DNA मराठी

ahmednagar news

Ahmednagar News: मुळा, जायकवाडी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी लागणार मार्गी!

Ahmednagar News:  अहमदनगर जिल्ह्यातील मुळा  व जायकवाडी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न प्रलंबित असल्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेत पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील व मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री मा. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन बुधवारी मंत्रालयातील दालनात केले होते.  यावेळी महसूलमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या आणि अडचणी जाणून घेत त्या तातडीने सोडविण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. यामुळे या प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळणार आहे.  अहमदनगर जिल्ह्यातील मुळा, जायकवाडी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तानां शासनाने जमिनी देण्याचे सोपास्कार केले मात्र अद्यापही अनेक जमिनी या भोगवाटा २ मध्ये असून त्यात वन विभागांच्या जमिनींचा सुद्धा समावेश आहे.   यामुळे त्यांना घरकुल योजना आणि इतर शासकीय योजना राबविताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. या जमिनी ह्या १९७३ पुर्वीच्या दिल्या गेल्याने त्यातील अनामत रकमा रखडल्यामुळे या जमीन शासन जमा केल्या जाणार आहेत. यामुळे प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महसूल मंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडे प्रस्ताव पाठऊन अशा जमिनीवरील तत्कालीन धोरणातील १०० टक्के, ७५ टक्के अनामत रक्कम भरण्याची अट शिथिल करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांना दाखले देण्यासंदर्भातील प्रश्न मार्गी लावण्याची मागणी खासदारांनी केली.  वन अधिनियम १९८० अस्तितवात येण्यापुर्वी वाटप केलेल्या जमिनी भोगवाटा २ वर्गातील जमिनी सरकट वर्ग १ मध्ये करण्यात याव्यात. तसेच रहिवाशी प्रयोजनातील वाटप करण्यात आलेले भुखंड आणि पुनर्वसन गावठाणातील जमिनी नियमाकुल करण्याबाबत धोरण निश्चित करण्याची मागणी यावेळी खासदार डॉ. विखे पाटील यांनी केली. या सर्व मागण्याच्या बाबतीत सखोल चर्चा होऊन दोन्ही मंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी सोडविण्यासाठी महसलू, मदत व पुनर्वसन आणि वन विभागाला निर्देश दिले.  या बैठकीला मंत्रालयातील दालनात महसूल व मदत व पुनर्वसन विभागांच्या मंत्र्यांसह आमदार श्रीमती मोनिका राजळे आणि महसूल, मदत पुनर्वसन व वन विभागाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.  तर दृकश्राव्य माध्यमातून खासदार डॉ. सुजय विखे पाटील,अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिध्दिराम सालीमठ आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Ahmednagar News: मुळा, जायकवाडी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी लागणार मार्गी! Read More »

Rajshritai Ghule Patil : स्त्री ही तिच्या कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे :- सौ. राजश्रीताई घुले पाटील

Rajshritai Ghule Patil : स्त्री ही तिच्या कुटुंबाचा कणा असुन तिच्या अस्तित्वावर कुटुंबाचे भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे तिने कोणत्याही परिस्थितीत धैर्याने उभे राहणे गरजेचे आहे.  आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करत असून आपल्या कुटुंबाची जबाबदारी देखील तितक्याच काळजीने पार पडत आहे.  महिलांच्या अतुलनीय योगदानामुळे समाजाची व राष्ट्राची चौफेर प्रगती होईल असे मत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांनी व्यक्त केले असून अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या लाडजळगाव येथील उत्कर्ष फाउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष ज्ञानेश्वर तहकिक, अमोल तहकिक, चंद्रकांत खरात, भाऊसाहेब क्षीरसागर, जगदीश जंगम यांच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.  प्राध्यापिका संजीवनी नवल यांचे व्याख्यानाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून शोभा तहकिक, मोनिका छाजेड, मनीषा कळसाई, मयुरी परदेशी, अस्मिता मराठे, पूजा मुळे, रेखा परदेशी, सुमनबाई कुलकर्णी, कांताबाई राठोड, रुख्मिणी कुलकर्णी आदींसह  महिलांचा सन्मान करण्यात आला होता. यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Rajshritai Ghule Patil : स्त्री ही तिच्या कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे :- सौ. राजश्रीताई घुले पाटील Read More »

Ahmednagar News: चार धारदार तलवारी जप्त, 2 आरोपी ताब्यात, शेवगाव पोलीसांची धडाकेबाज कारवाई

