DNA मराठी

DNA Marathi News

Maharashtra News: टायरची विक्री अन् फसवणुकीच्या गुन्ह्यात 5 आरोपी अटक, 97 टायर जप्त

Maharashtra News: नगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ड्रायव्हरकडून परस्पर टायरची विक्री करून फसवणुकीच्या गुन्ह्यात 5 आरोपी अटक केली आहे. आरोपीकडून 19,94,650 ( 97 टायर) जप्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 27 डिसेंबर 2024 रोजीकंटेनर क्रमांक पीबी-13-एडब्लू-5064 यावरील चालकाने सीएट कंपनीचे टायरची परस्पर विक्री करून विल्हेवाट लावली असल्याचा  सुपा पोलीस स्टेशनमध्ये बीएनएस कलम 316 (4) प्रमाणे विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास करण्यासाठी पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी  पोसई/अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, मनोहर गोसावी, गणेश लोढे, पंकज व्यवहारे, फुरकान शेख, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ, किशोर शिरसाठ, अमृत आढाव, विशाल तनपुरे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व महादेव भांड अशांचे दोन पथक तयार करुन गुन्ह्यातील निष्पन्न आरोपींचा शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन तपास करणेबाबत आदेश दिले होते.   पथकाने यापुर्वी गुन्हयाचे तपासात दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी आरोपी 1) इरशाद निशार अहमद, (वय 55, रा.रामपूर कुमियान, पो.तलालपट्टी, प्रतापगड, उत्तरप्रदेश), 2) अब्दुल कय्युम अब्दुल वहाब शहा, (वय 24, रा.जिन मैदानजवळ, चाळीसगाव रोड, धुळे) यांना 2,52,000 रूपये किंमतीचे सीएट कंपनीचे 12 टायर अशा मुद्देमालासह सुपा पोलीस स्टेशनला हजर केले होते. दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी पथक गुन्हयातील निष्पन्न आरोपीचा तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत असताना आरोपी नामे अन्सार, (रा.प्रतापगड, उत्तरप्रदेश) हा मुंबई येथे असलेबाबत माहिती प्राप्त झाल्याने पथकाने मुंबई येथे जाऊन संशयीत आरोपीचा शोध घेऊन, दोन संशयीतांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) अन्सार अहमद (नयाबअली, वय 23, रा.सरायबीर भद्र, ता.सदर, जि.प्रतापगड, उत्तरप्रदेश), 2) जैद खान अजिम खान मोहमंद, (वय 27, रा.आझादनगर, घाटकोपर वेस्ट, मुंबई) असे असल्याचे सांगीतले. ताब्यातील आरोपीकडे गुन्हयाच्या विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा 3) जावेद खान, रा.प्रतापगड, उत्तरप्रदेश (फरार) 4) शरिफ खान, रा.राणीगंज, उत्तरप्रदेश (फरार) 5) जोशेफ अली, रा.पिरथीगंज, उत्तरप्रदेश (फरार) अशांनी मिळून इरशाद निशार अहमद याचे मदतीने मिळून केला असल्याची माहिती सांगीतली. तसेच गुन्हयांतील मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता गुन्हयातील टायर हे सुरत येथील शिवलाल शहा, रा.पाल, सुरत, गुजरात याचे मार्फतीने योगेश गुंजाळ, रा.बेल्हे, आळाफाटा, पुणे यास विक्री केले असल्याची माहिती सांगीतली. ताब्यातील आरोपीकडून मिळालेल्या माहितीवरून पथकाने तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे शिवलाल शहा, रा.सुरत याचा राहते घरी जाऊन शोध घेतला तो मिळून आल्याने त्यास पुर्ण नाव विचारले असता त्याने त्याचे नाव 6) शिवलाल हसमुखलाल शहा, वय 58, रा.ए 602, मरोधर रेसीडेन्सी,  पाल, सुरत, गुजरात असे असल्याचे सांगीतले.गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची माहिती सांगीतली. दिनांक 31/01/2025 रोजी पथक गुन्हयातील मुद्देमाल हा योगेश गुंजाळ, रा.बेल्हे, पुणे याचेकडे असल्याने त्याचा गुप्त बातमीदार व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना योगेश गुंजाळ हा त्याचे साथीदारासह बेल्हे गावात तांबेवाडी परिसरात टायर विक्री करण्याकरीता आला असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने नमूद ठिकाणी जाऊन संशयितांना ताब्यात घेतले.त्यांना नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 7) योगेश अरूण गुंजाळ, वय 36, रा.दत्तनगर, बेल्हे, ता.जुन्नर, जि.पुणे 8) वैभव भगवंता चौधरी, वय 31, रा.चौधरी मळा, जामगाव, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले. तपास पथकाने पंचासमक्ष आरोपीचे ताब्यातुन 15,12,000/-रू किं.त्यात 72 सीएट कंपनीचे टायर, 80,000/- रू किं.त्यात 3 मोबाईल असा एकुण 15,92,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच आरोपी नामे योगेश अरूण गुंजाळ याचे उर्वरीत टायर बाबत विचारपूस करता त्याने सागर उर्फ महाराज शरद रूकारी यांना 10, दत्तात्रय शिवाजी सोमवंशी यांना 4, संकेत अशोक जाधव यांना 5 व राहुल संदीप औटी यांना 6 अशांना कंपनीकडून  टायर खरेदी केलेले असून टायरचे बील नंतर देतो असे खोटे सांगुन विक्री केल्याची पंचासमक्ष माहिती दिली.पथकाने पंचासमक्ष त्यांनी हजर केलेले 25 टायर किंमत रूपये 4,02,650/- असा मुद्देमाल जप्त केलेला आहे. पुढील कारवाई सुपा पोलीस करत आहे.

