DNA मराठी

ahmednagar news

Ahmednagar News: गोमांस विक्री करणारे 06 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Ahmednagar News : स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत बोधेगांव व खाटीक गल्ली शेवगांव येथे गोवंश जनावराची कत्तल करुन गोमांस विक्री करणारे 06 आरोपींना 90,200 रुपये किमतीचे मुद्देमालासह अटक केली आहे. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना  जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने माहिती घेवुन कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.  या आदेशानुसार दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/अतुल लोटके, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, पोकॉ/प्रमोद जाधव, किशोर शिरसाठ, शिवाजी ढाकणे, अमृत आढाव,उमाकांत गावडे यांचे पथक नेमुण त्यांना अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेकामी सुचना देवुन पथकास रवाना केले. नमुद आदेशान्वये पथकातील पोलीस अंमलदार हे शेवगांव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना खाटीक गल्ली, शेवगांव व बोधेगांव, ता. शेवगांव या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशीय जनावरांचे कत्तल करण्याची मनाई असतांना गोवंशी जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने आणुन त्यांची कत्तल करत करत आहेत अशी बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी दिनांक 28/12/2023 व दिनांक 29/12/2023 रोजी छापे टाकुन कारवाई करण्यात आली आहे.

Ahmednagar News: गोमांस विक्री करणारे 06 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई Read More »

Ahmednagar News: आरोपी विरोधात कारवाई करा! ‘त्या’ प्रकरणात समस्त मुस्लिम समाजाची मागणी

Ahmednagar News :  मुकुंदनगर परिसरात मौलाना असलम शेख यांना 27 डिसेंबर रोजी मारहाण करण्यात आली होती. या मारहाणी विरोधात परिसरातील नागरिकांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयमध्ये निवेदनाद्वारे आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  या प्रकरणात आरोपी असणाऱ्या अनिस सय्यदने मौलाना असलम शेख यांना गॅस कनेक्शनच्या वादातून जबरी मारहाण केली. या मारहाणीत मौलाना असलम शेख यांच्या उजव्या डोळ्याला मार लागला आहे.  या घटनेनंतर आरोपी विरोधात भिंगार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांनी आरोपी विरोधात आणखी कलम वाढवून योग्य ती कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे.

Ahmednagar News: आरोपी विरोधात कारवाई करा! ‘त्या’ प्रकरणात समस्त मुस्लिम समाजाची मागणी Read More »

