DNA मराठी

latest update

Pune Crime: पुण्यात पुन्हा गोळीबार अन् कोत्याने वार; एकाचा जागीच मृत्यू

Pune Crime: मागील काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याने आता पुण्यातील कायदे सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात गोळीबार झाला असून या गोळीबारात एक जणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा परिसरात गोळीबार झाला असून या गोळीबारात एक जणाचा मृत्यू झाला आहे. कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात गुन्हेगाराकडून गोळीबार करण्यात आला आणि या गोळीबाळात गणेश काळे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, गणेश काळे हा आंदेकर टोळीतील दत्ता काळे याचा भाऊ आहे. आरोपीने एकूण 4 गोळ्या झाडल्या यानंतर गणेश काळे वर कोयत्याने वार करण्यात आला ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. गणेश काळे याचा भाऊ दत्ता काळे हा आंदेकर टोळीतील नंबरकारी असून आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपी होता. आयुष कोमकर हत्याप्रकरणी दत्ता काळे याला अटक करण्यात आली होती.

Pune Crime: पुण्यात पुन्हा गोळीबार अन् कोत्याने वार; एकाचा जागीच मृत्यू Read More »

Devendra Fadnavis: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी राज्य शासनाची विशेष मदत

Devendra Fadnavis: अहिल्यानगरसह राज्यातील पुणे, नाशिक व अमरावती विभागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी विशेष मदत जाहीर करण्यात आली आहे. जुलै ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, जुलै ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रति हेक्टरी १०,००० प्रमाणे (कमाल ३ हेक्टरपर्यंत) मदत DBT पोर्टलद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. तसेच बियाणे व इतर अनुषंगिक बाबींसाठी सहाय्य एकूण मंजूर निधी १७६५ कोटी २२ लाख ९२ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी राज्य शासनाची विशेष मदत Read More »

Chandshaili Ghat Accident : चांदशैली घाटात भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू 15 गंभीर जखमी

Chandshaili Ghat Accident : नंदुरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात आज सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. भगवान अस्तंबा ऋषी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची पीकअप जीप खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तात्काळ तळोदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. दिवाळीच्या दिवशी यात्रेला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Chandshaili Ghat Accident : चांदशैली घाटात भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू 15 गंभीर जखमी Read More »

devendra fadnavis

Maharashtra News: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; दिवाळीपूर्वी खात्यात निधी वर्ग

Maharashtra News : सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना एकूण ८४६ कोटी ९६ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा निर्णय घेतला आहे. दिवाळीपूर्वी ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध भागांतील शेतीपिकांचे नुकसान झाले असून, जिल्ह्यात सुमारे ६ लाख हेक्टर क्षेत्रावर या नैसर्गिक आपत्तीचा परिणाम झाला होता. या अनुषंगाने महसूल आणि कृषी विभागांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीची आकडेवारी व मदतीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. राज्यातील सर्व बाधित जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत एकूण ३ हजार २५८ कोटी ५६ लाख रुपयांच्या मदतीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार अहिल्यानगर जिल्ह्यास ८४६ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या निधीचा लाभ जिल्ह्यातील ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना मिळणार आहे, असे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. मदतीचा निधी वितरित करताना शासनाच्या नियम व निकषांचे काटेकोर पालन करण्याच्या, नैसर्गिक आपत्ती संदर्भातील अटी व शर्तींची पूर्तता करण्याच्या तसेच लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

Maharashtra News: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; दिवाळीपूर्वी खात्यात निधी वर्ग Read More »

shivaji kardile

Shivajirao Kardile : भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं निधन

Shivajirao Kardile : अहिल्यानगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव भानुदास कर्डीले यांचं निधन झाले असून वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ह्रदयविकाराच्या धक्क्याने कर्डीले यांचे निधन झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ते अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. त्यांनी सहावेळा आमदारकी भूषवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते.

Shivajirao Kardile : भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं निधन Read More »

chandrashekhar bawankule

Chandrashekhar Bawankule : मोठी बातमी! महसूल विभागात जमीन मोजणी आता फक्त 30 दिवसांत

Chandrashekhar Bawankule : जमीन मोजणी आता फक्त 30 दिवसांत करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या निर्णयामुळे जमीन मोजणीचे कोट्यवधी प्रकरणे आता मार्गी लागणार आहे. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पोटहिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, संयुक्त भूसंपादन मोजणी, वनहक्क दावे मोजणी, नगर भूमापन मोजणी, गावठाण भूमापन मोजणी व सिमांकन आणि मालकीहक्कासाठी मोजणी प्रक्रिया अत्यावश्यक मोजणी प्रकरणांचा 30 दिवसांत निपटारा करण्यासाठी परवानाधारक खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबत राज्य सरकारकडून अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यात जमीन मोजणी फक्त 30 दिवसात होणार आहे.

