DNA मराठी

ahmednagar news

Maruti Jimny खरेदी करा ‘इतक्या’ स्वस्तात! मिळत आहे बंपर डिस्काउंट; पहा ऑफर

Maruti Jimny  :  मारुती सुझुकीने भारतीय बाजारात काही दिवसापूर्वी ऑफ-रोड SUV जिमनी लाँच केली आहे. यावेळी कंपनीने या ऑफ रोड एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 12.74 लाख रुपये ठेवली होती.  मात्र आता कंपनी या कारवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर देत आहे. ज्याच्या तुम्ही फायदा घेत स्वस्तात ही ऑफ रोड एसयूव्ही कार घरी आणू शकता.   आम्ही तुम्हाला सांगतो कंपनीने, आपल्या SUV – Thunder Edition  नवीन आणि स्वस्त व्हर्जन लाँच केला आहे. या एसयूव्हीचे हे मर्यादित-रन मॉडेल आहे. Maruti Jimny Thunder Edition तपशील कंपनीने 10.74 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत मारुती जिमनी थंडर एडिशन बाजारात लॉन्च केले आहे. त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 14.05 लाख रुपयांपर्यंत जाते.  कंपनीने थंडर एडिशन जिमनी लाइनअपच्या चारही व्हेरियंटमध्ये उपलब्ध करून दिली आहे. मात्र, त्याची विक्री डिसेंबर 2023 पर्यंतच केली जाईल.  जर आपण थंडर एडिशनची नियमित जिमनीच्या सुरुवातीच्या किंमतीशी तुलना केली तर त्याची किंमत 2 लाख रुपये कमी आहे. कंपनीने थंडर एडिशन जिमनीमध्ये फ्रंट बंपर, साइड डोअर क्लॅडिंग आणि डोअर व्हिझरवर सिल्व्हर गार्निश जोडले आहेत. त्याच्या ORVM, हुड आणि फ्रंट/साइड फेंडर्सवर देखील गार्निश केले गेले आहे.  इंटीरियर आकर्षकपणे डिझाइन केलेले आहेत आणि त्यात फ्लोअर मॅट्स (मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटसाठी वेगळे), आणि टॅन-फिनिश स्टिअरिंग व्हील देखील आहेत.  ही SUV 9-इंच टचस्क्रीन, क्रूझ कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, सहा एअरबॅग्ज आणि ऑटो क्लायमेट कंट्रोल यांसारख्या आधुनिक फीचर्ससह आहे. यात 1.5-लिटर K15B नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. ज्याची कमाल 104 bhp पॉवर आणि 134 Nm पीक टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. यामध्ये कंपनीने 5-स्पीड मॅन्युअल किंवा 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय दिला आहे.

Maruti Jimny खरेदी करा ‘इतक्या’ स्वस्तात! मिळत आहे बंपर डिस्काउंट; पहा ऑफर Read More »

T20 World Cup: रोहित-हार्दिकला बीसीसीआय देणार धक्का; ‘या’ खेळाडूला मिळणार टीम इंडियाचा कर्णधार पद

