DNA मराठी

ताज्या बातम्या

शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना नुकसान; जाणून घ्या 3 सर्वात मोठी कारणे

Indian Stock Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात आज ऐतिहासिक घसरण पाहायला मिळाली आहे. ज्यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये करोडो रुपयांचे नुकसान गुंतवणूकदारांना झाले आहे. आज भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स ३००० अंकांपेक्षा जास्त घसरून ७२,३०० च्या आसपास पोहोचला, तर निफ्टी ९०० अंकांनी घसरला. तो २२,००० च्या खाली घसरला. सकाळी १० वाजेपर्यंत, सेन्सेक्समधील ३० शेअर्स लाल रंगात व्यवहार करत होते. यामागील कारण काय आहे ते जाणून घ्या. जगभरातील शेअर बाजार कोसळलेट्रम्पच्या शुल्कामुळे निर्माण झालेल्या गोंधळात जगभरातील बाजारपेठा कोसळल्या आहेत. आशियाई बाजारपेठेत, जपानचा निक्केई २२५ ६% ने, कोरियाचा कोस्पी ४.५०% ने, चीनचा शांघाय निर्देशांक (एसएसई कंपोझिट निर्देशांक) ६.५०% ने आणि हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक १०% ने खाली आहे. अमेरिकन बाजारपेठेतही अशीच परिस्थिती दिसून आली आहे. ३ एप्रिल रोजी, डाऊ जोन्स ३.९८% ने घसरला, एस अँड पी ५०० निर्देशांक ४.८४% ने घसरला आणि नॅस्डॅक कंपोझिट ५.९७% ने घसरला. शेअर बाजारातील घसरणीची ३ सर्वात मोठी कारणेट्रम्पचा टॅरिफ बॉम्बअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील भारतावर २६% शुल्क लादले आहे. यामध्ये व्हिएतनामवर ४६%, चीनवर ३४%, दक्षिण कोरियावर २५%, जपानवर २४% आणि युरोपियन युनियनवर २०% शुल्क लादण्यात आले आहे. तेव्हापासून शेअर बाजार घसरणीत आहे. अमेरिकेला प्रत्युत्तरअमेरिकेच्या परस्पर कराला प्रत्युत्तर म्हणून, चीनने शुक्रवार, ४ एप्रिल रोजी त्यावर ३४% प्रत्युत्तरात्मक कर जाहीर केला, जो १० एप्रिलपासून लागू होईल. त्याचा परिणाम बाजारपेठांवरही दिसून येत आहे. गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीतअमेरिकेच्या शुल्कामुळे, वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे क्रयशक्ती कमी होईल, ज्यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. मागणी कमी असल्याने कच्च्या तेलाच्या किमतीही घसरल्या आहेत. कमकुवत आर्थिक संकेतांमुळे गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत आणि त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे.

शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना नुकसान; जाणून घ्या 3 सर्वात मोठी कारणे Read More »

… तर भांडूपच्या भोंग्यासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये एक ‘बेड’ बुक करु; आनंद परांजपे यांचा राऊतांवर हल्लाबोल

