Dnamarathi.com

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सत्ताधारी महायुतीमध्ये अद्याप देखील जागा वाटपाचा प्रश्न सुटलेला नाही. 

यामुळे राज्यात 48 लोकसभा जागांपैकी कोण किती जागावर निवडणूक लढवणार याची अपचारीक घोषणा झालेली नाही. 

तर दुसरीकडे मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीतील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे वृत्त आहे. महायुतीच्या 48 पैकी 46 जागांचा फॉर्म्युला निश्चित झाला असून, 2 जागांसाठी अजूनही लढत सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

भाजपने राज्यात आतापर्यंत 23 उमेदवार जाहीर केले आहेत. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही.मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक आणि ठाण्याच्या जागांबाबत सत्ताधारी महायुतीमध्ये अद्यापही चुरस सुरू आहे. ठाणे लोकसभा जागा मिळविण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.

ठाण्यात आपली ताकद शिवसेनेपेक्षा जास्त असल्याचा भाजपचा तर्क आहे. त्याचवेळी ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्यानं शिंदे सेना ठाण्याची जागा सोडायला तयार नाहीत. त्यामुळे ही जागा त्यांच्या प्रतिष्ठेची आहे. ठाण्याव्यतिरिक्त नाशिकच्या जागेवरही तिन्ही पक्षांनी दावा केला आहे.

या जागांवर शिंदे यांची शिवसेना निवडणूक लढवू शकते

कल्याण, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, पालघर, मावळ, रामटेक, कोल्हापूर, हातकणंगले, बुलढाणा, शिर्डी, हिंगोली, यवतमाळ-वाशीम.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला या जागा मिळतील

बारामती, शिरूर, रायगड, परभणी (महादेव जाणणे). याशिवाय राज्यातील उर्वरित जागा भाजपच्या खात्यात जाऊ शकतात.

ठाण्याला महत्त्व का? 

सध्या ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे आहेत. ते उद्धव ठाकरेंच्या गटात आहेत. या लोकसभा मतदारसंघात भाजपचे 4 आणि शिवसेनेचे 2 आमदार आहेत. याशिवाय हा मतदारसंघ मुख्यमंत्री शिंदे यांचाही मतदारसंघ आहे.

नाशिकमध्येही अडचणी?

नाशिकच्या जागेवर तिन्ही पक्षांना निवडणूक लढवायची आहे. सध्या नाशिकमधून शिंदे गटाचे हेमंत गोडसे खासदार आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे दिग्गज अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना नाशिकची जागा हवी आहे. याशिवाय ठाण्यात ताकद दाखवून हेमंत गोडसे यांनी आपले इरादे व्यक्त केले आहेत. रविवारी रात्री शिवसेनेचे नाशिकचे सर्व आमदार, अधिकारी आणि खुद्द खासदार गोडसे हे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर जमले होते.

नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपचे तीन आमदार आहेत. त्यामुळे ही जागा काबीज करण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत आहे. तर नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचा 1 आमदार आहे. त्यामुळे संख्याबळाचा विचार करता येथे शिवसेनेची ताकद कमी लेखली जात असल्याने राष्ट्रवादी आणि भाजपला ही जागा मिळवायची आहे.

 तर मुख्यमंत्री शिंदे यांनी हेमंत गोडसे यांना नाशिकची जागा जाऊ देणार नाही, असे आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *