DNA मराठी

मनोरंजन

raj thackeray

Raj Thackeray: महाराष्ट्राच्या वाट्याला काय? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे आक्रमक

Raj Thackeray: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा यंदा राजधानी दिल्लीऐवजी गुजरातमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळासह चित्रपटसृष्टीतही चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत महाराष्ट्राच्या योगदानाचा मुद्दा उपस्थित केला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या इतिहासात प्रथमच हा सोहळा दिल्लीबाहेर होणार आहे. यंदाचा 72 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा 22 सप्टेंबर 2026 रोजी गुजरातमधील एकता नगर येथे, स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरात होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. नेमकं काय म्हणाले राज ठाकरे ? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या 72 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हे पुरस्कार देशाच्या राजधानीच्या दिल्ली शहरातून हलवून गुजरातमध्ये केवाडिया येथे होणार आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीचं, मुंबई शहराचं महत्व संपवण्याचा खटाटोप एकीकडे सुरू असताना दुसरीकडे देशाच्या राजधानीचं जे महत्व आहे ते हळूहळू संपवण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. मुळात हा पुरस्कार सोहळा हलवण्याचं कारण काय ? स्वतःला काही निर्माण करता आलं नाही की बदल नावं, बदल स्थळं आणि यातून भ्रामक इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे असं दिसतंय. बरं कधी ना कधी आता उरलो गुजरातपुरते अशी आपली गत होणार याची खात्रीच वाटत असल्यामुळे किमान तिकडे तरी माहात्म्य निर्माण करून घेऊ हा अट्टाहास सध्या केंद्रातील 2 सत्ताधीशांचा दिसतोय. बरं समजा पुरस्कार सोहळ्याचं स्थळ हलवायचं होतं तर ते मुंबईत का नाही आणलं? ज्या दादासाहेब फाळकेंनी भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घातला त्या राज्यात का नाही पुरस्कार वितरण ? किंवा देशात सगळ्यात जास्त सिनेमे महाराष्ट्र आणि दक्षिणेतील तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा येथे घडवले जातात यापैकी कुठल्या राज्यात हा सोहळा का नाही ? दक्षिणेत तर सिनेमांनी तिथल्या राजकारणाला आकार दिला आहे. गुजरातच का ? या आधी देशात अनेक पंतप्रधान होऊन गेले, ज्यांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेली राज्य त्यांनी ओढूनताणून मोठी करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. इथे कॉमनवेल्थ स्पर्धा गुजरातमध्ये, 2023 च्या क्रिकेट वल्डकपचा अंतिम सामना गुजरातमध्ये, बाहेरून राष्ट्राध्यक्ष आले त्यांना गुजरातमध्ये घेऊन जायचं, गिफ्ट सिटी मुंबईतून गुजरातमध्ये न्यायची. या सगळ्यातून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना काय दाखवायचं आहे की या देशाच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा पाळणा हा गुजरातमध्ये हलला ? आज जो देश उभा आहे तो कित्येक पिढ्यांच्या त्यागातून आणि देशातील प्रत्येक प्रांताच्या योगदानातून उभा आहे. यांना गुजरातपलीकडचा देश फक्त आठवतो त्या त्या राज्यात निवडणुका आल्या की. मग तिकडे जाऊन तिथले कपडे घालून भाषणं करून, माझं कसं या राज्याशी जुनं नातं आहे सांगून मतं मिळवायची एवढंच जमतं का ? सध्याचे सत्ताधीश ‘कलासक्त’ नाहीत हे माहित आहे. कशाही निवडणुका जिंकायच्या ही एकमेव कला आणि त्यासाठी सगळ्यांवर सक्ती इतकाच यांचा ’कलासक्त’पणाशी संबंध. आणि चित्रपटांशी संबंध म्हणाल तर वाट्टेल ते प्रचारकी सिनेमे बनवून घ्यायचे आणि त्यांना पुरस्कार द्यायला लावायचे इतकाच संबंध. बरं या सगळ्याला दक्षिणेतील इतर सिनेमाप्रेमी राज्य कडाडून विरोध करतील, पण महाराष्ट्रात काहीही घडणार नाही. पण कलाकारांनी या विरोधात आवाज उठवायला हवा. मुद्दा केवाडिया किंवा इतर शहर हा नाही, देशाच्या राजधानीत या पुरस्कराची जी उज्वल परंपरा आहे ती का मोडली जात आहे यावर कलाकारांनी बोललं पाहिजे. नाहीतर उद्या गुजरातमधली स्थळं नसतील तर राष्ट्रीय पुरस्कार नाही असा फतवा पण हे लोकं काढतील. ऑस्कर सोहळा लॉसएंजलिसला होतो . ट्रम्प किंवा बुश किंवा ओबामा यांनी आपल्या राज्यात हा सोहळा नेला नाही. माझी गुजराती बांधवाना विनंती आहे की तुम्ही यांच्या नादी लागून उगाच वाहवत जाऊ नका. आपल्या भाषिक नेत्यांची सत्ता आहे याच्या ज्या गुदगुल्या होत आहेत, त्या सत्ता गेली की अस्वलाच्या गुदगुल्या होतील. भारतातील इतर प्रांतांचे नागरिक आणि नेते आपल्या राज्यांवर, तिथल्या व्यावसायिकांवर काय अन्याय झाला याचा हिशेब ठेवतील. या विषयाला आम्ही वाचा फोडूच पण देशातील समस्त कलाकारांनी पण भूमिका घ्यायला हवी. सरकारच्या स्तुतीची गीतं गायला सांगितली की ती लगेच गायला सुरुवात केल्यामुळे आजची ही वेळ आली आहे. त्यामुळे सर्वांनी याविरोधात भूमिका घ्यायलाच हवी. आणि महाराष्ट्र आणि दक्षिणेतील राज्यांनी जर कणखर भूमिका नाही घेतली तर या दख्खन प्रांताची जी ओळख आणि अस्मिता आहे त्यावरच हे वरवंटा फिरवतील आणि तेंव्हा वेळ निघून गेली असेल.

