DNA मराठी

eknath Shinde

Ajit Pawar: अजित पवार नॉट रिचेबल, अनेक चर्चांना उधाण; शरद पवार म्हणाले, अजित पवारांची…

Ajit Pawar:  एकीकडे राज्यात महायुतीच्या नेत्यांकडून लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी जोरदार प्रचार होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील महाराष्ट्रावर विशेष लक्ष देत रोडशो आणि अनेक जाहीर सभा घेत आहे. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातून अचानक गायब झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा देखील अजित पवार उपस्थित नव्हते.  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते मात्र अजित पवार उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. यामुळे अजित पवार नेमकं कुठे आहे याबाबत राष्ट्रवादी नेत्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अजित पवारांची तब्येत बरी नसल्याचे सांगितले. माञ राजकीय वर्तुळात अजित पवार महायुतीवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.  यामुळे अचानक लोकसभा प्रचारातून अजित पवार गायब झाले असल्याची चर्चा होत आहे.  अजित पवार नेमकं कुठे गायब झाले? याबाबत सर्व शरद पवार यांना प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देत शरद पवार म्हणाले अजित पवारांची तब्येत खराब आहे आणि यामुळे ते आराम करत आहे असं शरद पवार म्हणाले. मात्र अजित पवार महायुतीच्या काही नेत्यांवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून मुंबईत आज होणाऱ्या महायुतीच्या सभेत अजित पवार हजर राहणार का? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

Ajit Pawar: अजित पवार नॉट रिचेबल, अनेक चर्चांना उधाण; शरद पवार म्हणाले, अजित पवारांची… Read More »

Sujay Vikhe News: महाविकास आघाडीचे कुणी आले तरी विजय सुजय विखेंचाच: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Sujay Vikhe News: महाराष्ट्र मजबूत  झाला तरच देश मजबूत होईल, मोदींच्या विकासाचे यान चंद्रावर पोहचले आहे. मात्र राहूल गांधीचे यान अद्यापही लॉंच होऊ शकले नाही. महाविकास आघाडीचे कुणी आले तरी विजय सुजय विखेंचाच होईल, कारण आता जनतेचा विश्वास फक्त मोदी गॅरेंटीवर असल्याचे प्रदिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते डॉ. सुजय विखे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या सभेत ते बोलत होते.    नगर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील  यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आयोजित केलेल्या जाहीर सभेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. प्रा.राम शिदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, आ. संग्राम जगताप, माजी अरूणकाका जगताप, आ. मोनिका राजळे, शिवसेनेचे जिल्‍हा प्रमुख बाबुशेवठ टायरवाले,भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष दिलीप भालसिंग , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, शहर अध्‍यक्ष अभय आगरकर, रिपाईचे भैलुमे यांच्‍यासह राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, रिपब्लिक पार्टी आठवले गट तथा मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.  