DNA मराठी

DNA Marathi News

“कर्जमाफीचे फसवे वचन? शेतकऱ्यांच्या डोक्यावरून महायुतीचा ‘कर्जमुक्तीचा’ फेरा!”

Ajit Pawar: निवडणुकीच्या रंगीत भाषणांत “कर्जमाफी” हा शब्द शेतकऱ्यांच्या कानात गोड वाटतो. महायुती सरकारनेही याच चालीला बळ दिलं. निवडणूक जिंकण्यासाठी “आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू” असं ठोकून सांगितलं. पण, आता सत्तेवर आल्यावर अजित पवार सरकारच्या मंत्रालयातून स्पष्ट सांगताहेत “2025-26 मध्ये कर्जमाफी होणार नाही!” “वोट द्या, मग विसरा” , हाच काय महायुतीचा मंत्र? निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना “कर्जमुक्ती” चे स्वप्न दाखवणं, आणि नंतर “आर्थिक अडचणी”सांगून मागे हटणं ही राजकीय फसवणूक नाही का? शेतकरी आता प्रश्न विचारतो आहे. पवारांचा तर्क – खरा की बहाणा?अर्थमंत्री म्हणतात, “राज्याच्या आर्थिक स्थितीमुळे कर्जमाफी शक्य नाही.” पण प्रश्न आहे. निवडणुकीच्या वेळी हीच आर्थिक परिस्थिती नव्हती का? मग तेव्हा आश्वासन का दिलं? असा प्रश्न आता विरोधक विचारत आहे. जर सरकारला आधीच माहिती होतं की कर्जमाफी करणं अशक्य आहे, तर शेतकऱ्यांना फसवण्याचा हा डाव नाही का? याचा उत्तर महायुतीला द्यावे लागणार आहे. शेतकऱ्यांची प्रतिक्रिया – “आमच्यावर विश्वासघात!”  महाराष्ट्रातील लाखो शेतकरी आता स्वतःला “ठगलेला”* समजत आहेत. त्यांचा आक्रोश आहे. “वोट मिळाला, तेवढंच महत्त्व होतं का?” “कर्जाच्या बोजामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार?” असं शेतकऱ्यांकडून विचारण्यात येत आहे.

“कर्जमाफीचे फसवे वचन? शेतकऱ्यांच्या डोक्यावरून महायुतीचा ‘कर्जमुक्तीचा’ फेरा!” Read More »

IPS Sudhakar Pathare Death: मोठी बातमी! आयपीएस सुधाकर पठारे यांचे अपघातात निधन

IPS Sudhakar Pathare Death: आयपीएस सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झालं आहे. तेलंगणातील श्रीशैलम येथून ते नागरकुरलूनकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुधाकर पठारे हे ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीची बसला धडक झाली आणि हा अपघात झाला. सुधाकर पठारे हे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सुधाकर पठारे यांच्या अपघातामुळे महाराष्ट्र पोलिस दलामध्ये शोककळा पसरली आहे. सुधाकर पठारे सध्या मुंबई पोलिसमध्ये पोर्ट झोनचे डीसीपी म्हणून कार्यरत होते. सुधाकर पठारे हे ट्रेनिंगसाठी हैदराबादमध्ये गेले होते. त्या ठिकाणी त्यांच्या एका नातेवाईकासह ते ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात असता हा अपघात झाला. या अपघातात सुधाकर पठारे यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईकाचाही मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती तेलंगणा पोलिसांना मुंबई पोलिसांना कळवली आहे. कोण होते सुधाकर पठारे?सुधाकर पठारे हे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी होते. ते मूळचे वाळवणे (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील होते. आयपीएस होण्याअगोदर ते शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये अधिकारी म्हणून राहिले आहेत. डॉ. सुधाकर पठारे यांचे शिक्षण एम.एस्सी. अ‍ॅग्री, एलएलबी झाले आहे. स्पर्धा परीक्षा देत असताना 1995 साली ते जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले. यानंतर 1996 साली विक्रीकर अधिकारी वर्ग 1 म्हणून त्यांची निवड झाली. 1998 साली पोलिस उपअधीक्षक म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर पोलिस खात्यातच ते रमले. आतापर्यंत त्यांनी पोलिस उपअधीक्षक म्हणून पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर, राजुरा येथे सेवा बजावली आहे. राज्यात अनेक ठिकाणी सेवा बजावलीअप्पर पोलिस अधीक्षक म्हणून चंद्रपूर, वसई तर पोलिस अधीक्षक म्हणून सीआयडी अमरावती येथे सेवा बजावली आहे. पोलिस उपायुक्त म्हणून मुंबई, ठाणे, पुणे, वाशी, नवी मुंबई, ठाणे शहर येथे सेवा बजावली आहे. एसपी डॉ. सुधाकर पठारे यांनी पोलिस खात्यात सेवा बजावताना संघटित गुन्हेगारी (मोक्का), तडीपारी, एमपीडीए अशा प्रतिबंधात्मक कारवाईंचा धडाका केला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच पोलिस दलात अनेक विविध उपक्रम राबवले आहेत.सुधाकर पठारे यांच्या निधनामुळे महाराष्ट्र पोलिस खात्यावर शोककळा पसरली आहे.