Maharashtra News: टायरची विक्री अन् फसवणुकीच्या गुन्ह्यात 5 आरोपी अटक, 97 टायर जप्त Read More »

Rohit Pawar: कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी की नेत्यांसाठी…, रोहित पवारांचा आयोजकांवर निशाणा

Rohit Pawar: दोन दिवसापूर्वी 67 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नगर शहरात पार पडली. मात्र या स्पर्धेच्याउपांत्य फेरीत सामन्यात आणि अंतिम सामन्यात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. उपांत्य फेरीत सामन्यात शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराजमोहोळ यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात राक्षे पराभूत झाले मात्र त्यांनी पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेत निर्णय अमान्य केला. तर अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाड याने मैदान सोडले. त्यामुळे ही स्पर्धा चांगलीच चर्चेत आली आहे. तर दुसरीकडे या स्पर्धेवर आणि आयोजकांवर सोशल मीडियासह अनेक नेते मंडळी टीका करताना दिसत आहे. कर्जत – जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनी देखील जोरदार टीका करत आयोजकांवर निशाणा साधला आहे. स्पर्धा मल्लांसाठी होती की नेत्यांसाठीवादाचं ‘मोहोळ’ उठलेली अहिल्यानगरमधील कालची कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी होती की नेत्यांसाठी, असा प्रश्न निर्माण होतो. या स्पर्धेतील काही नियम अजब-गजबच होते, अनेक मल्लांना संधीही मिळाली नाही, शिवाय माजी महाराष्ट्र केसरी पैलवानांना कोणताही मानसन्मान न मिळाल्याने त्यांना अवमान सहन करावा लागला. केवळ राजकीय नेत्यांचीच या स्पर्धेवर छाप असल्याने या नेत्यांसाठी अनेक कुस्त्यांच्या वेळाही बदलल्या. एकूणच काय तर ही स्पर्धा कुस्तीची आणि पैलवानांनी चेष्टा करणारी होती. कुस्तीतील पारदर्शकता, आदरभाव, निष्पक्षपणा आणि खिलाडू वृत्तीच काल ‘चितपट’ झाल्याचं चित्र दुर्दैवाने अवघ्या महाराष्ट्राला उघड्या डोळ्यांनी बघावं लागलं. म्हणूनच पैलवानांना न्याय देणारी खऱ्या अर्थाने ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा’ अन्यायाला थारा न देणाऱ्या माझ्या मतदारसंघात कर्जत-जामखेडच्या पवित्र भूमीत घेण्याचं नियोजन आहे. आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्त्वाखालील ‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे’ने परवानगी दिली तर पुढील महिन्यातच मार्चअखेर ‘महाराष्ट्र केसरी’चा कर्जत-जामखेडच्या भूमीत भव्य असा आखाडा भरवण्यात येईल आणि ही स्पर्धा ‘कुणालातरी जिंकवण्यासाठी’ नसेल तर या स्पर्धेत गुणवत्तेवर जिंकणाऱ्या पैलवानालाच मानाची गदा मिळेल, याची खात्री देतो. असं रोहीत पवार यांनी ट्विट करत आयोजकांवर टीका केली आहे.

