DNA मराठी

latest news

Maharashtra News : भाजप पुन्हा देणार अनेकांना धक्का! शिंदे अपात्र ठरल्यास, कोण होणार मुख्यमंत्री?

Maharashtra News:  आज दुपारी चार वाजता महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राज्यातील राजकारणाचा सर्वात मोठा निर्णय देणार आहे. दुपारी चार वाजता विधानसभा अध्यक्ष शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात आपला निकाल देणार आहे. या निकालावर एकनाथ शिंदे यांच्या सरकारचं भवित्व अवलंबून आहे. यामुळे या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. जर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवलं तर राज्याचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र सध्या  सरकारला कोणताही धोका नाही असं सांगितलं जात आहे.  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी बोलताना निर्णय काहीही आला तरी आमचं सरकार स्थिर राहील अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आला आहे. यामुळे भाजपकडे बी प्लॅन रेडी असल्यास बोललं जात आहे.  आगामी विधानसभा निवडणुका पाहता भाजप पुन्हा एकदा अनेकांना धक्का देण्याची तयारी करत असल्यास राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. यामुळे जर आज एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर अजित पवार यांना भाजप मुख्यमंत्री पद देऊ शकते अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे.  भाजप युतीकडे बहुमत आहे.अजित पवारांचा गट देखील आता भाजपसोबत आला आहे. अजित पवार यांच्याकडे 40 आमदार असल्याचं देखील बोललं जात आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत भाजपने 105 जागा जिंकले होते. त्यात आता अजित पवार गट आणि इतर काही अपक्ष आमदार यांची बेरीज केल्यास भाजपकडे पुन्हा एकदा बहुमत सिद्ध होईल.

Maharashtra News : भाजप पुन्हा देणार अनेकांना धक्का! शिंदे अपात्र ठरल्यास, कोण होणार मुख्यमंत्री? Read More »

Maharashtra Politics : शिंदे की ठाकरे? सत्ता संघर्षात  कोण मारणार बाजी

Maharashtra Politics: आज महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मागच्या दीड वर्षापासून चर्चेत असणारा शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर निर्णय घेणार आहे. विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण देशाच्या लक्ष लागला आहे.  या निर्णयावर एकनाथ शिंदे यांची सरकार राज्यात राहणार की जाणार याचा देखील निर्णय आज होणार आहे. यामुळे राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे.  20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40  आमदारासह बंड केले होते ज्यामुळे राज्यात असणारी ठाकरे सरकार कोसळली होती. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपला बरोबर घेत राज्यात सरकार स्थापित केली होती.   मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला होता.  यासाठी त्यांनी 31 डिसेंबर 2023 ची डेटलाईन दिली होती मात्र त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवसांची मुदत दिली होती जी आज संपत आहे. तर दुसरीकडे सरकारला कोणताही धोका नसल्याचं भाजपकडून सांगितलं जातय. उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय काहीही आला तरी आमचं सरकार स्थिर राहील अशी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांची सुनावणी घेतली आहे. कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा झालेली आहे. अपात्रतेशी संबंधित याचिकेवर आज संध्याकाळी 4 पर्यंत येऊ शकतो. कायदेतज्ज्ञांनुसार शिंदे गटाविरोधात निकाल गेल्यास मुख्यमंत्री शिंदे, त्यांच्या गटातील मंत्री आणि आमदारांना तातडीनं राजीनामा द्यावा लागेल.   भाजप युतीकडे बहुमत असेल. काही महिन्यांपूर्वीच अजित पवारांचा गट भाजपसोबत आला आणि सत्तेत सहभागी झाला. आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा अजित पवारांचा दावा आहे. विधानसभेच्या एकूण 288 जागा आहे. बहुमतासाठी 145 आमदारांचा पाठिंबा गरजेचा असतो.

Maharashtra Politics : शिंदे की ठाकरे? सत्ता संघर्षात  कोण मारणार बाजी Read More »

Maharashtra News:  गुटखा विक्री करणाऱ्या 3 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Maharashtra News: राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेली सुगंधी तंबाखु, पानमसाला व गुटखा विक्री करणाऱ्या 3 आरोपींना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने 12,40,000 रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे.  अहमदनगर पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.  पोनि दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, शाहरुख शहा, नदीम शेख व रिजवान शेख (सर्व रा. वार्ड नं.2, ता. श्रीरामपूर) हे त्यांचा हस्तक दानिश सय्यद रा. वार्ड नं.2, ता. श्रीरामपूर व त्याचा साक्षीदार यांचे मार्फतीने सुगंधीत तंबाखु, पानमसाला व गुटखा राजु शेख व वसीम (रा. बीड) यांचेकडुन खरेदी करुन बीड जामखेड मार्गे अहमदनगर शहरात येणार आहे.  या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिचोंडी पाटील येथे सापळा लावून आरोपींना अटक केली आहे. पोलीसांनी या कारवाईत विविध प्रकारची सुगंधी तंबाखु, गुटखा, पानमसाला, एक अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो व एक टाटा इंडीगो कार असा एकुण  12,40,000 रुपये किंमतीचे मुद्देमालासह जप्त केला आहे.  शिवाजी अशोक ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये भादविक 328, 188, 272, 273, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशिर कारवाई नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.

Maharashtra News:  गुटखा विक्री करणाऱ्या 3 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई Read More »

Ahmednagar News : कोतवाली पोलीसांची मोठी कारवाई, अवघ्या 12 तासात ‘त्या’ प्रकरणात आरोपीला अटक

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील ब्राम्हणगल्ली माळीवाडा येथील शंकर बाबा सावली मठातील अंदाजे २० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल असलेली दानपेटी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती.  या घटनेनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३८०,४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करत आरोपीला अवघ्या बारा तासात अटक केली आहे. पोलीसांनी रोहीदास उर्फ (रोह्या/रावश्या) लक्ष्मण पलाटे याला अटक केली आहे. सदर गुन्हयाचा तपास करत असताना कोतवाली पोलीसांनी मंदीरातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे आरोपीला अटक केली आहे. तसेच चोरलेली दानपेटी आरोपीने गांधी मैदानात एका पडक्या खोलीत लपवुन ठेवली होती. पोलीसांनी चोरी झालेली दानपेटी व त्या मधील रक्कम पंचा समक्ष हस्तगत केली असून आली गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि.विश्वास भान्सी हे करत आहेत.

Ahmednagar News : कोतवाली पोलीसांची मोठी कारवाई, अवघ्या 12 तासात ‘त्या’ प्रकरणात आरोपीला अटक Read More »

Crime News : डोळ्यात मिरची पावडर झोकून बापलेकाने केले तरुणाला ठार

Crime News : जुन्या उधारीच्या पैशांना घेऊन झालेल्या वादात तिघा बापलेकासह अन्य दोघांनी मिळून तरुणाला ठार केले. ही धक्कादायक घटना गोंदिया रामनगर पोलिस ठाण्याअंतर्गत ग्राम कुडवा येथील इंजिनिअरिंग कॉलेजजवळ शनिवारी  रात्री 8 वाजता दरम्यान घडल्याची माहिती समोर आली आहे.  मृत तरुणाचे नाव मनीष ऊर्फ ईश्वर भालाधरे असे आहे. प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघा वापलेकासह अन्य एकाला ताब्यात घेतले आहे.  काय आहे प्रकरण गोंदिया रामनगर पोलिसांकडून माहिती देण्यात आली की, तक्रारदार प्रवीण ऊर्फ लक्की राजकुमार मेश्राम (रा. आंबेडकर चौक, वॉर्ड क्रमांक-3, कुडवा), मनीष भालाधरे आणि राहुल बरेले हे तिघे शनिवारी रात्री 8 वाजल्याच्या सुमारास इंजिनिअरिंग कॉलेज समोर सिगारेट पिण्याकरिता संतोष रामेश्वर मानकर यांच्या लकी रेस्टॉरंटमध्ये गेले होते.  तेथे त्यांचा मित्र प्रवेश मेश्राम याच्या जुन्या उधारीच्या पैशावरून वाद झाला असता संतोष मानकर याने प्रवीण मेश्राम, मनीष भालाधरे आणि राहुल बरेले यांच्यासोबतही भांडण व शिवीगाळ केली. तसेच मिरची पावडर मनीष भालाधरे यांच्या डोळ्यात फेकून संतोष मानकर, लकी ऊर्फ लोकेश, पवन संतोष जॉर्डन ऊर्फ मोहित शेंडे आणि विधीसंघर्ष ग्रस्त बालक यांनी लोखंडी रॉड, कुन्हाड, कोयता इत्यादी घातक हत्यारांनी वार करून मनीष भालाधरे याला ठार केले. प्रवीण मेश्राम याच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी खुनाचा गुन्ह दाखल केलाय. या प्रकरणात पोलिसांनी फरार आरोपींचा शोध घेण्याकरिता रामनगर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक नेमण्यात आले. यानंतर पथकांनी संतोष मानकर, लकी संतोष मानकर, पवन संतोष मानकर आणि विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले, तर जॉर्डन शेंडे हा फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.  आरोपीना अवघ्या काही तासांत पकडण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात केले होते.

Crime News : डोळ्यात मिरची पावडर झोकून बापलेकाने केले तरुणाला ठार Read More »

Ahmednagar News : शेतमाल चोरुन नेणारे टोळीकडुन सोयाबिन व तुर जप्त

Ahmednagar News: 28 डिसेंबर 2023 रोजी कोळगाव शिवारातुन सुमारे 1200 किलो शेतकऱ्याने अंगणात जमा करून ठेवलेली तुर अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचा गुन्हा ऋषिकेश देविदार लगड यांनी बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये भादवि.क.379, 342 प्रमाणे गुन्हा दाखल होता.  त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी तपास पथक नेमुन जिल्हयात पथके रवाना केले. त्यावेळी पो.नि.स्थागुशा दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, सदरची चोरी ही जामगाव येथील संदिप उत्तम गोरे व त्याचे सोबत असलेल्या लोकांनी चारचाकी वाहनाचे साहाय्याने केली आहे. या माहितीवरून त्यांनी  पारनेर तालुक्यातील जामगाव येथे स्थागुशा यांनी सापळा रचुन संदिप उत्तम गोरे , वैभव उर्फ बाल्या सुरेश औटी,  अमोल संतोष माळी, रोहीत सुनिल शेळके, आकाश आजिनाथ गोलवड,  विकास विठ्ठल घावटे यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले.  त्यांचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेला शेतमाल 1200 किलो तुर रुपये 96,000 किमतीची जप्त करण्यात आलेली आहे. तसेच तुर वाहतुक करण्यासाठी वापरलेला 8,00,000 रुपये किमतीची टाटा इंट्रा व्ही व नगर तालुक्यातील चोरुन नेलेले सोयाबीन 06 क्विंटल सोयाबिन 30,000 रुपये कि.चे असा एकुण 9,26,000 रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.  स्थागुशा अहमदनगर यांनी आरोपी व मुद्देमाल बेलवंडी पोस्टेस पंचनामा करुन ताब्यात देण्यात आले. आरोपींना बेलवंडी पोस्टेचे गुन्हयात अटक केले व पुढील तपास करिता समन्वय साधून बेलवंडी पोस्टेचे पो.नि.ठेंगे व पोलीस उपनिरीक्षक गाजरे, चाटे, पोहेकाँ खेडकर, पो.हे.कॉ. नंदकुमार पठारे, पोना शेख, पोकाँ पवार, भांडवलकर, दिवटे, शिपनकर, शिंदे यांनी आरोपींकडे अटक मुदतीत अधिक तपास करुन नगर तालुक्यातील शेंडी एम आय डी सी पोलीस स्टेशन येथिल दाखल असलेला गुन्हा रजि.1032/2023 भादवि.क.379 प्रमाणे गुन्हा उघडकीस आणला असुन आरोपीकडुन 08 सोयाबिनचे अर्धवट भरलेले कट्टे जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकाँ खेडकर हे करीत आहेत. 

