DNA मराठी

DNA Marathi News

Dhananjay Munde

Dhananjay Munde: धनंजय मुंडे गुन्हेगार नाही…,नामदेव शास्त्री महाराज मुंडेंच्या बचावार्थ मैदानात

Dhananjay Munde: बीड प्रकरणावरून सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचे ठरलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगड येथे जात महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. धनंजय मुंडे हे शंभर टक्के गुन्हेगार नाही मी त्यांच्या पाठीशी आहे असं ठाम मत यावेळी नामदेव शास्त्री महाराजांनी व्यक्त केले आहे. मुंडेंची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे. राजकीय स्वार्थापोटी हे केला जात असल्याचे देखील यावेळी बोलताना शास्त्री म्हणाले. धनंजय मुंडे यांनी रात्रीच भगवानगड येथे जात महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली यावेळी प्रदीर्घकाळ त्यांची चर्चा देखील झाली. एवढे बोलताना शास्त्री म्हणाले की खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत मुंडेंची पार्श्वभूमी देखील गुन्हेगारी नाही. आज मीडिया द्वारे जाते वाट पसरवला जात आहे. धनंजय मुंडे हा गुन्हेगार नाही हे मी शंभर टक्के सांगू शकतो तसेच त्यांच्या पक्षाचे नेत्यांना देखील हे माहिती आहे मात्र हा विषय किती तानायचा हा ज्याने त्याने ठरवावा. धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे असं देखील यावेळी शास्त्री म्हणाले. समोरासमोर येऊन राजकारण करा अशा पद्धतीने राजकारण करू नये कारण अशा मुद्द्यांचा फार काळ फायदा होईल असं मला वाटत नाही भविष्यात याचे देखील राजकीय मीडियाने देखील यामध्ये सहकार्य करून जातीय सलोखा निर्माण होईल असे सहकार्य करावे असे देखील यावेळी शास्त्री म्हणाले. संवेदनशील मुद्द्यावरून राजकारण करणे ही भित्री पद्धत असं शास्त्री म्हणाले.

Dhananjay Munde: धनंजय मुंडे गुन्हेगार नाही…,नामदेव शास्त्री महाराज मुंडेंच्या बचावार्थ मैदानात Read More »

IMG 20250130 WA0007

Maharashtra Politics : नगरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, माजी महापौरसह 12 नगरसेवक शिंदे गटात

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहे. यातच नगर शहरातील देखील तब्बल 12 नगरसेवकांनी ठाकरे गटाला राम राम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, जिल्हा संपर्क प्रमुख दिलिप सातपुते, शहर प्रमुख सचिन जाधव,युवासेना जिल्हाप्रमुख आकाश कतोरेसह उबाठा गटाच्या 12 नगरसेवक, महापौर आणि शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई  येथे हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यामुळे नगरमध्ये उबाठा गटाला मोठ खिंडार पडले. त्याचबरोबर मुंबईतील शेकडो उबाठा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीने  प्रभावित होऊन मागील महिनाभरात विविध पक्षांच्या हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत इनकमिंग जोरात सुरू असून उबाठा गटाला खिंडार पडले आहे. नगर महापालिकेचे महापौर संजय शेंडगे, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, नगरसेवक सचिन शिंदे, श्याम नळकांडे, सुरेश तिवारी, संतोष ग्यानाप्पा,बबलू शिंदे, संग्राम कोटकर, दत्तात्रय कावळे, परेश लोखंडे, संदीप दातरंगे, कैलास शिंदे यांच्यासह उपशाखाप्रमुख, विभाग प्रमुख आणि शाखाप्रमुख यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी उठाव केला होता. त्याची प्रचिती मागील अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामातून दिसली. त्यामुळेच अनेक पक्षातील लोकप्रतिनिधी शिवसेनेत येत आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की 12 नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाने नगरमधील शिवसेना आणखी मजबूत झाली आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीच्या सर्वाधिक जागा येतील असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की विधानसभा निवडणुकीत शिवसेना 80 जागा लढली आणि 60 आमदार निवडून आल्या. उबाठा 95 जागा लढले आणि 20 जागी निवडून आले. उबाठापेक्षा शिवसेनेला 17 लाख अधिक मते मिळाली तर लोकसभेत शिवसेनेला दोन लाख जास्त मते मिळाली. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न उरलेला नाही. तसेच नगरमधील विकास कामांना निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

