DNA मराठी

ताज्या बातम्या

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू, ‘या’ ड्रेसमध्ये प्रवेश नाही, जाणून घ्या नवीन नियम

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरातील सर्व भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. मंदिर प्रशासनाच्या मते, मंदिराचे पावित्र्य आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन नियमानुसार, लहान किंवा फाटलेले कपडे घालून मंदिरात येणाऱ्या भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. सर्व भाविकांनी सभ्य आणि पारंपारिक कपडे घालून मंदिरात यावे. मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, 30 जानेवारीपासून मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी हा नवीन ड्रेस कोड नियम लागू होईल. या नवीन व्यवस्थेनुसार, स्कर्ट, फाटलेले कपडे आणि उघडे कपडे घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी याबाबत माध्यमांना माहिती देताना सांगितले की, मुंबईत असलेले सिद्धिविनायक मंदिर हे केवळ भारतातच नाही तर जगभरातील सनातनी आणि गणेश भक्तांसाठी एक प्रमुख श्रद्धेचे केंद्र आहे. लाखो लोक येथे दर्शनासाठी येतात आणि येथे येणाऱ्या भाविकांच्या इच्छा पूर्ण होतात. परंतु, जेव्हा लोक एखाद्या पवित्र ठिकाणी जातात तेव्हा तेथे काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते, जेणेकरून त्या ठिकाणाचे पावित्र्य राखले जाईल. आचार्य पवन त्रिपाठी पुढे म्हणाले की, मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सूचनांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या काही भाविकांच्या पोशाखाबद्दल अनेक भाविकांनी चिंता व्यक्त केली होती, ज्यांचे कपडे योग्य नव्हते. हे लक्षात घेऊन, सिद्धिविनायक ट्रस्टने निर्णय घेतला की दर्शनासाठी येणाऱ्यांना चांगले कपडे घालावे लागतील. हा राजकारणाचा विषय नाही. हा धार्मिक आणि श्रद्धेशी संबंधित विषय आहे. जेव्हा लोक मंदिरात जातात तेव्हा ते सहसा स्नान करून आणि चांगले आणि सभ्य कपडे घालून जातात. आम्हाला फक्त एवढेच हवे आहे की मंदिरात येणाऱ्या भाविकांनी याचे पालन करावे. अनेक मंदिरांमध्ये ड्रेस कोड आधीच लागूआचार्य पवन त्रिपाठी पुढे म्हणाले की, देशभरातील अनेक मंदिरांमध्ये ड्रेस कोड आधीच लागू आहे आणि तिथे येणाऱ्या भाविकांना या नियमांची आधीच माहिती आहे. आम्हाला खात्री आहे की कालांतराने, सिद्धिविनायक मंदिरातही लोक हळूहळू या नियमांचे पालन करू लागतील. सिद्धिविनायक मंदिराचे पावित्र्य आणि भाविकांच्या श्रद्धेचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू, ‘या’ ड्रेसमध्ये प्रवेश नाही, जाणून घ्या नवीन नियम Read More »

Manoj Jarange Patil : … तर सरकारची जबाबदारी असणार, अखंड मराठा समाजाचा इशारा

Manoj Jarange Patil : मराठा समाजाचा आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी 25 जानेवारी 2025 पासून जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहे. आज उपोषणाचा पाचवा दिवस असून जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक होत चालली आहे. मात्र तरीही सरकारच्यावतीने कोणीही जरांगे पाटील यांच्याकडे चर्चेसाठी आले नसल्याने जर जरांगे पाटील यांना काही झालं तर सरकारची जबाबदारी असणार असल्याचा निवेदन आज अखंड मराठा समाज अ.नगरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, संघर्षयोद्धा मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासह इतर मराठा सेवक हे शनिवार दि. 25.01.2025 रोजी पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे व मराठा समाजाच्या अन्य काही मागण्यांसाठी अंतरवाली सराटी ता. अंबड जि. जालना येथे सामुहिक आमरण उपोषणास बसलेले आहेत. उपोषणाचा आजचा पाचवा दिवस उपोषण कर्त्यांची प्रकृती चिंताजनक होत चाललेली आहे. सरकार जाणीवपूर्वक या उपोषणाकडे दुर्लक्ष करत आहे. कारण अद्यापपर्यंत सरकारच्यावतीने कोणीही मा. मनोज दादा जरांगे यांच्याशी चर्चेसाठी गेलेले नाही. आम्ही या निवदेनाद्वारे सूचित करतो की समाजाच्या संयमाचा बांध सुटत चाललेला आहे. तेंव्हा आपण या निवेदनाची गांभीर्याने दखल घेवून सरकार व शासनाच्या वतीने शिष्टमंडळ अथवा प्रतिनिधी पाठवून चर्चा करून मा. मनोज दादा जरांगे यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा काही अनुचित प्रकार घडल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास आम्ही जबाबदार राहणार नाही ती सरकारची जबाबदारी असेल. असं या निवेदनात म्हटले आहे.

Manoj Jarange Patil : … तर सरकारची जबाबदारी असणार, अखंड मराठा समाजाचा इशारा Read More »

Stampede In Mahakumbh : मोठी बातमी! महाकुंभ चेंगराचेंगरी 17 लोकांचा मृत्यू

Stampede In Mahakumbh: प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून सुरू असलेल्या महाकुंभात मौनी अमावस्येच्या स्नानासाठी लाखो भाविक संगम घाटावर जमले होते मात्र अचानक चेंगराचेंगरीची घटना घडल्याने 17 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाने आतापर्यंत 17 मृत्यूंची पुष्टी केली आहे. अपघातानंतर लगेचच डझनभर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आणि मृतांचे मृतदेह तेथून नेण्यात आले. जखमी भाविकांना मेळ्याच्या परिसरात बांधलेल्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवकीनंदन ठाकूर काय म्हणाले?चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल आध्यात्मिक गुरू देवकीनंदन ठाकूर म्हणाले, “मी संगम घाटावर गेलो नाही कारण तिथे खूप गर्दी आहे. मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी फक्त संगम घाटावर स्नान करण्याचा आग्रह धरू नये. सध्या संपूर्ण गंगा आणि यमुना नद्या ‘अमृत’ आहेत, जर तुम्ही कुठेही स्नान केले तर तुम्हाला तेवढेच पुण्य मिळेल. स्वामी रामभद्राचार्य काय म्हणाले?चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य म्हणाले, “मी सर्व भाविकांना आवाहन करतो की आज प्रयागराजमध्ये मोठी गर्दी आहे, म्हणून त्यांनी केवळ संगम घाटावर पवित्र स्नान करण्याचा आग्रह धरू नये. त्यांनी आता त्यांचा छावणी सोडून स्वतःची सुरक्षितता शोधू नये.” साध्वी निरंजन ज्योती काय म्हणाल्या?महाकुंभ परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीसारख्या परिस्थितीबद्दल साध्वी निरंजन ज्योती म्हणाल्या, “ही एक दुःखद घटना आहे. जे काही झाले ते बरोबर नव्हते. जनहित लक्षात घेऊन, आखाडा परिषदेने त्यांचे अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जमलेल्या भाविकांची संख्या अंदाजापेक्षा जास्त आहे. मी लोकांना आवाहन करते की संपूर्ण जत्रा परिसर कुंभमेळा आहे, म्हणून ते केवळ त्रिवेणी घाटावरच नव्हे तर कोणत्याही घाटावर स्नान करू शकतात. आज आखाडे स्नानात सहभागी होणार नाहीतअखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी म्हणाले, “घडलेल्या घटनेने आम्हाला खूप दुःख झाले आहे. आमच्यासोबत हजारो भाविक होते… जनहितासाठी, आम्ही ठरवले की आज आखाडे स्नानात सहभागी होणार नाहीत. मी लोकांना आजच्याऐवजी वसंत पंचमीला स्नान करण्यासाठी येण्याचे आवाहन करतो.”

Stampede In Mahakumbh : मोठी बातमी! महाकुंभ चेंगराचेंगरी 17 लोकांचा मृत्यू Read More »

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंवर उपचार सुरू, आज घेणार मोठा निर्णय?

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहे. जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. अशा इशारा देखील त्यांनी दिला आहे. यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार मनोज जरांगे पाटलांवर अखेर उपचार सुरु करण्यात आले आहेत जरांगे यांना सलाईन लावण्यात आलं आहे. काल रात्री भाजप आमदार सुरेश धस यांनी जरांगे यांची भेट घेऊन सलाईन लावा आणि उपचार घ्या अशी विनंती केली होती. उपचार घेतल्यास आपल्याला चर्चा करता येईल असं धस जरांगे यांना म्हणाले होते त्यांनतर आज जरांगे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. उपस्थित मराठा आंदोलकांनी जरांगे यांना उपचार घेण्यास भाग पाडलंय त्यामुळे जरांगे यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत. दरम्यान आज जरांगे काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी सातव्यांदा उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी 25 जानेवारीपासून उपोषणाला सुरुवात केली आहे.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंवर उपचार सुरू, आज घेणार मोठा निर्णय? Read More »

