DNA मराठी

latest update

gmail

Gmail च्या इतिहासात ‘हे’ पहिल्यांदाच होणार; मिळणार अनेकांना दिलासा

Gmail Update: अनेकांना दिलासा देण्यासाठी आता गुगल एक मोठा नियम बदलण्याची तयारी करत आहे.कंपनी एक नवीन फीचर आणत आहे जे वापरकर्त्यांना त्यांचा @gmail.com ईमेल ॲड्रेस बदलण्याची परवानगी देईल. पहिल्यांदाच जीमेल ॲड्रेस बदलण्याचा पर्याय आतापर्यंत, गुगलने फक्त थर्ड-पार्टी ईमेल ॲड्रेसने तयार केलेल्या खात्यांसाठी ईमेल बदलण्याची परवानगी दिली होती. जीमेल ॲड्रेस असलेल्या खात्यांमध्ये हे फीचर नव्हते, परंतु गुगल सपोर्ट पेज सूचित करते की कंपनी आता जीमेल वापरकर्त्यांना त्यांचा ईमेल ॲड्रेस बदलण्याचा पर्याय देत आहे. जुने जीमेल एक उपनाम बनेल नवीन फीचर अंतर्गत, जेव्हा वापरकर्ता नवीन जीमेल ॲड्रेस निवडतो तेव्हा जुना पत्ता हटवला जाणार नाही. गुगल जुना जीमेल ॲड्रेस उपनाम म्हणून वापरेल. याचा अर्थ असा की वापरकर्ते जुन्या आणि नवीन दोन्ही ईमेल ॲड्रेससह गुगल सेवांमध्ये लॉग इन करू शकतील. इतकेच नाही तर जुन्या जीमेल ॲड्रेसवरील ईमेल पूर्वीप्रमाणेच प्राप्त होत राहतील. गुगलने स्पष्ट केले आहे की या बदलाचा फोटो, मेसेज, ईमेल आणि इतर डेटावर परिणाम होणार नाही. काही निर्बंध लागू होतील तर दुसरीकडे या वैशिष्ट्यासह काही मर्यादा देखील असणार आहे. गुगलच्या मते, ईमेल पत्ता बदलल्यानंतर, वापरकर्ते एका वर्षासाठी नवीन गुगल खाते तयार करू शकणार नाहीत. शिवाय, वापरकर्ता त्यांचा जीमेल पत्ता एकूण तीन वेळाच बदलू शकतो. सर्वांसाठी उपलब्ध नाही गुगलने असेही म्हटले आहे की हे वैशिष्ट्य अद्याप सर्व वापरकर्त्यांसाठी लाइव्ह नाही. ते हळूहळू आणले जात आहे, म्हणून काही वापरकर्त्यांना थोडा जास्त वेळ वाट पहावी लागू शकते. सुरुवातीला, हा पर्याय मर्यादित संख्येच्या खात्यांवरच दिसेल. हा बदल का महत्त्वाचा? बऱ्याच वापरकर्त्यांनी वर्षांपूर्वी घाईघाईत किंवा तरुण वयात जीमेल आयडी तयार केले होते, जे आता व्यावसायिक किंवा वैयक्तिक गरजांसाठी योग्य वाटत नाही. म्हणूनच, गुगलच्या या हालचालीमुळे वापरकर्त्यांना नवीन खाते तयार न करता त्यांची डिजिटल ओळख सुधारण्याची संधी मिळेल.

Gmail च्या इतिहासात ‘हे’ पहिल्यांदाच होणार; मिळणार अनेकांना दिलासा Read More »

Rahuri By election : राहुरीत होणार पोटनिवडणूक; विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