Sujay Vikhe News : शेवटच्या गावापर्यंत पाणी सोडले जाईल- खा.डॉ. सुजय विखे पाटील

Sujay Vikhe News: 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होईल आणि निळवंडे मधून राहुरी तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत पाणी सोडले जाईल हे दोनही सण नागरिकांनी मोठ्या उत्साहामध्ये साजरे करावेत. मात्र हे सर्व काही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाले असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.  राहुरी तालुक्यातील कनगर या ठिकाणी खासदार सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते व माजी मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पंचक्रोशीतील नागरिकांना साखर व हरभरा डाळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सरकारच्या माध्यमातून तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दूरदृष्टीकोनातून तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये अनेक विकास कामे मार्गी लागत आहेत. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत ज्या गतीने कामे मार्गी लागली ती कामे विरोधी पक्षाकडे तीन वर्ष सत्ता असूनही लागली नाहीत असे मत यावेळी सुजय विखेंनी मांडले.  तसेच पुढे ते म्हणाले की, साखर व हरभरा डाळ वाटणे ही शासनाची योजना नसून येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यानिमित्ताने हे वाटप केले जात आहे असे त्यांनी सांगितले. हा आपल्यासाठी एक प्रकारे मोठा सण असून या निमित्ताने साखर व डाळीच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबीयांनी लाडू बनवून श्री रामांना वहावे व श्रीरामांची पूजा करावी आणि त्यांना लाडूचा नैवेद्य दाखवावा हा उद्देश यामागे असून आपल्यासाठी ही दुसरी दिवाळी आहे असे मत खासदार सुजय विखेंनी मांडले.  तरी अतिशय शुद्ध हेतूने सदरील उपक्रम राबविण्यात येत असून विरोधकांनी यावर कसलेही राजकारण करू नये असे आवाहन देखील त्यांनी केले. तसेच पुढे त्यांनी निळवंडे संदर्भात भाष्य केले. विखे घराणे निळवंडेचे पाणी येऊन देणार नाही अशी वल्गना नेहमी विरोधकांनी करून घाणेरडे राजकारण केले, मात्र आम्ही सर्व सामान्य नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत. यासाठी आमच्या शासनाने सर्वाधिक निधी मंजूर केला आणि विखे घराण्याचे पालकमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून निळवंडे ला पाणी सोडण्यात आले असे देखील त्यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी यावेळी सांगितले की, येत्या 22 तारखेला निळवंडे कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत राहुरी तालुक्यामध्ये पालकमंत्री पाणी सोडतील. तो अधिकार त्यांचा आहे. तसेच कनगरच्या वर्ग दोनच्या जमिनीचा प्रश्न देखील अगदी कमी कालावधीमध्ये मार्गी लावला जाईल असेही त्यांनी आश्वासन दिले व सत्तेचा वापर हा केवळ जनकल्याणासाठीच केला जाईल. विखे घराने जे काम हाती घेतले ते पूर्णत्वास जातेच त्यामुळे कुणीही काळजी करू नये असे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले की, खासदार डॉ. सुजय विखे पाटील व पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये अनेक विकास कामे मार्गी लागत असून विकासक दृष्टी ठेवणारे हे सर्वसामान्यांचे नेते आहेत असे प्रतिपादन केले.  तसेच त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत विरोधकांची सत्ता असल्यावर कोणतीही विकासकामे करण्यात आली नाही. केवळ सत्तेचा उपभोग घेण्यात आला असे स्पष्ट केले. तसेच महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये जे नामदार झाले त्यांचे काम शून्य असल्याने नागरिकांना आज देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.  विद्युत खाते असताना देखील शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने वीज न देऊ शकणाऱ्यांनी इतरांवर आरोप करणे थांबवावे असे देखील त्यांनी स्पष्ट केले. निधी पालकमंत्री व खासदार आणतात आणि श्रेय घेण्यासाठी त्याचे भूमिपूजन विद्यमान आमदार करतात हे कुठपर्यंत योग्य आहे, असा सवाल विचारून येत्या निवडणुकीमध्ये जनता यांना त्यांची जागा दाखवून देईल अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. तसेच 50 वर्षांपासून रखडलेला निळवंडेचा प्रश्न पंचवीस वर्षे आमदार असणारे का सोडू शकले नाहीत याचे उत्तर त्यांनी शेतकऱ्यांना व समस्त जनतेला द्यावे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये कनगरच्या गावासंदर्भातील वन खात्याचा प्रश्न देखील पालकमंत्री मार्गी लावणार असून प्रत्येकाच्या शेताला पाणी देखील मिळणार आहे.  निळवंडेच्या माध्यमातून परिसरातील तलाव देखील पूर्ण क्षमतेने भरून मिळतील याबाबत सर्वांनी निश्चिंत राहावे असे त्यांनी सांगितले. तसेच निळवंडे बाबत आमचे योगदान नाही असे म्हणणाऱ्यांनी आम्ही निळवंडे साठी काय काय केले हे तपासले पाहिजे. तुम्ही घरी बसून बाता मारता, मात्र आम्ही प्रत्यक्षात नागरिकांसाठी काम करतो. तुमचे 50 वर्षांमध्ये निळवंडेसाठी योगदान काय? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी विरोधकांना विचारला. या कार्यक्रमास भाजपाचे तालुकाध्यक्ष सुरेश दादा बनकर, संदीप गिते, विजय कानडे, दिपक वाबळे, अमोल भनगडे, दादा पाटील हारदे, मयूर हारदे, विजय बलमे, सरपंच सर्जेराव घाडगे, उपसरपंच बाळासाहेब गाढे, बाबासाहेब गाढे, संदीप घाडगे, महमद भाई इनामदार, दत्तू गाढे, सोसायटी चेअरमन दत्तात्रय गाढे, भगवान घाडगे, सुभाष नालकर, भाऊसाहेब घाडगे, राजेद्र दिवे, शंकर राव जाधव, यशवंतराव जाधव, तुषार गाढे, दादासाहेब घाडगे, सुनील शेटे, गोविंदराव दिवे आदी मान्यवर उपस्थित होते.

