DNA मराठी

Maratha Reservation

Maratha Reservation: बारा बाभळी मदरसा परिसरात मनोज जरांगे पाटील यांची सभा! जाणुन घ्या संपूर्ण कार्यक्रम

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणी करिता आमरण उपोषणसाठी लवकरच मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये दाखल होणार आहे. आरक्षणासाठी पाटील पायी मुंबईला जाणार आहे. या वारीचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे. पाटील 20 जानेवारी 2024 ला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटी येथून या वारीची सुरुवात करणार आहे.  तर अहमदनगर जिल्ह्यात 21 जानेवारी रोजी ही वारी दाखल होणार आहे. अहमदनगर शहराच्या नजीक असणाऱ्या बारा बाभळी मदरसा परिसरात पाटील यांचा रात्री मुकाम असणार आहे.  तर याच ठिकाणी पाटिल एक सभा देखील घेणार असून या सभेमध्ये तब्बल 20 ते 25 लाख लोक सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे. पाटील यांच्यासोबत असणाऱ्या नागरिकांच्या चहा पाण्याची , नाश्त्याची तसेच जेवणाची उत्तम व्यवस्था देखील करण्यात आली आहे.  पाटील यांच्या होणाऱ्या सभामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असा आवाहन संघटनेकडून करण्यात आला आहे.

Maratha Reservation: बारा बाभळी मदरसा परिसरात मनोज जरांगे पाटील यांची सभा! जाणुन घ्या संपूर्ण कार्यक्रम Read More »

Maratha Reservation: मराठ्यांना न्याय मिळेल? मनोज जरांगे पाटील तयार! असं आहे संपूर्ण वेळापत्रक

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उद्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होणार आहे.  मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी 23 डिसेंबर 2023 रोजी सरकारने मराठ्यांना 20 जानेवारीपर्यंत कुणबी आरक्षण दिले नाहीतर मुंबईत उपोषण करणार असल्याची घोषणा केली होती.  मात्र अद्याप मराठा समाजाला आरक्षण मिळाला नसल्याने पाटील उद्यापासून उपोषणासाठी मुंबईकडे रवाना होणार आहे. काही दिवसापूर्वी सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकामध्ये आरक्षणाबाबत काहीच तोडगा निघाला नसल्याने पाटील यांनी चर्चा नाही तर कृती करा अशी घोषणा केली होती. चला मग या लेखात जाणुन घ्या मनोज जरांगे पाटील यांचे मुंबई दौऱ्याचे वेळापत्रक कसं असणार आहे.  संपूर्ण वेळापत्रक मुंबई दौऱ्यासाठी 20 जानेवारी रोजी अंतरवाली सराटीतून सकाळी नऊ वाजता पायी यात्रेला सुरुवात होणार आहे.  दुपारचे जेवण कोळगाव (ता. गवराई) येथे होईल तर मातोरी (ता. शिरूर) येथे रात्रीचा मुक्काम व जेवण असेल. (बीड जिल्हा) 21 जानेवारी मातोरीतून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल.   तनपुरवाई (ता. पाथर्डी) येथे दुपारचे जेवण तसेच बाराबाभळी-कारंजी बाट (ता, नगर) येथे रात्रीचा मुक्काम व जेवण असेल. 22 जानेवारी बाराबाभळीतून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल.    दुपारी जेवण येथे सुपा (ता. पारनेरे) व रांजणगाव (ता. शिरूर) येथे मुक्काम व रात्रीचे जेवण होईल. (जिल्हा पुणे) 23 जानेवारी रांजणगावातून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल.    दुपारचे जेवण कोरेगाव भिमा येथे व चंदनगर खराडी बायपास येथे मुक्काम व रात्रीचे जेवण होईल. (जिल्हा पुणे) 24 जानेवारी चंदननगर, खराडी बायपास येथून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल.  तसेच तळेगाव दाभाडे येथे दुपारी जेवण व लोणावळ्यात मुक्काम होईल. (पुणे जिल्हा) 25 जानेवारी  लोणावळ्याहून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल. त्यानंतर पनवेल (ता.नवी मुंबई) येथे दुपारी जेवण व वाशी येथे मुक्काम आणि रात्रीचे जेवण होईल. (ठाणे – नवी मुंबई)  26 जानेवारी वाशीतून सकाळी 8 वाजता नाष्टा करून पुढच्या प्रवासाला निघणार असून त्यानंतर थेट आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. यानुसार सगळीकडे मराठा बांधवांच्या वतीने तयारी सुरू आहे.

