DNA मराठी

ट्रेंडिंग

Ambernath Crime: धक्कादायक, अंबरनाथच्या जावसई भागात तरुणावर तलवार-कोयत्यांनी जीवघेणा हल्ला

Ambernath Crime: अंबरनाथ जावसई परिसरात एका तरुणावर 8 ते 9 जणांच्या टोळीने तलवार-कोयत्यांसारख्या धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फुलेनगर वाडीतील सुधीर ओमप्रकाश सिंह हा तरुण आपल्या कुटुंबासोबत राहतो आणि परिसरात त्यांचा तबेलाही आहे. गाडीच्या तुटलेल्या वेल्डिंगचे काम करण्यासाठी ते घराजवळील दुकानात गेले असताना अचानक मोटरसायकलवरून आलेल्या तरुणांनी त्यांच्यावर भीषण हल्ला चढवला. आरोपींकडे तलवार, कोयता यांसारखी घातक हत्यारे होती आणि त्यांनी थेट जीव घेण्याच्या उद्देशाने मारहाण केली. या हल्ल्यात सुधीर सिंह यांच्या पाठीवर, हातावर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या असून त्यांना तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्लेखोरांनी पळ काढताना पीडिताची मोटरसायकलसुद्धा फोडून टाकली. संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसून आली आहे.या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी हल्लेखोरांच्या टोळीचा शोध तीव्र केला आहे. शहरातील वाढत्या गुंडगिरीमुळे नागरिकांमध्ये मोठी भयभीतता पसरली आहे.

Ambernath Crime: धक्कादायक, अंबरनाथच्या जावसई भागात तरुणावर तलवार-कोयत्यांनी जीवघेणा हल्ला Read More »

ladki bahin yojana

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार ई-केवायसी

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारची लोकप्रिय योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांना एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या अडचणी लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ई-केवायसी करण्याची दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत निर्धारित अंतिम मुदत वाढवून आता 31 डिसेंबर 205 पर्यंत करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. अलीकडील नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच काही महिलांच्या पती किंवा वडिलांचे निधन झाल्यामुळे संबंधित आधार क्रमांकावर ओटीपी प्राप्त होणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत अपूर्ण ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ देणे आवश्यक आहे. तसेच, ज्या पात्र महिलांच्या पती किंवा वडील हयात नाहीत किंवा ज्या महिला घटस्फोटित आहेत अशांनी स्वतःची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचा आदेश यांची सत्यप्रत सादर करणे आवश्यक राहील. या अनुषंगाने पात्र महिलांना न्याय मिळावा आणि कोणतीही पात्र महिला तांत्रिक किंवा अपरिहार्य कारणांमुळे योजनेपासून वंचित राहू नये, ही शासनाची भूमिका आहे. याकरिता माननीय मुख्यमंत्री व दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या हिताचे भान राखत ई-केवायसी प्रक्रियेस 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच विस्तारित कालावधीत लाभार्थींनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही मंत्री तटकरे यांनी केले आहे.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार ई-केवायसी Read More »

crime

Dhule Crime : पेढ्यातून गुंगीचे औषध, शारीरिक संबंधाचा व्हिडिओ अन् 60 लाख रुपये उकळले, मुख्याध्यापकाचा महिलेवर अत्याचार

Dhule Crime : आर्थिक व्यवहारातून झालेल्या ओळखीचा फायदा घेत पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 60 लाख रुपये उकळून सलग सव्वा दोन वर्ष अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापका विरोधात 41 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच पश्चिम देवपूर पोलिसांनी सुकलाल रामभाऊ बोरसे, वय 53, रा. विवेकानंद नगर देवपूर धुळे, या मुख्याध्यापकाला अटक केली आहे. संबंधित नराधम मुख्याध्यापकाने पीडित महिलेला आर्थिक मदत केली होती. या आर्थिक मदतीतून ओळख झाल्याने मुख्याध्यापकांनी पीडित महिलेच्या घरी जाऊन पेढ्यांमध्ये गुंगीचे औषध देत महिलेवर अत्याचार केला. एवढ्यावरच या नराधम मुख्याध्यापकाने न थांबता पिढीत महिला सोबत केलेल्या शारीरिक संबंधाचा व्हिडिओ वायरल करण्याची धमकी देऊन तब्बल 59 लाख रुपये उकळत ब्लॅकमेल करत तब्बल सव्वा दोन वर्ष महिलेवर अत्याचार केला. अखेर महिलेने पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन गाठत नराधम मुख्याध्यापका विरोधात तक्रार दाखल केल्याने पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये मुख्याध्यापका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ नराधम मुख्याध्यापकाला ताब्यात घेत गजाआड केले आहे. घडलेल्या घटनेमुळे धुळ्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पश्चिम देवपूर पोलीस करत आहे.

