DNA मराठी

DNA Marathi News

Vijay Wadettiwar

Vijay Wadettiwar: अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतकरी संकटात; विजय वडेट्टीवारांनी मांडली शेतकऱ्यांची स्थिती

Vijay Wadettiwar: गेल्या 24 तासांत विदर्भ आणि मराठवाड्यात झालेली गारपीट आणि दुसरीकडे ‘शक्तिपीठ महामार्गा’साठी शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, यावरून काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची स्थिती मांडली. विदर्भ आणि मराठवाड्यातील नुकसानीचा पाढा वाचताना वडेट्टीवार म्हणाले की नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर ,नांदेड ,परभणी भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने ज्वारी, गहू, हरभरा ही काढणीला आलेली पिके मातीमोल झाली आहेत. आंबा आणि द्राक्ष बागायतदारांचेही अतोनात नुकसान झाले आहे. हवामान खात्याने सोलापूर, परभणी, नांदेड, धाराशीव भागात पुढील दोन दिवस पावसाचा इशारा दिला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे असं वडेट्टीवार म्हणाले. मागील अतिवृष्टीची मदत अजून मिळालेली नाही, धानाला बोनस जाहीर करून देण्यात आलेला नाही आणि आता पुन्हा संकट आले आहे. सरकारने नियम-निकष बाजूला ठेवून तातडीने रोख मदत द्यावी आणि पंचनाम्यांचे केवळ आदेश न देता प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. एकीकडे अवकाळी पावसाने शेतकरी उध्वस्त होत असताना दुसरीकडे शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या घराघरांवर नोटिसा चिकटवून दहशत निर्माण केली जात आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी सुरू आहे. सहजपूर-जवळा सारख्या 600 लोकसंख्येच्या गावात 1000 पोलिसांचा फौजफाटा तैनात करून मोजणी प्रक्रिया राबवली जात आहे. हे लोकशाहीला भूषणावह नाही. धाराशीव, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी 23 फेब्रुवारीला या प्रकल्पाविरोधात एल्गार पुकारला होता. हा प्रकल्प रद्द करावा, अशी जनभावना असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. एकीकडे अस्मानी संकटामुळे शेतकरी खचला आहे, तर दुसरीकडे सुलतानी संकटाप्रमाणे सरकार पोलीस बळाचा वापर करून त्यांच्या जमिनी हिसकावत आहे. सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी विधिमंडळ नेते विजय वडेटीवार यांनी केली. विधानसभा अध्यक्ष यांनी याची दखल घेऊन सरकारला निवेदन करण्याचे निर्देश दिले.

Vijay Wadettiwar: अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतकरी संकटात; विजय वडेट्टीवारांनी मांडली शेतकऱ्यांची स्थिती Read More »

sujay vikhe

Sujay Vikhe: सुजय विखे पाटील यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी निवड; अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण

Sujay Vikhe : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश संघटनात महत्त्वपूर्ण बदल करत भारतीय जनता पक्षने अहिल्यानगर जिल्ह्याचे युवा नेतृत्व आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड जाहीर केली आहे. या निवडीमुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. डॉ. सुजय विखे पाटील हे जिल्ह्यातील सक्रिय, अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. खासदार म्हणून त्यांनी विविध विकासकामांसाठी पाठपुरावा केला असून युवक आणि ग्रामीण भागातील प्रश्न मांडण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या संघटन कौशल्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली असल्याचे मानले जात आहे. प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे पक्ष संघटना अधिक मजबूत होईल आणि राज्यभरात भाजपची ताकद वाढेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या निवडीमुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात राज्याच्या राजकारणात डॉ. सुजय विखे पाटील यांची भूमिका अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Sujay Vikhe: सुजय विखे पाटील यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी निवड; अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण Read More »

