DNA मराठी

मनोरंजन

arbaz shaikh

Tukaram Munde : ‘सैराट’ फेम सल्ल्या प्रकरणानंतर FDA ची मोठी कारवाई; सोलापुरातील नोबेल हॉस्पिटलचे मेडिकल अखेर बंद

Tukaram Munde : ‘सैराट’ चित्रपटातील अभिनेता अरबाज शेखने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सोलापुरातील नोबेल हॉस्पिटलवर गंभीर आरोप केल्यानंतर या प्रकरणात अन्न व औषध विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. उपचारादरम्यान रुग्णांना हॉस्पिटलमधील मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडल्याचा आरोप समोर आल्यानंतर राज्यभरात मोठी चर्चा रंगली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रुग्णांना कोणत्याही परवानाधारक मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट करत कठोर निर्देश जारी केले होते. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील नोबेल हॉस्पिटलमधील मेडिकल दुकान अखेर बंद करण्यात आले आहे. या कारवाईनंतर अभिनेता अरबाज शेख याने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत, “माझ्यासाठी हा विषय आता संपला आहे,” असे म्हटले. तसेच, रुग्णांच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या सर्वांचे आभार मानत ही कारवाई सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची असल्याचे त्याने नमूद केले. एफडीएने नुकत्याच जारी केलेल्या आदेशानुसार कोणतेही हॉस्पिटल रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलशी संलग्न मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडू शकत नाही. रुग्णांना त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही परवानाधारक मेडिकलमधून औषधे घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर राज्यातील खासगी रुग्णालयांमधील औषध विक्रीच्या पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, एफडीएकडून अशा प्रकरणांवर अधिक कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Tukaram Munde : ‘सैराट’ फेम सल्ल्या प्रकरणानंतर FDA ची मोठी कारवाई; सोलापुरातील नोबेल हॉस्पिटलचे मेडिकल अखेर बंद Read More »

tridha choudhury

Tridha Choudhury : ‘आश्रम’मधील बोल्ड सीन ठरले ब्रेकअपचे कारण? अभिनेत्री त्रिधा चौधरीचा मोठा खुलासा

Tridha Choudhury : अभिनेता बॉबी देओलच्या गाजलेल्या ‘आश्रम’ वेब सीरिजमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री त्रिधा चौधरी हिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. या मालिकेतील बोल्ड आणि इंटिमेट दृश्यांमुळे तिच्या प्रेमसंबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि अखेर ब्रेकअप झाल्याचे तिने सांगितले आहे. एका मुलाखतीत त्रिधाने सांगितले की, ‘आश्रम’मधील भूमिका तिच्या कारकिर्दीसाठी महत्त्वाची ठरली. मात्र, मालिकेतील इंटिमेट दृश्यांमुळे तिचा तत्कालीन प्रियकर अस्वस्थ झाला. अभिनय आणि वास्तव यातला फरक तो स्वीकारू शकला नाही. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले आणि नात्यात तणाव वाढत गेला. त्रिधा म्हणाली की, त्या काळात तिला स्वतःबद्दल कमीपणाची भावना निर्माण करण्यात आली. मात्र आता ती त्या कठीण काळातून पूर्णपणे बाहेर पडली असून, मागे वळून पाहताना त्या निर्णयाबद्दल कोणतीही खंत वाटत नाही. अभिनय हा तिचा व्यवसाय असून, प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमाला तिने अधिक महत्त्व दिल्याचेही तिने स्पष्ट केले. प्रकाश झा दिग्दर्शित ‘आश्रम’ या वेब सीरिजमध्ये त्रिधाने ‘बबिता’ची भूमिका साकारली होती. बॉबी देओलसोबतच्या तिच्या काही बोल्ड दृश्यांची त्या काळात मोठी चर्चा झाली होती. या भूमिकेमुळे त्रिधाला देशभरात मोठी ओळख मिळाली असून, ‘आश्रम’च्या पुढील पर्वाचीही प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Tridha Choudhury : ‘आश्रम’मधील बोल्ड सीन ठरले ब्रेकअपचे कारण? अभिनेत्री त्रिधा चौधरीचा मोठा खुलासा Read More »

maharashtra epstein files

Maharashtra Epstein Files : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा फर्स्ट लूक प्रदर्शित.., अभिनेत्री दीपाली सय्यद मुख्य भूमिकेत