Raj Thackeray: महाराष्ट्राच्या वाट्याला काय? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे आक्रमक Read More »

nikki tamboli

Nikki Tamboli : निक्की तांबोळी-अरबाज पटेलचं ‘फेक ब्रेकअप’! ट्रोलिंगनंतर निक्कीचा संताप, म्हणाली- ‘बहती गंगा में सबने हाथ धोया, पण…’

Nikki Tamboli : ‘बिग बॉस मराठी 5’मधून चर्चेत आलेली अभिनेत्री निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांपासून दुरावल्याचे संकेत दिले होते. एकमेकांना अनफॉलो करणे, भावनिक पोस्ट आणि फसवणुकीशी संबंधित संकेत यामुळे दोघांचं नातं संपल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आता या संपूर्ण ‘ब्रेकअप’मागचं कारण समोर आलं असून, हे सगळं त्यांच्या नव्या म्युझिक व्हिडिओच्या प्रमोशनसाठी केलेलं पीआर होता. या खुलाशानंतर निक्की आणि अरबाजला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. चाहत्यांची दिशाभूल केल्याचा आरोप होत असतानाच निक्की तांबोळीने आता ट्रोलर्सना थेट प्रत्युत्तर दिलं आहे. सोशल मीडिया स्टोरीच्या माध्यमातून तिने आपली नाराजी व्यक्त करत, या संपूर्ण प्रकाराकडे ‘मार्केटिंग’ म्हणून पाहण्याचं आवाहन केलं आहे. नेमकं काय झालं होतं? निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांची जवळीक ‘बिग बॉस मराठी 5’च्या घरात वाढली होती. शोदरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि शो संपल्यानंतरही त्यांचं नातं कायम असल्याचं दिसून आलं. दोघेही अनेकदा एकत्र दिसत होते आणि सोशल मीडियावरही एकमेकांसोबतचे फोटो व व्हिडिओ शेअर करत होते. अलीकडे मात्र अचानक दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं. त्यानंतर अरबाजने विश्वासघात आणि ‘चीटिंग’शी संबंधित एक भावनिक पोस्ट शेअर केली. या पोस्टचा रोख निक्कीकडे असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला. निक्कीनेही त्यानंतर एक गूढ पोस्ट केल्याने ब्रेकअपच्या चर्चांना आणखी हवा मिळाली. मात्र, त्या वेळी दोघांनी अधिकृतपणे ब्रेकअप झाल्याचं स्पष्ट केलं नव्हतं. सोशल मीडियावरील पोस्ट आणि दोघांच्या वागण्यात झालेला बदल पाहून अनेक चाहत्यांनी हे नातं तुटल्याचं गृहीत धरलं. काही चाहत्यांनी निक्कीला ट्रोल करण्यास सुरुवात केली, तर काहींनी अरबाजच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत त्याला पाठिंबा दिला. निक्कीने स्वतःला ‘सिंगल’ संबोधल्याची चर्चा आणि तिच्या भावनिक पोस्टमुळेही या प्रकरणाला अधिक रंग चढला होता. त्यामुळे हे प्रकरण केवळ सोशल मीडिया चर्चेपुरतं राहिलं नाही, तर मनोरंजन विश्वातही त्याची मोठी चर्चा झाली. अखेर समोर आलं ‘फेक ब्रेकअप’चं सत्य मात्र, म्युझिक व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणामागील कारण स्पष्ट झालं. निक्की आणि अरबाज यांचा नवीन म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झाला असून, त्याच्या प्रमोशनसाठी दोघांनी ब्रेकअपचा सीन तयार केल्याचं