tata punch ev

मस्त मस्त फिचर्स अन् जबरदस्त बॅटरी; अखेर Tata Punch EV लाँच

Tata Punch EV : भारतीय बाजारात टाटाने आपली नवीन इलेक्ट्रिक कार टाटा पंच लाँच केली आहे. ही इलेक्ट्रिक मायक्रो-एसयूव्ही आता 30 किलोवॅट आणि 40 किलोवॅट बॅटरी पर्यायांसह येते आणि एआरएआयनुसार 468 किमी पर्यंतची रेंज देते. किंमत आणि बॅटरी पर्याय नवीन पंच ईव्हीची एक्स-शोरूम किंमत 9.69 लाख पासून सुरू होते आणि 12.59 लाख पर्यंत जाते. बॅटरी-अ‍ॅज-अ-सर्व्हिस (BaaS) योजनेअंतर्गत, ती फक्त 6.49 लाख च्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येते. ती दोन बॅटरी पर्यायांसह येते: 30 किलोवॅट आणि 40 किलोवॅट. 40 किलोवॅट बॅटरी आजीवन वॉरंटीसह येते. 65 किलोवॅट डीसी फास्ट चार्जर कारला फक्त 26 मिनिटांत 20 ते 80 टक्के चार्ज करतो. स्मार्ट व्हेरिएंट (30 किलोवॅट प्रति तास) हे पंच ईव्हीचे बेस मॉडेल आहे, ज्याची किंमत 69 लाख आहे. ते 88 पीएस पॉवर आणि 154 एनएम टॉर्क निर्माण करते. हा व्हेरिएंट अंदाजे 365-375 किमीची रेंज देतो. यात सहा एअरबॅग्ज, टीपीएमएस, ईएससी, हिल होल्ड, ऑटो क्लायमेट कंट्रोल, ड्राइव्ह मोड्स आणि एलईडी डीआरएल सारख्या आवश्यक फिचर्ससह येतो. स्मार्ट+ व्हेरिएंट (30 किलोवॅट प्रति तास / 40 किलोवॅट प्रति तास) हा व्हेरिएंट अधिक फिचर्ससह येतो आणि त्याची किंमत 10.29 लाख पासून सुरू होते. यात 8-इंच टचस्क्रीन, वायर्ड अ‍ॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, स्टीअरिंग कंट्रोल्स, रियर पॉवर विंडो आणि सेंट्रल लॉकिंग आहे. 40 किलोवॅट प्रति तास मॉडेलमध्ये रियर कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि इको मोड सारख्या अतिरिक्त फिचर्स देखील आहेत. अ‍ॅडव्हेंचर प्रकार (40 किलोवॅट प्रति तास) 11.59 लाख रुपयांची किंमत असलेला हा प्रकार मोठ्या बॅटरी पॅकसह येतो आणि 468 किमी पर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. तो 129 पीएस पॉवर देतो. क्रूझ कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल, पुश-बटण स्टार्ट, इलेक्ट्रिक ओआरव्हीएम आणि 13-इंच चाके यासारख्या फिचर्समुळे ते लांब पल्ल्याच्या आणि हायवे ड्रायव्हिंगसाठी आदर्श बनते. एम्पॉवर्ड प्रकार (40 किलोवॅट प्रति तास) हा व्हेरियंट प्रीमियम फिचर्ससह येतो आणि त्याची किंमत 12.29 लाख रुपये आहे. यात 10.25-इंच टचस्क्रीन आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, 360-डिग्री कॅमेरा, एअर प्युरिफायर, रेन-सेन्सिंग वायपर आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटर सारखी अँडव्हान्स फिचर्स आहेत. ज्यांना तंत्रज्ञान आणि आराम दोन्ही हवे आहेत त्यांच्यासाठी हे परिपूर्ण आहे. एम्पॉवर्ड प्लस एस (टॉप व्हेरिएंट) 12.59 लाख रुपयांची किंमत असलेले हे टॉप-ऑफ-द-लाइन पंच ईव्ही मॉडेल आहे. यात व्हॉइस-अ‍ॅक्टिव्हेटेड सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस चार्जिंग, लेदरेट सीट्स, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि ऑटो-डिमिंग आयआरव्हीएम सारख्या लक्झरी फीचर्स आहेत. जर तुम्हाला पूर्णपणे फीचर-लोडेड इलेक्ट्रिक एसयूव्ही हवी असेल, तर हा सर्वोत्तम पर्याय आहे. कोणता व्हेरिएंट सर्वोत्तम आहे? जर तुम्ही बजेटमध्ये लांब रेंज आणि आवश्यक फीचर्स शोधत असाल, तर स्मार्ट+ (40 किलोवॅट प्रति तास) हा सर्वात जास्त किमतीचा व्हेरिएंट आहे. लांब रेंज आणि चांगल्या ड्रायव्हिंग अनुभवासाठी, अ‍ॅडव्हेंचर व्हेरिएंट हा एक चांगला पर्याय आहे. आणि जर तुम्हाला प्रीमियम फीचर्स हवे असतील, तर एम्पॉवर्ड किंवा एम्पॉवर्ड प्लस एस तुमच्यासाठी योग्य असेल.

