DNA मराठी

ताज्या बातम्या

Akshay Shinde : अक्षय शिंदेचे एन्काउंटर कसे झाले? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व काही…

Akshay Shinde :  बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झालाय. हा एन्काउंटर कसा झाला याचा माहिती आता समोर येत आहे.  सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पोलीस अक्षय शिंदेला ट्रान्सिट रिमांडसाठी नेते होते. त्याचे पत्नीने केलेल्या लैंगिक अत्याचाराप्रकरणात हे रिमांड होते. याप्रकरणात चौकशीसाठी नेण्यात येत होते. तळोजा जेलमधून त्याला बदलापूरकडे नेण्यात येत होते. साधारण साडेसहाच्या सुमारास पोलिसांची गाडी मुंब्रा बायपास जवळ आली. तेव्हा आरोपीने एका कॉन्स्टेबलच्या हातातून बंदूक हिसकावून गोळीबार सुरू केला. त्यातील एक गोळी एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला लागली. त्यानंतर निलेश मोरे यांनी स्वसंरक्षणासाठी तीन गोळ्या झाडल्या. यामध्ये शिंदे हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कळवा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरनी शिंद याला मृत घोषित केलंय. तर जखमी एपीआय निलेश मोरेंवर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर या प्रकरणावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले असून, थेट देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे हे प्रकरणावरून राजकारण तापणार हे नक्की.

Akshay Shinde : अक्षय शिंदेचे एन्काउंटर कसे झाले? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व काही… Read More »

भारतीय बाजारात PhonePe चे वर्चस्व, ऑगस्टमध्ये 7.23 अब्जांचा व्यवहार

PhonePe Update: भारतीय बाजारपेठेमध्ये UPI ने आर्थिक व्यवहार करणाऱ्यांची संख्या दररोज वाढत आहे.   नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये, UPI ने भारतातील UPI मार्केटपैकी निम्म्याहून अधिक भाग काबीज केला आहे.  PhonePe ही Walmart च्या मालकीची अमेरिकन कंपनी आहे, जी भारतातील Google Pay आणि Paytm शी स्पर्धा करते. Google Pay ही अमेरिकन मालकीची कंपनी आहे, तर Paytm ही भारतीय कंपनी आहे. मात्र, आरबीआयच्या बंदीनंतर पेटीएमचे यूपीआय मार्केट खूपच कमी झाले आहे. NPCI च्या ऑगस्टच्या डेटाबद्दल बोलायचे तर, भारताच्या UPI मार्केटमध्ये ऑगस्टमध्ये 20,60,735.57 कोटी रुपयांचे व्यवहार झाले. सुमारे 14.96 अब्ज व्यवहार झाले आहेत. यापैकी 10,33,264.34 कोटी रुपयांचे व्यवहार एकट्या PhonePe द्वारे झाले आहेत. त्याची संख्या 7.23 अब्जांपेक्षा जास्त आहे. जर आपण व्यवहारांची संख्या पाहिली तर, PhonePe चा बाजारातील हिस्सा 48.36 टक्के होतो, तर UPI पेमेंटच्या मूल्याच्या दृष्टीने बाजारातील हिस्सा 50.14 टक्के होतो. NPCI ऑगस्ट आकडेवारी PhonePe – रु 10,33,264.34 कोटी Google Pay – रु 7,42,223.07 कोटी Paytm – रु 1,13,672.16 कोटी ऑगस्टमध्ये मार्केट शेअर PhonePe – 48.39 टक्के Google Pay – 37.3 टक्के paytm – 7.21 टक्के पेटीएमची अवस्था बिकट   ऑगस्टमध्ये, Google Pay ने 7,42,223.07 कोटी रुपयांच्या 5.59 अब्ज UPI पेमेंटवर प्रक्रिया केली, तर Paytm ने 1,13,672.16 कोटी रुपयांच्या व्यवहारांवर प्रक्रिया केली. या कालावधीत Google Pay चा बाजार हिस्सा 37.3 टक्के आहे, तर Paytm चा बाजार हिस्सा 7.21 टक्के आहे. NPCI च्या जुलैच्या आकडेवारीनुसार, PhonePe चा मार्केट शेअर जवळपास 48 टक्के आहे. Google Pay चा बाजार हिस्सा 37 टक्के होता आणि पेटीएमचा बाजार हिस्सा 7.82 टक्के होता. 2026 पर्यंत दररोज 1 अब्ज UPI पेमेंट अपेक्षित ऑगस्ट महिन्यात PhonePe आणि Google Pay च्या UPI पेमेंटमध्ये वाढ झाली आहे, तर पेटीएमच्या UPI पेमेंटमध्ये घट झाली आहे. UPI दररोज 500 दशलक्ष व्यवहार करत आहे, जे 2026-27 पर्यंत दररोज 1 अब्ज UPI व्यवहारांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

