DNA मराठी

DNA Marathi News

Maharashtra Election: भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा पाथर्डीत भव्य निर्धार मेळावा…!

Maharashtra Election:  शेवगांव व पाथर्डी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा निर्धार मेळावा  पाथर्डी येथील विजय लॉन्स मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडला.  भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे तसेच ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष गोकुळ दौंड यांच्या नेतत्वाखाली आमदार मोनिका राजळे यांना डावलुन हा निर्धार मेळावा घेऊन अरुण मुंडे व गोकुळ दौंड यांनी आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात शेवगांव-पाथर्डी विधानसभेसाठी दंड थोपटले असुन मेळाव्यात अरुण मुंढे किंवा गोकुळ दौंड या दोघांपैकी कोणी एकाला पक्षाने विधानसभेची उमेदवारी द्यावी अशा मागणीने जोर धरला आहे. विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पक्षश्रेष्ठींनी पुन्हा उमेदवारी देऊ नये अन्यथा शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी सामुहिक राजीनामे देणार असल्याचे वक्तव्य यावेळी अनेकांनी बोलताना केले. यावेळी भाजपचे शेवगांव तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथराव इसारवाडे, सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर केदार, पंचायत समितीच्या सभापती सुनीता डौंड, भाजपाच्या महिला तालुकाध्यक्ष शितल केदार, आत्माराम कुंडकर, भाऊ वाघमारे, बाळासाहेब सोनवने, बाळासाहेब डोंगरे, आत्माराम कुंडकर, बाळासाहेब कोळगे सह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra Election: भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा पाथर्डीत भव्य निर्धार मेळावा…! Read More »

Ahmednagar News: सीना नदी, भिंगार नाल्याचे भाग्य उजाळणार, खोलीकरण व रुंदीकरणासाठी 20 कोटी मंजूर

