Dnamarathi.com

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरामध्ये असणाऱ्या शांतीधाम मंदिर परिसरात घणीचे साम्राज्य वाढत चालले आहे. मात्र तरी देखील महापालिकेकडून याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. 

शांतीधाम मंदिर परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घाणीकडे महापालिकेकडून कुठलेही कारवाई होत नसल्याची तक्रार स्थानिकांकडून होत आहे.

या प्रकरणात स्थानिक नागरिक आणि शांतीधाम मंदिरच्या ट्रस्टकडून अहमदनगर महापालिकेला वारंवार तक्रार देण्यात आली आहे मात्र तरी देखील अहमदनगर महापालिकेकडून कुठलेही कारवाई होताना दिसत नाही. 

या परिसरात वाढत असणाऱ्या घाणीमुळे आजारांचा धोका वाढत चालला आहे. यामुळे महापालिकेने कारवाई करीत परिसर स्वच्छ करावा अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *