DNA मराठी

मनोरंजन

pravin tarde

Pravin Tarde : नसरापूर दुर्घटनेवर प्रवीण तरडे संतप्त; “अशा नराधमांना चेचणारा सिनेमा बनवणार”

Pravin Tarde : नसरापूर दुर्घटनेवर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची संतप्त प्रतिक्रिया दिली असून येणाऱ्या अशा नराधमांना चेचणारा सिनेमा बनवणार अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना प्रवीण तरडे म्हणाले की, येणाऱ्या काळात अशा नराधमांना चेचण्यासाठी सिनेमा काढणार. मी एक फिल्ममेकर आहे. याबद्दल मी माझी उद्विग्न प्रतिक्रिया दिली होती. त्यावरून मोठा गदारोळ उठला. मी शेवटी माणूसच आहे. महाराष्ट्रातील मुलींच्या वडिलांना विचारा, ती बातमी पाहिल्यानंतर काय झाले असेल. येणाऱ्या काळात मी ‘देऊळ बंद’ या सिनेमाचे 11 भाग करणार आहे. त्यामुळे ‘देऊळ बंद’च्या पुढील एखाद्या भागात अशा नराधमांना चेचण्यासाठी स्वतः स्वामींनाच यावे लागेल. माझ्या सिनेमात कायदा-बियदा असं काही नसेल. कारण जेव्हा स्वामी शिक्षा द्यायला उतरतात, तेव्हा त्यांची शिक्षा भयानक असते. स्वामींनी तो प्रकार पाहिला असेल. त्यामुळे त्या नराधमांना असा मृत्यू येईल की पुन्हा कोणी असे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. जे सध्या चाललंय, ते अतिशय भयावह आहे. यानिमित्ताने मुलींच्या आई-वडिलांना आशेचा किरण देण्यासाठी असा चित्रपट बनवेन, ज्यात अशा नराधमांना असे मृत्यू दाखवले जातील की ते पाहून कोणीही असे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. ज्याप्रकारे ‘मुळशी पॅटर्न’नंतर शेतकऱ्यांच्या जमिनी धाकदपटशाहीने घेणं बंद झालं, त्याचप्रमाणे ‘मुळशी पॅटर्न’ने शेतकऱ्यांना खडबडून जाग केलं. आता अशा नराधमांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. या विषयाला वाचा फोडण्याचा मी प्रयत्न करेन. ‘देऊळ बंद 2’च्या टीझर प्रदर्शन सोहळ्यात, वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट येथे प्रवीण तरडे यांनी ही भावना व्यक्त केली.

Pravin Tarde : नसरापूर दुर्घटनेवर प्रवीण तरडे संतप्त; “अशा नराधमांना चेचणारा सिनेमा बनवणार” Read More »

img 20260507 wa0027

Matka King च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा: प्राइम व्हिडिओवर पुन्हा रंगणार मटक्याचा खेळ

