तर राज्याचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र सध्या  सरकारला कोणताही धोका नाही असं सांगितलं जात आहे.  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी बोलताना निर्णय काहीही आला तरी आमचं सरकार स्थिर राहील अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आला आहे. यामुळे भाजपकडे बी प्लॅन रेडी असल्यास बोललं जात आहे.  आगामी विधानसभा निवडणुका पाहता भाजप पुन्हा एकदा अनेकांना धक्का देण्याची तयारी करत असल्यास राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. यामुळे जर आज एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर अजित पवार यांना भाजप मुख्यमंत्री पद देऊ शकते अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे.  भाजप युतीकडे बहुमत आहे.अजित पवारांचा गट देखील आता भाजपसोबत आला आहे. अजित पवार यांच्याकडे 40 आमदार असल्याचं देखील बोललं जात आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत भाजपने 105 जागा जिंकले होते. त्यात आता अजित पवार गट आणि इतर काही अपक्ष आमदार यांची बेरीज केल्यास भाजपकडे पुन्हा एकदा बहुमत सिद्ध होईल.

Maharashtra News : भाजप पुन्हा देणार अनेकांना धक्का! शिंदे अपात्र ठरल्यास, कोण होणार मुख्यमंत्री? Read More »

Maharashtra Politics : शिंदे की ठाकरे? सत्ता संघर्षात  कोण मारणार बाजी

Maharashtra Politics: आज महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मागच्या दीड वर्षापासून चर्चेत असणारा शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर निर्णय घेणार आहे. विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण देशाच्या लक्ष लागला आहे.  या निर्णयावर एकनाथ शिंदे यांची सरकार राज्यात राहणार की जाणार याचा देखील निर्णय आज होणार आहे. यामुळे राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे.  20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40  आमदारासह बंड केले होते ज्यामुळे राज्यात असणारी ठाकरे सरकार कोसळली होती. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपला बरोबर घेत राज्यात सरकार स्थापित केली होती.   मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला होता.  यासाठी त्यांनी 31 डिसेंबर 2023 ची डेटलाईन दिली होती मात्र त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवसांची मुदत दिली होती जी आज संपत आहे. तर दुसरीकडे सरकारला कोणताही धोका नसल्याचं भाजपकडून सांगितलं जातय. उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय काहीही आला तरी आमचं सरकार स्थिर राहील अशी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांची सुनावणी घेतली आहे. कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा झालेली आहे. अपात्रतेशी संबंधित याचिकेवर आज संध्याकाळी 4 पर्यंत येऊ शकतो. कायदेतज्ज्ञांनुसार शिंदे गटाविरोधात निकाल गेल्यास मुख्यमंत्री शिंदे, त्यांच्या गटातील मंत्री आणि आमदारांना तातडीनं राजीनामा द्यावा लागेल.   भाजप युतीकडे बहुमत असेल. काही महिन्यांपूर्वीच अजित पवारांचा गट भाजपसोबत आला आणि सत्तेत सहभागी झाला. आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा अजित पवारांचा दावा आहे. विधानसभेच्या एकूण 288 जागा आहे. बहुमतासाठी 145 आमदारांचा पाठिंबा गरजेचा असतो.

Maharashtra Politics : शिंदे की ठाकरे? सत्ता संघर्षात  कोण मारणार बाजी Read More »

Ahmednagar News : कोतवाली पोलीसांची मोठी कारवाई, अवघ्या 12 तासात ‘त्या’ प्रकरणात आरोपीला अटक

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील ब्राम्हणगल्ली माळीवाडा येथील शंकर बाबा सावली मठातील अंदाजे २० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल असलेली दानपेटी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती.  या घटनेनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३८०,४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करत आरोपीला अवघ्या बारा तासात अटक केली आहे. पोलीसांनी रोहीदास उर्फ (रोह्या/रावश्या) लक्ष्मण पलाटे याला अटक केली आहे. सदर गुन्हयाचा तपास करत असताना कोतवाली पोलीसांनी मंदीरातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे आरोपीला अटक केली आहे. तसेच चोरलेली दानपेटी आरोपीने गांधी मैदानात एका पडक्या खोलीत लपवुन ठेवली होती. पोलीसांनी चोरी झालेली दानपेटी व त्या मधील रक्कम पंचा समक्ष हस्तगत केली असून आली गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि.विश्वास भान्सी हे करत आहेत.

Ahmednagar News : कोतवाली पोलीसांची मोठी कारवाई, अवघ्या 12 तासात ‘त्या’ प्रकरणात आरोपीला अटक Read More »

