DNA मराठी

Narendra Modi

yogendra yadav

Yogendra Yadav : देशाला सध्या आणीबाणीपेक्षा अधिक धोका; योगेंद्र यादव यांचे प्रतिपादन

Yogendra Yadav : आणीबाणी काळात लोकशाही धोक्यात आली होती. मात्र आता मोदी सरकारच्या काळात लोकशाहीसह देशाची संस्कृती, सभ्यता, आयडिया ऑफ इंडिया धोक्यात आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि मोदींविरोधातील लढाई तीव्र करून एकूण अन्यायाच्या विरोधात परावर्तित केली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी नेते योगेंद्र यादव यांनी केले. समाजवादी चळवळीच्या ९० वर्षपूर्तीनिमित्त पुण्यात तीन दिवसीय समाजवादी एकजुटता संमेलन पार पडले. पुणे घोषणा पत्र या सत्रात यादव बोलत होते. अध्यक्षस्थानी अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसनमुक्ती चळवळीचे नेते अविनाश पाटील होते. या सत्रामध्ये अमूल्य निधि (इंदौर), विनोद शिरसाठ, अशोक पांडा (छत्तीसगड), हरीश खन्ना, शाहिद कमाल, सिद्धराम पैटी आदी सहभागी होते. सुनीति सु. र., गीता आर यांनी घोषणा पत्राचा प्रस्ताव मांडला. देशाला लोकशाहीवादी बनविण्याचे काम समाजवादी चळवळीने केले आहे. देशातील सध्याच्या प्रश्नांचा मुकाबला करण्याची ताकद देखील समाजवादी विचारांमध्ये आहे. प्रत्येक समाजवादी व्यक्तीने संघ, भाजप यांना प्रतिकार करणे हा पहिला धर्म आहे. अन्यथा त्यांना समाजवादी म्हणवून घेण्याचा अधिकारी नाही, असेही यादव म्हणाले. राजकीय सामाजिक संस्था संघटनांमध्ये पन्नास पंचावन्न वय झाले तरी ते कार्यकर्ते स्वतःला तरुण समजतात. वयोवृद्ध झाल्यावरही पदांचा मोह त्यांना सुटत नाही. त्यामुळे व्यवकांनी संघर्ष करून संस्था संघटनांमधील सत्ता हस्तगत केली पाहिजे. अनेक ठिकाणी असे संघर्ष उभे राहिले आहेत, असे अविनाश पाटील म्हणाले. हिंदीभाषा दिन बंद करावा मी स्वतः हिंदीप्रेमी आहे. मात्र हिंदी भाषा दिन साजरा करण्याची गरज नाही. सरकारने तो बंद करून भारतीय भाषा दिन सुरू करण्याची गरज आहे. हिंदी आणि इतर भाषांमध्ये वाद निर्माण केला जात आहे. उलट सर्व भाषांनी एकमेकांशी एकोपा निर्माण करून सरकारच्या विरोधात सांस्कृतिक लढाई लढली पाहिजे, असेही योगेंद्र यादव म्हणाले.

Yogendra Yadav : देशाला सध्या आणीबाणीपेक्षा अधिक धोका; योगेंद्र यादव यांचे प्रतिपादन Read More »

donald trump

Donald Trump ने भारताला दिला मोठा धक्का; लावला 25% कर

Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा करत 1 ऑगस्टपासून भारतावर 25 टक्के टॅरिफ लावल्याची माहिती दिली आहे. तसेच रशियाकडून तेल आणि लष्करी उपकरणे खरेदी केल्याबद्दल भारतावर अतिरिक्त दंड देखील आकारला जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’ वर ट्रम्प यांनी माहिती दिली आहे. भारत आणि अमेरिकेतील व्यापार गेल्या काही वर्षांपासून खूपच कमी आहे कारण भारताचे टॅरिफ दर खूप जास्त आहेत आणि तेथील गैर-मौद्रिक व्यापार अडथळे देखील खूप गुंतागुंतीचे आणि आक्षेपार्ह आहेत. असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. तर भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आणि लष्करी उपकरणे खरेदी करत आहे, ज्यामुळे युक्रेन युद्धाविरुद्ध अमेरिकेची मोहीम कमकुवत होते. असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. अतिरिक्त दंड भरावा लागणार भारत आता 1 ऑगस्टपासून 25% टॅरिफ भरेल आणि अतिरिक्त दंड देखील भरावा लागेल, जो रशियासोबतच्या संबंधांची किंमत असेल असं ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी लिहिले की भारत त्याच्या लष्करी गरजांसाठी रशियावर दीर्घकाळ अवलंबून आहे आणि सध्या तो रशियाकडून ऊर्जेचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. ते रशियाकडून मोठ्या प्रमाणात लष्करी उपकरणे खरेदी करत आहेत आणि चीनसह ऊर्जेचा सर्वात मोठा खरेदीदार आहेत, अशा वेळी जेव्हा संपूर्ण जगाला रशियाने युक्रेनमध्ये हत्या थांबवावी असे वाटते, तेव्हा या सर्व गोष्टी चांगल्या नाहीत.