Ahmednagar News : शेतमाल चोरुन नेणारे टोळीकडुन सोयाबिन व तुर जप्त Read More »

Ahmednagar News : बहीणीच्या घरी घरफोडी करणारा आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Ahmednagar News: अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत एम.आय.डी.सी. परिसरामध्ये बहीणीच्या घरी घरफोडी करणारा आरोपी  तब्बल 16,18,900 रुपये किमतीचे मुद्देमालासह जेरबंद केला आहे.  फिर्यादी सुजय सुनिल गांधी 30 डिसेंबर रोजी  लग्न समारंभाचे कार्यक्रमाकरिता गेले असता रात्री 11 च्या सुमारास परत घरी आले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे बंद घराचे दरवाजाचे कुलुप तोडुन घरात प्रवेश करुन 2,50,000 रुपये रोख रक्कम व 4,80,000 रुपये किमतीचे 20 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 3000 रुपये किमतीची लोखंडी तिजोरी असा एकुण 7,33,000 रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी करुन चोरुन नेला.  सदर घटनेबाबत एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात  भादवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेबाबत तपास करत असताना पोनि दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, फिर्यादीचा मेव्हणा सुरज प्रकाश लोढा याने मुथुट फायनान्स कंपनीमध्ये काही सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवल्या आहे.  प्राप्त माहितीवरून पोलीस पथक सुरज लोढा याची माहिती घेत असतांना त्याच्या हालचाली संशयास्पद आढळुन आल्याने पोलीस पथकाने 03 जानेवारी रोजी सुरज प्रकाश लोढा यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्ह्याबाबत  बारकाईने विचारपुस केली.  या तपासा दरम्यान आरोपीने  गुन्हा केल्याची कबुली दिली.   ताब्यात घेण्यात आलेला आरोपीकडून  त्याने चोरी केलेले 13,26,400 रुपये किमतीचे 221 ग्रॅम सोन्याचे दागिने, 2,04,500 रुपये रोख रक्कम, तसेच गुन्ह्याचे वेळी वापरलेले 16,000 रुपये किमतीचे दोन मोबाईल, 70,000 रुपये किमतीची मोटारसायकल, 2000 रुपये किमतीचे तिजोरी कापण्यासाठी वापरलेले ग्राइंडर असा एकुण 16,18,900 रुपये किमतीचा मुद्देमाल तपासकामी जप्त केला आहे.  तसेच त्याने चोरी केलेल्या मुद्देमालापैकी 04 सोन्याच्या बांगड्या मुथुट फायनान्स कंपनीमध्ये गहाण ठेवले असल्याची कबुली दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस पुढील तपासकामी एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे हे करीत आहेत.

Ahmednagar News : बहीणीच्या घरी घरफोडी करणारा आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई Read More »

Mumbai News : लाजिरवाणी घटना! 13 वर्षांच्या चुलत बहिणीवर भावांनी केला अत्याचार अन्…..