IPS Sudhakar Pathare Death: मोठी बातमी! आयपीएस सुधाकर पठारे यांचे अपघातात निधन Read More »

वर्षातील पहिले सूर्यग्रहण सुरू, गर्भवती महिलांसाठी ‘हे’ आहे विशेष नियम

Surya Grahan 2025 : वर्षातील पहिले सूर्यग्रहण 29 मार्च रोजी होत आहे. वर्षातील पहिला सूर्यग्रहण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून विशेष महत्वाचा असतो. हे आंशिक सूर्यग्रहण असणार आहे. जे भारतात दिसणार नाही, त्यामुळे आपल्या देशात सुतक काळ वैध राहणार नाही. हे ग्रहण प्रामुख्याने दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिकेचा काही भाग, उत्तर आशिया, वायव्य आफ्रिका, युरोप, उत्तर ध्रुव, आर्क्टिक महासागर आणि अटलांटिक महासागरात दिसेल. सूर्यग्रहणाशी संबंधित महत्वाची माहिती जाणून घेऊया. भारतात सूर्यग्रहणाची वेळभारतीय वेळेनुसार, हे ग्रहण दुपारी 2.21 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6.14 वाजता संपेल. एकूण, त्याचा कालावधी सुमारे 3 तास ​​53 मिनिटे असेल. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्याने येथे कोणतेही धार्मिक नियम लागू होणार नाहीत. सूर्यग्रहणाचे वैज्ञानिक आणि ज्योतिषीय महत्त्वजेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो आणि सूर्यप्रकाश अंशतः रोखतो तेव्हा सूर्यग्रहण होते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून, ही एक महत्त्वाची खगोलीय घटना आहे, तर ज्योतिषशास्त्रानुसार, ती अनेक राशींसाठी प्रभावशाली मानली जाते. भारतात सुतक काळ वैध असेल का?धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यग्रहणाच्या 9 ते 12 तास आधी सुतक काळ सुरू होतो, त्या दरम्यान कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. तथापि, जेव्हा ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहता येते तेव्हाच सुतक काळ प्रभावी असतो. कारण हे ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे येथे सुतक काळ वैध राहणार नाही. सूर्यग्रहण कुठे दिसेल?हे आंशिक सूर्यग्रहण न्यू यॉर्क, बोस्टन, मॉन्ट्रियल आणि क्यूबेकसह अनेक ठिकाणी दिसेल. याशिवाय, ते आफ्रिका, सायबेरिया, कॅरिबियन आणि युरोपच्या काही भागात देखील दिसेल.

वर्षातील पहिले सूर्यग्रहण सुरू, गर्भवती महिलांसाठी ‘हे’ आहे विशेष नियम Read More »

