DNA मराठी

DNA Marathi News

Pushpa 2

Pushpa 2 ची बॉक्स ऑफिसवर क्रेझ, मोडले अनेक विक्रम अन् केली बंपर कमाई

Pushpa 2 : सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ आता देखील बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. याच बरोबर आता या चित्रपटाने अनेक विक्रम देखील स्वतःच्या नावावर केले आहे. माहितीनुसार, पुष्पा 2 ने पहिल्या आठवड्यात 725.8 कोटींची कमाई केली तर दुसर्‍या आठवड्यात 264.8 कोटी रुपये कमावले आणि तिसऱ्या आठवड्यात तब्बल129.5 कोटी रुपये जमा केले. तर चौथ्या शुक्रवारी 8.75 रुपये कोटीचा व्यवसाय केला. यामुळे 1700 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा तिसरा भारतीय सिनेमा ठरला आहे. तर दुसरीकडे नुकतंच रिलीज झालेले ‘वनवास’, ‘मुफासा’ आणि ‘बेबी जॉन’ या सिनेमांना देखील पुष्पा 2 ला टक्कर देता आली नाही. पुष्पा 2 ने सगळ्यात अगोदर देशातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ‘बाहुबली 2: द कन्क्लूजन’ला मागे टाकलं. 2017 मध्ये रिलीज झालेल्या प्रभासच्या या सिनेमाने 1030.42 कोटींचा गल्ला जमवला होता. पुष्पा 2 नं यापेक्षा जवळपास 120 कोटी रुपये जास्त कमावले आहेत. तसेच पुष्पानं किंग खानलाही मागे टाकलं आहे.

Pushpa 2 ची बॉक्स ऑफिसवर क्रेझ, मोडले अनेक विक्रम अन् केली बंपर कमाई Read More »

Bikes

Maharashtra News: जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव होणार

Maharashtra News: तालुक्यात अवैधरित्या गौणखनिज उत्खनन करुन वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या मालकांनी दंडात्मक कार्यवाहीत आदेशातील रक्कम शासन जमा न केल्याने ही रक्कम वसूल करण्यासाठी २ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, अहिल्यानगर जवळील गंगा उद्यानाच्या मागील बाजूस जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. लिलावात भाग घेण्याचा अर्ज, लिलाव होणाऱ्या जंगम मालमत्तेची किंमत, अनामत रक्कम, तसेच लिलावाच्या अटी व शर्तीकरिता तहसीलदार अहिल्यानगर यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. अशी माहिती तहसीलदार संजय शिंदे यांनी दिली आहे.

Maharashtra News: जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव होणार Read More »

Valmik Karad

Valmik Karad : मोठी बातमी, संतोष देशमुख हत्या प्रकरण, वाल्मिक कराडला अटक?

Valmik Karad : एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने मोठी कारवाई करत पुण्यातून वाल्मिक कराडला अटक करण्यात आली असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी होत होती. तर दुसरीकडे या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सीआयडीला दिले होते. त्यामुळे वाल्मिक कराडला कधी अटक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील या प्रकरणात वाल्मिक कराड आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 21 दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे.

Valmik Karad : मोठी बातमी, संतोष देशमुख हत्या प्रकरण, वाल्मिक कराडला अटक? Read More »