T20 World Cup:  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या टी – 20 मध्ये धमाकेदार विजय मिळूवुन भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका 1-1 ने बरोबरीत राखली.  या मालिकेनंतर आता सूर्यकुमार यादव 2024 मध्ये होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकात टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून उदयास आला आहे. सध्या कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची सातत्याने चांगली कामगिरी लक्ष वेधून घेत आहे. जून 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. स्पर्धेची तयारी सुरू असताना संघाचे नेतृत्व कोण करणार या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही. अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या, ज्यांना यापूर्वी टी-20 संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते, ते अनिश्चिततेचा सामना करत आहेत. दुखापतीमुळे हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीमुळे T20 संघातील नेतृत्व शून्य झाले आहे. एकदिवसीय विश्वचषकादरम्यान त्याच्या दुखापतीमुळे तो खेळापासून दूर राहिला आणि त्याच्या पुनरागमनाबद्दल प्रश्न कायम आहेत. रोहित शर्मा देखील नियमितपणे T20 सेटअपचा भाग नसल्यामुळे, निवडकर्त्यांसमोर T20 विश्वचषकासाठी कर्णधार निवडण्यात पेचप्रसंग आहे. या परिस्थितीत, सूर्यकुमार यादवने कर्णधार म्हणून वचन दिले आहे, ज्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध T20 मालिकेत 4-1 असा विजय मिळवला. यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत राखली.  सूर्यकुमारचे कर्णधारपद यशस्वी ठरले आहे आणि त्याने बॅटनेही आपला फॉर्म कायम ठेवला आहे, त्यामुळे त्याच्या कामगिरीवर अतिरिक्त दडपणाच्या परिणामाची चिंता दूर केली आहे. भारत अफगाणिस्तानविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मायदेशात टी-20 मालिकेसाठी तयारी करत असताना, कर्णधारपदाचा प्रश्न चर्चेत आहे.  सूर्यकुमार यादव टी-20 विश्वचषकात संघाचे कर्णधारपद भूषवणार की नाही आणि केवळ तीन टी-20 मालिकेनंतर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवणे हा योग्य निर्णय आहे की नाही, या निवडकर्त्यांसाठी महत्त्वाच्या बाबी आहेत.  अफगाणिस्तानविरुद्धची आगामी मालिकेमध्ये टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचा कर्णधार कोण होणार हे चित्र स्पष्ट होऊ शकते.

T20 World Cup: रोहित-हार्दिकला बीसीसीआय देणार धक्का; ‘या’ खेळाडूला मिळणार टीम इंडियाचा कर्णधार पद Read More »

Gutkha Ban : गुटखाबंदीने पोलिसांचे हप्ते वाढले…हेरंब कुलकर्णींचा थेट निशाणा

Gutkha Ban – दोन महिन्यापूर्वी अहमदनगर शहरामध्ये दारूबंदी चळवळीचे कार्यकर्ते  हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता.  कुलकर्णी ज्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत त्या शाळेच्या आजूबाजूला असलेल्या गुटखा आणि अवैध्य व्यवसायाच्या विरोधात त्यांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाला पत्र देऊन कारवाईची मागणी केली होती.  हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा देखील उपस्थित झाला मात्र नगर जिल्ह्यातील परिस्थिती काही बदलली नाही, यामुळे राज्यातील गुटखा बंदी हि फसलेली बंदी आहे. तसेच ही जी शासनाने गुटखाबंदी केली आहे. त्यामुळे गुटखा विक्री करण्याचे प्रमाणही वाढले असून यामध्ये पोलिसांचे हप्ते वाढले असा थेट आरोप सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे.  शाळा व महाविद्यालय परिसरातील गुटखा, तंबाखू अशा अवैद्य टपऱ्या काढण्याची मागणी कुलकर्णी यांनी नगर जिल्हा प्रशासनाकडे केली होती. या कारणावरून हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची  घटना घडली होती. या घटनेला दोन महिने होऊन गेले व नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सुमारे 32 आमदारांनी या हल्ल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता व याबाबत शिक्षक  आमदार विक्रम काळे यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला आहे.  मात्र या हल्ल्याच्या घटनेनंतरही अहमदनगर जिल्ह्यातील परिस्थिती बदलली नसून जिल्ह्यातील अवैद्य गुटखा विक्री आणि अवैध धंदे तसेच सुरू असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.सध्याची नगर जिल्ह्यातील परिस्थिती पाहता गुटखाबंदी ही फसलेली बंदी असल्याचे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.  गुटखाबंदीने पोलिसांचे हप्ते वाढले… ही जी शासनाने गुटखाबंदी केली आहे. त्यामुळे गुटखा विक्री करण्याचे प्रमाणही वाढले असून यामध्ये पोलिसांचे हप्ते वाढले असा थेट आरोप सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे. गुटखा हा शरीराला घातक असल्यामुळे तरुणांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. माझ्यावर हल्ला झाल्यानंतर प्रशासनामध्ये थोडी चलबीचाल झाली मात्र कुठल्याही प्रकारचं धोरणात्मक निर्णय किंवा ॲक्शन सरकारकडून होताना दिसत नाही असे खंतही त्यांनी व्यक्त केली.  प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष राज्यातील सर्वच भागात गुटखा आणि मावा खुलेआम विक्री जोरात सुरू आहे. मात्र अन्न औषध प्रशासन याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत असून या मावा आणि गुटखा विक्री करणाऱ्या या महानगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून लावण्यात येत असताना महानगरपालिका ही याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करत.  संपूर्ण जिल्ह्यात याच प्रकारे सर्व अवैद्य धंदे सुरू असून प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे? हा प्रश्न हेरंब कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.