Dhule Crime : पेढ्यातून गुंगीचे औषध, शारीरिक संबंधाचा व्हिडिओ अन् 60 लाख रुपये उकळले, मुख्याध्यापकाचा महिलेवर अत्याचार Read More »

hospital

Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजना; जिल्ह्यात 41 लाख 65 हजार लाभार्थी आयुष्मान कार्डासाठी पात्र

Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारची महत्वाची योजना आयुष्मान भारत योजना अहिल्यानगर जिल्ह्यात अनेकांसाठी वरदान ठरत आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नगर जिल्ह्यात 41 लाख 65 हजार लाभार्थी आयुष्मान कार्डासाठी पात्र ठरले असून 18 लाख 23 हजार कार्डे तयार आहे. योजनांचे मुख्य फायदे प्रति कुटुंब 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार 1,356 शस्त्रक्रिया व उपचार मोफत 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान भारत वय वंदना कार्ड अतिरिक्त 5 लाख रुपये कव्हर जिल्ह्यात अंमलबजावणी होत असलेल्या योजना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना दोन्हींचा एकत्रित लाभ नागरिकांना उपलब्ध आयुष्मान गोल्डन कार्ड कसे मिळेल? स्व: लाभार्थी आशा स्वयंसेविका आपले सरकार सेवा केंद्र स्वस्त धान्य (राशन) दुकान आयुष्मान App (Google Play Store) कार्ड घरबसल्या तयार करा भेट द्या: beneficiary.nha.gov.in किंवा Google Play Store → Ayushman App डाउनलोड आधार क्रमांक/रेशन कार्ड/नोंदणीकृत मोबाईल वरून OTP नोंदणी कुटुंबातील सदस्यांची माहिती + फोटो अपलोड कार्ड डाउनलोड करा आणि वापर सुरू करा आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड रेशन कार्ड नोंदणीकृत मोबाईल क्रमांक

Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजना; जिल्ह्यात 41 लाख 65 हजार लाभार्थी आयुष्मान कार्डासाठी पात्र Read More »

Maharashtra Crime: महाराष्ट्र हादरला, तीन वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करून हत्या

Maharashtra Crime: राज्यात गेला काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या गुन्हांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. यातच एक धक्कादायक बातमी आता समोर येत आहे ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येते. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या भागात तीन वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने एकच खडबड उडाली आहे. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावात तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली ही घटना काल संध्याकाळच्या सुमारास घडली असून तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून 24 वर्षीय विजय संजय खैरनार याने चिमुकलीची दगडाच्या सहाय्याने हत्या केली. त्यानंतर आरोपी फरार झाला या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी संजय खैरनार याला ताब्यात घेतले आहे रात्री उशिरा चिमुकलीचे शव पोस्टमार्टम करता मालेगाव मेडिकल कॉलेज येथे पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण डोंगराळे गावावर शोककळा पसरली आहे रात्री उशिरापर्यंत एफआरआय दाखल करायचं काम सुरू होते.

Maharashtra Crime: महाराष्ट्र हादरला, तीन वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करून हत्या Read More »

fb img 1763353276214

Ahilyanagar News: चार वर्षांचा वाद, चार तासांत संपला; शेतरस्त्याच्या वादाचे समाधानकारक निकालाकडे मार्गक्रमण