भारतीय बाजारात PhonePe चे वर्चस्व, ऑगस्टमध्ये 7.23 अब्जांचा व्यवहार Read More »

Bangladesh Crisis: बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारच्या निषेधार्थ 72 समाज आले एकत्र

Bangladesh Crisis: बांगलादेशात झालेल्या हिंदू अत्याचाराच्या विरोधात  गोंदियामध्ये 72 समजातील हजारोच्या संख्येने महिला पुरुष रस्त्यावर उतरले व झालेल्या घटनेच्या निषेधार्थ जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या जन आक्रोश मोर्चामध्ये 72 समाजांनी सहभाग घेतला त्याचप्रमाणे शहरातील मुख्य बाजारात हा मोर्चा भ्रमण करत बांगलादेशा विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर आंबेडकर चौक या ठिकाणी राष्ट्रगीताने रॅलीचे समापन करण्यात आले.   काही दिवसा अगोदर  बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर हल्ले करीत अत्याचार केले तर हिंदू देवी दैवतांची मंदिरे तोडली यात काही लोकांचें दुर्दैवी मृत्यू झाले. याचे पाडसाद संपूर्ण भारतात व हिंदू समुदाय मध्ये उमटू लागले.  अनेक हिंदू संघटना देशातील राज्य पातळीवर आंदोलने केली. तरी देखील केंद्र सरकारने बांगलादेशात हिंदू बांधवांर झालेल्या हल्ल्या करणाऱ्या संघटनेच्या विरोधात हवे तसे पाऊल न उचलल्याने देशात हिंदू समाजात आक्रोश निर्माण झाले.  याच घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी गोंदियात सकल हिंदू समाजाच्या वतीने जण आक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅली मध्ये गोंदिया जिल्यातील हजारो हिंदू बांधवानी सहभाग घेत सामील झाले. ही रॅली गोंदिया शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण भ्रमण करत बांगलादेशा विरोधात नारेबाजी करण्यात आली.

Bangladesh Crisis: बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारच्या निषेधार्थ 72 समाज आले एकत्र Read More »

Ahmednagar Rain Alert: सावधान, जिल्ह्यात पुढील 2 दिवस कोसळणार धो धो पाऊस, अलर्ट जारी