Gutkha Ban : गुटखाबंदीने पोलिसांचे हप्ते वाढले…हेरंब कुलकर्णींचा थेट निशाणा Read More »

Nilesh Lanke : जलजीवन योजनेत घोटाळा…लंकेकडून कारवाईची मागणी; अनेक चर्चांना उधाण

Nilesh Lanke : – अहमदनगर जिल्ह्यात जलजीवन मिशन अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या पाणी योजनांच्या निविदा प्रक्रियेत मुख्य कार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी संगनमताने घोटाळा केल्याचा आरोप विधानसभेत आमदार नीलेश लंके यांनी केला आहे.  यामुळे जिल्ह्यात अनेक चर्चांना उधाण आला आहे. या प्रकरणात कारवाईची मागणी देखील त्यांनी विधानसभेमध्ये केली आहे.   विधानसभेत लंके म्हणाले, ठेकेदारास काम देण्यासाठी गैरमार्गाचा अनेकदा अवलंब करण्यात आला आहे. खोटी कागदपत्रे जोडणे, ठेका मिळाल्यानंतर काम पुर्ण नसणे, कॅपॅसिटीपेक्षा कोटींची जास्त कामे देण्यात आली.  एका ठेकेदारास सुरूवातील अपात्र ठरविणे व त्याच ठेेकेदाराला लगेच दोन दिवसांत पात्र ठरविण्यात आले आहे. टेेंडर रद्द करून पुन्हा करणे, टेेंडर नोटीसमधील अटी बदलणे अशा गैरमार्गाचा अवलंब केल्याच्या तक्रारी कार्यकारी अभियंता यांच्याकडे करूनही काहीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे लंके यांनी नमुद केले.   जल जीवन कार्यक्रमांतर्गत पारनेर-नगर मतदारसंघातील मौजे जामगांवसह सहा गावांची पाणी पुरवठा योजनेचे काम घेताना ठेकेदारांनी खोटी व बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केली आहे. ठेकेदाराकडे कोणतीही कागदपत्रे नसताना काम देण्यात आले आहे. या ठेकेदाराने काम पुर्ण झाल्याचे दाखलेही खोटे सादर केले असून त्यावर संबंधित विभागाच्या जावक क्रमांकाचा उल्लेख नाही तसेच सही देखील बनावट आहे. शासन निर्णयाप्रमाणे प्रक्रिया राबविण्यात आलेली नसल्याचे लंके यांनी सांगितले.   ठेका घेतलेली सर्व कामे 25 ते 30 टक्के पुर्ण आहेत. टेंडर प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या व्यक्ती, संस्था यांच्याविषयी नगर जिल्हयातील लोकप्रतिनिधीनींनी जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे पुराव्यासह वारंवार तक्रारी करण्यात येऊनही चौकशी करण्यात येत नाही.  ठेकेदारासबंधी माहीती मागविल्यानंतर माहीती देण्यात येत नाही. बनावट कागदपत्रे सादर करून ठेकेदाराने कामे मिळविली आहेत. या ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजे अशी आग्रही मागणी आ. लंके यांनी यावेळी बोलताना केली.

Nilesh Lanke : जलजीवन योजनेत घोटाळा…लंकेकडून कारवाईची मागणी; अनेक चर्चांना उधाण Read More »

Satyajit Tambe :  सरकाने शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीत टाकले… ‘त्या’ प्रकरणात तांबेंचा सरकारवर निशाणा