Ahmednagar News: जास्त पाऊस पडला की पूर येऊन नगर शहरातील नदीच्या आजूबाजूच्या सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरणे हे दरवषच्या पावसाळ्यात नियम झालेल्या सीना नदीला आता पाणी पोटात साठवून ठेवण्याचे भाग्य लाभणार आहे. तसेच भिंगार नाल्याचाही चेहरा उजाळणार आहे.  सीना नदीच्या पूररेषेची फेरआखणी करण्याची आमदार संग्राम जगताप यांची मागणी रुंदीकरण व खोलीकरण केल्याशिवाय करता येत नव्हती. तेव्हा आमदार जगताप यांनी त्यासाठी लागणाऱ्या निधीकरिता पाठपुरावा केला व त्या पाठपुराव्याला यश येऊन राज्या शासनाच्या 15 व्या वित्त आयोगातून आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन योजनेअंतर्गत 20 कोटी 66 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसे पत्र अहमदनगर महापालिकेला ऐन नवरात्रीच्या प्रारंभीच प्राप्त झाले आहे. नगर शहराच्या सीमेला लागून सीना नदी वाहते. नगर शहराभोवती तिची लांबी सुमारे 14 किलोमीटर आहे. परंतु सीना नदीच्या काठाने मानवी वस्त्या वाढत गेल्या तसेच नदीकाठच्या जमीनधारकांनी अतिक्रमणही केले आणि नदीचे पात्र आकसत गेले. त्यातून नदीला एखाद्या ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले. सीना नदीला पूर येणे हे तशी औत्सुक्याची बाब. एक तर नगर जिल्ह्यात एखाद्या वषच पावसाची कृपा असते. नेहमी अवर्षणच असते. कधी तरी सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडला की सीना नदीला पूर येतो.  पाऊस जास्त झाला की आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरते व तेथील रहिवाशांची त्रेधातिरपीट उडते. यंदाच्या पावसाळ्यातही तशी परिस्थिती उद्भवली होती. वारंवार होणारी ही स्थिती व नागरिकांचे हाल टाळण्यासाठी सीना नदीची पूररेषा आखून नियोजन करणे आवश्यक होते. त्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी नगर महापालिका व जिल्हाधिकारी यांच्यासह 2023 मध्ये संयुक्त बैठक घेतली होती. त्या बैठकीत सांगोपांग चर्चाही झाली.  आमदार जगताप यांनी महसूल व वनविभागाच्या अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडे याबाब कैफीयत मांडली. या विभागाने राज्याच्या जलसंपदा विभागाकडे याबाबत मत मागविले होते. जलसंपदा विभागाने पूररेषेची फेरआखणी करण्यासाठी काय करावे लागणार याबाबत सूचना केल्या. सीना नदीचे रुंदीकरण व खोलीकरण अगोदर करायला हवे तरच पूररेषेची आखणी करता येईल असे या विभागाने सांगितले. या नदीवर शहर व शहराजवळ असलेल्या पुलांच्या लांबीरुंदीचे गणितही पाहणे गरजेचे आहे. सीना नदीची मूळ वहनक्षमता पुनर्स्थापित करावयाची असल्यास नदीपात्रात साचलेला गाळ काढणे, अतिक्रमण काढणे, गरजेचे आहे. काढलेला गाळ नदीकिनारी टाकून नगर शहराचे सुशोभिकरण करता येईल असे महापालिकेने म्हटले होते. त्यावरून किनारी रस्ता (कोस्टल रोड) तयार करता येऊ शकतो. त्यातून नदीचे मूळ पात्र पुनर्स्थापित होऊन त्या पात्रात पाऊस व अन्य पाण्याचा विसर्ग किती बसू शकतो ही लक्षात येईल. त्यासाठी महापालिकेच्या हद्दीतील 10 किलोमीटर लांब नदीचे खोलीकरण व रुंदीकरण होणे अत्यंत गरजेचे असल्याचे महापालिकेने म्हटले होते.  तशी शहराभोवतालची नदीची लांबी 14 किलोमीटर आहे. या भागात तिची प्रस्तावित रुंदी 20 ते 30 मीटर व प्रस्तावित खोली चार मीटर आहे. पूव 09.70 किलोमीटर लांबीचे काम झाले असले तरी उर्वरीत पुरे करावयाचे आहे. नदीचे रुंदीकरण व खोलीकरणासंदर्भात प्रकल्प मूल्यमापन समिती, राज्य कार्यकारी समिती, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, तांत्रिक मूल्यमापन समिती यांच्या बैठका झाल्या. दिल्लीतील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना आदींचा विचार करून 15व्या वित्त आयोगामार्फ आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन योजनेअंतर्गत सीना नदीचे खोलीकरण व रुंदीकरण तसेच भिंगार नाल्याचेही खोलीकरण व रुंदीकरण या कामांसाठी 20 कोटी 66 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आमदार संग्राम जगताप यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून सीना नदी व भिंगार नाल्याचे भाग्य त्यामुळे उजाळणार आहे. नगरमध्ये विकास कामांचा महासंग्राम कोरोना काळात नगर शहरातील विकास कामे काही प्रमाणात थांबली होती. परंतु, त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नगर शहरात विविध कामांसाठी भरीव निधी आणला. या निधीतून वाडिया पार्क, शहरातील अंतर्गत रस्ते, उपनगरातील रस्त्यांची कामे सुरु झाली आहेत. उद्यानांसाठी सहा कोटींचा निधी मिळाल्यामुुळे शहराच्या विकासात मोठी भर पडणार आहे. तसेच सीना नदी, भिंगारनाला सुशोभिकरणासाठी 20 कोटींचा निधी मिळाल्याने नगर शहराचे रुपडे बदलणार असल्याचे दिसून येत आहे. सीना नदी अतिक्रमणमुक्त होणार सीना नदी पात्रातील अतिक्रमण व गाळामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी नागरी वसाहतींमध्ये शिरते. यंदाही पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरलेे. पुराच्या पाण्याची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणीही केली होती. पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याची आ. जगताप यांनी गांभीर्याने दखल घेत सीना नदी सुशोभिकरण व अतिक्रमण मुक्त, रुंदीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मदत पुर्नवसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. याबाबत आ. जगताप तीन वर्षांपासून प्रयत्नशील होते. सीना नदीतील गाळ व अतिक्रमणे काढल्यास पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरणार नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पूर नियंत्रण निळ्या व लाल रेषेचा विषय मार्गी नागपूर, बोल्हेगाव, सावेडी, बालिकाश्रम रोड, नालेगाव, ठागणे मळा, काटवण खंडोबा रोड, स्टेशन भाग, पुणे महामार्ग, फुलसौंदर मळा, बाबर मळा या भागात पूर नियंत्रण रेषेचा विषय माग लागत नव्हता. परंतु, आमदार संग्राम जगताप यांच्या अथक प्रयत्नानंतर सीना नदी लगत असलेल्या पूर नियंत्रण निळ्या व लाल रेषेचा विषय माग लागला आहे. त्यामुळे जागा मालकांना आता जागा डेव्हलप करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Ahmednagar News: सीना नदी, भिंगार नाल्याचे भाग्य उजाळणार, खोलीकरण व रुंदीकरणासाठी 20 कोटी मंजूर Read More »