समोर आलं. निक्कीने सांगितलं की, हे सगळं निर्मात्यांच्या प्लॅनचा भाग होतं. कलाकार म्हणून त्यांना जे सांगितलं जातं, त्यानुसार काम करावं लागतं. मात्र, सोशल मीडियावरील लोकांनी आणि चाहत्यांनी हे ब्रेकअप खरं मानलं. इतकंच नाही तर त्यांच्याकडे या विषयावर फोनही येऊ लागले होते, असं निक्कीने सांगितलं. ट्रोलिंगनंतर निक्कीचा पारा चढला फेक ब्रेकअपचा खुलासा झाल्यानंतर मात्र दोघांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. चाहत्यांना भावनिक केल्याचा आणि प्रसिद्धीसाठी नात्याचा वापर केल्याचा आरोप सोशल मीडियावर करण्यात आला. या ट्रोलिंगनंतर निक्कीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ आणि त्यासोबत एक नोट शेअर केली. ट्रोलर्सना उद्देशून तिने अतिशय आक्रमक शब्दांत आपली भूमिका मांडली. निक्कीच्या म्हणण्यानुसार, लोकांनी या संपूर्ण प्रकरणावर रील्स बनवल्या, कथा तयार केल्या आणि त्यातून कंटेंट तयार केला. पण तिने मात्र याच चर्चेचा उपयोग स्वतःच्या गाण्याच्या प्रमोशनसाठी केला. ‘बहती गंगा में सबने हाथ धोया, पण ती गंगा मी तयार केली,’ अशा आशयाची प्रतिक्रिया देत तिने हा सगळा प्रकार मार्केटिंगचा भाग असल्याचं स्पष्ट केलं. ‘हीच तर मार्केटिंग आहे’, निक्कीचा दावा निक्कीने आपल्या पोस्टमधून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला की, सोशल मीडियावर निर्माण झालेल्या चर्चेचा फायदा तिच्या गाण्याला झाला. लोकांनी या कथित ब्रेकअपवर चर्चा केली, रील्स बनवल्या आणि वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट तयार केला. त्यामुळे म्युझिक व्हिडिओकडे मोठ्या प्रमाणात लक्ष वेधलं गेलं. निक्कीने हा प्रकार ‘मार्केटिंग’ असल्याचं सांगत, ट्रोलिंगलाही अप्रत्यक्षपणे आपल्या प्रमोशनचा भाग ठरवलं. दोन वर्षांपासून चर्चेत आहे निक्की-अरबाजचं नातं निक्की आणि अरबाज यांचं नातं ‘बिग बॉस मराठी 5’पासून चर्चेत आहे. रिअॅलिटी शोमध्ये दोघांची जवळीक वाढली आणि त्यानंतरही त्यांचं नातं कायम राहिलं. दोघे ‘द 50’ या शोमध्येही एकत्र दिसले. या शोदरम्यान अरबाजने निक्कीला लग्नासाठी प्रपोज केल्याचंही समोर आलं होतं. निक्कीनेही अरबाजसाठी आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाण्याची तयारी केल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल चाहत्यांमध्येही मोठी उत्सुकता होती. मग खरंच ब्रेकअप झालंय का? या सगळ्या प्रकारानंतर सर्वात मोठा प्रश्न हा आहे की निक्की आणि अरबाज खरंच वेगळे झाले आहेत की हा पूर्णपणे प्रमोशनल स्टंट होता? सध्या उपलब्ध माहितीनुसार, दोघांनी ज्या पद्धतीने ब्रेकअपचं वातावरण तयार केलं होतं, त्याचा संबंध त्यांच्या नवीन म्युझिक व्हिडिओच्या प्रमोशनशी असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, त्यांच्या वैयक्तिक नात्याची सद्यस्थिती याबाबत दोघांकडून स्वतंत्र आणि सविस्तर अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेलं नाही.