Maharashtra Epstein Files : प्रत्येक व्यक्तिरेखा कलाकाराला नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची संधी देत असते. अभिनेत्री नृत्यांगना दीपाली सय्यद यांनी आजवर विविधांगी भूमिका साकारत आपल्या कलागुणांना वाव दिला आहे. आता त्या आणखी एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहेत. नुकतीच ‘महाराष्ट्र एपस्टिन फाईल’ या आगामी सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात भूकंप निर्माण करणाऱ्या घटनांवर प्रकाशझोत टाकणाऱ्या या सिनेमात काही वास्तवातील व्यक्तिरेखाही दिसणार आहेत. यात दीपाली सय्यद मुख्य भूमिका साकारत आहेत. २ ऑक्टोबर २०२६ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. फ्लेमिंगो क्रिएशन आणि मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी देवेंद्र भट, सुर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे करीत आहेत. दिग्दर्शक स्वरूप बी. सावंत दिग्दर्शन करीत आहेत. सध्या या सिनेमाचे चित्रीकरण वेगात सुरू आहे. ‘आता सगळं उघड होणार…!’ असे म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. यामधील दीपाली सय्यद यांचा लूक पाहताक्षणी लक्ष वेधून घेतो. त्यांची व्यक्तिरेखा या सिनेमात अतिशय महत्वाची असून या रुपात पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या रुपात दीपाली यांच्या अभिनयाचा कस लागणार आहे. दीपाली सय्यद यांच्यासह फर्स्ट लूक मध्ये अभिनेते उदय टिकेकर यांचा समावेश आहे. दीपाली सय्यद या व्यक्तीरेखेला अचूक न्याय देऊ शकतील याची खात्री असल्यानेच त्यांची या भूमिकेसाठी निवड करण्यात आल्याचे दिग्दर्शकांचे म्हणणे आहे. हा सिनेमा महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक घडामोडींमधील एक अतिशय महत्त्वाचे प्रकरण जगासमोर आणणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या सिनेमाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाची कथा सागरकुमार एस. जैन यांनी लिहीली असून, पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. डिओपी आकाश काकडे या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करणार असून, कला दिग्दर्शन अक्षय आंबेकर करणार आहेत. वेशभूषा आकांक्षा गांधी यांची असून, सचिन घनवट या चित्रपटाचे प्रोडक्शन हेड आहेत तसेच नेहा घोडके प्रॉडकशन कंट्रोलर म्हणून काम पाहणार आहेत.

Maharashtra Epstein Files : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा फर्स्ट लूक प्रदर्शित.., अभिनेत्री दीपाली सय्यद मुख्य भूमिकेत Read More »

allu arjun

Allu Arjun : अल्लू अर्जुन कायद्याचा आदर राखत न्यायालयीन सुनावणीत घेतला सहभाग

Allu Arjun : अल्लू अर्जुन यांनी खऱ्या अर्थाने पॅन-इंडिया सुपरस्टारची व्याख्या नव्या उंचीवर नेली आहे. पुष्पा चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर जगभरात त्यांना आयकॉन स्टार म्हणून ओळख मिळाली असली, तरी त्यांची प्रचंड लोकप्रियता आणि अतुलनीय स्टारडम अनेक वर्षांपासून कायम आहे. देशातील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक असण्यासोबतच ते एक आदर्श आणि कायद्याचे पालन करणारे नागरिकही आहेत. याचे उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले, जेव्हा न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत त्यांनी कोणताही विलंब न करता नामपल्ली न्यायालयासमोर व्हर्च्युअल माध्यमातून हजेरी लावली. अल्लू अर्जुन नेहमीच कायद्याचे पालन करतात आणि न्यायव्यवस्थेचा आदर राखतात.