Maharashtra Government: मोठी बातमी! मंत्रालयात ऑनलाईन ॲपद्वारे मिळणार प्रवेश

Maharashtra Government: मंत्रालय सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातंर्गत पहिल्या टप्प्यात चेहरा ओळख आधारित प्रवेश प्रक्रिया कार्यान्वीत करण्यात आली. तसेच टप्पा २ अंतर्गत प्रवेशासाठी व्हीजीटर मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मंत्रालयात क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, अभ्यागत यांना यापुढे कोणत्याही कामाकरिता प्रवेश हवा असल्यास त्यांना ‘डिजीप्रवेश’ या ऑनलाईन ॲप आधारित प्रणालीद्वारे मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे. अभ्यांगतांना मंत्रालयाच्या ज्या विभागात कामानिमित्त प्रवेश आवश्यक आहे. केवळ त्यांना दिलेल्या वेळेत आणि अनुज्ञेय असलेल्या मजल्यावरच प्रवेश करावा. अनधिकृत मजल्यावर प्रवेश केल्यास अभ्यागत कारवाईस पात्र राहतील. अभ्यागतांनी संबंधित विभागातील आपले काम पूर्ण झाल्यावर विहीत वेळेत मंत्रालयातून बाहेर पडावे. ज्येष्ठ नागरीक व दिव्यांग अभ्यागतांना रांगेत उभे राहण्यामुळे होणारा त्रास विचारात घेता त्यांना दुपारी १२ वाजता प्रवेश देण्यात येईल. तर दुपारी १२ नंतर ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग अभ्यांगत यांचेसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था राहील. तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग अभ्यांगत यांनी तत्संबंधीचे वैध प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. मंत्रालयात येणाऱ्या सर्व अभ्यागतांना दुपारी २ वाजेनंतर प्रवेश देण्यात येईल. अशा प्रवेशासाठी त्यांना डिजीप्रवेश या ऑनलाईन ॲप आधारीत प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेशपास घेऊन मंत्रालयात प्रवेश मिळविता येईल. अभ्यागतांनी मंत्रालयात प्रवेश मिळविण्यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड आदी शासन मान्य ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. अशिक्षीत तसेच स्मार्टफोन नसलेल्या अभ्यांताकरीता गार्डन गेट येथे ऑनलाईन ॲप आधारीत प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेश नोंदणीकरीता तसेच मदतीकरीता एक खिडकी उपलब्ध असणार आहे. ‘डिजीप्रवेश’ ॲपद्वारे आपली नोंदणी केल्यानंतर मिळणाऱ्या क्यू आर कोड आधारे मंत्रालयाबाहेर असलेल्या खिडकीवर मंत्रालय प्रवेशाकरिता आरएफआयडी कार्ड वितरीत करण्यात येईल. हे आरएफआयडी कार्ड आधारे सुरक्षाविषयक तपासणी करून मंत्रालयात प्रवेश देण्यात येईल. अभ्यागतांना आरएफआयडी प्रवेश ओळखपत्र परिधान करणे व मंत्रालयातून बाहेर जाताना ते सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे जमा करणे बंधनकारक राहील. अभ्यागतांनी अशी करावी नोंदणी‘डिजीप्रवेश’ ॲप हे मोबाईल ॲप ॲण्ड्राईड आणि आयओएस ॲपल या दोन्ही प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपल्या मोबाईल च्या प्रणालीनुसार ॲण्ड्राईडमध्ये प्ले स्टोअर वर तर आयओएस ॲपलवर ॲपल स्टोअरवर digi pravesh हे सर्च केल्यास हे ॲप विनामुल्य डाऊनलोड करता येते. या ॲपवर सुरूवातीला केवळ एकदाच नोंदणी करणे आवश्यक राहील. नोंदणी झाल्यानंतर आधार क्रमांकावर आधारीत यंत्रणेद्वारे छायाचित्राची ओळख पटवून नोंदणी पूर्ण केल्यानंतर ज्या विभागात काम आहे, त्याचा स्लॉट बुक करून रांगेशिवाय प्रवेश घेता येईल. या संपूर्ण प्रक्रियेला तीन मिनीटांपेक्षा कमी कालावधी लागतो.

Maharashtra Government: मोठी बातमी! मंत्रालयात ऑनलाईन ॲपद्वारे मिळणार प्रवेश Read More »

‘भाईजान’ च्या चाहत्यांना धक्का, “टायगर वर्सेस पठान” सह बिग बजेट सिनेमाला ब्रेक!