Rahuri By election : भारत निवडणूक आयोगाने २२३ राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार ३ जानेवारी २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. या मोहिमेत पात्र नागरिकांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, नव्याने पात्र असलेल्या मतदारांची नोंदणी करणे व दोषरहित मतदार यादी तयार करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमांतर्गत २९ डिसेंबर २०२५ पर्यंत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येईल. यात कोणत्याही मतदान केंद्रावर १२०० पेक्षा जास्त मतदार असणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल. प्रारूप मतदार यादी ३ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध होईल. यानंतर ३ जानेवारी ते २४ जानेवारी २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जातील. प्राप्त दावे व हरकतींचा निपटारा ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत करून १४ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. ०१/०१/२०२६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या व भारताचा नागरिक असलेल्या पात्र व्यक्तीस नाव नोंदणी करता येईल. नवीन नाव नोंदणीसाठी ‘नमुना नं. ६’ भरावा लागेल. याशिवाय मतदार यादीतील मयत अथवा दुबार नावे वगळण्यासाठी ‘नमुना नं. ७’, तर एका भागातून दुसऱ्या भागात नाव समाविष्ट करणे किंवा तपशीलात (नाव, वय, लिंग, फोटो इ.) दुरुस्ती करण्यासाठी ‘नमुना नं. ८’ भरता येईल. यासाठी https://voters.eci.gov.in/ हे संकेतस्थळ व ‘Voter Helpline App’ या सुविधा उपलब्ध आहेत. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मतदार नोंदणी अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) वर्षा पवार यांची, तर सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून राहुरी, अहिल्यानगर, पाथर्डी व पुनर्वसन विभागाच्या तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजकीय पक्षांचा सहभाग महत्त्वाचा असून, त्यांनी आपले मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) नेमावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या अनुषंगाने २६ डिसेंबर २०२५ रोजी राजकीय पक्षांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी व राजकीय पक्षांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.

Rahuri By election : राहुरीत होणार पोटनिवडणूक; विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर Read More »

img 20251210 wa0004

Mephedrone Drug Factory : मेफेड्रोन ड्रग्सची फॅक्टरी महसूल गुप्तचर संचालनालयाने केली उद्धवस्त, 192 कोटी रुपयांचे तब्बल 128 किलो मेफेड्रोन ड्रग्स जप्त

Mephedrone Drug Factory : वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) या ठिकाणी सुरू असलेला ड्रग्स कारखाना महसूल गुप्तचर संचालनालयाने उद्धवस्त केला आहे. बेकायदेशीर पद्धतीने ड्रग्ज फॅक्टरी सुरू असल्याने “ऑपरेशन हिंटरलँड ब्रू” अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान 192 कोटी रुपयांचे तब्बल 128 किलो इतक्या वजनाचे मेफेड्रोन ड्रग्स (MD) जप्त करण्यात आले असून तिघांना अटक करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी मेफेड्रोन ड्रग्सच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणारे उपकरणे जप्त केले आहेत. कारंजा (घाडगे) ठिकाण वर्धापासून सुमारे 75 किलोमीटर दूर आहे. या भागातील जंगलामध्ये बेकायदेशीररित्या ड्रग्सचा कारखाना चालविला जातोय अशी अत्यंत गोपनीय माहिती महसूल गुप्तवार्ता संचालनालय नागपूर येथील युनिटला समजली होती. त्या आधारेच DRI च्या पथकाने धाड टाकून हा कारखाना उद्धवस्त केला आहे. ज्यावेळी ही कारवाई करण्यात आली त्यावेळी या कारखान्यात एमडी ड्रग्स तयार करण्याचे काम सुरू होते. कारवाईत तब्बल 128 किलो मेफेड्रोन (एमडी)  जप्त करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्सची किंमत सुमारे 192 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. ‘ऑपरेशन हिंटरलँड ब्रू’ महसूल गुप्तचर संचालनालयाकडून ‘ऑपरेशन हिंटरलँड ब्रू’ राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत विदर्भातील ही सर्वांत मोठी कारवाई करण्यात आली आहे. कारंजा (घाडगे) या तालुक्यातील एका निर्जन जंगल भागात मेफेड्रोनची निर्मिती होत असल्याची गुप्त माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना समजली होती त्या आधारे  अधिकाऱ्यांनी या भागावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली होती. हा संपूर्ण परिसर पूर्णतः अत्यंत घनदाट जंगलाने व्यापलेला आहे ज्यावेळी कारखान्यात एमडी ड्रग्सची निर्मिती  सुरू असल्याची खात्री पटल्यानंतर पथकाने तिथे छापा टाकला आणि तब्बल 128 किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले. शिवाय 245 किलो कच्चा माल जप्त करण्यात आला आहे. दोषींवर कारवाई करणार:- गृहराज्य मंत्री वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे या ठिकाणच्या जंगलात सुरू बेकायदेशीरपणे असलेली एमडी ड्रग्स तयार करण्याची फॅक्टरी महसूल गुप्तचर संचलनालयाने उद्धवस्त केल्याचेनंतर स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. या संदर्भात गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना विचारले असता ते म्हणालेत की मी आज वर्धा जिल्हाचा दौरा करणार आहे आणि प्रकरणात दोषी असलेली असलेल्यांवर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले आहेत.

