DNA मराठी

DNA Marathi News

जयकुमार गोरे यांच्याकडून मातंग समाजाच्या न्यायात अडथळा, रोहित पवारांचा आरोप

Rohit Pawar: राज्यातील राजकारणात एक मोठा खळबळजनक प्रकार समोर आला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी थेट मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करत मोठा पर्दाफाश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पवार हे गोरे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्याच्या तयारीत होते. मात्र आता त्यांनी गोरे यांच्या कथित गैरकारभाराची सविस्तर माहिती देत त्यांच्या कारभारावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मातंग समाजाला न्याय मिळण्यात अडथळारोहित पवार यांनी सांगितले की, “मी सुरुवातीपासून महिलेला न्याय मिळावा यासाठी प्रयत्नशील होतो. मात्र, मंत्री गोऱ्हे हे मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन दबाव आणण्याचे काम करत आहेत.” पवार यांनी असा धक्कादायक आरोप केला की, गोरे यांनी त्यांच्या भागातील कॉलेजला रस्ता मिळावा यासाठी मातंग समाजातील मृत व्यक्तीचे खोटे आधार कार्ड तयार करून त्याला जिवंत दाखवले. या मृत व्यक्तीचे नाव पिराजी भिसे असून, त्यांचा मृत्यू 8 ऑक्टोबर 2016 रोजी झाला होता. भिसे यांच्या कुटुंबाने याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली असून सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. खोट्या सहीने जमीन हडप करण्याचा आरोप“पिराजी भिसे यांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांचे खोटे कागदपत्र तयार करण्यात आले. भिसे हे अंगठा लावत असताना त्यांच्या नावावर तोतयाने सही केली. ही गंभीर फसवणूक असून यामुळे अॅट्रॉसिटी कायद्याचाही भंग होतो. एवढ्या गंभीर प्रकारानंतरही गोरे यांना जामीन मिळाला,” असा आरोप पवार यांनी केला. विशेष म्हणजे, ज्या न्यायाधीशाने गोरे यांना जामीन दिला, त्यांना उच्च न्यायालयाने डिमोट केल्याचेही पवार यांनी सांगितले. कोरोना काळातील योजनांचा गैरवापरया प्रकरणात आणखी गंभीर बाब उघड करत रोहित पवार म्हणाले, “गोरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्याचा फोटो वापरून कॉलेज रजिस्टरसाठी कागदपत्रे तयार केली. कोविड काळात सामान्य माणूस बाहेर फिरू शकत नव्हता. याच काळाचा फायदा घेत गोरे यांनी आपल्या फायद्यासाठी कॉलेज रजिस्टर केलं.” तसेच “मायनी मेडिकलमध्ये 3 कोटी 25 लाख रुपयांची अनियमितता झाली असून, हे मेडिकल देशमुख कुटुंबाशी संबंधित आहे, ज्यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली होती,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला. गोरे यांना मोठ्या ताकदीचा पाठिंबा असल्याचा दावाया संपूर्ण प्रकरणात गोरे यांच्या पाठीमागे मोठ्या ताकदीचा पाठिंबा असल्याचा दावा करत रोहित पवार म्हणाले, “देवा भाऊ त्यांच्या पाठीशी आहेत, म्हणूनच ते वाचत आहेत. पण पाठीशी कितीही मोठी शक्ती असली, तरी आम्ही न्यायासाठी लढत राहू.” तसेच या प्रकरणात पूर्ण पारदर्शकता यावी आणि सत्य बाहेर यावे, यासाठी आपला लढा सुरूच राहील, असेही पवार यांनी स्पष्ट केले. राजकीय वर्तुळात खळबळया आरोपांमुळे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता या प्रकरणाची चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रिया कोणत्या वळणावर जाते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. रोहित पवार यांनी केलेले आरोप जर खरे ठरले, तर गोऱ्हे यांच्यासह संबंधितांवर मोठी कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जयकुमार गोरे यांच्याकडून मातंग समाजाच्या न्यायात अडथळा, रोहित पवारांचा आरोप Read More »

