DNA मराठी

ahmednagar news

Agriculture News : राज्यातील 72 टक्के दूध खाजगी संस्थांना ! अनुदान फक्त सहकारीला

Agriculture News : राज्यातील शेतकरी गेल्या दोन महिन्यापासून दुधाचे दर कोसळल्याने अडचणीत सापडला आहे. यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना अनुदान द्यावे या मागणीसाठी किसान सभा, विविध शेतकरी संघटना व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती गेले दोन महिने सातत्याने आंदोलन करत आहे.  आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 22 नोव्हेंबर 2023 रोजी सह्याद्री अतिथीगृहावर बोलावलेल्या बैठकीतही किसान सभेने याबाबत जोरदार मागणी केली होती. राज्यभर तहसील कार्यालयांवर दुध ओतून करण्यात आलेल्या आंदोलनांमध्येही हीच मागणी करण्यात आली होती.  आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सरकार याबाबत सकारात्मक निर्णय करेल असे आश्वासन विखे पाटील यांनी वारंवार दिले होते. मात्र बैठकीला आज महिना उलटून गेला तरी प्रत्यक्ष अनुदानाची घोषणा अजूनही करण्यात आलेली नाही.  विधी मंडळाच्या नागपूर अधिवेशनात अर्थातच याचे पडसाद उमटले. सभागृहात दूध प्रश्नाबाबत दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आ. हरिभाऊ बागडे, आ. बाळासाहेब थोरात, आ. जयंत पाटील, आ. राजेश टोपे  यांनी लक्षवेधी अंतर्गत  प्रश्न विचारले.  किमान या प्रश्नांना उत्तर देताना तरी दुग्धविकास मंत्री अनुदानाची घोषणा करतील अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. सरकार अनुदान देण्याबाबत सकारात्मक आहे हीच ध्वनीफीत यावेळीही वाजविण्यात आली.  दुध अनुदानाबाबतची सरकारची ही चालढकल संतापजनक असून अनुदान देण्यात होणारी ही दिरंगाई दुध कंपन्यांना लाभ पोहचविण्यासाठीच केली जात आहे. सध्या दुध क्षेत्रात पृष्ठकाळ (फ्लश सीजन) सुरु आहे. या काळात दुधाचे उत्पादन वाढलेले असते.  दुध कंपन्या या काळात स्वस्तात दुध घेऊन त्याची पावडर बनवितात. जानेवारीनंतर हळूहळू दुधाचे उत्पादन कमी होते. परिणामी दुधाचे भाव आपोआप वाढू लागतात. मार्च अखेरपर्यंत फ्लश सीजन संपून लीन सीजन सुरु होतो.  दुधाचे भाव तेंव्हा पुरवठा घटल्याने स्वाभाविकपणे वाढलेले असतात. जेंव्हा भाव आपोआप वाढतात तेंव्हा अनुदान देण्याचा मुहूर्त साधून त्याचा  लाभ कंपन्यांना पोहचविला जातो. अनुदानाबाबत  आजवरचा हाच अनुभव शेतकरी घेत आले आहेत. यावेळीही अनुदान जाहीर करण्यात होत असलेली दिरंगाई यासाठीच सुरु आहे.   दुग्धविकास मंत्र्यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी अनुदानाची घोषणा होईल असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात किती अनुदान देणार याबाबत खुलासा केलेला नाही ही बाबही चिंताजनक आहे.  भेसळ रोखण्यासाठीचे अधिकार दुग्धविकास विभागाला द्यावेत ही किसान सभेची मागणी आहे. सभागृहात लक्षवेधीला उत्तर देताना ही मागणी मान्य झाल्याचे दुग्धविकास मंत्र्यांनी  सभागृहात जाहीर केले आहे. मात्र मिल्कोमिटर व वजन काट्यात होणारी लूटमार रोखण्याबाबत असलेल्या मागणीबाबत अद्यापही धोरण घेण्यात आलेले नाही.  पशुखाद्याचे भाव कमी करण्याबाबतही  सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. तत्काळ किमान भाव फरका इतकी रक्कम अनुदान म्हणून जाहीर करून पूर्वलक्षी प्रभावाने गेले दोन महिन्याचा भाव फरक सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा, पुढील काळातही हे अनुदान शेतकऱ्यांना सरळ खात्यावर द्यावे तसेच पशुखादय, औषधे व चाऱ्याचे  दर कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती करत आहे.  डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, इंजि.  सतीश देशमुख, जोतीराम जाधव, दादा गाढवे, दीपक वाळे, राजकुमार झोरी, श्रीकांत करे,  डॉ. अशोक ढगे, नंदू रोकडे,  सदाशिव साबळे, अमोल गोर्डे, धनंजय धोरडे, रामनाथ वदक, सुदेश जाधव, सुदेश इंगळे, रवी हासे, दीपक अण्णा काटे, सागर जाधव, अप्पा अनारसे, अरविंद कापसे.

