DNA मराठी

DNA Marathi News

Ahmednagar News: इंस्टाग्रामवर ओळख अन् मुलींनी गाठले परराज्य; कोतवाली पोलिसांनी शोधून आणले!

Ahmednagar News: आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण एकमेकांशी गप्पा गोष्टी करत असतात.  काहीजणांना सोशल मीडियावर प्रेम देखील होतो मात्र त्यानंतर अनेकांची फसवणूक झाल्याची अनेक बातम्या आपण वाचले आहेत.  अहमदनगर शहरात कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच एक घटना घडली आहे. अठरा वर्षे पुर्ण झालेल्या दोन मुली सोशल मिडीयाच्या इंस्टाग्रामवर अनोळखी तरुणांशी ओळख करून घरातून निघून गेल्या. पालकांनी शोधाशोध केली मात्र उपयोग झाला नाही.त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनातून कोतवाली पोलिसांनी एका मुलीला बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमारेषेवरून आणले आणि काही दिवस पाहुण्यांकडे अहमदनगरमध्ये आली आणि निघून गेलेल्या दुसऱ्या मुलीला मराठवाड्यातून आणले.  सोशल मिडीयावर झालेले प्रेम,मैत्री हे मृगजळासारखे असते. दिखाव्याच्या खोट्या गोष्टींमध्ये गुंतवून मुलांकडून जाळ्यात फसवले जाते. अशा दिखाव्याला मुली बळी पडतात. घरातील आई वडील नातेवाईकांचा जराही विचार न करता कल्पना विश्वाच्या जगात हरवून जातात. मात्र यातून कुटुंबाला होणारा त्रास, बदनामी अटळ असते. जेंव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले तेंव्हा त्यांना आपण खूप मोठी चूक केली असल्याचे समजले. तपास लावल्यानंतर मुलींच्या परिसरातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस जवान विश्वास गाजरे,रवी टकले, प्रमोद लहारे, सचिन लोळगे यांचा सत्कार केला. ‘याबाबत पालकांनी आपल्या पाल्यांवर कायम लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक विषयाबाबत वेळोवेळी संवाद साधावेत. पालकांचे आपल्या पाल्याची मैत्रीपूर्ण संबंध असावेत. मुलांमध्ये फक्त भीती नको तर, आदरयुक्त भीती असावी. पालकांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष देण्याचे भावनिक आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी व्यक्त केले.’ …मग आयुष्याचा जोडीदार निवडताना का काळजी घेत नाही?  ‘सर्व शाळा-महाविद्यालयात मार्गदर्शन करताना चंद्रशेखर यादव एक आवर्जून उदाहरण सांगतात की,’आपण एक टिकलीचे पाकीट घ्यायचे असेल तर दहा ते बारा पाकीट चाळून पाहतो, चप्पल ड्रेस किंवा काहीही घ्यायचं म्हटलं तरी चार ते पाच दुकानात जाऊन पाहतो मग, आपण आयुष्याचा जोडीदार निवडताना किती काळजी घ्यायला पाहिजे? त्यामुळे मुलींनी अधिकची काळजी घ्यायला हवी’

Ahmednagar News: इंस्टाग्रामवर ओळख अन् मुलींनी गाठले परराज्य; कोतवाली पोलिसांनी शोधून आणले! Read More »

Ahmednagar Accident: महाराष्ट्र हादरला! संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू

Ahmednagar Accident: राज्यात कालरात्री पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या दोन भीषण रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एक महिला जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नगर – पुणे- कल्याण महामार्गावर डिंगोरे परिसरात तीन वाहनांच्या धडकेत आठ जणांचा जागीच मृत्यू झाला.  मृतांमध्ये दोन मुलांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अकराच्या सुमारास नगर-कल्याण महामार्गावरील डिंगोरे परिसरातील अंजिराची बाग येथे हा भीषण अपघात झाला. या अपघातात माळशेज घाटाजवळील मढ गावात राहणाऱ्या संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला.  अपघातग्रस्ताचे कुटुंब जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे नातेवाइकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी गेले होते व रात्री उशिरा घरी परतत होते. गणेश मस्करे (वय 30), कोमल मस्करे (वय 25), हर्षद मस्करे (वय 4), काव्या मस्करे (वय 6) अशी मृतांची नावे आहेत. तीन वाहनांची धडक… कुटुंब उद्ध्वस्त गणेश मस्करे हा भाजीविक्रीचा व्यवसाय करायचा. त्यामुळेच तो पिकअपमध्ये भाजीपालाही भरून आणत होता. कुटुंबाला घरी सोडून ते नेहमीप्रमाणे भाजी विकण्यासाठी जात होता.  पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. मस्करे हे आळेफाटा येथून भाजीपाला घेऊन पिकअपने ओतूरहून कल्याणच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या रिक्षाने पिकअपला धडक दिली. या अपघातात रिक्षाचालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. चालक आणि मस्करे कुटुंब पिकअपच्या केबिनमध्ये बसले होते आणि मागे एक कुली बसला होता.  रिक्षाला धडकल्यानंतर पिकअपची कल्याणकडून येणाऱ्या ट्रकला धडक बसली. त्यामुळे पिकअपमधील 5 पुरुष, 1 महिला आणि दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला. कारवर टेम्पो उलटला पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर येथे रविवारी रात्री भीषण अपघात झाला. त्यांच्या कारवर टेम्पो उलटल्याने चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी गावाजवळ हा अपघात झाला. समोरून येणाऱ्या कारवर भरधाव वेगात असलेला टेम्पो पलटी झाल्याने कारमधील चार जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर एक महिला थोडक्यात बचावली. या अपघातात सुनील धारणकर (वय 65 वर्षे), ओजस्वी धारणकर (वय 2 वर्षे), आशा सुनील धारणकर (वय 42 वर्षे) आणि अभय सुरेश विसाळ (वय 48 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणारा टेम्पो एका वाहनाला ओव्हरटेक करत असताना रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की टोयोटा इटिओस कारचा चक्काचूर झाला.  या घटनेनंतर चंदनापुरी ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठून तातडीने मदतकार्य सुरू केले, त्यामुळे महिलेचा जीव वाचला. मात्र या अपघातात अकोले तालुक्यातील एका दोन वर्षाच्या चिमुरडीसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Ahmednagar Accident: महाराष्ट्र हादरला! संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू Read More »

Weather Update: नागरिकांनो, अलर्ट जारी! मुंबईसह ‘या’ भागात बदलणार हवामान; पावसाची शक्यता

IMD Weather News:  दक्षिण भारतात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रामध्ये देखील झपाट्याने वातावरण बदलताना दिसत आहे.  बदलणाऱ्या हवामानामुळे राज्यातील बहुतेक भागात थंडीची तीव्रता वाढली आहे. अहमदनगर, मुंबई, पुणेसह राज्यातील इतर भागात पारा घसरल्याने थंडी जाणवू लागली आहे.   आठवड्याच्या शेवटी दक्षिण महाराष्ट्रातील बहुतांश भागात थंड वाऱ्यांनी प्रवेश केल्याने पारा सामान्यापेक्षा खाली घसरला. मात्र, दोन दिवसांत कमाल तापमानात पुन्हा वाढ होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तर 20 डिसेंबरनंतर किमान तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पुण्यातही पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार सोमवारपासून तापमानात आणखी 2-3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. वास्तविक उत्तर भारतातून थंड वारे महाराष्ट्रात पोहोचत आहेत. राज्याच्या बहुतांश भागात आता किमान तापमान 13 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले जात आहे. मात्र नवीन हवामान प्रणालीमुळे पारा चढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने काय म्हटले? IMD (पुणे) च्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांच्या म्हणण्यानुसार, 18 डिसेंबरपासून काही दिवस उत्तर-मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. या आठवडय़ात किमान तापमानात चढ-उतार दिसून येतील, परंतु 18-20 डिसेंबरच्या सुमारास राज्यातील रात्रीचे तापमान सामान्यापेक्षा किंचित कमी राहील. यानंतर रात्रीच्या तापमानात पुन्हा किंचित वाढ होऊ शकते. थंडी कमी होईल! IMD च्या अंदाजानुसार, पुढील दोन आठवड्यांत उत्तर-मध्य महाराष्ट्रात किमान तापमान सामान्यपेक्षा किंचित जास्त राहील. मात्र, या काळात राज्यातील उर्वरित भागात रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा कमी राहू शकते. 20 ते 21 डिसेंबर दरम्यान राज्यात उत्तरेकडील वारे वाहू लागतील, त्यामुळे किमान तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. वास्तविक हे थंड वारे पश्चिम हिमालय आणि उत्तर-पश्चिम भारताच्या थंड प्रदेशातून येत आहेत. पाऊस का पडू शकतो? दुसरीकडे, हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पुढील काही आठवडे अंतर्गत महाराष्ट्रातील किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त आणि विदर्भ आणि मराठवाड्यात सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.  वाऱ्याची दिशा बदलल्याने राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होणार आहे. ओलसर आग्नेय-पूर्वेकडील वाऱ्यांमुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात आजपासून 20 डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहील आणि किमान तापमानात वाढ होईल. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्येही गुलाबी थंडी कमी होणार आहे. या आर्द्रतेमुळे पुण्यासह दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातही तुरळक सरी पडू शकतात. राज्यात दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडी कमी असेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Weather Update: नागरिकांनो, अलर्ट जारी! मुंबईसह ‘या’ भागात बदलणार हवामान; पावसाची शक्यता Read More »