Matka King : पहिल्या पर्वाच्या ऐतिहासिक यशानंतर, ज्याने प्रदर्शित झालेल्या आठवड्यात १७ देशांमध्ये पहिला क्रमांक मिळवला आणि ३७ देशांमध्ये अव्वल दहामध्ये स्थान पटकावले, प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे या गाजलेल्या मूळ मालिकेच्या दुसऱ्या पर्वाच्या निर्मितीची घोषणा केली आहे. प्राइम व्हिडिओ या भारतातील लोकप्रिय मनोरंजन व्यासपीठाने आज जाहीर केले की त्यांची गाजलेली मूळ नाट्यमालिका ‘मटका किंग’चे दुसरे पर्व सध्या निर्मिती प्रक्रियेत आहे. पहिल्या पर्वाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. १९६० च्या दशकातील वेगाने बदलणाऱ्या मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित या उच्च-दावांच्या नाट्यमालिकेने महत्त्वाकांक्षा, सत्ता आणि ओळख यांची कथा प्रभावी अभिनय आणि जिवंत कथनशैलीतून मांडत प्रेक्षकांशी घट्ट नाळ जोडली. पहिले पर्व गेल्या दोन वर्षांत या व्यासपीठावरील सर्वाधिक पाहिले गेलेले नवीन लिखित स्वरूपातील मालिका ठरले. प्रदर्शित झालेल्या पहिल्याच आठवड्यात ३७ देशांतील अव्वल दहामध्ये स्थान मिळवत १७ देशांमध्ये पहिला क्रमांक पटकावला. प्रेक्षकांकडून मिळालेल्या भरभरून प्रतिसादामुळे पुन्हा एकदा हे सिद्ध झाले की मातीतल्या आणि वास्तवाशी जोडलेल्या कथा भारतीय प्रेक्षकांच्या मनात खोलवर घर करतात. ‘मटका किंग’च्या पहिल्या पर्वाची निर्मिती आणि लेखन अभय कोराणे यांनी केले असून नागराज पोपटराव मंजुळे यांनी निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. रॉय कपूर फिल्म्स, आटपाट आणि एसएमआर एंटरटेनमेंट यांच्या बॅनरखाली सिद्धार्थ रॉय कपूर, नागराज पोपटराव मंजुळे, गार्गी कुलकर्णी, अश्विनी सिडवानी आणि आशीष आर्यन यांनी याची निर्मिती केली आहे. आठ भागांच्या या मालिकेत विजय वर्मा प्रमुख भूमिकेत असून त्यांच्यासोबत कृतिका कामरा, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, भूपेंद्र जदावत आणि गुलशन ग्रोवर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. तसेच भरत जाधव, गिरीश कुलकर्णी, जेमी लीवर, किशोर कदम, सायरस साहूकार, अर्पिता सेठिया, संभाजी तांगडे, इश्त्याक खान, संजीव जोतांगिया आणि सिमरन अश्विनी यांनी आपल्या प्रभावी अभिनयाने कथेला अधिक वास्तव आणि खोली दिली आहे. १७ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेले ‘मटका किंग’चे पहिले पर्व प्राइम व्हिडिओवर भारतासह जगभरातील २४० देश आणि प्रदेशांमध्ये विशेष स्वरूपात पाहण्यासाठी उपलब्ध आहे. मटक्याचा खेळ अजून संपलेला नाही आणि बृज भाटीचे राज्यही कायम आहे. ‘मटका किंग’च्या दुसऱ्या पर्वात खरे डाव सुरू होणार आहेत.

Matka King च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा: प्राइम व्हिडिओवर पुन्हा रंगणार मटक्याचा खेळ Read More »

Bigg Boss Marathi : तन्वी कोलते ठरली “बिग बॉस मराठी सिझन 6”ची महाविजेती !

Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठी सिझन ६ ची धमाकेदार सुरुवात तीन महिन्याआधी कलर्स मराठी वाहिनीवर झाली. बिग बॉस मराठी सिझन ६ देखील महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचला आणि कानाकोपर्‍यात फक्त याच कार्यक्रमाची चर्चा सुरू झाली. बिग बॉस मराठीच्या या सिझनमध्ये सदस्य १०० दिवसं कॅमेरांच्या नजरकैदेत राहिले. या घराने आणि महाराष्ट्राने सदस्यांमधील भांडणं, वाद-विवाद, मैत्री, भावनांचे उतार-चढाव आणि नात्यांचे बदलते रंग पाहिले. आता अखेर हा शंभर दिवसांचा रोमांचक प्रवास आज संपन्न झाला. बिग बॉस मराठी सिझन ६ चा महाअंतिम सोहळा नुकताच मुंबईमध्ये पार पडला. सदस्य आणि प्रेक्षक सगळ्यांनाच उत्सुकता होती या पर्वाचा विजेता कोण असेल हे जाणून घेण्याची. ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पहात होता तो क्षण शेवटी आला. सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मने जिंकत घराघरांत पोहोचलेल्या या पर्वाचा भव्य समारोप होत, तन्वी कोलते हिने आपल्या दमदार आणि सातत्यपूर्ण खेळाच्या जोरावर ‘महाविजेती’चा मान पटकावला. अंतिम क्षणापर्यंत कायम असलेल्या उत्कंठेनंतर विजेतेपदाची घोषणा होताच संपूर्ण वातावरण जल्लोषात न्हाऊन निघालं. विजेत्याला कलर्स मराठीकडून तब्बल १५ लाख धनराशी आणि ट्रॉफी देण्यात आली. विजेत्याला मिळणार आहे. पु. ना. गाडगीळ आणि सन्स तर्फे तब्बल १० लाख रुपयांचं वाउचर…रेवा डायमंडच्या सर्टिफाईड नॅचरल डायमंड ज्वेलरी खरेदीसाठी. तुनवाल ई मोटर्स ची लिथीनो प्रो ही ई बाईक देण्यात येणार आहे. रितेश देशमुख यांच्याकडून आणि राज शिवाजी चित्रपटाच्या टीमकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुंदर फोटो देण्यात आला. या घराने गेल्या १०० दिवसांत प्रत्येक भावनेचा साक्षीदार होत अनेक रंग दाखवले कधी मैत्रीची घट्ट नाती जुळताना पाहिली, तर कधी त्याच नात्यांमध्ये कटुता येताना अनुभवली. सदस्यांचे रडणं–हसणं, तक्रारी, मतभेद आणि स्पर्धेची धग यामुळे प्रत्येक दिवस नवा वाटत गेला. कॅमेरांच्या नजरकैदेत प्रत्येकाचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आला. या सगळ्या प्रवासात तन्वीने आपल्या रोखटोक बोलण्याने, जिद्दीने आणि ठाम मताने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आणि प्रेक्षकांचा विश्वास जिंकला. Executive Vice President, Marathi Cluster‘ Jiostar, सतीश राजवाडे म्हणाले, “बिग बॉस मराठी सिझन ६’ अनोख्या थीमसह सुरू झाला आणि सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवले. या सिझनमध्ये सदस्यांसाठी दार उघडलं आणि नशिबाचा खेळही पालटला एका मागून एक सरप्राइजेस, अनपेक्षित ट्विस्ट्स, नात्यांचे बदलते रंग आणि प्रत्येक क्षणाला नव्या आव्हानांचा सामना करत हा १०० दिवसांचा प्रवास भावनांनी, संघर्षांनी आणि जिद्दीने परिपूर्ण ठरला. या पर्वाला महाराष्ट्राचं भरभरून प्रेम लाभलं आणि प्रत्येक स्पर्धकाने आपल्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी छाप उमटवली. तन्वी कोलतेने सातत्य, प्रामाणिकपणा आणि प्रेक्षकांशी जोडलेलं नातं यांच्या जोरावर ‘महाविजेती’ हा मान पटकावला. हा शेवट नाही, तर नव्या प्रवासाची सुरुवात आहे.” विजेती ठरल्यानंतर भावना व्यक्त करताना तन्वी कोलते म्हणाली, “हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आणि शिकवणारा ठरला. या घराने मला स्वतःला ओळखायला शिकवलं, प्रत्येक परिस्थितीत ठाम राहायला शिकवलं. प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम आणि पाठिंबा हीच माझी खरी ताकद आहे. हा विजय मी माझ्या कुटुंबाला आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला समर्पित करते. मला सगळे घरात बोलत होते विचारत होते काय काम केलंस, काय नावं तेव्हा वाईट वाटायचे पण मी ठरवलं होतं या घरातून बाहेर पडेन तेव्हा सगळ्यांच्या तोंडी माझंच नावं असेल. बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केले आहे, आले होते तन्वी कोलते म्हणून जाते आहे तन्वी कोलते हा ब्रॅण्ड बनून”. असं म्हणता म्हणता, भावना, जिद्द आणि मनोरंजनाचा संगम असलेला हा प्रवास एका अविस्मरणीय टप्प्यावर येऊन पूर्ण झाला. ‘बिग बॉस मराठी सिझन ६’ने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मनात आपली वेगळी छाप उमटवत या पर्वाची दिमाखदार सांगता केली.

Bigg Boss Marathi : तन्वी कोलते ठरली “बिग बॉस मराठी सिझन 6”ची महाविजेती ! Read More »

img 20260330 wa0006

Siddharth Jadhav : हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’चा हाऊसफुल प्रयोग ; अभिनेता सिद्धार्थ जाधव यांची उपस्थिती