Ahmednagar News: शेवगाव पोलीसांनी धडाकेबाज कारवाई शेवगाव शहरातुन दोन आरोपींकडुन चार धारदार तलवारी जप्त करुन त्यांना अटक केली आहे.   09 मार्च 2024 रोजी आपले पोस्टे हद्दीत कोम्बींग ऑपरेशन राबवुन अवैध धंद्यावर कारवाई, अग्निशस्त्रे व हत्यारे याबाबत मोहीम राबवावी याबाबत  पोलीस अधिक्षक राकेश ओला यांचे आदेश प्राप्त झाले होते.   त्याअनुषंगाने शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांचे आदेशाने दोन पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक  शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत 06.30 वा. चे सुमारास शेवगाव शहरात कोरडे वस्ती येथील दोन इसम यांनी स्वतः जवळ तलवार बाळगली असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून  विशाल संपत भाकरे (वय-२३ वर्षे रा. कोरडेवस्ती ता. शेवगाव जि. अहमदनगर) व संतोष अशोक घोंगडे (वय-२५ वर्ष रा. कोरडेवस्ती ता. शेवगाव जि. अहमदनगर) यांना पोलीस पथकाने ताब्यात घेवुन सदर तलवारी बाबत विचारपुस केली असता त्यांनी प्रथम उडवडीचे उत्तरे दिली परंतु पोलीस पथकाने अधिक विश्वासामध्ये घेऊन विचारले असता त्यांनी सांगितले की, सदरच्या तलवारी ह्या घरामध्ये लपवून ठेवल्या आहेत. तुम्ही आमच्या सोबत चला त्या आम्ही काढून देतो.  तेव्हा आमचे कडिल पोलीस स्टाफ व पंचासमक्ष वरिल दोन्ही आरोपींनी त्यांचे ताब्यातील चार तलवारी काढुन दिल्यानंतर शेवगाव पोलीस स्टेशन भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाने वरिल दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही  पोलीस अधिक्षक  राकेश ओला सो.अ.नगर,अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे अ.नगर, मा.उपविभागिय पोलीस अधिकारी  सुनिल पाटील उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, पोसई अमोल पवार, पोहेकॉ नाकाडे, पोहेकॉ दराडे, पोना उमेश गायकवाड, पोकों शाम गुंजाळ, पोकों बप्पासाहेब धाकतोडे, पोकों एकनाथ गर्कळ, पोकों कृष्णा मोरे, पोकों संतोष वाघ, पोकों संपत खेडकर यांनी केली असून पुढील तपास पो.नि. दिंगबर भदाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकाँ दराडे हे करत आहेत.

Ahmednagar News: चार धारदार तलवारी जप्त, 2 आरोपी ताब्यात, शेवगाव पोलीसांची धडाकेबाज कारवाई Read More »

Ahmednagar News: धक्कादायक घटना, श्रीगोंदा तालुक्यात नऊ वर्षाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार, दोन आरोपींना अटक

Ahmednagar News: ८ मार्च म्हणजे सगळीकडे जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो मात्र श्रीगोंद्यात एका अल्पवयीन मुलीवरती सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघांना जेरबंद करत न्यायालयात हजर केल्यावर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील दक्षिणेकडील एका गावातील एका अल्पवयीन म्हणजे नऊ वर्षाच्या मुली वरती दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील मुख्य आरोपी संतोष रामभाऊ पवार व युवराज नंदू शेंडगे यांनी अल्पवयीन मुली सोबत एक महिन्यांपासून वारंवार बलात्कार केला असून त्याचे मोबाईल चित्रीकरण केल्यानंतर मोबाईल मधील चित्रीकरण नातेवाईकांनी पाहिल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत या दोघांना विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तर दिली.  मात्र प्रकरण चांगलेच अंगाशी येत आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी घडलेल्या सगळा प्रकार सांगितला यावरून मुलीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून संतोष रामभाऊ पवार, युवराज नंदू शेंडगे यांच्यावर पोक्सो ॲट्रॉसिटीसह सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलिसांनी दोघांना जेरबंद केले असून त्यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 मार्चपर्यंत पोलीस कोठवडी सुनावण्यात आली.  या घटनेस चा सर्व प्रकार उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग विवेकानंद वाखारे हे करत आहेत मात्र जागतिक महिलादिनी असा प्रकार घडल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Ahmednagar News: धक्कादायक घटना, श्रीगोंदा तालुक्यात नऊ वर्षाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार, दोन आरोपींना अटक Read More »