कुणाल कामराचं लोकेशन ट्रेस करतोय, कारवाई होणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा इशारा

Yogesh Kadam : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान भवन आवारात पत्रकारांशी बोलताना वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्यावर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. “कुणाल कामराचं लोकेशन आम्ही ट्रेस करतोय. जो कोणी कायदा हातात घेईल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असं कदम यांनी ठणकावून सांगितलं. संविधानाने बोलण्याचा अधिकार दिला असला तरी संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींवर टीका करणं योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ठाकरे गटावरही निशाणा साधताना ते म्हणाले, “ठाकरे गटाने कायदा आणि सुव्यवस्था आम्हाला शिकवू नये. राज्यात शांतता राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” कुणाल कामरा याने अलीकडेच सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतल्याचं दिसत आहे. कदम यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून, काहींनी याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचा आरोप केला आहे. तर काहींनी सरकारच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. कुणाल कामराने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही या मुद्द्यावर भाष्य केलं. ते म्हणाले, “एकनाथ शिंदेंचं कर्तृत्व मोठं आहे. व्यंगात्मक टीका ही ठाकरेंची ताकद होती, पण आता त्यांचे कार्यकर्ते असतील तर याकडे दुर्लक्ष करायला हवं. राजीव गांधींबद्दल एका सिरीजमध्ये काही बोललं गेलं तेव्हा राहुल गांधी म्हणाले होते की त्यांचं कर्तृत्व छोटं होत नाही. कलाकार काही बोलला म्हणून त्याचं ऑफिस फोडणं चुकीचं आहे.” पवार यांनी पुढे सावधगिरीचा इशारा देताना म्हटलं, “2014, च्या आधीचा काळ आता नाही. एखाद्या नेत्यावर बोलताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मर्यादित झालं आहे, त्यामुळे काळजी घ्यावी. व्यंगात्मक टीकेमुळे एकनाथ शिंदेंची उंची कमी होत नाही.” या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. पुढील घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कुणाल कामराचं लोकेशन ट्रेस करतोय, कारवाई होणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा इशारा Read More »

Maharashtra News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार असलेल्या आरोपीला अटक

Maharashtra News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून सहा महिण्यापासुन फरार असलेल्या आरोपीला शेवगाव पोलीसांनी अटक केली आहे. संदिप सरसे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. माहितीनुसार, 25 सप्टेंबर 2024 रोजी पिडीतेला फोन करून पिडीतेच्या घराचे काही अंतरावर असलेल्या बौध्द समाज मंदीराचे आवारात भेटण्यासाठी बोलावुन पिडितेच्या आई वडिलांना जिवे ठार मारण्याची धमकी देवुन पिडीतेवर अत्याचार केला होता. या प्रकरणात शेवगांव पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहीता कलम 64, 65(1), 351 (1) सह बा.लै.अत्या.अधि. 4,8,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आरोपी सहा महिन्यापासून फरार होता. आरोपीबाबत पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, नमुद गुन्ह्यातील आरोपी हा सुपा ता. पारनेर जि. अहिल्यानगर येथुन जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावरून शेवगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Maharashtra News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार असलेल्या आरोपीला अटक Read More »

Jayant Patil: आपण एका कबरीच्या मागे लागलो, जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल

Jayant Patil: विधानसभेत विरोधी पक्षाच्या 293 अन्वये प्रस्तावावर चर्चा करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. बाहेरच्या देशांनी सुनिता विल्यम्स यांना पृथ्वीवर परत आणले. जग अवकाशात पोहोचले आहे आणि आपण एका कबरीच्या मागे लागलो आहोत असा टोला त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना लगावला. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, आधुनिक पद्धतीने शेती करणारे राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास नागरे या आपल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. शिवारात कायमच पाण्याची चणचण होती ही समस्या दूर करण्यासाठी त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन एक आंदोलन उभारले होते. ओवर फ्लो झालेल्या खडकपूर्णा धरणातून पाणी सोडावे अशी त्यांची मागणी होती. तसे लेखी आश्वासनही अधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु मार्च महिना उजाडला तरीही मागणी मान्य न झाल्याने अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. हे अतिशय दुर्दैवी आहे. असं जयंत पाटील म्हणाले. तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1883 मध्ये “शेतकऱ्यांचा आसूड” हे पुस्तक लिहिले त्याकाळी फुलेंनी मांडलेल्या समस्या आजही कायम आहेत कारण शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी राज्यकर्ते कमी पडत आहेत. सातत्याने तोट्याची शेती आणि त्यातून होणारी आर्थिक कुचंबना हे आत्महत्यांचे मूळ कारण आहे. मागच्या वर्षभरात मराठवाडा आणि विदर्भात सुमारे 2706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. योग्य सिंचन व्यवस्था नाही, वीज पुरवठा नाही, जीएसटीचा अतिरिक्त भार त्यात सावकारी बेहिशोबी कर्जाचा पाश यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सत्ता आल्या गेल्या मात्र शेतकऱ्यांना न्याय अद्याप मिळालेला नाही. असेही जयंत पाटील म्हणाले. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आज ज्यांनी खऱ्या अर्थाने ही मुंबई घडवली त्यांना मुंबईत राहण्याची भ्रांती करावी लागते. कारण त्यांच्या घरांवर परप्रांतीयांचा डोळा आहे. मुंबईत 200-300 अमराठी विकासक आहेत. त्या तुलनेत मराठी विकासक फार कमी आहे. हे परप्रांतीय विकासक सहाव्या मजल्यावर बसूऊ मुंबईतील इंच न इंच जमिनीची सौदेबाजी करतात. काही एस आर ए प्रकल्प 15 वर्षांपासून प्रलंबित आहेत. ट्रान्झिट कॅम्पमध्ये लोकांची गैरसोय झाली आहे. विकासकांनी त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. जाणून-बुजून प्रकल्प प्रलंबित ठेवणाऱ्या विकासकांवर कारवाई का होत नाही? त्यांच्यावर फौजदारी होणे दाखल होणे गरजेचे आहे. काळा चौकीत राहणाऱ्या प्रणय बोडके या युवकाला चुकीच्या मार्गाने येणाऱ्या शिवशाही बसने चिरडले, त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज त्याच्या पत्नीच्या पदरी दीड वर्षाचे मूल आहे. या कुटुंबाला नुकसान भरपाई झालीच पाहिजे. भारताला मोठ्या ऐतिहासिक परंपरा आहे. तंत्रज्ञानाचा वारसा आहे. आपली अवस्था वाईट का झाली? तर आपण शिक्षणाचा प्रसार केला नाही, विज्ञान चमत्काराला जोडलं, देवाकडून दैवाकडे गेलो, श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धेचे पारडे जड झाले. कर्मकांडांना महत्व दिलं. जातिभेद सोबतीला घेतले. यामुळे समाजाची वैचारिक क्षमता कमी झाली. याचा परिणाम म्हणून मुठभर परकीय आक्रमणांनी आपल्यावर सत्ता गाजवली. स्वातंत्र्यानंतर गोष्टी बदलल्या. मात्र आता जग तिथे अवकाशात पोहोचलेलं असताना आपण इथे कबरीच्या मागे लागलो आहेत. हे दुर्दैव आहे. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. असं यावेळी जयंत पाटील म्हणाले.

Jayant Patil: आपण एका कबरीच्या मागे लागलो, जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल Read More »

अनेकांना दिलासा, वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यास 30 जूनपर्यंत मुदतवाढ

Maharashtra Government: राज्य सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी 31 मार्च 2025 पर्यंत वाहन मालकांना मुदत देण्यात आली होती. मात्र आता सरकारने मोठा निर्णय घेत आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्याचे काम कमी झाले असल्याने उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांना ही पाटी बसविण्याकरिता 3 संस्थाची /उत्पादकांची परिवहन विभागामार्फत निवड केली आहे. तरी संबंधित वाहन मालकांनी याची नोंद घेऊन 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यात यावी, असे आवाहन परिवहन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