Ahmednagar News : शेतमाल चोरुन नेणारे टोळीकडुन सोयाबिन व तुर जप्त

Ahmednagar News: 28 डिसेंबर 2023 रोजी कोळगाव शिवारातुन सुमारे 1200 किलो शेतकऱ्याने अंगणात जमा करून ठेवलेली तुर अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचा गुन्हा ऋषिकेश देविदार लगड यांनी बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये भादवि.क.379, 342 प्रमाणे गुन्हा दाखल होता.  त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी तपास पथक नेमुन जिल्हयात पथके रवाना केले. त्यावेळी पो.नि.स्थागुशा दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, सदरची चोरी ही जामगाव येथील संदिप उत्तम गोरे व त्याचे सोबत असलेल्या लोकांनी चारचाकी वाहनाचे साहाय्याने केली आहे. या माहितीवरून त्यांनी  पारनेर तालुक्यातील जामगाव येथे स्थागुशा यांनी सापळा रचुन संदिप उत्तम गोरे , वैभव उर्फ बाल्या सुरेश औटी,  अमोल संतोष माळी, रोहीत सुनिल शेळके, आकाश आजिनाथ गोलवड,  विकास विठ्ठल घावटे यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले.  त्यांचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेला शेतमाल 1200 किलो तुर रुपये 96,000 किमतीची जप्त करण्यात आलेली आहे. तसेच तुर वाहतुक करण्यासाठी वापरलेला 8,00,000 रुपये किमतीची टाटा इंट्रा व्ही व नगर तालुक्यातील चोरुन नेलेले सोयाबीन 06 क्विंटल सोयाबिन 30,000 रुपये कि.चे असा एकुण 9,26,000 रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.  स्थागुशा अहमदनगर यांनी आरोपी व मुद्देमाल बेलवंडी पोस्टेस पंचनामा करुन ताब्यात देण्यात आले. आरोपींना बेलवंडी पोस्टेचे गुन्हयात अटक केले व पुढील तपास करिता समन्वय साधून बेलवंडी पोस्टेचे पो.नि.ठेंगे व पोलीस उपनिरीक्षक गाजरे, चाटे, पोहेकाँ खेडकर, पो.हे.कॉ. नंदकुमार पठारे, पोना शेख, पोकाँ पवार, भांडवलकर, दिवटे, शिपनकर, शिंदे यांनी आरोपींकडे अटक मुदतीत अधिक तपास करुन नगर तालुक्यातील शेंडी एम आय डी सी पोलीस स्टेशन येथिल दाखल असलेला गुन्हा रजि.1032/2023 भादवि.क.379 प्रमाणे गुन्हा उघडकीस आणला असुन आरोपीकडुन 08 सोयाबिनचे अर्धवट भरलेले कट्टे जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकाँ खेडकर हे करीत आहेत. 

Ahmednagar News : शेतमाल चोरुन नेणारे टोळीकडुन सोयाबिन व तुर जप्त Read More »

Loksabha Election : महायुतीने वाजवले निवडणुकीचे बिगुल! लोकसभेच्या 45 जागांसाठी मास्टर प्लॅन तयार

Loksabha Election :  येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहे. तर ऑक्टोंबर – नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. या दोन्ही निवडणुकांसाठी आता महायुतीने तयारी केली आहे.   मुंबईत महायुतीतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी महाआघाडीत सामील तिन्ही पक्ष-भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आगामी निवडणुकीच्या योजना सांगितल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेना नेते दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली.  राज्यातील लोकसभेच्या 45 हून अधिक जागांवर विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी महायुतीने मेगाप्लॅन केला असून, त्यादृष्टीने कामालाही सुरुवात केली आहे. 14 जानेवारीपासून सर्व जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे होणार आहेत. भाजपचे नेते बावनकुळे म्हणाले, आम्ही 45 हून अधिक जागा जिंकण्याची तयारी केली आहे. पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला यश मिळेल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.  जिल्हा, तालुका आणि बूथ स्तरावर रॅली, सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये तिन्ही पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. फेब्रुवारीमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा जाहीर सभा घेणार आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीला राज्यात मोठे यश मिळेल. राज्यातील 48 पैकी 45 हून अधिक लोकसभेच्या जागा आम्ही जिंकणार आहोत. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्हाला 51 टक्के मते मिळणार आहेत, महायुती आणखी मजबूत करू, असे आमच्या तिन्ही पक्षांनी ठरवले आहे. अनेकांना आमच्या आघाडीत सहभागी व्हायचे आहे. 47 हजार 412 लोकांनी आमच्याशी संवाद साधला असून त्यांना मोदींना पंतप्रधान म्हणून पाहायचे असल्याचे सांगितले आहे. संपूर्ण महाराष्ट्र मोदींच्या पाठीशी उभा आहे. विधानसभेतही विजय निश्चित – बावनकुळे पक्षात येण्यासाठी लोकांची गर्दी झाल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. आगामी काळात महाविकास आघाडीत फक्त नेतेच असतील, कार्यकर्ते उरणार नाहीत. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील तेव्हा महाराष्ट्रातून महायुतीचे 45 खासदार उभे राहतील. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीत महायुती मोठा विजय मिळवेल आणि आम्हाला 225 पेक्षा जास्त जागा मिळतील. अजित पवार गटाचा प्लॅन तयार राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी गेली 10 वर्षे देशाचे यशस्वी नेतृत्व केले आहे. आज राज्यात महायुतीचे सरकार आहे. जानेवारीपासून महायुतीच्या बैठकांना सुरुवात होणार आहे. यासाठी एक हजार प्रमुख कार्यकर्ते असतील. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून आम्ही (अजित पवार गट) जाहीर सभा घेणार आहोत. शिवसेना नेते व मंत्री दादा भुसे म्हणाले, देशपातळीवर अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. महायुतीचे सर्व मोर्चे आम्ही विभाग स्तरावर, गावपातळीवर आयोजित करत आहोत. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या बहुतांश आमदारांनी बंड पुकारले आणि भगवा पक्ष दोन गटात विभागला गेल्याची माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीचे (एमव्हीए) सरकार पडले होते. यानंतर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्याच वेळी, गेल्या वर्षी जुलैमध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हेही राष्ट्रवादीच्या आठ आमदारांसह शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील झाले आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. यानंतर अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेत आपला गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा केला. सध्या दोन्ही गट निवडणूक आयोगापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत वर्चस्वासाठी लढत आहेत.

Loksabha Election : महायुतीने वाजवले निवडणुकीचे बिगुल! लोकसभेच्या 45 जागांसाठी मास्टर प्लॅन तयार Read More »