Maharashtra Politics : नगरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, माजी महापौरसह 12 नगरसेवक शिंदे गटात Read More »

Ajit Pawar On Dhananjay Munde

… तर मकोका लावणार, अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या समोर दिला इशारा

Ajit Pawar On Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. या प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधाडून आरोप- प्रत्यारोप सुरू आहे. तर दुसरीकडे आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीड दौऱ्यावर असताना थेट धनंजय मुंडे यांच्यासमोर अजित पवारांनी सर्वांना इशारा दिला आहे. आपल्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नये. मी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना बोलावलं असून त्यांना आता माझ्या पद्धतीने सांगणार आहे. कोणत्याही अफवावंवर विश्वास ठेऊ नका आणि एक गोष्ट पुन्हा सांगतो, जर कोणी कुठल्या गोष्टीत जबाबदार असेल, जर कुणी वेडेवाकडे प्रकार केले असतील, विकासाची कामं करताना कुणी कुणाला खंडणी मागितली तर मी मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही. मी टोकाची भूमिका घेईन. असं अजित पवार म्हणाले. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, जनतेचा पैसा सत्कारणी लागलाच पाहिजे. त्या ठिकाणी कोणतीही गडबड होता कामा नये. जिल्ह्यासाठी केंद्राचा निधी कसा जास्त आणता येईल, यासाठी प्रयत्न आम्ही करणार आहे. मी पहिल्यांदाच पालकमंत्री या नात्याने बीड जिल्ह्यामध्ये आलो आहे. असं देखील यावेळी अजित पवार म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे मंत्रीपदाचा राजीनामा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

… तर मकोका लावणार, अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या समोर दिला इशारा Read More »

Crime 1

Crime News: आईचा प्रेमसंबंध, नाराज मुलांनी केला चाकूने – रॉडने वार अन् घडलं असं काही…

Crime News: आईच्या प्रेमप्रकरणामुळे नाराज झालेल्या दोन मुलांनी चाकूने सपासप वार करून एका व्यक्तीची हत्या केली आहे. हे धक्कादायक प्रकरण गुजरातमधील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील गांधीनगरमध्ये दोन भावांनी एका व्यक्तीची चाकूने वार करून हत्या केल्याचा आरोप आहे. त्याच्या आईसोबतच्या प्रेमसंबंधाच्या रागातून हे कृत्य केल्याचे वृत्त आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आरोपीने पीडितेची आतडेही बाहेर काढली आणि बाहेर फेकून दिली, ज्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या लोकांना धक्का बसला. पीडितेचा मुलगा अजयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, संजय (27) आणि जयेश ठाकोर (23) हे दोन भाऊ आहेत. आईच्या प्रियकरावर रागत्यांच्या विधवा आईसोबत 15 वर्षांहून अधिक काळ संबंध असलेले 45 वर्षीय रतनजी ठाकोर यांच्याविरुद्ध त्यांच्या मनात तीव्र नाराजी होती. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की आरोपींचा असा विश्वास होता की या नात्यामुळे त्यांच्या दिवंगत वडिलांच्या स्मृतीचा अनादर झाला. आईपासून दूर राहण्याची ताकीदएफआयआरनुसार, संजय आणि जयेश ठाकोर यांचा रतनजी ठाकोर यांच्याशी आधीच वाद होता. तपास अधिकारी (आयओ) उन्नती पटेल म्हणाल्या, ‘त्यांनी वारंवार त्या माणसाला त्यांच्या आईपासून दूर राहण्याचा इशारा दिला आणि समाजातील वृद्धांनाही या प्रकरणात सहभागी करून घेतले. तथापि, हा प्रश्न शांततेने सोडवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले. चाकू आणि रॉडने हल्लातपास अधिकारी पुढे म्हणाले, ‘रविवारी, चाकू आणि रॉडने सशस्त्र संजय आणि जयेश यांनी गावात घर बांधत असलेल्या रतनजी ठाकोर आणि त्यांचे सहकारी जिकुजी परमार यांच्यावर हल्ला केला.’ एफआयआरमध्ये असेही म्हटले आहे की आरोपींनी त्यांचे रक्त ओवाळले- काही कामगार आणि रतनजींच्या सहकाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी त्यांनी शस्त्रे भिजवली आणि त्यांच्या दुचाकीवरून पळून गेले. अशा प्रकारे पोलिसांनी त्याला अटक केलीआयओने सांगितले की पोलिसांनी दोघांनाही त्यांच्या मोबाईल फोन लोकेशनचा वापर करून ट्रॅक केले आणि नंतर त्यांना अटक केली. त्याच्याविरुद्ध खून आणि भडकावण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News: आईचा प्रेमसंबंध, नाराज मुलांनी केला चाकूने – रॉडने वार अन् घडलं असं काही… Read More »