Satyajit Tambe : केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयानंतर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात कांद्यामुळे तापमान वाढला आहे.  केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत कांदा निर्यातीवर बंदी लावली आहे. यामुळे राज्यातील हजारो शेतकरी आंदोलन करत आहे यातच आता आमदार सत्यजीत तांबे या प्रकरणात केंद्र सरकारवर निशाणा साधत कांद्याच्या निर्यातीवरील बंदीवर तातडीने फेर विचार करण्याची शिफारस राज्य शासनाने केंद्र शासनाकडे करावी, अशी मागणी सभागृहात केली. आमदार सत्यजीत तांबे यांनी अधिवेशनात शेतकरी प्रश्न, महावितरण व महापारेषणमधील कंत्राटी वीज कामगारांच्या प्रश्नांकडे  सरकारचे लक्ष वेधले. तसेच कांदा निर्यात बंदीवर राज्य शासनाने केंद्र सरकारकडे फेर विचार करण्याची मागणी करावी असे मुद्दे आमदार सत्यजीत तांबे यांनी मांडले.  वीज कंपन्यांमध्ये रिक्त जागांवर कंत्राटी कामगारांची नियुक्ती केली जाते. तसेच आजच्या घडीला 42 हजार कंत्राटी वीज कामगार कार्यरत असून कंत्राटी वीज कामगार विजेची कामे करत असतात. कामगारांना कोणतीही सुरक्षा साधनांचा पुरवठा कंपनीमार्फत केला जात नाही. मागील तीन वर्षांत विजेचा धक्का (शॉक) लागल्यामुळे 80 वीज कामगारांना जीव गमवावा लागला, अशी खंत आ. तांबे यांनी सभागृहात बोलून दाखवली.  या कामगारांना वीजेपासून संरक्षण करणाऱ्या साहित्याचा वाटप होते का? याकडे सरकारने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे, असा कंत्राटी वीज कामगारांचा सुरक्षेसंदर्भातील गंभीर मुद्दा अधिवेशनात आमदार तांबे यांनी मांडला.  मुलभूत सुविधांपासून वीज कामगार वंचित लाईनमन व अन्य कामगारांना सुरक्षेच्या साधनाशिवाय खांबांवर चढणे, बिघाड दुरुस्त करणे, अशी जोखमीची कामे करावी लागतात. सुरक्षा संदर्भातील साधने पुरविणे हे कंपनीचे काम असते. मात्र, कंपनी याकडे दुर्लक्ष करते. तसेच कामगारांना वेळेवर पगार दिला जात नसून, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी व विमा काढला जात नाही. अशा मुलभूत गरजांपासून कामगारांना वंचित राहावं लागत आहे असं आमदार सत्यजीत तांबे म्हणाले.

Satyajit Tambe :  सरकाने शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीत टाकले… ‘त्या’ प्रकरणात तांबेंचा सरकारवर निशाणा Read More »

Ahmednagar Police: चैन स्नॅचिंग करणारा सराईत आरोपी जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Ahmednagar News: अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई कारवाई करत संगमनेर शहरात चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. 20 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 3.00 च्या सुमारास फिर्यादी उषा अशोक लोंगानी त्यांचे नातवाला घराकडे घेऊन जात असतांना पाठीमागुन बाईकवर दोन आरोपींनी येवुन त्यांच्या गळ्यातील 32 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दोन तोळे वजनाचे गंठण तोडुन बळजबरीने चोरुन घेवुन पळुन गेले होते. त्यांनतर त्यांनी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये भादविक 392, 34 प्रमाणे अनोळखी दोन आरोपी विरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानंतर दिनेश आहेर, स्था.गु.शा.अहमदनगर यांनी विशेष पथक नेमुण या प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश दिले होते.  या आदेशा प्रमाणे पोनि. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/मनोहर गोसावी, संतोष लोढे, पोना/रविंद्र कर्डीले, पोना/संदीप चव्हाण, गणेश भिंगारदे, संतोष खैरे, पोकॉ/रणजित जाधव, रोहित मिसाळ, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, चापोकॉ/अरुण मोरे पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुण  गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.  स्थागुशा पथकाने घटनाठिकाणी भेट देवुन घटनाठिकाणचे आजुबाजुचे सी.सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करुन आरोपीची माहिती घेत असतांना सी.सी.टी.व्ही. फुटेजमधील संशयीत आरोपीचे नांव सचिन ताके रा. उंदीरगांव, ता. श्रीरामपुर असे असल्याचे निष्पन्न झाले.  पोनि दिनेश आहेर स्था.गु.शा. अहमदनगर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, या प्रकरणातील आरोपी त्याचा आणखी एक साथीदारासह अहमदनगर शहरातील चांदणी चौक परिसरात येत आहे.  यानंतर या बातमीनुसार  पोलीस पथकाने चांदनी चौक येथे सापळा लावला आणि एका आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.  

Ahmednagar Police: चैन स्नॅचिंग करणारा सराईत आरोपी जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई Read More »

Headache

Headache Relief Tips:  डोकेदुखीपासून औषधाशिवाय  मिळणार आराम; ‘या’ 5 पद्धतीचा करा वापर

Headache Relief Tips : आज असे अनेकजण आहे ज्यांना डोकेदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि, डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात.  हवामानातील बदल,  निद्रानाश, तणाव यामुळे डोकेदुखी होऊ शकते. जर तुम्ही डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर औषधांव्यतिरिक्त, तुम्ही या पद्धतींद्वारे देखील डोकेदुखीपासून मुक्त होऊ शकता. कधी कधी कामाचा ताण हे देखील डोकेदुखीचे कारण असू शकते. चला तर मग आम्ही तुम्हाला डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी घरगुती उपायांबद्दल सांगू. डोकेदुखीपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी उपायलाईट डोळ्यांवर जास्त प्रकाश पडणे देखील चांगले नाही. कधीकधी प्रकाशाच्या तेजामुळे डोकेदुखी देखील होऊ शकते. अशा वेळी डोकेदुखीचा त्रास टाळण्यासाठी रूममधील लाईट  मंद ठेवा. सूर्यप्रकाशापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी चष्मा वापरा. मानसिक दबाव कमी कराबर्‍याच वेळा काम किंवा इतर कोणत्याही गोष्टींबद्दल खूप दबाव असतो, यामुळे देखील तीव्र डोकेदुखी होऊ शकते. अशा परिस्थितीत मानसिक दबावापासून दूर राहा. डोकेदुखी टाळण्यासाठी आणि डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. कामाच्या ओझ्यामुळे मानसिक दडपणही वाढते. हे टाळण्याचा प्रयत्न करा. डोके मालिशडोकेदुखीपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी मसाज हा एक चांगला उपाय आहे. मसाज करून तुम्हाला वेदनांपासून आराम मिळू शकतो. डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी डोक्याच्या मसाजसोबतच कपाळ, मान आणि खांद्यांची मालिश करावी. कधी कधी थकवा आल्यानेही वेदना होतात. मसाज केल्याने तणावही कमी होतो. कॅफिनचे सेवनकॅफिनचे सेवन डोकेदुखीमध्ये खूप फायदेशीर आहे. अनेकजण डोकेदुखीवर औषध म्हणून चहाचा वापर करतात. तीव्र डोकेदुखीच्या बाबतीत चहा आणि कॉफीचे सेवन करणे चांगले. जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर चहा किंवा कॉफी प्यायल्याने डोकेदुखी वाढणे थांबू शकते. आल्याचे सेवनडोकेदुखीवर उपचार करण्यासाठी आल्याचे सेवन करणे खूप चांगले आहे. आल्याच्या चहाने तुम्ही डोकेदुखी दूर करू शकता. अद्रक दुधात मिसळूनही वापरू शकता. यामुळे डोकेदुखीपासून बऱ्याच अंशी आराम मिळतो आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. (अस्वीकरण: आमचा लेख केवळ माहिती प्रदान करण्यासाठी आहे. अधिक माहितीसाठी नेहमी तज्ञाचा सल्ला घ्या.)

Headache Relief Tips:  डोकेदुखीपासून औषधाशिवाय  मिळणार आराम; ‘या’ 5 पद्धतीचा करा वापर Read More »

Ahmednagar News: ‘त्या’ प्रकरणानंतर कुत्र्याला दिले मंत्री भुजबळांचे नाव…मराठा समाज आक्रमक