Salman Khan: बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सलमान आणि शाहरुख खानच्या टायगर वर्सेस पठान या चित्रपटाची प्रतीक्षा सर्वांना होती मात्र आतापर्यंत या प्रोजेक्टवर कोणताही निर्णय झालेला नसल्याची माहिती सलमान खानने एका पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे त्याचे अनेक चाहते नाराज झाले आहे. मुंबईतील एका फाइव स्टार हॉटेलमध्ये नुकत्याच झालेल्या सिकंदर चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सलमान खानने त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल माहिती दिली. सलमानची बिग बजेट फिल्म ठप्पएका मोठ्या फिल्मसाठी अॅटली सलमान आणि रजनीकांत यांना एकत्र आणण्याच्या तयारीत होता. मात्र, बजेट खूपच वाढल्यामुळे निर्मात्यांनी हा प्रोजेक्ट तूर्तास थांबवला आहे. “एक काळ होता जेव्हा आम्ही हे प्रोजेक्ट करण्याच्या तयारीत होतो. आम्ही खूप प्रयत्न केले, पण काही गोष्टी जुळून आल्या नाहीत,” असे सलमान म्हणाला. “टायगर वर्सेस पठान” वर काम नाही!सलमान खानने आणखी एक मोठा खुलासा केला की टायगर वर्सेस पठान हा मेगा प्रोजेक्ट सध्या कोणत्याही स्थितीत बनत नाही आहे. “आता तरी यावर कोणाचेही लक्ष नाही,” असे स्पष्ट करत त्याने चाहत्यांच्या आशेला तात्पुरता ब्रेक दिला. तर दुसरीकडे “अंदाज अपना अपना 2” साठी आमिरसोबत काम करण्यास आपण एक्साइटेड आहोत असं सलमान म्हणाला. सलमान आणि आमिर खान अंदाज अपना अपना 2साठी एकत्र येणार का, या प्रश्नावर तो म्हणाला, “हो, आम्ही दोघेही खूप उत्साहित आहोत. राजकुमार संतोषी यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ते काहीतरी भन्नाटच करणार.” “बजरंगी भाईजान 2” शक्य, पण कधी?बजरंगी भाईजानच्या सिक्वेलबद्दल विचारले असता सलमान म्हणाला, “हो, हे होऊ शकते. कबीर खान यावर काम करत आहे.” मात्र, त्याने कोणतीही ठोस माहिती दिली नाही.

‘भाईजान’ च्या चाहत्यांना धक्का, “टायगर वर्सेस पठान” सह बिग बजेट सिनेमाला ब्रेक! Read More »

गोमातेचे नाव असलेले तंबाखू व्यवसाय कायमस्वरूपी बंद करा अन्यथा…, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचा राज्य सरकारला इशारा

Vidya Gadekar: तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी जगभरात सुमारे 80 लाख लोकांचा मृत्यू होतो तसेच आपल्या संस्कृतीत गोमाता ही मातेसमान असून मात्र  संगमनेर तालुक्यात मालपाणी उद्योग गाय मातेचा अपमान करून व्यवसाय करत असल्याने या व्यवसायावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी अन्यथा अमरण उपोषण करणार असा इशारा महाराष्ट्र राज्य, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी सेलच्या प्रदेश सचिव(संघटन) विद्या गाडेकर यांनी निवेदनाच्या माध्यमातून राज्य सरकारला दिला आहे. विद्या गाडेकर आपल्या निवेदनात म्हणाल्या की, 100 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून मालपाणी उद्योग समूह हा व्यवसाय करत आहे मात्र गायछापच्या पाकिटावर तंबाखू हानिकारक असते असं लिहिले आहे तसेच तंबाखूची जी पुडी असते त्यावर गोमताचे चित्र असते गोमातेचे चित्र असलेल्याने ही एक प्रकारची विटंबना असून हा गोमतेचा घोर अपमान आहे.त्यामुळे या व्यवसायवर कायमस्वरूपी बंदी आणावी अन्यथा आमरण उपोषण करणार असा इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे. विद्या गाडेकर निवेदनात पुढे म्हणाल्या की, या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करता व हिंदू धर्माचे प्रतीक गोमाता असताना आमच्या धर्माचे प्रतीक असलेल्या गोमातेची विटंबना गेल्या अनेक वर्षे करणाऱ्या मालपाणी उद्योग समूहाला धडा शिकवण्यासाठी त्वरित ” गाय छाप जर्दा” हे तंबाखू उत्पादन बंद करण्याचे संबंधिताना आदेश द्यावेत तसेच हे उत्पादन त्वरित बंद न केल्यास मी लवकरच आमरण उपोषण करणार आहे. असा इशारा विद्या गाडेकर यांनी दिला.

गोमातेचे नाव असलेले तंबाखू व्यवसाय कायमस्वरूपी बंद करा अन्यथा…, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचा राज्य सरकारला इशारा Read More »

Manoj Bharathiraja : तमिळ चित्रपटसृष्टीला धक्का: मनोज भारतीराजा निधन.