Agriculture News : राज्यातील 72 टक्के दूध खाजगी संस्थांना ! अनुदान फक्त सहकारीला Read More »

Ahmednagar Shivaji Maharaj Statue: शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करा : नगरसेविका शिला दीप चव्हाण यांची मागणी

Ahmednagar Shivaji Maharaj Statue : ऐतिहासिक अहमदनगर शहरातील महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येणार आहे.   या पुतळ्याचे अनावरण मराठा समाजाच्या हक्कासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात यावे अशी मागणी पालिका सभागृहात नगरसेविका शिला दीप चव्हाण यांनी केली आहे. तसेच मनपा आयुक्त व महापौर यांना देखील त्यांनी या मागणीचे पत्र दिले आहे. त्यांनी या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला बरोबर घेऊन आदर्श राज्याची निर्मिती केली आहे. यामुळे त्यांचा महापालिकेत बसविण्यात आलेला पुतळा सर्वांना प्रेरणा व ऊर्जा देणारा आहे. अहमदनगर महापालिका प्रशासनाने गुरुवारी (दि.21 डिसेंबर) रोजी महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे नियोजन केले आहे.  या पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते झाल्यास सर्व नगरकरांना आनंद होईल.मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला आरक्षण मिळावा यासाठी स्वत:च्या मालकीची जमीन विकून संघर्ष करत आहे. यामुळे ते एक लढवय्ये कार्यकर्ते आहे. आज समाजासाठी सर्वस्वी त्याग करण्याची त्यांची भूमिका आहे.

Ahmednagar Shivaji Maharaj Statue: शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करा : नगरसेविका शिला दीप चव्हाण यांची मागणी Read More »

Sujay Vikhe Patil : खा. डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांना मोठे यश; ‘त्या’ प्रकरणात मिळाली मंत्री मंडळाची मान्यता

Sujay Vikhe Patil : अहमदनगर मध्ये रोजगाराची उपलब्धता वाढवण्याकरिता मौजे वडगाव गुप्ता येथील जमीन औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकाने घेतला आहे. नगर जिल्ह्यातील औद्योगिक विकासाकरिता महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्याकरीता शिर्डी आणि वडगाव गुप्ता येथे जमीन उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू केला होता. शिर्डी येथील औद्योगिक वसाहती करिता शेती महामंडळाच्या जमिनी उपलब्ध करून देण्यास राज्य मंत्री मंडळाने यापूर्वीच निर्णय घेतला होता.  काल झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत नगर तालुक्यातील महाराष्ट्र शासनाची वडगाव गुप्ता येथील 600 एकर म्हणजेच सुमारे 225 हेक्टर आर जमीन फेज 2 साठी विनामूल्य वर्ग करण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाने मान्यता दिली असल्याचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.  विशेष म्हणजे राज्यात ही पहिलीच एमआयडीसी अशी आहे ज्या एमआयडीसीसाठी शेतकरी तसेच खाजगी जमीन मालकाची जमीन संपादित केली गेली नाही. अहमदनगर जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर औद्योगिक वसाहतीचा विस्तार होणे आवश्यक होते. या विस्ताराकरिता जागा उपलब्ध होणे जरूरीचे होते. मात्र राज्यात महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर या सर्व निर्णयाला गती मिळाली आणि राज्य सरकारने औद्योगिक विकासाकरिता वडगाव गुप्ता येथे एमआयडीसीसाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली. यामुळे मोठे उद्योग जिल्ह्यात येतील असा विश्वास खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. औद्योगिक वसाहतीच्या विस्ताराकरिता खासदार डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. दरम्यान जागा विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल खा. सुजय विखेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.