Donald Trump ने भारताला दिला मोठा धक्का; लावला 25% कर Read More »

rahul gandhi

Rahul Gandhi on PM Modi : इंदिरा गांधी सारखी हिम्मत असेल तर पंतप्रधानांनी ट्रम्प खोटे बोलत आहेत सांगावे; राहुल गांधींचे आव्हान

Rahul Gandhi on PM Modi: लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर होत असलेल्या चर्चेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी संसदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खोटे बोलत आहेत असे सांगावे असे आव्हान केले आहे. या चर्चेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, चूक सैन्याची नाही तर सरकारची होती. ट्रम्प यांनी 29 वेळा म्हटले आहे की आम्ही युद्ध थांबवले आहे. जर हिंमत असेल तर पंतप्रधानांनी सभागृहात सांगावे की ट्रम्प खोटे बोलत आहेत. जर त्यांच्यात इंदिरा गांधींच्या 50 टक्केही हिंमत असेल तर ते येथे सांगतील. असं राहुल गांधी म्हणाले. तसेच सरकारने सांगितले की ही कारवाई पहाटे 1.27 वाजेपर्यंत सुरू होती. पाकिस्तानला 1.35 वाजता फोनवरून माहिती देण्यात आली. ही माहिती थेट पाकिस्तानला का देण्यात आली? तुम्ही पाकिस्तानला सांगितले की तुम्हाला लढायचे नाही. सरकारने पाकिस्तानसमोर शरणागती पत्करली. आम्ही 30 मिनिटांत शरणागती पत्करली. सरकारकडे लढण्याची इच्छाशक्ती नव्हती. अशी टीका देखील राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केल. तर भारतीय सैनिक वाघ आहेत. वाघांना स्वातंत्र्य दिले पाहिजे. सैन्याच्या वापरासाठी इच्छाशक्ती आवश्यक आहे. जर सैनिकांना देशासाठी काम करायचे असेल तर त्यांना स्वातंत्र्य द्यावे लागेल. मी राजनाथ सिंह यांचे भाषण ऐकले. त्यांनी ऑपरेशन सिंदूरची तुलना 1971 शी केली. राहुल म्हणाले की, 1971 मध्ये सरकारकडे इच्छाशक्ती होती. 1971 मध्ये आम्ही अमेरिकेचे ऐकले नाही. असा टोला देखील राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लावला. मी पाकिस्तान आणि चीनला वेगळे ठेवण्याचे म्हटले होते. सरकारचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरले. खरी लढाई चीनशी होती. पहलगाम हल्ल्यामागे मुनीरचा हात होता. पाकिस्तान आणि चीनने हातमिळवणी केली. सरकारला वाटले की आपण पाकिस्तानशी लढत आहोत. प्रत्यक्षात आपण पाकिस्तान आणि चीन दोघांशीही लढत आहोत. असं देखील यावेळी राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi on PM Modi : इंदिरा गांधी सारखी हिम्मत असेल तर पंतप्रधानांनी ट्रम्प खोटे बोलत आहेत सांगावे; राहुल गांधींचे आव्हान Read More »