Iran-Israel Conflict : इस्रायल-इराण युद्धात अमेरिकेची एन्ट्री, ‘या’ देशाला दिला पाठिंबा

Iran-Israel Conflict :  इराणने इस्रायलला मोठा धक्का देत 400 मिसाईलने इस्रायलवर जोरदार हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे इस्रायलला मोठा नुकसान झाला असल्याची माहिती समोर येत आहे. यातच आता अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी इस्रायलला आपला पाठिंबा देत इराणला इशारा दिला आहे.  अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन म्हणाले की आज, माझ्या निर्देशानुसार, युनायटेड स्टेट्स सैन्याने इस्रायलच्या संरक्षणास सक्रियपणे पाठिंबा दिला आणि आम्ही अजूनही परिणामांचे मूल्यांकन करत आहोत. हा इस्रायलच्या लष्करी क्षमतेचा आणि अमेरिकन लष्कराचा दाखला आहे.   अमेरिकेचा इस्रायलला पूर्ण पाठिंबा आहे. मी सकाळ आणि दुपारचा काही भाग माझ्या संपूर्ण राष्ट्रीय सुरक्षा दलासह आणि इस्रायली लोकांशी सल्लामसलत करण्यासाठी सिच्युएशन रूममध्ये घालवला. राष्ट्रीय सुरक्षा दल इस्रायली अधिकारी आणि त्यांच्या समकक्षांच्या सतत संपर्कात आहे. मध्यपूर्वेतील घडामोडींवर अमेरिका लक्ष ठेवून आहे – बिडेन दरम्यान, इराणने इस्रायलवर केलेल्या बॅलेस्टिक मिसाईल हल्ल्यानंतर जो बिडेन म्हणाले की, अमेरिका मध्यपूर्वेत घडणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवून आहे आणि इस्रायलच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे. बिडेन म्हणाले की, उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि मी आमच्या राष्ट्रीय सुरक्षा टीमशी बोललो आहोत की अमेरिका या हल्ल्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यास आणि तेथील अमेरिकन कर्मचाऱ्यांचे संरक्षण करण्यास अमेरिका मदत करण्यास तयार आहे का. बिडेन यांनी आपल्या मुद्याचा पुनरुच्चार करत आम्ही पूर्णपणे इस्रायलच्या पाठीशी असल्याचे सांगितले. इराणी हल्ल्यादरम्यान, बिडेन यांनी अमेरिकन सैन्याला इराणी मिसाईल पाडण्याचे आदेश दिले. अमेरिकेने या प्रदेशात आपली लष्करी उपस्थिती वाढवली आहे. त्याच वेळी, वॉशिंग्टनमध्ये परराष्ट्र मंत्रालयात भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी झालेल्या बैठकीपूर्वी, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन म्हणाले की, इराणने 5 महिन्यांच्या कालावधीत दुसऱ्यांदा इस्रायलवर थेट हल्ला केला, ज्यामध्ये सुमारे 200 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे हे अस्वीकार्य आहे आणि संपूर्ण जगाने त्याचा निषेध केला पाहिजे.