Anand Paranjape : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल पटेल यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता संजय राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर दिला आहे. भांडुपचा भोंगा दिल्लीवरून कर्णकर्कश आवाजात एखाद्या मानसिक रोग्यासारखा वाजला मात्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्याबद्दल त्याने तारतम्य बाळगून बोलावे नाहीतर ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये एक बेड भविष्यात बुक करु अशी टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी गुरुवारी वक्फ बोर्डाच्या विधेयकावर भाषण करताना शिवसेनेचे जाज्वल्य हिंदूत्व जे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात होते याची आठवण करून दिली आणि त्या भाषणाच्या मिरच्या इतक्या झोंबल्या की, हा भोंगा दिल्लीवरून कर्कश आणि खालच्या पातळीवर येऊन वाजला असेही आनंद परांजपे म्हणाले. शिवसेनेचे हिंदूत्व हे ‘गर्व से कहो हम हिंदू है…’ आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळी माझ्या शिवसैनिकांनी मशीद पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे असे वक्तव्य केले होते आणि ज्यावेळी 92 – 93 मध्ये दंगली झाल्या त्यावेळी शिवसेनेच्या असलेल्या सहभागाबद्दल आठवण करून दिल्यानंतर केवळ आताची शिवसेना जी संजय राऊत यांनी कॉंग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या चरणी अर्पण केली आहे. ज्या प्रकारच्या शब्दांचा त्यांनी प्रयोग केला ते शब्द आम्ही बोलू शकतो मग संजय राऊत यांना कॉंग्रेसचे सर्टीफाईड ‘डॅशडॅशडॅश’ किंवा सिल्व्हर ओकचे सर्टीफाईड ‘डॅशडॅशडॅश’ हे आम्ही देखील बोलू शकतो. परंतु आमच्यावर ते संस्कार नाहीत. लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल ज्या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये दोन्ही सभागृहात शिवसेनेची भाषणे झाली परंतु ही निराशेच्या व पराभवाच्या वैफल्यातून झाल्याचे सांगतानाच रोज पक्ष सोडून जे शिवसैनिक जात आहेत त्यांचा उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास कमी होतो आहे तो अधिक बळकट कसा होईल याचा संजय राऊत यांनी विचार केला तर ते अधिक योग्य राहील असा टोलाही आनंद परांजपे यांनी लगावला. पत्राचाळीची लॉटरी निघत आहे आणि ज्यांना या आरोपात ईडीची 8-9 महिने जेलवारी झाली आहे त्या संजय राऊत यांनी बोलताना तारतम्य बाळगावे. आरोप करणे खूप सोपे आहे. खासदार प्रफुल पटेल यांची साधी चौकशीही कधी लागली नाही. स्वतः संजय राऊत हे ईडीच्या जेलची वारी करुन आले आहेत. सध्या ते जामीनावर आहेत. त्यांनी उगाच वायफळ आरोप करु नये असा इशाराही आनंद परांजपे यांनी दिला.

… तर भांडूपच्या भोंग्यासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये एक ‘बेड’ बुक करु; आनंद परांजपे यांचा राऊतांवर हल्लाबोल Read More »

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल, चौकशीसाठी समिती गठीत

Devendra Fadanvis : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने विरोधकांनी या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर आता या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या धर्मादाय रुग्ण योजनेची धर्मादाय रुग्णालयांकडून अंमलबजावणी होत नसल्यास, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील कथित प्रकरणाची पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशी करण्यात येईल. या समितीत उपसचिव, सह कक्षप्रमुख तथा कक्ष अधिकारी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष – मुख्यमंत्री सचिवालय यांचे प्रतिनिधी, मुंबईतील सर जे. जे. रुग्णालय समूहाचे अधीक्षक, तसेच विधि व न्याय विभागाचे उपसचिव/अवर सचिव हे या चौकशी समितीचे सदस्य सचिव असतील. याच प्रमाणे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धर्मादाय रुग्ण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अंमलबजावणी बाबतही प्रधान सचिव विधी व न्याय विभाग तसेच धर्मादाय आयुक्त यांनी संनियत्रण व नियमन करावे याबाबतही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. या निर्देशात म्हटले आहे की, धर्मादाय रूग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व धर्मादाय रुग्णालयांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे ‘धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची’ मान्यता घ्यावी. याबाबत धर्मादाय रुग्णालयांना तत्काळ निर्देश देण्यात यावेत. विधी व न्याय विभागामार्फत गठीत करण्यात आलेल्या तपासणी पथकामार्फत तपासणी अहवाल व समितीच्या शिफारशी सादर केल्या आहेत. त्या शिफारशींवर तत्काळ कार्यवाही करावी. शासनामार्फत धर्मादाय रुग्णालयांमध्ये 186 धर्मादाय आरोग्य सेवकांच्या सेवा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. या पदांवरील भरती तत्काळ करण्यात यावी. निर्धन रुग्णनिधी (IPF) खात्याबाबतची अद्ययावत माहिती धर्मादाय रुग्णालयांकडून घेवून ती धर्मादाय आयुक्त यांच्या संकेतस्थळावर अद्ययावत करावी. योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या रुणालयांवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कठोर कारवाई करावी.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल, चौकशीसाठी समिती गठीत Read More »

शेवगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी मागितली सामूहिक आत्महत्येची परवानगी, कारण काय?