Rohit Pawar: कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी की नेत्यांसाठी…, रोहित पवारांचा आयोजकांवर निशाणा Read More »

Maharashtra Keshari 2025: महाराष्ट्र केसरीमध्ये वाद घालणारे शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाडचे 3 वर्षासाठी निलंबन

Maharashtra Keshari 2025 : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने मोठी कारवाई करत महाराष्ट्र केसरीमध्ये वाद घालणारे शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाडचे 3 वर्षासाठी निलंबन करण्याचे निर्णय घेतला आहे. पंचांच्या निर्णय अमान्य असल्याने शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाडने महाराष्ट्र केसरीमध्ये वाद घातला होता. त्यामुळे आता महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे मोठा निर्णय घेत दोघांना तीन वर्षांसाठी निलंबन केला आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या 67 व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताबासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करीत विजतेपद पटकाविले. स्पर्धेचा विजेता पृथ्वीराज मोहोळ याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाची गदा प्रदान करण्यात आली. राज्यातील क्रीडा विकासाला चालना देतांना प्रत्येक खेळासाठी आवश्यक आर्थिक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली. मॅट विभागात नांदेडचा (मूळचा पुण्याच्या राजगुरुनगरमधील राक्षेवाडीचा) डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत झाली. यात पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला. माती विभागातून सोलापूर जिल्ह्याचा महेंद्र गायकवाड आणि परभणीचा साकेत यादव यांच्यात अंतिम लढत झाली. यात महेंद्र गायकवाड विजेता ठरला. यावेळी माजी आमदार अरुणकाका जगताप, पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, माजी खासदार सुजय विखे पाटील, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, सरचिटणीस हिंदकेसरी पै. योगेश दोडके, चित्रपट दिग्दर्शक प्रविण तरडे, जिल्हा कुस्तीगीर कार्याध्यक्ष संघाचे संतोष भुजबळ आदी उपस्थित होते.

Maharashtra Keshari 2025: महाराष्ट्र केसरीमध्ये वाद घालणारे शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाडचे 3 वर्षासाठी निलंबन Read More »

UPI मध्ये मोठा बदल…, जाणून घ्या नवीन नियम, नाहीतर होणार नाही पेमेंट

UPI Rules Change: देशात वाढत असणाऱ्या ऑनलाईन व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटना देखील समोर येत आहे. या घटनांना थांबवण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नवीन नवीन नियम लागू करत आहे. तर आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आजपासून UPI ​​ट्रान्झॅक्शन आयडीमध्ये विशेष अक्षरे वापरता येणार नाहीत. म्हणजेच तुम्ही UPI आयडीमध्ये *#@ सारखे अक्षरे वापरू शकणार नाही. जर एखाद्या अ‍ॅपने विशेष वर्ण असलेला ट्रान्झॅक्शन आयडी जनरेट केला तर तो पेमेंट सेंट्रल सर्व्हरद्वारे नाकारला जाईल. एनपीसीआयने हा निर्णय का घेतला?UPI ट्रान्झॅक्शन आयडी जनरेट करण्याची प्रक्रिया मानक आणि सुरक्षित करण्यासाठी NPCI ने हे पाऊल उचलले आहे. यामुळे डिजिटल पेमेंट सिस्टमची सुरक्षितता आणि विश्वासार्हता वाढेल. आता व्यवहार आयडीमध्ये फक्त अल्फान्यूमेरिक वर्ण (A-Z, 0-9) वापरले जाऊ शकतात. NPCI ने UPI व्यवहार आयडी प्रमाणित करण्यासाठी आधीच नियम जारी केले आहेत. मार्च 2023 मध्ये जारी केलेल्या आदेशानुसार, व्यवहार आयडीची कमाल लांबी 35 वर्णांपर्यंत निश्चित करण्यात आली होती. डिजिटल पेमेंटमध्ये UPI चा प्रमाण वाढला डिजिटल पेमेंटमध्ये UPI चा वाटा सतत वाढत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अहवालानुसार, 2019 मध्ये डिजिटल पेमेंटमध्ये UPI चा वाटा 34% होता, जो आता 83% पर्यंत वाढला आहे. उर्वरित 17% मध्ये एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे केलेले पेमेंट समाविष्ट आहे. नवीन NPCI नियम लागू झाल्यानंतर, UPI पेमेंट अॅप्सना या बदलाचे पालन करणे बंधनकारक असेल. जर एखाद्या अॅपने नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार ट्रान्झॅक्शन आयडी जनरेट केला नाही, तर ते UPI व्यवहार करू शकणार नाही.