Iran-Israel Conflict : इस्रायल-इराण युद्धात अमेरिकेची एन्ट्री, ‘या’ देशाला दिला पाठिंबा Read More »

LPG Gas Price Hike: ग्राहकांना धक्का, व्यावसायिक LPG सिलेंडर 48.50 रुपयांनी महाग, जाणून घ्या नवीन दर

LPG Gas Price Hike: ऑक्टोबर 2024 ची आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र या महिन्याच्या पहिल्याच दिवशी लोकांना महागाईचा मोठा धक्का बसला आहे. होय, आजपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये झाली आहे. 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 48.50 रुपयांनी महागला आहे. त्यामुळे आता दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1691.50 रुपयांवरून 1740 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचली आहे. नवरात्री, दसरा, दिवाळी या सणांच्या आधी महागडे सिलिंडर लोकांना त्रास देणार आहेत. IOCL वेबसाइटनुसार, हे दर आज 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू झाले आहेत. तेल कंपन्यांनी 14 किलोग्रॅमच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. ऑक्टोबर 2024 पासून गॅस सिलिंडरच्या नवीन किमती तेल विपणन कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 48.50 रुपयांनी वाढ केली आहे. दिल्लीत सिलेंडरची किंमत 1740 रुपये झाली आहे, जी आधी 1691 रुपये होती. कोलकातामध्ये, सिलिंडर 1850.50 रुपयांना मिळेल, जो पूर्वी 1802 रुपयांना मिळत होता. मुंबईत हा सिलेंडर 1692.50 रुपयांना मिळेल, जो पूर्वी 1644 रुपयांना मिळत होता. चेन्नईमध्ये सिलिंडर 1903 रुपयांना मिळेल जे आधी 1855 रुपये होते. जुलै महिन्यापासून 19 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमती सातत्याने वाढ गेल्या जुलै 2024 पासून 19 किलो LPG सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. 1 जुलै 2024 रोजी दिल्लीत या सिलिंडरची किंमत 30 रुपयांनी कमी झाली. पण ऑगस्ट 2024 मध्ये 19 किलोग्रॅमचा गॅस सिलिंडर 8.50 रुपयांनी महागला. सप्टेंबर महिन्यात दिल्लीत त्याची किंमत थेट 39 रुपयांनी वाढली होती.

LPG Gas Price Hike: ग्राहकांना धक्का, व्यावसायिक LPG सिलेंडर 48.50 रुपयांनी महाग, जाणून घ्या नवीन दर Read More »

Govinda Health Update: मोठी बातमी, अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात दाखल

Govind Helath Update: एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदा याच्या पायाला बंदुकीची गोळी असल्याची माहिती समोर आली आहे.  माहितीनुसार, स्वतःकडील बंदूक साफ करत असताना अनावधानाने स्ट्रीगर दाबले गेल्याने बंदुकीतून गोळी सुटली आणि गोविंदा याच्या पायाला लागली.  यानंतर जखमी झालेल्या गोविंदाला जवळच्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गोविंदाच्या पायावर शस्त्रक्रिया झाली असून तो आता सुखरूप असल्याची देखील माहिती समोर आली आहे.  तर दुसरीकडे याप्रकरणी जुहू पोलीसने पुढील तपास सुरू केला आहे.

Govinda Health Update: मोठी बातमी, अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात दाखल Read More »

Gondia News :  हजारो आदिवासी बांधव उतरले रस्त्यावर, सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा केला विरोध