मस्त मस्त फिचर्स अन् जबरदस्त बॅटरी; अखेर Tata Punch EV लाँच Read More »

manoj jarange

Manoj Jarange : राज्य सरकारला 26 फेब्रुवारीपर्यंतचा अल्टिमेटम; मनोज जरांगे मोठा निर्णय घेणार?

Manoj Jarange : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 26 फेब्रुवारीपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. जालन्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांना पुरेसा निधी दिला जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सरकार या संस्थांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्हा येथील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीवरून झालेल्या वादात एका महिलेला कथितरित्या निर्वस्त्र करून मारहाण करण्यात आल्याच्या घटनेचा त्यांनी तीव्र निषेध केला. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. काही आरोपींना अटक झाल्याची माहिती असली तरी संपूर्ण घटनेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. रंजना नागापुरकर प्रकरणावर बोलताना, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव घेत त्यांच्या तसेच संबंधित सहकाऱ्यांची चौकशी करून अटक करण्याची मागणी केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून पीडित महिलेला न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. शिंदे समितीबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नसल्याचे सांगत त्यांनी विखे पाटील यांच्याशी चर्चा झाल्याचे नमूद केले. मराठा आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे अद्याप मागे घेतले नसल्याबद्दलही त्यांनी सरकारला जाब विचारला. 26 फेब्रुवारीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास पुढील भूमिका जाहीर करण्यात येईल आणि त्यानंतर कोणाचेही ऐकणार नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

Manoj Jarange : राज्य सरकारला 26 फेब्रुवारीपर्यंतचा अल्टिमेटम; मनोज जरांगे मोठा निर्णय घेणार? Read More »

