DNA मराठी

ahmednagar news

Ahmednagar News: जिल्हा बार असोसिएशनच्या काम बंद आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चेचा पाठिंबा

Ahmednagar News:  काही दिवसांपूर्वी राहुरी शहरातील वकील दांपत्यांच्या निर्घृण हत्या करण्यात आली होती ही प्रकरण उघडकीस आल्यानंतर तात्काळ पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली व तपासाची चक्रे वेगाने फिरवली.  त्यानंतर यातील पाच आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. तर दुसरीकडे या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात असून 3 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाचे कामकाज बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.  आज या आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्त्यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. यावेळी रामेश्वर निमसे, अमोल हुंबे, अनिकेत आवारे, राम जरांगे, श्रीकांत भामरे, गिरीश भामरे, एडवोकेट गजेंद्र दांगट, एडवोकेट स्वप्निल दगडे, किशोर शिंदे, योगेश देशमुख, विलास तळेकर, अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ahmednagar News: जिल्हा बार असोसिएशनच्या काम बंद आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चेचा पाठिंबा Read More »

Poonam Pandey Death News : पूनम पांडेचा मृत्यू, वयाच्या 32 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अनेक चर्चांना उधाण

Poonam Pandey Death News : बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे यांचे निधन झाले आहे. ती नेहमी सोशल मीडियावर तिच्या व्हिडिओ आणि फोटोमुळे चर्चेत राहत होती.  रिपोर्टनुसार, पूनम पांडेला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होता आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पूनम पांडेने कधीही तिला असा आजार झाल्याचे सांगितले नाही. पूनम पांडेने काही वर्षांपूर्वी सॅम बॉम्बेसोबत लग्न केले होते पण नंतर ते वेगळे झाले. पूनम पांडे केवळ 32 वर्षांची होती. पूनम पांडेच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या स्टोरीमध्ये लिहिले आहे की, ‘आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी खूप कठीण आहे. अत्यंत दुःखाने आपणा सर्वांना कळवावे लागते की, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे आपण आपली लाडकी पूनम पांडे हिला गमावले आहे. पूनम तिला भेटलेल्या प्रत्येकावर नेहमीच प्रेम करत असे. या दुःखाच्या काळात आम्ही आशा करतो की आमच्या गोपनीयतेची काळजी घेतली जाईल. पूनम पांडे खूप चर्चेत राहिली 2011 मध्ये पूनम पांडे चर्चेत आणि वादात आली जेव्हा तिने जाहीर केले की जर भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकला तर ती टॉपलेस होईल. तिने काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. ती तिच्या कूल स्टाइल आणि हॉट फोटोशूटमुळे चर्चेत राहिली. एकदा त्याचा कथित सेक्स व्हिडिओ देखील लीक झाला होता, ज्यामुळे त्याच्यावर बरीच टीका झाली होती.  पूनम पांडेने स्वतः अनेक ॲडल्ट व्हिडिओ बनवले होते आणि ते सोशल मीडिया साइट्सवर शेअर केले होते. मात्र, यावरून वाद झाल्यानंतर त्याने असे व्हिडिओ बनवणे बंद केले.

Poonam Pandey Death News : पूनम पांडेचा मृत्यू, वयाच्या 32 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अनेक चर्चांना उधाण Read More »

BJP News: राष्ट्रवादीचे युवानेते पवनराजे राळेभात यांचा भाजपात प्रवेश

BJP News:  जामखेडच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला असून, राष्ट्रवादीचे युवानेते व जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक पवनराजे राळेभात यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत  राळेभात यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.  पवनराजे राळेभात यांनी बुधवारी (ता.३१) चौंडी येथे आ प्रा राम शिंदे यांच्या निवासस्थानी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपाचे विधानसभाक्षेत्र प्रमुख रवी सुरवसे, तालुकाध्यक्ष अजय काशीद, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, माजी सभापती डाॅ.भगवान मुरूमकर, सौ अर्चना ताई राळेभात ; संपत राळेभात ;सचिन पोठरे, माजी उपसभापती दादासाहेब रिठे,  गौतम उत्तेकर, नगरसेवक अमीत चिंतामणी, बिबिशन धनवडे, सोमनाथ राळेभात, तात्याराम पोकळे,, खर्ड्याच्या सरपंच  संजीवनी पाटील, जवळयाचे सरपंच सुशील आव्हाड, उपसरपंच प्रशांत शिंदे, युवानेते राहूल पाटील, डाॅ.ज्ञानेश्वर झेंडे , प्रवीण सानप, मोहन गडदे, डाॅ.विठ्ठल राळेभात यांच्यासह मोठया संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान पवनराजे राळेभात यांच्या भाजपा प्रवेशाने आ रोहित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा जामखेड शहरातील प्रमुख चेहरा असलेले पवनराजे राळेभात यांचा शहरात मोठा समर्थक वर्ग असल्याने जामखेड शहरात भाजपाची ताकद वाढणार आहे. तर राळेभात यांच्या भाजपा प्रवेशाने  राष्ट्रवादीला पुन्हा एकदा मोठे खिंडार पडले आहे.  यावेळी आमदार राम शिंदे व पवन राळेभात यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