Gondia News :  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला असून धनगरांना अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याला आदिवासींनी विरोध दर्शवला आहे.  त्यातच सोमवार 30 सप्टेंबर रोजी आदिवासी बहुल गोंदिया जिल्ह्यात हजारो आदिवासी बांधवांनी रस्त्यावर उतरत विशाल आक्रोश मोर्चा काढून विरोध दर्शवला. तर आदिवासी समाजाच्या आरक्षणात घुसखोरी खपवून घेतली जाणारा नाही असा इशारा शासनाला दिला. त्यामुळे राज्य शासनापुढे आता मोठे पेच निर्माण झाले आहे. सकल धनगर समाजाने एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी एक समिती नेमण्याची घोषणा केली होती. तसेच धनगड व धनगर हा शब्द एकच असल्याचा जीआर काढण्याचीही तयारी दर्शवली होती. पण त्यांच्या या घोषणेला आदिवासी आमदारांकडून कडाडून विरोध केला जात आहे. त्यातच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी देखील धनगरांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण दिल्यास आपण मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा देणार, असा इशारा दिला आहे.  असे असतानाच आता आदिवासी समाजकडूनही सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला जात आहे.  या अनुषंगाने सोमवारी गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी आदिवासी हक्क कृती समितीच्या माध्यमातून शासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल आक्रोश मोर्चा काढत विरोध दर्शवला. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयापुढे मोर्चाचे सभेत रुपांतर करण्यात आले. यावेळी आदिवासी हक्क कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सभेला मार्गदर्शन केल्यानंतर जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

Gondia News :  हजारो आदिवासी बांधव उतरले रस्त्यावर, सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा केला विरोध Read More »

Maharashtra Election : परवेज अशरफी निवडणुकीच्या रिंगणात, पक्षाकडे उमेदवारीची मागणी

Maharashtra Election :  राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी तसेच पक्षांनी देखील जोरदार तयारी सुरू केली आहे.   तर दुसरीकडे एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी इच्छुक उमेदवार यांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून अर्ज भरण्यासाठी औरंगाबाद येथे इच्छुक उमेदवारांची गर्दी होत आहे.  अहमदनगर जिल्ह्यातून ही इच्छुक उमेदवारांनी आपले नामांकन पक्षाकडे सादर केले. त्यात अहमदनगर शहरातून एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल केला आहे. तसेच नेवासा आणि राहुरी विधानसभा येथून ही पक्षाकडे अर्ज दाखल करण्यात आले आहे. परवेज अशरफी यांनी लोकसभेसाठी देखील अहमदनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र पक्षाने दिलेल्या आदेशानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. नुकतेच पैगंबर साहेब यांच्याविरोधात अपशब्द वापरणारे आणि भाजप नितेश राणे यांच्यावर कारवाईची मागणी साठी औरंगाबाद येथून मुंबई रॅली यशस्वी झाल्याने अहमदनगरच्या वतीने इम्तियाज जलील यांचा सत्कार करण्यात आले. यावेळी डॉ परवेज अशरफी, ताहर शेख, ऍड सलीम सय्यद, अमीर खान, इम्रान शेख, सफवान कुरेशी, बिलाल शेख, इस्माईल शेख आदी उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यावर डॉ परवेज अशरफी यांनी पत्रकारांशी बोलतांना संगितले की अहमदनगर जिल्ह्यातून सर्वच 12 विधानसभेतील इच्छुक पक्षाकडे दावेदारी अर्ज दाखल करणार आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने महाविकस आघाडीला भरभरून मतदान केले. परंतु मविआ ने लोकसभेत एकही उमेदवार मुस्लिम समाजाचा दिलेला नाही.आणि औरंगाबाद मधून इम्तियाज जलील यांना पराभव करण्यासाठी दोन्ही गटबंधनने पूर्ण शक्ती लावली.  तसेच विधान परिषदेतही मुस्लिम समाजाला माविआ ने निराशा केले. एकही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली नाही. याचाच अर्थ माविआला मुस्लिम अल्संख्यांक समाजाचे मत पाहिजे परंतु मुस्लिम समाजाचा नेता नको. महायुती बद्दल बोलतांना डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले की हे तर महाविकास आघाडी पेक्षा एक पाऊल पुढे आहे. यांना मुस्लिम अल्पसंख्यांक समाजच नको मुख्यमंत्री ज्या व्यक्तीने प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल अपशब्द वापरले त्यांचे सवरक्षण करतात.  तर गृहमंत्री त्यांची सुरक्षेत वाढ करून हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की जो मुस्लिम समजविरोधत बोलेल त्यांना सरकार पूर्ण सुरक्षा देईल. यांचे आमदार मुस्लिम समजला घुसून मारण्याची धमकी देतात आणि गृहमंत्री त्यांची पाठ राखण करतात. यावरून स्पष्ट दिसते की ना महाविकास आघाडी ना महायुती यांना मुस्लिम समाजाची गरज आहे.  जर मुस्लिम समाज आपल्या सोबत इतर समाज घेऊन इतर समाजाचे लोकांना एकत्र घेऊन येणारे विधान सभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत असेल तर चांगलेच आहे. प्रत्येक समाजाचा नेतृत्व विधानसभेत असणे गरजेचे असल्याने उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. सध्या अहमदनगर मध्ये सामान्य नागरिकांत चर्चा आहे की अहमदनगरचा भावी आमदार सामान्य जनतेला पाहिजे. वर्षानुवर्ष जी घराणेशाही चालली आहे त्याला कुठे तरी थांबवणे गरजेचे आहे. अहमदनगर शहराला असा आमदार पाहिजे जो प्रत्येक समाजाला एकत्र घेऊन चालेल. जाती जातीत तेढ निर्माण करून दंगल घडवणारा आणि स्वतःची राजकीय पोळी भाजवणार लोक प्रतिनिधी नको. यामुळे पक्षाकडे मी उमेदवारी मागितली आहे. मला आशा आहे की पक्ष अहमदनगर मधून उमेदवारी देताना माझा विचार करेल.