ST Bus

Pratap Sarnaik: आता… ‘ गाव तिथे एसटी ’ नव्हे… ‘ आदिवासी पाडा, तिथे एसटी ’; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Pratap Sarnaik : सह्याद्री व मेळघाटच्या कुशीत, धुक्याने वेढलेल्या डोंगरदऱ्यांमध्ये, आजवर केवळ पायवाटांनीच ओलांडलेले अंतर आता ‘लालपरी’ च्या चाकांनी मोजले जाणार आहे! राज्यातील दुर्गम आदिवासी पाड्यापर्यंत एसटीची सेवा पोहोचवण्याचा ऐतिहासिक संकल्प परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला. “आता केवळ गाव तिथे एसटी नाही, तर आदिवासी पाडा तिथे एसटी,” असा ठाम निर्धार करत त्यांनी विकासाचा नवा अध्याय सुरू केल्याची घोषणा केली. ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी ’ मिडी बसेस – विकासाची नवी वाट राज्य परिवहन महामंडळ ९ मीटर लांबीच्या, ३५ आसनी अशा १०० अत्याधुनिक मिडी बसेस खरेदी करीत असून या बसेसना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ असे प्रेरणादायी नामकरण करण्यात येणार आहे. अरुंद रस्ते, तीव्र चढ-उतार आणि वळणावळणाच्या घाटरस्त्यांवरून सहज धावू शकतील, अशा या बसेस खास करून आदिवासी पाड्यांसाठीच नियोजित आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या आठ दशकांत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एसटी पोहोचली. आज तब्बल ९३% लोकसंख्या एसटी सेवेशी जोडलेली आहे. तरीही सह्याद्री व मेळघाटच्या दऱ्याखोऱ्यातील अनेक पाडे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूरच राहिले होते. मोठ्या बसेसना तिथे प्रवेश शक्य नव्हता; त्यामुळे शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी आदिवासी बांधवांना अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत होती.आता मात्र ही पायपीट थांबणार आहे. पायवाटांवरून चाकवाटांकडे… ही केवळ बससेवा नाही, तर सामाजिक समावेशकतेचा सेतू आहे. शिक्षणासाठी शहरात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, आरोग्यसेवेसाठी धाव घेणाऱ्या मातांसाठी आणि रोजगाराच्या शोधात निघालेल्या तरुणांसाठी ही ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी ’ बस म्हणजे आशेचा किरण ठरणार आहे. मंत्री सरनाईक यांनी आशावाद व्यक्त करत सांगितले की, “दुर्गम भागातील आपला आदिवासी समाज आता एसटीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राशी जोडला जाईल. विकासाची गंगा प्रत्येक पाड्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा निर्धार आहे.” विकासाचा नवा संकल्प ‘ लालपरी ’च्या चाकांमध्ये आता केवळ प्रवास नाही, तर परिवर्तनाची गती दडलेली आहे. डोंगर-दऱ्यांतील शांत पाड्यांवर लवकरच एसटीचा हॉर्न घुमेल आणि त्या आवाजात विकास, समता आणि संधींची नवी पहाट दडलेली असेल. असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

Pratap Sarnaik: आता… ‘ गाव तिथे एसटी ’ नव्हे… ‘ आदिवासी पाडा, तिथे एसटी ’; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक Read More »

bhiwandi municipal corporation

Bhiwandi Municipal Corporation : भिवंडी महापौर निवडणूक, बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई होणार; रवींद्र चव्हाणांची घोषणा

Bhiwandi Municipal Corporation : भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात बंडखोरी करणाऱ्या नारायण चौधरी आणि त्यांच्याबरोबरच्या नगरसेवकांवर कारवाई केली जाणार असल्याची घोषणा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केली. भाजपाच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन केल्यानंतर मुंबई कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत रवींद्र चव्हाण बोलत होते. भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यावेळी उपस्थित होते. यावेळी चव्हाण म्हणाले की, महापौरपदासाठी भिवंडीच्या स्थानिक समितीकडून बहुमताने नारायण चौधरी यांचे नाव पाठविण्यात आले होते. त्यानुसार पक्षाकडून चौधरी यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आले होते. मात्र बऱ्याच चर्चेअंती अखेर स्थानिक पातळीवर कुठल्याही स्वरुपाचे वाद टाळण्यासाठी भाजपा प्रदेश स्तरावर स्नेहा पाटील यांना पक्षाच्या महापौरपदाच्या उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. चौधरी यांचे कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटील यांच्यासोबतचे स्थानिक पातळीवरचे मतभेद लक्षात घेता वाद टाळण्यासाठी महापौर पदाचा उमेदवार बदलण्याचा निर्णय प्रदेश स्तरावर पक्षहितासाठी घेण्यात आला. त्यानंतरही नाराज असलेल्या चौधरी आणि त्यांच्या बरोबरच्या नगरसेवकांनी बंडखोरी करू नये यासाठी अखेरपर्यंत अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र दुर्दैवाने त्या प्रयत्नांना यश आले नाही असे चव्हाण यांनी नमूद केले. तसेच बंडखोरी करणाऱ्या सर्व नगरसेवकांवर कारवाई करणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. भिवंडी महापौर निवडणुकीत भाजपचे बंडखोर नारायण चौधरी यांना 46 मतं मिळाली आहे. तर भाजपच्या स्नेहा पाटील यांना 16 मतं मिळाली आहे.