Health Tips: अंडे की पनीर,कोणता पदार्थ आहे प्रोटीनचा उत्तम स्रोत? जाणून घ्या व्हाल थक्क

Health Tips: आहाराद्वारे शरीराला योग्य प्रमाणात प्रथिनांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. अंडे की पनीर? यापैकी कोणत्या पदार्थाद्वारे शरीराला पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळतात, जाणून घेऊया याबाबतची माहिती. पनीर आणि अंडे, दोन्हींमध्येही शरीरास आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. अंडे व पनीर, दोन्ही पदार्थ प्रोटीनचा उत्तम स्त्रोत मानले जातात. शाकाहार करणाऱ्यांना पनीरपासून तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन करणं भरपूर आवडते. तर मांसाहार व डाएट फॉलो करणाऱ्या व्यक्ती आपल्या आहारामध्ये अंड्याचा आवर्जून समावेश करतात. पनीरमध्ये पोषक तत्त्वांचा खजिना आहे. यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फोरस, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी चे घटक आहेत. दरम्यान प्रोटीनमुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते शिवाय स्नायू मजबूत राहण्यासाठीही शरीराला पुरेशा प्रमाणात प्रोटीनचा पुरवठा होणे गरजेचं आहे.  अंडे आणि पनीर, दोन्हींमध्येही भरपूर प्रमाणात आरोग्यवर्धक गुणधर्मांचा साठा आहे. जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती कोणत्या पदार्थामध्ये प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक आहे? दोन प्रोटीनयुक्त खाद्यपदार्थाची तुलना केली जाते, त्यावेळेस आपल्या मनात पहिला प्रश्न असा उपस्थित होतो की ‘पनीर’ आणि ‘अंडे’ यापैकी कोणत्या पदार्थांद्वारे शरीराला सर्वाधिक प्रोटीनचा पुरवठा होतो? दोन मोठ्या आकाराच्या अंड्यांचे वजन जवळपास 100 ग्रॅम एवढे असते. यामध्ये अंदाजे प्रोटीनची मात्रा 14 ग्रॅम इतकी असते. तर 100 ग्रॅम पनीरमध्येही प्रोटीनचे प्रमाण 14 ग्रॅम एवढंच असते. अशा प्रकारे या दोन्ही पदार्थांमध्ये प्रोटीनची मात्रा जवळपास समानच आहे. पनीर आणि अंड्याची तुलना अंडे आणि पनीर दोन्हींमधील पोषक तत्त्वांमुळे आपले स्नायू निरोगी व मजबूत राहतात. या दोन्ही पदार्थामध्ये पुरेशा प्रमाणात पोषक घटकांचा समावेश असतो. ज्यामुळे आपल्या शरीराच्या अंतर्गत असणाऱ्या पेशींना पुरेसा ओलावा मिळतो तसंच ओलावा टिकून राहण्यासही मदत मिळते. यामुळे स्नायूंचे आरोग्य निरोगी राहते. हाडे बळकट होतात पनीर आणि अंड्याद्वारेही आपल्या शरीराला कॅल्शिअमचा पुरवठा होतो. जेव्हा आपल्या शरीरात कॅल्शिअमची कमतरता निर्माण होते तेव्हा ही झीज भरून काढण्यासाठी शरीर हाडांमधील कॅल्शिअम शोषून घेते. या अवस्थेत हाडे कमकुवत होऊ लागतात. परिणामी हाडांशी संबंधित गंभीर समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता असते. शरीराचे हे नुकसान टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पनीर किंवा अंड्याचा योग्य प्रमाणात आहारामध्ये समावेश करावा. अंड्यामुळे आपल्या हाडांना व्हिटॅमिन डीचा देखील पुरवठा होतो. स्नायूंच्या निर्मितीसाठी अंड्याच्या सेवनामुळे आपल्या स्नायूंना भरपूर लाभ मिळतात. अंड्यातील पांढऱ्या भागामध्ये प्रोटीन आणि अमिनो अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असते. या पोषक तत्त्वामुळे शरीरात स्नायूंची निर्मिती होण्यास मदत मिळते. सोबत अंड्याच्या सेवनामुळे स्नायू मजबूत देखील होतात.  याच कारणामुळे व्यायाम करणारे, जिममध्ये जाणाऱ्या व्यक्ती आहारामध्ये अंड्याचा समावेश करतात. अंडे खाल्ल्याने दिवसभरासाठी शरीराला योग्य प्रमाणात ऊर्जा मिळते. त्वचेसाठी पनीर व अंड्याचे फायदे त्वचा निरोगी राहण्यास उपयुक्त असलेले पोषक घटक अंडे आणि पनीरमध्ये आहेत. या घटकांमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या दूर होण्यास मदत मिळते. पनीरमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आहे. त्वचा निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिन ए पोषक असते. नितळ त्वचेसाठी आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन ए युक्त खाद्यपदार्थांचा समावेश करावा.