Allu Arjun : अल्लू अर्जुन कायद्याचा आदर राखत न्यायालयीन सुनावणीत घेतला सहभाग Read More »

img 20260602 wa0015

Live Movie : ‘लाईव्ह’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू…

Live Movie: काही दिवसांपूर्वीच ‘लाईव्ह’ या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आल्यानंतर गीत ध्वनीमुद्रणाने चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. त्यानंतर चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये झळकलेल्या बातम्यांनी ‘लाईव्ह’बाबत रसिकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण वेगात सुरू आहे. रिद्धी बिद्दी व्हिजन्स या बॅनरखाली निर्माते सुमित पांडे ‘लाईव्ह’ चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते छबी असीम हल्दर असून, लेखक-दिग्दर्शक संजीव राय आहेत. या चित्रपटाची प्रेरणादायी कथा एका महत्त्वकांक्षी तरुणीभोवती फिरणारी आहे. या कथेच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात येणार असून, समाजातील विविध घटनांचा वेध घेण्यात येणार आहे. नायिकेच्या संघर्ष आणि न्याय-हक्काच्या लढाईची हृदयस्पर्शी गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईतील मढ, गोरेगाव तसेच आजूबाजूच्या परिसरात सुरू आहे. ‘लाईव्ह’ या शीर्षकावरून चित्रपटात काय पाहायला मिळणार याची कल्पना येत नाही. त्यामुळे चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाविषयी दिग्दर्शक संजीव राय म्हणाले की, ‘लाईव्ह’ चित्रपटाची कथा समाजातील वास्तव चित्र दाखवणारी आहे. आजच्या युगात सर्वच क्षेत्रांमध्ये तरुणींनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, तरीही त्यांच्या समोरील आव्हाने कमी झालेली नाहीत. या चित्रपटाची कथाही अशाच आव्हानात्मक प्रवासावर आधारलेली असून, सरकारी व्यवस्थेचा पर्दाफाश करणारी आहे. समाजातील विविध घटकांचा समावेश असलेला हा चित्रपट आजवर कधीही प्रकाशात न आलेले पैलूंवर प्रकाश टाकणार आहे. वास्तवाला मनोरंजनाची जोड देत ‘लाईव्ह’ चित्रपटाच्या माध्यमातून एक संगीतप्रधान कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी ‘लाईव्ह’ चित्रपटाची संपूर्ण टिम खूप मेहनत घेत असल्याचेही राय यांनी सांगितले. दिग्दर्शक संजीव राय आणि पूनम विभूते यांनी चित्रपटातील अर्थपूर्ण संवाद लिहिले आहेत. या चित्रपटात मिलिंद गुणाजी, अनंत जोग, निशिगंधा वाड, रूपाली जाधव, हितेन तेजवानी, सागर काळे, अनिल नागरथ, नम्रता जाधव, विनय राजपूत आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. गीतकार महालिंग कंठाळे यांनी गीतलेखन केले असून, संगीतकार दिनेश अर्जुना आणि अमन श्लोक या चित्रपटातील गीतांना संगीत देणार आहेत. डिओपी गोपी सिनेमॅटोग्राफी करीत असून, सैफुद्दीन शेख कला दिग्दर्शकाची बाजू सांभाळत आहेत.

Live Movie : ‘लाईव्ह’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू… Read More »

pravin tarde

Pravin Tarde : नसरापूर दुर्घटनेवर प्रवीण तरडे संतप्त; “अशा नराधमांना चेचणारा सिनेमा बनवणार”