Mumbai News: राज्याची राजधानी मुंबईमध्ये नात्याला लाजवेल घटना समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईत दोन भावांनी त्यांच्या 13 वर्षांच्या चुलत बहिणीवर अनेकदा बलात्कार केला. अल्पवयीन पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने दोघांचे हे घृणास्पद कृत्य उघडकीस आले. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.  गेल्या आठ महिन्यांपासून पीडितेवर अत्याचार होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडिता घरी एकटी असताना चुलत भाऊ तिच्यावर बलात्कार करायचे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून 22 वर्षीय आणि 18 वर्षीय भावांना अटक केली आहे. आईला संशय आला पीडित मुलगी मुंबईतील विक्रोळी परिसरात तिच्या आई-वडिलांसोबत राहते. जिथे दोन्ही आरोपी त्यांच्या अल्पवयीन चुलत भावाला भेटायला येत असत. दोघेही अनेकदा घरी यायचे. यावेळी ते त्याच्या चुलत बहिणीलाही भेटत असेल. तथापि, सर्वांचे एकमेकांशी चांगले संबंध होते आणि ते भाऊ असल्यामुळे कोणालाच चुकीची भीती वाटत नव्हती. जेव्हा पीडितेचे आई-वडील दोघेही कामावर जात होते. तेव्हा  आरोपी आरोपी निष्पाप बालकावर घाणेरडे कृत्य करायचे. दाम्पत्याच्या अनुपस्थितीत अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा बलात्कार करण्यात आला.  गेल्या रविवारी पीडितेच्या आईच्या लक्षात आले की, आपल्या मुलीचे पोट बाहेर आले आहे. त्यांनी त्या मुलीला याबाबत विचारले, पण तिने नीट काहीही सांगितले नाही. गर्भधारणेचे रहस्य उघड आपल्या मुलीच्या प्रकृतीबद्दल चिंतित असलेल्या आईने तिला रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितले की मुलगी 23 आठवड्यांची गर्भवती आहे. हे ऐकून आई स्तब्ध झाली. त्यानंतर विक्रोळी येथील पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवून तपास सुरू केला. तपासात मोठा खुलासा पीडितेने पोलिसांना सांगितले की, मे महिन्यात तिच्या लहान चुलत भावाने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर ऑगस्टमध्ये मोठ्या चुलत भावाने बलात्कार करण्यास सुरुवात केली. दोन्ही भावांनी तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. आरोपी आधी तिला अश्लील व्हिडिओ दाखवायचा आणि नंतर तिच्यावर बलात्कार करायचा. अल्पवयीन पीडितेच्या जबानीच्या आधारे दोन्ही आरोपींविरुद्ध भादंविच्या विविध कलमान्वये बलात्कार, सामूहिक बलात्कार, वारंवार लैंगिक अत्याचार, आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवणे आणि इतर गुन्ह्य़ांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai News : लाजिरवाणी घटना! 13 वर्षांच्या चुलत बहिणीवर भावांनी केला अत्याचार अन्….. Read More »

Maharashtra Politics :  शिवसेना 23 जागांवर लढणार, लोकसभेपूर्वी I.N.D.I.A. मध्ये अस्वस्थता, खेळ बिघडणार?