Maharashtra Election : परवेज अशरफी निवडणुकीच्या रिंगणात, पक्षाकडे उमेदवारीची मागणी Read More »

2024 Maruti Suzuki Dzire ‘या’ दिवशी होणार लॉन्च, फर्स्ट क्लास फिचर्ससह मिळणार खुपकाही…

2024 Maruti Suzuki Dzire: जर तुम्ही देखील नवीन डिझायर खरेदीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. माहितीनुसार, मारूती सुझुकी आपली नवीन कार 2024 Maruti Suzuki Dzire 4 नोव्हेंबर रोजी भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करणार आहे.   2024 Dezire ला 6-स्लॅट ग्रिल,  हेडलॅम्प आणि LED DRLs, नवीन डिझाइन केलेले बंपर आणि बरेच काही असलेला नवीन फेस मिळेल. हे हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर देखील तयार करण्यात आले असून नवीन के-सिरीज इंजिन नवीन कारमध्ये उपलब्ध होणार आहे. केबिनमध्ये मोठे बदल होणार   नवीन मारुती सुझुकी डिझायरमध्ये फुल एलईडी लाइटिंग, ORVM वरील कॅमेरा, 360 डिग्री कॅमेरा सेटअप यासारखी फीचर्स मिळू शकतात. केबिनचा फोटो अजून समोर आलेला नाही पण बदललेला डॅशबोर्ड, अपडेटेड टचस्क्रीन सिस्टीम, वायरलेस ऍपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो, क्रूझ कंट्रोल, पुश बटन स्टार्ट/स्टॉप आणि ऑटो क्लायमेट कंट्रोल यांसारखे फीचर्स यात असणार अशी चर्चा आहे.    याशिवाय, कंपनी नवीन Dezire सह लेव्हल 2 ADAS, मानक 6 एअरबॅग्ज, हाय बीम असिस्ट, ओम्नी-डायरेक्शनल कॅमेरा, इमर्जन्सी स्टॉप सिग्नल आणि ऑटोमॅटिक हेडलॅम्प यांसारखी फीचर्स मिळवू शकतात.  किंमत किती असू शकते?  या कारमध्ये 1.2-लिटर तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन आढळू शकते जे 81 bhp पॉवर आणि 108 Nm पीक टॉर्क बनवते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सने सुसज्ज असेल आणि यावेळी कंपनी ग्राहकांना ऑटोमॅटिक किंवा सीव्हीटी गिअरबॉक्सचा पर्यायही देऊ शकते.  असा अंदाज वर्तवला जात आहे की ती 6.50 लाख रुपये एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च केली जाऊ शकते.

