DNA मराठी

DNA Marathi News

narendracharya maharaj

Ram Mandir Theft : राम मंदिर चोरीप्रकरणी नरेंद्राचार्य महाराजांची मोठी मागणी; मंदिरे आचार्यांच्या ताब्यात द्यावीत

Ram Mandir Theft : राम मंदिरातील चोरीच्या घटनेवर जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचे म्हटले आहे. ही घटना अत्यंत निंदनीय असल्याचे सांगत त्यांनी हिंदूंची मंदिरे शासनाऐवजी अधिकृत शंकराचार्य, रामानंदाचार्य, वल्लभाचार्य आदी आचार्यांच्या समितीच्या ताब्यात देण्याची मागणी केली. नरेंद्राचार्य महाराज म्हणाले की, मंदिरांचे व्यवस्थापन आणि धार्मिक परंपरा जपण्याचे आवश्यक प्रशिक्षण शासनाकडे नाही. त्यामुळे मंदिरांचे संचालन आचार्यांच्या समितीकडे दिल्यास धार्मिक परंपरा आणि मंदिरांची पवित्रता अधिक प्रभावीपणे जपली जाईल. राम मंदिर चोरीप्रकरणी सरकारने तत्पर कारवाई करत आरोपींना अटक केली असली, तरी या घटनेमुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून त्याची भरपाई होऊ शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना नरेंद्राचार्य महाराज यांनी सरकारने उचललेले पाऊल योग्य असल्याचे सांगितले. मात्र, केवळ राजीनामा देऊन प्रश्न सुटणार नाही. भविष्यात पेपरफुटीसारख्या घटना रोखण्यासाठी कठोर आणि प्रभावी कायदा करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Ram Mandir Theft : राम मंदिर चोरीप्रकरणी नरेंद्राचार्य महाराजांची मोठी मागणी; मंदिरे आचार्यांच्या ताब्यात द्यावीत Read More »

sanjay raut

Sanjay Raut on BJP : उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा निर्णय फडणवीसांच्या हातात नव्हता; संजय राऊतांचा मोठा दावा

Sanjay Raut on BJP : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या नवीन शिक्षण विधेयकावर, शिक्षण व्यवस्थेवर, विद्यार्थी आंदोलन, संसद अधिवेशन तसेच राज्यातील राजकारणावर जोरदार टीका केली. नवीन शिक्षण विधेयकात केवळ शिक्षा आणि दंडाच्या तरतुदी वाढवण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी या कायद्यामुळे परीक्षा व्यवस्था ‘फुलप्रूफ’ होणार नसल्याचे म्हटले. राऊत म्हणाले की, पेपरफुटी प्रकरणातील शिक्षेची मुदत एक वर्षांवरून दहा वर्षे आणि दंडाची रक्कम एक कोटींवरून दहा कोटी रुपये करण्यात आली आहे. मात्र, फक्त आकडे बदलल्याने समस्या सुटणार नाही. सरकार कायदे करते, पण त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. पक्षांतर कायद्याचा दाखला देत त्यांनी सरकारवर कायद्याचा केवळ दिखावा केल्याची टीका केली. विद्यार्थी आंदोलनाचा उल्लेख करत राऊत यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमार, मुलींशी गैरवर्तन आणि आंदोलनकर्त्यांवरील कारवाईबाबत सरकारला संसदेत प्रश्न विचारले जाणार असल्याचे सांगितले. इतक्या घटना घडूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितलेली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, देशातील आधुनिक शिक्षण व्यवस्थेची पायाभरणी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात झाली होती. त्यानंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी आधुनिक भारत घडवण्याचे काम केले. मात्र, गेल्या दहा वर्षांत शिक्षण व्यवस्थेला मागे नेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. आयआयटीसारख्या संस्थांची स्थापना काँग्रेस सरकारांनी केली, तर सध्याच्या सरकारने शिक्षणाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केल्याचा दावा त्यांनी केला. नवीन शिक्षणमंत्र्यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राऊत यांनी, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना जबाबदारी दिली पाहिजे, असे मत व्यक्त केले. नंदन नीलेकणी यांच्यासारख्या तज्ज्ञाला शिक्षणमंत्री करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. राज्यातील राजकारणावर बोलताना राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही मोठे विधान केले. “भाजपने गुणवत्तेच्या आधारे शिक्षणमंत्री निवडायचा ठरवला, तर मोदी यांच्या मनात देवेंद्र फडणवीस यांचेच नाव असेल,” असे ते म्हणाले. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचाही निर्णय फडणवीस यांच्या हातात नव्हता, असा दावाही त्यांनी केला. ‘धन्यवाद मोदीजी’ कार्यक्रमावर टीका करताना राऊत म्हणाले की, राजीनामा हा विद्यार्थी आंदोलनाचा विजय आहे. हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, अनेकांनी आत्महत्या केल्या, अनेकांवर लाठीमार झाला. त्यामुळे धन्यवाद विद्यार्थ्यांचे मानायला हवेत, असे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या पत्राचा उल्लेख करताना त्यांनी दिल्लीतील घटनांची जबाबदारी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर असल्याचे म्हटले. दिल्ली पोलिसांना आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाकडूनच दिले जातात, असेही त्यांनी नमूद केले. भाजपच्या आंदोलनापासून अलिप्त राहण्यावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या विरोधात उभे राहण्याची भाजपची हिंमत नव्हती. आंदोलनाच्या मुद्द्यावर भाजपमध्येही मतभेद निर्माण झाले असून काही भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांनीही आंदोलनाला पाठिंबा दिल्याचा दावा त्यांनी केला. संसद अधिवेशनाबाबत बोलताना त्यांनी सरकार अजूनही धक्क्यातून सावरले नसल्याचा दावा केला. सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षांनीही दबाव वाढवल्याचे सांगत आता केंद्र सरकारने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे राऊत यांनी म्हटले.

Sanjay Raut on BJP : उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा निर्णय फडणवीसांच्या हातात नव्हता; संजय राऊतांचा मोठा दावा Read More »

sujay vikhe

Sujay Vikhe Patil: सत्तेतील आमदार असलात तरी लोकहितासाठी वेळप्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करा; विखेंचा आमदार लंघेंना सल्ला

Sujay Vikhe Patil : अधिकारी जनतेची कामे वेळेत करत नसतील, तर सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी लोकहितासाठी वेळप्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यास घाबरू नये, असा स्पष्ट सल्ला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांना दिला. सत्ता आणि पदापेक्षा जनता मोठी असून, लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी हे जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्यासाठीच असतात, असे प्रतिपादन त्यांनी केले. नेवासा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियानाचा शुभारंभ यावेळी मान्यवरांचा उपस्थितीत करण्यात आला. त्या आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले, अधिकारी काम करत नसतील, तर आंदोलन करा. तुम्ही सत्तेत असलात, महायुतीचे आमदार असलात तरी लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्यास मागे-पुढे पाहू नका. तुम्ही आंदोलन केले तर मी स्वतः तुमच्यासोबत येईन. माझे वडील पालकमंत्री असले तरी मी जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलनात सहभागी होईन. प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे जनतेची कामे करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांना उद्देशून ते म्हणाले की, पूर्वी ज्या पद्धतीने काम चालत होते, ती कार्यपद्धती आता बदलण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्य नागरिकांशी सन्मानाने वागावे, त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे आणि त्यांना शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारायला लावू नयेत. जनतेला तुमची खुर्ची किंवा गाडी नको आहे, त्यांना वेळेत न्याय आणि सन्मानाची वागणूक हवी आहे, असे ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की नेवासा तालुका गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसून, महिलांवरील अत्याचार, बलात्कार, खून यांसारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल. गुन्हेगारांच्या मतांसाठी तत्त्वांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याचबरोबर शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या माध्यमातून हजारो नागरिकांना दिलासा मिळत असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी पदापेक्षा जनतेची सेवा महत्त्वाची असल्याचे सांगितले. पद मिळविण्यापेक्षा गरिबांचे प्रश्न सोडविणे हेच सर्वात मोठे कार्य आहे. समाजसेवा करणाऱ्यालाच जनता कायम साथ देते,असे सांगत पदाच्या राजकारणात न अडकता जनतेची कामे करण्याचे आवाहन त्यांनी केले. नेवासा तालुक्यातील रस्ते, जमीनविषयक वाद आणि महसूल प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी महसूल प्रशासनाने घटनास्थळी जाऊन निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अधिकारी काम करत नसतील, तर लोकप्रतिनिधींनीही जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्यास मागे-पुढे पाहू नये. सत्ता नव्हे, तर जनता मोठी असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Sujay Vikhe Patil: सत्तेतील आमदार असलात तरी लोकहितासाठी वेळप्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करा; विखेंचा आमदार लंघेंना सल्ला Read More »

img 20260726 wa0003

Ahilyanagar Police: पोलीस अधीक्षक महोदय, संवेदनशीलतेची अपेक्षा चुकीची आहे का?