Sujay Vikhe Patil : खा. डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांना मोठे यश; ‘त्या’ प्रकरणात मिळाली मंत्री मंडळाची मान्यता Read More »

MIDC Police: श्री संत सावता महाराज मंदीरात चोरी करणा-या सराईत गुन्हेगारास अटक, MIDC पोलीसांची कामगिरी

MIDC Police: MIDC पोलीसांनी मोठी कारवाई करत पिंपळगाव माळवी येथील श्री संत सावता महाराज मंदीरात चोरी करणा-या सराईत गुन्हेगारास अटक केली आहे. MIDC पोलीसांनी दोन गुन्हे उघडकीस आणुन तब्बल एक लाख रुपये किमतीचा मुददेमाल जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 03 डिसेंबर 2023 रोजी फिर्यादी श्रीकृष्ण बबन रायकर ( रा पिंपळगाव माळवी ता.जि.अहमदनगर) यांनी श्री. संत सावता महाराज मंदीरातील विठठल रुख्मीनीच्या डोक्यातील मुकुट व रुख्मीणीच्या गळयातील मणीमंगळ सुत्रातील सोण्याचे 4 मणी कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याची फिर्याद दाखल केली होती. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा  तपास करत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा राहुल नानासाहेब शिंदे आणि कुणाल विजय बनसोडे यांनी केला आहे आणि ते  सध्या वडगाव गुप्ता येथे आहेत.  त्यानुसार सपोनि राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन त्यांना वडगाव येथे पाठविले. सदर पोलीस पथकांनी वडगाव गुप्ता येथुन सदर आरोपीला सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेतले.  सदर आरोपीनी गुन्हयाची कबुली दिली असुन त्यांचेकडे एक नटराज देवताची मृती मिळुन आली. तसेच त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल आहे. तसेच त्यांनी सदरची मृती कोटुन आणली याबाबत त्यांना काहीएक सांगता आले नाही. त्यामुळे त्यांचेवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचे आरोपी हे सराईत गुन्हेगार आहे.

MIDC Police: श्री संत सावता महाराज मंदीरात चोरी करणा-या सराईत गुन्हेगारास अटक, MIDC पोलीसांची कामगिरी Read More »

Ahmednagar News:  दागिने व रोख रकमेची चोरी करणारी महिला आरोपींची टोळी जेरबंद

Ahmednagar News: बसमध्ये प्रवाशांचे दागिने व रोख रकमेची चोरी करणारी महिला आरोपींची टोळी 2 लाख 38 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात आली आहे. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. 22 मे 2023 रोजी फिर्यादी रुपेश रोहिदास गायकवाड तारकपुर बस स्टँड अहमदनगर येथुन आळेफाटा जाणेकरीता बस मध्ये चढत असतांना अज्ञात आरोपींनी 10 ग्रॅम वजनाची सोन्याचे चैन चोरुन नेली होती. या गुन्ह्याची नोंद कलम 379 प्रमाणे तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली होती.  गुन्हाची नोंद झाल्यानंतर दिनेश आहेर यांच्या पथकाने तारकपुर बस स्टँड येथे सापळा रचुन तीन संशयीत महिलानां तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये पुढील तपासकामी हजर केले असून या प्रकरणाच्या पुढील तपास करत आहे. सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर , अनिल कातकाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Ahmednagar News:  दागिने व रोख रकमेची चोरी करणारी महिला आरोपींची टोळी जेरबंद Read More »

Ahmednagar News: इंस्टाग्रामवर ओळख अन् मुलींनी गाठले परराज्य; कोतवाली पोलिसांनी शोधून आणले!