Nikki Tamboli : निक्की तांबोळी-अरबाज पटेलचं ‘फेक ब्रेकअप’! ट्रोलिंगनंतर निक्कीचा संताप, म्हणाली- ‘बहती गंगा में सबने हाथ धोया, पण…’ Read More »

awarapan 2

Awarapan 2 चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्याच दिवशी कमवले 22 कोटी

Awarapan 2 : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीच्या बहुप्रतीक्षित ‘आवारापन 2’ या चित्रपटाने अखेर 14 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रवेश केला आणि पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. तब्बल 19 वर्षांनंतर ‘शिवम पंडित’ या लोकप्रिय भूमिकेत इमरान हाश्मी पुन्हा मोठ्या पडद्यावर परतल्याने या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच मोठी उत्सुकता होती. त्याचा परिणाम आता बॉक्स ऑफिसच्या आकडेवारीतही दिसून येत आहे. पहिल्याच दिवशी 21 कोटींची कमाई उपलब्ध बॉक्स ऑफिस आकडेवारीनुसार, ‘आवारापन 2’ने भारतात पहिल्या दिवशी सुमारे 21 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. भारतातील ग्रॉस कलेक्शन सुमारे 25 कोटी रुपये असल्याचे वृत्त आहे. परदेशातील कमाई धरली तर चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे जागतिक ग्रॉस कलेक्शन जवळपास 27 कोटी रुपये झाले आहे. मात्र, विविध बॉक्स ऑफिस ट्रॅकर्सच्या आकडेवारीत थोडा फरक दिसत आहे. काही अहवालांमध्ये भारतातील पहिल्या दिवसाची कमाई 20 ते 22 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अंतिम अधिकृत आकडेवारीत किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे. इमरान हाश्मीच्या करिअरमधील सर्वात मोठी ओपनिंग ‘आवारापन 2’च्या या दमदार सुरुवातीचा सर्वात मोठा फायदा इमरान हाश्मीच्या रेकॉर्डला झाला आहे. हा चित्रपट त्याच्या करिअरमधील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. यापूर्वी इमरानच्या चित्रपटांना पहिल्या दिवशी अशी मोठी कमाई मिळालेली नव्हती. ‘आवारापन 2’ने या बाबतीत त्याच्या आधीच्या सर्व चित्रपटांना मागे टाकले आहे. विशेष म्हणजे 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या ‘आवारापन’ला सुरुवातीच्या काळात बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळाले नव्हते. मात्र, कालांतराने हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये कल्ट फिल्म म्हणून लोकप्रिय झाला. आता त्याच चित्रपटाच्या दुसऱ्या भागाला मिळालेली एवढी मोठी सुरुवात हा इमरान हाश्मीच्या चाहत्यांसाठी निश्चितच विशेष क्षण मानला जात आहे. ‘आवारापन’च्या जुन्या चाहत्यांचा फायदा ‘आवारापन 2’ला मिळालेल्या चांगल्या ओपनिंगमागे जुन्या चित्रपटाची लोकप्रियता हा महत्त्वाचा घटक मानला जात आहे. शिवम पंडित हे इमरान हाश्मीच्या कारकिर्दीतील लक्षात राहणारे पात्र आहे. त्यामुळे या पात्राला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. ट्रेलर, गाणी आणि प्रमोशनल कंटेंटमुळे चित्रपटाची चर्चा रिलीजपूर्वीच वाढली होती. सोशल मीडियावरही चित्रपटाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. यामुळे पहिल्या दिवसाच्या तिकीट विक्रीला चांगला फायदा झाल्याचे दिसते. ‘बटवारा 1947’ला दिली कडवी टक्कर 14 ऑगस्ट रोजीच सनी देओल आणि प्रीती झिंटा यांच्या ‘बटवारा 1947’ या चित्रपटाचाही थिएटरमध्ये प्रवेश झाला. त्यामुळे या दोन चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर थेट स्पर्धा पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवसाच्या कमाईत मात्र ‘आवारापन 2’ने स्पष्ट आघाडी घेतली. ‘बटवारा 1947’ने भारतात सुमारे 5.75 कोटी रुपयांची कमाई केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सुरुवातीच्या बॉक्स ऑफिस लढतीत इमरान हाश्मीचा चित्रपट वरचढ ठरला आहे. पुढील दोन दिवस ठरणार महत्त्वाचे पहिल्या दिवशी ‘आवारापन 2’ला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी चित्रपटाच्या यशासाठी शनिवार आणि रविवारचे कलेक्शन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. यंदा 15 ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन शनिवारला आल्याने चित्रपटाला सुट्टीचा मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. बॉक्स ऑफिसवरील सुरुवातीच्या ट्रेंडनुसार चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडची कमाई मजबूत राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. काही व्यापार विश्लेषणांनुसार पहिल्या वीकेंडमध्ये चित्रपट 80 कोटी रुपयांच्या आसपास पोहोचू शकतो. मात्र, हा अंदाज असून प्रत्यक्ष कमाई प्रेक्षकांचा प्रतिसाद, शोची संख्या आणि शनिवार-रविवारच्या ऑक्युपन्सीवर अवलंबून असेल. इमरान हाश्मीसाठी मोठे कमबॅक? ‘आवारापन 2’ची सुरुवात पाहता हा चित्रपट इमरान हाश्मीच्या करिअरसाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. एका काळात आपल्या रोमँटिक आणि थ्रिलर भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या इमरानने ‘शिवम पंडित’च्या भूमिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पहिल्याच दिवशी मिळालेली 20 कोटींपेक्षा जास्त कमाई ही केवळ चित्रपटासाठीच नव्हे तर इमरान हाश्मीसाठीही मोठी उपलब्धी आहे. आता हा वेग पुढील दिवसांमध्ये कायम राहतो का आणि ‘आवारापन 2’ बॉक्स ऑफिसवर किती मोठा आकडा गाठतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Awarapan 2 चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्याच दिवशी कमवले 22 कोटी Read More »