Ahilyanagar Police : “साहेब… माझी मुलगी सापडेल ना?” हा प्रश्न एखादी आई किंवा वडील विचारतात, तेव्हा तो केवळ एक प्रश्न नसतो; तो त्यांच्या उरात धडधडणाऱ्या भीतीचा आक्रोश असतो. त्या एका वाक्यामध्ये असहाय्यता असते, वेदना असते, आशा असते आणि आपल्या लेकराला पुन्हा एकदा मिठी मारण्याची तळमळ असते. मुलगी घरातून बाहेर पडते आणि परत येत नाही, तेव्हा एका घरातील भिंतीही निःशब्द होतात. आईचा घास अडकतो, वडिलांच्या पायाखालची जमीन सरकते, भावंडांच्या चेहऱ्यावरचे हसू हरवते. प्रत्येक फोनची रिंग हृदयाचा ठोका चुकवते आणि प्रत्येक दार ठोठावल्याचा आवाज आशेचा किरण वाटतो. अशा वेळी त्या कुटुंबाची पहिली धाव असते ती पोलीस ठाण्याकडे. कारण त्यांना विश्वास असतो की, आता त्यांच्या मुलीचा शोध घेण्यासाठी संपूर्ण यंत्रणा उभी राहील. पण इथेच एक प्रश्न समाजाच्या मनात पुन्हा पुन्हा उभा राहतो पोलीस अधीक्षक महोदय, संवेदनशीलतेची अपेक्षा चुकीची आहे का? हा प्रश्न कोणावर आरोप करण्यासाठी नाही. हा प्रश्न एका आईच्या अश्रूंनी विचारला आहे. हा प्रश्न त्या वडिलांच्या काळजीने विचारला आहे, जे रात्रभर रस्त्यावर मुलीचा फोटो घेऊन भटकत असतात. हा प्रश्न त्या समाजाने विचारला आहे, ज्याला आजही प्रशासनावर विश्वास ठेवायचा आहे. हरवलेल्या मुलीची तक्रार म्हणजे केवळ कागदावरची एक नोंद नसते. त्या तक्रारीच्या मागे अनेक शक्यता दडलेल्या असतात. कदाचित ती सुरक्षित असेल, कदाचित एखाद्या संकटात अडकली असेल, कदाचित कोणाच्या फसवणुकीची बळी ठरली असेल. म्हणूनच अशा प्रत्येक तक्रारीकडे वेळेशी स्पर्धा करत पाहणे आवश्यक असते. तपासशास्त्र सांगते की, सुरुवातीचे काही तास हे सर्वाधिक महत्त्वाचे असतात. त्या वेळेत घेतलेला एक योग्य निर्णय एखाद्या मुलीचे आयुष्य वाचवू शकतो. आपल्या पोलीस दलात अत्यंत प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि माणुसकी जपणारे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने आहेत. अनेकांनी जीव धोक्यात घालून हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवले आहे. अशा अधिकाऱ्यांचा समाजाला अभिमान आहे. त्यामुळे हा लेख संपूर्ण पोलीस दलावर टीका करण्यासाठी नाही. परंतु काही कुटुंबांनी व्यक्त केलेले अनुभव दुर्लक्षित करूनही चालणार नाहीत. काही वेळा सुरुवातीच्या टप्प्यात अपेक्षित तातडी जाणवत नाही, अशी भावना नागरिक व्यक्त करतात. ही भावना खरी असो किंवा गैरसमजुतीतून निर्माण झालेली असो, तिचे निराकरण करणे आवश्यक आहे. कारण नागरिकांचा विश्वास टिकवणे ही कोणत्याही यंत्रणेची सर्वात मोठी जबाबदारी असते. पोलीस अधीक्षक महोदय, आपण संपूर्ण जिल्ह्याचे प्रमुख आहात. आपल्या एका सूचनेमुळे प्रत्येक पोलीस ठाण्याची कार्यपद्धती बदलू शकते. प्रत्येक अधिकाऱ्याला हे सांगता येऊ शकते की, हरवलेल्या मुलीची तक्रार ही इतर कोणत्याही नियमित प्रकरणासारखी नसते. ती एका कुटुंबाच्या अस्तित्वाशी जोडलेली असते. अशा तक्रारीला प्राधान्य देणे ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नाही, तर मानवी कर्तव्य आहे. आज आपल्या हातात अत्याधुनिक साधने आहेत. शहरागणिक सीसीटीव्हीचे जाळे उभे राहिले आहे. मोबाईल लोकेशन, डिजिटल ट्रॅकिंग, सोशल