Manoj Bharathiraja : तमिळ चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज भारतीराजा यांचे चेन्नईमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 48 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोज भारतीराजा हे प्रख्यात तमिळ दिग्दर्शक भारतीराजा यांचे पुत्र होते. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टी हळहळली आहे. अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रातील योगदानमनोज भारतीराजा यांनी 1999 मध्ये त्यांच्या वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ताजमहल’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘समुधिरम’, ‘अल्लु अर्जुन’, ‘वरुशामेलम वसंतम’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये लक्षणीय भूमिका साकारल्या. त्यांनी अभिनयाबरोबरच दिग्दर्शनातही पदार्पण केले होते. 2013 मध्ये त्यांनी ‘मार्गजी थिंगल’ या रोमँटिक ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन केले. माहितीनुसार मनोज भारतीराजा यांना काही दिवसांपूर्वीच बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी मनोज भारतीराजा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “त्यांनी ‘ताजमहल’, ‘समुधिरम’, ‘अल्लु अर्जुन’, ‘वरुशामेलम वसंतम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला. त्यांनी दिग्दर्शनही केले. मी दिग्दर्शक भारतीराजा, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो.” मनोज भारतीराजा यांच्या पश्चात त्यांची पत्नी नंदना आणि दोन मुली अर्शिता आणि मथिवाधानी असा परिवार आहे. अनेक कलाकार आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी सोशल मीडियावर लिहिले, “मनोज आता आपल्यात नाही हे ऐकून खूप मोठा धक्का बसला. त्यांचे अकाली निधन दुःखद आहे. ते फक्त 48 वर्षांचे होते. देव त्यांचे वडील थिरु भारतीराजा आणि त्यांच्या कुटुंबाला या असह्य वेदनादायक नुकसानातून सावरण्याची शक्ती देवो.”

Manoj Bharathiraja : तमिळ चित्रपटसृष्टीला धक्का: मनोज भारतीराजा निधन. Read More »

ठाकरेंना धक्का, महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांचा राष्ट्रवादीत प्रवेश…

Snehal Jagtap: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देत आज महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष देतानाच ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मोठं करण्यात हातभार लावला आणि आपल्याला या पदावर बसवले त्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी देण्याचा विचार असल्याचे सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे.त्यामुळे आपल्या या पक्षाशी कार्यकर्ता जोडला गेला पाहिजे. आज पुरोगामी विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी स्नेहल जगताप आपल्या पक्षात आली आहे. माणिकराव जगताप यांचे आणि माझे फार जुने संबंध होते. ती पोकळी भरून काढण्याचे काम स्नेहल जगताप करतील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. पक्षाची ताकद कोकणात वाढत आहे आणि स्नेहल जगताप यांच्यामुळे अजून वाढणार आहे. राजकारणात कोण कुणाचा कायम शत्रू नसतो हे सांगतानाच कोकणाने नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दिपक केसरकर, भास्कर जाधव, उदय सामंत, संजय कदम, मंदा म्हात्रे असे नेते घडवले याची आठवणही अजित पवार यांनी सांगितली. कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी नेहमीच पुढाकार घेत असतो. कोकणात पायाभूत सुविधा कशा देता येतील यासाठी माझा प्रयत्न असतो असेही अजित पवार म्हणाले. तसेच शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारांशी कधीही तडजोड करणार नाही असे स्पष्ट करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजून मजबूत करुया असे आवाहन अजित पवार यांनी केले.

ठाकरेंना धक्का, महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांचा राष्ट्रवादीत प्रवेश… Read More »

Maharashtra Politics: विधानभवन परिसरात झाडावर चढून ईश्वर शिंदेच आंदोलन, कारण काय?