Pravin Tarde : नसरापूर दुर्घटनेवर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची संतप्त प्रतिक्रिया दिली असून येणाऱ्या अशा नराधमांना चेचणारा सिनेमा बनवणार अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना प्रवीण तरडे म्हणाले की, येणाऱ्या काळात अशा नराधमांना चेचण्यासाठी सिनेमा काढणार. मी एक फिल्ममेकर आहे. याबद्दल मी माझी उद्विग्न प्रतिक्रिया दिली होती. त्यावरून मोठा गदारोळ उठला. मी शेवटी माणूसच आहे. महाराष्ट्रातील मुलींच्या वडिलांना विचारा, ती बातमी पाहिल्यानंतर काय झाले असेल. येणाऱ्या काळात मी ‘देऊळ बंद’ या सिनेमाचे 11 भाग करणार आहे. त्यामुळे ‘देऊळ बंद’च्या पुढील एखाद्या भागात अशा नराधमांना चेचण्यासाठी स्वतः स्वामींनाच यावे लागेल. माझ्या सिनेमात कायदा-बियदा असं काही नसेल. कारण जेव्हा स्वामी शिक्षा द्यायला उतरतात, तेव्हा त्यांची शिक्षा भयानक असते. स्वामींनी तो प्रकार पाहिला असेल. त्यामुळे त्या नराधमांना असा मृत्यू येईल की पुन्हा कोणी असे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. जे सध्या चाललंय, ते अतिशय भयावह आहे. यानिमित्ताने मुलींच्या आई-वडिलांना आशेचा किरण देण्यासाठी असा चित्रपट बनवेन, ज्यात अशा नराधमांना असे मृत्यू दाखवले जातील की ते पाहून कोणीही असे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. ज्याप्रकारे ‘मुळशी पॅटर्न’नंतर शेतकऱ्यांच्या जमिनी धाकदपटशाहीने घेणं बंद झालं, त्याचप्रमाणे ‘मुळशी पॅटर्न’ने शेतकऱ्यांना खडबडून जाग केलं. आता अशा नराधमांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. या विषयाला वाचा फोडण्याचा मी प्रयत्न करेन. ‘देऊळ बंद 2’च्या टीझर प्रदर्शन सोहळ्यात, वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट येथे प्रवीण तरडे यांनी ही भावना व्यक्त केली.

Pravin Tarde : नसरापूर दुर्घटनेवर प्रवीण तरडे संतप्त; “अशा नराधमांना चेचणारा सिनेमा बनवणार” Read More »

img 20260507 wa0027

Matka King च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा: प्राइम व्हिडिओवर पुन्हा रंगणार मटक्याचा खेळ