lopamudra raut

Lopamudra Raut : बिग बॉस फेम लोपामुद्रा राउतच्या घरात 1 कोटींची चोरी; बिहारमधून आरोपीला अटक

Lopamudra Raut : अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’ फेम लोपामुद्रा राउत हिच्या मुंबईतील सांताक्रूझ येथील घरात झालेल्या सुमारे 1 कोटी रुपयांच्या चोरीचा छडा लावण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. सांताक्रूझ पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला बिहारमधील दरभंगा येथून अटक केली आहे. आरोपीकडून सोन्याची बिस्किटे, महागडे घड्याळ, रोकड आणि इतर मौल्यवान वस्तूंसह सुमारे 76 लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आरोपी कोण? पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव चंदन कमलेश मुखिया असून त्याचे वय 26 वर्षे आहे. तो बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.चोरीनंतर आरोपी मुंबईतून बिहारला परतला होता. पोलिसांनी तांत्रिक तपास, मोबाइल लोकेशन आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे त्याचा माग काढला. त्यानंतर बिहार पोलिसांच्या मदतीने कारवाई करत त्याला ताब्यात घेण्यात आले. पाचव्या मजल्यावरील घरात प्रवेश कसा केला? पोलिसांच्या तपासानुसार, लोपामुद्रा राउत राहत असलेल्या इमारतीतील पाचव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आरोपीने बाल्कनीच्या दिशेने प्रवेश केला. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने बांबूच्या काठीचा वापर करून बाल्कनीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग तयार केला आणि त्यानंतर घरात प्रवेश केला. घरातील बेडरूममध्ये जाऊन त्याने रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू चोरल्याचा आरोप आहे. घरातून नेमके काय चोरीला गेले? या चोरीमध्ये मोठ्या प्रमाणावर रोकड तसेच सोन्या-चांदीच्या आणि महागड्या वस्तूंचा समावेश असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या कारवाईत आतापर्यंत मिळालेल्या मालमत्तेमध्ये सुमारे 200 ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे, महागडे Rolex घड्याळ, रोकड आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश असल्याचे अहवालात नमूद आहे. एकूण चोरीचा अंदाजे आकडा ₹1 कोटींपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात असले तरी पोलिसांनी आतापर्यंत सुमारे ₹76.39 लाख किमतीची मालमत्ता शोधून काढल्याची माहिती आहे. चोरीच्या पैशातून जमीन खरेदीचा प्रयत्न? तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आल्याचे वृत्त आहे. आरोपीने चोरीच्या पैशातून आपल्या बहिणीच्या नावावर जमीन खरेदी केल्याचा संशय पोलिसांना आहे. दरभंगा परिसरात या व्यवहारासंदर्भात पोलिसांनी चौकशी केली असून, चोरीच्या पैशांचा माग काढण्यासाठी आर्थिक व्यवहारांचीही तपासणी सुरू आहे. काही अहवालांनुसार, चोरीच्या रकमेशी संबंधित सुमारे ₹46 लाखांची रक्कम पोलिसांनी गोठवली आहे. सोन्याच्या बिस्किटांचा शोध कसा लागला? तपासादरम्यान पोलिसांनी स्थानिक पातळीवरही चौकशी केली. एका ज्वेलर्सकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरीच्या मालातील दोन सोन्याची बिस्किटे शोधून काढण्यात आल्याचे वृत्त आहे. यामुळे चोरीनंतर आरोपीने मौल्यवान वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी स्थानिक पातळीवर संपर्क साधल्याचा संशय अधिक बळावला आहे. या व्यवहारांशी संबंधित इतर व्यक्तींची भूमिकाही तपासली जात आहे. आरोपी एकटाच होता का? या प्रकरणातील तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे आरोपीने ही चोरी एकट्याने केली की त्याला अन्य कोणाची मदत मिळाली, याचा तपास पोलिस करत आहेत. आरोपीच्या नातेवाईकांचा तसेच चोरीच्या मालाची खरेदी-विक्री किंवा पैशांच्या व्यवहारात सहभागी असलेल्या व्यक्तींचाही तपास होण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून चोरीला गेलेल्या उर्वरित वस्तूंचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या तपासाला यश कसे मिळाले? चोरीनंतर पोलिसांनी उपलब्ध तांत्रिक पुराव्यांचा आधार घेत तपास सुरू केला. मोबाइल लोकेशन, इतर डिजिटल माहिती आणि स्थानिक पातळीवरील तपासाच्या माध्यमातून आरोपीचा माग काढण्यात आला. आरोपी मुंबईबाहेर निघून बिहारमध्ये पोहोचल्यानंतरही पोलिसांनी त्याचा तपास सुरू ठेवला. अखेर दरभंगा परिसरात कारवाई करून त्याला अटक करण्यात आली. या कारवाईत मुंबई आणि बिहार पोलिसांमध्ये समन्वय साधण्यात आला. लोपामुद्रा राउत कोण आहे? लोपामुद्रा राउत ही मॉडेल, अभिनेत्री आणि सौंदर्यस्पर्धेतील विजेती म्हणून ओळखली जाते. ‘बिग बॉस 10’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमुळे तिला मोठी ओळख मिळाली. त्यानंतर ती ‘खतरों के खिलाड़ी’ मध्येही सहभागी झाली होती. टेलिव्हिजनवरील शो व्यतिरिक्त ती सोशल मीडियावरही सक्रिय आहे.