Money 1

Happy New Year: नवीन वर्षात होणार मोठे बदल, 1 जानेवारीपासून ‘हे’ नियम बदलणार

Happy New Year: नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 1 जानेवारी 2025 पासून देशात अनेक नियम बदलणार आहे. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. कर आणि अनुदानांमध्ये बदलआता 1% TCS (टॅक्स कलेक्शन ॲट सोर्स) 10 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या हँडबॅग आणि घड्याळे यांसारख्या लक्झरी वस्तूंवर लागू होईल. कारच्या किमतीत वाढमारुती सुझुकीने आपल्या वाहनांच्या किमतीत 4% पर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे.Hyundai ने 25,000 पर्यंत आणि Mahindra ने 3% ने किमती वाढवल्या आहेत. Mercedes-Benz, BMW आणि Audi सारख्या लक्झरी कार कंपन्या देखील किमती 3% पर्यंत वाढवत आहेत. जुन्या फोनवर व्हॉट्सॲप सपोर्ट नसणारव्हॉट्सॲप काही जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणे बंद करेल. याचा परिणाम Samsung Galaxy S3, Motorola Moto G (1st Gen), HTC One X आणि Sony Xperia Z सारख्या मॉडेल्सवर होईल. UPI पेमेंटची नवीन मर्यादाफीचर फोन वापरकर्त्यांसाठी UPI पेमेंट मर्यादा 5,000 वरून 10,000 करण्यात आली आहे. या बदलामुळे 123Pay सेवेअंतर्गत ग्रामीण भागातील लहान व्यापारी आणि वापरकर्त्यांना फायदा होईल. या बदलाचा काय परिणाम होतो?2025 चे हे बदल सामान्य ग्राहक आणि बाजाराची दिशा ठरवतील. एकीकडे कर आणि डिजिटल पेमेंटमुळे जीवन सुकर होणार आहे, तर दुसरीकडे रिअल इस्टेट आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील किमती वाढल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे.

Happy New Year: नवीन वर्षात होणार मोठे बदल, 1 जानेवारीपासून ‘हे’ नियम बदलणार Read More »

Rohit Sharma

Rohit Sharma होणार निवृत्त, मुख्य निवडकर्ता आगरकर घेणार मोठा निर्णय?

Rohit Sharma: भारतीय कर्णधार रोहित शर्माची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये बॅट आतापर्यंत खूप फ्लॉप ठरली आहे. त्याने आतापर्यंत 3 सामन्यात केवळ 22 धावा केल्या आहेत. रोहितच्या या खराब फॉर्ममध्ये एक मोठी बातमी समोर येत आहे. सातत्याने धावा न केल्याने निराश झालेल्या रोहितने आता कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित निवृत्तीची घोषणा करू शकतोमीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर निवृत्तीची घोषणा करू शकतो. अशा स्थितीत सिडनीतील शेवटचा सामना हिटमॅनच्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी ठरू शकतो. रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा झाला आहे. रिपोर्टनुसार, भारतीय संघाचा मुख्य निवडकर्ता आणि माजी खेळाडू अजित आगरकर मेलबर्नमध्ये असून तो रोहित शर्माशी त्याच्या भविष्याबद्दल बोलू शकतो. रिपोर्टनुसार, जर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला नाही, तर रोहित शर्मा टेस्ट फॉरमॅट सोडू शकतो. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सध्या 1-1अशी बरोबरीत आहे. अशा स्थितीत रोहितचे कसोटी भवितव्य त्याच्या फॉर्मवर आणि भारताच्या विजयावर अवलंबून आहे. रोहितला कारकीर्द वाचवायची असेल तर त्याला मेलबर्न आणि सिडनीमध्ये अप्रतिम कामगिरी करावी लागेल. त्याच्या कारकिर्दीतील हा सर्वात महत्त्वाचा सामना असणार आहे. रोहित टी-20आधीच निवृत्त झाला आहेरोहित शर्माने पहिल्यांदाच T20I ला अलविदा केला आहे. भारताने यावर्षी ऐतिहासिक T20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. रोहितच्या निवृत्तीनंतर चाहते खूपच निराश झाले होते. आता हा रिपोर्ट जाणून हिटमॅनच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. आता रोहितने आगामी डावात फलंदाजीने खळबळ माजवावी आणि भारतासाठी महत्त्वाची खेळी खेळून संघाला विजयाकडे नेले पाहिजे, अशी चाहत्यांची इच्छा आहे. हिटमॅन रोहित बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना खेळला नव्हता. यानंतर त्याने फलंदाजीचा क्रमही बदलला आणि मधल्या फळीत फलंदाजी केली. मात्र, रोहितच्या खराब फॉर्मने त्याची साथ सोडली नाही आणि तो आतापर्यंत बॅटने मोठी खेळी खेळू शकला नाही.