Ahmednagar Rain Alert: देशात मान्सून परतीच्या पावसाची सुरुवात झाली असून अहमदनगर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यातील काही भागात 23 ते 25 सप्टेंबर जोरदार पावसाचा हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत वीजांच्‍या कडकडाटांसह वादळी वारा व जोरदार पाऊस, तसेच 26 सप्टेंबर रोजी  वीजांच्‍या कडकडाटांसह हलक्‍या ते मध्‍यम स्‍वरुपाचा पाऊस होण्‍याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.  जिल्‍ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्‍यात आलेला आहे.   पुणे, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्‍टी झाल्‍यास जिल्‍ह्यातील भिमा व घोड नदी, गोदावरी नदी तसेच प्रवरा व मुळा या नद्यांवरील धरणातून सोडलेल्‍या विसर्गामुळे नद्यांच्‍या पाणीपातळीत वाढ होऊ शकते. त्यामुळे  जिल्‍ह्यातील भिमा, घोड, गोदावरी, प्रवरा व मुळा या नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन  जिल्हा प्रशासनाने केले आहे.   मेघगर्जनेच्‍या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. धोकादायक ठिकाणी सेल्‍फी काढू नये. गडगडाटीच्‍या वादळादरम्‍यान व वीजा चमकतांना कोणत्‍याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्‍या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्‍टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्‍वजांचे खांब, विद्युत, दिव्‍यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉंन्‍सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्‍या अधांतरी लटकणाऱ्या लोंबणाऱ्या केबल्‍सपासून दूर रहावे. जाहिरात फलक (होर्डिंग्‍ज्) कोसळून होणाऱ्या दूर्घटना टाळण्‍यासाठी दक्षतेची बाब म्‍हणून जाहिरात फलकांच्‍या (होर्डिंग्‍ज्) आजूबाजूला थांबू नये व योग्‍य ती दक्षता घ्‍यावी. वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्‍यास सुरक्षेसाठी गुडघ्‍यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्‍ही गुडघ्‍यांच्‍यामध्‍ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. स्‍थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्‍या सुचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरीकांना तातडीने सुरक्षितस्‍थळी स्‍थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्‍याकाठच्‍या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्‍यास नागरिकांनी नदीपात्रातुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षित स्‍थळी स्‍थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्‍यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्‍यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्‍यासाठी गर्दी करू नये. अतिवृष्‍टीमुळे भूस्‍खलन होण्‍याची व दरडी कोसळण्‍याची शक्‍यता असते. त्‍यादृष्‍टीने डोंगराच्‍या पायथ्‍याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्‍यावी. वेळीच सुरक्षित स्‍थळी स्‍थलांतर करावे. घाट रस्‍त्‍याने प्रवास करणे शक्‍यतो टाळावे.  धरण व नदीक्षेत्रामध्‍ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्‍यावी. नदीच्‍या पाण्‍याच्‍या प्रवाहामध्‍ये चढू अथवा उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्‍फी  काढू नये.                   वादळी वारे, वीज, पाऊस आणि गारपीट यांपासून स्‍वत:सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्‍य ती दक्षता घ्‍यावी. आपत्‍कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्‍टेशन किंवा जिल्‍हा नियंत्रण कक्ष, जिल्‍हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्‍वनी क्र. 1077 (टोल फ्री), 0241- 2323844  अथवा 2356940  या क्रमांकावर  संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Ahmednagar Rain Alert: सावधान, जिल्ह्यात पुढील 2 दिवस कोसळणार धो धो पाऊस, अलर्ट जारी Read More »

Ahmednagar News: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणा समर्थनार्थ ‘या’ दिवशी अहमदनगर जिल्हा बंद

Ahmednagar News: मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवली सराटी येथे 17 सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत. तर दुसरीकडे अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून देखील त्यांच्या समर्थनार्थ 23 सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे. याबाबत अखंड मराठा समाजाने अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन दिले आहे. सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करणे. शिंदे समितीस मुदतवाढ देवून त्याचे कामकाज जोमाने सुरु ठेवावे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट तत्काळ मागे घ्यावेत आणि हैदराबाद, मुंबई, सातारा, गॅझेट लागू करावे या मागणीसाठी 23 सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्हा बंद पुकारण्यात आला असल्याची माहिती अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून देण्यात आली आहे.

Ahmednagar News: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणा समर्थनार्थ ‘या’ दिवशी अहमदनगर जिल्हा बंद Read More »