Ahmednagar News: आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण एकमेकांशी गप्पा गोष्टी करत असतात.  काहीजणांना सोशल मीडियावर प्रेम देखील होतो मात्र त्यानंतर अनेकांची फसवणूक झाल्याची अनेक बातम्या आपण वाचले आहेत.  अहमदनगर शहरात कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच एक घटना घडली आहे. अठरा वर्षे पुर्ण झालेल्या दोन मुली सोशल मिडीयाच्या इंस्टाग्रामवर अनोळखी तरुणांशी ओळख करून घरातून निघून गेल्या. पालकांनी शोधाशोध केली मात्र उपयोग झाला नाही.त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनातून कोतवाली पोलिसांनी एका मुलीला बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमारेषेवरून आणले आणि काही दिवस पाहुण्यांकडे अहमदनगरमध्ये आली आणि निघून गेलेल्या दुसऱ्या मुलीला मराठवाड्यातून आणले.  सोशल मिडीयावर झालेले प्रेम,मैत्री हे मृगजळासारखे असते. दिखाव्याच्या खोट्या गोष्टींमध्ये गुंतवून मुलांकडून जाळ्यात फसवले जाते. अशा दिखाव्याला मुली बळी पडतात. घरातील आई वडील नातेवाईकांचा जराही विचार न करता कल्पना विश्वाच्या जगात हरवून जातात. मात्र यातून कुटुंबाला होणारा त्रास, बदनामी अटळ असते. जेंव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले तेंव्हा त्यांना आपण खूप मोठी चूक केली असल्याचे समजले. तपास लावल्यानंतर मुलींच्या परिसरातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस जवान विश्वास गाजरे,रवी टकले, प्रमोद लहारे, सचिन लोळगे यांचा सत्कार केला. ‘याबाबत पालकांनी आपल्या पाल्यांवर कायम लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक विषयाबाबत वेळोवेळी संवाद साधावेत. पालकांचे आपल्या पाल्याची मैत्रीपूर्ण संबंध असावेत. मुलांमध्ये फक्त भीती नको तर, आदरयुक्त भीती असावी. पालकांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष देण्याचे भावनिक आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी व्यक्त केले.’ …मग आयुष्याचा जोडीदार निवडताना का काळजी घेत नाही?  ‘सर्व शाळा-महाविद्यालयात मार्गदर्शन करताना चंद्रशेखर यादव एक आवर्जून उदाहरण सांगतात की,’आपण एक टिकलीचे पाकीट घ्यायचे असेल तर दहा ते बारा पाकीट चाळून पाहतो, चप्पल ड्रेस किंवा काहीही घ्यायचं म्हटलं तरी चार ते पाच दुकानात जाऊन पाहतो मग, आपण आयुष्याचा जोडीदार निवडताना किती काळजी घ्यायला पाहिजे? त्यामुळे मुलींनी अधिकची काळजी घ्यायला हवी’

Ahmednagar News: इंस्टाग्रामवर ओळख अन् मुलींनी गाठले परराज्य; कोतवाली पोलिसांनी शोधून आणले! Read More »

Ahmednagar Accident: महाराष्ट्र हादरला! संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू

Ahmednagar Accident: राज्यात कालरात्री पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या दोन भीषण रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एक महिला जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नगर – पुणे- कल्याण महामार्गावर डिंगोरे परिसरात तीन वाहनांच्या धडकेत आठ जणांचा जागीच मृत्यू झाला.  मृतांमध्ये दोन मुलांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अकराच्या सुमारास नगर-कल्याण महामार्गावरील डिंगोरे परिसरातील अंजिराची बाग येथे हा भीषण अपघात झाला. या अपघातात माळशेज घाटाजवळील मढ गावात राहणाऱ्या संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला.  अपघातग्रस्ताचे कुटुंब जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे नातेवाइकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी गेले होते व रात्री उशिरा घरी परतत होते. गणेश मस्करे (वय 30), कोमल मस्करे (वय 25), हर्षद मस्करे (वय 4), काव्या मस्करे (वय 6) अशी मृतांची नावे आहेत. तीन वाहनांची धडक… कुटुंब उद्ध्वस्त गणेश मस्करे हा भाजीविक्रीचा व्यवसाय करायचा. त्यामुळेच तो पिकअपमध्ये भाजीपालाही भरून आणत होता. कुटुंबाला घरी सोडून ते नेहमीप्रमाणे भाजी विकण्यासाठी जात होता.  पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. मस्करे हे आळेफाटा येथून भाजीपाला घेऊन पिकअपने ओतूरहून कल्याणच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या रिक्षाने पिकअपला धडक दिली. या अपघातात रिक्षाचालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. चालक आणि मस्करे कुटुंब पिकअपच्या केबिनमध्ये बसले होते आणि मागे एक कुली बसला होता.  रिक्षाला धडकल्यानंतर पिकअपची कल्याणकडून येणाऱ्या ट्रकला धडक बसली. त्यामुळे पिकअपमधील 5 पुरुष, 1 महिला आणि दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला. कारवर टेम्पो उलटला पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर येथे रविवारी रात्री भीषण अपघात झाला. त्यांच्या कारवर टेम्पो उलटल्याने चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी गावाजवळ हा अपघात झाला. समोरून येणाऱ्या कारवर भरधाव वेगात असलेला टेम्पो पलटी झाल्याने कारमधील चार जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर एक महिला थोडक्यात बचावली. या अपघातात सुनील धारणकर (वय 65 वर्षे), ओजस्वी धारणकर (वय 2 वर्षे), आशा सुनील धारणकर (वय 42 वर्षे) आणि अभय सुरेश विसाळ (वय 48 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणारा टेम्पो एका वाहनाला ओव्हरटेक करत असताना रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की टोयोटा इटिओस कारचा चक्काचूर झाला.  या घटनेनंतर चंदनापुरी ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठून तातडीने मदतकार्य सुरू केले, त्यामुळे महिलेचा जीव वाचला. मात्र या अपघातात अकोले तालुक्यातील एका दोन वर्षाच्या चिमुरडीसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Ahmednagar Accident: महाराष्ट्र हादरला! संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू Read More »