Health Tips: अंडे की पनीर,कोणता पदार्थ आहे प्रोटीनचा उत्तम स्रोत? जाणून घ्या व्हाल थक्क Read More »

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसकडून महिला दिनानिमित्त मेडिकल शिबिरचं आयोजन

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या वतीने महिला दिनानिमित्त मेडिकल शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व महिलांना कौतुकाचे प्रमाणपत्र आणि सर्व महिलांच्या समानता आणि सक्षमीकरणाची सहानुभूती आणि प्रतीक म्हणून गुलाबांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवर नेते, पदाधिकारी उपस्थित होते,मा.शांतिलालजी मिसाळ प्रदेश पदाधिकारी,मा अब्दुलसत्तार शेख भाई सरचिटणीस अल्पसंख्याक सेल,नरेश इन्द्रसेन जाधव अध्यक्ष कॅन्टोन्मेट विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर, फरदीन पटेल युवक कार्याध्यक्ष कॅन्टोन्मेट विधानसभा मतदारसंघ ,मा.जयदेवराव इसवे अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग,मा.गौरीजी जाधव प्रभारी अध्यक्ष पुणे महिला विंग,मा अलिमभाई शेख कार्याध्यक्ष अल्पसंख्याक सेल पुणे शहर,मा. दिनेशजी अर्धाळकर ब्लॉक अध्यक्ष कॅन्टोन्मेट बोर्ड पुणे,मा.दिनेशजी परदेशी उपाध्यक्ष पुणे शहर,मा.रुहीजी सय्यद सरचिटणीस पुणे शहर,मा.आयाजभाई शेख उपाध्यक्ष कॅन्टोन्मेट विधानसभा,मा. अतुलजी जाधव अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग मा.शुभमजी शिंदे अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग,मा.विशाल गद्रे , मा.विकास कांबळे मा.विनायक जाधव आणि इतर क्षेत्रातील मान्यवर अॅड.मंगलाताई भोसले,मा अर्पणाताई यादव शिक्षिका कॅम्प एज्युकेशन सोसायटी उपस्थित होते.

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसकडून महिला दिनानिमित्त मेडिकल शिबिरचं आयोजन Read More »

Railway Scam: धक्कादायक! रेल्वेत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली 23 जणांची फसवणूक; अधिकाऱ्याला अटक

Railway Scam: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीचं आमिष दाखवून 23 हून जास्त  तरुणांची फसवणूक करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्याला सीबीआयने अटक केली आहे.   आरोपी अधिकाऱ्याने 23 हून अधिक लोकांना रेल्वेत नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. रेल्वेत नोकरी देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केल्याप्रकरणी मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपी अधिकारी मध्य रेल्वेमध्ये मुख्य डेपो मटेरियल सुपरिटेंडंट (CDMS) आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने राजेश रमेश नायक याला ताब्यात घेतले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, नायकने दोन भावांना रेल्वेत नोकरी लावण्याच्या नावाखाली 10 लाख रुपयांहून अधिक रक्कम घेतल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडितेच्या वडिलांनी सीबीआयकडे जाऊन रेल्वे अधिकारी राजेश नायक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर सीबीआयने तपास सुरू केला. झडतीदरम्यान सीबीआयने विविध कागदपत्रे जप्त केली. 23 हून अधिक लोक कथितपणे फसवणुकीचे बळी ठरल्याचे कागदपत्रांवरून समोर आले आहे.