Sujay Vikhe News : शेवटच्या गावापर्यंत पाणी सोडले जाईल- खा.डॉ. सुजय विखे पाटील Read More »

Priyanka Gandhi:  प्रियांका गांधी यांच्या अडचणीत वाढ? ‘त्या’ प्रकरणात ईडीच्या आरोपपत्रात नाव

Priyanka Gandhi :  काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जमीन खरेदीशी संबंधित प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात प्रियांका गांधींचाही उल्लेख आहे. मात्र या प्रकरणात त्यांना आरोपी करण्यात आलेले नाही. काय प्रकरण आहे हे संपूर्ण प्रकरण हरियाणातील फरीदाबाद येथील जमीन खरेदीशी संबंधित आहे. माहितीनुसार, 2005-2006 दरम्यान, रॉबर्ट वाड्रा यांनी फरिदाबादच्या अमीपूर गावात प्रॉपर्टी डीलर एचएल पाहवा (थम्पीच्या जवळ) मार्फत सुमारे 40.8 एकर जमीन खरेदी केली होती, जी डिसेंबर 2010 मध्ये पाहवा यांना परत विकली गेली. त्याचप्रमाणे एप्रिल 2006 मध्ये याच अमीपूर गावात प्रियंका गांधी वड्रा यांच्या नावावर घर खरेदी करण्यात आले होते, जे फेब्रुवारी 2010 मध्ये पाहवा यांना परत विकण्यात आले. ईडीचे म्हणणे आहे की वाड्रा आणि थंपी यांचे दीर्घ संबंध आहेत आणि समान व्यवसाय करण्याव्यतिरिक्त दोघेही अनेक गोष्टी एकत्र करतात. हा एक मोठा खटला आहे, जो फरारी शस्त्र विक्रेता संजय भंडारीशी संबंधित आहे. रॉबर्ट वड्रा यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत रॉबर्ट वाड्रा यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) एका नवीन प्रकरणात आरोपी केले आहे ज्यात त्यांनी लंडनमधील एका घराचे नूतनीकरण केले आणि त्यात वास्तव्य केले. संजय भंडारी विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात हे घर कथितपणे ‘गुन्ह्याच्या कमाईचा’ भाग आहे. संजय भंडारी 2016 मध्ये ब्रिटनमध्ये पळून गेला आणि यूके सरकारने ईडी आणि केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) च्या कायदेशीर विनंतीवर कारवाई करत, या वर्षी जानेवारीमध्ये त्याच्या भारतात प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली. या प्रकरणात वाड्रा यांचे नाव प्रथमच समोर आले असून ईडीने निवेदन जारी करून ते सार्वजनिक केले आहे. परदेशात कथित अघोषित संपत्ती असलेल्या व्यक्तींवरील मनी लाँड्रिंग आणि करचुकवेगिरीच्या आरोपांची चौकशी करणे हा या तपासाचा मुख्य उद्देश आहे.  ईडीने या प्रकरणी यूएईस्थित अनिवासी भारतीय (एनआरआय) व्यापारी सीसी किंवा चेरुवथुर चकुट्टी थम्पी आणि यूकेचे नागरिक सुमित चड्ढा यांच्याविरुद्ध नवीन आरोपपत्र दाखल केले आहे.

Priyanka Gandhi:  प्रियांका गांधी यांच्या अडचणीत वाढ? ‘त्या’ प्रकरणात ईडीच्या आरोपपत्रात नाव Read More »

Maharashtra News: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ATM मशिन चोरी करणारी टोळी 48 तासांचे आत जेरबंद

Maharashtra News: अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत समशेरपुर, ता. अकोले येथील ए.टी.एम. मशिन चोरी करणारी टोळी 7,52,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह 48 तासांचे आत जेरबंद केली आहे.  23 डिसेंबर 2023 रोजी रात्री 12 ते सकाळी 06.00  चे दरम्यान समशेरपुर फाटा, ता. अकोले  येथील आदिवासी सहकारी सोसायटी कॉम्प्लेक्सचे गाळ्यामधील इंडिया 1 पेमेंट लि. कंपनीचे ए.टी.एम. मशिनला दोरखंड बांधुन ए.टी.एम. मशिन बोलेरो गाडीने बाहेर ओढुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली होती.  फिर्यादी नितीन सखाराम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अकोले पोलीस ठाण्यात भादवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यामध्ये एकुण 90,000 रुपये किमतीचे मशिन व त्यामधील रोख रक्कम चोरी गेलेली होती. या घटनेचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समशेरपुर परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासत असतांना गुन्ह्यातील आरोपी हे केळी रुम्हणवाडी मार्गे गेल्याचे दिसुन आले. पोनि दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमीदारामार्फत सदर गुन्ह्यातील ए.टी.एम. मशिन हे आरोपी भरत लक्ष्मण गोडे व त्याचे इतर साथीदारांनी चोरुन नेले आणि तो त्याचे राहते घरी त्याचे इतर साथीदारांसह थांबलेला असल्याची माहिती मिळाली.  या माहितीवरून सदर ठिकाणी जावुन गुन्हे शाखेच्या पथकाने भरत लक्ष्मण गोडे , सुर्यभान उर्फ काळ्या लक्ष्मण गोडे, अशोक रघुनाथ गोडे ,  सुयोग अशोक दवंगे आणि अजिंक्य लहानु सोनवणे यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून  1,42,000 रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली बोलेरो गाडी, गुन्ह्याचे वेळी वापरलेले मोबाईल व तुटलेले ए.टी.एम. मशिनसह एकुण 7,52,000  रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.  ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासकामी अकोले पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास अकोले पोलीस स्टेशन करीत आहे.