Saif Ali Khan प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली आहे. मात्र तरही देखील या प्रकरणात दररोज नवीन नवीन खुलासे होत आहे. तर आता या प्रकरणात मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाशी संबंधित काही नवीन आणि धक्कादायक माहिती शेअर केली आहे. पत्रकार परिषदेत पश्चिम विभागाचे अतिरिक्त सीपी परमजीत सिंह दहिया यांनी सैफ प्रकरणाशी संबंधित अनेक खुलासे केले. त्यांनी सांगितले की, सैफवरील हल्ल्याची तक्रार अभिनेत्याच्या घरून आली नव्हती तर रुग्णालयातून आली होती. पोलिसांना लीलावती रुग्णालयातून कळले की सैफवर हल्ला झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, सैफ सुमारे 3 वाजता ऑटोने रुग्णालयात पोहोचला. त्याच वेळी, एसीपी दहिया यांनी असा दावाही केला की सैफ प्रकरणात अटक करण्यात आलेली व्यक्ती ही खरी आरोपी आहे आणि यात कोणताही गोंधळ नाही. त्यांनी सांगितले की पोलिसांकडे सर्व पुरावे आहेत, जे ते न्यायालयात सादर करतील. सैफ अली खानचा हल्लेखोर बांगलादेशहून भारतात आलाएसीपी दहिया यांनी पत्रकार परिषदेत पुढे सांगितले की, आरोपी पश्चिम बंगालमार्गे भारतात दाखल झाला होता. तो काही दिवस कोलकात्यातही राहिला. पोलिसांनी असेही सांगितले की, ज्या महिलेच्या आधार कार्डवरून आरोपीने सिम घेतले होते, तिचा जबाब कोलकातामध्ये नोंदवण्यात आला आहे. आरोपींच्या फिंगरप्रिंटबाबत पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांना अद्याप अहवाल मिळालेला नाही. हे नमुने पुणे सीआयडीकडे पाठवण्यात आले आहेत. सैफ अली खान प्रकरणात अजूनही अनेक प्रश्नसैफ अली खान हल्ला प्रकरणात अजूनही अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे पोलिसांनी दिलेली नाहीत. घटनेच्या रात्री प्रत्यक्षात काय घडले हे पोलिसांनी अद्याप सांगितलेले नाही. त्याचवेळी, आरोपी 11 व्या मजल्यावर राहणाऱ्या सैफच्या घरी चोरी करायला का गेला, तो खालच्या मजल्यावर चोरी करू शकला असता, याचे उत्तर अद्याप समोर आलेले नाही. हल्ला रात्री 2 वाजता झाला आणि पोलिसांना रात्री 3 वाजता कळवण्यात आले. एवढेच नाही तर आरोपी सकाळपर्यंत सैफच्या अपार्टमेंटच्या बागेत लपून का बसला होता?

Saif Ali Khan प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा Read More »

Baba Siddique : धक्कादायक खुलासा, बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं भाजपच्या बड्या नेत्याचं नाव, WhatsApp चॅटिंग अन्…

Baba Siddique : राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर आता या प्रकरणात मोठा आणि धक्कादायक खुलासा माजी आमदार आणि बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांनी केला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या डायरीत शेवटचे नाव भाजपचे नेते मोहित कंबोज यांचे आहे, असे झिशान सिद्दीकी यांनी सांगितले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. “मोहित कंबोज यांचे डायरीत शेवटचे नाव असून त्यानंतर माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास व्हॉटसॲपवर चॅटिंग केले होते. वडिलांनी त्यांचे नाव डायरीत का लिहले, हे मी सांगू शकत नाही. परंतु या गोष्टीचा तपास होणे गरजेचे आहे,” असं माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी म्हंटले आहे. याच बरोबर झिशान सिद्दीकी यांनी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचाही उल्लेख केला आहे. परब यांनी ज्ञानेश्वर नगर प्रकल्पबाधितांची बैठक घेतली. बैठकीत विकासकांनी झोपडपट्टीधारकांना त्याच ठिकाणी घर मिळेल असे वचन दिले होते. असं झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हंटले आहे. झिशान सिद्दीकी यांनी नोंदविलेल्या जबाबानंतर बाब सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन ट्विस्ट येणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Baba Siddique : धक्कादायक खुलासा, बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं भाजपच्या बड्या नेत्याचं नाव, WhatsApp चॅटिंग अन्… Read More »