Bhiwandi Municipal Corporation : भिवंडी महापौर निवडणूक, बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई होणार; रवींद्र चव्हाणांची घोषणा Read More »

Vikhe Patil

Vikhe Patil on Rohit Pawar: अजितदादा हयात असताना त्यांना त्रास दिला अन्…, विखे पाटलांचा रोहित पवारांवर हल्लाबोल

Vikhe Patil on Rohit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर आता त्यांचा अपघात की घातपात यावरून रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत संशय व्यक्त केला आहे. यावरती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले आहे. अजितदादा ज्यावेळेस हयात होते तेव्हा रोहित पवार तसेच शरद पवार हे त्यांच्याशी कसे वागले हे राज्याच्या जनतेला माहित आहे. तुम्ही दादांना कधीच सन्मान मिळवून दिला नाही तसेच त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी देखील तुम्हीच नाकारली याचं प्रथमता उत्तर द्या अशा शब्दात विखे पाटलांनी शरद पवारांवर देखील टीका केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काही दिवसांपूर्वी बारामती येथील विमानतळावरती विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर अनेक दिवस उलटले असतानाही तपास संथ गतीने सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला तसेच दादांचा अपघात नव्हे तर घातपात होता असा संशय देखील पवारांनी व्यक्त केला. यावर मंत्री राधाकृष्ण विखे यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की, झालेली घटना दुर्दैवीच आहे याचं आम्हालाही दुःख आहे. घटनेची सत्यता जाणून घेण्याचं अधिकार कुटुंबीयांसह राज्यातील जनतेला आहे. त्या पद्धतीने तपास कार्य सुरू आहे. मात्र रोहित पवार सातत्याने माध्यमं समोर येऊन वेगवेगळी माहिती देत आहेत सर्व प्रकरण चौकशी मध्ये असल्याने याची योग्य ती चौकशी होईल. तसेच यावेळी बोलताना मंत्री विखे म्हणाले, अजित पवार हे हयात असताना रोहित पवार तसेच शरद पवार हे त्यांच्याशी कसे वागले हे राज्यातील जनतेने पाहिले आहे. त्यांना कधीच सन्मान जनक वागणूक ही त्यांच्याकडून देण्यात आली नाही. काँग्रेसच्या काळात राष्ट्रवादीला जास्त जागा मिळून देखील मुख्यमंत्री होण्याची संधी कोणी नाकारली याचे उत्तर प्रथमता त्यांनी द्यावी अशा शब्दात मंत्री विखे यांनी शरद पवार यांच्या नाम उल्लेख टाळत त्यांच्यावरती देखील जोरदार निशाणा साधला. अजित पवारांच्या निधनानंतर वीस दिवस उलटले असताना देखील तपास कार्य अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने आमदार रोहित पवार यांनी दोन वेळेस पत्रकार परिषद घेत अनेक महत्त्वाचे मुद्दे यामध्ये मांडले व अजित पवारांचा घातपात झाल्याचा संशय देखील त्यांनी वेळोवेळी व्यक्त केला तसेच तपास यंत्रणेवर देखील संशय व्यक्त केला. याचबरोबर सत्ताधाऱ्यांवर ती देखील या घटनेवरून जोरदार निशाणा साधला यामुळे रोहित पवारांनी केलेले आरोप तथ्य आहे की नाही हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