ततपुर्वी महायुतीच्या वतीने नगर शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आलेल्या प्रचार फेरीतून डॉ. सुजय विखे पाटील यांनी भव्य शक्ती प्रदर्शन केले. प्रभातफेरीपुर्वी डॉ.सुजय विखे पाटील यांनी शहरातील सर्व महापुरूषांना विनम्र अभिवादन केले.या रॅलीमध्ये महिला युवक, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिल्लीगेट चौकात या रॅलीचा समारोप झाला.  त्यानंतर झालेल्या सभेत बोलताना मुख्यंत्री एकनाथ शिदे म्हणाले की , ड्रामा करून कुणी निवडून येत नाही. विखे परिवाराला समाजकारणाची मोठी परंपरा आहे. स्व डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात मोठे योगदान असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलरावांच्या   आठवणींना उजाळा दिला. त्यांचा  वारसा स्व. बाळासाहेब विखे यांची पुढे नेला,तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याचा वटवृक्ष केला.आणि सुजय विखे हा वारसा अविरत चालवत आहेत. यामुळे सुजय विखे हे सर्वांच्या सुखादुखात धावून जातात. त्यांना तरूणांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यांनी जिल्ह्याचे तसेच महाराष्ट्रातील अनेक प्रश्न मोठ्या प्रभावीपणे लोकसभेत मांडले आहेत. यामुळे ज्याच्या नावातच जय आहे त्याचा पराभव अशक्य आहे. डॉ. विखे खासदार झाल्यावर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीप मध्ये सामिल होणार आहेत. यामुळे नगर जिल्ह्याचा विकास जलद गतीने होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  या सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात  इंडी आघाडीचा चांगलाच समाचार घेतला. फडणवीस म्हणाले की, महायुती सरकार ही विकासाची गाडी असून त्याला वेगवान पंतप्रधान मोदी यांचे इंजिन आहे. तर दुसरीकडे इंडी आघाडीत सर्वच स्वताला इंजिन समजतात. राहूल गांधी, उध्दव ठाकरे, शरद पवार, ममता बॅनर्जी, असे सर्वच नेते आपल्याला इंजिन समजत असल्याने इंजिनमध्ये केवळ ड्रायवरला बसायला जागा असते. सर्वसामान्यांना इंजिनमध्ये बसता येत नाही.  राहूल सोनिया गाधीच्या इंजिन मध्ये राहूल गांधी बसतील होतील, शरद पवारांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळे बसतील होतील तर उध्दव ठाकरेंच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरे असतील अशी मार्मिक टिका करून दुसरीकडे मोदींच्या विकासाच्या इंजिनला भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, आणि इतर मित्र पक्षांचे डबे आहेत. तिथे सर्वांना बसण्यासाठी जागा आहे. मोदींच्या गॅरंटीमध्ये सबका साथ सबका विकास हे धोरण आहे. त्यामुळे नगर जिल्ह्याच्या विकासासाठी डॉ.सुजय विखे यांचा डबा मोदींच्या गाडीला जोडण्यासाठी १३ मेला मोठ्या मताधिक्याने सुजय विखे यांना मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या प्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले.तर खा. डॉ, सुजय विखे पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Sujay Vikhe News: महाविकास आघाडीचे कुणी आले तरी विजय सुजय विखेंचाच: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