2024 Maruti Suzuki Dzire ‘या’ दिवशी होणार लॉन्च, फर्स्ट क्लास फिचर्ससह मिळणार खुपकाही… Read More »

IMD Alert Maharashtra: सावधान, पावसाचा रेड अलर्ट, वीज पडून 3 जणांचा मृत्यू

IMD Alert Maharashtra: पुन्हा एकदा मुंबईसह राज्यातील इतर भागात मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. यातच आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने  मुंबई आणि त्याच्या आसपासच्या ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी गुरुवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. पावसामुळे आज मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. पोलिसांनी सर्व नागरिकांना अत्यावश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. सर्वांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे ठाण्यातील मुंब्रा बायपासवर 25 सप्टेंबर रोजी रात्री 9:30 वाजता दरड कोसळल्याने परिसरात 3 तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडी झाली होती. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे काही विमानांना उतरण्याची परवानगी देण्यात आली नाही. पावसामुळे अनेक गाड्याही थांबवाव्या लागल्याने मोठा विस्कळीत झाला. मुंबईच्या ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांत वीज पडून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे नोकरदारांचे हाल होत आहेत. पावसामुळे रुळावरून घसरलेल्या ट्रॅफिकमध्ये घरी परतणारे लोक अडकले.

IMD Alert Maharashtra: सावधान, पावसाचा रेड अलर्ट, वीज पडून 3 जणांचा मृत्यू Read More »

Israel Attack On Lebanon : मोठी बातमी, इस्रायल लेबनॉनवर जमिनी हल्ला करणार, बिडेनने दिला इशारा

Israel Attack On Lebanon :  गेल्या काही दिवसांपासून इस्रायलकडून लेबनॉनवर हवाई हल्ले करण्यात येत आहे. तर बुधवारी या हल्ल्यांना प्रतिउत्तर म्हणून हिजबुल्लाकडून इस्रायलवर हवाई हल्ला करण्यात आला आहे. तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे.इस्रायल लेबनॉनमध्ये जमिनीवर हल्ला करण्याची तयारी करत आहे.  इस्रायलच्या लष्करी प्रमुखांनी सैन्यांना लेबनॉनमध्ये हिजबुल्लासोबतच्या वाढत्या संघर्षाच्या दरम्यान जमिनीवर आक्रमणासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. इस्रायलचा हल्ला असाच सुरू राहिल्यास हिजबुल्लाला पूर्ण पाठिंबा देऊ, असे इराणने म्हटले आहे. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी लेबनॉनमध्ये जर जमिनीवर हल्ला केला तर ते ‘ऑल आऊट वॉर’ असेल, असे म्हटले आहे. बुधवारी इस्त्रायली हल्ल्यात किमान 72 लोक ठार आणि 233 जखमी झाल्याची माहिती लेबनीज आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. “तुम्ही ओव्हरहेड जेट्सचा आवाज ऐकत आहात. आम्ही दिवसभर हल्ला करत आहोत. हे तुमच्या संभाव्य प्रवेशासाठी आणि हिजबुल्लाला कमकुवत करण्यासाठी मैदान तयार करण्यासाठी आहे,” इस्रायली सैन्याचे प्रमुख लेफ्टनंट जनरल हर्झी हॅलेवी यांनी इस्रायली सैन्याला सांगितले आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले – लेबनॉनमध्ये युद्ध होऊ नये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी यूएन जनरल असेंब्लीला सांगितले की, “लेबनॉनमध्ये युद्ध होऊ नये. आम्ही इस्रायलला लेबनॉनमधील हल्ले थांबवण्याची आणि हिजबुल्लाला इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले थांबवण्याची विनंती करतो.” इस्त्रायलने हिजबुल्लाहविरोधात सोमवारी सुरू केलेल्या मोहिमेपासून लेबनॉनमध्ये 600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. UN च्या आकडेवारीनुसार लेबनॉनमध्ये सुमारे 90,000 लोक विस्थापित झाले आहेत. हे 110,000 लोकांव्यतिरिक्त आहेत ज्यांनी तणाव वाढण्यापूर्वी घरे सोडून पळ काढला.

Israel Attack On Lebanon : मोठी बातमी, इस्रायल लेबनॉनवर जमिनी हल्ला करणार, बिडेनने दिला इशारा Read More »