एकापेक्षा जास्त Credit Card असेल तर काय होणार? जाणून घ्या नियम

Credit Card :  आज आपल्या देशात शॉपिंगसाठी किंवा इतर कामासाठी मोठ्या प्रमाणात क्रेडिट कार्डचा वापर होत आहे. कोणा कोणाकडे तर एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असतात पण तुम्हाला माहिती आहे का? तुमच्याकडे किती क्रेडिट कार्ड असावेत नाही ना तर जाणून घ्या. नियम काय सांगतात?  असा काही नियम आहे की जो तुम्हाला क्रेडिट कार्ड ठेवण्यास प्रतिबंधित करतो? या प्रश्नाचे अगदी साधे आणि सरळ उत्तर आहे, नाही. एखाद्या व्यक्तीकडे किती क्रेडिट कार्ड असावेत असा कोणताही नियम नाही. पण तुमचे आर्थिक स्वावलंबन राखण्यासाठी तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर एका ठराविक मर्यादेपर्यंतच करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या कमाईपेक्षा जास्त खर्च करत असाल तर तुमच्याकडे कितीही क्रेडिट कार्ड असले तरी तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. फायदे आणि तोटे आता आम्ही तुम्हाला अधिक क्रेडिट कार्ड असल्याने तुमच्या आर्थिक स्थितीवर कोणते धोके निर्माण होऊ शकतात ते सांगू आणि अधिक क्रेडिट कार्ड असल्याने तुम्हाला कोणते फायदे मिळू शकतात ते देखील सांगू. फायदे पहिला आणि सर्वात मोठा फायदा असा आहे की एकाधिक क्रेडिट कार्ड्स असल्याने, तुम्ही तुमच्या खर्चाचे अधिक चांगल्या प्रकारे विभाजन करून व्यवस्थापित करू शकता. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर देखील वाढतो आणि तुम्ही क्रेडिट कार्डच्या मदतीने तुमचे अतिरिक्त खर्च देखील करू शकता. दुसरा फायदा म्हणजे प्रत्येक क्रेडिट कार्डमध्ये काही खास वैशिष्ट्ये असतात. ज्याप्रमाणे काही कार्ड्स मोफत एअरपोर्ट लाउंज सुविधा देतात, त्याचप्रमाणे काही कार्ड तुम्हाला पेट्रोल भरून रिवॉर्ड मिळवण्याची परवानगी देतात. अधिक क्रेडिट कार्ड्स असल्यास, तुम्हाला विविध प्रकारचे फायदे मिळू शकतात. तोटा एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे तुम्हाला दर महिन्याला अनेक बिले भरावी लागतील आणि जर तुम्ही ही बिले भरण्यात अक्षम असाल तर तुम्हाला दंडालाही सामोरे जावे लागू शकते. प्रत्येक क्रेडिट कार्डला वार्षिक फी, जॉईनिंग फी आणि ट्रान्झॅक्शन फी भरावी लागते. तुमच्याकडे जितके जास्त कार्ड असतील तितके जास्त शुल्क तुम्हाला द्यावे लागेल.

एकापेक्षा जास्त Credit Card असेल तर काय होणार? जाणून घ्या नियम Read More »

One Nation One Election : वन नेशन, वन इलेक्शनला मंजुरी पण सरकार पडल्यास काय होईल? जाणून घ्या

One Nation One Election :  केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन, वन इलेक्शन या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.  केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर आता वन नेशन, वन इलेक्शनची प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे. वन नेशन, वन इलेक्शन लागू झाल्यानंतर लोकसभा किंवा राज्यसभेत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही तर काय होईल हे तुम्हाला माहिती आहे का? वन नेशन, वन इलेक्शनला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असेल, पण प्रत्यक्षात येण्याआधी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने यामध्ये आपल्या शिफारशी दिल्या आहेत.   त्रिशंकू सभागृहाच्या बाबतीत काय? वन नेशन, वन इलेक्शन लागू केले तर त्यानंतरच्या निवडणुका घेतल्या जातात. अशा परिस्थितीत लोकसभा किंवा राज्यसभेत त्रिशंकू सभागृहाची स्थिती निर्माण झाली तर काय होईल? हा प्रश्न अतिशय समर्पक आहे आणि आपण अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रात तो वारंवार पाहिला आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अशी शिफारस केली आहे की अशा परिस्थितीत त्या विधानसभा किंवा लोकसभेसाठी पुन्हा निवडणुका घेता येतील. मात्र लोकसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत ही निवडणूक होणार आहे. अविश्वास प्रस्ताव  राज्य किंवा केंद्र सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला किंवा सरकार पडले. इतर कोणताही पक्ष किंवा आघाडी सरकार स्थापन करू शकली नाही, तर तेथे पुन्हा निवडणुका घेता येतील, अशी शिफारस माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली.  अशा परिस्थितीत, नवीन राज्य विधानसभा किंवा लोकसभेचा कार्यकाळ हा फक्त मागील लोकसभेच्या उर्वरित कालावधीसाठी असेल. उदाहरणार्थ, एखादे सरकार साडेतीन वर्षांत पडले आणि पुन्हा निवडणुकांची गरज भासली, तर पुन्हा निवडणुका नक्कीच होतील, पण नव्या सरकारचा कार्यकाळ केवळ दीड वर्षाचा असेल. पंचायत निवडणुकांचे काय? त्याच्या नावाप्रमाणेच, वन नेशन, वन इलेक्शन, संपूर्ण देशात एकाच वेळी निवडणुका होतील का? लोकसभा आणि विधानसभा व्यतिरिक्त यात नगरपालिका, पंचायत इत्यादींचाही समावेश असेल का? यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुरुवातीला म्हणजेच पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात, असा प्रस्ताव दिला आहे.  त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांशी अशा प्रकारे जोडल्या जाव्यात की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या 100 दिवसांत नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका पूर्ण होतील. मार्चमध्ये अहवाल सादर करण्यात आला होता माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने लोकसभा निवडणुकीच्या घोषणेच्या काही दिवस अगोदर या वर्षी मार्चमध्ये वन नेशन, वन इलेक्शनचा अहवाल सरकारला सादर केला होता.