Matka King : पहिल्या पर्वाच्या ऐतिहासिक यशानंतर, ज्याने प्रदर्शित झालेल्या आठवड्यात १७ देशांमध्ये पहिला क्रमांक मिळवला आणि ३७ देशांमध्ये अव्वल दहामध्ये स्थान पटकावले, प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे या गाजलेल्या मूळ मालिकेच्या दुसऱ्या पर्वाच्या निर्मितीची घोषणा केली आहे. प्राइम व्हिडिओ या भारतातील लोकप्रिय मनोरंजन व्यासपीठाने आज जाहीर केले की त्यांची गाजलेली मूळ नाट्यमालिका ‘मटका किंग’चे दुसरे पर्व सध्या निर्मिती प्रक्रियेत आहे. पहिल्या पर्वाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. १९६० च्या दशकातील वेगाने बदलणाऱ्या मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित या उच्च-दावांच्या नाट्यमालिकेने महत्त्वाकांक्षा, सत्ता आणि ओळख यांची कथा प्रभावी अभिनय आणि जिवंत कथनशैलीतून मांडत प्रेक्षकांशी घट्ट नाळ जोडली. पहिले पर्व गेल्या दोन वर्षांत या व्यासपीठावरील सर्वाधिक पाहिले गेलेले नवीन लिखित स्वरूपातील मालिका ठरले. प्रदर्शित झालेल्या पहिल्याच आठवड्यात ३७ देशांतील अव्वल दहामध्ये स्थान मिळवत १७ देशांमध्ये पहिला क्रमांक पटकावला. प्रेक्षकांकडून मिळालेल्या भरभरून प्रतिसादामुळे पुन्हा एकदा हे सिद्ध झाले की मातीतल्या आणि वास्तवाशी जोडलेल्या कथा भारतीय प्रेक्षकांच्या मनात खोलवर घर करतात. ‘मटका किंग’च्या पहिल्या पर्वाची निर्मिती आणि लेखन अभय कोराणे यांनी केले असून नागराज पोपटराव मंजुळे यांनी निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. रॉय कपूर फिल्म्स, आटपाट आणि एसएमआर एंटरटेनमेंट यांच्या बॅनरखाली सिद्धार्थ रॉय कपूर, नागराज पोपटराव मंजुळे, गार्गी कुलकर्णी, अश्विनी सिडवानी आणि आशीष आर्यन यांनी याची निर्मिती केली आहे. आठ भागांच्या या मालिकेत विजय वर्मा प्रमुख भूमिकेत असून त्यांच्यासोबत कृतिका कामरा, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, भूपेंद्र जदावत आणि गुलशन ग्रोवर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. तसेच भरत जाधव, गिरीश कुलकर्णी, जेमी लीवर, किशोर कदम, सायरस साहूकार, अर्पिता सेठिया, संभाजी तांगडे, इश्त्याक खान, संजीव जोतांगिया आणि सिमरन अश्विनी यांनी आपल्या प्रभावी अभिनयाने कथेला अधिक वास्तव आणि खोली दिली आहे. १७ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेले ‘मटका किंग’चे पहिले पर्व प्राइम व्हिडिओवर भारतासह जगभरातील २४० देश आणि प्रदेशांमध्ये विशेष स्वरूपात पाहण्यासाठी उपलब्ध आहे. मटक्याचा खेळ अजून संपलेला नाही आणि बृज भाटीचे राज्यही कायम आहे. ‘मटका किंग’च्या दुसऱ्या पर्वात खरे डाव सुरू होणार आहेत.

Matka King च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा: प्राइम व्हिडिओवर पुन्हा रंगणार मटक्याचा खेळ Read More »

Bigg Boss Marathi : तन्वी कोलते ठरली “बिग बॉस मराठी सिझन 6”ची महाविजेती !

Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठी सिझन ६ ची धमाकेदार सुरुवात तीन महिन्याआधी कलर्स मराठी वाहिनीवर झाली. बिग बॉस मराठी सिझन ६ देखील महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचला आणि कानाकोपर्‍यात फक्त याच कार्यक्रमाची चर्चा सुरू झाली. बिग बॉस मराठीच्या या सिझनमध्ये सदस्य १०० दिवसं कॅमेरांच्या नजरकैदेत राहिले. या घराने आणि महाराष्ट्राने सदस्यांमधील भांडणं, वाद-विवाद, मैत्री, भावनांचे उतार-चढाव आणि नात्यांचे बदलते रंग पाहिले. आता अखेर हा शंभर दिवसांचा रोमांचक प्रवास आज संपन्न झाला. बिग बॉस मराठी सिझन ६ चा महाअंतिम सोहळा नुकताच मुंबईमध्ये पार पडला. सदस्य आणि प्रेक्षक सगळ्यांनाच उत्सुकता होती या पर्वाचा विजेता कोण असेल हे जाणून घेण्याची. ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पहात होता तो क्षण शेवटी आला. सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मने जिंकत घराघरांत पोहोचलेल्या या पर्वाचा भव्य समारोप होत, तन्वी कोलते हिने आपल्या दमदार आणि सातत्यपूर्ण खेळाच्या जोरावर ‘महाविजेती’चा मान पटकावला. अंतिम क्षणापर्यंत कायम असलेल्या उत्कंठेनंतर विजेतेपदाची घोषणा होताच संपूर्ण वातावरण जल्लोषात न्हाऊन निघालं. विजेत्याला कलर्स मराठीकडून तब्बल १५ लाख धनराशी आणि ट्रॉफी देण्यात आली. विजेत्याला मिळणार आहे. पु. ना. गाडगीळ आणि सन्स तर्फे तब्बल १० लाख रुपयांचं वाउचर…रेवा डायमंडच्या सर्टिफाईड नॅचरल डायमंड ज्वेलरी खरेदीसाठी. तुनवाल ई मोटर्स ची लिथीनो प्रो ही ई बाईक देण्यात येणार आहे. रितेश देशमुख यांच्याकडून आणि राज शिवाजी चित्रपटाच्या टीमकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुंदर फोटो देण्यात आला. या घराने गेल्या १०० दिवसांत प्रत्येक भावनेचा साक्षीदार होत अनेक रंग दाखवले कधी मैत्रीची घट्ट नाती जुळताना पाहिली, तर कधी त्याच नात्यांमध्ये कटुता येताना अनुभवली. सदस्यांचे रडणं–हसणं, तक्रारी, मतभेद आणि स्पर्धेची धग यामुळे प्रत्येक दिवस नवा वाटत गेला. कॅमेरांच्या नजरकैदेत प्रत्येकाचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आला. या सगळ्या प्रवासात तन्वीने आपल्या रोखटोक बोलण्याने, जिद्दीने आणि ठाम मताने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आणि प्रेक्षकांचा विश्वास जिंकला. Executive Vice President, Marathi Cluster‘ Jiostar, सतीश राजवाडे म्हणाले, “बिग बॉस मराठी सिझन ६’ अनोख्या थीमसह सुरू झाला आणि सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवले. या सिझनमध्ये सदस्यांसाठी दार उघडलं आणि नशिबाचा खेळही पालटला एका मागून एक सरप्राइजेस, अनपेक्षित ट्विस्ट्स, नात्यांचे बदलते रंग आणि प्रत्येक क्षणाला नव्या आव्हानांचा सामना करत हा १०० दिवसांचा प्रवास भावनांनी, संघर्षांनी आणि जिद्दीने परिपूर्ण ठरला. या पर्वाला महाराष्ट्राचं भरभरून प्रेम लाभलं आणि प्रत्येक स्पर्धकाने आपल्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी छाप उमटवली. तन्वी कोलतेने सातत्य, प्रामाणिकपणा आणि प्रेक्षकांशी जोडलेलं नातं यांच्या जोरावर ‘महाविजेती’ हा मान पटकावला. हा शेवट नाही, तर नव्या प्रवासाची सुरुवात आहे.” विजेती ठरल्यानंतर भावना व्यक्त करताना तन्वी कोलते म्हणाली, “हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आणि शिकवणारा ठरला. या घराने मला स्वतःला ओळखायला शिकवलं, प्रत्येक परिस्थितीत ठाम राहायला शिकवलं. प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम आणि पाठिंबा हीच माझी खरी ताकद आहे. हा विजय मी माझ्या कुटुंबाला आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला समर्पित करते. मला सगळे घरात बोलत होते विचारत होते काय काम केलंस, काय नावं तेव्हा वाईट वाटायचे पण मी ठरवलं होतं या घरातून बाहेर पडेन तेव्हा सगळ्यांच्या तोंडी माझंच नावं असेल. बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केले आहे, आले होते तन्वी कोलते म्हणून जाते आहे तन्वी कोलते हा ब्रॅण्ड बनून”. असं म्हणता म्हणता, भावना, जिद्द आणि मनोरंजनाचा संगम असलेला हा प्रवास एका अविस्मरणीय टप्प्यावर येऊन पूर्ण झाला. ‘बिग बॉस मराठी सिझन ६’ने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मनात आपली वेगळी छाप उमटवत या पर्वाची दिमाखदार सांगता केली.