Lok Sabha Election 2024  : महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटेना, ‘या’ 2 जागा भाजपसाठी ठरल्या डोकेदुखी ?

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सत्ताधारी महायुतीमध्ये अद्याप देखील जागा वाटपाचा प्रश्न सुटलेला नाही.  यामुळे राज्यात 48 लोकसभा जागांपैकी कोण किती जागावर निवडणूक लढवणार याची अपचारीक घोषणा झालेली नाही.  तर दुसरीकडे मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीतील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे वृत्त आहे. महायुतीच्या 48 पैकी 46 जागांचा फॉर्म्युला निश्चित झाला असून, 2 जागांसाठी अजूनही लढत सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.  भाजपने राज्यात आतापर्यंत 23 उमेदवार जाहीर केले आहेत. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही.मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक आणि ठाण्याच्या जागांबाबत सत्ताधारी महायुतीमध्ये अद्यापही चुरस सुरू आहे. ठाणे लोकसभा जागा मिळविण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. ठाण्यात आपली ताकद शिवसेनेपेक्षा जास्त असल्याचा भाजपचा तर्क आहे. त्याचवेळी ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्यानं शिंदे सेना ठाण्याची जागा सोडायला तयार नाहीत. त्यामुळे ही जागा त्यांच्या प्रतिष्ठेची आहे. ठाण्याव्यतिरिक्त नाशिकच्या जागेवरही तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. या जागांवर शिंदे यांची शिवसेना निवडणूक लढवू शकते कल्याण, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, पालघर, मावळ, रामटेक, कोल्हापूर, हातकणंगले, बुलढाणा, शिर्डी, हिंगोली, यवतमाळ-वाशीम. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला या जागा मिळतील बारामती, शिरूर, रायगड, परभणी (महादेव जाणणे). याशिवाय राज्यातील उर्वरित जागा भाजपच्या खात्यात जाऊ शकतात. ठाण्याला महत्त्व का?  सध्या ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे आहेत. ते उद्धव ठाकरेंच्या गटात आहेत. या लोकसभा मतदारसंघात भाजपचे 4 आणि शिवसेनेचे 2 आमदार आहेत. याशिवाय हा मतदारसंघ मुख्यमंत्री शिंदे यांचाही मतदारसंघ आहे. नाशिकमध्येही अडचणी? नाशिकच्या जागेवर तिन्ही पक्षांना निवडणूक लढवायची आहे. सध्या नाशिकमधून शिंदे गटाचे हेमंत गोडसे खासदार आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे दिग्गज अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना नाशिकची जागा हवी आहे. याशिवाय ठाण्यात ताकद दाखवून हेमंत गोडसे यांनी आपले इरादे व्यक्त केले आहेत. रविवारी रात्री शिवसेनेचे नाशिकचे सर्व आमदार, अधिकारी आणि खुद्द खासदार गोडसे हे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर जमले होते. नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपचे तीन आमदार आहेत. त्यामुळे ही जागा काबीज करण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत आहे. तर नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचा 1 आमदार आहे. त्यामुळे संख्याबळाचा विचार करता येथे शिवसेनेची ताकद कमी लेखली जात असल्याने राष्ट्रवादी आणि भाजपला ही जागा मिळवायची आहे.  तर मुख्यमंत्री शिंदे यांनी हेमंत गोडसे यांना नाशिकची जागा जाऊ देणार नाही, असे आश्वासन दिले आहे.

Lok Sabha Election 2024  : महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटेना, ‘या’ 2 जागा भाजपसाठी ठरल्या डोकेदुखी ? Read More »

Loksabha Election 2024 :  ‘या’ जागांवरून भाजप-शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच, कोण घेणार माघार?

Loksabha Election 2024 : एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा जाहीर केल्या आहेत.  यावेळी लोकसभा निवडणुकीत देशात 19 एप्रिलपासून एकूण 7 टप्प्यात मतदान होणार आहे. तर या सातपैकी पहिल्या पाच टप्प्यात राज्यात मतदान होणार आहे. मात्र अद्याप देखील राज्यात सत्तेत असणारी महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरू शकलेला नाही.  काही दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यात आले होते तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याशी जागा वाटपाबाबत चर्चा केली होती. मात्र महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरू शकला नाही. दुसरीकडे, भाजपने राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 20 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यात 25 जागा लढवल्या होत्या. यावेळीही त्यापैकी 20 जागांवर उमेदवार उभे करण्यात आले आहेत. ताज्या वृत्तानुसार भाजप आणि शिवसेना यांच्यात चार जागांवर जोरदार रस्सीखेच सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत या चारही जागा शिवसेनेने (अविभक्त) जिंकल्या होत्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतर या मतदारसंघातील खासदारांनी एकनाथ शिंदे यांची बाजू घेण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी त्यांना पाठिंबा देणाऱ्या 13 खासदारांची तिकिटे कापू नयेत, अशी मागणी केली आहे. ते मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्याची विनंतीही शिंदे यांनी शहा यांना केली होती. मात्र त्यानंतरही भाजप त्या चार जागांसाठी आग्रही आहे. जागावाटप जिंकण्याच्या क्षमतेच्या आधारे व्हायला हवे, असा युक्तिवाद भाजप करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या जागांवर भाजपचा डोळा? वृत्तानुसार भाजपने रामटेक, यवतमाळ-वाशीम, कोल्हापूर आणि उत्तर पश्चिम मुंबईच्या जागांवर दावा केला आहे. सध्या या चार जागांवर शिंदे गटाचे खासदार आहेत. मात्र यावेळी भाजपला या मतदारसंघात आपले उमेदवार उभे करायचे आहेत.  प्रत्यक्षात शिंदेंच्या खासदारांना पुन्हा तिकीट न मिळाल्यास पक्षात अंतर्गत कलह निर्माण होण्याची शक्यता असून अनेक नेतेही शिंदे यांची साथ सोडू शकतात. त्यामुळे कोणत्याही पक्षात नाराजी नको म्हणून जागावाटपाच्या अशा सूत्रावर चर्चा सुरू आहे.