UPI मध्ये मोठा बदल…, जाणून घ्या नवीन नियम, नाहीतर होणार नाही पेमेंट Read More »

LPG Gas Price: आनंदाची बातमी, एलपीजी सिलिंडर स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

LPG Gas Price : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन थोड्याच वेळात देशाचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करणार आहे. या बजेटमध्ये सर्वसामान्य लोकांना काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागू नये मात्र त्यापूर्वीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे. 1 फेब्रुवारी 2025 पासून लागू झालेल्या नवीन दरानुसार, आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 7 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आजपासून दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत 1797 रुपये झाली आहे. कोणत्या शहरात गॅसच्या किमती किती कमी झाल्या?इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, राष्ट्रीय राजधानीत 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1 फेब्रुवारीपासून 1804 रुपयांवरून 1797 रुपयांवर आली आहे. कोलकातामध्ये या एलपीजी सिलिंडरची किंमत 1911 रुपयांवरून 1907 रुपयांवर आली आहे. मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आता 1756 रुपयांवरून 1749.50 रुपयांना उपलब्ध आहे. आजपासून चेन्नईमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 1959.50 रुपये आहे. एलपीजी गॅस सिलेंडरचा दरआज घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत, 14 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर अजूनही 803 रुपयांच्या जुन्या किमतीत उपलब्ध आहे. लखनौमध्ये या एलपीजी सिलेंडरची किंमत 810.50 रुपये आहे. मुंबईत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 802.50 आहे. चेन्नईमध्ये या सिलेंडरची किंमत 818.50 रुपये आहे. त्याच वेळी, कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 829 रुपये आहे.

LPG Gas Price: आनंदाची बातमी, एलपीजी सिलिंडर स्वस्त, जाणून घ्या नवीन दर Read More »