अनेकांना दिलासा, वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यास 30 जूनपर्यंत मुदतवाढ Read More »

अल्पवयीन गुन्हेगारांचा वाढता प्रमाण, कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज, ; सुजय विखे स्पष्टच बोलले

Sujay Vikhe: अल्पवयीन मुलांमध्ये वाढत्या गुन्ह्यांच्या प्रमाणामुळे समाजातील सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे. माजी खासदार सुजय विखे यांनी या संदर्भात कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, अल्पवयीन मुलांनी गुन्हा केल्यानंतर ते लगेच कोर्टाच्या बाहेर पडतात, ज्यामुळे कायद्यातील वयाची अट कमी करणे आवश्यक आहे. सध्या जवळपास 50 टक्के आरोपी अल्पवयीन असतात. 16 किंवा 17 वर्षाचा मुलगा खूनासारखा गंभीर गुन्हा करूनही कायद्याच्या वयाच्या अटींमुळे सुटतो. या प्रकारच्या घटनांमुळे समाजातील सुरक्षिततेची भावना खालावत आहे. माजी खासदार विखे यांच्या मते, या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. अल्पवयीन मुलांमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील एक मुख्य कारण म्हणजे कायद्यातील वयाची अट. सध्याच्या कायद्यानुसार, 18 वर्षाखालील मुलांना अल्पवयीन मानले जाते आणि त्यांच्यावर सामान्य कायद्याची कारवाई लागू होत नाही. यामुळे अनेकदा अल्पवयीन गुन्हेगारांना शिक्षा न मिळाल्याने ते पुन्हा गुन्हा करण्याचे प्रकार वाढत आहेत. या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. माजी खासदार विखे यांच्या मते, अल्पवयीन मुलांना योग्य मार्गदर्शन आणि शिक्षण देऊन त्यांना गुन्ह्याकडे वळण्यापासून रोखणे गरजेचे आहे. तसेच, कायद्यातील वयाची अट कमी करून अल्पवयीन गुन्हेगारांना योग्य शिक्षा मिळाली पाहिजे.

अल्पवयीन गुन्हेगारांचा वाढता प्रमाण, कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज, ; सुजय विखे स्पष्टच बोलले Read More »

मोठी बातमी! राम सुतारांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर

Ram Sutar: ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झालेला राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार हा राज्यातल्या तेरा कोटी जनतेच्या त्यांच्यावरील निखळ प्रेमाचं प्रतिक आहे. हा महाराष्ट्राच्या इतिहास, कला, सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त करीत त्यांचे अभिनंदन केले आहे. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत करताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला. राम सुतार यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात शेकडो शिल्पे साकारली आहेत. त्यांचं प्रत्येक शिल्प अप्रतिम आणि सौंदर्याचा अद्भूत नमूना आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल या महामानवांच्या शिल्पातून त्यांनी देशाचा इतिहास जिवंत केला. या महामानवांचे कार्य, विचार सर्वांपर्यंत पोहचवले. गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, देशाच्या संसदेतील महात्मा गांधींचा पुतळा, दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, दादरला चैत्यभूमी येथे उभारण्यात येत असलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हे त्यांच्या कलाकौशल्याप्रमाणेच या महामानवांवरील त्यांच्या प्रेमाचे, आदराचे प्रतिक आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राम सुतार यांचा गौरव केला. महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रातील या दीपस्तंभाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत.

मोठी बातमी! राम सुतारांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर Read More »

दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना अटक करा, मंत्री नितेश राणेंची मागणी