Maruti Jimny खरेदी करा ‘इतक्या’ स्वस्तात! मिळत आहे बंपर डिस्काउंट; पहा ऑफर

Maruti Jimny  :  मारुती सुझुकीने भारतीय बाजारात काही दिवसापूर्वी ऑफ-रोड SUV जिमनी लाँच केली आहे. यावेळी कंपनीने या ऑफ रोड एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 12.74 लाख रुपये ठेवली होती.  मात्र आता कंपनी या कारवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर देत आहे. ज्याच्या तुम्ही फायदा घेत स्वस्तात ही ऑफ रोड एसयूव्ही कार घरी आणू शकता.   आम्ही तुम्हाला सांगतो कंपनीने, आपल्या SUV – Thunder Edition  नवीन आणि स्वस्त व्हर्जन लाँच केला आहे. या एसयूव्हीचे हे मर्यादित-रन मॉडेल आहे. Maruti Jimny Thunder Edition तपशील कंपनीने 10.74 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत मारुती जिमनी थंडर एडिशन बाजारात लॉन्च केले आहे. त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 14.05 लाख रुपयांपर्यंत जाते.  कंपनीने थंडर एडिशन जिमनी लाइनअपच्या चारही व्हेरियंटमध्ये उपलब्ध करून दिली आहे. मात्र, त्याची विक्री डिसेंबर 2023 पर्यंतच केली जाईल.  जर आपण थंडर एडिशनची नियमित जिमनीच्या सुरुवातीच्या किंमतीशी तुलना केली तर त्याची किंमत 2 लाख रुपये कमी आहे. कंपनीने थंडर एडिशन जिमनीमध्ये फ्रंट बंपर, साइड डोअर क्लॅडिंग आणि डोअर व्हिझरवर सिल्व्हर गार्निश जोडले आहेत. त्याच्या ORVM, हुड आणि फ्रंट/साइड फेंडर्सवर देखील गार्निश केले गेले आहे.  इंटीरियर आकर्षकपणे डिझाइन केलेले आहेत आणि त्यात फ्लोअर मॅट्स (मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटसाठी वेगळे), आणि टॅन-फिनिश स्टिअरिंग व्हील देखील आहेत.  ही SUV 9-इंच टचस्क्रीन, क्रूझ कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, सहा एअरबॅग्ज आणि ऑटो क्लायमेट कंट्रोल यांसारख्या आधुनिक फीचर्ससह आहे. यात 1.5-लिटर K15B नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. ज्याची कमाल 104 bhp पॉवर आणि 134 Nm पीक टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. यामध्ये कंपनीने 5-स्पीड मॅन्युअल किंवा 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय दिला आहे.

Maruti Jimny खरेदी करा ‘इतक्या’ स्वस्तात! मिळत आहे बंपर डिस्काउंट; पहा ऑफर Read More »

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाण्याची नासाडी, व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनाने घेतली दखल..!

शेवगाव/प्रतिनिधी ( इसाक शेख ) Maharashtra News: शेवगाव तालुक्यातील चापडगाव नजीक असणाऱ्या शेवगाव-गेवराई या राज्य महामार्गावरील कांबी फाट्याजवळ असणाऱ्या गेवराई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या एअरवॉल मधून गेल्या आठ दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे अनेकांच्या निदर्शनात आले होते.  मात्र याकडे कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत असल्याने रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांनी मात्र याचे व्हिडिओ काढून फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम यासारख्या आदी सोशल मीडियाच्या स्टेटसला ठेवल्याने तसेच काही नागरिकांनी गेवराई येथील अधिकाऱ्यांना संपर्क केल्याने गेवराई नगर परिषद प्रशासन खडबडून जागे झाले आणि आठ दिवसात दोन वेळेस गेवराई नगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रशासनाने एयरवाल बंद केले.  पैठणच्या जायकवाडी जलाशयातून गेवराई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नगरपालिकेच्या पाईपलाईनच्या चापडगाव येथील कांबी फाट्या जवळील एअरवॉलला अज्ञात इसमाने छेडछाड केल्याने गेल्या आठ दिवसापासून दिवसभरात किमान लाखो लिटर पाण्याची नासाडी होत होती.  सध्या सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती असताना याकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले गेल्याने रोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत होती. परंतु गेवराई नगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रशासनाचे याकडे मात्र दुर्लक्ष असल्याचे दिसून येत असल्याने याविषयी सध्या नागरिकात मात्र मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे.  या राज्य मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात हे दृश्य कैद होत होती,  तर काही जण मोबाईलच्या स्टेटसला या पाण्याचे विहंगम दृश्य ठेवल्याने याची चर्चा होऊन काहींनी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रशासनास दूरध्वनीवरून संपर्क केल्याने पाईपलाईनच्या एअरवॉलमधून वाया जात असलेले पाणी हे तत्परतेने गेवराईचा नगरपरिषद पाणीपुरवठा प्रशासनाने बंद केले. तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल गेवराई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पैठण-गेवराई या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनवर असणाऱ्या एअरवॉलला कोणत्याही नागरिकांनी कुठल्याही प्रकारची छेडछाड करू नये जेणेकरून पाण्याची नासाडी होऊन पाणी वायाला जाणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी तसेच आसपासच्या नागरिकांनी घ्यावी.  तसेच कोणी अशा प्रकारची छेडछाड करत असल्याचे नगरपरिषदेच्या फिरत्या पथकास निदर्शनास आल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद यांच्या आदेशावरून नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. – ए.बी. लाड  पाणीपुरवठा प्रमुख, गेवराई नगरपरिषद