BJP News: राष्ट्रवादीचे युवानेते पवनराजे राळेभात यांचा भाजपात प्रवेश Read More »

Sujay Vikhe : खा. सुजय विखे यांच्या पाठपुराव्याला यश! ‘या’ योजनांना प्रशासकीय मान्यता..

Sujay Vikhe : अहमदनगर जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतील ० ते १०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या सुमारे १५ को.प. बंधारे आणि गे.सी. बंधारे योजनांना महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी या योजनांना प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. आज त्या प्रयत्नांना आणि वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने आनंद वाटत असल्याचे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.    या योजनांच्या कामासाठी भरीव निधी मंजूर झाला असून मृद व जलसंधारण विभागाच्या सन २०२२-२३ च्या दरसूचीवर आधारित कामाप्रित्यर्थ सुमारे ८.५ कोटी रुपये व अनुषंगिक खर्चासाठी ६५ लक्ष रुपये अशा एकूण अंदाजित ९.५ कोटी रुपयांच्या किमतीस मान्यता प्रदान करण्यात आली आहे.  तसेच सदर योजनांच्या प्रशासकीय मान्यता अंदाजपत्रकानुसार या बंधाऱ्यांची एकूण साठवण क्षमता ५३०.२८ स.घ.मी. असून नियोजित एकूण सिंचन क्षमता १९६ हेक्टर इतकी असल्याचे खासदार सुजय विखे यांनी सांगितले.  या योजनेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून यापैकी नगर तालुक्यात दोन, पाथर्डी-५, पारनेर-२, श्रीगोंदा-३ आणि शेवगाव, जामखेड आणि कर्जत तालुक्यातील प्रत्येकी एका जागेची अशा एकूण १५ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. दरम्यान खासदार विखेंनी सदरील भरीव रकमेस मान्यता मिळवून दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले.

Sujay Vikhe : खा. सुजय विखे यांच्या पाठपुराव्याला यश! ‘या’ योजनांना प्रशासकीय मान्यता.. Read More »

Ahmednagar News : मुकुंदनगर भागातील हिंदु मंदिरावर होणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करा

Ahmednagar News: मुकुंदनगर भागातील हिंदु मंदिरावर होणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई आणि मंदिराचे जीर्णोध्दार व सुशोभिकरण करण्यात यावे अशी मागणी कुणाल भंडारी यांनी निवेदनाद्वारे अहमदनगर महापालिका आयुक्तांना केली आहे.   त्यांनी आपल्या निवेदनात असं म्हटले आहे की, मुकुंदनगर भागातील इंडिया बेकरी समोरील श्री पावन दत्त मंदिर हे जुने व पुरातन मंदिर असून या मंदिराच्या असलेल्या जागेच्या परिसरामध्ये अतिक्रमण करुन बांधकाम करण्यात आलेले असून या मंदिराची जागा हडपुन या मंदिराच्या पावित्र्याला धोका निर्माण होत आहे.  याबाबत तातडीने कारवाई करुन संबंधीत बांधकाम काढण्यात यावे व मुकुंदनगर भागातील शांतीधाम मंदिर हे सुध्दा पुरातन व जुने मंदिर असून महानगरपालिकेच्या जागेत हे मंदिर असल्याने या मंदिराच्या बाबतीत दिनांक 1 फेब्रुवारी 2022 रोजी बजरंग दलाने आपणास निवेदन दिलेले होते.  या मंदिरामध्ये त्या भागातील मुस्लिम गुंडांकडून मंदिराच्या जागेत अतिक्रमण करणे, तसेच ड्रेनेजचे पाणी सोडणे, कचरा आणुन टाकणे, मांसाचे तुकडे टाकणे असे मंदिराच्या पावित्र्याला धोका निर्माण होऊन मंदिराच्या जागेवरती कब्जा करण्याच्या उद्देशाने व तेथील हिंदु बांधवांना हाकलून लावण्याचे हे षडयंत्र आहे व हे सातत्याने अनेक वर्षापासून चालु आहे.  तरी आपण संबंधीत विषयामध्ये तातडीने कारवाई करुन मंदिराचा जीर्णोध्दार करुन वॉल कंपाऊंड बांधुन त्या ठिकाणी सुशोभिकरण करावे व मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करावी.  तसेच संबंधीत समाज कंटकांवर त्वरीत कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा बजरंग दल तीव्र स्वरुपाचे आंदोलन उभारेल व पुढील होणाऱ्या परिस्थितीस सर्वस्वी जबाबदार महानगरपालिका व पोलिस प्रशासन असेल असा इशाराही त्यांनी आपल्या निवेदनात दिला आहे.