Lopamudra Raut : बिग बॉस फेम लोपामुद्रा राउतच्या घरात 1 कोटींची चोरी; बिहारमधून आरोपीला अटक Read More »

rajpal yadav

Rajpal Yadav : 16 कोटींच्या कर्जप्रकरणी राजपाल यादव यांच्या मालमत्तांचा होणार लिलाव

Rajpal Yadav : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे तब्बल 16 कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकीत असल्याने त्यांच्या उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर येथील दोन मालमत्तांचा 9 सप्टेंबर रोजी लिलाव होणार आहे. माहितीनुसार, चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनासाठी घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड न झाल्याने बँकेने ही कारवाई सुरू केली आहे. अनेक वेळा नोटिसा देऊनही थकबाकीची रक्कम जमा न झाल्यामुळे अखेर मालमत्तांच्या लिलावाचा निर्णय घेण्यात आला. राजपाल यादव यांना यापूर्वीही आर्थिक आणि कायदेशीर प्रकरणांचा सामना करावा लागला आहे. आता या नव्या कारवाईमुळे त्यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. मात्र, या प्रकरणावर राजपाल यादव किंवा त्यांच्या टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान, या घडामोडींमुळे बॉलिवूडमध्येही चर्चा रंगली असून, 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या लिलावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Rajpal Yadav : 16 कोटींच्या कर्जप्रकरणी राजपाल यादव यांच्या मालमत्तांचा होणार लिलाव Read More »