Maharashtra News: गोळेगाव तालुका शेवगाव, अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामस्थांनी एक अघटीत पाऊल उचलून सामूहिक आत्महत्येची परवानगी मागितली आहे. हा निर्णय त्यांना दुष्काळाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये विविध सरकारी योजनांसाठी केलेल्या मागण्या व प्रयत्नांच्या निष्फळतेमुळे घ्यावा लागला आहे. गोळेगाव येथील पाझर तलावाची दुरुस्ती, भूजल विकास यंत्रणेच्या मार्फत अनुदानित विहिरीचा लाभ, आणि दुष्काळी गावांसाठी पोखरा योजनेत समावेश ही त्यांच्या मुख्य मागण्या आहेत. 5 एप्रिल रोजी देण्यात आलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. पाझर तलावाची दुरुस्ती: जेणेकरून पाणी साठवण क्षमता वाढून नदीपात्रात पाणी सोडता येईल. अनुदानित विहिरीचा लाभ: भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या मार्फत शेतकऱ्यांना अनुदानित विहिरीचा लाभ मिळवून देण्यात यावा. पोखरा योजनेत समावेश: दुष्काळी गावांसाठी पोखरा योजनेत समाविष्ट करण्यात यावे(रेफरन्स नसणे). तर दुसरीकडे यापूर्वी 24 फेब्रुवारी 2025 पासून या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. यावेळी पाझर तलावात जलआंदोलन, तसेच रस्तारोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. प्रशासनाची प्रतिक्रियाग्रामस्थांच्या आंदोलनाला जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पाझर तलावाचे काम जलसंधारण विभागाच्या मार्फत होत असल्याचे सांगितले. दरम्यान, जलसंधारण विभागाचे अधिकारी तोंडी आश्वासन देत असताना लेखी आश्वासन दिले नाही. तसेच, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन दिले होते. आत्महत्येची परवानगीदोन्ही विभागांनी आश्वासन देऊनही काम पुढील कार्यवाही न झाल्यामुळे ग्रामस्थ सामूहिक आत्महत्येच्या हद्दीत पोहोचले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, सिंचनासाठी आवश्यक पाझर तलावाची दुरुस्ती न केल्याने शेतकऱ्यांची कोंडी होत आहे, तर अनुदानित विहिरीच्या अभावामुळे शेती पणन कठीण होत आहे. या बाबतीत शासनाकडून अधिकृत प्रतिसाद नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामस्थांच्या सामूहिक आत्महत्येच्या धमकीमुळे प्रशासनासाठी त्वरित पावले उचलणे गरजही बनले आहे. या मागण्यांवर तातडीने संवाद साधून समाधानकारक निर्णय घेतल्यास गावात शांतता राखता येईल.

शेवगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी मागितली सामूहिक आत्महत्येची परवानगी, कारण काय? Read More »

हैदराबादला धक्का देत KKR ने मारली बाजी, वेंकटेश अय्यर ठरला हिरो

KKR vs SRH: आयपीएल 2025 मध्ये गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादवर 80 धावांनी शानदार विजय मिळवला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट्स गमावून 200 धावा केल्या. वेंकटेश अय्यर, अंगकृष रघुवंशी आणि रिंकू सिंग यांच्या उत्कृष्ट खेळीमुळे कोलकाताने चांगली धावसंख्या उभारली. 29 चेंडूत 60 धावा अय्यरने 29 चेंडूत सात चौकार आणि तीन षटकारांसह 60 धावा केल्या तर रिंकू सिंगने 17 चेंडूत 32 धावा केल्या, तर अंगकृष रघुवंशीने 32 चेंडूत 50 धावा केल्या. शेवटच्या पाच षटकांत कोलकाताने 78 धावा जोडल्या. हैदराबादचा हा सलग तिसरा पराभव होता. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्सने त्यांना पराभूत केले होते. हैदराबादला विजयासाठी 201 धावांची आवश्यकता होती, पण कोलकाताच्या गोलंदाजी समोर त्यांचा फलंदाजीचा क्रम कोसळला त्यामुळे संपूर्ण संघ 120 धावांवर ऑल आऊट झाला. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा अपयशी ठरलेहैदराबादचे ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा हे दोघेही लवकर बाद झाले. पहिल्या षटकात हेडने चौकार मारला पण पुढच्या षटकात हर्षित राणाने त्याला झेलबाद केले. दुसऱ्याच षटकात राणाने अभिषेकलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर, इशान किशन आणि नितीश कुमार रेड्डी देखील लवकर बाद झाले. हेनरिक क्लासेनने 21 चेंडूत 33 धावा केल्या, पण तोही लवकर बाद झाला.

हैदराबादला धक्का देत KKR ने मारली बाजी, वेंकटेश अय्यर ठरला हिरो Read More »

वक्फ सुधारणा विधेयक राज्यसभेत 128 मतांनी मंजूर, विरोधात किती मते?