Mephedrone Drug Factory : मेफेड्रोन ड्रग्सची फॅक्टरी महसूल गुप्तचर संचालनालयाने केली उद्धवस्त, 192 कोटी रुपयांचे तब्बल 128 किलो मेफेड्रोन ड्रग्स जप्त Read More »

img 20251125 wa0001

प्रतीक्षा संपणार, Bigg Boss Marathi 6 लवकरच कलर्स मराठीवर आणि JioHotstar वर!

Bigg Boss Marathi : मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय शो  बिग बॉस मराठीचा सहावा सीझन  लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता बिग बॉसच्या घराचा दरवाजा पुन्हा उघडणार आणि एंटरटेनमेंटचा बार पुन्हा उडणार. प्रत्येक वर्षीप्रमाणे प्रेक्षकांच्या मनात हजारो प्रश्न घोळू लागले आहेत. यंदाचा USP काय असेल? थीम काय असेल? सदस्य कोण असतील? घर कसे असेल? यंदाचा गेम प्लॅन काय असणार? आणि बरंच काही. तसेच यावेळेस सूत्रसंचालन महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणजे रितेश देशमुख करणार का? भाऊचा कट्टा पुन्हाएकदा घराघरात पाहायला मिळणार का ? या सर्व प्रश्नांमुळे बिग बॉसच्या पुनरागमनाची वारे सगळीकडे वाहू लागले आहेत. कलर्स मराठीकडून सादर करण्यात आलेल्या खास टीझरमध्ये प्रेक्षकांना यंदाच्या सीझनच्या थीमचा सर्वात महत्त्वाचा संकेत मिळाला तो म्हणजे दरवाजा. या वेळी एक नाही तर अनेक दरवाजे असणार आहेत. यावेळेसचा खेळ अजूनच धमाकेदार होणार आहे. या वर्षीच्या बिग बॉस मराठी सिझन 6 च्या टीझरमध्ये एकाच दाराऐवजी अनेक दरवाजे दिसतात, आणि याच क्षणी प्रेक्षकांची उत्सुकता क्षणात वाढते. खरं काहीच उघड न करता टीझर प्रेक्षकांना थेट गुंतवून ठेवतो. दारांमधून येणारा प्रकाश, त्यांची अनोखी रचना आणि रहस्यमय वातावरण हे फक्त एकच सांगतं या सीझनमध्ये काहीतरी खूप वेगळं घडणार आहे. सध्या या सिझनबद्दलची सर्व माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली असून ती लवकरच उलगडणार आहे. सदस्यांची नावे, घराची पहिली झलक, थीमची अधिकृत घोषणा आणि या वर्षीचे मोठे ट्विस्ट हे सर्व लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहेत. महाराष्ट्रभर पुन्हा एकदा “Bigg Boss आदेश देत आहेत!” हा आवाज घुमण्याच्या तयारीत आहे आणि मनोरंजनाचा बाप बिग बॉस मराठी सिझन 6 लवकरच परततोय फक्त कलर्स मराठीवर आणि JioHotstar वर!

प्रतीक्षा संपणार, Bigg Boss Marathi 6 लवकरच कलर्स मराठीवर आणि JioHotstar वर! Read More »

dharmendra passed away

Dharmendra Passed Away : धर्मेंद्रच्या आयुष्यातील असं प्रेम जे कधीही पूर्ण झाले नाही