Maharashtra Politics : राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सर्व पक्ष आपापल्या ताकतीनुसार निवडणुकी उतरण्याची तयारी करत आहे.  यातच I.N.D.I.A. मध्ये असणाऱ्या शिवसेनेने (यूबीटी) ने लोकसभेच्या 48 जागांपैकी 23 जागांवर दावा केल्याने I.N.D.I.A. आघाडीच्या नेत्यांमध्ये मतभेद दिसून येत आहे. शिवसेनेच्या या निर्णयानंतर नंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार दिल्लीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना शिवसेनेच्या दबावाखाली येऊ नका, अन्यथा निवडणुकीच्या वर्षात पक्षावर विपरीत परिणाम होईल, असा इशारा दिला आहे.  राज्यात भाजपच्या प्रभावामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आधीच फुटली असली तरी काँग्रेस अजूनही एकजूट असल्याचे काँग्रेस नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने जागांबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड केल्यास या प्रतिकूल वातावरणातही पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या पक्षश्रेष्ठींवर विपरीत परिणाम होऊन ते पर्यायी मार्ग निवडू शकतात. तिकिटासाठी अनेक ज्येष्ठ नेतेही पक्ष सोडू शकतात. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस हायकमांडलाही शरद पवारांपासून सावध राहण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, शरद पवार शिवसेनेशी आघाडी करून काँग्रेसचा खेळ बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात, कारण सध्या राज्यात काँग्रेसच्या बाजूने वातावरण चांगले आहे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी फुटली आहे.  लोकसभा लढवण्यासाठी शरद पवार यांच्याकडे सध्या चांगले आणि तगडे उमेदवार नाहीत. या ज्येष्ठ नेत्याने नाव न लिहिण्याच्या  अटीवर सांगितले की, ‘काँग्रेसला कमी जागा मिळाव्यात आणि काँग्रेसमध्ये निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या काही नेत्यांना तिकीट मिळावे, यासाठी शरद पवार शिवसेना-उद्धव गटाला अधिक जागांसाठी भडकवत आहेत, असे मला वाटते.   दरम्यान, जागावाटपाबाबत महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांच्या कठोर भूमिकेला काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही काही प्रमाणात सहमती दर्शवत असून, I.N.D.I.A. आघाडीबाबतही चिंतेत असल्याचे वृत्त आहे. त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा अभिप्राय घेतला असून दिल्लीत याबाबत चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राचे नवनियुक्त काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनीही महाराष्ट्रातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची चिंता योग्य असल्याचे मान्य केले आहे. उद्धव-पवार दिल्लीला जाणार अलीकडेच शिवसेनेचे (UBT) खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते माजी खासदार संजय निरुपम यांच्यातील जागावाटपावरून झालेल्या शाब्दिक युद्धानेही आगीत आणखी भडका उडवला आहे. यानंतर उद्धव ठाकरेंचा सूरही बदलला आहे. I.N.D.I.A. आघाडीतील जागावाटपाचा आधार केवळ जिंकण्याच्या क्षमतेवर असेल, असे ते म्हणू लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी फोनवर चर्चा केल्याचे वृत्त असून जागावाटपावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे लवकरच दिल्लीला जाणार आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही दिल्लीतील चर्चेत सहभागी होणार असल्याचे वृत्त आहे. येत्या पंधरा दिवसांत निर्णय : सुळे येत्या 15 किंवा 16 जानेवारीपर्यंत महाविकास आघाडीत कोण कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार हे स्पष्ट होईल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी सोमवारी केला. त्यानंतर उमेदवार निश्चित केले जातील. I.N.D.I.A. आघाडीतील प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्रपणे निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. पटोले म्हणाले, मतभेद नाहीत महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून माहिती मागवली असता ते म्हणाले की, जागावाटपाबाबत महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, गुणवत्तेनुसार जागा वाटल्या जातील, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Maharashtra Politics :  शिवसेना 23 जागांवर लढणार, लोकसभेपूर्वी I.N.D.I.A. मध्ये अस्वस्थता, खेळ बिघडणार? Read More »

Ahmednagar News: शेतमाल चोरी करणाऱ्या 07 आरोपींना अटक, 9,26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

Ahmednagar News : शेतकऱ्यांचा शेतमाल चोरी करणारी 07 आरोपींची टोळी 9,26,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.  फिर्यादी ऋषिकेश देविदास लगड यांनी त्यांच्या घरासमोर पटांगणामध्ये वाळण्यासाठी टाकलेली 84,000 रुपये किमतीची पांढरी तुर 27 डिसेंबर रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली होती. सदर घटनेबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात भादवि कलम 379, 342 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेचा तपास करताना पोनि. दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा हा वैभव उर्फ बाल्या सुरेश औटी याने व त्याचे साथीदाराने केला असून आता ते हा शेतमाल विक्रीकरीता पारनेर येथे येणार असल्याची माहिती मिळाली.  या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने जामगांव ते पारनेर जाणारे रोडवर जामगांव घाट या ठिकाणी सापळा रचुनवैभव उर्फ बाल्या सुरेश औटी, अमोल संतोष माळी, रोहीत सुनिल शेळके, आकाश अजिनाथ गोलवड, किरण संजय बर्डे आणि साहील नामदेव माळी या आरोपींना अटक केली आहे.   पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींच्या कब्जामधून 96,000 रुपये किमतीची 12 क्विंटल पांढरी तुर, 30,000 रुपये किमतीची 6 क्विंटल सोयाबीन व 8,00,000 रुपये किमतीची टाटा कंपनीची इंट्रा गाडी असा एकुण 9,26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.   ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना बेलवंडी पोलीस ठाणेमध्ये  भादवि कलम 379, 342 प्रमाणे या गुन्ह्याचे तपासकामी बेलवंडी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास बेलवंडी पोलीस ठाणे हे करीत आहेत.

Ahmednagar News: शेतमाल चोरी करणाऱ्या 07 आरोपींना अटक, 9,26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त Read More »