Vikhe Patil on Rohit Pawar: अजितदादा हयात असताना त्यांना त्रास दिला अन्…, विखे पाटलांचा रोहित पवारांवर हल्लाबोल Read More »

crime

Ahilyanagar Crime : राहुरीत अपहरण, पाच दिवस अत्याचार अन् जंगलातून सुटका…

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे एक धक्कादायक घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तब्बल पाच दिवस जंगलात तिला ठेवत तिच्यावरती अत्याचार केल्याची धक्कादायक घटना राहुरीत घडली आहे. या प्रकरणातील तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे मात्र घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्या आक्रमक झाले असून गाव बंदची हाक देण्यात आलेली आहे. यामुळे राहुरीत राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे आदिवासी कुटुंबातील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना 13 फेब्रुवारी रोजी घडली. कॉलेजला जात असल्याचे सांगून मुलगी घराबाहेर पडली होती मात्र ती परतलीच नाही. या मुलीचे अपहरण करून तिला पाच दिवस जंगलात ठेवून तिच्यावरती अत्याचार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलीस स्थानकात जाऊन फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलीस पथकाने संबंधित मुलीच्या मोबाईलचे लोकेशन व तांत्रिक साह्याने पोलिसांनी तपास यंत्रणा वेगाने हलवली. पोलीस पथकाने तातडीने पावले उचलत या प्रकरणी तिघा जणांना अटक केली आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने दिलेली माहिती अशी की घटनेतील आरोपीने नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ला जवळील परिसरात मुलीला अपहरण करून घेऊन गेला होता. यानंतर पोलिसांनी तिची सुटका केली आणि तीन जणांना अटक केली आहे.

Ahilyanagar Crime : राहुरीत अपहरण, पाच दिवस अत्याचार अन् जंगलातून सुटका… Read More »

mukesh ambani

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, रिलायन्स 7 वर्षांत करणार 10 लाख कोटींची गुंतवणूक

Mukesh Ambani : नवी दिल्ली येथे झालेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी एक महत्त्वाकांक्षी रोडमॅप सादर केला, ज्यामध्ये जिओला भारतातील आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) क्रांतीच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले. मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ पुढील सात वर्षांत संयुक्तपणे 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. ही गुंतवणूक एआय पायाभूत सुविधा, डेटा सेंटर आणि स्वदेशी एआय मॉडेल्स विकसित करण्यासाठी खर्च केली जाईल. ही गुंतवणूक भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या संपूर्ण लँडस्केपमध्ये बदल घडवून आणेल. ही एक सट्टेबाजीची गुंतवणूक नाही, तर राष्ट्र उभारणीसाठी शिस्तबद्ध भांडवल आहे, ज्यामुळे दशकांपर्यंत चिरस्थायी आर्थिक मूल्य आणि धोरणात्मक ताकद निर्माण होईल. एआयचा सर्वोत्तम टप्पा अजून येणे बाकी शिखर परिषदेतील भाषणादरम्यान, अंबानींनी एआयच्या भविष्यावर भर देत म्हटले की एआयचा सर्वोत्तम टप्पा अजून येणे बाकी आहे. हे तंत्रज्ञान भारतासाठी प्रचंड समृद्धी आणि संधींच्या नवीन युगाची सुरुवात करू शकते. एआय काही लोकांच्या हातात सत्ता केंद्रित करेल की सर्वांसाठी संधी निर्माण करेल याबद्दल सुरू असलेल्या जागतिक चर्चेचा त्यांनी संदर्भ दिला. मुकेश अंबानी यांनी भारताला 21 व्या शतकातील एआय सुपरपॉवर बनवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि त्याला रिलायन्सचा आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि धाडसी प्रयत्न म्हटले. एआयमुळे नोकऱ्या जाणार नाहीत एआयमुळे नोकऱ्या जाण्याच्या भीतीबाबत अंबानी म्हणाले की एआय नोकऱ्या काढून टाकणार नाही, तर त्याऐवजी उच्च-कुशल रोजगारासाठी नवीन संधी निर्माण करेल. एआय भारतातील तरुण प्रतिभेला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुकेश अंबानी म्हणाले की एआयच्या बाबतीत जग एका चौरस्त्यावर आहे. एक मार्ग महागड्या आणि डेटा-चालित एआयकडे घेऊन जातो, तर दुसरा रिलायन्सचा परवडणाऱ्या आणि सुलभ एआयचा दृष्टिकोन आहे जो प्रत्येक भारतीयाला सक्षम करतो. त्यांनी स्पष्ट केले की रिलायन्सचे ध्येय भारतातील प्रत्येक नागरिकासाठी एआय सुलभ करणे आहे, केवळ श्रीमंतांसाठी तंत्रज्ञान नाही. ज्याप्रमाणे कंपनीने मोबाइल डेटाची किंमत लक्षणीयरीत्या कमी केली, त्याचप्रमाणे आता एआय इन्फरन्सिंगचा खर्च देखील कमी करेल. अंबानी यांनी यावर भर दिला की भारत एआय भाड्याने घेऊ शकत नाही. त्यांचे ध्येय कनेक्टिव्हिटीइतकेच सर्वव्यापी आणि परवडणारे बनवणे आहे.