Pune News: धक्कादायक! शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने नराधमांनी केलं असं काही.., परिसरात खळबळ

Pune Women Murder: राज्याची संस्कृती राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार पुणे मधील बिबवेवाडी परिसरात महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यास नाकार दिल्याने त्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.   बिबवेवाडी परिसरातील एका मंदिराजवळ पोलिसांना महिलेचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत महिलेचे बिबवेवाडी येथील गोयाला गार्डनसमोर एक दुकान होते, ज्यात आयुर्वेदिक औषधांची विक्री होत असे. 9 डिसेंबर रोजी ही महिला नेहमीप्रमाणे दुकानात झोपण्यासाठी आली. त्याचवेळी आरोपी दारूच्या नशेत तेथे पोहोचला आणि तिला शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. महिलेने नकार दिल्यावर आरोपीने घटनास्थळी उपस्थित असलेल्या रॉडने तिच्यावर अनेक वार केले. गंभीर जखमी महिलेचा जागीच मृत्यू झाला. गुन्हा लपविण्यासाठी आरोपींनी क्रौर्याची परिसीमा ओलांडली. त्यांची ओळख पटू नये म्हणून त्यांनी महिलेच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा सोडल्या. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना एक संशयास्पद दुचाकी दिसली. पोलिसांच्या पथकाने बिबवेवाडी ते चाकणपर्यंत 250 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. रविसिंग चितोडिया आणि विजय मारुती पाटील अशी आरोपींची नावे आहेत. तपासादरम्यान दुचाकीवरून संशयित रविसिंगचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला नाशिक येथून अटक केली. चौकशीत त्याने विजय पाटीलचे नाव उघड केले. पोलिसांनी त्याला पालघर येथून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Pune News: धक्कादायक! शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने नराधमांनी केलं असं काही.., परिसरात खळबळ Read More »

Anna Hazare : आता मुख्यमंत्र्यांची पण चौकशी होणार!! जाणून घ्या नवीन कायद्याबद्दल सर्वकाही……

Anna Hazare: भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींचा समावेश करत विधान परिषदेने महाराष्ट्र लोकायुक्त विधेयकाला अखेर वर्षभरानंतर मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेतेमंडळींची चौकशी करणे शक्य होणार असून मुख्यमंत्री, मंत्री व आमदारही या कायद्याच्या कक्षेत येणार आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजार यांनी केले आहे. गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनातच लोकायुक्त हे विधेयक विधानसभेत मंजूर झाले होते. तब्बल वर्षभरानंतर हे विधायक विधान परिषदेत मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री देखील आता या कायद्याच्या चौकटीमधून सुटणार नाही लोकायुक्त कायदा व्हावा यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून लढा दिला. या दरम्यानच्या काळात अनेक मोठी आंदोलने देखील अण्णांनी केली. विधानसभेत मंजूर झालेला हा कायदा आता विधानपरिषदेत देखील मंजूर झाला.  तसेच पुढे बोलताना अण्णा म्हणाले, आम्ही केलेल्या मागणीनुसार लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार झाला होता. हा मसुदा विधानसभेत मंजूर करण्यात आला होता. विधान परिषदेत हे विधेयक आल्यानंतर यात सदस्यांच्या सूचनांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या लोकप्रतिनिधी, अधिकारी यांची चौकशी या माध्यमातून करता येणार आहे. मुख्यमंत्री देखील आता या कायद्याच्या चौकटीमधून सुटणार नाही. या कायद्याच्या आधारे आता मुख्यमंत्र्यांवर देखील कारवाई करणे शक्य होणार आहे असे यावेळी बोलताना अण्णा हजारे म्हणाले.

