DNA मराठी

Maharashtra

Weather Update  : तापमानात वाढ मात्र थंडी कायम! जाणून घ्या, लेटेस्ट अपडेट्स

Weather Update :  राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून थंडीचा दडपण कायम आहे. मात्र गेल्या 24 तासांत राज्यातील बहुतांश भागात थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात आता किमान तापमानात वाढ झाली आहे आणि हीच स्थिती पुढील आठवड्यापर्यंत कायम राहणार असल्याचा दावा हवामान खात्याने केला आहे.   तर दुसरीकडे फेब्रुवारीच्या सुरुवातीला राज्यात पुन्हा एकदा कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात किंचित चढ-उतार अपेक्षित आहे. दुसरीकडे, डोंगराळ भागात झालेल्या नव्या हिमवृष्टीमुळे उत्तर भारतात हाडांना गारवा देणारी थंडी जाणवत आहे. त्याचा परिणाम लवकरच महाराष्ट्रातही दिसून येईल.  गेल्या दोन-तीन दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात रात्रीचे तापमान 10 अंशांच्या खाली नोंदवले गेले. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी किमान तापमान 10.8 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने जळगाव हे राज्यातील सर्वात थंड ठिकाण ठरले. यानंतर विदर्भातील चंद्रपूरमध्ये पारा 11 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. तर, मुंबईबद्दल बोलायचे झाल्यास, कुलाबा हवामान केंद्रात किमान तापमान 20.7 अंश तर सांताक्रूझ येथे 17.9 अंश नोंदवले गेले. पुण्यातही थंडीचा कडाका कमी झाला असून रात्रीचा पारा 13.3 अंशांवर घसरला असून कमाल तापमान 31 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात थंडी कमी झाली आहे. मात्र, 1 आणि 2 फेब्रुवारीच्या सुमारास पुन्हा तापमानात मोठी घसरण होईल आणि रात्री थंडीत लक्षणीय वाढ होईल, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेषत: महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात कडाक्याची थंडी पडणार असून पारा एकेरी अंकांमध्ये नोंदवला जाईल. या काळात पुणे, नाशिक, जळगाव, धुळे आदी ठिकाणी तापमान 10 अंशांच्या खाली जाऊ शकते. त्यानंतर पुण्याचे किमान तापमान 9 अंशांवर तर नाशिकचे किमान तापमान 8 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. IMD-पुणेच्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांच्या म्हणण्यानुसार, किमान तापमानातील घसरण 29 जानेवारीनंतर सुरू होऊ शकते आणि ती दोन-तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यात थंडी वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स. हवामान अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 29 जानेवारीपासून आकाश निरभ्र राहील आणि थंड उत्तरेचे वारे राज्याच्या काही भागात ठोठावतील. 3 फेब्रुवारीनंतर किमान तापमानात पुन्हा वाढ होऊन राज्यात थंडी कमी होईल. वास्तविक, हवामानातील हा बदल वाऱ्याच्या स्वरूपातील बदलामुळे होईल. यानंतर महाराष्ट्रात पुन्हा उत्तरेचे वारे येणार नाहीत, अशी शक्यता आहे. दुसऱ्या हवामान शास्त्रज्ञाने सांगितले की, महाराष्ट्रात जानेवारीत, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये नव्हे तर दोन महिन्यांच्या विलंबानंतर तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरला. मात्र, राज्यातील बहुतांशी हिवाळा संपला आहे. महाराष्ट्रात साधारणपणे 15 फेब्रुवारीपर्यंत रात्रीचे तापमान कमी होते. 15 फेब्रुवारीनंतर वसंत ऋतु सुरू होतो. तथापि, मजबूत वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, फेब्रुवारीच्या मध्यानंतरही किमान तापमानात घट होऊन राज्यात थंडी जाणवू शकते.

Weather Update  : तापमानात वाढ मात्र थंडी कायम! जाणून घ्या, लेटेस्ट अपडेट्स Read More »

Maharashtra News : भाजप पुन्हा देणार अनेकांना धक्का! शिंदे अपात्र ठरल्यास, कोण होणार मुख्यमंत्री?