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाण्याची नासाडी, व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनाने घेतली दखल..! Read More »

Headache

Headache Relief Tips:  डोकेदुखीपासून औषधाशिवाय  मिळणार आराम; ‘या’ 5 पद्धतीचा करा वापर

Headache Relief Tips : आज असे अनेकजण आहे ज्यांना डोकेदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि, डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात.  हवामानातील बदल,  निद्रानाश, तणाव यामुळे डोकेदुखी होऊ शकते. जर तुम्ही डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर औषधांव्यतिरिक्त, तुम्ही या पद्धतींद्वारे देखील डोकेदुखीपासून मुक्त होऊ शकता. कधी कधी कामाचा ताण हे देखील डोकेदुखीचे कारण असू शकते. चला तर मग आम्ही तुम्हाला डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी घरगुती उपायांबद्दल सांगू. डोकेदुखीपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी उपायलाईट डोळ्यांवर जास्त प्रकाश पडणे देखील चांगले नाही. कधीकधी प्रकाशाच्या तेजामुळे डोकेदुखी देखील होऊ शकते. अशा वेळी डोकेदुखीचा त्रास टाळण्यासाठी रूममधील लाईट  मंद ठेवा. सूर्यप्रकाशापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी चष्मा वापरा. मानसिक दबाव कमी कराबर्‍याच वेळा काम किंवा इतर कोणत्याही गोष्टींबद्दल खूप दबाव असतो, यामुळे देखील तीव्र डोकेदुखी होऊ शकते. अशा परिस्थितीत मानसिक दबावापासून दूर राहा. डोकेदुखी टाळण्यासाठी आणि डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. कामाच्या ओझ्यामुळे मानसिक दडपणही वाढते. हे टाळण्याचा प्रयत्न करा. डोके मालिशडोकेदुखीपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी मसाज हा एक चांगला उपाय आहे. मसाज करून तुम्हाला वेदनांपासून आराम मिळू शकतो. डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी डोक्याच्या मसाजसोबतच कपाळ, मान आणि खांद्यांची मालिश करावी. कधी कधी थकवा आल्यानेही वेदना होतात. मसाज केल्याने तणावही कमी होतो. कॅफिनचे सेवनकॅफिनचे सेवन डोकेदुखीमध्ये खूप फायदेशीर आहे. अनेकजण डोकेदुखीवर औषध म्हणून चहाचा वापर करतात. तीव्र डोकेदुखीच्या बाबतीत चहा आणि कॉफीचे सेवन करणे चांगले. जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर चहा किंवा कॉफी प्यायल्याने डोकेदुखी वाढणे थांबू शकते. आल्याचे सेवनडोकेदुखीवर उपचार करण्यासाठी आल्याचे सेवन करणे खूप चांगले आहे. आल्याच्या चहाने तुम्ही डोकेदुखी दूर करू शकता. अद्रक दुधात मिसळूनही वापरू शकता. यामुळे डोकेदुखीपासून बऱ्याच अंशी आराम मिळतो आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. (अस्वीकरण: आमचा लेख केवळ माहिती प्रदान करण्यासाठी आहे. अधिक माहितीसाठी नेहमी तज्ञाचा सल्ला घ्या.)

Headache Relief Tips:  डोकेदुखीपासून औषधाशिवाय  मिळणार आराम; ‘या’ 5 पद्धतीचा करा वापर Read More »