One Nation One Election : वन नेशन, वन इलेक्शनला मंजुरी पण सरकार पडल्यास काय होईल? जाणून घ्या Read More »

Raj Thackeray: आधी महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या, ‘एक देश एक निवडणूक’ वरून राज ठाकरेंचा मोदींना टोला

Raj Thackeray : केंद्रीय मंत्रिमंडळाने एक मताने व नेशन व इलेक्शन प्रस्ताव पास केल्यानंतर काही जणांनी याला समर्थन तर काही जणांनी विरोध केला आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावरून मोदी सरकारला टोला लावत राज्यात आधी महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या असा टोला लावला आहे.  राज ठाकरे म्हणाले की, ‘एक देश एक निवडणूक’ संकल्पनेला   केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल. आणि अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल. आणि कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशा प्रकारांनी राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहचणार नाही, याची खातरजमा पण व्हायलाच हवी.  बरं जर एखाद्या राज्यात सरकार कोसळलं किंवा किंवा तिथली विधानसभा बरखास्त झाली तर तिकडे आधी निवडणूक होणार का ? त्या राज्याने लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पहायची? किंवा समजा काही कारणांनी लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या तर देशातील सगळ्या निवडणुका परत होणार का? असा कुठलाच खुलासा झालेला नाही. तो कदाचित होईल. असो…  पण ‘एक देश एक निवडणूक’ हे सर्व ठीक आहे, आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या. येत्या ऑक्टोबर २०२४ मध्ये कित्येक महापालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये प्रशासक येऊन ४ वर्ष होतील. इतका काळ नगरसेवक नाहीत म्हणजे लोकप्रतिनिधी नाहीत. ते जास्त महत्वाचं नाही का? स्थानिक स्वराज्य संस्थांचा थेट संबंध सामान्य माणसांच्या जगण्याशी, त्यांच्या प्रश्नांशी असतो. त्याच्याच निवडणुका होत नसतील तर सामान्य माणसाने जायचं कोणाकडे? निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या. असं राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray: आधी महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या, ‘एक देश एक निवडणूक’ वरून राज ठाकरेंचा मोदींना टोला Read More »

Chandrashekhar Bawankule : ‘सुद्धा तोंड सांभाळून बोललं पाहिजे’, चंद्रशेखर बावनकुळेंचा राहुल गांधींना सल्ला