Health Tips: रात्री झोपताना मोजे घालण्याचे ‘हे’ आहेत फायदे आणि तोटे

Health Tips: सतत बदलणाऱ्या वातावरणाचा सामना करण्यासाठी स्वतःची खूप काळजी घ्यावी लागते. अशा वातावरणात  प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी डायटवर भर दिला जातो. तर रात्री थंडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी अंगात स्वेटर आणि पायात मायमोजे घातले जातात. ज्यामुळे तुमचे पाय थंड पडत नाहीत आणि शांत झोप लागते. मात्र तुम्हाला रात्री झोपताना मोजे घालण्याची सवयच असेल तर त्याचे तुमच्या शरीरावर चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम होऊ शकतात. यासाठी जाणून घ्या ही महत्त्वाची माहिती. रात्री झोपताना मोजे घालण्याचे फायदेरात्री झोपताना मोजे घालण्याचे अनेक फायदे आहेत जसं की यामुळे तुम्हाला थंडी लागत नाही आणि शांत झोप लागते.  शरीराचे तापमान नियंत्रित राहतेहिवाळ्यात वातावरणात वाढत जाणाऱ्या थंडीमुळे घरातील तापमान हळू हळू कमी होत जाते. याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो आणि शरीरातील तापमान अनियंत्रित होते. ज्यामुळे सर्वात आधी तुमचे हात, पाय आणि नाक थंड होतं. शरीराचे कार्य सुरळीत राहण्यासाठी शरीराला ठराविक तापमानाची गरज असते. यासाठीच जर रात्री झोपताना तुम्ही पायमोजे घातलेले असतील तर रात्रभर तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास  मदत होते. ज्यामुळे बाहेरच्या वातावरणाचा तुमच्या शरीरावर परिणाम होत नाही. रक्तभिसरण सुरळीत होतेरात्री झोपताना पायात मोजे घालण्यामुळे तुमच्या शरीराचे रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होते. कारण मोज्यांमुळे पाय आणि शरीर उबदार राहतं. सहाजिकच यामुळे तुमच्या शरीराला योग्य रक्ताचा पूरवठा आणि ऑक्सिजन मिळते. शरीरातील रक्तपेशी, ह्रदय, रक्तवाहिन्या आणि फुफ्फुसाचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी हे फार आवश्यक आहे. शांत झोप येतेहिवाळ्यात कडाक्याची थंडी पडली की गारव्यामुळे शरीर थंड पडू लागतं आणि त्याचा तुमच्या झोपेवर परिणाम होतो. या काळात नेहमी झोपमोड झाल्यामुळे झोप पूर्ण होत नाही. मात्र जर तुम्ही रात्री झोपताना मोजे घातले असतील तर तुम्हाला रात्री शांत झोप लागते. ज्यामुळे तुमच्या शरीराला पुरेशी झोप मिळते आणि सकाळी तुम्हाला फ्रेश वाटते.  पायाला मुंग्या येत नाहीहिवाळ्यात पाय गार पडल्यामुळे रक्तप्रवाहावर विपरित परिणाम होतो. ज्यामुळे तुमच्या हातापायाला मुंग्या म्हणजेच झिणझिण्या येतात. ज्यामुळे रात्री पाय अचानक बधीर झाल्यासारखा वाटू लागतो. वास्तविक ही हिवाळ्यात सर्वांना जाणवणारी एक सामान्य समस्या आहे. त्यामुळे याबाबत फार चिंता करण्याची गरज नाही. मात्र यामुळे तुमच्या झोपेवर विपरित परिणाम होऊ शकतो आणि निरोगी राहण्यासाठी चांगली झोप गरजेची आहे. रात्री झोपताना मोजे घालण्यामुळे तुमच्या पायांना मुंग्या येत नाहीत.  रात्री झोपताना मोजे घालण्याचे तोटेहिवाळ्यात रात्री पायात मोजे घालण्याचे जसे फायदे आहेत तसेच अनेक तोटेदेखील आहेत. जे तुम्हाला  माहीत असायला हवे. इनफेक्शनचा धोकाझोपताना मोजे घालायचे असतील तर ते प्रत्येकवेळी स्वच्छ करणं गरजेचं आहे. जुने अथवा सतत वापरलेले मोजे घालल्यामुळे तुमच्या शरीराला इनफेक्शनचा धोका वाढतो. कारण पायाला मोजे घातल्यामुळे घाम येतो आणि हा घाम मोज्यांमध्ये मुरतो. जर तुमचे मोजे सुती नसतील तर सतत घाम येण्यामुळे तुमच्या पायाचे आरोग्य बिघडू शकते.  रक्ताभिसरण बिघडण्याची शक्यतारात्री मोजे घातल्यामुळे तुमच्या शरीराचे रक्ताभिसरण सुधारत असले तरी कधी कधी याचा विपरित परिणामही जाणवू शकतो. कारण जर तुम्ही तुमच्या पायापेक्षा घट्ट, हवा खेळती राहणार नाही असे मोजे घातले तर त्यामुळे पायाच्या रक्तप्रवाहात अडथळा येऊ शकतो. याचा परिणाम तुमच्या संपूर्ण शरीराच्या रक्ताभिसरणावर होण्याची शक्यता असते.  शरीराच्या तापमानात बदलहिवाळ्यात मोजे घालणं गरजेचं आहे कारण त्यामुळे तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहते. मात्र जर तुम्ही चुकीचे म्हणजेच हवा खेळती न राहणारे मोजे घातले तर यामुळे तुमच्या पायाचे तापमान अचानक वाढून तुम्हाला ओव्हर हिटिंगचा त्रास होऊ शकतो. कारण शांत झोप येण्यासाठी तुमच्या शरीराचे तापमान अती प्रमाणात कमी अथवा अती प्रमाणात जास्त वाढून चालणार नाही. यासाठीच नेहमी झोपताना सुती, हवेशीर मोजेच घालावे. 