Siddharth Jadhav : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित ‘दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळा’च्या उपक्रमांतर्गत शनिवारी २८ मार्च २०२६ रोजी “हजार वेळा शोले पाहिलेला माणूस” या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन पार पडले. या चित्रपटाचे हे पहिलेच सार्वजनिक प्रदर्शन असल्याने चित्रपटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली. या प्रदर्शनावेळी चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते सिद्धार्थ जाधव यांच्यासह राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि चित्रपटाचे रंगभूषाकार श्रीकांत देसाई उपस्थित होते. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी या मान्यवरांचे स्वागत केले. हा चित्रपट हाऊसफुल ठरला असून प्रेक्षकांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सप्टेंबर २०२५ पासून या उपक्रमांतर्गत दरमहा एक चित्रपट दाखवण्यात येत असून रसिकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ चित्रपटाविषयी हृषीकेश गुप्ते दिग्दर्शित ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ हा चित्रपट एक बहुचर्चित मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, दिलीप प्रभावळकर आणि सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात एका ग्रामीण भागातील माणसाच्या संघर्षाची आणि स्वप्नांची कथा आहे. त्याच्यावर ‘शोले’ या चित्रपटाचा प्रभाव असून तो हा चित्रपट हजार वेळा पाहतो. सामाजिक, प्रेरणादायी आणि चित्रपटप्रेमीच्या भावविश्वावर आधारित अशी या चित्रपटाची मांडणी आहे.

Siddharth Jadhav : हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’चा हाऊसफुल प्रयोग ; अभिनेता सिद्धार्थ जाधव यांची उपस्थिती Read More »

salim khan

Salim Khan Hospitalized : सलीम खान यांची प्रकृती बिघडली रुग्णालयात दाखल; कारण काय?

Salim Khan Hospitalized : अभिनेता सलमान खान याचे वडील आणि ज्येष्ठ लेखक सलीम खान यांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी सकाळी सलीम यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. वृद्धापकाळाशी संबंधित आरोग्य समस्यांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. 90 वर्षीय सलीम खान यांनी बॉलीवूडमध्ये शोले आणि जंजीर सारख्या अनेक प्रतिष्ठित चित्रपटांच्या कथा लिहिल्या आहेत.  तर दुसरीकडे एका अहवालानुसार अभिनेता सलमान खानने सर्व कार्यक्रम रद्द केले असून तो वडिलांना भेटण्यासाठी तातडीने रुग्णालयात दाखल झाला आहे. खान कुटुंबाकडून अद्याप या प्रकरणाबाबत कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. सलीम खान यांची प्रकृती बिघडणे ही चाहत्यांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. सोशल मीडियावरील अनेक चाहते त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.  सलमान खान रुग्णालयात दाखल सलमान खानचा हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाचा व्हिडिओ काल रात्री उशिरा समोर आला. वडिलांच्या प्रकृतीबद्दल कळताच सलमान रुग्णालयात पोहोचला. तेव्हापासून तो रुग्णालयातच आहे. कुटुंबातील इतर सदस्यही नियमितपणे हॉस्पिटलमध्ये येत आहेत. यामध्ये अरबाज खान, शौरा खान, हेलेन आणि सलमा खान तसेच त्यांच्या मुली अलविरा, अर्पिता आणि तिचा पती अतुल अग्निहोत्री आणि आयुष शर्मा यांचा समावेश आहे. या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या कथा लिहिल्या पटकथा लेखक म्हणून, सलीम खानच्या लेखणीने हिंदी चित्रपटसृष्टीत असंख्य ब्लॉकबस्टर कथा निर्माण केल्या आहेत. जावेद अख्तर यांच्यासोबत त्यांनी जवळजवळ दोन डझन चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. त्यांच्या लोकप्रिय चित्रपटांची नावे अशी आहेत: सीता और गीता, शोले, डॉन, दीवार, जंजीर, हाथ मेरे साथी, मिस्टर इंडियाचा समावेश आहे.

Salim Khan Hospitalized : सलीम खान यांची प्रकृती बिघडली रुग्णालयात दाखल; कारण काय? Read More »

ranpati shivray swari agra

Ranpati Shivray Swari Agra : प्रतीक्षा संपली! ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ‘या’ दिवशी चित्रपटगृहात येणार