Loksabha Election 2024 :  ‘या’ जागांवरून भाजप-शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच, कोण घेणार माघार? Read More »

Maharashtra Politics : MVA मध्ये एकमत! ‘इतक्या’ जागांवर काँग्रेस लढवणार निवडणूक

Maharashtra Politics: महाविकास आघाडीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एक मत झालं आहे. MVA ने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला असून याचा औपचारिक घोषणा दोन दिवसांत होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गट राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 20 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस किमान 10 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. तर काँग्रेस लोकसभेच्या 18 जागांवर निवडणूक लढवणार आहे. याशिवाय प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला दोन जागा मिळतील. उद्धव गट व्हीबीएला दोन जागा देणार आहे. व्हीबीएने पाच जागांची मागणी केली होती.  तर पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष म्हणून राजू शेट्टी यांना पाठिंबा देणार आहे. वृत्तानुसार, उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईतील लोकसभेच्या सहापैकी चार जागा लढवणार आहे. त्यापैकी मुंबई नॉर्थ ईस्टची एक जागा व्हीबीएला देता येईल. विशेष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष दोन गटात विभागले गेले असून त्यांचा प्रत्येक गट हा बहुतांश आमदारांसह सत्ताधारी महायुतीच्या युतीचा भाग आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपसोबत युती करून 23 जागा लढवल्या होत्या. यामध्ये भाजपला 23 तर शिवसेनेला 18 जागांवर यश मिळाले.  शिवसेनेने मुंबईच्या दक्षिण मध्य आणि उत्तर-पश्चिमच्या जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने 25 जागा लढवून केवळ चंद्रपूर जिंकले, तर राष्ट्रवादीने 19 जागा लढवून चारवर विजय मिळवला.  अविभाजित शिवसेनेने 2019 ची निवडणूक भाजपसोबत युती करून लढवली होती आणि लोकसभेच्या 18 जागा जिंकल्या होत्या. मात्र तत्कालीन शिवसेना आता दोन गटात विभागली गेली आहे. त्यापैकी केवळ 5 खासदार उद्धव यांच्यासोबत आहेत, तर उर्वरित 13 खासदार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे आहेत. भाजपसाठी महाराष्ट्र जिंकणे महत्त्वाचे भाजपने महाराष्ट्रात लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. खरे तर, उत्तर प्रदेश (80 जागा) नंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक 48 जागा आहेत. त्यामुळे ही दोन्ही राज्ये भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यासाठी विशेष रणनीतीही आखण्यात आली आहे. 2019 मध्ये निकाल कसे लागले? गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपसह शिवसेनेने 23 जागा लढवल्या होत्या. तेव्हा शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या. तर, काँग्रेसने 25 ठिकाणी निवडणूक लढवली आणि त्यांना केवळ एक जागा जिंकता आली. राष्ट्रवादीने 19 जागा लढवून चार जागा जिंकल्या. तेव्हा प्रकाश आंबेडकर यांच्या पक्ष व्हीबीएने लोकसभेच्या 48 पैकी 47 जागा लढवल्या होत्या. मात्र, एकही जागा जिंकता आली नाही. पण व्हीबीएला सुमारे सात टक्के मते मिळाली. त्यावेळी राज्यात भाजपला सुमारे 28 टक्के, शिवसेनेला 23 टक्के, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 16 टक्के मते मिळाली होती. असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएमला एक टक्क्यांहून कमी मते मिळाली, परंतु औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एआयएमआयएमला यश मिळाले.