Maratha Reservation: मराठ्यांना न्याय मिळेल? मनोज जरांगे पाटील तयार! असं आहे संपूर्ण वेळापत्रक Read More »

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या आंदोलनाची सरकारला धास्ती? सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू

Maratha Reservation : आरक्षणासाठी आता मराठा समाजाकडून आंदोलन आणखी तीव्र होताना दिसत आहे. 20 जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील मुंबईपर्यंत पायीवारी करुन अमरण उपोषण करणार आहे.  पाटील यांच्यासोबत या वारीमध्ये वीस ते पंचवीस लाख लोकांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. यामुळे सरकार जरांगेंची समजूत काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केल्याची माहिती मिळत आहे.   समोर आलेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहे. यामुळे येत्या काही दिवसात राज्य सरकार मराठा आरक्षणावर वेळी तोडगा काढणार असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे पाटील यांना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही. सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा जरांगेंच्या भेटीला सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आज गेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या शिष्टमंडळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ओएसडी मनोज चिवटे आणि बच्चू कडू यांचा समावेश आहे.

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या आंदोलनाची सरकारला धास्ती? सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू Read More »

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील 21 जानेवारीला अहमदनगर शहरात, जाणुन घ्या संपुर्ण रूट

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणी करिता आमरण उपोषणसाठी लवकरच मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये दाखल होणार आहे. आरक्षणासाठी पाटील पायी मुंबईला जाणार आहे. या वारीचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे. पाटील 20 जानेवारी 2024 ला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटी येथून या वारीची सुरुवात करणार आहे.  तर अहमदनगर जिल्ह्यात 21 जानेवारी रोजी ही वारी दाखल होणार आहे. जिल्ह्यात या वारीचा मुक्काम बाराबाभळी मदरसा येथे असणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातून या वारीमध्ये तब्बल तीन ते चार लाख लोकांचा सहभाग राहणार असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली.  ही वारी अहमदनगर शहरातून भिंगार माळीवाडा बस स्टँड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळायला पुष्पहार अर्पण करून केडगाव मार्गे पुणेकडे जाणार आहे.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील 21 जानेवारीला अहमदनगर शहरात, जाणुन घ्या संपुर्ण रूट Read More »

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील मुंबई दौऱ्यासाठी सज्ज! कोहिनूर मंगल कार्यालयमध्ये बैठक; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावा या मागणी करिता आमरण उपोषणासाठी पायी मुंबईला जाणार आहे.  मनोज जरांगे पाटील या दौऱ्यात अहमदनगर मार्गे मुंबईला जाणार असल्याने आज शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयमध्ये संघटनेकडून जिल्हा नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून अनेकांनी सहभाग नोंदवला.  मनोज जरांगे पाटील यांच्यासह मुंबईला जाणाऱ्यांसाठी श्रीरामपूर तालुक्याकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती संघटने करून देण्यात आली आहे. याच बरोबर इतर तालुके देखील अनेक प्रकारे मदत करणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढण्याची तयारी करणार असल्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे.   या पायी दिंडीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत अंदाजे 25 ते 30 लाखा नागरिक असणार आहे. ही पायी दिंडी पाथर्डी, अहमदनगर शहर मार्गे पुणेकडे जाणार आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील मुंबई दौऱ्यासाठी सज्ज! कोहिनूर मंगल कार्यालयमध्ये बैठक; घेतला ‘हा’ मोठा निर्णय Read More »

Maratha Reservation : …. तर मराठे अयोध्येला जाणार, ‘त्या’ प्रकरणात मनोज जरांगे यांचं मोठे वक्तव्य