Chandrashekhar Bawankule : मोठी बातमी! महसूल विभागात जमीन मोजणी आता फक्त 30 दिवसांत Read More »

oplus 16908288

Shirdi Sai Baba: साईबाबांना साई भक्ताने दिला तब्बल एक कोटीचा हार

Shirdi Sai Baba : श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्‍तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक श्री साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या सांगता दिनी आंध्रप्रदेश येथील एका श्री साईभक्‍ताने श्री साईचरणी ९५४ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम व नवरत्‍नांचे खडे असलेला सोन्‍याचा हार श्री साईबाबांच्‍या चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍याकडे सुपुर्द केला. याची किंमत ०१ कोटी ०२ लाख ७४ हजार ५८० रुपये असून हा सुंदर नक्षीकाम असलेला हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केल्‍यानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार श्री साईभक्‍त यांचा सत्‍कार केला. श्री साईभक्‍त यांच्‍या विनंतीवरून त्‍यांचे नाव गुप्‍त ठेवण्‍यात आले आहे.

Shirdi Sai Baba: साईबाबांना साई भक्ताने दिला तब्बल एक कोटीचा हार Read More »

atul save

Maharashtra Government: मोठी बातमी, राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती गठीत

Maharashtra Government: राज्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी राज्यस्तरीय दुग्धव्यवसाय अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा उद्देश राज्यातील दूध उत्पादन कमी असलेल्या भागांमध्ये दूध उत्पादन वाढीसाठी दिर्घकालीन उपाययोजना सुचविणे आणि सहकारी व खाजगी दूध संघांसह शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण करणे हा असल्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. मंत्री सावे म्हणाले, अभ्यास समितीचे अध्यक्ष आयुक्त, पशुसंवर्धन असून, सदस्य सचिव म्हणून आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास हे आहेत. समिती राज्यातील दुग्धव्यवसायाच्या परिस्थितीचा आढावा घेईल. तसेच, दूध उत्पादक शेतकरी, खाजगी व सहकारी दूध संघ यांचेकडून प्राप्त सूचना लक्षात घेऊन उपाययोजना सुचवण्याचे काम समिती करणार आहे. समितीच्या कार्यात “विकसित महाराष्ट्र 2047” या उद्दिष्टाचा विचार केला जाईल. राज्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अग्रगण्य दुग्धव्यवसाय व पशुसंवर्धन विभाग म्हणून कामगिरी करण्यासाठी देशभरातील विविध राज्यांतील योजना अभ्यासून सर्वोत्तम योजना राज्यात राबविण्याचे मार्गदर्शन समिती करणार आहे. ही अभ्यास समिती पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती, दुग्ध उद्योगांचे प्रतिनिधी आणि प्रगतिशील दूध उत्पादक शेतकरी यांना आवश्यकतेनुसार आमंत्रित करेल. समितीच्या मार्गदर्शनाखाली महिलांना दुग्धव्यवसायात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच बचतगट/शेतकरी उत्पादक गटांच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल, या बाबींचेही नियोजन केले जाणार असल्याचे मंत्री सावे यांनी सांगितले.

Maharashtra Government: मोठी बातमी, राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती गठीत Read More »