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, रिलायन्स 7 वर्षांत करणार 10 लाख कोटींची गुंतवणूक Read More »

phonepe

PhonePe : पिनची आवश्यकता नाही! फक्त फिंगरप्रिंट अन् फेस आयडीने करता येणार PhonePe वर पेमेंट

PhonePe : लोकप्रिय पेमेंट प्लॅटफॉर्म फोनपेने अलीकडेच भारतातील युजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच केले आहे. युजर्स आता बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन वापरून त्यांचे यूपीआय पेमेंट करू शकतात. त्यामुळे आता लहान व्यवहारांसाठी प्रत्येक वेळी यूपीआय पिन टाकण्याची आवश्यकता नाही. फक्त तुमचा फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी वापरा आणि पेमेंट त्वरित प्रक्रिया केली जाईल. हा बदल डिजिटल पेमेंटला आणखी जलद, सुरक्षित आणि अधिक वापरकर्ता-अनुकूल बनवतो. बायोमेट्रिक पेमेंट कसे करावे या नवीन फोनपे फीचरसह, वापरकर्ते बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी त्यांचे बँक खाते अँपशी लिंक करू शकतात. सुरुवातीला, तुम्हाला एकदाच यूपीआय पिन आणि बायोमेट्रिक्स दोन्ही सेट करावे लागतील. त्यानंतर, 5000 पर्यंतच्या पेमेंटसाठी पिनऐवजी फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी वापरता येईल. ही प्रक्रिया केवळ जलदच नाही तर सुरक्षित देखील आहे, कारण डिव्हाइस-स्तरीय बायोमेट्रिक सुरक्षा तुमचे खाते सुरक्षित ठेवते. कसे सेट करायचे? फोनपे वर बायोमेट्रिक पेमेंट सेट करणे खूप सोपे आहे. प्रथम, अँप उघडा, प्रोफाइलवर जा आणि पेमेंट्स व्यवस्थापित करा पर्याय निवडा. त्यानंतर, बायोमेट्रिक पे वर टॅप करा आणि तुमच्या बँक खात्यासाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सक्षम करा. सुरुवातीला, तुम्हाला पिन आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण दोन्ही वापरावे लागतील, परंतु त्यानंतर, लहान व्यवहारांसाठी फक्त बायोमेट्रिक प्रमाणीकरण पुरेसे असेल. आता, युजर्स गर्दीच्या किंवा घाईच्या परिस्थितीतही सहजपणे पेमेंट करू शकतात. शिवाय, हा बदल आरबीआय आणि एनपीसीआयच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार आला आहे, जे अधिकृतपणे यूपीआय प्लॅटफॉर्मवर बायोमेट्रिक प्रमाणीकरण ओळखतात. हे केवळ पेमेंटला गती देत नाही तर सुरक्षा आणि वापरकर्ता अनुभव देखील सुधारते. हे फीचर सुरुवातीला अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी आणले गेले आहे, तर ते टप्प्याटप्प्याने iOS वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केले जाईल. भविष्यात, हे फिचर्स इतर यूपीआय-आधारित अँपमध्ये देखील उपलब्ध असू शकते.

PhonePe : पिनची आवश्यकता नाही! फक्त फिंगरप्रिंट अन् फेस आयडीने करता येणार PhonePe वर पेमेंट Read More »