Maharashtra News: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ATM मशिन चोरी करणारी टोळी 48 तासांचे आत जेरबंद Read More »

Ahmednagar News: डोक्यामध्ये हातोडा मारुन जबरी चोरी करणारे 02 आरोपी 5,06,250 रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद

Ahmednagar News:  कार चालकाचे डोक्यामध्ये हातोडा मारुन जबरी चोरी करणारे परराज्यातील 02 आरोपी 5,06,250 रुपये किंमतीचे मुद्देमालासह 24 तासाचे आत जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई.   25 डिसेंबर 2023 रोजी फिर्यादी सचिन बापु पठारे हे सुपा येथे त्यांचे कंपनीचे मॅनेजर यांना सोडुन घरी जात असतांना रस्त्त्याने जाणारे दोन प्रवाशांनी त्यांना हॉटेल अमृत येथे सोडणेबाबत विनंती केली.  यामुळे फिर्यादी यांनी एम. एच.12 व्ही. व्ही. 7336 त्यांच्या गाडीमध्ये  प्रवाशांना बसवुन घेवुन जात असतांना रत्त्याने गाडीमध्ये मागील सिटवर बसलेल्या प्रवाशाने फिर्यादीचे डोक्यामध्ये काहीतरी टणक वस्तुने मारुन त्यांना जखमी केले आणि त्याचेकडील कार, मोबाईल, व रोख रक्कम असा एकुण 5,04,000 रुपये  किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला. सदर घटनेबाबत सुपा पोलीस ठाणे भादवि कलम 394 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.   गुन्ह्याचा सखोल तपास करत असताना पोनि. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारामार्फत सदरची कार व त्यामध्ये दोन आरोपी असे कोपरगांव ते सिन्नर जाणारे रोडलगत एका पेट्रोलपंपाजवळ थांबलेले असल्याची माहिती मिळाली. पोनि दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती त्यांच्या पथकास कळवुन कार व आरोपी ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या.   पथकातील पोलीस अंमलदार हे कोपरगांव ते सिन्नर जाणारे रोडवर चोरी गेलेले कारचा शोध घेत असतांना सदरची कार ही रोडचे कडेला एका पेट्रोलपंपाजवळ उभी असल्याचे दिसुन आल्याने पथकाने सापळा रचुन कारमधील दोन आरोपींना ताब्यात घेतले.   शिवम मातादीन गौतम आणि दुर्जन अनारसिंग गौतम असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. दोन्ही आरोपी उत्तर प्रदेशमधील आहे.  पोलिसांनी त्यांच्या अंगझडतीमध्ये कब्जात गुन्ह्यातील चोरीस गेली कार, मोबाईल, रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेला हातोडा असा एकुण 5,06,250 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आणि आरोपींना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी सुपा पोलीस स्टेशनमध्ये हजर केला आहे.

Ahmednagar News: डोक्यामध्ये हातोडा मारुन जबरी चोरी करणारे 02 आरोपी 5,06,250 रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद Read More »

Maharashtra Corona: राज्यात कोरोनाचा प्रसार, आढळले ‘इतके’ रुग्ण; जाणुन घ्या लेटेस्ट अपडेट