bhetali tu punha

Bhetali Tu Punha : “भेटली तू पुन्हा” चा सिक्वल ‘या’ दिवशी येणार

Bhetali Tu Punha : तरुणाईच्या पसंतीस उतरलेला “भेटली तू पुन्हा” हा चित्रपट २८ जुलै २०१७ रोजी प्रदर्शित झाला होता. आज या चित्रपटाला ९ वर्ष पूर्ण झाली असून याच विशेष दिवसाचे औचित्य साधून निर्मात्यांनी चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा नुकतीच सोशल मीडियावर केली आहे. “भेटली तू पुन्हा 2” लव स्टोरीच्या पुढची स्टोरी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत्या डिसेंबर महिन्यात सुरुवात होणार असून अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री पूजा सावंत ही जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येणार आहे. स्वरूप स्टुडिओज या चित्रपटाची निर्मिती करणार असून प्रभाकर परब, सचिन नारकर आणि विकास पवार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. “भेटली तू पुन्हा” या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे हे या चित्रपटाच्या सिक्वलचे दिग्दर्शन करणार असून लेखन संजय जमखंडी यांचे आहे. “भेटली तू पुन्हा” या चित्रपटाचा सिक्वल येतो आहे हे माझ्यासाठी खरंच आनंदाची बाब आहे. हलकी फुलकी प्रेमकथा, सुमधुर संगीत, उत्तम अभिनय यामुळे रसिक प्रेक्षकांचा चित्रपटाच्या पहिल्या भागाला छान प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटाच्या सिक्वलमुळे कथानक काय वळण घेणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पहावी लागणार असल्याचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांनी सांगितले.

Bhetali Tu Punha : “भेटली तू पुन्हा” चा सिक्वल ‘या’ दिवशी येणार Read More »

arbaz shaikh

Tukaram Munde : ‘सैराट’ फेम सल्ल्या प्रकरणानंतर FDA ची मोठी कारवाई; सोलापुरातील नोबेल हॉस्पिटलचे मेडिकल अखेर बंद

Tukaram Munde : ‘सैराट’ चित्रपटातील अभिनेता अरबाज शेखने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सोलापुरातील नोबेल हॉस्पिटलवर गंभीर आरोप केल्यानंतर या प्रकरणात अन्न व औषध विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. उपचारादरम्यान रुग्णांना हॉस्पिटलमधील मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडल्याचा आरोप समोर आल्यानंतर राज्यभरात मोठी चर्चा रंगली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रुग्णांना कोणत्याही परवानाधारक मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट करत कठोर निर्देश जारी केले होते. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील नोबेल हॉस्पिटलमधील मेडिकल दुकान अखेर बंद करण्यात आले आहे. या कारवाईनंतर अभिनेता अरबाज शेख याने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत, “माझ्यासाठी हा विषय आता संपला आहे,” असे म्हटले. तसेच, रुग्णांच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या सर्वांचे आभार मानत ही कारवाई सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची असल्याचे त्याने नमूद केले. एफडीएने नुकत्याच जारी केलेल्या आदेशानुसार कोणतेही हॉस्पिटल रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलशी संलग्न मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडू शकत नाही. रुग्णांना त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही परवानाधारक मेडिकलमधून औषधे घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर राज्यातील खासगी रुग्णालयांमधील औषध विक्रीच्या पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, एफडीएकडून अशा प्रकरणांवर अधिक कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Tukaram Munde : ‘सैराट’ फेम सल्ल्या प्रकरणानंतर FDA ची मोठी कारवाई; सोलापुरातील नोबेल हॉस्पिटलचे मेडिकल अखेर बंद Read More »

tridha choudhury

Tridha Choudhury : ‘आश्रम’मधील बोल्ड सीन ठरले ब्रेकअपचे कारण? अभिनेत्री त्रिधा चौधरीचा मोठा खुलासा

Tridha Choudhury : अभिनेता बॉबी देओलच्या गाजलेल्या ‘आश्रम’ वेब सीरिजमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री त्रिधा चौधरी हिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. या मालिकेतील बोल्ड आणि इंटिमेट दृश्यांमुळे तिच्या प्रेमसंबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि अखेर ब्रेकअप झाल्याचे तिने सांगितले आहे. एका मुलाखतीत त्रिधाने सांगितले की, ‘आश्रम’मधील भूमिका तिच्या कारकिर्दीसाठी महत्त्वाची ठरली. मात्र, मालिकेतील इंटिमेट दृश्यांमुळे तिचा तत्कालीन प्रियकर अस्वस्थ झाला. अभिनय आणि वास्तव यातला फरक तो स्वीकारू शकला नाही. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले आणि नात्यात तणाव वाढत गेला. त्रिधा म्हणाली की, त्या काळात तिला स्वतःबद्दल कमीपणाची भावना निर्माण करण्यात आली. मात्र आता ती त्या कठीण काळातून पूर्णपणे बाहेर पडली असून, मागे वळून पाहताना त्या निर्णयाबद्दल कोणतीही खंत वाटत नाही. अभिनय हा तिचा व्यवसाय असून, प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमाला तिने अधिक महत्त्व दिल्याचेही तिने स्पष्ट केले. प्रकाश झा दिग्दर्शित ‘आश्रम’ या वेब सीरिजमध्ये त्रिधाने ‘बबिता’ची भूमिका साकारली होती. बॉबी देओलसोबतच्या तिच्या काही बोल्ड दृश्यांची त्या काळात मोठी चर्चा झाली होती. या भूमिकेमुळे त्रिधाला देशभरात मोठी ओळख मिळाली असून, ‘आश्रम’च्या पुढील पर्वाचीही प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Tridha Choudhury : ‘आश्रम’मधील बोल्ड सीन ठरले ब्रेकअपचे कारण? अभिनेत्री त्रिधा चौधरीचा मोठा खुलासा Read More »

maharashtra epstein files

Maharashtra Epstein Files : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा फर्स्ट लूक प्रदर्शित.., अभिनेत्री दीपाली सय्यद मुख्य भूमिकेत