Waqf Amendment Bill In Rajya Sabha: गेल्या काही दिवसांपासून देशातील राजकारणात चर्चेचा विषय ठरलेला वक्फ (सुधारणा) विधेयक, 2025 मंजूर लोकसभेनंतर राज्यसभेत देखील मंजूर झाला आहे. राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूने 128 मते पडली तर 95 खासदारांनी विरोधात मतदान केले. दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाल्याने आता हे विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीसाठी पाठवले जाणार आहे. त्यांची संमती मिळाल्यानंतर हे विधेयक कायद्याचे रूप घेईल. गुरुवारी लोकसभेतही या विधेयकावर चर्चा झाली. लोकसभेत 288 खासदारांनी पाठिंबा दिला तर 232 जणांनी विरोध केला. किरण रिजिजू यांनी सरकारची बाजू मांडलीराज्यसभेत चर्चेदरम्यान, अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केले की हे विधेयक विविध भागधारकांकडून मिळालेल्या सूचनांच्या आधारे तयार करण्यात आले आहे. ते म्हणाले, “वक्फ बोर्ड ही एक वैधानिक संस्था आहे आणि प्रत्येक सरकारी संस्था धर्मनिरपेक्ष असली पाहिजे.” वक्फ बोर्डात बिगर-मुस्लिमांच्या सहभागावर भर देताना रिजिजू म्हणाले की, 22 सदस्यांपैकी फक्त 4 सदस्य गैर-मुस्लिम असतील. विरोधकांवर हल्लाबोल करताना ते म्हणाले, “भाजप नाही तर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष मुस्लिमांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत.” मुस्लिमांच्या स्थितीवर काँग्रेस कोंडीत सापडलीकिरण रिजिजू म्हणाले, “तुम्ही (विरोधी पक्ष) मुस्लिमांना मुख्य प्रवाहापासून वेगळे करत आहात. 60 वर्षे काँग्रेस आणि इतर पक्षांनी देशावर राज्य केले, परंतु मुस्लिमांसाठी काहीही विशेष केले नाही. आजही हा समुदाय गरिबीत जगत आहे.” ते म्हणाले की, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार त्यांच्या उन्नतीसाठी काम करत आहे. विधेयकातील प्रमुख तरतुदीवक्फ न्यायाधिकरणांना अधिकार दिले जातील आणि त्यांचा कार्यकाळ स्पष्टपणे परिभाषित केला जाईल.वक्फ बोर्डांना अनिवार्य योगदान 7% वरून 5% पर्यंत कमी करण्यात आले आहे. एक लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या वक्फ संस्थांचे ऑडिट राज्य सरकारने नियुक्त केलेल्या ऑडिटर्सकडून केले जाईल. वक्फ घोषणेपूर्वी महिलांना त्यांचा वारसा मिळू शकेल अशी तरतूद या विधेयकात आहे. तसेच, विधवा, घटस्फोटित महिला आणि अनाथ मुलांसाठी विशेष तरतुदी जोडण्यात आल्या आहेत. सरकारी मालमत्तेवरील वक्फ दाव्याच्या चौकशीची तरतूदसरकारी मालमत्तेवर केलेल्या वक्फ दाव्यांची चौकशी जिल्हाधिकारी पातळीवरील अधिकाऱ्याकडून केली जाईल. तसेच, सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी, केंद्रीय आणि राज्य वक्फ बोर्डांमध्ये गैर-मुस्लिम सदस्यांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे.

वक्फ सुधारणा विधेयक राज्यसभेत 128 मतांनी मंजूर, विरोधात किती मते? Read More »

भारतीय सिनेसृष्टीतील महान युगाचा अंत, अभिनेते मनोजकुमार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली

Actor Manoj Kumar Passes Away : ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि ‘भारतकुमार’ म्हणून ओळखले जाणारे मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका महान युगाचा अस्त झाला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांनी देशभक्तीपर चित्रपटांच्या माध्यमातून जनमानसात देशप्रेम जागवले. ‘उपकार’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘क्रांती’ यांसारख्या चित्रपटांनी त्यांनी समाजातील वास्तव आणि देशासाठी असलेली निष्ठा मोठ्या ताकदीने मांडली. त्यांच्या अभिनयात आणि दिग्दर्शनात असलेली राष्ट्रभक्ती ही आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य असून त्यांची जागा कधीही भरून निघणारी नाही. ‘दादासाहेब फाळके’, ‘पद्मश्री’ पुरस्कारप्राप्त असलेले मनोज कुमार हे अनेक नवोदित कलाकारांचे प्रेरणास्थान होते.त्यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात केली आहे.