Maharashtra Corona:  पुन्हा एकदा राज्यात कोरोना वाढत चालला आहे. नवीन व्हेरियंट आता हळूहळू अनेक शहरांमध्ये पसरत आहे. यामुळे राज्य सरकार अलर्ट मोडवर आहेत. तर दुसरीकडे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मुंडे यांनी स्वतः ट्विट करून संसर्ग झाल्याची माहिती दिली.  सोमवारी राज्यात 28 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. यासह राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 168 वर पोहोचली आहे. कोविडचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. यानंतर ठाणे आणि पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे 77 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर ठाण्यात 29, रायगडमध्ये 17 आणि पुण्यात 23 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या JN.1 या नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. सिंधुदुर्गात एका 41 वर्षीय व्यक्तीला जेएन.1 ने धडक दिली. आतापर्यंत राज्यात जेएन-1 ची लागण झालेल्या एकूण 10 रुग्णांची पुष्टी झाली आहे. रविवारी महाराष्ट्रात 50 नवीन कोरोना बाधित आढळून आले. ज्यामध्ये जेएन-1 ची लागण झालेले 09 रुग्ण आहेत. जेएन-1चे सर्वाधिक पाच रुग्ण ठाण्यात आहेत. याशिवाय पुणे महापालिका हद्दीत दोन, पुणे ग्रामीण आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. रविवारी आढळलेल्या नवीन जेएन-1 रुग्णांमध्ये 8 पुरुष आणि एक महिला रुग्ण आहेत. यामध्ये एक 9 वर्षांचा मुलगा, 21 वर्षांची महिला, 28 वर्षीय पुरुष आणि इतर रूग्ण 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. पुण्यात सापडलेला एकच रुग्ण परदेशात गेला आहे. नुकताच तो अमेरिकेहून परतला आहे.  राज्यात आढळलेल्या 9 जेएन – 1 प्रकरणांपैकी 8 जणांना कोविड लसीचे दोन डोस मिळाले आहेत. सर्वांना सौम्य लक्षणे आहेत आणि त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Maharashtra Corona: राज्यात कोरोनाचा प्रसार, आढळले ‘इतके’ रुग्ण; जाणुन घ्या लेटेस्ट अपडेट Read More »

MP Sujay Vikhe : कांदा निर्यात बंदी, खासदार डॉ. सुजय विखे घेणार अमित शाह यांची भेट!

MP Sujay Vikhe : खासदार डॉ. सुजय विखे पाटील  यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. या प्रकरणात ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवाजीराव कर्डिले यांच्यासमवेत जानेवारी महिन्यात दिल्ली येथे अमित शाह यांना भेटणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. ते उदरमल ता. नगर येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.  कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यासाठीची चर्चा अमित शाह यांच्या सोबत करणार असून यातून कांदा निर्यात बंदी उठवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होणार  असं देखील ते म्हणाले. तसेच कांद्याचा भाव स्थिर होण्यासाठी एक मासिक कोटा निश्चित करून कांद्याला हमी भाव मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, तालुकाध्यक्ष दीपक कार्ले, राजेंद्र तोरडमल, देविदास आव्हाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सदरील भेट घेतली जाणार असून निश्चितच शेतकरी हिताचा विचार केला जाईल असे देखील खासदार सुजय विखेंनी बोलताना स्पष्ट केले.

MP Sujay Vikhe : कांदा निर्यात बंदी, खासदार डॉ. सुजय विखे घेणार अमित शाह यांची भेट! Read More »

Ahmednagar News: ‘त्या’ प्रकरणात 05 आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Ahmednagar News : अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत चापडगांव व आखेगांव ता. शेवगांव येथे सशस्त्र दरोडा घालणारे 05 आरोपींना 2,49,000 रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद केले आहे. फिर्यादी कमलेश सुभाष वाल्हेकर 21 डिसेंबर 2023 रोजी हे त्यांचे कुटुंबासह घरामध्ये झोपलेले असतांना रात्री 01.00 ते 02.00 वा. चे सुमारास अनोळखी चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करुन फिर्यादी तसेच त्यांचे कुटुंबियांना चाकुचा धाक दाखवुन मोबाईल, सोन्या चांदीचे दागिने, मोटारसायकल, टी.व्ही., गॅस शेगडी, 6 शेळ्या असा एकुण 1,08,700 रुपये किमतीचा मुद्देमाल दरोडा टाकुन चोरुन नेला होता.  तसेच दिनांक 24 डिसेंबर रोजी फिर्यादी अभय राधाकिसन पायघन यांचे घरामध्ये रात्री 01.00 वा. चे सुमारास अनोळखी चोरट्यांनी प्रवेश करुन फिर्यादीची आई मंगल पायघन हिचे डोळयाच्या जवळ धारदार शस्त्राने तसेच रामकिसन पांडु काटे यांना मारहाण करुन 50,000 रुपये रोख रक्कम दरोडा टाकुन चोरुन नेली होती.  या घटनेनंतर शेवगांव पोलीस ठाण्यात भादवि कलम 392, 452, 504, 506, 34 व भादवि कलम 394, 452, 457, 380, 506, 511, 34 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला होता.  या घटनेचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्तबातमीदारा सदरचा गुन्हा हा दिपक गौतम पवार रा. टाकळीअंबड, ता. पैठण याने व त्याचे इतर साथीदारांनी केलेला असुन ते सध्या त्यांचे टाकळीअंबड येथील घरी व घरासमोर असलेल्या पालावर आलेले असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली. यानंतर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ टाकळीअंबड, ता. पैठण येथे जावुन दिपक गौतम पवार याचे घरास व त्याचे घरासमोरील असलेल्या पालांना चोहोबाजुने सापळा लावला असता सदर पालांमधुन काही इसम जवळच असलेल्या ऊसाचे शेतामध्ये पळुन गेले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी घरातील व पालामधील तसेच ऊसामध्ये जावुन लपुन बसलेल्या इसमांना ताब्यात घेतले. मिळुन आलेल्या आरोपींची अंगझडती तसेच त्यांचे घराची व पालाची झडती घेता त्यांचेकडे गुन्ह्यातील चोरीस गेले मालापैकी, मोबाईल, रोख रक्कम, शेळ्या, मोटारसायकल असा एकुण 2,49,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्यांना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी शेवगांव पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आले आहे. पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे.