Weight Loss Seed : वजन होणार कमी, ‘हे’ बियाणे करणार मदत, जाणून घ्या सर्वकाही…

Weight Loss Seed : आज अनेकजण वाढत्या वजनामुळे अनेक अडचणींना तोंड देत आहे. याच बरोबर वजन कमी करण्यासाठी पैसे खर्च करून अनेक उपाय देखील करत आहे. मात्र वजन कमी होत नाही. जर तुम्ही देखील वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही एका बियाण्याच्या मदतीने तुमचे वाढलेले वजन कमी करू शकता. होय, तुम्ही जवसाचे बियाणे तुमचे वाढलेले वजन कमी करू शकतात. जवसाचे बियाणे शरीराच्या विकासासाठी खुप महत्त्वाचे असतात. माहितीनुसार, जवसाच्या बियाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकद्रव्ये आढळतात. जवसाच्या बियाण्यांमध्ये फायबर, ओमेगा -3 फॅटीऍसिड, हेल्दी प्रथिने, फिनोलिक कंपाऊंड आणि खनिजे आढतात. अशाप्रकारे होईल वजन कमीतुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर हे बियाणे तुम्हाला खूप उपयुक्त ठरू शकते. या बियाणेमुळेचरबी कमी होते. जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर एक चमचा जवस, एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा गूळ घ्या. कढईत एक चमचा जवस एक ग्लास पाण्यात उकळत ठेवा. दहा मिनिटांनी गॅस बंद करा आणि चव वाढवण्यासाठी यात एक चमचा लिंबाचा रस आणि गूळ मिक्स करावा. हे मिश्रण थोडा वेळ थंड होऊ द्या आणि प्या. हे खास पेय आपण रिकाम्या पोटी घ्या. यामुळे वजन झटपट कमी होते.

Weight Loss Seed : वजन होणार कमी, ‘हे’ बियाणे करणार मदत, जाणून घ्या सर्वकाही… Read More »

Pratap Sarnaik : महामंडळाला मिळणार 25 हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस, खरेदीसाठी अजित पवारांची मान्यता

Pratap Sarnaik : एस. टी. महामंडळाला स्वमालकीच्या दरवर्षी ५००० या प्रमाणे येत्या ५ वर्षात २५ हजार नव्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली असून तसा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सन २०२५-२६ अर्थसंकल्पासाठी परिवहन विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी बोलवली होती. यामध्ये एसटीच्या सद्यस्थिती मंत्री सरनाईक यांनी विशद केली. सध्या एसटी महामंडळाकडे केवळ १४ हजार ३०० बसेस असून त्यापैकी १० वर्ष पेक्षा जास्त जुन्या झालेल्या १० हजार बसेस आहेत. त्या पुढील ३-४ वर्षात प्रवासी सेवेतून बाद होतील. हि वस्तुस्थिती लक्षात घेता, भविष्यात एसटीला आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतः च्या बसेस घेणे आवश्यक आहे. त्यासाठी दरवर्षी ५ हजार नवीन लालपरी बसेस याप्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये २५ हजार लालपरी बसेस घेण्याची पंचवार्षिक योजना आम्ही आखली असून त्याला अर्थमंत्र्यांनी परवानगी द्यावी असा प्रस्ताव मांडला. अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावाची निकड लक्षात घेऊन तातडीने तत्वतः मान्यता दिली असून त्याबद्दल त्यांचे मंत्री सरनाईक यांनी आभार मानले आहेत. ते पुढे म्हणाले की, दरवर्षी ५ हजार नवीन बसेस याप्रमाणे सन २०२९ साली या २५ हजार वसेस व ५ हजार इलेक्ट्रिक बसेस मिळून ३० हजार बसेसचा ताफा एसटीकडे तयार असेल भविष्यात ” गाव तिथे एसटी… मागेल त्याला बस फेरी..!” आपणं देऊ शकतो. “आज आनंद दिघे साहेब यांच्या जयंती निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता देऊन एसटी वर प्रेम करणाऱ्या लाखो सर्वसामान्य जनतेला गोड भेट दिली आहे. याबद्दल मी त्यांचा शतशः आभार आहे.” अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली.

Pratap Sarnaik : महामंडळाला मिळणार 25 हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस, खरेदीसाठी अजित पवारांची मान्यता Read More »

एसआयटीची स्थापना करा नाहीतर आंदोलन करणार…, पारनेर तालुक्यात ‘त्या’ प्रकरणात शेतकरी आक्रमक