Dharmendra Passed Away :  बॉलीवूडचा “ही मॅन” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांचे 89 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खराब असल्याने सुरुवातीला त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर त्यांच्या राहत्या घरी उपचार सुरू होता. धर्मेंद्र यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी अनेक सुपरहिट चित्रपट आणि त्यांच्या आयुष्यातील असंख्य स्टोरी पाठीमागे सोडून गेले. अशीच एक स्टोरी म्हणजे मीना कुमारीशी असलेल्या त्यांच्या नात्याची. ही स्टोरी अन्नू कपूर यांनी त्यांच्या लोकप्रिय रेडिओ शो “सुहाना सफर” मध्ये सांगितली होती. ही स्टोरी धर्मेंद्र यांच्या चित्रपट कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील आहे. मीना त्यावेळी चित्रपट उद्योगातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होती. कोणताही निर्माता किंवा दिग्दर्शक मीना कुमारी यांच्यासोबत काम करण्यास तयार होते मात्र धर्मेंद्र यांनी त्यांच्या चित्रपटामध्ये काम करावे अशी मीना कुमारची इच्छा होती. दोघांनी 1964 ते 1968 दरम्यान अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले, ज्यात “मैं भी लडकी हूं,” “काजल,” “फूल और पत्थर,” आणि इतर चित्रपटांचा समावेश होता. अफेअरची सर्वत्र चर्चा या काळात मीना कुमारी धर्मेंद्र यांच्याशी जवळीक वाढली. त्यांच्या जवळीकतेची सर्वत्र चर्चा झाली. दिल्लीतील एका कार्यक्रमातही तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी मीना कुमारी यांना त्यांच्या नात्याबद्दल विचारले. मात्र त्यानंतर “फूल और पत्थर” या चित्रपटामुळे धर्मेंद्र स्टार झाले. त्यानंतर मीना कुमारींपासून त्यांचे अंतर वाढत गेले. अखेर त्यांचे नाते तुटले. धर्मेंद्र मीनाच्या घरी गेले नाहीत तेव्हा त्यांचे मन दुखावले. काही काळानंतर मीना कुमारी आणि धर्मेंद्र पुन्हा एकमेकांना भेटले. प्रसंगी के. आसिफ यांनी आयोजित केलेल्या पार्टीचा होता. मीना कुमारी थोडी आधी आली होती. काही वेळाने धर्मेंद्र आले. त्यांनी मीना कुमारीला पाहिले. मीनालाही त्यांनी पाहिले. पण, ते दोघेही पाहत राहिले. त्यांनी थोडा वेळ शोध घेतला, नंतर धर्मेंद्र निघून गेले. यामुळे मीना दु:खी झाली. तिने तिच्या चेहऱ्यावर वेदना दिसू नयेत म्हणून खूप प्रयत्न केले. तथापि, ती अपयशी ठरली आणि पार्टी सोडून गेली.

Dharmendra Passed Away : धर्मेंद्रच्या आयुष्यातील असं प्रेम जे कधीही पूर्ण झाले नाही Read More »

pankaj ashiya

Pankaj Ashiya : घरवापरगुती गॅसचा व्यावसायिक रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा; जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आदेश

Pankaj Ashiya : घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिले. जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले , घरगुती वापरासाठी असलेल्या अनुदानित एलपीजीचा हॉटेल, ढाबे यांसारख्या व्यावसायिक ठिकाणी अवैध वापर होत असल्याने सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण होत आहे आणि शासनाच्या निधीचे मोठे नुकसानही होते आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरच्या काळाबाजारावर तात्काळ ठोस कारवाई करण्यात यावी. अवैध रिफिलिंग आढळल्यास संबंधित गॅस एजन्सीवर कारवाई करून तिचे परवाने रद्द करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. घरगुती गॅसच्या अवैध व्यापारात सहभागी किंवा गैरव्यवहार करणाऱ्या गॅस एजन्सींना देण्यात आलेले ना हरकत प्रमाणपत्र तातडीने रद्द करावे. तसेच पेट्रोलियम अधिनियमांतर्गत एजन्सीची साठवणूक आणि विक्रीची परवानगीही तत्काळ रद्द करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. ग्राहकांनी गॅस सिलेंडर घेताना वजन काट्यावर तपासून घ्यावे तसेच लिकेज डिटेक्टरद्वारे गॅस गळतीची खात्री करून घ्यावी. अवैध रिफिलिंगमुळे गॅस गळतीची आणि मोठ्या अपघातांची शक्यता असते. त्यामुळे आपले गॅस सिलेंडर इतरांना देऊ नयेत आणि घरगुती सिलेंडर व्यावसायिक वापरासाठी अजिबात वापरू नयेत. घरगुती गॅसचा अवैधरित्या वापर होत असल्याची माहिती मिळाल्यास ती संबंधित कंपनीच्या सेल्स अधिकारी किंवा नोडल अधिकाऱ्यांना देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.