Ahmednagar News: ‘त्या’ प्रकरणात 05 आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई Read More »

Maharashtra News: धक्कादायक! आईने दारूसाठी पैसे दिले नाही, मुलाने केला कोयत्याने वार अन्….

Maharashtra News:  लातूरमध्ये नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे.  लातूरमध्ये 23 वर्षीय मुलाने आईच्या डोक्यात कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार अहमदपूर तालुक्यातील सातळा गावात ही घटना घडली आहे.दारुसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने ही हत्या करण्यात आली असल्याची माहिती आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगीता नाथराव मुंडे (वय 40) असे मृत महिलेचे नाव असून, ज्ञानेश्वर नाथराव मुंडे (वय 23) असे आरोपी मुलाचे नाव आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानेश्वरने त्याचे माध्यमिक शिक्षण अर्धवट सोडले होते. सध्या तो शेतीची कामे करतो. दरम्यान, तो मित्रांसोबत दारू पिण्यास शिकला. गावातील नदीकाठावरील शेताच्या शेजारी बांधलेल्या घरात तो आई-वडिलांसोबत राहतो. ज्ञानेश्वरचा लहान भाऊ कृष्णा पुण्यात एका खासगी कंपनीत काम करतो. दरम्यान, शुक्रवारी ज्ञानेश्वरचे वडील कामानिमित्त गावाबाहेर गेले होते. घरी फक्त आई संगीता आणि मुलगा ज्ञानेश्वर होते. दरम्यान दारूचे व्यसन असलेल्या ज्ञानेश्वरने दारू पिण्यासाठी आईकडे पैसे मागितले. अलीकडेच या कुटुंबाने त्यांची म्हैस विकली होती, त्यातून त्यांना काही पैसे मिळाले. मात्र आईने पैसे नसल्याचे सांगून काहीही दिले नाही. त्यानंतर रागाच्या भरात ज्ञानेश्वरने घरातील जीवनावश्यक वस्तू विकायला सुरुवात केली. याला आईने विरोध केला असता रागाच्या भरात त्याने तिच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने वार केले, त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. आईला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्याने कुलर चालू केला आणि दरवाजा बाहेरून लावला. आणि काही माल विकण्यासाठी सोबत घेतला. दरम्यान, गावातील दोन मुले ज्ञानेश्वरच्या घरी गावकऱ्यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यासाठी आली.  दोन्ही मुलांनी पाहिले की दरवाजा बाहेरून बंद होता आणि आतमध्ये कुलर चालू होता. दोघेही घरात शिरले असता संगीता मुंडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या.  आजूबाजूच्या लोकांना तातडीने बोलावून संगीताला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, आरोपी ज्ञानेश्वरचे वडील नाथराव मुंडे यांच्या फिर्यादीवरून मुलगा ज्ञानेश्वर मुंडे याच्याविरुद्ध किनगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वरला अटक करण्यात आली.

Maharashtra News: धक्कादायक! आईने दारूसाठी पैसे दिले नाही, मुलाने केला कोयत्याने वार अन्…. Read More »