Ranpati Shivray Swari Agra : शौर्य, जिद्द आणि चातुर्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी असंख्य समस्यांवर मात करत स्वराज्याची स्थापना केली. असामान्य नियोजन कौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोठमोठ्या शत्रूंना धूळ चारली. औरंगजेबासारख्या शत्रूला छत्रपती शिवाजी महाराज पुरून उरले. आग्रा भेट ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वगुणांचा, स्वाभिमानाचा आणि राष्ट्रनिष्ठेचा जाज्वल्य इतिहास ठरली. हाच प्रेरणादायी इतिहास ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाच्या रूपाने मराठी रुपेरी पडद्यावर येतो आहे. पॅनोरमा स्टुडिओज, मुगाफी निर्मित आणि दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ६ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. महाराजांना स्वराज्य निर्मितीच्या कामात अनेकदा जीवावर बेतेल, अशा अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण, अखंड सावध राहून महाराजांनी त्यावर मात केली. ‘आग्रा स्वारी’ नेमकी कशी झाली, शिवरायांनी त्याचे नियोजन नेमके कसे केले हे दाखवतानाच औरंगजेबासारखा अत्यंत दगाबाज, कपटी बादशहाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले आव्हान याचा रोमांचकारी थरार या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या आग्रा भेटीतून छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले की केवळ बळावर नव्हे, तर बुद्धी आणि नियोजनावर विजय अवलंबून असतो. ‘पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे.  कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक (पॅनोरमा स्टुडिओज), विपुल अग्रवाल, जेनील परमार (मुगाफी), मुरलीधर छतवानी (पॅनोरमा स्टुडिओज) चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते रवींद्र औटी (पॅनोरमा स्टुडिओज), तान्शा बत्रा, आलोक शर्मा (मुगाफी) आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे. मृणाल कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, दिग्पाल लांजेकर, स्मिता शेवाळे, पुनीत इस्सार, विराजस कुलकर्णी, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, योगेश सोमण, अक्षय वाघमारे, बिपीन सुर्वे, ऋषी सक्सेना, नुपूर दैठणकर, सचिन देशपांडे, अमिषा ठाकूर, अभिलाष चौधरी, अयन कर्णे, अमित देशमुख, अभ्यंग कुवळेकर, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, भूषण शिवतारे, संकेत ओक कलाकारांच्या भूमिका चित्रपटात आहेत. चित्रपटाचे कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज, संजय करोले यांचे आहे. पटकथा आणि संवाद दिग्पाल लांजेकर यांचे आहेत. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. गीते जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज, दिग्पाल लांजेकर यांची असून संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, मयूर राऊत यांनी सांभाळली आहे. पार्श्वसंगीत  मयूर राऊत यांचे आहे. ध्वनी संयोजन निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर (नॉइज स्टोरीज) यांनी केले आहे.  रंगभूषा अतुल मस्के तर वेशभूषा रोहिणी सालेकर यांची आहे. कार्यकारी निर्माती केतकी पार्थ अभ्यंकर आहेत. क्रिएटिव्ह प्रोड्युसर अर्जुन मोगरे  आहेत. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. नृत्यदिग्दर्शनाची  जबाबदारी  समित साळुंखे, अनुराधा गव्हाणे साळुंखे  यांनी सांभाळली आहे. पॅनोरमा स्टुडिओज ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचे जगभरात (वर्ल्ड वाईड) वितरण करणार आहे.

Ranpati Shivray Swari Agra : प्रतीक्षा संपली! ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ‘या’ दिवशी चित्रपटगृहात येणार Read More »