Maharashtra News:  आज दुपारी चार वाजता महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राज्यातील राजकारणाचा सर्वात मोठा निर्णय देणार आहे. दुपारी चार वाजता विधानसभा अध्यक्ष शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात आपला निकाल देणार आहे. या निकालावर एकनाथ शिंदे यांच्या सरकारचं भवित्व अवलंबून आहे. यामुळे या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. जर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवलं तर राज्याचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र सध्या  सरकारला कोणताही धोका नाही असं सांगितलं जात आहे.  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी बोलताना निर्णय काहीही आला तरी आमचं सरकार स्थिर राहील अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आला आहे. यामुळे भाजपकडे बी प्लॅन रेडी असल्यास बोललं जात आहे.  आगामी विधानसभा निवडणुका पाहता भाजप पुन्हा एकदा अनेकांना धक्का देण्याची तयारी करत असल्यास राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. यामुळे जर आज एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर अजित पवार यांना भाजप मुख्यमंत्री पद देऊ शकते अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे.  भाजप युतीकडे बहुमत आहे.अजित पवारांचा गट देखील आता भाजपसोबत आला आहे. अजित पवार यांच्याकडे 40 आमदार असल्याचं देखील बोललं जात आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत भाजपने 105 जागा जिंकले होते. त्यात आता अजित पवार गट आणि इतर काही अपक्ष आमदार यांची बेरीज केल्यास भाजपकडे पुन्हा एकदा बहुमत सिद्ध होईल.

Maharashtra News : भाजप पुन्हा देणार अनेकांना धक्का! शिंदे अपात्र ठरल्यास, कोण होणार मुख्यमंत्री? Read More »

Maharashtra Politics : शिंदे की ठाकरे? सत्ता संघर्षात  कोण मारणार बाजी

Maharashtra Politics: आज महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मागच्या दीड वर्षापासून चर्चेत असणारा शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर निर्णय घेणार आहे. विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण देशाच्या लक्ष लागला आहे.  या निर्णयावर एकनाथ शिंदे यांची सरकार राज्यात राहणार की जाणार याचा देखील निर्णय आज होणार आहे. यामुळे राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे.  20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40  आमदारासह बंड केले होते ज्यामुळे राज्यात असणारी ठाकरे सरकार कोसळली होती. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपला बरोबर घेत राज्यात सरकार स्थापित केली होती.   मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला होता.  यासाठी त्यांनी 31 डिसेंबर 2023 ची डेटलाईन दिली होती मात्र त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवसांची मुदत दिली होती जी आज संपत आहे. तर दुसरीकडे सरकारला कोणताही धोका नसल्याचं भाजपकडून सांगितलं जातय. उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय काहीही आला तरी आमचं सरकार स्थिर राहील अशी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांची सुनावणी घेतली आहे. कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा झालेली आहे. अपात्रतेशी संबंधित याचिकेवर आज संध्याकाळी 4 पर्यंत येऊ शकतो. कायदेतज्ज्ञांनुसार शिंदे गटाविरोधात निकाल गेल्यास मुख्यमंत्री शिंदे, त्यांच्या गटातील मंत्री आणि आमदारांना तातडीनं राजीनामा द्यावा लागेल.   भाजप युतीकडे बहुमत असेल. काही महिन्यांपूर्वीच अजित पवारांचा गट भाजपसोबत आला आणि सत्तेत सहभागी झाला. आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा अजित पवारांचा दावा आहे. विधानसभेच्या एकूण 288 जागा आहे. बहुमतासाठी 145 आमदारांचा पाठिंबा गरजेचा असतो.

Maharashtra Politics : शिंदे की ठाकरे? सत्ता संघर्षात  कोण मारणार बाजी Read More »