भारतातील परिस्थिती धक्कादायक, सोशल मीडियावर मात्र वेगळंच चित्र

Maharashtra Politics : देशात गेल्या अनेक दिवसांपासून धर्माचे तसेच जातीचे राजकारणात भर पडताना दिसत आहे.त्यामुळे आज भारत दोन वेगवेगळ्या वास्तवांमध्ये विभागला गेला आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर ग्लॅमरस, देशभक्तीचा उद्रेक, आर्थिक प्रगतीचे आकडे आणि सत्ताधाऱ्यांचे गोडवे दाखवणारी मंडळी आहे. तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर  शेती संकट, बेरोजगारी, महागाई, प्रशासनाचा ढिसाळपणा आणि नागरिकांच्या जीवनात आलेली अस्थिरता दिसून येत आहे. सोशल मीडियाचे स्वप्नील वास्तव आज सोशल मीडियावर “न्यू इंडिया”चे जे चित्र रंगवले जात आहे, त्यात भारताला एक विश्वगुरु, मजबूत आणि अस्मितेने भरलेला देश म्हणून सादर करण्यात येत आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूबवर देशाची प्रतिमा अतिशय सुंदर आणि सुव्यवस्थित दाखवली जात आहे. पंतप्रधानांचे भाषण, सरकारी योजनांचे व्हिडीओ, तरुणांनी यश मिळवलेले प्रेरणादायक क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या यंत्रणाही सोशल मीडियावर अग्रेसर असून विशिष्ट विचारसरणीचे ट्रेंड पुश करण्याचे काम नेटकेपणाने करत आहेत. यातच पारंपरिक मीडियाचा (विशेषतः टीव्ही न्यूज चॅनेल्सचा) सहभागदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. अनेक मुख्यधारेतील चॅनेल्स सत्तेच्या जवळ गेले असून विरोधकांच्या टीकेपेक्षा राष्ट्रवादाचे बेमालूम प्रदर्शन करण्यात अधिक रस घेतात. यातून निर्माण होणारी एक बाजू म्हणजे ‘सगळं काही ठिक आहे’ असा समज जनतेत रुजवला जातो. ग्रामीण व स्थानिक भारताचं वेगळं वास्तव पण या सर्व ग्लॅमरपलीकडे, जो माणूस खऱ्या अर्थाने भारताची नाडी सांगतो. तो सामान्य नागरिक त्याचं वास्तव खूप वेगळं आहे. ग्रामीण भागात अजूनही सिंचनासाठी पुरेशी पाणीव्यवस्था नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी केवळ कागदावरच आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत काम मिळवण्यासाठी कष्टकरी लोकांना महिनोंमहिने वाट पाहावी लागते. शहरांमध्येही परिस्थिती फार वेगळी नाही. लाखो शिक्षित युवक रोजगाराच्या शोधात आहेत, पण सरकारच्या आकड्यांमध्ये बेरोजगारी दर कमी असल्याचं भासवण्यात येतं. आरोग्य सेवा, शिक्षण व्यवस्था, महागाई, भ्रष्टाचार आणि प्रशासनाची उदासीनता ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या सगळ्याचे प्रतिबिंब मुख्यधारेतील मीडियात फारसे दिसत नाही. सत्य दडपण्याचे धोरण माहितीचा युगात माहितीचाच वापर करून सत्य लपवण्याचे तंत्र विकसित झाले आहे. सोशल मीडियावर जे चित्र दिसतं ते व्यवस्थेने तयार केलेलं आहे. प्रत्येक टीका ‘राष्ट्रद्रोह’ ठरवली जाते. ज्या पत्रकारांनी, समाजकर्मींनी, किंवा सामान्य नागरिकांनी वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. यामुळे एक प्रकारचं भयाचं वातावरण निर्माण झालं आहे. वाटचाल कोणत्या दिशेने? या साऱ्या परिस्थितीत प्रश्न असा उरतो की, देश कुठल्या दिशेने चाललाय? जर मिडिया आणि सोशल मीडियावरून मिळणारी माहिती खोटी, अपूर्ण किंवा व्यवस्थेनं नियंत्रित असेल, तर सामान्य माणसाला सत्य कसं कळणार? लोकशाहीची खरी ताकद ही मोकळ्या संवादात असते. पण आज तो संवादच एकसुरी आणि व्यवस्थानुरूप झाला आहे.