Stampede In Mahakumbh

Stampede In Mahakumbh : मोठी बातमी! महाकुंभ चेंगराचेंगरी 17 लोकांचा मृत्यू

Stampede In Mahakumbh: प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून सुरू असलेल्या महाकुंभात मौनी अमावस्येच्या स्नानासाठी लाखो भाविक संगम घाटावर जमले होते मात्र अचानक चेंगराचेंगरीची घटना घडल्याने 17 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाने आतापर्यंत 17 मृत्यूंची पुष्टी केली आहे. अपघातानंतर लगेचच डझनभर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आणि मृतांचे मृतदेह तेथून नेण्यात आले. जखमी भाविकांना मेळ्याच्या परिसरात बांधलेल्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवकीनंदन ठाकूर काय म्हणाले?चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल आध्यात्मिक गुरू देवकीनंदन ठाकूर म्हणाले, “मी संगम घाटावर गेलो नाही कारण तिथे खूप गर्दी आहे. मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी फक्त संगम घाटावर स्नान करण्याचा आग्रह धरू नये. सध्या संपूर्ण गंगा आणि यमुना नद्या ‘अमृत’ आहेत, जर तुम्ही कुठेही स्नान केले तर तुम्हाला तेवढेच पुण्य मिळेल. स्वामी रामभद्राचार्य काय म्हणाले?चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य म्हणाले, “मी सर्व भाविकांना आवाहन करतो की आज प्रयागराजमध्ये मोठी गर्दी आहे, म्हणून त्यांनी केवळ संगम घाटावर पवित्र स्नान करण्याचा आग्रह धरू नये. त्यांनी आता त्यांचा छावणी सोडून स्वतःची सुरक्षितता शोधू नये.” साध्वी निरंजन ज्योती काय म्हणाल्या?महाकुंभ परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीसारख्या परिस्थितीबद्दल साध्वी निरंजन ज्योती म्हणाल्या, “ही एक दुःखद घटना आहे. जे काही झाले ते बरोबर नव्हते. जनहित लक्षात घेऊन, आखाडा परिषदेने त्यांचे अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जमलेल्या भाविकांची संख्या अंदाजापेक्षा जास्त आहे. मी लोकांना आवाहन करते की संपूर्ण जत्रा परिसर कुंभमेळा आहे, म्हणून ते केवळ त्रिवेणी घाटावरच नव्हे तर कोणत्याही घाटावर स्नान करू शकतात. आज आखाडे स्नानात सहभागी होणार नाहीतअखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी म्हणाले, “घडलेल्या घटनेने आम्हाला खूप दुःख झाले आहे. आमच्यासोबत हजारो भाविक होते… जनहितासाठी, आम्ही ठरवले की आज आखाडे स्नानात सहभागी होणार नाहीत. मी लोकांना आजच्याऐवजी वसंत पंचमीला स्नान करण्यासाठी येण्याचे आवाहन करतो.”