Bigg Boss Marathi : तन्वी कोलते ठरली “बिग बॉस मराठी सिझन 6”ची महाविजेती ! Read More »

img 20260330 wa0006

Siddharth Jadhav : हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’चा हाऊसफुल प्रयोग ; अभिनेता सिद्धार्थ जाधव यांची उपस्थिती

Siddharth Jadhav : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित ‘दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळा’च्या उपक्रमांतर्गत शनिवारी २८ मार्च २०२६ रोजी “हजार वेळा शोले पाहिलेला माणूस” या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन पार पडले. या चित्रपटाचे हे पहिलेच सार्वजनिक प्रदर्शन असल्याने चित्रपटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली. या प्रदर्शनावेळी चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते सिद्धार्थ जाधव यांच्यासह राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि चित्रपटाचे रंगभूषाकार श्रीकांत देसाई उपस्थित होते. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी या मान्यवरांचे स्वागत केले. हा चित्रपट हाऊसफुल ठरला असून प्रेक्षकांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सप्टेंबर २०२५ पासून या उपक्रमांतर्गत दरमहा एक चित्रपट दाखवण्यात येत असून रसिकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ चित्रपटाविषयी हृषीकेश गुप्ते दिग्दर्शित ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ हा चित्रपट एक बहुचर्चित मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, दिलीप प्रभावळकर आणि सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात एका ग्रामीण भागातील माणसाच्या संघर्षाची आणि स्वप्नांची कथा आहे. त्याच्यावर ‘शोले’ या चित्रपटाचा प्रभाव असून तो हा चित्रपट हजार वेळा पाहतो. सामाजिक, प्रेरणादायी आणि चित्रपटप्रेमीच्या भावविश्वावर आधारित अशी या चित्रपटाची मांडणी आहे.

Siddharth Jadhav : हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’चा हाऊसफुल प्रयोग ; अभिनेता सिद्धार्थ जाधव यांची उपस्थिती Read More »

salim khan

Salim Khan Hospitalized : सलीम खान यांची प्रकृती बिघडली रुग्णालयात दाखल; कारण काय?

Salim Khan Hospitalized : अभिनेता सलमान खान याचे वडील आणि ज्येष्ठ लेखक सलीम खान यांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी सकाळी सलीम यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. वृद्धापकाळाशी संबंधित आरोग्य समस्यांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. 90 वर्षीय सलीम खान यांनी बॉलीवूडमध्ये शोले आणि जंजीर सारख्या अनेक प्रतिष्ठित चित्रपटांच्या कथा लिहिल्या आहेत.  तर दुसरीकडे एका अहवालानुसार अभिनेता सलमान खानने सर्व कार्यक्रम रद्द केले असून तो वडिलांना भेटण्यासाठी तातडीने रुग्णालयात दाखल झाला आहे. खान कुटुंबाकडून अद्याप या प्रकरणाबाबत कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. सलीम खान यांची प्रकृती बिघडणे ही चाहत्यांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. सोशल मीडियावरील अनेक चाहते त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.  सलमान खान रुग्णालयात दाखल सलमान खानचा हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाचा व्हिडिओ काल रात्री उशिरा समोर आला. वडिलांच्या प्रकृतीबद्दल कळताच सलमान रुग्णालयात पोहोचला. तेव्हापासून तो रुग्णालयातच आहे. कुटुंबातील इतर सदस्यही नियमितपणे हॉस्पिटलमध्ये येत आहेत. यामध्ये अरबाज खान, शौरा खान, हेलेन आणि सलमा खान तसेच त्यांच्या मुली अलविरा, अर्पिता आणि तिचा पती अतुल अग्निहोत्री आणि आयुष शर्मा यांचा समावेश आहे. या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या कथा लिहिल्या पटकथा लेखक म्हणून, सलीम खानच्या लेखणीने हिंदी चित्रपटसृष्टीत असंख्य ब्लॉकबस्टर कथा निर्माण केल्या आहेत. जावेद अख्तर यांच्यासोबत त्यांनी जवळजवळ दोन डझन चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. त्यांच्या लोकप्रिय चित्रपटांची नावे अशी आहेत: सीता और गीता, शोले, डॉन, दीवार, जंजीर, हाथ मेरे साथी, मिस्टर इंडियाचा समावेश आहे.

Salim Khan Hospitalized : सलीम खान यांची प्रकृती बिघडली रुग्णालयात दाखल; कारण काय? Read More »