Maharashtra Politics: विधानभवन परिसरात मंगळवारी एका तरुणाच्या अनोख्या आंदोलनाने खळबळ उडाली. बीड जिल्ह्यातील शेतकरी नेता ईश्वर शिंदे या तरुणाने विधानभवन परिसरातील एका झाडावर चढून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले. तर दुसरीकडे प्रशासन आणि आमदारांनी त्याला खाली उतरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेरीस धुळे येथील भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी क्रेनच्या साहाय्याने झाडावर जाऊन ईश्वर शिंदेची मनधरणी केली आणि त्याला खाली उतरवण्यात यश मिळवले. आंदोलनाची पार्श्वभूमी ईश्वर शिंदे हे बीड जिल्ह्यातील रहिवासी असून, ते शेतकरी नेता म्हणून परिचित आहेत. त्यांनी आपल्या आंदोलनादरम्यान हातात राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार गट) नेत्यांचे फोटो असलेले बॅनर झळकावले होते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सूत्रांनी सांगितले. विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना त्यांनी विधानभवन परिसरात झाडावर चढून आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. क्रेनने झाडावर चढले आमदार अग्रवालईश्वर शिंदे यांना खाली उतरवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी सुरुवातीला प्रयत्न केले. मात्र, आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. यानंतर धुळे येथील भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी पुढाकार घेतला. त्यांनी क्रेनच्या साहाय्याने झाडाच्या दिशेनेवर जाऊन ईश्वर शिंदे यांच्याशी संवाद साधला. सुमारे अर्ध्या तासाच्या मनधरणीनंतर शिंदे खाली उतरण्यास तयार झाले आणि त्यांना सुरक्षितपणे जमिनीवर आणण्यात आले. घटनास्थळावरील गोंधळया आंदोलनामुळे विधानभवन परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. बघ्यांची गर्दी आणि माध्यमांचे कॅमेरे यामुळे प्रशासनाला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागली. ईश्वर शिंदे यांना खाली उतरवल्यानंतर त्यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, त्यांच्या मागण्यांबाबत अधिक माहिती घेतली जात आहे. शेतकरी मागण्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेतईश्वर शिंदे यांच्या या आंदोलनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणले आहे. त्यांनी आपल्या आंदोलनातून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार गट) नेत्यांचे फोटो असलेले बॅनर वापरल्याने या आंदोलनाला राजकीय रंगही प्राप्त झाला आहे. याबाबत अद्याप पक्षाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. आमदार अग्रवालांचे कौतुकआमदार अनुप अग्रवाल यांनी संयम आणि धैर्याने परिस्थिती हाताळल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. “आंदोलकाला खाली उतरवणे हे आमचे प्रथम कर्तव्य होते. त्याच्या मागण्या काय आहेत, हे समजून घेऊन त्यावर चर्चा करण्याची आमची तयारी आहे,” असे अग्रवाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या घटनेनंतर विधानभवन परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून विशेष उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे. ईश्वर शिंदे यांच्या आंदोलनामुळे शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले असून, सरकार यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Maharashtra Politics: विधानभवन परिसरात झाडावर चढून ईश्वर शिंदेच आंदोलन, कारण काय? Read More »

उपाध्यक्ष अण्णा बनसोडे सदस्यांच्या हक्कांचे रक्षण करणार अन् कामकाज निष्पक्षपणे चालवणार; अजित पवार

Ajit Pawar: ज्येष्ठ सदस्य अण्णा बनसोडे यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर विधानसभेच्या उपाध्यक्षपदापर्यंत मजल मारली आहे. त्यांचा राजकीय प्रवास राजकारण व समाजकारणात कार्यरत असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. मेहनत, संघर्ष आणि लोकसेवा या तीन गोष्टींवर श्रद्धा ठेवून वाटचाल करणाऱ्या अण्णा बनसोडे यांनी आज विधानसभा उपाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी स्वीकारली आहे. प्रत्येक सदस्याच्या हक्कांचे रक्षण करणे, सर्वांना समान न्याय आणि संधी मिळवून देणे, ही जबाबदारी ते निःपक्षपातीपणे पार पाडतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र विधानसभेच्या 22 व्या उपाध्यक्षपदी पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा दादू बनसोडे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीच्या निमित्ताने विधानसभेत अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जेव्हा कोणी सभागृहाच्या अध्यक्षपदी किंवा उपाध्यक्षपदी निवडून येतो, तेव्हा तो एका पक्षाचा नसतो, तर संपूर्ण सभागृहाचा होतो. प्रत्येक सदस्याच्या हक्कांचे रक्षण करणे, सर्वांना समान न्याय आणि संधी मिळवून देणे, कामकाज निष्पक्षपणे चालवणे, ही मोठी जबाबदारी असते. मला विश्वास आहे की अण्णा बनसोडे ही जबाबदारी यशस्वीपणे निभावतील. पिंपरी-चिंचवड सारख्या उद्योगनगरीत स्थलांतरित कामगारांची मोठी संख्या आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अण्णांनी नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष म्हणून मोठे योगदान दिले आहे. विशेषतः झोपडपट्टी भागातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी विशेष काम केले आहे. कोरोना संकटाच्या काळात अण्णा बनसोडे यांनी त्यांच्या आमदार निधीतून कोरोना लसीकरणासाठी 25 लाख रुपये देण्याबरोबरच पिंपरी-चिंचवडच्या ‘वायसीएम’ रुग्णालयासाठी सव्वा कोटी रुपये देऊन आरोग्य सुविधांसाठी मोठा हातभार लावला. त्यांच्या समाजसेवेचा हा वारसा पुढेही सुरू राहील, तसेच उपाध्यक्षपदाची मिळालेली जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

उपाध्यक्ष अण्णा बनसोडे सदस्यांच्या हक्कांचे रक्षण करणार अन् कामकाज निष्पक्षपणे चालवणार; अजित पवार Read More »