Nitesh Rane : दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात तापले असून, यावरून भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. या याचिकेत दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, यात आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही आरोपांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत आदित्य ठाकरेंच्या अटकेची आणि चौकशीची मागणी केली आहे. नितेश राणेंचा सवाल: लपवालपवी का?नितेश राणे यांनी या प्रकरणावरून ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “ही फार सोपी आणि सरळ केस आहे. जर ही आत्महत्येचीच घटना होती, तर मग ८ जून २०२० पासून आतापर्यंत इतकी पळापळ का सुरू आहे? लपवालपवी का चालली आहे? आदित्य ठाकरेंना यातून का वाचवावे लागते आहे? जर त्यांचा काहीच संबंध नसेल, तर मग त्यांची एवढी धडपड का दिसते?” त्यांनी पुढे सुप्रीम कोर्टाच्या एका निकालाचा हवाला देत म्हटले, “सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे की, बलात्काराचा आरोप असेल, तर सर्वप्रथम त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करावी. त्याच नियमानुसार, आदित्य ठाकरेंवर केस दाखल करून त्यांना अटक करावी आणि चौकशी करावी. ज्या न्यायाची अपेक्षा इतरांना असते, तोच न्याय ठाकरेंनाही लागू करावा.” याचिकेतील गंभीर आरोपदिशा सालियनच्या वडिलांनी, सतीश सालियन यांनी, मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे, किशोरी पेडणेकर यांच्यासह इतरांवर सामूहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप केला आहे. याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, दिशा सालियनच्या मृत्यूनंतर मालवणी पोलिसांनी चुकीचे अहवाल तयार करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, ज्यामागे ठाकरे गटाचा दबाव होता. या याचिकेत केंद्रीय तपास यंत्रणेकडे (सीबीआय) स्वतंत्र तपासाची मागणीही करण्यात आली आहे. या आरोपांमुळे ठाकरे गटावर प्रचंड दबाव आला असून, भाजपने हा मुद्दा पकडून राजकीय हल्ला तीव्र केला आहे. नितेश राणेंचा ठाकरे गटावर पलटवारशिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत या प्रकरणावरून भाजपवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला उत्तर देताना नितेश राणे म्हणाले, “संजय राऊत आणि ठाकरे गटाला सत्य समोर येण्याची भीती वाटते. त्यामुळे ते असली आक्षेप घेत आहेत. पण आता कायदा आपले काम करेल. ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. कोणालाही विशेष सवलत मिळता कामा नये.” राणे यांनी या प्रकरणाला निवडणूक काळातील राजकारणाशी जोडले जाण्याच्या शक्यतेलाही फेटाळून लावले आणि हे प्रकरण “निव्वळ सत्य आणि न्यायासाठी” असल्याचा दावा केला. राजकीय घडामोडींना वेगया प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. एकीकडे महायुती सरकारमधील भाजप आणि शिंदे गट यांना ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याची संधी मिळाली आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटावर या आरोपांचे खंडन करण्याचे आणि आपली प्रतिमा सांभाळण्याचे आव्हान आहे. नितेश राणे यांनी यापूर्वीही दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर अनेकदा आरोप केले आहेत आणि आता या याचिकेमुळे त्यांचा हल्ला आणखी तीव्र झाला आहे. त्यांनी या प्रकरणात ठाकरे गटाच्या तत्कालीन सरकारवरही पुरावे दडपण्याचा आरोप केला आहे. न्यायालयाचा निर्णय आणि पुढील दिशामुंबई उच्च न्यायालयात दिशा सालियन यांच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका आज (२० मार्च) सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे. या याचिकेतून ठाकरे गटाच्या नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आल्याने न्यायालय काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नितेश राणे यांनी या प्रकरणात तातडीने कारवाईची मागणी केली असून, “आदित्य ठाकरेंना वाचवण्याचा प्रयत्न का होतो आहे, हे जनतेला कळले पाहिजे,” असेही ते म्हणाले. दिशा सालियन प्रकरणाने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणला आहे. नितेश राणे यांच्या आक्रमक मागणीमुळे आणि याचिकेतील गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण आता न्यायालयीन आणि राजकीय लढाईचे नवे केंद्र बनले आहे. ठाकरे गट या आरोपांचे खंडन कसे करणार आणि भाजप याचा राजकीय लाभ कसा उठवणार, हे पुढील काळात स्पष्ट होईल. दरम्यान, या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, जनतेच्या नजरा आता न्यायालयाच्या निर्णयावर खिळल्या आहेत.

दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना अटक करा, मंत्री नितेश राणेंची मागणी Read More »

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू पण शेतकरी, बेरोजगारी अन् महागाईवर चर्चाच नाही

Maharashtra Politics: महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सध्या विविध चर्चा होत आहेत, परंतु त्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, महागाईवर, बेरोजगारीवर आणि शहरी भागातील मुद्द्यांवर चर्चा होत नाही असा आरोप केला जात आहे. या प्रकारच्या चर्चांमुळे समाजाला काहीही घेणं-देणं नाही असे मत व्यक्त केले जात आहे. राजकारणी राजकारण करत असताना सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. विधानसभेतील चर्चा ही राजकीय भूमिकांवर आधारित असताना, त्यातून समाजाच्या मुख्य प्रश्नांवर योग्य ती चर्चा होत नाही हे एक मोठे चिंताजनक विषय आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महागाईचा फैलाव, बेरोजगारीची वाढ आणि शहरी भागातील सुविधांचा अभाव या मुद्द्यांवर योग्य ती चर्चा न झाल्याने नागरिकांमध्ये निराशा पसरत आहे.”राजकारणी फक्त राजकारण करतात, त्यांना समाजाच्या खर्या प्रश्नांशी काही देणे-घेणे नाही,” असे एका नागरिकाने सांगितले. “आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नावर, महागाईवर आणि बेरोजगारीवर चर्चा करण्याची अपेक्षा करतो. परंतु त्याऐवजी राजकीय भांडणे होत आहेत,” त्यांनी नमूद केले.महत्त्व आणि परिणामया प्रकारच्या चर्चांचा परिणाम म्हणजे नागरिकांमध्ये राजकीय प्रक्रियांबद्दल निराशा निर्माण होत आहे. राजकीय नेत्यांनी समाजाच्या मुख्य प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे मत व्यक्त केले जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, महागाईवर आणि बेरोजगारीवर योग्य ती चर्चा झाल्यास समाजातील मुख्य समस्या सोडवल्या जाऊ शकतात. संदर्भ महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती सध्या विधानसभेच्या अधिवेशनातील चर्चांवर केंद्रित आहे. या अधिवेशनात राजकीय भांडणांवर जास्त भर दिला जात असल्याचे दिसत आहे. परंतु, समाजाच्या मुख्य प्रश्नांवर चर्चा न झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. या प्रश्नांवर तातडीने लक्ष दिले पाहिजे असे विचार मांडले जात आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू पण शेतकरी, बेरोजगारी अन् महागाईवर चर्चाच नाही Read More »

मग ते पत्र कुणाचे? दिशा सालियन प्रकरणात, सतीश सालियन यांचा धक्कादायक दावा

Disha Salian Death Case : दिशा सालियन, जी सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक होती, तिच्या मृत्यू प्रकरणात गेल्या काही दिवसांत गंभीर आरोप-प्रत्यारोपांचा फेरा सुरू झाल्या आहेत. 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड येथे तिचा मृत्यू झाला होता, ज्याला पोलिसांनी आत्महत्या म्हटले होते. मात्र, आता तिच्या वडिलांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात या सर्व आरोपांना अफवा म्हटले होते. मात्र, आता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यांच्या मुलीच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आदित्य ठाकरे, सूरज पंचोली आणि डिनो मोरिया यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचीही मागणी केली आहे. तर दुसरीकडे भाजप नेते नितेश राणे यांनीही दिशा सालियनवर सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. नितेश राणे म्हणाले की, “आदित्य ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी”. पोलिसांची भूमिकामुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पुराव्यांच्या अभावामुळे बंद केला होता. मात्र, आता दिशाच्या वडिलांनी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “पोलिसांनी आणि तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर दबाव आणला आणि त्यांची दिशाभूल केली”. दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा फेरा सुरू झाला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी वाढत आहे. सोशल मीडियावरही या प्रकरणाची चर्चा सुरू आहे.

मग ते पत्र कुणाचे? दिशा सालियन प्रकरणात, सतीश सालियन यांचा धक्कादायक दावा Read More »