भारतातील परिस्थिती धक्कादायक, सोशल मीडियावर मात्र वेगळंच चित्र Read More »

भाजप पुन्हा मालामाल, मिळालेल्या सर्वाधिक देणग्या, 2,243 कोटी रुपये खात्यात जमा

BJP Donations in 2024 : केंद्रात सत्तेत असणारी भाजपला २०२३-२०२४ या वर्षात सर्वाधिक देणग्या मिळाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या आर्थिक वर्षात काँग्रेसला देखील मोठ्या प्रमाणात देणग्या मिळालेल्या आहे. एडीआरच्या अहवालात म्हटले आहे की घोषित देणगीच्या रकमेपैकी ८८ टक्के रक्कम भाजपच्या खात्यात गेली आहे. जे २,२४३ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याला २८१.४८ कोटी रुपये मिळाले आहेत. तर दुसरीकडे बसपाने त्यांच्या हिश्श्याला मिळालेल्या देणग्यांची रक्कम शून्य असल्याचे जाहीर केले आहे. हा अहवाल निवडणूक आयोगाला सादर केलेल्या आकडेवारीवर आधारित आहे, या आकडेवारीत २० हजार रुपयांपेक्षा जास्त राजकीय देणग्यांची माहिती देण्यात आली आहे. भाजपला सर्वाधिक देणग्या मिळाल्या२०२३-२४ या आर्थिक वर्षात भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक २,२४३ कोटी रुपयांपेक्षा जास्त देणगी मिळाली आहे, जी राष्ट्रीय राजकीय पक्षांमध्ये सर्वाधिक आहे. ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ (ADR) या निवडणुकीशी संबंधित संस्थेने त्यांच्या अहवालात ही माहिती दिली आहे. राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या एकूण घोषित देणग्यांची रक्कम २,५४४.२८ कोटी रुपये आहे, जी १२,५४७ देणगीदारांकडून मिळाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा हा आकडा १९९ टक्के जास्त आहे. एकूण घोषित देणग्यांपैकी ८८ टक्के देणग्या एकट्या भाजपकडे आहेत. काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली आणि त्यांना १,९९४ देणग्यांमधून २८१.४८ कोटी रुपये मिळाले, जे भाजपपेक्षा खूपच कमी आहे. इतर पक्षांची स्थितीआम आदमी पार्टी (आप), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) आणि नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीईपी) यांनी कमी रक्कम नोंदवली. भाजपच्या देणग्या अनेक पटींनी वाढल्याभाजपला मिळालेल्या देणग्या आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ७१९.८५८ कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये २,२४३.९४ कोटी रुपयांपर्यंत वाढल्या, ज्यामध्ये २११.७२ टक्के वाढ दिसून येते. त्याचप्रमाणे, काँग्रेसला मिळालेल्या देणग्या आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ७९.९२४ कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये २८१.४८ कोटी रुपयांपर्यंत वाढल्या, ज्यामध्ये २५२.१८ टक्क्यांची वाढ दिसून येते, असे अहवालात म्हटले आहे.

भाजप पुन्हा मालामाल, मिळालेल्या सर्वाधिक देणग्या, 2,243 कोटी रुपये खात्यात जमा Read More »

Maharani Laxmi Bai Medical College : शॉर्टसर्किटमुळे रुग्णालयात भीषण आग, 10 मुले जिवंत जाळली, 16 जखमी