मीडिया अलर्ट, तांत्रिक विश्लेषण अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. परंतु या सर्व साधनांपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे वेळेवर घेतलेला निर्णय. तक्रार दाखल होताच शोधकार्य सुरू झाले, माहितीचे जाळे सक्रिय झाले, विविध पथके सज्ज झाली आणि कुटुंबीयांशी सातत्याने संपर्क ठेवला गेला, तर अनेक संकटे टाळता येऊ शकतात. या प्रश्नाकडे समाजानेही जबाबदारीने पाहण्याची गरज आहे. मुली हरवल्यानंतर अफवा पसरवणे, सोशल मीडियावर अप्रमाणित माहिती शेअर करणे किंवा कुटुंबीयांवरच संशय घेणे, हे अत्यंत अमानुष आहे. अशा वेळी समाजाने शोधकार्यात सहकार्य करणे, माहिती उपलब्ध करून देणे आणि कुटुंबाला मानसिक आधार देणे अधिक आवश्यक आहे. महिलांच्या सुरक्षेवर आपण अनेक चर्चा करतो. व्याख्याने होतात, मोहिमा राबवल्या जातात, घोषणाही केल्या जातात. परंतु या सर्वांचा खरा अर्थ तेव्हाच आहे, जेव्हा एखादी आई पोलीस ठाण्यात येऊन “माझी मुलगी हरवली आहे” असे म्हणते आणि तिला पहिल्याच क्षणी विश्वास दिला जातो “काळजी करू नका, आम्ही तातडीने शोध सुरू करतो.” हे चार शब्द त्या कुटुंबासाठी औषधापेक्षाही मोठा आधार ठरू शकतात. पोलीस अधीक्षक महोदय, आपण जिल्ह्यात संवेदनशील प्रशासनाची ओळख निर्माण करू शकता. प्रत्येक पोलीस ठाण्यात हरवलेल्या मुलांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र आणि तातडीची कार्यपद्धती असावी. प्रत्येक अधिकाऱ्याला याबाबत नियमित प्रशिक्षण मिळावे. प्रत्येक तक्रारीचा वेळोवेळी आढावा घेतला जावा. कुटुंबीयांना तपासाची माहिती दिली जावी. या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी जनतेचा विश्वास अनेक पटींनी वाढवू शकतात. हा लेख टीका करण्यासाठी लिहिलेला नाही. हा लेख एका आईच्या डोळ्यांतून गळालेल्या अश्रूंनी लिहिला आहे. हा लेख त्या वडिलांच्या वेदनेने लिहिला आहे, जे प्रत्येक अनोळखी चेहऱ्यात आपल्या मुलीचा चेहरा शोधत असतात. हा लेख त्या भावंडांच्या शांततेने लिहिला आहे, ज्यांच्या घरात हसण्याचे आवाज अचानक बंद होतात. प्रशासनाची खरी ताकद गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्यात नसते; तर संकट येताच तत्परतेने उभे राहण्यात असते. प्रत्येक हरवलेल्या मुलीकडे एका फाईलप्रमाणे नव्हे, तर एका जिवंत आयुष्याप्रमाणे पाहिले गेले पाहिजे. कारण आकडेवारीत एक संख्या कमी-जास्त होऊ शकते, पण एका कुटुंबासाठी त्यांची मुलगी ही संपूर्ण जग असते. म्हणूनच शेवटी पुन्हा एकदा तोच प्रश्न पोलीस अधीक्षक महोदय, संवेदनशीलतेची अपेक्षा चुकीची आहे का? जर उत्तर “नाही” असेल, तर प्रत्येक हरवलेल्या मुलीची तक्रार ही सर्वोच्च प्राधान्याची ठरली पाहिजे. प्रत्येक मिनिट मोलाचे मानले पाहिजे. प्रत्येक कुटुंबाला विश्वास दिला पाहिजे की, व्यवस्था त्यांच्या सोबत खंबीरपणे उभी आहे. कारण प्रत्येक हरवलेल्या मुलीमागे केवळ एक प्रकरण नसते; तर एका आईचा जीव, एका वडिलांचा श्वास, भावंडांचे बालपण आणि एका कुटुंबाचे संपूर्ण विश्व दडलेले असते. त्या विश्वाला पुन्हा उजाळा देण्याची जबाबदारी ही केवळ एका विभागाची नाही, तर संपूर्ण समाजाची आहे. आणि त्या जबाबदारीची सुरुवात होते ती संवेदनशीलतेपासून.

Ahilyanagar Police: पोलीस अधीक्षक महोदय, संवेदनशीलतेची अपेक्षा चुकीची आहे का? Read More »

dharmendra pradhan

Dharmendra Pradhan : मोठी बातमी! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम; आंदोलकांचा मोठा विजय

Dharmendra Pradhan : नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनामान्याच्या मागणीवरून गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर हजारो विद्यार्थी कोक्रोज जनता पार्टीसह आंदोलन करत होते. या आंदोलनाल यश आलं असून आज केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा विरोधपक्ष नेते राहुल गांधी यांनी देखील या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत जेव्हापर्यंत सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत नाही तेव्हापर्यंत संसदेत चर्चा होणार नाही असं स्पष्ट करत सरकारला इशारा दिला होता. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामान्याची मागणी करत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी देखील तब्बल 26 दिवस उपोषण केले होते. तर दुसरीकडे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आता कॉक्रोज जनता पार्टी आणि विरोधक काय भूमिका घेणार आणि जंतर मंतर मैदानावर सुरू असणारा आंदोलन कधीपर्यंत चालणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Dharmendra Pradhan : मोठी बातमी! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम; आंदोलकांचा मोठा विजय Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: गुंड खोटे पोलीस व भाजपच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांचे आंदोलन चिराडण्याचा प्रयत्न… खासदार लंकेचा आरोप

Nilesh Lanke: नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती लाठी चार्ज होते हे अत्यंत लज्जस्पद आहे वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मात्र पेपर फुटीमुळे आतापर्यंत 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली महाराष्ट्रात देखील टीईटी चा पेपर फुटला जे उद्या देशाचे भविष्य आहे मात्र पेपर फुटी मुळे विद्यार्थ्यांना आत्महत्या करावा लागत असेल तर या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहे अशी तीव्र संतप्त प्रतिक्रिया खासदार निलेश लंके यांनी दिली नीट पेपर फुटी प्रकरणानंतर दिल्ली येथील जंतर मंतर वर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांच्या आंदोलन सुरू असून या आंदोलनाला अहिल्यानगर मध्ये खासदार निलेश लंके यांनी पाठिंबा दिला असून यावेळी लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांच्या समवेत आंदोलन सुरू केले यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले सनम वांगचूंग असतील किंवा अभिजीत इतके असतील हे आंदोलन करत असताना त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवरती अमानुष लाठीचार्ज झाला . दरोडेखोरांना देखील एवढ्या चुकीच्या पद्धतीने मारहाण केली जात नाही तेवढ्या चुकीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मारहाण झाली असा यावेळी लंके म्हणाले विद्यार्थ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही नीट पेपर कुठे प्रकरणानंतर थेट पुरावे घेऊन लंके जिल्हाधिकारी कार्यालयावर बसले यावेळी एका विद्यार्थिनीला उत्तर पत्रिकेवरती 500 हून अधिक मार्क दिसतात मात्र ऑनलाईन तिला केवळ 50 मार्क पडल्याचे दिसले आणि याबाबत विद्यार्थ्यांनी विचारणा केल्यास त्यांना धुडकावून लावले जात आहे यामुळे विद्यार्थ्यांसमोर आत्महत्या सारखाच पर्याय उरला असल्याचा देखील यावेळी लंके यांनी नमूद केलं तसेच लंके म्हणाले विद्यार्थ्यांच्या मागण्या देखील मापक आहे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 वर्षीचे स्वप्न दाखवले विद्यार्थ्यांकडे युवाशक्ती म्हणून पाहिले जायचे आणि त्याच युवाशक्ती वरती अन्याय होतो आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे ज्यांच्यामुळे विद्यार्थ्यांना आत्महत्या करावे लागले त्यासंबंधीचा वरती मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा हे हिटलर शाही व हुकूमशाही सरकार हे मंगरूळ आणि हुकूमशाही सरकार आहे हे हिटलर सरकार आहे हिटलर चा अंत कसा झाला हे जगाला माहिती आहे की मी विद्यार्थ्यांना न्याय देण्यापेक्षा पोलीस बळाचा वापर करत विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली महिला भगिनींना मारहाण केली गुंड प्रवृत्तीचे लोक आंदोलनामध्ये आणले कारण हे आंदोलन चिरडले जावे. काही ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते देखील आढळून आले असा सणसणीत आरोप खासदार निलेश लंके यांनी केला.