Railway Scam: धक्कादायक! रेल्वेत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली 23 जणांची फसवणूक; अधिकाऱ्याला अटक Read More »

Loksabha Election: भाजप देणार ‘या’ विद्यमान खासदारांना धक्का; कापले जाणार तिकीट

Loksabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीमुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यातच सत्ताधारी ‘महायुती’ मध्ये अद्याप जागा वाटपाचा फॉर्मुला ठरला नसल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.   तर दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप राज्यातील काही विद्यमान खासदारांना धक्का देणार आहे.  मिळालेल्या माहितीनुसार भाजप आगामी लोकसभा विद्यमान निवडणुकीमध्ये तब्बल डझनभर खासदारांना तिकीट नाकारणार आहे. यामुळे आता कोणाला तिकीट मिळणार आणि कोणाचं तिकीट कापलं जाणार ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्मुला पुढील आठवड्यामध्ये ठरू शकतो.  यानंतर भाजप आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील आपल्या उमेदवारांची घोषणा देखील करण्याची शक्यता आहे.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महायुतीच्या जागावाटपात विजय हा एकमेव निकष आहे. महायुतीमध्ये समाविष्ट सर्व पक्षांना सन्मानजनक जागा मिळतील. जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. सुरुवातीची चर्चा सकारात्मक झाली असून 11-12 मार्चपर्यंत जागावाटपाचा निर्णय होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील लोकसभेच्या 45 जागा कशा जिंकायच्या, याशिवाय जागावाटपाचा दुसरा कोणताही फॉर्म्युला नाही. पंतप्रधानांच्या विजयासाठी तिन्ही पक्ष एकत्र काम करतील. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. अनेक बैठका होऊनही महायुती आघाडी किंवा विरोधी महाविकास आघाडी (एमव्हीए) आघाडीने महाराष्ट्रात जागावाटपाचा निर्णय घेतलेला नाही. राज्यातील विद्यमान खासदारांची कार्यपद्धती आणि परिणामकारकता जाणून घेण्यासाठी भाजपने पक्षांतर्गत तीन सर्वेक्षण केल्याचे वृत्त आहे. डझनभर खासदारांचा स्ट्राइक रेट समाधानकारक नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे ज्या खासदारांचा स्ट्राइक रेट चांगला नाही अशा खासदारांना हटवले जाण्याची शक्यता आहे. उमेदवारांची निवड करताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गेल्या पाच वर्षांतील विद्यमान खासदारांची कामगिरी हा सर्वोच्च निकष ठेवला आहे. याशिवाय सामाजिक समीकरणाबरोबरच स्थानिक पातळीवरील राजकारणातील त्या नेत्याचा प्रभावही तपासण्यात आला आहे. भाजपने राज्यातील 32 ते 37 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. भाजप येत्या दोन-तीन दिवसांत लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करू शकते. ज्यामध्ये डझनभर नवीन नावांचा समावेश अपेक्षित आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी या खासदारांची तिकिटे कापली जाऊ शकतात. 1. उत्तर मध्य मुंबई- पूनम महाजन 2. उत्तर मुंबई- गोपाळ शेट्टी 3. सोलापूर- जयसिद्धेश्वर स्वामी 4. सांगली- संजय काका पाटील 5. लातूर- सुधाकर श्रृंगारे 6. जळगाव- उन्मेष पाटील 7. धुळे- सुभाष भामरे 8. बीड- प्रीतम मुंडे 09. नांदेड- प्रतापराव चिखलीकर 10. रावेर- रक्षा खडसे 11. वर्धा- रामदास तडस.

Loksabha Election: भाजप देणार ‘या’ विद्यमान खासदारांना धक्का; कापले जाणार तिकीट Read More »

Maharashtra News: अवधूत गुप्तेंच्या भन्नाट गाण्यांवर खा.सुजय विखे आणि माजीमंत्री शिवाजी कर्डीले थिरकले!!