Maharashtra Politics : MVA मध्ये एकमत! ‘इतक्या’ जागांवर काँग्रेस लढवणार निवडणूक Read More »

Sanjay Gaikwad  :  ‘शिकारी आमदार’ च्या अडचणीत वाढ, वाघाच्या दातांचा हार जप्त, गुन्हा दाखल

Sanjay Gaikwad  : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आणि आमदार संजय गायकवाड अचानक चर्चेत आले आहे. त्यांनी 1987 मध्ये वाघाची शिकार केल्याचा दावा केला आहे. यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे.  गायकवाड यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून हा दावा केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी वाघाची शिकार केल्याचा दावा केला असून त्याच वाघाचे दात गळ्यात घातले आहेत. यानंतर संजय गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे महाराष्ट्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वाघाचे कथित दातही जप्त करण्यात आले आहेत. त्यांचा दावा खरा ठरल्यास त्यांना एक लाख रुपये दंड आणि तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. बुलढाणा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे संजय गायकवाड यांनी दावा केला आहे की, आपण 37 वर्षांपूर्वी वाघाची शिकार केली होती आणि त्याचे तुकडे गळ्यात घातले होते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी शुक्रवारी दात असलेली जपमाळ जप्त केली आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी डेहराडून येथील प्रयोगशाळेत पाठवली. वाघाचे दात खरेच काढले आहेत का, याची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल. आमदाराविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिका-यांनी सांगितले की लॅबचे निकाल 20 ते 25 दिवसांत येण्याची शक्यता आहे. शिवसेना नेत्याचे दावे खरे ठरल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. गायकवाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाचे नेते असून त्यांनी अलीकडेच वाघाची शिकार केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.  गायकवाड यांचे दावे खरे ठरले तर ते मोठे संकटात सापडू शकतात. कारण या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

Sanjay Gaikwad  :  ‘शिकारी आमदार’ च्या अडचणीत वाढ, वाघाच्या दातांचा हार जप्त, गुन्हा दाखल Read More »

Maratha Reservation: मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, सरकारने उचलले ‘हे’ पाऊल

Maratha Reservation :  10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहे. आज या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे.  राज्य सरकारने गेल्या महिन्यात काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास मुंबईत नव्याने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. वृत्तानुसार, मनोज जरांगे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. बुधवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सलाईन द्यावे लागले. मात्र नंतर त्यांनी सलाईन काढून आरक्षण लागू होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याची घोषणा केली. त्यानंतर आज मनोज जरांगे यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे.  गावकरी आणि मराठा कार्यकर्त्यांच्या वारंवार सांगण्यावरून त्यांनी थोडे पाणी प्यायले. दरम्यान, उपोषणस्थळी मोठ्या संख्येने लोक जमा झाले आहेत. मनोज जरांगे यांची प्रकृती चिंताजनक मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा सातवा दिवस आहे. आता त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे, ही चिंतेची बाब आहे. शरीरात पाण्याची तीव्र कमतरता आहे. अशक्तपणामुळे त्याला चक्कर येत आहे. अन्न, पाणी आणि औषधही घेण्यास नकार देणाऱ्या पाटील यांना तातडीने उपचारांची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मराठा आंदोलक त्यांना सतत पाणी पिण्याचा आग्रह करत आहेत.   PM मोदींचा कार्यक्रम थांबवणार – जरांगे मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळत असल्याचे पाहून काल त्यांना पाणी देण्यात आले. यामुळे ते संतप्त झाले आणि म्हणाले, “ज्यांनी मला झोपेत पाणी दिले तेच आता मराठा आरक्षण लागू करण्याची जबाबदारी घेत आहेत.” सरकार गप्प बसू शकत नाही आणि असे मानू शकत नाही की माझेच लोक या मार्गाने माझा मृत्यू रोखतील. जर सरकारने दोन दिवसांत कारवाई केली नाही तर मी पुन्हा मुंबईत उपोषण सुरू करेन. याआधी जरांगे यांनी आंदोलनस्थळावरूनच इशारा दिला होता की, जर आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर पीएम मोदींची एकही रॅली महाराष्ट्रात होऊ दिली जाणार नाही. 20 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला. मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी 20 फेब्रुवारीला विधानसभेचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यास शिंदे सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता 20 फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी अधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे. कुणबी मराठ्यांच्या रक्ताच्या नातेवाइकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतच्या प्रारुप अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. हायकोर्टात सरकार काय म्हणाले? दरम्यान, बुधवारी महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले की, इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गात कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन पात्र मराठ्यांचा समावेश करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत. मराठा समाजाला ओबीसी गटांतर्गत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणाला बसण्याची गेल्या वर्षभरात ही चौथी वेळ आहे.