Chandrashekhar Bawankule :  शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यातील राजकारण चांगलंच तापला आहे. यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांनी सुद्धा तोंड सांभाळून बोललं पाहिजे असा सल्ला दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होण्याची शक्यता आहे.  माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांच्या अश्या बोलण्याचं समर्थन होऊ शकत नाहीय, असं बोलनही योग्य नाहीय, कुठल्याही व्यक्तीने असं बोलू नये. पण राहुल गांधीने सुद्धा तोंड सांभाळून बोललं पाहिजे. राहुल गांधींनी ज्या पद्धतीने ओबीसी, एस सी, एस टी यांचं आरक्षण काढून टाकू क्लियर आहे त्यांच्या बोलण्या मधे. आता बघा हे लोक आता मोदींच्या विरोधात प्रचार करत सुटले होते की मोदीजी संविधान बदलणार, मोदींनी कधीही संविधान बदलण्याची भाषा केली नव्हती. दहा वर्ष मोदी होते कधी संविधान बदललं नाहीय आणि आताही संविधान बदलणार नाहीय आणि तो बदलूच शकत नाहीय.  आता राहुल गांधीनी पोटातलं ओठांवर आणलं की आम्ही आरक्षण बदलणार आहे आम्हला आरक्षण नको आहे. हेच नेहरूजी म्हटलं होत.. की आरक्षण विकासाला बाधा आहे, हेच राजीव गांधींनी म्हटलं होत की आरक्षण हे बुद्धिहीन लोकांना द्यावं लागत आणि हेच आता राहुल गांधींनी म्हटलं की आम्ही आरक्षण थांबवणार आहे. तीन पिढ्याची भाषा गांधी परिवाराची आरक्षण थांबाविण्याची आहे  राहुल गांधींनी सुद्धा विचार करून बोललं पाहिजे असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.  तसेच यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला.  महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाला घेऊन धुसपूस आहे. शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचा चंग बांधला आहे उद्धव ठाकरे कटोरा घेऊन फिरत आहे, मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा, काँग्रेसकडे जातं आहे, शरद पवार कडे जातं आहे. काँग्रेसकडे नाना पटोले सारखे दहा नेते तयार झाले आहे.  महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्री साठी चढाओढ आहे पण आमच्याकडे डबल इंजिन सरकार आलं पाहिजे  2029 पर्यंत केंद्रात मोदीच सरकार आहे आणि राज्यातलं सरकार एका विचारच आलं आणि दोन्ही सरकार एका विचाराचे आले तर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला फायदा होऊ शकतो. म्हणून महाराष्ट्रात डबल इंजिनच महायुतीच सरकार पाहिजे असेही यावेळी ते म्हणाले.

Chandrashekhar Bawankule : ‘सुद्धा तोंड सांभाळून बोललं पाहिजे’, चंद्रशेखर बावनकुळेंचा राहुल गांधींना सल्ला Read More »

Manoj Jarange: … तर आमरण उपोषणास बसणार, अखंड मराठा समाजाकडून सरकारला इशारा

Manoj Jarange: मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करण्यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहे. त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे यासाठी आज अखंड मराठा समाज अहमदनगरकडून जिल्हाधिकारी अहमदनगर यांना निवेदन देण्यात आले. तसेच जर जरांगे पाटील यांचे मागण्या पूर्ण झाले नाही तर तहसील कार्यालय नगर येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील अखंड मराठा समाज अहमदनगरकडून देण्यात आला आहे. या निवेदनात म्हटले आहे की, मनोज जरांगे हे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी त्यात प्रामुख्याने सगेसीयर अधिसूचनेची अंमलबजावणी करणे. शिंदे समितीस मुदतवाढ देवून तिचे कामकाज जोमाने चालू ठेवावे. मराठा आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत. हैदराबाद सातारा मुंबई गॅझेट लागू करावे. इ. मागण्यांसाठी 17 सप्टेंबर पासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास बसलेले आहे. सरकारने त्यांच्या या मागण्या मान्य न केल्यास मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अखंड मराठा समाज अ. नगर यांच्यावतीने हे निवेदन दिलेपासून 48 तासात मागण्या मान्य न झाल्यास तहसील कार्यालय नगर येथे गोरख दळवी, संतोष आजबे, सखाराम गुंजाळ यांच्यासह काही मराठा बांधव आमरण उपोषणास बसणार आहेत. त्यानंतर होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची असेल असा इशारा अखंड मराठा समाज अहमदनगरकडून देण्यात आला आहे.

Manoj Jarange: … तर आमरण उपोषणास बसणार, अखंड मराठा समाजाकडून सरकारला इशारा Read More »