Rohit Sharma होणार निवृत्त, मुख्य निवडकर्ता आगरकर घेणार मोठा निर्णय? Read More »

Former PM Manmohan Singh Death

Manmohan Singh Death: माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन, सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Manmohan Singh Death: भारत सरकारने दु:ख व्यक्त करत भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाची घोषणा केली आहे. त्यांचे निधन 26 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात झाले. डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे भारत सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. हा दुखवटा 26 डिसेंबर 2024 पासून 1 जानेवारी 2025 पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) पाळला जाईल. या काळात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल आणि कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. डॉ. मनमोहन सिंग यांना शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. तसेच, त्यांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी देश-विदेशातील सर्व भारतीय दूतावासांमध्येही राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येईल.

Manmohan Singh Death: माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन, सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर Read More »

Former PM Manmohan Singh Death

Former PM Manmohan Singh Death : महान अर्थशास्त्री, प्रमाणिक, संवेदनशील राजकारणी, यशस्वी पंतप्रधान आणि भारतमातेचे महान सुपुत्र काळाच्या पडद्याआड – नाना पटोले

Former PM Manmohan Singh Death : देशाच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया घालणारे, थोर अर्थशास्त्री आणि विद्वान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे एक प्रामाणिक, संवेदनशील राजकारणी आणि यशस्वी पंतप्रधान काळाच्या पडद्याआड गेले आहेत, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करून पटोले म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंह साहेबांनी आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय आणि राजकीय राजकीय कारकिर्दीत भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया घातला. देशाचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी देशात आर्थिक उदारीकरणाच्या मार्गाने अर्थव्यवस्थेला चालना दिली. २००४ साली देशाचे पंतप्रधन म्हणून त्यांची निवड करण्यात आली. सोनिया गांधी यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत त्यांनी देशाला जागतिक पटलावर एक आर्थिक सत्ता म्हणून भारताला मान्यता मिळवून दिली. आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात माहितीचा अधिकार, अन्न सुरक्षा कायदा, शिक्षण हक्क कायदा, मनरेगा असे कायदे करून त्यांनी सर्वसामान्यांच्या अधिका-यांना कायद्याचे रूप देत संविधानाने दिलेले अधिकार शेवटच्या रांगेतील लोकांना मिळतील याची काळजी घेतली. डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशाने सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती केली. त्यांचा दहा वर्षाचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ देशाच्या इतिहासातील प्रगतीचा सुवर्णकाळ म्हणून लक्षात राहील. डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचे व देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले असून भारताने एक महान सुपुत्र गमावला आहे. डॉ. मनमोहन सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Former PM Manmohan Singh Death : महान अर्थशास्त्री, प्रमाणिक, संवेदनशील राजकारणी, यशस्वी पंतप्रधान आणि भारतमातेचे महान सुपुत्र काळाच्या पडद्याआड – नाना पटोले Read More »

Supreme Court

Supreme Court: मोठी बातमी! ED ला तपासता येणार नाही मोबाईल अन् लॅपटॉप

Supreme Court: ‘लॉटरी किंग’ प्रकरणात सुनवाई करताना आज देशातील सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत ईडीसाठी लक्ष्मण रेषा आखली आहे. या प्रकरणात दिलेल्या आदेशानुसार आता ईडीला मोबाईल आणि लॅपटॅाप तपासण्याची अनुमती मिळणार नाही. तसेच ईडीला मोबाईल, लॅपटॅापचा ॲक्सेस देता येणार नाही शिवाय डेटा कॅापी करता येणार नाही. याच बरोबर आता ईडीला धाड टाकल्यावर संशयिताच्या खाजगी वस्तूंना हात लावता येणार नाही. विशेष करून इलेक्ट्रॅानिक वस्तू ताब्यात घेता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. नोव्हेंबरमध्ये “लॉटरी किंग” सँटियागो मार्टिन, त्याचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांवर ईडीने धाडी टाकल्या होत्या. या प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे.