भारतीय सिनेसृष्टीतील महान युगाचा अंत, अभिनेते मनोजकुमार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली Read More »

ट्रम्पने दिला जगाला धक्का, भारतावर 26% टॅक्स, जाणून घ्या कोणत्या देशावर किती टॅक्स लावला

Trump Tariffs Rules : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आजपासून नवीन टॅरिफ नियम लागू केले आहे. त्यामुळे आता याचा जगाच्या अर्थव्यस्थेवर काय परिणाम होणार याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे. नवीन नियमांनुसार भारतातून येणाऱ्या वस्तूंवर 26% कर लावण्यात आला आहे. ट्रम्प यांनी या निर्णयाचे वर्णन अमेरिकेच्या “आर्थिक स्वातंत्र्या”कडे एक महत्त्वाचे पाऊल म्हणून केले आहे.या नवीन धोरणांतर्गत, चीन आणि पाकिस्तानसह अनेक देशांवर कठोर आयात कर लादण्यात आले आहेत. चीनवर 34%, बांगलादेशवर 37% आणि पाकिस्तानवर 29% कर लादण्यात आला आहे. तर युरोपियन युनियन, जपान, तैवान, व्हिएतनाम आणि इतर देशांवर वेगवेगळ्या दराने शुल्क लादण्यात आले आहे. भारतावर 26% कर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अमेरिकेला बऱ्याच काळापासून व्यापार पातळीवर तोटा सहन करावा लागत आहे. त्यांनी आरोप केला की भारत अमेरिकन वस्तूंवर 52% कर लादतो, म्हणून अमेरिकेने भारतावर 26% कर लादून प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्या देशांवर किती शुल्क आकारले गेले? ट्रम्प प्रशासनाने जारी केलेल्या चार्टनुसार, हे नवीन शुल्क वेगवेगळ्या देशांवर लादण्यात आले आहे. चीन: 34% युरोपियन युनियन: 20% दक्षिण कोरिया: 25% भारत: 26% व्हिएतनाम: 46% तैवान: 32% जपान: 24% थायलंड: 26% स्वित्झर्लंड: 31% इंडोनेशिया: 32% मलेशिया: 24% कंबोडिया: 49% युनायटेड किंग्डम: 10% दक्षिण आफ्रिका: 30% ब्राझील: 10% बांगलादेश: 37% सिंगापूर: 10% इस्रायल: 17% फिलीपिन्स: 17% चिली: 10% ऑस्ट्रेलिया: 10% पाकिस्तान: 29% तुर्की: 10% श्रीलंका: 44% कोलंबिया: 10% कॅनडा आणि मेक्सिकोसाठी विशेष सूट या नवीन टॅरिफ धोरणात कॅनडा आणि मेक्सिकोला विशेष सूट देण्यात आली आहे. व्हाईट हाऊसने स्पष्ट केले की हे दोन्ही देश आधीच USMCA करारांतर्गत येतात, ज्यामुळे त्यांना या नवीन शुल्कातून सूट देण्यात आली आहे. ट्रम्प म्हणाले, “आपण अनेक देशांना सबसिडी देतो, पण आता आपल्याला आपल्याच देशाचा विचार करावा लागेल.”

ट्रम्पने दिला जगाला धक्का, भारतावर 26% टॅक्स, जाणून घ्या कोणत्या देशावर किती टॅक्स लावला Read More »