img 20260126 wa0005

Lagnacha Short : ‘लग्नाचा शॉट’ रिलीजसाठी सज्ज! ‘रेशमी बंध’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Lagnacha Short : मराठी चित्रपटसृष्टीत लव्हस्टोरीचा नवा रंग भरण्यासाठी आगामी चित्रपट ‘लग्नाचा शॉट’ सज्ज झाला असून चित्रपटातील अभिजीत आमकर व प्रियदर्शिनी इंदलकर या नव्या जोडीची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. आता या चित्रपटातील ‘रेशमी बंध’ हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात या फ्रेश जोडीची केमिस्ट्री पाहायला मिळते. प्रदर्शित होताच या गाण्याने आपल्या हळव्या सुरांमुळे आणि मनाला भिडणाऱ्या दृश्यांमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘रेशमी बंध’ या गाण्यात अभि आणि कृतिका यांच्या प्रेमकथेची सुरुवात उलगडताना पाहायला मिळते. निसर्गरम्य वातावरणात उमलणारं त्यांचं नातं, नजरेतून व्यक्त होणारी ओढ आणि एकमेकांच्या सहवासात वाढणारी जवळीक या गाण्यात अत्यंत सौम्य आणि भावस्पर्शी पद्धतीने मांडण्यात आली आहे. निसर्गसौंदर्यात या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आल्यामुळे हे गाणं अधिकच लक्षवेधी ठरत आहे. या गाण्याचं संगीत आणि गीतलेखन प्रविण कोळी आणि योगिता कोळी यांनी केलं असून, केवल वाळंज आणि स्नेहा महाडिक यांच्या मधुर स्वरांनी गाण्यात अधिकच रंगत आणली आहे. दिग्दर्शक अक्षय गोरे म्हणतात, “ ‘रेशमी बंध’ हे गाणं अभि आणि कृतिकाच्या नात्याची पहिली ओळख आहे. ज्यात त्यांच्या खुलणाऱ्या प्रेमाची झलक पाहायला मिळते. अभि-कृतिकाची केमिस्ट्री, आजूबाजूचे निसर्गसौंदर्य व गाण्याचे सुमधूर संगीत यामुळे प्रेक्षकांना हे गाणे नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.” महापर्व फिल्म्स निर्मित आणि जिजा फिल्म कंपनी यांच्या सहयोगाने साकारलेल्या ‘लग्नाचा शॉट’ या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अक्षय गोरे यांनी केले आहे. गीत-संगीताची धुरा प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी सांभाळली असून अक्षय महादेव गोरे, विजय महादेव गोरे, अभिषेक उत्कर्ष कोळी आणि सुरेश मगनलाल प्रजापती हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात प्रियदर्शिनी इंदलकर, अभिजीत आमकार, प्रभाकर मोरे, अभिजीत चव्हाण, राजन ताम्हाणे, लीना पंडित, संजय कुलकर्णी, विजय पवार, मनोहर जाधव, संजीवनी पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Lagnacha Short : ‘लग्नाचा शॉट’ रिलीजसाठी सज्ज! ‘रेशमी बंध’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला Read More »

ek naata asahi

Ek Naata Asahi : पनवेल मध्ये रंगणार “एक नातं असंही” नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग

Ek Naata Asahi : सद्यस्थितीवर भाष्य, नात्यातली गुंतागुंत, थोडसं हशा पिकवणार, सामाजिक गांभीर्य असणारा विषय, नात्यात होणारे गैरसमज, व्यक्ती व्यक्तीतला फरक, समाजात असणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींचे वेगवेगळे स्वभाव गुणधर्म, थोडीशी कॉमेडी थोडं सिरीयस असा सगळा मालमसाला असलेलं एक नाटक सध्या व्यावसायिक रंगभूमीवर आहे. ज्याचं नाव आहे “एक नातं असंही” आहे. हे दोन अंकी नाटक प्रत्येकाच्या आयुष्यावर किंबहुना नात्यावर प्रकाश टाकणार असे असून या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग येत्या 31 जानेवारीला वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे संपन्न होणार आहे. “एक नातं असंही” या नाटकाची निर्मिती शिवाय मेघा या निर्मिती संस्थेने केली असून अभिजीत भालेराव हे या नाटकाचे निर्माते आहेत. नाटकाचे लेखन विस्मय दिपक कासार यांनी केलेले असून दिग्दर्शन दर्शन सिद्धार्थ घोलप यांचे आहे. या नाटकात अभिनेत्री मृण्मयी सुपल, विस्मय कासार, मोहिनी, प्रवीण भाबल, राजस वैद्य, तन्वी महाडिक, सुजल दळवी या कलाकारांच्या भूमिका आहेत. नाटकाचे संगीत रुपेश मोहन जाधव यांचे तर प्रकाश योजना निखिल मारणे यांची आहे. या नाटकात काव्याच्या भूमिका अभिनेत्री मृण्मयी सुपलने साकारली असून आजवर अनके मालिका आणि चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. या नाटकाच्या निमित्ताने मृण्मयीने पहिल्यांदाच व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले आहे. नाटकाच्या शीर्षकावरूनच हे नाटक एका नात्याची गोष्ट सांगणार असल्याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. मुंबईच्या एका कॉलनीत एखाद्या सामान्य कुटुंबाप्रमाणेच “देशमुख कुटुंब” राहत असतं. आई, वडील, भाऊ, बहीण या सर्वजणांनी भरलेलं असं एक सुखी कुटुंब. कार्तिक आणि काव्या या भावा बहिणीच्या नात्यावर या नाटकाची कथा आधारित आहे. अचानक एक दिवशी देशमुख कुटुंबावर खूप मोठ संकट कोसळतं. कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपत. कार्तिक मोठा असल्याने घरची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर येते, त्याला गायक व्हायचं असतं पण एकंदरीत परिस्थिती पाहता गायक होण्याचे स्वप्न तो सोडून देतो आणि बहिणीचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून एका कंपनीत नोकरी करतो. आपल्याला सांभाळणार या जगात एकमेकांशिवाय कोणीच नाही याची त्या दोघांनाही जाणीव असल्यामुळे ते दोघे एकमेकाची काळजी घेतात. दोघेही आता दुःखातून सावरून एकमेकाला सांभाळत असतात. पुढे काव्याच्या आयुष्यात एक मुलगा येतो त्याच्या येण्याने कार्तिक आणि काव्याच्या नात्यात दुरावा निर्माण होतो की संबंध चांगले राहतात? एका भावाने बहिणीसाठी आपल्या गायक होण्याच्या स्वप्नाला बाजूला ठेवून केलेल्या त्याग्याची जाणीव बहिणीला राहते का? याची रंजक गोष्ट या नाटकातून आपल्याला पहायला मिळणार आहे. आजच्या पिढीसाठी नाती जपणं म्हणजे फक्त स्टेटस, रील्स किंवा मेसेजपुरतं मर्यादित न राहता, भावनिक समज, आपुलकी, संयम आणि जबाबदारी यांचा अर्थ काय असतो, ते “एक नातं असंही” या नाटकातून प्रभावीपणे अनुभवता येतं. हे नाटक नात्यांच्या मुळाशी जाऊन आपल्याला आरसा दाखवतं आपण कुठे आहोत आणि कुठे जायला हवं, याची जाणीव करून देतं. आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल जगात नाती आणि संस्कार यांचं खरं मोल समजून घ्यायचं असेल, तर “एक नातं असंही” हे नाटक प्रेक्षकांनी नक्की पाहावं असे अभिनेत्री मृण्मयी सुपलने सांगितले . आजच्या जगात जपण्यासारख्या खूप कमी गोष्टी उरल्या आहेत, आपण नेहेमी फक्त त्याच गोष्टी जपतो ज्या आपल्या साठी खास असतात, “एक नातं असंही” हे नाटक सुद्धा तसंच आहे एका सामान्य नात्याची असामान्य गोष्ट म्हणजे हे नाटक आहे, त्याच बरोबर आपल्याला विचार करायला भाग पाडणार आहे, कसं ते जाणून घेण्यासाठी हे नाटक तुम्ही नक्की पाहा असे या नाटकाचा लेखक आणि अभिनेता विस्मय कासार याने आवर्जून नमूद केले.

Ek Naata Asahi : पनवेल मध्ये रंगणार “एक नातं असंही” नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग Read More »

seema anand

Who is Seema Anand : सीमा आनंद Google वर सर्वाधिक सर्च होणारी भारतीय महिला; नेमकं कारण काय?