Maharashtra News:  गुटखा विक्री करणाऱ्या 3 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Maharashtra News: राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेली सुगंधी तंबाखु, पानमसाला व गुटखा विक्री करणाऱ्या 3 आरोपींना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने 12,40,000 रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे.  अहमदनगर पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.  पोनि दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, शाहरुख शहा, नदीम शेख व रिजवान शेख (सर्व रा. वार्ड नं.2, ता. श्रीरामपूर) हे त्यांचा हस्तक दानिश सय्यद रा. वार्ड नं.2, ता. श्रीरामपूर व त्याचा साक्षीदार यांचे मार्फतीने सुगंधीत तंबाखु, पानमसाला व गुटखा राजु शेख व वसीम (रा. बीड) यांचेकडुन खरेदी करुन बीड जामखेड मार्गे अहमदनगर शहरात येणार आहे.  या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिचोंडी पाटील येथे सापळा लावून आरोपींना अटक केली आहे. पोलीसांनी या कारवाईत विविध प्रकारची सुगंधी तंबाखु, गुटखा, पानमसाला, एक अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो व एक टाटा इंडीगो कार असा एकुण  12,40,000 रुपये किंमतीचे मुद्देमालासह जप्त केला आहे.  शिवाजी अशोक ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये भादविक 328, 188, 272, 273, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशिर कारवाई नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.

Maharashtra News:  गुटखा विक्री करणाऱ्या 3 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई Read More »

Chhatrapati Sambhajinagar: धक्कादायक! कारखान्याला भीषण आग, सहा मजुरांचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज मिडक येथील एका कारखान्यात काल रात्री भीषण आग लागली.  या अपघातात सहा मजुरांचा मृत्यू झाला. व्हॅलुज इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये हातमोजे तयार करणाऱ्या सनशाईन एंटरप्रायजेसने मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली.  आग इतकी तीव्र होती की संपूर्ण कंपनी उध्वस्त झाली. अग्निशामक ब्रिगेडला आग विझवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. या आगीमध्ये सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की फॅक्टरीला वाळूज मिडीसी क्षेत्रात आग लागली. रात्री आग लागली तेव्हा कंपनी बंद झाली होती. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक वाहने घटनास्थळी पाठविली गेली. परंतु जेव्हा बचाव कर्मचारी अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचले तेव्हा सर्व काही संपले. असे सांगितले जात आहे की मृतदेह जाळले गेले नाहीत, म्हणून प्रारंभिक अंदाज असा आहे की धुरामुळे कामगार गुदमरल्यासारखे मरण पावले असते. पोलिस आयुक्त मनोज लोहिया म्हणाले, रात्री 1. 15 वाजता छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज मिडीसी भागात कंट्रोल रूममध्ये कंट्रोल रूमची नोंद झाली. रात्री पोलिस एसीपी घटनास्थळी पोहोचले. तपासणी पूर्ण झाल्यानंतर पुढील माहिती उघडकीस येईल. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मृत मुश्ताक शेख (वय 65), कौशर शेख (वय 32), इक्बाल शेख (वय 18), काकांजी (वय 55), रियाझभाई (वय 32), मार्गम शेख (वय 33 वर्षे वय 33 वर्षे) ) घडले. तथापि, मृत व्यक्ती तिथे अडकला की झोपला होता हे अद्याप स्पष्ट झाले नाही. माहिती प्राप्त होताच अग्निशमन दलाने त्वरित घटनास्थळी पोहोचली. ज्या ठिकाणी हे लोक अडकले होते तो रस्ता पूर्णपणे ज्वालांमध्ये गुंतला होता. अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी आग विझविली, परंतु धूर आणि उष्णता इतकी जास्त होती की ते त्वरित वर जाऊ शकले नाहीत. यानंतर शीतकरण ऑपरेशन झाले. यानंतर, ते काळजीपूर्वक वरच्या मजल्यावर पोहोचला. जिथे त्यांना खोलीत हृदय -विखुरलेले दृश्य पाहिले. त्या खोलीत सहा लोक मरण पावले होते. त्यात एक कुत्रा देखील होता.  अधिकाऱ्यांनी सांगितले की ही आग कारखान्याच्या आसपास होती आणि हे लोक पहिल्या मजल्याच्या आत अडकले होते.  अधिकाऱ्यांनी असेही म्हटले आहे की, आग का लागली याची अद्याप माहिती मिळाली नाही, पुढील तपास चालू आहे.

Chhatrapati Sambhajinagar: धक्कादायक! कारखान्याला भीषण आग, सहा मजुरांचा मृत्यू Read More »

Maharashtra News: अवैध जुगार व्यवसाय बंद करा अन्यथा शेवगाव-गेवराई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन…!