Stampede In Mahakumbh : मोठी बातमी! महाकुंभ चेंगराचेंगरी 17 लोकांचा मृत्यू Read More »

Baba Siddique

Baba Siddique : धक्कादायक खुलासा, बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं भाजपच्या बड्या नेत्याचं नाव, WhatsApp चॅटिंग अन्…

Baba Siddique : राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर आता या प्रकरणात मोठा आणि धक्कादायक खुलासा माजी आमदार आणि बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांनी केला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या डायरीत शेवटचे नाव भाजपचे नेते मोहित कंबोज यांचे आहे, असे झिशान सिद्दीकी यांनी सांगितले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. “मोहित कंबोज यांचे डायरीत शेवटचे नाव असून त्यानंतर माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास व्हॉटसॲपवर चॅटिंग केले होते. वडिलांनी त्यांचे नाव डायरीत का लिहले, हे मी सांगू शकत नाही. परंतु या गोष्टीचा तपास होणे गरजेचे आहे,” असं माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी म्हंटले आहे. याच बरोबर झिशान सिद्दीकी यांनी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचाही उल्लेख केला आहे. परब यांनी ज्ञानेश्वर नगर प्रकल्पबाधितांची बैठक घेतली. बैठकीत विकासकांनी झोपडपट्टीधारकांना त्याच ठिकाणी घर मिळेल असे वचन दिले होते. असं झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हंटले आहे. झिशान सिद्दीकी यांनी नोंदविलेल्या जबाबानंतर बाब सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन ट्विस्ट येणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Baba Siddique : धक्कादायक खुलासा, बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं भाजपच्या बड्या नेत्याचं नाव, WhatsApp चॅटिंग अन्… Read More »

ST Bus

Pratap Sarnaik : महामंडळाला मिळणार 25 हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस, खरेदीसाठी अजित पवारांची मान्यता

Pratap Sarnaik : एस. टी. महामंडळाला स्वमालकीच्या दरवर्षी ५००० या प्रमाणे येत्या ५ वर्षात २५ हजार नव्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली असून तसा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सन २०२५-२६ अर्थसंकल्पासाठी परिवहन विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी बोलवली होती. यामध्ये एसटीच्या सद्यस्थिती मंत्री सरनाईक यांनी विशद केली. सध्या एसटी महामंडळाकडे केवळ १४ हजार ३०० बसेस असून त्यापैकी १० वर्ष पेक्षा जास्त जुन्या झालेल्या १० हजार बसेस आहेत. त्या पुढील ३-४ वर्षात प्रवासी सेवेतून बाद होतील. हि वस्तुस्थिती लक्षात घेता, भविष्यात एसटीला आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतः च्या बसेस घेणे आवश्यक आहे. त्यासाठी दरवर्षी ५ हजार नवीन लालपरी बसेस याप्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये २५ हजार लालपरी बसेस घेण्याची पंचवार्षिक योजना आम्ही आखली असून त्याला अर्थमंत्र्यांनी परवानगी द्यावी असा प्रस्ताव मांडला. अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावाची निकड लक्षात घेऊन तातडीने तत्वतः मान्यता दिली असून त्याबद्दल त्यांचे मंत्री सरनाईक यांनी आभार मानले आहेत. ते पुढे म्हणाले की, दरवर्षी ५ हजार नवीन बसेस याप्रमाणे सन २०२९ साली या २५ हजार वसेस व ५ हजार इलेक्ट्रिक बसेस मिळून ३० हजार बसेसचा ताफा एसटीकडे तयार असेल भविष्यात ” गाव तिथे एसटी… मागेल त्याला बस फेरी..!” आपणं देऊ शकतो. “आज आनंद दिघे साहेब यांच्या जयंती निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता देऊन एसटी वर प्रेम करणाऱ्या लाखो सर्वसामान्य जनतेला गोड भेट दिली आहे. याबद्दल मी त्यांचा शतशः आभार आहे.” अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली.