Who is Seema Anand  : गेल्या काही दिवसांपासून भारतात सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चेत असलेला नाव म्हणजे सीमा आनंद. सीमा आनंद काहींना काही कारणाने सोशल मीडियावर चर्चेत आहे. तर ती आता गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या भारतीय महिलांपैकी एक बनली आहे. काही दिवसांपुर्वी तिचे काही एआय-जनरेटेड, आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाले होते, त्यानंतर तिने या प्रकरणात एफआयआर दाखल केला आणि डिजिटल छळाच्या सामान्यीकरणाविरुद्ध बोलले. जर तुम्हाला तिच्याबद्दल माहिती नसेल तर जाणून घ्या सीमा आनंद कोण आहे? सीमा आनंद कोण आहे? सीमा आनंद एक लेखिका, व्यावसायिक कथाकार आणि पौराणिक कथा तज्ञ आहे. ती मानसशास्त्र आणि कामसूत्र सारख्या प्राचीन भारतीय ग्रंथांवर आधारित नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्यावर चर्चा करते. सीमा आनंद अलिकडच्या काळात, विशेषतः तरुण पिढीमध्ये वाढत्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहे. ती सोशल मीडियावर नातेसंबंध, जवळीक आणि स्वतःवर प्रेम यासारख्या विषयांवर उघडपणे सल्ला देते. तिच्याविरुद्ध डिजिटल छळाचा एक खटला उघडकीस आल्यानंतर तिला आणखी लक्ष वेधले गेले. तिने या छळाविरुद्ध कडक भूमिका घेतली आणि पोलिस तक्रार दाखल केली. या वयात तिच्या धाडसी कृतीने आणि आत्मविश्वासाने लाखो लोकांची मने जिंकली. ती अनेकदा तिच्या व्हिडिओंमध्ये म्हणते की वय हे फक्त एक संख्या आहे आणि ती स्वतःच्या मुळांशी आणि संस्कृतीशी जोडून आधुनिक समस्यांवर उपाय शोधण्यावर विश्वास ठेवते.  सीमा आनंद पुस्तके सीमा आनंद यांनी “द आर्ट्स ऑफ सेडक्शन” आणि अलिकडेच “स्पीक इझी” सारखी लोकप्रिय पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकांमध्ये, ती प्राचीन भारतीय ज्ञानाचा वापर करून नातेसंबंधांमध्ये संवाद आणि आदराचे महत्त्व स्पष्ट करते. “द आर्ट ऑफ सेडक्शन” वरील तिचा टेड टॉक लाखो वेळा पाहिला गेला आहे. 

Who is Seema Anand : सीमा आनंद Google वर सर्वाधिक सर्च होणारी भारतीय महिला; नेमकं कारण काय? Read More »

img 20260115 wa0012

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांकडून सर्वोत्तम अभिनेते म्हणून रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांची निवड

Devendra Fadnavis: समकालीन हिंदी चित्रपटसृष्टीची नाडी ओळखणाऱ्या एका स्पष्ट आणि मनमोकळ्या संवादात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बॉलीवूडमधील आपल्या सध्याच्या आवडत्या अभिनेत्यांची नावे सांगितली. आजच्या काळात कोणते अभिनेते पाहायला आवडतात, असे विचारले असता फडणवीस म्हणाले, “सध्याच्या अभिनेत्यांमध्ये मला रणबीर कपूर आवडतो, रणवीर सिंगही आवडतो. मात्र माझ्या ऑल टाइम फेव्हरेटमध्ये आजही अमिताभ बच्चन जी आणि विनोद खन्ना जीच आहेत.” रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांचा उल्लेख सध्या विशेष महत्त्वाचा ठरतो. रणवीर सिंग सध्या धुरंधर या चित्रपटासाठी प्रचंड प्रशंसा मिळवत आहे. प्रेक्षक आणि समीक्षक दोघेही त्याच्या प्रभावी स्क्रीन प्रेझेन्स आणि रूपांतरकारी अभिनयाचे भरभरून कौतुक करत आहेत. “हमझा फिव्हर” सध्या चर्चेत असून, त्यामुळे धुरंधर 2 बद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. एका भाषेत—हिंदीत—८५० कोटी रुपयांहून अधिक कमाई करणारा तो एकमेव अभिनेता ठरला असून, या पिढीतील सर्वोत्तम आणि श्रेष्ठ अभिनेता म्हणून त्याने आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. दुसरीकडे, रणबीर कपूरने काही वर्षांपूर्वी अ‍ॅनिमल चित्रपटातील आपल्या स्फोटक अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती आणि त्याला प्रचंड प्रेम व प्रशंसा मिळाली होती. आता चाहते अ‍ॅनिमल पार्कच्या माध्यमातून त्या सिनेमॅटिक विश्वाचा आणखी विस्तार पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांसारख्या दिग्गज कलाकारांची नावे घेत फडणवीस यांनी पिढ्यांमधील एक सुंदर दुवा निर्माण केला आहे—एकीकडे कालातीत महान कलाकारांचा सन्मान करत, तर दुसरीकडे हिंदी चित्रपटसृष्टीचे भविष्य घडवणाऱ्या समकालीन कलाकारांचेही त्यांनी कौतुक केले आहे.

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांकडून सर्वोत्तम अभिनेते म्हणून रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांची निवड Read More »