Maharashtra Epstein Files : प्रत्येक व्यक्तिरेखा कलाकाराला नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची संधी देत असते. अभिनेत्री नृत्यांगना दीपाली सय्यद यांनी आजवर विविधांगी भूमिका साकारत आपल्या कलागुणांना वाव दिला आहे. आता त्या आणखी एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहेत. नुकतीच ‘महाराष्ट्र एपस्टिन फाईल’ या आगामी सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात भूकंप निर्माण करणाऱ्या घटनांवर प्रकाशझोत टाकणाऱ्या या सिनेमात काही वास्तवातील व्यक्तिरेखाही दिसणार आहेत. यात दीपाली सय्यद मुख्य भूमिका साकारत आहेत. २ ऑक्टोबर २०२६ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. फ्लेमिंगो क्रिएशन आणि मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी देवेंद्र भट, सुर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे करीत आहेत. दिग्दर्शक स्वरूप बी. सावंत दिग्दर्शन करीत आहेत. सध्या या सिनेमाचे चित्रीकरण वेगात सुरू आहे. ‘आता सगळं उघड होणार…!’ असे म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. यामधील दीपाली सय्यद यांचा लूक पाहताक्षणी लक्ष वेधून घेतो. त्यांची व्यक्तिरेखा या सिनेमात अतिशय महत्वाची असून या रुपात पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या रुपात दीपाली यांच्या अभिनयाचा कस लागणार आहे. दीपाली सय्यद यांच्यासह फर्स्ट लूक मध्ये अभिनेते उदय टिकेकर यांचा समावेश आहे. दीपाली सय्यद या व्यक्तीरेखेला अचूक न्याय देऊ शकतील याची खात्री असल्यानेच त्यांची या भूमिकेसाठी निवड करण्यात आल्याचे दिग्दर्शकांचे म्हणणे आहे. हा सिनेमा महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक घडामोडींमधील एक अतिशय महत्त्वाचे प्रकरण जगासमोर आणणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या सिनेमाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाची कथा सागरकुमार एस. जैन यांनी लिहीली असून, पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. डिओपी आकाश काकडे या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करणार असून, कला दिग्दर्शन अक्षय आंबेकर करणार आहेत. वेशभूषा आकांक्षा गांधी यांची असून, सचिन घनवट या चित्रपटाचे प्रोडक्शन हेड आहेत तसेच नेहा घोडके प्रॉडकशन कंट्रोलर म्हणून काम पाहणार आहेत.

Maharashtra Epstein Files : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा फर्स्ट लूक प्रदर्शित.., अभिनेत्री दीपाली सय्यद मुख्य भूमिकेत Read More »

allu arjun

Allu Arjun : अल्लू अर्जुन कायद्याचा आदर राखत न्यायालयीन सुनावणीत घेतला सहभाग

Allu Arjun : अल्लू अर्जुन यांनी खऱ्या अर्थाने पॅन-इंडिया सुपरस्टारची व्याख्या नव्या उंचीवर नेली आहे. पुष्पा चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर जगभरात त्यांना आयकॉन स्टार म्हणून ओळख मिळाली असली, तरी त्यांची प्रचंड लोकप्रियता आणि अतुलनीय स्टारडम अनेक वर्षांपासून कायम आहे. देशातील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक असण्यासोबतच ते एक आदर्श आणि कायद्याचे पालन करणारे नागरिकही आहेत. याचे उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले, जेव्हा न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत त्यांनी कोणताही विलंब न करता नामपल्ली न्यायालयासमोर व्हर्च्युअल माध्यमातून हजेरी लावली. अल्लू अर्जुन नेहमीच कायद्याचे पालन करतात आणि न्यायव्यवस्थेचा आदर राखतात.

Allu Arjun : अल्लू अर्जुन कायद्याचा आदर राखत न्यायालयीन सुनावणीत घेतला सहभाग Read More »