Supreme Court: मोठी बातमी! ED ला तपासता येणार नाही मोबाईल अन् लॅपटॉप Read More »

Egg

Health Update: नागरिकांनो, अंड्यांसोबत ‘या’ 5 गोष्टी खाणे टाळा, नाहीतर…

Helath Update: हेल्दी राहण्यासाठी आज अनेकजण अंडी खातात. अंड्याला सुपरफूड म्हटले जाते पण तुम्हाला माहित आहे का की अशा काही गोष्टी आहेत ज्यांसोबत अंडी खाणे टाळावे, अन्यथा तुम्ही आजारी पडू शकता. अंडी खाताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याबद्दल जाणून घ्या. सोया दूधसोया दुधातही प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. अंड्यांसोबत सोया दुधाचे सेवन केल्याने शरीरात प्रथिनांचे प्रमाण जास्त होऊ शकते, ज्यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. याशिवाय, दोन्हीचे मिश्रण शरीरातील प्रथिने शोषण्यास अडथळा आणू शकते. चहाअंड्यासोबत चहा पिणे ही एक सामान्य सवय आहे, परंतु ती तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. चहामध्ये असलेले टॅनिन प्रथिने शोषण्यास अडथळा आणते. अंड्यासोबत चहा प्यायल्याने शरीरातील प्रथिनांचे शोषण कमी होते, ज्यामुळे पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते. लिंबूलिंबूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, परंतु अंड्यांसोबत लिंबू खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. लिंबाच्या आंबटपणामुळे अंड्यातील प्रथिने पचणे कठीण होते. मासअंडी आणि मांस दोन्ही प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत. पण दोन्ही एकत्र खाल्ल्याने पचनसंस्थेवर जास्त ताण पडतो. यामुळे पोट फुगणे, गॅस आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

Health Update: नागरिकांनो, अंड्यांसोबत ‘या’ 5 गोष्टी खाणे टाळा, नाहीतर… Read More »

Smriti Mandhana

Smriti Mandhana ने रचला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला क्रिकेटपटू

Smriti Mandhana : भारतीय महिला संघाने शानदार कामगिरी करत मंगळवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 115 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे या सामन्यात भारताची सलामीवीर स्मृती मानधना हिने एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली. मंधानाने वडोदरा येथील कोटंबी स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध 53 धावांचे शानदार अर्धशतक झळकावले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली ही त्याची सलग सहावी 50 हून अधिक धावसंख्या आहे. तिने प्रतिका रावलसोबत पहिल्या विकेटसाठी 110 धावांची शतकी भागीदारी केली. मानधनाने आतापर्यंत या वेस्ट इंडिज दौऱ्यातील पाचही डावांमध्ये (3 टी-20, 2 वनडे) अर्धशतके झळकावली आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला WACA येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही त्याने शतक झळकावले होते. स्मृती मानधनाने इतिहास रचलावडोदरातील अर्धशतकी खेळीच्या जोरावर मानधनाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. एका वर्षात 7 वेळा तीन वेळा 50 प्लस स्कोअर करणारी ती इतिहासातील पहिली खेळाडू ठरली. मानधनाने यापूर्वी 2018 आणि 2022 मध्येही अशीच कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू बेलिंडा क्लार्कने 1997 आणि 2000 मध्ये दोनदा ही कामगिरी केली होती. 28 वर्षीय मानधना एका कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16 वेळा 50 हून अधिक धावा करणारी इतिहासातील पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे. मंधानाच्या नावावर 2024 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये चार शतके आणि तीन अर्धशतके आहेत. त्याने T20I मध्ये आठ अर्धशतके झळकावली आहेत. या वर्षी भारतातर्फे खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यात त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेन्नईत शतकही झळकावले.

Smriti Mandhana ने रचला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला क्रिकेटपटू Read More »