Maharani Laxmi Bai Medical College : उत्तर प्रदेशातील झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या एनआयसीयू (नवजात अतिदक्षता विभाग) मध्ये शुक्रवारी भीषण आग लागली. त्यामुळे 10 मुलांचा मृत्यू झाला. अन्य 16 मुले जखमी झाली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अपघातानंतर घटनास्थळी आरडाओरडा आणि गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी रुग्ण इकडे तिकडे धावू लागले. कुटुंबातील सदस्य मुलांना हातात घेऊन धावताना दिसत होते. यावेळी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. आगीच्या वेळी एनआयसीयूमध्ये 54 मुलांना दाखल करण्यात आले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. रुग्णालयातून 37 मुलांची सुटका करण्यात आली. आग लागली तेव्हा रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये 54 रुग्ण दाखल होते. डीएम अविनाश कुमार यांनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. आग कशी लागली याचा तपास करण्यात येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 12 तासांत अहवाल मागवलाउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही घटना हृदयद्रावक असल्याचे म्हटले आहे. जखमींवर चांगले उपचार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त आणि डीआयजींकडून 12 तासांत अहवाल मागवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक आणि आरोग्य सचिव पार्थ सारथी सेन शर्मा मदतकार्यात समन्वय साधण्यासाठी झाशीला पोहोचले आहेत. बचाव आणि मदत कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी डीएम, एसएसपी आणि डीआयजी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात पोहोचले. जखमी 16 मुलांची प्रकृती चिंताजनकएसएसपी सुधा सिंह यांनी सांगितले की, 16 जखमी मुलांवर उपचार सुरू आहेत. त्याचा जीव वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व डॉक्टर आणि पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. कोणाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला याची सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली आहे. आग लागल्यानंतर काही पालक आपल्या मुलांना घरी घेऊन गेल्याचीही माहिती मिळाली आहे. पंतप्रधानांनी घोषणा केली – मृत मुलांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये मिळणारझाशी मेडिकल कॉलेजला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृत मुलांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची एक्स-ग्रेशिया रक्कम जाहीर केली आहे. जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

Maharani Laxmi Bai Medical College : शॉर्टसर्किटमुळे रुग्णालयात भीषण आग, 10 मुले जिवंत जाळली, 16 जखमी Read More »

Sanjay Raut On PM Modi : ‘आम्ही आमचा रिमोट कंट्रोल दिला नाही, म्हणून…’ PM मोदींना संजय राऊतांचे प्रत्युत्तर

Sanjay Raut On PM Modi : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या शेवटच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तर आता या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत (ठाकरे गट) यांनी प्रत्युत्तर दिला आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की,महाराष्ट्रातील जनतेचा पंतप्रधानांच्या वक्तव्यावर विश्वास नाही. ही महाविकास आघाडी आहे. महाराष्ट्रात आम्ही तिघे एकत्र आहोत आणि तुमच्यापेक्षा सुरक्षित आहोत. पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या टिप्पणीवर त्यांनी पलटवार केला आणि रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात आहे हे जनता ठरवेल असे म्हटले. मुंबईतील एका सभेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले होते की, महाविकास आघाडीच्या एका पक्षाने आपला रिमोट कंट्रोल काँग्रेसकडे सोपवला आहे. त्याचा संदर्भ उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे होता. त्यावर संजय राऊत म्हणाले की, शिवसेना फोडून तुम्ही जो वेगळा गट स्थापन केला आहे, त्याचे नियंत्रण तुमच्या हातात असेल, मात्र आम्ही आमचा रिमोट कंट्रोल भाजपकडे सोपवला नाही, त्यामुळे पंतप्रधान मोदी संतापले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीतसंजय राऊत म्हणाले, जोपर्यंत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रश्न आहे, मी यापूर्वीही म्हटले आहे की 23 नोव्हेंबरनंतर कोणतीही महाआघाडी होणार नाही कारण मुख्यमंत्री नसतील. ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणार नाही. त्यांना विरोधी पक्षनेतेपदही दिले जाणार नाही, कारण भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत केले आहे. राऊत म्हणाले, निवडणुकीनंतर आम्ही सरकार स्थापन करत आहोत. महायुतीला बहुमत मिळणार नाही. काय म्हणाले पीएम मोदी?गुरुवारी जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, मुंबई हे स्वाभिमानी शहर आहे, मात्र महाविकास आघाडीत समाविष्ट असलेल्या एका पक्षाने आपला रिमोट कंट्रोल बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करणाऱ्यांच्या हाती दिला आहे. मोदी म्हणाले, म्हणून मी त्यांना आव्हान दिले की, त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे गुणगान काँग्रेसला करावे. आजपर्यंत या लोकांना बाळासाहेबांची स्तुती करायला काँग्रेस आणि त्यांचे राजपुत्र जमले नाही. काँग्रेस सत्तेसाठी हतबल असून हा पक्ष पाण्याविना माशासारखा आहे, असे ते म्हणाले.