Maratha Reservation: मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, सरकारने उचलले ‘हे’ पाऊल Read More »

Maharashtra Politics: मुंबईसाठी भाजपचा मास्टर प्लान तयार! शिंदे गटाला मिळणार फक्त ‘इतक्या’ जागा

प्रतिनिधी : सय्यद शाकीर  Maharashtra Politics : भारतीय निवडणूक आयोग येत्या काही दिवसात लोकसभा निवडणूक जाहीर करणार आहे. यामुळे आत्तापासूनच सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या तयारीला सुरुवात केली आहे. सर्व पक्ष आता जागा वाटपावरून एकमेकांशी बोलताना दिसत आहे.  तर दुसरीकडे राज्यात आणि केंद्रामध्ये सत्तेत असणारे भारतीय जनता पक्षाने मुंबईसाठी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भाजप मुंबई सर्वाधिक लोकसभा जागा लढू शकते. यामुळे शिंदे गटाला मुंबईत लोकसभेचे किती जागा मिळणार आता हे पाहावे लागणार आहे.   राज्याची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राज्यात बहुतेक ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती अशी थेट लढत होणार आहे. यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.  2019 च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील साही जागांवर भाजप शिवसेनेने विजय मिळवला होता मात्र आता मुंबईत ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट आणि भाजप अशी लढत होणार आहे. यामुळे भाजपने एक खास प्लॅन रेडी केला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील सहा लोकसभा जागांपैकी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष चार जागांवर निवडणूक लढवू शकते. भाजप उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईसह भाजप दक्षिण मुंबईच्या लोकसभेच्या जागेवर उमेदवार देऊ शकते. जर असं झालं तर शिंदे गटाला फक्त 2 लोकसभा जागा मुंबईमध्ये मिळणार. शिंदे गटाला भाजप उत्तर पश्चिम आणि मुंबई साऊथची जागा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Politics: मुंबईसाठी भाजपचा मास्टर प्लान तयार! शिंदे गटाला मिळणार फक्त ‘इतक्या’ जागा Read More »