Maharashtra News: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भाजप खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांत सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी दिली जात आहे.  कला,मनोरंजन, गायन,संगीत क्षेत्रातील नामवंत सेलिब्रेटींच्या उपस्थितीत होत असल्याने या सर्व कार्यक्रमांना महिलावर्गाची जबरदस्त गर्दी दिसून येत आहे. अगदी शालेय मुली, कॉलेज युवतींपासून लग्न झालेल्या महिला, मुलं-नातवंड असलेल्या आजीबाईंपर्यंत या रंगारंग कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेताना दिसून येत आहे.  याबाबत बोलताना फाउंडेशनच्या धनश्री विखे आणि खा.सुजय विखे यांनी सांगितले की, भारतीय समाजात घरामध्ये स्त्री ला निश्चितच मानाचे आणि आदराचे स्थान दिले जाते. अनेक युवती-महिला शिक्षण आणि त्यांच्यातील कलागुण कौशल्याने नोकरी-व्यवसायात स्थिरावत असल्या तरी एकूणच स्त्रीला आजही घरातील सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे सार्वजनिक जीवनात घेता येईल असा मनोरंजन, छंद आदींचा आनंद घेता येत नाही. घरातील कामांची व्यस्तता आणि समाज काय म्हणेल म्हणून महिलांची व्यक्ती म्हणून घुसमट होत असते. त्यामुळे आम्ही महिला दिनाचे औचित्य साधून सर्व घटकांतील युवती-महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. इतर कोणी मंडळी कार्यक्रम घेताना वेग वेगळे इप्सित डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम घेत असतील, मात्र आम्ही जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून कुठलाही राजकीय हेतू डोळ्यासमोर न ठेवता आणि याची उगाच जास्तीची प्रसिद्ध न करता केवळ महिलांच्या मनाचा विचार करून त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण पेरण्याच्या हेतूने कार्यक्रम घेत आहोत.  विशेष म्हणजे आम्ही आयोजित केलेल्या कार्यक्रमांना महिला,युवतीं बरोबर अगदी नातू-पणतू असलेल्याआजीबाई देखील आवर्जून उपस्थिती लावत आहेत हे आमच्या कार्यक्रमांचे यश असल्याचे धनश्री विखे म्हणाल्या. शेवगाव, पाथर्डी,कर्जत,जामखेड नंतर राहुरी इथे आयोजित कार्यक्रमास तर रेकॉर्डब्रेक गर्दी झाल्याचे दिसून आले. असंख्य महिलांची उपस्थिती, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि दिलखेचक लावणी नृत्यासाठी ओळख निर्माण केलेल्या मानसी नाईक यांचे प्रेक्षकांवर भुरळ घालणारे नृत्य, प्रसिद्ध धम्माल गायक, परीक्षक अवधूत गुप्ते यांचा प्रेक्षकांची मने जिंकणारा आवाज, महिलांसाठी पैठणीसह विविध आकर्षक बक्षिसांची लयलूट आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कर्तृत्ववान महिलांचा केलेला सन्मान असा अनोखा आणि दैदिप्यमान सोहळा काल राहुरी येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दीसह संपन्न झाला.  जनसेवा फाउंडेशन च्या माध्यमातून काल राहुरी येथील केशर मंगल कार्यालय,(मल्हारवाडी रोड) येथे महिला दिनाच्या अनुषंगाने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा व सांस्कृतिक महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले होते. माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले आणि धनश्री विखे पाटील यांची सदरील कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.  या कार्यक्रमात महिलांच्या गर्दीने परिसर अगदी फुलून गेला होता. दरम्यान विविध क्षेत्रात आपले बहुमूल्य योगदान देऊन आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिलांचा सन्मान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सन्मानित करण्यात आलेल्या महिलांकडून सर्वांनी प्रेरणा घेऊन त्यांच्या पायावर पाय ठेवत वाटचाल करावी असे आवाहन सुजय विखेंनी उपस्थित महिलांना केले. या सांस्कृतिक महोत्सवात महिलांचे मनोरंजन करण्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम राबविण्यात आले. भव्य लकी ड्रॉ स्पर्धा आयोजित करून महिलांना पैठणीसह विविध आकर्षक बक्षिसे देण्यात आली.  तसेच दिग्गज कलाकार, जसे की अवधूत गुप्ते यांनी आपल्या गोड आवाजात आणि मानसी नाईक यांनी आपल्या नृत्याविष्कार सादर करून प्रेक्षकांना खिळवून ठेवले. या कार्यक्रमात राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शशिकलाताई पाटील, शेती व व्यवसाय क्षेत्रातील पुष्पलताताई येवले, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. दिपा कुसळकर, 32 वर्षांपासून ईश्वरीय सेवेत असणाऱ्या ब्रह्मशांती पद्मादेवी, कृषी क्षेत्रातील कविता जाधव, वैद्यकीय क्षेत्रातील श्रीम. डॉ. केतन साळवे, अध्यात्मिक कार्य करणाऱ्या ह.भ.प. वंदना आंधळे, क्रीडा व कृषी क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या ज्योती खेडेकर/ धामोरे, दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील ज्योती शिंदे, क्रीडा व राजकीय क्षेत्रातील सोनाली बर्डे, सामाजिक कार्यकर्त्या सविता मगर, फोटोग्राफी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या काजल शर्मा, बालक संगोपन सेवा क्षेत्रातील सखुबाई जाधव, उद्योजिका रोहिणी कुसमुडे, बचत गट संघटन करणाऱ्या उमा जैन, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या वंदना कांडेकर, बचत गट क्षेत्रात कार्य करणाऱ्या वैशाली धसाळ, अध्यात्मिक कार्य करणाऱ्या ह.भ.प. सोनालीताई गावडे/ तागड, शैक्षणिक क्षेत्रातील प्रमिला ढोकणे आदी कर्तृत्ववान महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आले. रेकॉर्ड ब्रेक गर्दी.. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून राहुरी येथे आयोजित कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव 2024 साठी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. गेल्या आठवडाभरात वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या या महोत्सवाला जी गर्दी पाहायला मिळाली त्यापेक्षा अधिक गर्दी कालच्या या भव्य सोहळ्यात दिसून आली. खरंतर हा एक ऐतिहासिक आणि अविस्मरणीय असा क्षण होता.. आपल्या खास धमाल गाण्यांच्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले अवधूत गुप्ते यांनी गायलेल्या गाण्यांवर गुप्ते यांनी खा.सुजय विखे यांना नाचायला भाग पाडलेच. आपल्या अवखळ स्वभावामुळे अवधूत गुप्ते कार्यक्रमात मोठी रंगत आणतात. अरे दिवानो, मुझे पाहचानो..  में हु डॉन.. या गाण्यावर खा.सुजय विखे चांगलेच नाचले. यावेळी समर्थक चाहत्यांनी खा.विखे आणि माजीमंत्री कर्डीले यांनी खांद्यावर घेत नाचत एकच जल्लोष केला. यावेळी काळा गॉगल घालून कर्डीले आणि विखे यांनीही खांद्यावर नाचत गाण्याचा आनंद घेतला.