Sanjay Raut On PM Modi : ‘आम्ही आमचा रिमोट कंट्रोल दिला नाही, म्हणून…’ PM मोदींना संजय राऊतांचे प्रत्युत्तर Read More »

PM Modi : शेतकऱ्यांना 15 हजार रुपये मिळणार, नाशिकमधून नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. नाशिक येथे आयोजित एका जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. या सभेत बोलताना त्यांनी वीर सावरकर यांना काँग्रेसचे युवराज संपूर्ण देशात फिरून शिव्या देतात मात्र सावरकर यांचा वारसा जपण्याचा दावा करणारे आज काँग्रेससोबत आहे. असं देखील नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच आमची सरकार आली तर राज्यातील शेतकऱ्यांना 12 ऐवजी 15 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार असल्याची घोषणा देखील मोदींनी नाशिकमधून केली. तर राज्यातील अनेक विकास कामे थांबवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीची सरकार आणा असा आवाहन देखील त्यांनी केला. पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, जर राज्यात महाविकास आघाडीची सरकार आली तर राज्यात सुरु असणारी लाडकी बहिण योजना बंद होणार असा दावा देखील त्यांनी केला. राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे.

PM Modi : शेतकऱ्यांना 15 हजार रुपये मिळणार, नाशिकमधून नरेंद्र मोदींची मोठी घोषणा Read More »

Rahul Gandhi : ‘भाजप आणि पंतप्रधानांना कोण घाबरत नाही’, राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

Rahul Gandhi : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत.   रविवारी टेक्सास विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी आरएसएस आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला.   राहुल गांधी म्हणाले, ‘आरएसएसचा विश्वास आहे की भारत ही एक कल्पना आहे आणि आम्ही मानतो की भारत हा अनेक विचारांचा देश आहे. आम्हाला विश्वास आहे की प्रत्येकाला सहभागी होण्याची परवानगी दिली पाहिजे, स्वप्न पाहण्याची परवानगी दिली पाहिजे आणि त्यांची जात, भाषा, धर्म, परंपरा किंवा इतिहास याची पर्वा न करता त्यांना स्थान दिले पाहिजे. हा लढा आहे आणि हा लढा निवडणुकीत अधिक स्पष्ट झाला जेव्हा भारताच्या कोट्यवधी जनतेला स्पष्टपणे समजले की भारताचे पंतप्रधान भारतीय संविधानावर हल्ला करत आहेत. राहुल गांधी अमेरिकेत काय म्हणाले? ते पुढे म्हणाले, ‘मी तुम्हाला जे काही सांगितले ते संविधानात आहे. आधुनिक भारताचा पाया संविधान आहे. निवडणुकीत लोकांना जे स्पष्टपणे समजले आणि मी पाहिले की मी संविधानाचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा लोकांना मी काय म्हणतो ते समजले. भाजप आमच्या परंपरेवर हल्ला करत आहे, आमच्या भाषेवर हल्ला करत आहे, आमच्या राज्यांवर हल्ला करत आहे, आमच्या इतिहासावर हल्ला करत आहे, असे ते सांगत होते. ‘भाजपला हे सहन होत नाही’ राहुल गांधी पुढे म्हणाले, ‘सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना जे समजले ते म्हणजे जो कोणी भारतीय संविधानावर हल्ला करत आहे तो आपल्या धार्मिक परंपरेवरही हल्ला करत आहे. म्हणूनच संसदेतील माझ्या पहिल्या भाषणात जेव्हा मी अभयमुद्राचे वर्णन केले तेव्हा तुमच्या लक्षात आले असेल की ते निर्भयतेचे प्रतीक आहे आणि ते प्रत्येक भारतीय धर्मात आहे. मी हे सांगत होतो तेव्हा भाजपला ते सहन होत नव्हते. त्यांना समजत नाही आणि आम्ही त्यांना समजावणार आहोत. ‘भाजपची भीती नाहीशी झाली’ भाजपवर निशाणा साधत विरोधी पक्षनेते म्हणाले, ‘दुसरी गोष्ट घडली ती म्हणजे भाजपची भीती नाहीशी झाली. निवडणूक निकालानंतर लगेचच, काही मिनिटांतच, भारतात कोणीही भाजप किंवा भारताच्या पंतप्रधानांना घाबरत नाही, हे आपण पाहिले. त्यामुळे हे मोठे यश आहे, राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्षाचे नाही. लोकशाही समजून घेणाऱ्या भारतीय जनतेचे हे मोठे यश आहे, ज्यांना हे समजले आहे की आम्ही आमच्या संविधानावर हल्ला स्वीकारणार नाही. आमच्या धर्मावर, राज्यावर झालेला हल्ला आम्ही मान्य करणार नाही. भारत जोडो यात्रेवर काय म्हणाले? राहुल गांधी म्हणाले, ‘भारत जोडो यात्रेने माझ्या कामाबद्दल विचार करण्याची पद्धतच बदलली. मी म्हणेन की राजकारणाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन, आमच्या लोकांकडे पाहण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा आणि त्यांचे ऐकण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. या प्रवासात फक्त मीच नाही तर अनेकांचा सहभाग होता.