Ahilyanagar News: चार वर्षे चालत आलेल्या शेतरस्त्याच्या वादाला शेवटी तोडगा निघाला. महसूल विभाग, पोलिस प्रशासन व स्थानिक शेतकऱ्यांच्या समन्वयातून समुपदेशनाच्या माध्यमातून मार्ग काढत रस्ता खुला करण्यात आला. तहसीलदारांच्या आदेशाची प्रक्रिया सुरू असतानाच मंडळाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने फेरपालटाने जमिनींची अचूक माहिती समोर आली, त्यातून वादी–प्रतिवादींमध्ये सामंजस्य घडून आले. शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने झाडी-झुडपे हटवण्याचा निर्णय घेतला आणि फक्त चार तासांत रस्ता खुला झाला. महसूल अधिकाऱ्यांनीही या सकारात्मक उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. एकजुटीने काम केल्यास कोणतेही आव्हान सोपे होते, याचे उत्तम उदाहरण. चर्चेत सहभागी असणारे भाऊसाहेब मतकर, विक्रम मतकर, नारायण मतकर, सुरेश मतकर, राजेश मतकर, वसंत मतकर, रेवजी कराळे, कमलाकर जाधव, संदीप जाधव, म्हातारदेव जाधव, आदिनाथ जाधव, हरिश्चंद्र मतकर, रमेश मतकर, जैनोद्दीन शेख, मन्सूर शेख, पोपटराव कराळे (संचालक, खरेदी-विक्री संघ) आदी

Ahilyanagar News: चार वर्षांचा वाद, चार तासांत संपला; शेतरस्त्याच्या वादाचे समाधानकारक निकालाकडे मार्गक्रमण Read More »

Nitesh Rane on Rahul Gandhi : राहुल गांधी देशाची बदनामी करणारे पार्ट टाइम राजकारणी; नितेश राणेंचा घणाघात

Nitesh Rane on Rahul Gandhi : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून पुन्हा एकदा बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन करणार आहे. विधानसभा निवडणुकीत एनडीएने 243 पैकी 202 जागा जिंकल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत राहुल गांधी यांचा पार्ट टाइम राजकारणी म्हणून उल्लेख केला आहे. माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, राहुल गांधी हे देशासाठी पर्यटक आहेत. ते देशाची बदनामी करणारे पार्ट टाइम राजकारणी आहेत. अशांना भारतीय म्हणायचं का? हा प्रश्न आहे. बिहारच्या जनतेने अशा लोकांना स्पष्ट नाकारलं आहे. लोकशाहीची थट्टा करणं ही राहुल गांधींची सवय आहे. त्यामुळे जनतेने त्यांना नाकारून NDA ला संधी दिली असं माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले. तसेच लालू प्रसाद यादव यांच्या काळात कायदा-सुव्यवस्था ढासळली होती. पण नितीश कुमार आणि मोदी सरकारने महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. विविध योजना आणल्या आणि त्याचं प्रतिबिंब निकालात स्पष्ट दिसलं असं देखील नितेश राणे म्हणाले.   तर दुसरीकडे हिंमत असेल तर काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान देखील त्यांनी यावेळी काँग्रेसला दिले.

Nitesh Rane on Rahul Gandhi : राहुल गांधी देशाची बदनामी करणारे पार्ट टाइम राजकारणी; नितेश राणेंचा घणाघात Read More »

Vijay Wadettiwar on Pune land Case : मुंढवा जमीन घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करा; विजय वडेट्टीवारांची मागणी