Ahmednagar News : मुकुंदनगर भागातील हिंदु मंदिरावर होणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करा Read More »

Ahmednagar News: तरुणाचा मध्यरात्री खून, पत्नीसमोरच 4 अज्ञात आरोपींनी केले कोयत्याने वार…

Ahmednagar News:  श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीतील कोथूळ गावात मध्यरात्री अडीचच्या सुमारास 4 अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून पत्नीसमोरच पतीला कोयत्याने वार करून ठार केल्याची घटना घडली असून योगेश सुभाष शेळके (वय 33 वर्षे) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मयताच्या पत्नीने अज्ञात चार व्यक्तींविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सदर घटनेने श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली आहे.  मयताच्या पत्नीने आपल्या फिर्यादीत म्हणले आहे की,मी माझे पती, सासरे मुले सर्व कुटुंबीय नेहमीप्रमाणे जेवण करून झोपलो असता मध्यरात्री अडीच च्या सुमारास दरवाजा वाजवल्याचा आवाज आल्याने मी उठले त्यावेळी घरातील लाईट गेली होती,मी उठून घराचा दरवाजा उघडला असता काळे कपडे घातलेले व तोंडाला बांधलेले हातात कोयता असलेली 4 इसम दिसून आले.  त्यातील एकाने माझ्या गळ्याला कोयता लावत तू जर आरडाओरडा केला तर तुला ठार मारेल असा दम दिला आणि त्यातील तिघे जण पती योगेश सुभाष शेळके झोपलेल्या ठिकाणी जाऊन कोयत्याने गळ्यावर, पायावर ,हातावर कोयत्याने वार करून पतीला ठार मारून पळून गेले.त्यानंतर आरडाओरडा केल्याने शेजारील जमा झाले.  घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, पीएसआय राजेंद्र चाटे, पीएसआय गाजरे,पो हे कॉ. नंदकुमार पठारे,पो.हे.कॉ. खेडकर, पो. कॉ. संदीप दिवटे, पो. कॉ. कैलास शिपणकर यांच्यासह बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.  घटनास्थळी पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, डीवायएसपी विवेकानंद वाखारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी भेट देऊन तापसाबाबत सूचना केल्या. काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असून त्यादृष्टीने तपास चालू आहे. बेलवंडी पोलिसांची चार पथके आणि स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके आरोपींच्या मागावर असून लवकरच आरोपी गजाआड केले जातील. अशी प्रतिक्रिया  पोलीस निरीक्षक श्री. संतोष भंडारे यांनी फोनवर बोलताना दिली.

Ahmednagar News: तरुणाचा मध्यरात्री खून, पत्नीसमोरच 4 अज्ञात आरोपींनी केले कोयत्याने वार… Read More »

Ahmednagar News: जिल्हा न्यायालयातील वकिलांचे 3 फेब्रुवारी पर्यंत काम बंद आंदोलन..

Ahmednagar News: अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने आज मंगळवारी वकिलांनी काम बंद आंदोलन ठेवून राहुरी येथील न्यायालयातील अॅड.राजाराम आढाव आणि अॅड.मनिषा आढाव या वकील दाम्पत्याची निर्घृण हत्या झालेल्या या घटनेचा निषेध व्यक्त करत, भविष्यामध्ये अशा घटना थांबल्या नाहीत तर वकील संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलने केली जातील असा इशाराही यावेळी वकील संघटनांनी दिला आहे.  यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट नरेश गुगळे, उपाध्यक्ष महेश शेडाळे, एडवोकेट सतीश गुगळे, सचिव संदीप शेळके, एडवोकेट अनिता दिघे, एडवोकेट सुहास टोने, एडवोकेट महेश काळे, एडवोकेट विकास सांगळे, एडवोकेट अनिता येवले आदी वकिलांनी सहभाग नोंदवला होता.  तसेच सदर परिस्थिती गांभीर्याने घेऊन शासनाने एडवोकेट प्रोटेक्शन कायदा संमत करावा अशी मागणी अहमदनगर जिल्हा न्यायालय ते अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत  मोर्चा काढून निदर्शने दर्शवत जिल्हाधिकारी यांना एडवोकेट प्रोटेक्शन कायदा लागू करण्याची केली मागणी.