Rahul Gandhi : ‘भाजप आणि पंतप्रधानांना कोण घाबरत नाही’, राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल Read More »

Uddhav Thackeray: ‘हिंदूंना वाचवण्यासाठी बांगलादेशात जा’, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला

Uddhav Thackeray: शिवसेना प्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर  माध्यमांशी बोलताना बांगलादेश हिंसाचार प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र  मोदींवर निशाणा साधला.   पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा मणिपूरला जाऊ शकत नाहीत, पण जर ते बांगलादेशला जाऊ शकत असतील तर त्यांनी जावे… युक्रेनने युद्धप्रमाने बांगलादेशातील हिंसाचार त्यांनी थांबवावा.   ते पुढे म्हणाले की, आज बांगलादेशात जे काही घडत आहे, ती सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे. जनतेचा निर्णय सर्वोच्च आहे. ‘पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी बांगलादेशला जावे’ उद्धव ठाकरे म्हणाले, “बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत, त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारची आहे. PM मोदी आणि अमित शाह जी मणिपूरला जात नाहीत, पण जर ते बांगलादेशला जाऊ शकत असतील तर त्यांनी जावे… बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवणे आणि त्यांचे संरक्षण करणे हे मोदीजींचे काम आहे, भारत सरकारचे काम आहे.  ज्या भारत सरकारने बांगलादेशला इंदिरा गांधींनी स्वातंत्र्य दिले होते आणि त्याच बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असतील तर ते थांबवण्याची संपूर्ण जबाबदारी भारताच्या पंतप्रधानांची आहे. हिंदूंना वाचवणे हे भारत सरकारचे काम हिंसाचार भडकल्यानंतर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना बांगलादेश सोडून भारतात आल्या आहेत. शेख हसीना यांना भारत सरकारकडून सुरक्षा पुरवली जात आहे. यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे यांनी  जर भारत सरकार शेख हसीना यांना सुरक्षा देत असेल तर त्यांनी बांगलादेशातील हिंदूंनाही संरक्षण द्यावे, अशी मागणी केली. वृत्तानुसार, बांगलादेशमध्ये अनेक हिंदू मंदिरे, घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांची तोडफोड करण्यात आली आहे. शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाशी संबंधित किमान दोन हिंदू नेत्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. काही ठिकाणी समाजकंटक हिंदूंना टार्गेट करत आहेत. बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमधील कोटा पद्धतीच्या विरोधात झालेल्या हिंसाचारानंतर शेख हसीना यांनी सोमवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. वृत्तानुसार, बांगलादेशातून भारतात आलेल्या शेख हसीना यांना धक्का बसला आहे. बांगलादेशातील राजकीय गोंधळामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचा संशय आहे. भारत या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून बांगलादेश सोडून भारतात आल्या आहेत. सोमवारी त्यांचे लष्करी विमान उत्तर प्रदेशातील हिंडन एअरबेसवर उतरले. हिंडन एअरबेस भारतीय हवाई दलाच्या नियंत्रणाखाली आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी गरुड कमांडो तैनात आहेत. शेख हसीना काही दिवस भारतात राहतील आणि नंतर दुसऱ्या देशात आश्रय घेऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे.

Uddhav Thackeray: ‘हिंदूंना वाचवण्यासाठी बांगलादेशात जा’, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला Read More »