Pankaj Ashiya : घरवापरगुती गॅसचा व्यावसायिक रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा; जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आदेश Read More »

crime

Dhule Crime : पेढ्यातून गुंगीचे औषध, शारीरिक संबंधाचा व्हिडिओ अन् 60 लाख रुपये उकळले, मुख्याध्यापकाचा महिलेवर अत्याचार

Dhule Crime : आर्थिक व्यवहारातून झालेल्या ओळखीचा फायदा घेत पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 60 लाख रुपये उकळून सलग सव्वा दोन वर्ष अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापका विरोधात 41 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच पश्चिम देवपूर पोलिसांनी सुकलाल रामभाऊ बोरसे, वय 53, रा. विवेकानंद नगर देवपूर धुळे, या मुख्याध्यापकाला अटक केली आहे. संबंधित नराधम मुख्याध्यापकाने पीडित महिलेला आर्थिक मदत केली होती. या आर्थिक मदतीतून ओळख झाल्याने मुख्याध्यापकांनी पीडित महिलेच्या घरी जाऊन पेढ्यांमध्ये गुंगीचे औषध देत महिलेवर अत्याचार केला. एवढ्यावरच या नराधम मुख्याध्यापकाने न थांबता पिढीत महिला सोबत केलेल्या शारीरिक संबंधाचा व्हिडिओ वायरल करण्याची धमकी देऊन तब्बल 59 लाख रुपये उकळत ब्लॅकमेल करत तब्बल सव्वा दोन वर्ष महिलेवर अत्याचार केला. अखेर महिलेने पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन गाठत नराधम मुख्याध्यापका विरोधात तक्रार दाखल केल्याने पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये मुख्याध्यापका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ नराधम मुख्याध्यापकाला ताब्यात घेत गजाआड केले आहे. घडलेल्या घटनेमुळे धुळ्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पश्चिम देवपूर पोलीस करत आहे.

Dhule Crime : पेढ्यातून गुंगीचे औषध, शारीरिक संबंधाचा व्हिडिओ अन् 60 लाख रुपये उकळले, मुख्याध्यापकाचा महिलेवर अत्याचार Read More »

maharashtra government

Maharashtra Cabinet Decisions: राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ जिल्हा बँकांना मिळणार 827 कोटींचे भागभांडवल

Maharashtra Cabinet Decisions: नाशिक, नागपूर आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकांना भागभांडवल म्हणून 827 कोटी रुपये देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यात नाशिक जिल्हा बँकेला 672 कोटी, नागपूर जिल्हा बँकेला 81 आणि धाराशिव जिल्हा बँकेला 74 कोटी रुपये देण्यात येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने नाशिक, नागपूर आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकांचे पुनर्भांडवलीकरण व पुनरूज्जीवन करण्याबाबत शासनास कळवले आहे. त्यानुसार आज या तीनही बँकांना भागभांडवल म्हणून अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले. शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेची भूमिका महत्त्वाची असते. जिल्हा बँकेच्या आर्थिक स्थितीवरच सेवाविकास संस्थांचेही अस्तित्व असते. त्यामुळे नाशिक, नागपूर आणि धाराशिव जिल्हा बँक यांना एकूण 827 कोटी रुपये भागभांडवल स्वरूपात शासकीय अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले. नाशिक जिल्हा बँकेस यंदाच्या आर्थिक वर्षात 336 कोटी आणि पुढील आर्थिक वर्षात 336 कोटी वितरित करण्यासही मान्यता देण्यात आली. नाशिक आणि नागपूर जिल्हा बँकांवर सध्या प्रशासक कार्यरत आहेत. धाराशिव जिल्हा बँकेवर संचालक मंडळ आहे. मात्र धाराशिव जिल्हा बँकेची स्थिती सातत्याने खालावत असल्याने या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्यासाठी सहकार आयुक्तांना निर्देश देण्यासही मान्यता देण्यात आली.

Maharashtra Cabinet Decisions: राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ जिल्हा बँकांना मिळणार 827 कोटींचे भागभांडवल Read More »

maharashtra local body election

Maharashtra Local Body Election: निवडणुकीची रणधुमाळी, स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व वाढणार?