Health Tips: रात्री झोपताना मोजे घालण्याचे ‘हे’ आहेत फायदे आणि तोटे Read More »

Dhananjay Munde: धनंजय मुंडे गुन्हेगार नाही…,नामदेव शास्त्री महाराज मुंडेंच्या बचावार्थ मैदानात

Dhananjay Munde: बीड प्रकरणावरून सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचे ठरलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगड येथे जात महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. धनंजय मुंडे हे शंभर टक्के गुन्हेगार नाही मी त्यांच्या पाठीशी आहे असं ठाम मत यावेळी नामदेव शास्त्री महाराजांनी व्यक्त केले आहे. मुंडेंची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे. राजकीय स्वार्थापोटी हे केला जात असल्याचे देखील यावेळी बोलताना शास्त्री म्हणाले. धनंजय मुंडे यांनी रात्रीच भगवानगड येथे जात महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली यावेळी प्रदीर्घकाळ त्यांची चर्चा देखील झाली. एवढे बोलताना शास्त्री म्हणाले की खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत मुंडेंची पार्श्वभूमी देखील गुन्हेगारी नाही. आज मीडिया द्वारे जाते वाट पसरवला जात आहे. धनंजय मुंडे हा गुन्हेगार नाही हे मी शंभर टक्के सांगू शकतो तसेच त्यांच्या पक्षाचे नेत्यांना देखील हे माहिती आहे मात्र हा विषय किती तानायचा हा ज्याने त्याने ठरवावा. धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे असं देखील यावेळी शास्त्री म्हणाले. समोरासमोर येऊन राजकारण करा अशा पद्धतीने राजकारण करू नये कारण अशा मुद्द्यांचा फार काळ फायदा होईल असं मला वाटत नाही भविष्यात याचे देखील राजकीय मीडियाने देखील यामध्ये सहकार्य करून जातीय सलोखा निर्माण होईल असे सहकार्य करावे असे देखील यावेळी शास्त्री म्हणाले. संवेदनशील मुद्द्यावरून राजकारण करणे ही भित्री पद्धत असं शास्त्री म्हणाले.

Dhananjay Munde: धनंजय मुंडे गुन्हेगार नाही…,नामदेव शास्त्री महाराज मुंडेंच्या बचावार्थ मैदानात Read More »

Maharashtra Politics : नगरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, माजी महापौरसह 12 नगरसेवक शिंदे गटात

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहे. यातच नगर शहरातील देखील तब्बल 12 नगरसेवकांनी ठाकरे गटाला राम राम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, जिल्हा संपर्क प्रमुख दिलिप सातपुते, शहर प्रमुख सचिन जाधव,युवासेना जिल्हाप्रमुख आकाश कतोरेसह उबाठा गटाच्या 12 नगरसेवक, महापौर आणि शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई  येथे हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यामुळे नगरमध्ये उबाठा गटाला मोठ खिंडार पडले. त्याचबरोबर मुंबईतील शेकडो उबाठा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीने  प्रभावित होऊन मागील महिनाभरात विविध पक्षांच्या हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत इनकमिंग जोरात सुरू असून उबाठा गटाला खिंडार पडले आहे. नगर महापालिकेचे महापौर संजय शेंडगे, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, नगरसेवक सचिन शिंदे, श्याम नळकांडे, सुरेश तिवारी, संतोष ग्यानाप्पा,बबलू शिंदे, संग्राम कोटकर, दत्तात्रय कावळे, परेश लोखंडे, संदीप दातरंगे, कैलास शिंदे यांच्यासह उपशाखाप्रमुख, विभाग प्रमुख आणि शाखाप्रमुख यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी उठाव केला होता. त्याची प्रचिती मागील अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामातून दिसली. त्यामुळेच अनेक पक्षातील लोकप्रतिनिधी शिवसेनेत येत आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की 12 नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाने नगरमधील शिवसेना आणखी मजबूत झाली आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीच्या सर्वाधिक जागा येतील असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की विधानसभा निवडणुकीत शिवसेना 80 जागा लढली आणि 60 आमदार निवडून आल्या. उबाठा 95 जागा लढले आणि 20 जागी निवडून आले. उबाठापेक्षा शिवसेनेला 17 लाख अधिक मते मिळाली तर लोकसभेत शिवसेनेला दोन लाख जास्त मते मिळाली. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न उरलेला नाही. तसेच नगरमधील विकास कामांना निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

Maharashtra Politics : नगरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, माजी महापौरसह 12 नगरसेवक शिंदे गटात Read More »

… तर मकोका लावणार, अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या समोर दिला इशारा

Ajit Pawar On Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. या प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधाडून आरोप- प्रत्यारोप सुरू आहे. तर दुसरीकडे आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीड दौऱ्यावर असताना थेट धनंजय मुंडे यांच्यासमोर अजित पवारांनी सर्वांना इशारा दिला आहे. आपल्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नये. मी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना बोलावलं असून त्यांना आता माझ्या पद्धतीने सांगणार आहे. कोणत्याही अफवावंवर विश्वास ठेऊ नका आणि एक गोष्ट पुन्हा सांगतो, जर कोणी कुठल्या गोष्टीत जबाबदार असेल, जर कुणी वेडेवाकडे प्रकार केले असतील, विकासाची कामं करताना कुणी कुणाला खंडणी मागितली तर मी मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही. मी टोकाची भूमिका घेईन. असं अजित पवार म्हणाले. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, जनतेचा पैसा सत्कारणी लागलाच पाहिजे. त्या ठिकाणी कोणतीही गडबड होता कामा नये. जिल्ह्यासाठी केंद्राचा निधी कसा जास्त आणता येईल, यासाठी प्रयत्न आम्ही करणार आहे. मी पहिल्यांदाच पालकमंत्री या नात्याने बीड जिल्ह्यामध्ये आलो आहे. असं देखील यावेळी अजित पवार म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे मंत्रीपदाचा राजीनामा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

… तर मकोका लावणार, अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या समोर दिला इशारा Read More »

Crime News: आईचा प्रेमसंबंध, नाराज मुलांनी केला चाकूने – रॉडने वार अन् घडलं असं काही…

Crime News: आईच्या प्रेमप्रकरणामुळे नाराज झालेल्या दोन मुलांनी चाकूने सपासप वार करून एका व्यक्तीची हत्या केली आहे. हे धक्कादायक प्रकरण गुजरातमधील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील गांधीनगरमध्ये दोन भावांनी एका व्यक्तीची चाकूने वार करून हत्या केल्याचा आरोप आहे. त्याच्या आईसोबतच्या प्रेमसंबंधाच्या रागातून हे कृत्य केल्याचे वृत्त आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आरोपीने पीडितेची आतडेही बाहेर काढली आणि बाहेर फेकून दिली, ज्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या लोकांना धक्का बसला. पीडितेचा मुलगा अजयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, संजय (27) आणि जयेश ठाकोर (23) हे दोन भाऊ आहेत. आईच्या प्रियकरावर रागत्यांच्या विधवा आईसोबत 15 वर्षांहून अधिक काळ संबंध असलेले 45 वर्षीय रतनजी ठाकोर यांच्याविरुद्ध त्यांच्या मनात तीव्र नाराजी होती. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की आरोपींचा असा विश्वास होता की या नात्यामुळे त्यांच्या दिवंगत वडिलांच्या स्मृतीचा अनादर झाला. आईपासून दूर राहण्याची ताकीदएफआयआरनुसार, संजय आणि जयेश ठाकोर यांचा रतनजी ठाकोर यांच्याशी आधीच वाद होता. तपास अधिकारी (आयओ) उन्नती पटेल म्हणाल्या, ‘त्यांनी वारंवार त्या माणसाला त्यांच्या आईपासून दूर राहण्याचा इशारा दिला आणि समाजातील वृद्धांनाही या प्रकरणात सहभागी करून घेतले. तथापि, हा प्रश्न शांततेने सोडवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले. चाकू आणि रॉडने हल्लातपास अधिकारी पुढे म्हणाले, ‘रविवारी, चाकू आणि रॉडने सशस्त्र संजय आणि जयेश यांनी गावात घर बांधत असलेल्या रतनजी ठाकोर आणि त्यांचे सहकारी जिकुजी परमार यांच्यावर हल्ला केला.’ एफआयआरमध्ये असेही म्हटले आहे की आरोपींनी त्यांचे रक्त ओवाळले- काही कामगार आणि रतनजींच्या सहकाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी त्यांनी शस्त्रे भिजवली आणि त्यांच्या दुचाकीवरून पळून गेले. अशा प्रकारे पोलिसांनी त्याला अटक केलीआयओने सांगितले की पोलिसांनी दोघांनाही त्यांच्या मोबाईल फोन लोकेशनचा वापर करून ट्रॅक केले आणि नंतर त्यांना अटक केली. त्याच्याविरुद्ध खून आणि भडकावण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News: आईचा प्रेमसंबंध, नाराज मुलांनी केला चाकूने – रॉडने वार अन् घडलं असं काही… Read More »