pt chhannulal mishra death

Pt Chhannulal Mishra Death: पद्मविभूषण पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे निधन; 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pt Chhannulal Mishra Death : शास्त्रीय गायक आणि पद्मविभूषण पंडित छन्नूलाल मिश्रा यांचे गुरुवारी पहाटे उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी पहाटे 4.15 वाजता त्यांची मुलगी नम्रता मिश्रा हिच्या मिर्झापूर येथील घरी अखेरचा श्वास घेतला. ते काही काळापासून आजारी होते आणि बनारस हिंदू विद्यापीठातील (BHU) वैद्यकीय विज्ञान संस्थेत त्यांच्यावर उपचार सुरू होते. नंतर त्यांची मुलगी त्यांना मिर्झापूर येथील त्यांच्या घरी घेऊन गेली, जिथे ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहिले. छन्नूलाल मिश्रा यांनी त्यांच्या शास्त्रीय संगीताद्वारे लोकांच्या हृदयात स्थान मिळवले. त्यांचे “खेले मसाने में होली…” हे गाणे अजूनही सर्वांच्या ओठांवर आहे. मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार छन्नूलाल मिश्रा यांच्या निधनाने संगीत विश्वात शोककळा पसरली आहे. त्यांचे अंत्यसंस्कार आज वाराणसीतील मणिकर्णिका घाटावर केले जातील. पंडित छन्नूलाल मिश्रा गेल्या सात महिन्यांपासून अनेक आरोग्य समस्यांशी झुंजत होते. बीएचयूच्या सर सुंदरलाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालानुसार, त्यांना अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (एआरडीएस) होता, जो त्यांच्या फुफ्फुसांमध्ये तीव्र जळजळ होण्यामुळे उद्भवणारा आजार होता. त्यांना टाइप २ मधुमेह, उच्च रक्तदाब, ऑस्टियोआर्थरायटिस आणि वाढलेले प्रोस्टेट यासारख्या समस्या देखील होत्या. अनेक गंभीर आजारांनी ग्रस्त होते 11 सप्टेंबर 2025 रोजी, मिर्झापूर येथील त्यांच्या मुलीच्या घरी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. छातीत दुखण्याची तक्रार केल्यानंतर, त्यांना ताबडतोब मिर्झापूर येथील रामकृष्ण सेवाश्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले. 13 सप्टेंबरच्या रात्री त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना बीएचयूच्या सर सुंदरलाल रुग्णालयात हलवण्यात आले. 17 दिवसांच्या रुग्णालयात उपचारानंतर, त्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना 27 सप्टेंबर रोजी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते त्यांच्या मुलीसह मिर्झापूर येथील त्यांच्या घरी गेले, जिथे ते डॉक्टरांच्या जवळच्या देखरेखीखाली राहिले. त्यांनी गुरुवारी पहाटे शेवटचा श्वास घेतला. बनारस घराण्याचे एक अनमोल रत्न पंडित छन्नुलाल मिश्रा यांचा जन्म 3 ऑगस्ट 1936 रोजी उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील हरिहरपूर येथे झाला. ते भारतीय शास्त्रीय संगीताच्या बनारस घराण्यातील सर्वात प्रमुख गायकांपैकी एक होते. त्यांच्या गायनात बनारसच्या गंगा-जमुनी संस्कृतीचे स्पष्ट प्रतिबिंब होते. ठुमरी, दादरा, कजरी, चैती आणि भजन यासारख्या शास्त्रीय आणि अर्धशास्त्रीय गायन शैलींवर त्यांचे प्रभुत्व अतुलनीय होते. त्यांच्या आवाजात एक अनोखी जादू होती जी श्रोत्यांना मोहित करते.

Pt Chhannulal Mishra Death: पद्मविभूषण पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे निधन; 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास Read More »

team india

Team India : Asia Cup नंतर भारतीय संघ मालामाल, बीसीसीआयकडून मोठी घोषणा

Team India: भारताने दमदार कामगिरी करत आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात बाजी मारली आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 विकेट्सने हरवून नवव्यांदा विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात पाकिस्तानने 147 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे तिलक वर्मा, शिवम दुबे आणि संजू सॅमसन यांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने साध्य केले. बीसीसीआयकडून 21 कोटी रुपयांचे बक्षीस आशिया कप विजयानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संघ आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी 21 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. आशिया कपमध्ये भारताचे वर्चस्व भारताने आतापर्यंत 9 वेळा आशिया कप जिंकला आहे, ज्यामध्ये 7 एकदिवसीय आणि 2 टी-20 जेतेपदांचा समावेश आहे. या कामगिरीमुळे भारत या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ बनला आहे. श्रीलंकेने 6 वेळा आणि पाकिस्तानने 2 वेळा विजेतेपद जिंकले आहे. कुलदीप यादवची शानदार कामगिरी फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने 146 धावा केल्या. साहिबजादा फरहान आणि फखर झमान यांनी 84 धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात केली, परंतु त्यानंतर त्यांची फलंदाजी कोसळली. कुलदीप यादवने चार बळी घेत पाकिस्तानला 146 धावांवर बाद केले. वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तिलक आणि दुबे यांची स्फोटक फलंदाजी भारताकडून तिलक वर्माने शानदार खेळी केली, 53 चेंडूत 69 धावा (तीन चौकार आणि चार षटकार) केल्या. शिवम दुबेने 22 चेंडूत 33 धावा (दोन चौकार आणि दोन षटकार) केल्या, ज्यामुळे भारताला लक्ष्य सहज गाठता आले.

Team India : Asia Cup नंतर भारतीय संघ मालामाल, बीसीसीआयकडून मोठी घोषणा Read More »