Pratap Sarnaik : महामंडळाला मिळणार 25 हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस, खरेदीसाठी अजित पवारांची मान्यता Read More »

Saif Ali Khan 1

Saif Ali Khan: ‘त्या’ रात्री काय घडले? सैफने केला धक्कादायक खुलासा

Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर काही दिवसापूर्वी चाकूने हल्ला करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली आहे. तर आता त्या रात्री नेमक काय घडलं होते याबाबत सैफने गुरुवारी त्याच्या घरी पोलिसांना आपला जबाब नोंदवला आहे. सैफवर हल्ला झाला त्या रात्री काय घडले?पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफने आपल्या जबाबात म्हटले आहे की, 16 जानेवारीच्या रात्री तो आणि त्याची पत्नी करीना कपूर 11 व्या मजल्यावर त्यांच्या बेडरूममध्ये होते. जेव्हा त्याने त्याची नर्स एलियामा फिलिपच्या किंकाळ्या ऐकल्या. सैफ पुढे म्हणाला की जेव्हा त्यांना त्यांच्या नर्स अलियामा फिलिपच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा ते दोघेही जहांगीरच्या रूमकडे धावले, जिथे अलियामा फिलिप देखील झोपली होती. तिथे त्याला एक अनोळखी माणूस दिसला आणि जहांगीरही रडत होता. सैफवर हल्ला कसा झाला?सैफ म्हणाला की त्याने हल्लेखोराला पकडले. यावेळी हल्लेखोराने त्याच्या पाठीवर, मानेवर आणि इतर ठिकाणी अनेक वार केले. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आणि कसा तरी त्याने स्वतःची सुटका केली. त्यानंतर हल्लेखोराला मागे ढकलण्यात आले. पोलिसांना चाकूचा तिसरा तुकडा सापडला16 जानेवारी रोजी सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरी झालेल्या हल्ल्यात वापरलेल्या चाकूचा तिसरा तुकडा जप्त करण्यात आला आहे. “चाकूचा तिसरा तुकडा, ज्यामध्ये हँडल आणि ब्लेडचा काही भाग होता, तो वांद्रे तलावाजवळ सापडला,” असे वांद्रे पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. ज्या ठिकाणाहून चाकूचा भाग सापडला ते ठिकाण अभिनेत्याच्या सतगुरु शरण बिल्डिंगमधील घरापासून एक किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे. बुधवारी संध्याकाळी आम्ही आरोपीला तलावावर घेऊन गेलो आणि चाकूचा हरवलेला भाग सापडला.”

Saif Ali Khan: ‘त्या’ रात्री काय घडले? सैफने केला धक्कादायक खुलासा Read More »

Dahi

Health Update: सावधान…, दह्यासोबत ‘हे’ 5 पदार्थ खाऊ नका, नाहीतर आरोग्यावर होणार वाईट परिणाम