Ahmednagar News – ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण केलं होत. सध्या ते राज्यभर दौरे करत असून जनतेची भेट घेत आहे. दरम्यान ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यात येऊ नये अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी घेतल्याने आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. जिल्ह्यातील कोपरगाव येथे सकल मराठा समाजाने एका कुत्र्याला छगन भुजबळांचे नाव देत बिस्कीट खाऊ घालत आंदोलन केलं. सध्या राज्यात ओबीसी व मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. याच मुद्द्यावरून सध्या मनोज जरांगे व छगन भुजबळ हे एकमेकांवर टीका टिपण्णी करत आहे. यामुळे राजकारण तापू लागले आहे. दरम्यान नेत्यांची भाषा खालावू लागल्याने आता मराठा समाज देखील आक्रमक होऊ लागला आहे. नुकतेच भुजबळ यांनी टीका करताना मेंदूने दिव्यांग, टाकीवर चढलेले गाढव एवढ्या वर कोणी नेले असे म्हणत जरांगे यांच्यावर बोचरी टीका केली. यांच्या निषेधार्थ कोपरगाव सकल मराठा समाज आक्रमक झाला असून सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी आंदोलन स्थळी अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी चक्क एका कुत्र्याला प्रतिकात्मक छगन भुजबळ याचे नाव देत त्याला बिस्किट खाऊ घालत भुजबळ यांची कान उघडणी करण्यात आली आहे. त्यांना या कुत्र्यप्रमाणे इमानदार राहण्याचा व शांत राहण्याचा सल्ला मराठा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. सदर अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होत आहे.

Ahmednagar News: ‘त्या’ प्रकरणानंतर कुत्र्याला दिले मंत्री भुजबळांचे नाव…मराठा समाज आक्रमक Read More »

animal

Animal Box Office Collection: रणबीर कपूरने मोडला सुपरहिट चित्रपटाचा रेकॉर्ड! 8 दिवसात केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

Animal Box Office Collection: रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांचा काही दिवसापूर्वी रिलीज झालेला चित्रपट अॅनिमल बॉक्स ऑफिस सध्या धुमाकूळ घालत आहे.  अॅनिमल बॉक्स ऑफिस कलेक्शन बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. धमाकेदार ओपनिंग असलेल्या या चित्रपटाला रिलीज होऊन एक आठवडा झाला आहे आणि अजूनही लोकांमध्ये त्याची क्रेझ आहे. रिलीजच्या आठव्या दिवशी, अॅनिमलने त्याच्या सर्वकालीन हिट संजूच्या कमाईचा रेकॉर्ड मोडला आहे.   रणबीर कपूरच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट बनण्याच्या दिशेने अॅनिमल वाटचाल करत आहे. केवळ वीकेंडलाच नाही तर आठवड्याच्या दिवशीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या दिवशी अॅनिमल कीने 63 कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 66.27 कोटी रुपये कमावले, तिसऱ्या दिवशी 71.46 कोटी रुपये कमावले आणि चौथ्या दिवशी अॅनिमलने 43.96 कोटी रुपये कमवले. पाचव्या दिवशी रणबीर कपूरच्या चित्रपटाची कमाई 37.47 कोटी रुपये होती. सहाव्या दिवशी 30.39 कोटी, सातव्या दिवशी 25.50 कोटी जमा झाले. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, अॅनिमलने शुक्रवारी म्हणजेच आठव्या दिवशी 15-17 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह अॅनिमलने आतापर्यंत 353-355 कोटी रुपये जमा केले आहेत, जे खूपच विलक्षण आहे. गदर 2 चा रेकॉर्ड लवकरच मोडणार गदर 2 ने भारतात 525.7 कोटी रुपयांची कमाई केली होती. अशा परिस्थितीत अ‍ॅनिमलच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, असे म्हटल्यास अ‍ॅनिमल लवकरच गदर 2 चा रेकॉर्ड मोडेल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. संजूचा रेकॉर्ड मोडला यासह रणबीरने त्याच्याच ‘संजू’ या चित्रपटाच्या लाइफटाईम कलेक्शनचा विक्रम मोडला आहे. 2018 मध्ये रिलीज झालेल्या संजूचे आयुष्यभराचे कलेक्शन 342.53 कोटी रुपये होते. अशा स्थितीत प्राण्यांच्या कमाईनेही हा टप्पा ओलांडला आहे. आता अॅनिमल हा रणबीर कपूरच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

Animal Box Office Collection: रणबीर कपूरने मोडला सुपरहिट चित्रपटाचा रेकॉर्ड! 8 दिवसात केली ‘इतक्या’ कोटींची कमाई Read More »