PM Modi: ‘लेक लाडकी योजने’चा शुभारंभ! ‘या’ मुलींना मिळणार 1 लाख रुपये

PM Modi: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला अनेक योजनांची भेट आहे. त्यांनी तब्बल 30,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.  याच बरोबर त्यांनी ‘लेक लाडकी योजने’चा शुभारंभ केला आणि काही लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत पहिला हप्ता दिला. तुमच्या माहितीसाठी जाणुन घ्या,  या योजनेंतर्गत राज्यातील मुलींना 1 लाख 1 हजार रुपये मिळणार आहेत.  एकनाथ शिंदे सरकारने ऑक्टोबर महिन्यात मुलींना मोठी भेट दिली होती. मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. लेक लाडकी योजना मार्च 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर करण्यात आली होती. त्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ‘लेक लाडकी योजने’च्या माध्यमातून  गरीब कुटुंबातील मुलींना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेंतर्गत मुलींना 1 लाख 1 हजार रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. ही आर्थिक मदत मुलीच्या जन्मानंतर ती 18 वर्षांची होईपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांत दिली जाईल. मुलींना सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे. लेख लाडकी योजना विशेषतः राज्यातील पिवळे आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील मुलींसाठी आहे. या योजनेंतर्गत मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये दिले जातील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्य सरकारकडून थेट खात्यात पैसे पाठवले जातील. पैसे कधी मिळणार? लेक लाडकी योजनेंतर्गत  सरकार मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये देणार आहे. त्यानंतर जेव्हा मुलगी पहिली प्रवेश करेल तेव्हा तिला 6000 रुपये मिळतील. तिसरा हप्ता मुलगी सहाव्या इयत्तेत पोहोचल्यावर दिला जाईल. त्यानंतर राज्य सरकारकडून 7000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. तसेच, मुलगी अकरावीत पोहोचल्यावर 8000 रुपयांची मदत दिली जाईल. मुलगी 18 वर्षांची झाल्यावर शेवटचा हप्ता मिळेल. मुलगी पूर्ण झाल्यानंतर तिला महाराष्ट्र सरकारकडून 75000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. योजनेचा लाभ कोणाला मिळणार? 1 एप्रिल 2023 नंतर एका कुटुंबात 1 किंवा 2 मुली किंवा 1 मुलगा आणि 1 मुलगी जन्माला आल्यास त्या मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. जर दुस-या प्रसूतीदरम्यान जुळी मुले जन्माला आली तर एक मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. परंतु ‘लेक लाडकी योजने’चा लाभ घेण्यासाठी आई किंवा वडिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागेल. 1 एप्रिल 2023 पूर्वी मुलगी किंवा मुलगा जन्माला आला असेल आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यासही या योजनेचा लाभ मिळेल. दोन्ही जुळ्या मुलींना स्वतंत्रपणे योजनेचा लाभ दिला जाईल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

PM Modi: ‘लेक लाडकी योजने’चा शुभारंभ! ‘या’ मुलींना मिळणार 1 लाख रुपये Read More »

Maharashtra News : भाजप पुन्हा देणार अनेकांना धक्का! शिंदे अपात्र ठरल्यास, कोण होणार मुख्यमंत्री?

Maharashtra News:  आज दुपारी चार वाजता महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राज्यातील राजकारणाचा सर्वात मोठा निर्णय देणार आहे. दुपारी चार वाजता विधानसभा अध्यक्ष शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात आपला निकाल देणार आहे. या निकालावर एकनाथ शिंदे यांच्या सरकारचं भवित्व अवलंबून आहे. यामुळे या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. जर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवलं तर राज्याचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र सध्या  सरकारला कोणताही धोका नाही असं सांगितलं जात आहे.  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी बोलताना निर्णय काहीही आला तरी आमचं सरकार स्थिर राहील अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आला आहे. यामुळे भाजपकडे बी प्लॅन रेडी असल्यास बोललं जात आहे.  आगामी विधानसभा निवडणुका पाहता भाजप पुन्हा एकदा अनेकांना धक्का देण्याची तयारी करत असल्यास राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. यामुळे जर आज एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर अजित पवार यांना भाजप मुख्यमंत्री पद देऊ शकते अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे.  भाजप युतीकडे बहुमत आहे.अजित पवारांचा गट देखील आता भाजपसोबत आला आहे. अजित पवार यांच्याकडे 40 आमदार असल्याचं देखील बोललं जात आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत भाजपने 105 जागा जिंकले होते. त्यात आता अजित पवार गट आणि इतर काही अपक्ष आमदार यांची बेरीज केल्यास भाजपकडे पुन्हा एकदा बहुमत सिद्ध होईल.

Maharashtra News : भाजप पुन्हा देणार अनेकांना धक्का! शिंदे अपात्र ठरल्यास, कोण होणार मुख्यमंत्री? Read More »