Parner News : पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरणात गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात क्रांती शुगर या खासगी कंपनीचे नऊ संचालक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे दोन वरिष्ठ अधिकारी यांच्याविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात सहा दिवसांपूर्वी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार, या कारखान्यात 17 सभासदांच्या मालकीच्या सहकारी साखर कारखान्याचे खासगीकरण संबंधित असून या घोटाळ्याची व्याप्ती 249 ते 300 कोटी पेक्षा जास्त असल्याची सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात सखोल तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात यावी अशी मागणी होत आहे. मात्र सरकारने आतापर्यंत या प्रकरणात एसआयटी स्थापन न केल्याने पारनेर पोलीस स्टेशन समोर साखर कारखाना बचाव समिती आणि शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणात मिळाली माहिती अशी की, या कारखान्याची मालमत्ता विक्री करण्यासाठी राज्य सहकारी बँकेने साडेचौदा कोटी रुपये कर्जाचे एक बनावट गहाणखत तयार करून कारखान्यावर कर्ज असल्याचे दाखवले आणि विक्रीची बेकायदा प्रक्रिया करण्यात आली. तसेच फक्त पाचशे रुपये मुद्रांक शुल्क कारखान्याचा विक्रीसाठी देण्यात आले. त्यामुळे या व्यवहारात सरकारचा दीड कोटी रुपयांचा महसूल बुडवला असा देखील आरोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे ज्यादिवशी कारखान्याची विक्री केली त्याच दिवशी क्रांती शुगर या खरेदीदार कंपनीला कारखाना विकत घेण्याकरिता त्याच मालमत्तेवर गहाणखत घेऊन कर्ज पुरवठा केला. त्यामुळे पारनेर साखर कारखान्याची मालमत्ता फक्त 32 कोटी रुपयांना खरेदी करून त्यावर 249 कोटी रुपयांचे कर्ज काढण्यात आले. त्यामुळे कारखाना बचाव व पुनर्जीवन समितीने 17 हजार सभासदांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे याचिका दाखल करून या प्रकरणात एसआयटीची मागणी केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर पारनेर पोलीस ठाण्यात क्रांती शुगर अ‍ॅण्ड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या खासगी साखर कारखान्याचे अध्यक्ष ज्ञानेश नवले, पांडुरंग नवले, दत्तात्रय नवले, भिकू नवले, जालिंदर नवले, गुलाब नवले, शिवराज नवले, श्रीधर नवले व निवृत्ती नवले या 9 संचालकांसह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे तत्कालीन जनरल मॅनेजर अनंत भुईभार व वरिष्ठ अधिकारी अनिल चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

एसआयटीची स्थापना करा नाहीतर आंदोलन करणार…, पारनेर तालुक्यात ‘त्या’ प्रकरणात शेतकरी आक्रमक Read More »

GBS Syndrome: मोठी बातमी! सोलापूरमध्ये GBS सिंड्रोममुळे एकाचा मृत्यू, 19 नवीन रुग्ण आढळले

GBS Syndrome : सोलापूरमध्ये ‘गिलेन-बॅरे सिंड्रोम’ या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरने ग्रस्त असल्याचा संशय असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. 26 जानेवारी रोजी, जीबीएसचे 19 नवीन संशयित रुग्ण आढळले. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या मते, आतापर्यंत गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे एकूण 101 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 81 रुग्ण पुण्यातील, 14 पिंपरी चिंचवडमधील आणि सहा रुग्ण इतर जिल्ह्यांतील आहेत. गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे जो उपचार करण्यायोग्य आहे. सध्या पुण्यात 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. या रुग्णांमध्ये 19 मुले आहेत ज्यांचे वय 9 वर्षांपेक्षा कमी आहे. 50 ते 83 वर्षे वयोगटातील 23 रुग्ण आहेत. जीबीएस ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे. आरोग्य तज्ञ म्हणतात की जेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून परिधीय मज्जासंस्थेच्या भागावर हल्ला करते तेव्हा असे होते. यामुळे मज्जातंतूंमध्ये जळजळ होते ज्यामुळे स्नायू कमकुवत होणे किंवा पक्षाघात आणि इतर लक्षणे उद्भवतात. मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये मेंदू आणि पाठीचा कणा समाविष्ट असतो. 68 पुरुष आणि 33 महिलारविवारी पुण्यात जीबीएसच्या एकूण रुग्णांची संख्या 101 वर पोहोचली, असे राज्य आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. संक्रमित लोकांमध्ये 68 पुरुष आणि 33 महिलांचा समावेश आहे. यापैकी 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. सोलापूरमध्ये संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या जलद प्रतिसाद पथके (RRTs) आणि आरोग्य विभागाचे अधिकारी सिंहगड रोडच्या बाधित भागात संसर्ग प्रकरणांवर लक्ष ठेवून आहेत.

GBS Syndrome: मोठी बातमी! सोलापूरमध्ये GBS सिंड्रोममुळे एकाचा मृत्यू, 19 नवीन रुग्ण आढळले Read More »