Maharashtra Local Body Election 2025 : राज्यात पुन्हा एकदा राजकीय तापमान चढले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास आज (१० नोव्हेंबर) पासून सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर करताच राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून अनेक ठिकाणी गटबाजी, नाराजी आणि स्थानिक आघाड्यांची चाचपणी सुरू झाली आहे. महायुती व महाविकास आघाडीमध्ये राज्यस्तरावरील चर्चेचा निष्कर्ष अद्याप निघालेला नसल्याने, अनेक ठिकाणी पक्षीय चिन्हाऐवजी स्थानिक आघाड्यांच्या जोरावर निवडणूक लढवली जाण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत २८८ अध्यक्ष आणि ६,८५९ सदस्य निवडले जाणार असून २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून १७ नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, १८ नोव्हेंबरला अर्जांची छाननी आणि २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. यंदा उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरून त्याची प्रिंट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावी लागणार आहे. राज्यातील २४७ नगरपरिषदांपैकी ३३ पदे अनुसूचित जातींसाठी, ११ पदे अनुसूचित जमातींसाठी, ६७ पदे मागास प्रवर्गासाठी, तर १३६ पदे खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. पुणे जिल्ह्यात ६.३४ लाख मतदार, १७ स्थानिक संस्था रणांगणातपुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली असून, आचारसंहिता लागू झाली आहे. १ जुलै २०२५ च्या मतदार यादीप्रमाणे जिल्ह्यात एकूण ६,३४,९४० मतदार आहेत. बारामती ही ‘अ’ वर्गातील नगरपरिषद असून, लोणावळा, दौंड, चाकण, तळेगाव दाभाडे आणि फुरसुंगी-उरळी देवाची या नगरपरिषदा ‘ब’ वर्गात येतात. सासवड, जेजुरी, इंदापूर, शिरूर, जुन्नर, आळंदी, भोर आणि राजगुरूनगर या ‘क’ वर्गातील नगरपरिषदा आहेत. मंचर, वडगाव मावळ आणि माळेगाव बुद्रुक या नगरपंचायतींसाठीही आचारसंहिता लागू झाली असून या नगरपंचायतींसाठी पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. विशेष म्हणजे, फुरसुंगी-उरळी देवाची नगरपरिषदेत प्रथमच निवडणूक होत आहे. ही निवडणूक द्विसदस्यीय पद्धतीने होणार असून एकूण १६ प्रभागांतून ३२ नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. अध्यक्षपदासाठी थेट मतदान होणार असल्याने या नगरपरिषदेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे ढवळून निघणार आहेत. कोण जिंकणार स्थानिक सत्तेची लढाई, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

Maharashtra Local Body Election: निवडणुकीची रणधुमाळी, स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व वाढणार? Read More »

josh hazlewood

Josh Hazlewood : टीम इंडियासाठी गुड न्यूज; ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ स्टार गोलंदाज टी20 मालिकेतून बाहेर

Josh Hazlewood : पहिल्या आणि दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताविरोधात शानदार गोलंदाजी करणारा ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज जोश हेझलवूड टी 20 मालिकेतून बाहेर झाला आहे. तो या मालिकेतील पुढील तिन्ही सामने खेळणार नसल्याची माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेट बॉर्डकडून देण्यात आली आहे. जोश हेझलवूड मालिकेतून बाहेर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आगामी अ‍ॅशेस कसोटी मालिकेला लक्षात घेऊन जोश हेझलवूडला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस सुरू होणाऱ्या या प्रतिष्ठित कसोटी मालिकेसाठी हेझलवूडला पूर्णपणे तंदुरुस्त ठेवणे संघ व्यवस्थापनासाठी प्राधान्य आहे. लांब आणि आव्हानात्मक पाच सामन्यांच्या अ‍ॅशेस मालिकेत त्याचा अनुभव आणि तंदुरुस्ती आवश्यक असेल, म्हणून त्याला भारताविरुद्धच्या उर्वरित टी-20 सामन्यांमधून विश्रांती देण्यात आली आहे. मेलबर्नमधील दुसऱ्या टी-20 सामन्यात, हेझलवूडने चार षटकांत फक्त 13 धावा देऊन तीन महत्त्वपूर्ण बळी घेतले. त्याच्या घातक स्पेलमुळे टीम इंडिया सुरुवातीलाच अडचणीत आली. हेझलवूडच्या अनुपस्थितीत, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी विभागाची नक्कीच परीक्षा होईल. संघ आता त्याच्या जागी झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस किंवा शॉन अ‍ॅबॉट सारख्या गोलंदाजांना निवडू शकतो. दुसरीकडे, भारतीय संघासाठी ही एक दिलासादायक बाब आहे की त्यांना उर्वरित सामन्यांमध्ये हेझलवूडच्या धोकादायक स्विंग आणि अचूक गोलंदाजीचा सामना करावा लागणार नाही.

Josh Hazlewood : टीम इंडियासाठी गुड न्यूज; ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ स्टार गोलंदाज टी20 मालिकेतून बाहेर Read More »