Nilesh Lanke: गुंड खोटे पोलीस व भाजपच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांचे आंदोलन चिराडण्याचा प्रयत्न… खासदार लंकेचा आरोप Read More »

rahul gandhi

Rahul Gandhi: राहुल गांधी आक्रमक; विद्यार्थ्यांसाठी मांडल्या तीन नव्या मागण्या

Rahul Gandhi : NEET-UG परीक्षा आणि पेपरफुटीच्या आरोपांवरून विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्या परीक्षा व्यवस्थेची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे, असे सांगत त्यांनी तीन महत्त्वाच्या मागण्या सरकारसमोर ठेवल्या. राहुल गांधी म्हणाले की, देशातील लाखो विद्यार्थी अनेक वर्षे मेहनत करून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र, वारंवार होणाऱ्या पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील गोंधळ आणि गैरव्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा सरकारवरील विश्वास कमी होत असून, या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारणे आवश्यक आहे. त्यांनी पहिली मागणी करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, असे म्हटले. परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि सातत्याने घडणाऱ्या घटनांसाठी शिक्षण मंत्रालय जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. दुसऱ्या मागणीत त्यांनी जंतर-मंतर येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर आक्षेप घेतला. आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तिसऱ्या मागणीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची सार्वजनिक माफी मागावी, असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याने देशभरातील तरुणांमध्ये असंतोष वाढला असून, सरकारने त्यांची भावना समजून घेत जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांनीही परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्याला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगत, संसदेत आणि रस्त्यावरही हा मुद्दा सातत्याने उपस्थित केला जाईल, असे आश्वासन दिले. NEET परीक्षेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा प्रक्रियेबाबत देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या आंदोलनानंतर केंद्र सरकार या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

Rahul Gandhi: राहुल गांधी आक्रमक; विद्यार्थ्यांसाठी मांडल्या तीन नव्या मागण्या Read More »

uddhav thackeray

Uddhav Thackeray: नीट पेपरफुटी प्रकरण; ठाकरे बंधूंचा 26 जुलैला मुंबईत मोर्चा

Uddhav Thackeray : देशातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून नीट पेपर फुटीवरून चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. या प्रकरणावरून दिल्लीत आंदोलन देखील होत असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामान्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे आता या प्रकरणावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत मोठी घोषणा केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी संयुक्तपणे 26 जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचार थांबवावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी ही लढाई कोणत्याही पक्षाची नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याची असल्याचे स्पष्ट केले. लाखो विद्यार्थी वर्षभर कठोर परिश्रम करून परीक्षेला सामोरे जातात. मात्र पेपरफुटीसारख्या गैरप्रकारांमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरते. त्यामुळे अशा घटनांबाबत सरकारने कठोर भूमिका घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले. मोर्चा मुंबईतील शिवाजी पार्क येथून सुरू होणार असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते, विद्यार्थी संघटना आणि विविध सामाजिक संस्था सहभागी होण्याची शक्यता आहे. या आंदोलनाद्वारे केंद्र सरकारवर दबाव निर्माण करून नीट पेपरफुटी प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची मागणी करण्यात येणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात आंदोलनाची लाट उसळली असून विविध राज्यांमध्ये विद्यार्थी आणि राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रस्तावित मेगा मोर्च्याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न केंद्रस्थानी ठेवून होणारे हे आंदोलन आगामी काळातील शिक्षण व्यवस्थेवरील चर्चेला नवी दिशा देऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Uddhav Thackeray: नीट पेपरफुटी प्रकरण; ठाकरे बंधूंचा 26 जुलैला मुंबईत मोर्चा Read More »

rain

Ahilyanagar Rain Alert: अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा येलो अलर्ट; जाणून घ्या हवामान अंदाज

Ahilyanagar Rain Alert : भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यात आज सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवून जिल्ह्यास ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. तसेच नदीकाठच्या नागरिकांसह धरणक्षेत्रातील पर्यटकांनी विशेष सतर्कता बाळगून जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये आज दुपारी १२.०० वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भीमा नदीत दौंड पुलाजवळ २७ हजार ६५१ क्युसेक, घोड धरणातून घोड नदीत ४ हजार क्युसेक आणि गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ५५ हजार ७७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास भीमा, घोड व गोदावरी नद्यांच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे व मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू असून धरणांमध्ये पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे प्रवरा व मुळा नदीकाठच्या नागरिकांसह धरणक्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांनी विशेष खबरदारी घ्यावी. मेघगर्जना व विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली अथवा झाडांजवळ उभे राहू नये. तसेच मोकळी मैदाने, टॉवर, ध्वजांचे खांब, विद्युतवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर, धातूचे कुंपण आणि रोहित्रांपासून दूर राहावे. वादळी वाऱ्यादरम्यान कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. ट्रॅक्टर, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल आदींपासून सुरक्षित अंतर राखावे. मोकळ्या जागेत अडकल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हातांनी कान व डोके झाकावे आणि जमिनीशी कमीत कमी संपर्क ठेवावा. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जाहिरात फलक कोसळण्याची शक्यता असल्याने त्यांच्या आजूबाजूला थांबणे टाळावे. पर्यटकांनी धरणे, नद्या व ओढ्यांच्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नये तसेच धोकादायक ठिकाणी छायाचित्रे (सेल्फी) काढणे टाळावे. नदी, ओढे व नाल्यांवरील पूल अथवा बंधारे पाण्याखाली गेले असल्यास ते ओलांडू नयेत. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासून सुरक्षित अंतर राखून तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. अतिवृष्टीमुळे भूस्खलन अथवा दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी दक्षता घ्यावी तसेच घाटरस्त्यांवरील प्रवास शक्यतो टाळावा. जुनाट अथवा धोकादायक इमारतींमध्ये आश्रय घेऊ नये. सर्व नागरिकांनी स्वतःचे तसेच जनावरांचे संरक्षण करून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाचे ०२४१-२३२३८४४, ०२४१-२३५६९४० हे दूरध्वनी क्रमांक अथवा ११२ आणि १०७७ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Ahilyanagar Rain Alert: अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा येलो अलर्ट; जाणून घ्या हवामान अंदाज Read More »

mpsc

MPSC Exam 2027 पासून लागू होणार नवा पॅटर्न

​MPSC Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या आराखड्यात अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सुधारित परीक्षा पॅटर्न २०२७ पासून लागू केला जाणार असून, आयोगाने यासंदर्भात अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ​काय आहेत मुख्य परीक्षेतील महत्त्वाचे बदल? ​भाषा विषय केवळ अर्हताकारी (Qualifying): मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही भाषा विषयांचे पेपर केवळ पात्रतेसाठी (Qualifying) असतील. उमेदवारांना यामध्ये किमान २५% गुण मिळवणे अनिवार्य असेल. या पेपरांचे गुण अंतिम गुणवत्तेसाठी धरले जाणार नाहीत. ​एकूण 7 अनिवार्य पेपर मुख्य परीक्षेत आता भाषा विषयांचे २ अर्हताकारी पेपर, १ निबंधाचा पेपर आणि ४ सामान्य अध्ययनाचे (General Studies) पेपर असे एकूण सात अनिवार्य पेपर असतील. ​गुणवाटप 1250 + 175 (मुलाखत): अंतिम निवड यादी ही १ निबंधाचा पेपर आणि ४ सामान्य अध्ययनाचे पेपर यांच्या एकूण १२५० गुणांवर आधारित असेल. याशिवाय, मुलाखतीसाठी (Interview) १७५ गुण निश्चित करण्यात आले आहेत. या आधी मुख्य परीक्षेचे गुण वाटप 900 गुणांचे होते. ​बदलांमागील मुख्य कारण ​सर्वोच्च न्यायालयाच्या विविध मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करून आणि परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्याच्या उद्देशाने आयोगाने २५ जून २०२६ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्य सेवा मुख्य परीक्षा अधिक पारदर्शक आणि संतुलित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ​ २०२७ ची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी सुधारित गुणवाटप आणि रचनेनुसार अभ्यासाचे नियोजन करणे आवश्यक आहे. या सुधारित योजनेचा सविस्तर अभ्यासक्रम लवकरच MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध केला जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

MPSC Exam 2027 पासून लागू होणार नवा पॅटर्न Read More »