Vijay Wadettiwar on Pune land Case :   पुणे मुंढवा येथील कोट्यवधी रुपयांच्या शासकीय जमिनीचा बेकायदेशीर व्यवहार काही निवडक खाजगी व्यक्ती आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने करण्यात आला असून, शासनाच्या मालकीची जमीन हडपण्याचा हा सुनियोजित कट होता.या  गैरव्यवहारात सहभागी असलेल्या सर्व अधिकारी व लाभार्थ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहून वडेट्टीवर यांनी मागणी केली. या प्रकरणातील गंभीर बाबी म्हणजे २४ ऑक्टोबर १९७३ रोजी ही जमीन ‘वनस्पती सर्वेक्षण विभाग’ यांना वार्षिक रु. १/- भाड्याने १५ वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात आली होती. नंतर ३१ मार्च २०३८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ३० डिसेंबर २०२४ रोजी  शीतल तेजवानी यांनी कोणताही अधिकृत शासन निर्णय, तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश नसतानाही, व्याजासह फक्त रु. ११ हजार ही रक्कम ‘जमीन धारकत्व मूल्य’ म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली. अधिकाऱ्यांनी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता ही रक्कम स्वीकारली. २० मे २०२५ रोजी विक्रीपत्र नोंदविण्यात आले. त्यात जमिनीच्या मालकीचा पुरावा, मोबदला बाजार मूल्य, स्टॅम्प ड्युटी याचा कोणताही उल्लेख नाही. सिटीसर्वे मिळकत पत्रिका उपलब्ध असतानाही, केवळ जुन्या ७/१२ उताऱ्यावर आधारित दस्त नोंदविण्यात आला. नोंदणी अधिकारी आणि तहसीलदार यांनी संगनमताने शासकीय जमीन खाजगी व्यक्तीकडे हस्तांतरित करण्याचे गैरकृत्य केले. ०९ जून २०२५ रोजी तहसीलदार सुर्यकांत येवले यांनी कोणताही तपास न करता अमेडिया कंपनीच्या मागणीनुसार BSI ला जागा रिकामी करण्याचे आदेश दिले. याच अधिकाऱ्यावर याआधी बोपोडी येथील प्रकरणात गुन्हा दाखल आहे, अस वडेट्टीवर यांनी पत्रात नमूद केले  आहे. शासकीय जमिनीवर बेकायदा ताबा घेण्यासाठी लाभार्थ्यांना अनुकूल अशी भूमिका तहसीलदाराने घेतली. वतनाच्या जमिनी हस्तांतरित करण्यासंबंधीच्या २०२१ च्या शासन आदेशाचे उल्लंघन करून, शासनाची पूर्वपरवानगी नसतानाही बेकायदेशीरपणे जमीन धारकत्व मूल्य स्वीकारले. इलीजिबीलिटी प्रमाणपत्र न घेता, स्टॅम्प ड्युटी व मूल्यांकन नियम मोडून आणि केवळ लेटर ऑफ इन्टेन्टवर सवलत देऊन बेकायदा दस्त नोंदणी करण्यात आली. लाभार्थी  शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनीने खोटे कागदपत्रे आणि चुकीची ओळख वापरून शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवर यांनी केला आहे. सगळ्यात महत्वाची बाब, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाने समिती नेमली,त्यातील काही अधिकारी हेच आधीच्या बेकायदेशीर व्यवहारांमध्ये गुंतलेले आहेत. यामुळे नेमलेली चौकशी निष्पक्ष चौकशी करणार नाही, समिती रद्द करणे आवश्यक आहे. हा केवळ प्रशासकीय गैरव्यवहार नसून, शासनाच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या मालमत्तेचा नियोजनबद्ध अपहार आहे. त्यामुळे मुंढवा प्रकरणमधील सर्व बेकायदेशीर व्यवहार, आदेश व विक्रीपत्रे तात्काळ रद्द करावीत. सर्व संबंधित अधिकारी आणि लाभार्थी, अमेडिया कंपनी यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदवण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रात केली. या प्रकरणी वडेट्टीवर यांनी महसूल मंत्री बावनकुळे आणि मुख्य सचिवाना देखील पत्र लिहिले आहे. या प्रकरणातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करून त्यांची विभागीय चौकशी सुरु करावी. गैरव्यवहार झालेली जमीन शासनाच्या ताब्यात घ्यावी. याच अधिकाऱ्यांनी आणखी कोणत्या सरकारी व खाजगी जमिनी बळकावल्या आहेत, याची स्वतंत्र सखोल चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवारा यांनी केली आहे.

Vijay Wadettiwar on Pune land Case : मुंढवा जमीन घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करा; विजय वडेट्टीवारांची मागणी Read More »

office romance

Office Romance : काय सांगता? ऑफिस रोमान्समध्ये भारतीय दुसऱ्या नंबरवर सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा

Office Romance: ऑफिस रोमांसमध्ये भारतीय दुसऱ्या क्रमांकावर असल्याचा धक्कादायक खुलासा एका नवीन सर्वेक्षणातून झाला आहे. आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण व्यावसायिक जीवनात, ऑफिस हे फक्त काम करण्याचे ठिकाण राहिलेले नाही. दररोज तासनतास एकत्र काम केल्याने सहकाऱ्यांमध्ये भावनिक बंध निर्माण होणे सामान्य होत आहे. कधीकधी, ही नैसर्गिक जवळीक कालांतराने मैत्रीपासून प्रेमसंबंधांपर्यंत वाढू शकते. एकूण 11 देशांतील लोकांचा अभ्यास अ‍ॅशले मेडिसेलने केलेल्या अलीकडील आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार, ऑफिस रोमान्सच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या अभ्यासात अमेरिका, ब्रिटन, स्पेन, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियासह 11 देशांतील लोकांचा समावेश होता. अहवालातील सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष असा होता की 40 टक्के भारतीय कर्मचारी, किंवा 40 टक्के, कधी ना कधी सहकाऱ्यासोबत संबंधात होते. मेक्सिको या यादीत अव्वल आहे, 43 टक्के लोक ऑफिस अफेअरची तक्रार करतात. त्यानंतर भारत येतो. अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडामध्ये ही संख्या सुमारे 30 टक्के आहे. या अहवालात असेही दिसून आले आहे की महिलांपेक्षा पुरुष सहकाऱ्याशी डेट करण्याची शक्यता जास्त असते. 51 टक्के पुरुषांनी सहकाऱ्याशी संबंध असल्याचे मान्य केले, तर महिलांसाठी हे प्रमाण 36 टक्के होते. महिलांमध्ये करिअरची खबरदारी महिला करिअरबाबत अधिक जागरूक होत्या. सुमारे 29 टक्के महिलांनी सांगितले की त्यांना ऑफिस रोमान्समध्ये सहभागी होण्यास कचरतात कारण त्यामुळे त्यांच्या व्यावसायिक वाढीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पुरुषांसाठी हा आकडा 27 टक्के होता. उल्लेखनीय म्हणजे, 18 ते 24 वयोगटातील तरुण कर्मचारी ऑफिसच्या बाबींबाबत सर्वात जास्त सावध असल्याचे दिसून आले. त्यांना भीती आहे की अशा नात्यांमुळे त्यांचे करिअर खराब होऊ शकते. ऑफिस रोमान्समध्ये भारताचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च स्थान हे केवळ बदलत्या नातेसंबंधांचे लक्षण नाही तर सामाजिक दृष्टिकोनातील बदल देखील दर्शवते. पारंपारिक नातेसंबंधांसोबतच, भारतातील लोक खुल्या नातेसंबंधांसारख्या संकल्पनांबद्दलच्या त्यांच्या धारणा देखील बदलल्या आहेत. ग्लीडेन या डेटिंग अॅपच्या सर्वेक्षणानुसार, देशातील 35 टक्के लोक खुल्या नातेसंबंधांमध्ये आहेत, तर 41 टक्के लोक अशा व्यवस्थेचा विचार करतील.

Office Romance : काय सांगता? ऑफिस रोमान्समध्ये भारतीय दुसऱ्या नंबरवर सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा Read More »

asaduddin owais

Bihar Election Result: सीमांचलमध्ये ‘ओवैसी फॅक्टर’ सुपरहिट; RJD ला मोठा धक्का

Bihar Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात असून पुन्हा एकदा एनडीए बिहारमध्ये सरकार स्थापन करणार आहे. या विधानसभा निवडणुकीत जेडीयू आणि भाजपने शानदार कामगिरी करत काँग्रेस आणि आरजेडीला मोठा धक्का दिला आहे. तर दुसरीकडे सीमांचलमध्ये ओवैसी फॅक्टर पुन्हा एकदा दिसून आला आहे. 2020 मध्ये सीमांचलमध्ये ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने 5 जागांवर बाजी मारली होती. तर आता या निवडणुकीत पुन्हा एकदा एमआयएमने 5 जागा जिंकले असून एका जागेवर सध्या आघाडी घेतली आहे. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी एमआयएमकडून आरजेडीकडे 6 जागांची मागणी करण्यात आली होती मात्र आरजेडी एमआयएमला स्पष्ट नकार दिला होता. यानंतर एमआयएमकडून 24 जागांवर उमेदवार देण्यात आले होते तर या 24 पैकी 5 जागांवर विजय मिळवला आहे तर एका जागेवर आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने या निवडणुकी 60 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवली होती मात्र पक्षाला काही खास करता आले नाही. काँग्रेस ताज्या अपडेटनुसार 5 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे फक्त सीमांचलमधेच नाहीतर संपूर्ण बिहारमध्ये आरजेडीला मोठा फटका बसला आहे.

Bihar Election Result: सीमांचलमध्ये ‘ओवैसी फॅक्टर’ सुपरहिट; RJD ला मोठा धक्का Read More »