Ahmednagar News: जिल्हा न्यायालयातील वकिलांचे 3 फेब्रुवारी पर्यंत काम बंद आंदोलन.. Read More »

Maratha Reservation: कोणाला फसवलं, मराठ्यांना की ओबीसींना? राज्य सरकारला काँग्रेसचा सवाल

Maratha Reservation : मराठा समाजाच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेत मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे.  मात्र आता सरकारच्या या निर्णयानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत ओबीसींना की मराठ्यांना फसवले? असं प्रश्न उपस्थित केला आहे. याचं बरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे यांचे उपोषण सोडण्यासाठी का? गेले नाही असं देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.   काय म्हणाले नाना पटोले? “आरक्षण देताना ओबीसींना धक्का न लावता आरक्षण देऊ असे सांगितले होते मग आरक्षण नेमके कसे दिले याचा खुलासा राज्य सरकारने करावा, त्याचबरोबर सरसकट आरक्षण देऊ असे सांगितले होते मात्र ते का दिले नाही असे म्हणत नाना पटोले यांनी राज्य सरकारने मराठा समाजाला फसवले की ओबीसी समाजाला याचा खुलासा करावा,” अशी मागणी सरकारकडे केली आहे. “जनगणना करण्याची मागणी सुरुवातीपासून आहे. एक फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनात 50 टक्क्यांची मर्यादा तोडून सगळ्यांना न्याय द्यावा तसेच सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण द्यावे ही आमची सुरुवातीपासून मागणी असून, यांनी नक्की कोणाला फसवले? याबाबतचा संभ्रम राज्यात कायम असल्याचं मत देखील नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. “मराठा समाजाच्या आरक्षणाची ही लढाई आज झालेली नसून या आधी चार वेळा झाली आहे देवेंद्र फडणवीस यांनी जे सांगितले तेच आता पुन्हा दिले आहे, यामुळे यांनी नक्की कुणाला फसवले याबाबत स्पष्टीकरण द्यावे, तसेच फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना संपवण्याचे काम भाजप सरकार करीत असून ते काँग्रेस खपवून घेणार नाही असा इशारा नाना पटोले यांनी यावेळी दिला आहे.

Maratha Reservation: कोणाला फसवलं, मराठ्यांना की ओबीसींना? राज्य सरकारला काँग्रेसचा सवाल Read More »

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, म्हणाले, मी….

Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून सुरू राज्यात मराठा आरक्षणासाठी मागणी होत होती. आज या मागणीला पुर्ण करत राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी जाहीरपणे घेतलेली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ पूर्ण केली.  मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट घेऊन त्यांचे उपोषण सोडवले आणि जरांगे यांना सकल मराठा समाजासमोर राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेची प्रत दिली. जरांगे यांच्या कपाळाला गुलाल लावत मुख्यमंत्र्यांची त्यांचे अभिनंदन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय.. जय शिवराय आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. आपल्या मागण्यांसाठी मुंबईच्या वेशीपर्यत आलेल्या मराठा समाज बांधवांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे सकाळी सव्वा नऊच्या सुमारास वाशी येथे आले. त्यानंतर ते पायी चालत छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेले त्याठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि जरांगे व्यासपीठावर आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेची प्रत जरांगे यांना देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या हाताने मोसंबीचा रस घेऊन जरांगे यांनी आपण उपोषण सोडल्याचे जाहीर केले. मराठा समाज बांधवांची मागणी पूर्ण केल्याबद्दल जरांगे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा यावेळी सत्कार केला.

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, म्हणाले, मी…. Read More »

Talathi Bharti : तलाठी भरतीत घोटाळा? उमेदवाराला चक्क 200 पैकी 214 गुण!

Talathi Bharti :  काही महिन्यापूर्वी झालेल्या तलाठी भरतीवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँग्रेसने या भरतीमध्ये मोठी हेराफेरी झाल्याचा आरोप केला आहे.  या परीक्षेत बसलेल्या उमेदवाराला 200 पैकी 214 गुण मिळाले आहेत. त्यामुळे उर्वरित उमेदवारांमध्ये नाराजी आहे. काँग्रेसने तलाठी भरती परीक्षेला मोठा घोटाळा असल्याचे म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. काँग्रेसने नोकरभरती परीक्षेचा निकाल रद्द करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, तलाठी नियुक्तीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘रेल रोको’ आंदोलन केले. सरकारी रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) सांगितले की, पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकावर सुमारे 20 ते 25 युवक काँग्रेस कार्यकर्ते जमले आणि त्यांनी दुपारी 3.15 वाजता बोरिवलीकडे जाणारी ट्रेन थांबवली.

Talathi Bharti : तलाठी भरतीत घोटाळा? उमेदवाराला चक्क 200 पैकी 214 गुण! Read More »