Maharashtra News : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव सह ग्रामीण भागात जुगाराचे मोठमोठे फड सुरू आहे. “बिनधास्त या आणि खेळा’ या धर्तीवर काही घरात तर ठिक- ठिकाणी दिवसाढवळ्या, रात्रंदिवस जुगार सुरु असल्याकारणाने गावात अशांतता निर्माण झाली असून व्यसनाधीन लोकांच्या घरात दररोज भांडणतंटे होत असल्याने घराघरात अशांतता पसरली आहे.  तसेच दादागिरी करुन पैशांची मागणी करणे, सट्टा, पत्ता, जुगार खेळण्यासाठी घरातील संसारपयोगी वस्तू व धान्य विकून तसेच एवढ्यावरच न थांबता घरातील महिलांच्या अंगावरील दागदागिने सौभाग्याच लेण मंगळसूत्र मोडून किंवा गहाण ठेवून तसेच शासनमान्य स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य विकून व्यसनपूर्ती करत असून या भागातील सुरू असलेले जुगार व्यवसाय तातडीने बंद करून संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा कुठल्याही क्षणी शेवगाव-गेवराई राज्य महामार्गावर बोधेगाव या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन बोधेगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण यांनी अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना ईमेलद्वारे दिले आहे.  अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना ईमेलद्वारे दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे  की, बोधेगाव येथे बेकायदा जुगाराच्या अड्ड्यामुळे या भागातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. इतर तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील गुन्हेगार प्रवृत्तीचे युवक देखील जुगार खेळण्यासाठी बोधेगावात येत असून यामुळे चोऱ्या होण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे या भागातील सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गावातील 17 ते 24 वर्षातील तरुण मुलांची वर्दळ वाढलेली आहे, पत्ते खेळायला तरुण मुलांची गर्दी व्हायला पाहिजे म्हणून दारू, मटण, सिगारेट इत्यादी सह अन्य आमिषे दिले जात आहे.  अवैध सुरू असलेल्या जुगार व्यवसायामुळे या भागातील गुन्हेगारी देखील बोकाळत चालली आहे. त्यामुळे बोधेगाव परिसरातील तरुण पिढी व्यसनाधीन होऊन त्यांचे भविष्य खराब करण्याचे काम अवैध जुगार व्यवसाय चालवणाऱ्याकडून या भागात सुरू असून सर्वसामान्यांचे संसार वाचविण्यासाठी जुगाराच्या अड्ड्यांवर कारवाई करावी  तसेच पोलिसांकडून यावर कारवाई न झाल्यास जुगाराच्या अड्ड्यावर महिला मोर्चा नेऊन तो बंद पाडू अशी मागणी बोधेगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण यांनी अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना ईमेलद्वारे दिले लेखी निवेदनद्वारे केली आहे.

Maharashtra News: अवैध जुगार व्यवसाय बंद करा अन्यथा शेवगाव-गेवराई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन…! Read More »

Maharashtra Accident

Maharashtra Accident: मोठी बातमी! फायर कँडल कंपनीला भीषण आग, 7 जणांचा होरपळून मृत्यू

 Maharashtra Accident :  पिंपरी-चिंचवड शहरातील मेणबत्ती बनवणाऱ्या कारखान्याला लागलेल्या आगीत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तळवडे, पिंपरी चिंचवड येथे लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या अपघातात किमान सहा जण जखमी झाले आहेत. केकवर लावल्या जाणार्‍या मेणबत्त्या कारखान्यात बनवल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे परिसरात एका कारखान्याला लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत्यू झालेल्या सात जणांपैकी बहुतांश महिला आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तळवडे येथे शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास भीषण आग लागली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने सात जणांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. चिखली व देहूरोड पोलीस तसेच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी हजर आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या आगीत फायर कँडल कंपनी जळून खाक झाली. अजूनही काही लोक अडकले असण्याची भीती आहे. मृत आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ज्वलनशील पदार्थ असल्याने आग वेगाने पसरली असल्याचे सांगण्यात येत आहे. काही वेळातच आगीने संपूर्ण कॉम्प्लेक्सला वेढले. अशा परिस्थितीत तिथं काम करणा-या लोकांना पळून जाण्यास वेळ मिळाला नाही. सध्या आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.

Maharashtra Accident: मोठी बातमी! फायर कँडल कंपनीला भीषण आग, 7 जणांचा होरपळून मृत्यू Read More »