Anna Hazare : आता मुख्यमंत्र्यांची पण चौकशी होणार!! जाणून घ्या नवीन कायद्याबद्दल सर्वकाही…… Read More »

Sujay Vikhe Patil : आम्ही सदैव मराठा बांधवांच्या पाठीमागे! मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार लवकरच तोडगा काढणार: डॉ. सुजय विखे पाटील

Sujay Vikhe Patil :  खासदार डॉ. सुजय विखे पाटील आज शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथे साखर वाटपाच्या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी सकल मराठा समाज, बोधेगाव यांनी त्यांची भेट घेऊन सकल मराठा समाज बाधवांना ओबीसी मधून सरसकट आरक्षण मिळावे हा मुद्दा लोकसभेत मांडून आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी निवेदन दिले. खासदार विखेंनी त्यांचे निवेदन स्वीकारून सकारात्मक संवाद साधला. यावेळी मराठा आरक्षणावर भाष्य करताना ते म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या संदर्भात यापूर्वीही नामदार राधाकृष्ण विखे पाटील व मी सकारात्मक भूमिका मांडली आहे. आमचं समर्थन प्रत्येक वेळी सकल मराठा समाजाच्या बाजूने राहिले असून मराठा बांधवांच्या पाठीमागे आम्ही सदैव खंबीरपणे उभे आहोत. पालकमंत्री म्हणून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व खासदार म्हणून मी यापूर्वीही मराठा समाजाची भूमिका स्पष्ट मांडली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच मराठा आरक्षणावर योग्य तो तोडगा काढण्यात येईल असे मत त्यांनी व्यक्त केले. शेवगाव तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिकाताई यांच्या माध्यमातून आजवर कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिलेला नाही व इथून पुढेही निरनिराळ्या विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असे मत मांडून आपण माझ्यावर जो विश्वास दाखवून मतदान केलं, या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही.  विशेष म्हणजे याची प्रचिती आपल्याला विविध विकासकामांच्या माध्यमातून वेळोवेळी आलीच आहे असे खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केले. आज बोधेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या साखर वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.  खासदार विखे पुढे म्हणाले, बोधेगाव गावासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या माध्यमातून विविध विकास कामे पूर्णत्वास आली आहेत. यापुढे देखील भरीव निधी उपलब्ध करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे स्पष्ट केले. दरम्यान २२ जानेवारीला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होणार असून याच पार्श्वभूमीवर साखर व चणाडाळ वाटपाचे नियोजन चालू आहे असे सांगून २२ जानेवारीला आपण दुसरी दिवाळी साजरी करणार आहोत असे मत मांडले.  सर्व लाभधारकांनी या साखरेतून दोन लाडू बनवावे आणि श्रीरामाच्या चरणी नैवेद्य म्हणून ठेवावेत असे देखील आवाहन खासदार सुजय विखे यांनी उपस्थितांना केले. यावेळी ताराभाऊ लोंढे, बापूसो पाटेकर, नितीन भाऊ काकडे, रजाक शेख, बाबा सावळेकर, बाळासो कोळगे, महादेव घोरतळे, मयूर हुंडेकरी, बाळासाहेब कोळगे, संजय खेडकर, भगवान मिसाळ, बाळासाहेब डोंगरे, रामकाका केसभर, अमोल सागडे आदी मान्यवरांसह भाजपाचे विविध पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sujay Vikhe Patil : आम्ही सदैव मराठा बांधवांच्या पाठीमागे! मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार लवकरच तोडगा काढणार: डॉ. सुजय विखे पाटील Read More »