बाईक टॅक्सीसाठी ॲग्रीगेटर धोरण जाहीर, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Decision : राज्यातील एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी (बाइक) टॅक्सी समुच्चयक ॲग्रीगेटर सेवा सुरू करण्याबाबतचे धोरण लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.बैठकीत बाईक टॅक्सी वाहनांचे समुच्चयक धोरण ठरविण्यासाठी गठीत केलेल्या रामनाथ झा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशीनुसार हे धोरण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे राज्यातील नागरिकांसाठी वाहतुकीचा किफायतशीर आणि सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या धोरणांतर्गत बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्या समुच्चयकांकडून (Aggregators) इलेक्ट्रिक बाईक वापराव्या लागणार आहेत. त्या पिवळ्या रंगात रंगवलेल्या असतील. हा पर्याय पर्यावरणपूरक व रोजगार उपलब्ध करून देणारा हा पर्याय आहे. यातून मोठी रोजगारनिर्मिती होणार असून महिला चालकांना देखील प्रोत्साहीत केले जाणार आहे. या धोरणांतर्गत सेवा देणाऱ्या अँग्रीगेटरच्या वाहनांना जीपीएस लावणे, संकटकालीन संपर्क सुविधा, वेग पडताळणी, चालक व प्रवाशी या दोन्हींकरिता विमा संरक्षण, स्वच्छता दर्जा राखणे आदी बाबी आवश्यक करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच दुचाकी चालकांची निवड करताना त्यांची पार्श्वभूमी तपासून सुरक्षेबातच्या सर्व निकषांची पूर्तता करणे आवश्यक करण्यात आले आहे. तसेच या बैठकीत वडसा-देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी ९४३ कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. वडसा-देसाईगंज-गडचिरोली या रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास आणि राज्याच्या हिश्श्याचे ९४३ कोटी २५ लाख रुपये देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हा निधी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने वितरित केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने ५० टक्के आर्थिक सहभाग देण्याचा निर्णय पूर्वीच घेतला आहे. सध्या या प्रकल्पाचा एकूण खर्च १ हजार ८८६ कोटी ५ लाख रुपये इतका असून त्यापैकी अर्धा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. आतापर्यंत राज्य सरकारने २८८ कोटी ८५ लाख रुपये वितरित केले असून उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देण्यात येईल. हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास गडचिरोली जिल्हा रेल्वे मार्गाने जोडला जाईल, ज्यामुळे येथील विकास प्रक्रियेला गती मिळेल आणि वाहतूक सुलभ होईल.

बाईक टॅक्सीसाठी ॲग्रीगेटर धोरण जाहीर, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय Read More »

आडवाणींना सत्तेपासून दूर ठेवले अन्…, राऊतांचा PM मोदींवर गंभीर आरोप

Sanjay Raut on PM Modi: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी लालकृष्ण आडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी आडवाणी यांची तुलना मुघल सम्राट शहाजहान यांच्याशी केली असून, त्यांना जिवंत असताना सत्तेपासून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप केला. यासोबतच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आडवाणींना सत्तेपासून दूर ठेवले – राऊतांचा आरोपसंजय राऊत म्हणाले, “लालकृष्ण आडवाणी जिवंत असताना त्यांना शहाजहानाप्रमाणे कोंडून ठेवण्यात आले आणि नरेंद्र मोदी दोन वेळा पंतप्रधान झाले. मुघली संस्कृतीप्रमाणे त्यांना सत्तेपासून बेदखल करण्यात आले. तेव्हा आम्ही विचारले होते की, मुघली संस्कृतीप्रमाणे का वागले? आडवाणी यांचा पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदावर हक्क होता. तो त्यांना का दिला नाही?” राऊत यांनी हा सवाल उपस्थित करत भाजपच्या अंतर्गत धोरणांवर टीका केली. मोदींची निवृत्ती आणि फडणवीसांचे मतराऊत यांनी पुढे नरेंद्र मोदी यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “17 सप्टेंबर 2025 रोजी नरेंद्र मोदी वयाची 75 वर्षे पूर्ण करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कितीही वाटत असले तरी त्यांना निवृत्त व्हावे लागेल.” राऊत यांचे हे वक्तव्य फडणवीस यांच्या त्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर आले आहे, ज्यात त्यांनी मोदी 2029 पर्यंत पंतप्रधान राहतील, असे म्हटले होते. राऊत यांनी यावरून भाजपच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचा दावा केला. भाजप-संघ संबंधांवर मौनभाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्यातील संबंधांबाबत राऊत यांनी भाष्य करण्याचे टाळले. ते म्हणाले, “भाजप आणि संघ यांच्यातील संबंध कसे असावे, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर माझ्यासारख्या बाहेरच्या माणसाने बोलण्याची गरज नाही.” राऊत यांनी यावर तटस्थ भूमिका घेतली असली तरी त्यांच्या इतर वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा तापली आहे. राजकीय वादाला तोंडराऊत यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा भाजप आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू होण्याची शक्यता आहे. आडवाणी यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा मुद्दा आणि मोदी यांच्या निवृत्तीचा प्रश्न यावर भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दरम्यान, या विधानांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा गरम झाले आहे.

आडवाणींना सत्तेपासून दूर ठेवले अन्…, राऊतांचा PM मोदींवर गंभीर आरोप Read More »