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील आता मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये उपोषण करणार आहे मात्र त्यापूर्वी जरांगे पाटील यांनी अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराबाबत मोठे वक्तव्य केले आहे.  ते म्हणाले, मराठ्यांना आरक्षण मिळाल्यास ते नक्कीच अयोध्येला जातील. 22 जानेवारी रोजी राम मंदिराचा उत्सव करणार. जालन्यातील अंतरवली गावात पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी ही प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, मराठ्यांना ओबीसीमध्ये तातडीने आरक्षण देण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींकडे केली आहे. 20 जानेवारीपर्यंत राज्य सरकारसाठी चर्चेचे दरवाजे खुले असून मध्यंतरी बाहेर पडलो तर सरकारसाठी चर्चेचे दरवाजे बंद केले जातील, त्यानंतर कोणतीही चर्चा होणार नाही, असा अल्टिमेटम त्यांनी दिला. मराठा आंदोलनात अडचण निर्माण होईल असे कोणीही करू नये, त्यांनी शांततेने आंदोलन करावे, असेही ते म्हणाले. सरकारने आम्हाला रोखले तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुंबईतील त्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्या दारात धरणे आंदोलन करू, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, आता मराठा कुळातील असल्याचे पुरावे ट्रकभर सापडले आहेत, मग आरक्षण द्यायला काय हरकत आहे? मराठ्यांनी तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? महाराष्ट्रातील मराठा समाज शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी करत आहे. गेल्या महिन्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी नऊ दिवसांचे बेमुदत उपोषण संपवले. तेव्हा राज्य सरकारने दोन महिन्यात समाजाला आरक्षणाचा लाभ देण्याचे आश्वासन दिले होते.  मात्र, योग्य ती पावले न उचलल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा जरांगे यांनी दिला होता. दोन महिन्यांत मराठा आरक्षणाबाबत निर्णय न झाल्यास मुंबईवर मोठा मोर्चा काढणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले होते.

Maratha Reservation : …. तर मराठे अयोध्येला जाणार, ‘त्या’ प्रकरणात मनोज जरांगे यांचं मोठे वक्तव्य Read More »

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी ‘या’ मार्गाने मुंबईकडे जाणार मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील आता समाजाला आरक्षण मिळावा या मागणी करिता आमरण उपोषणासाठी पायी मुंबईला जाणार आहे.  या पायी दिंडीमध्ये मनोज जरांगे पाटील अहमदनगर मार्गे मुंबईला जाणार आहे. या पायी दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांचे राहण्याची सोय अहमदनगर शहरातील आलमगीर परिसरामध्ये असणाऱ्या दारूर उमुल मदरासाच्या जमिनीवर तसेच कृषी बाजार समिती येथे करण्यात आल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे.  या पायी दिंडीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत अंदाजे 25 ते 30 लाखा नागरिक असणार असल्याची माहिती देखील संघटने करून देण्यात आली आहे.  ही पायी दिंडी पाथर्डी, अहमदनगर शहर मार्गे पुणेकडे    जाणार आहे.

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी ‘या’ मार्गाने मुंबईकडे जाणार मनोज जरांगे पाटील Read More »

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर खासदार विखेंचे मोठे विधान! म्हणाले,ओबीसी समाज……

Maratha Reservation: राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून राजकारण तापले आहे.  यातच मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा लढा तीव्र केला आहे. आणि सरकारला दिलेली डेडलाईन बदलली जाणार नाही अशी देखील भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात राजकारण तापण्याची शक्यता आहे.   या वर खासदार सुजय विखे यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की, चर्चेनेच विषय मार्गे लागणार आहे. तसेच मराठा समाजाने देखील संयम दाखवला आहे. त्याचबरोबर सरकार देखील याबाबत सकारात्मक आहे.  त्यामुळे कोणत्याही निकषापर्यंत येण्याऐवजी आणखी काही कालावधी आहे. ओबीसी समाज असो अथवा मराठा समाज या दोन्हीही समाजाच्या भावना लक्षात घेत दोन्ही समाजाचे हित जोपासण्याचा काम राज्य सरकारकडून केलं जाईल अशी प्रतिक्रिया खासदार सुजय विखे यांनी दिली. सरकारला 24 डिसेंबरची डेडलाईन मराठा आरक्षणसाठी मनोज जरांगे यांच्याकडून देण्यात आली आहे. मात्र डेडलाईन जवळ आली असता देखील कोणत्याही हालचाली करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे जरांगे यांनी देखील सरकारला इशारा दिला आहे.  जरांगे पुन्हा आक्रमक मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आणि मराठा समाजाच्यावतीने सरकारला दिलेली डेडलाईन दोन दिवसांवर आली आहे. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत 24 डिसेंबर असून, त्यानंतर आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्याच्या भूमिकेवर जरांगे ठाम असल्याचे दिसून येत आहे.  दरम्यान पुन्हा एकदा जरांगेंनी आज माध्यमांशी बोलताना देखील दिलेल्या तारखेनंतर आमचं आंदोलन शांततेत होणार आणि आरक्षणाचा मुद्दा अग्रस्थानी ठेवूनच चर्चा करणार, असं म्हटलं आहे.

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर खासदार विखेंचे मोठे विधान! म्हणाले,ओबीसी समाज…… Read More »