Health Update: आरोग्यासाठी दही हे खूप फायदेशीर मानले जाते. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे पोटात असंख्य चांगले बॅक्टेरिया तयार करतात आणि ते पचनसंस्था मजबूत करण्यास आणि इतर आजारांना दूर ठेवण्यास मदत करतात. मात्र काही गोष्टी अशा आहेत ज्या दह्यासोबत खाऊ नयेत. यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकते. मासेदही आणि मासे एकत्र खाऊ नयेत, त्यांच्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या गुणधर्मांमुळे त्याला परस्परविरोधी आहार म्हणतात. अशा परिस्थितीत पोट फुगणे आणि अपचनाची समस्या उद्भवू शकते. यामुळे तुम्हाला त्वचेची अ‍ॅलर्जी देखील होऊ शकते. आंबाआंबा आणि दही, दोन्ही एकत्र खाऊ नयेत. यामुळे पोटात आम्लता, जास्त गॅस तयार होणे आणि पोट फुगणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.  आंबा हा गोड आणि उष्ण पदार्थ आहे आणि दह्याचा स्वभाव थंड असतो, म्हणून दोन्हीही विरुद्ध पदार्थ मानले जातात. कांदाजर तुम्ही दह्यासोबत कच्चा कांदा खाल्ला तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. कारण कांदा गरम असतो आणि दही थंड असते. त्यामुळे तेएकत्र खाल्ल्याने पोटफुगी आणि गॅसची तीव्र समस्या उद्भवू शकते. यामुळे अपचन होऊ शकते. दूधदही आणि दूध एकत्र सेवन करू नये. हा एक विसंगत आहार मानला जातो. यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, दही आणि दूध एकत्र सेवन केल्याने पोटात असलेले चांगले बॅक्टेरिया नष्ट होतात, ज्यामुळे एकूण आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जास्त रसाळ फळेजर तुम्ही रसाळ फळांसोबत दही खाल्ले तर पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे पचनक्रियेत समस्या निर्माण होऊ शकतात आणि तुम्हाला पोट फुगण्याची समस्या येऊ शकते. म्हणून, खूप रसाळ फळांसोबत दही खाऊ नका.

Health Update: सावधान…, दह्यासोबत ‘हे’ 5 पदार्थ खाऊ नका, नाहीतर आरोग्यावर होणार वाईट परिणाम Read More »

Ahmednagar Collector Office

Siddharam Salimath : ‘मिशन 100 दिवस’ अंतर्गत नागरिकांना किमान 5 लाख सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवा- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

Siddharam Salimath : ‘इज ऑफ लिव्हिंग’ या संकल्पनेवर नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी विविध विभागांच्या सेवांचे सुसूत्रीकरण करत 100 दिवसांमध्ये सर्व विभागांनी मिळून किमान 5 लाख सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध विषयांवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी हेमलता बडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना असलेल्या 7 कलमी कार्यक्रमांची ‘मिशन 100 दिवस’ उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमबजावणी करण्यात यावी. महसूल विभागामार्फत विद्यार्थी-विद्यार्थींनींना विविध प्रकारचे एक लाख दाखले देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याप्रमाणे इतर शासकीय विभागांनीही त्यांच्या सेवा देण्याचे नियोजन करावे. प्रत्येक कार्यालय, कार्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा. कार्यालयातील दस्तऐवज सहागठ्ठे पद्धतीनूसार ठेवण्यात यावे. अनावश्यक साहित्य निर्लेखित करण्यात यावे. अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या विविध भागांना भेटी देण्यासाठी दोन दिवस क्षेत्रीय भेटीसाठी राखून ठेवावा. भेटीमध्ये शासनाच्या महत्त्वकांक्षी व पथदर्शी योजनांचा आढावा घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सर्व विभागांनी त्यांच्या संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत करावी. जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळ अधिक माहितीपूर्ण आणि नागरिकांसाठी उपयुक्त करण्यावर भर द्यावा. जिल्ह्याच्या विकासामध्ये विभागाचे योगदान असलेल्या ब्लॉगची निर्मिती करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिल्या. जनतेला पारदर्शक, गतीमान आणि दिलेल्या कालमर्यादेत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिक प्रभावीपणे ऑनलाईन सेवा देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम तयार करण्यात आला आहे. या अधिनियमांतर्गतची कामे प्राधान्याने करत नागरिकांना विहित मुदतीमध्ये सेवा देण्यात याव्यात. डॅशबोर्डवर एकही प्रकरण प्रलंबित राहणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. जिल्ह्यात विविध विभागामार्फत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांची माहिती अभिनव पहल या पोर्टलवर अपलोड करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. बैठकीस दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Siddharam Salimath : ‘मिशन 100 दिवस’ अंतर्गत नागरिकांना किमान 5 लाख सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवा- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ Read More »