Maharashtra News: अवधूत गुप्तेंच्या भन्नाट गाण्यांवर खा.सुजय विखे आणि माजीमंत्री शिवाजी कर्डीले थिरकले!! Read More »

Ahmednagar News: धडाकेबाज कारवाई! दोन फुटी तलवारीसह आरोपी जेरबंद

Ahmednagar News: 07 मार्च 2024 रोजी शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, इसम नामे संदीप नवनाथ माळी रा. मळेगाव ता. शेवगाव याने वाढदिवसानिमीत्त तलवारीने केक कापलेचा स्टेटस मोबाईलला ठेवला होता.  व समाजात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर प्रसिद्ध करून दहशत करत आहे.  या माहितीवरून पोनि/ दिगंबर भदाणे यांनी  पोहेकाँ/नाकाडे, पोहेकॉ दराडे, पोशि/शाम गुजाळ, पोशि/बप्पासाहेब धाकतोडे, पोशि/ संपत खेडकर, नगर दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुडू,नितीन शिंदे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने तांत्रिक व लोकेशन मदतीने सदर इसमाचा शोध घेऊन त्याला  बोधेगाव ता. शेवगाव मधून अटक केली. त्याची दोन पंचासमक्ष  अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात एक पितळी मुठ असलेली दोन फुट लांबीची एक पांढरे रंगाची लोखंडी तलवार मिळून आली. यानंतर आरोपी व तलवार ताब्यात घेउन शेवगाव पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले.   सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगाव  उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांचे आदेशाने पोहेकाँ/नाकाडे, पोहेकॉ दराडे, पोशि/शाम गुजाळ, पोशि/बप्पासाहेब धाकतोडे, पोशि/ संपत खेडकर, नगर दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुडू,नितीन शिंदे यांनी कारवाई केली.  तसेच पोलीस निरीक्षक शेवगाव यांनी शेवगाव तालुक्यातील जनतेस आव्हान केले आहे की वाढदिवसानिमित्त तलवारीने केक  कापत असेल व  हत्यार बाळगून समाजामध्ये दहशत निर्माण करत असेल व अवैधरित्या गावठी कट्टा व तलवारी चाकू व चोरीच्या उद्देशाने कुणी संशयितरित्या फिरत असतील तर  शेवगाव पोलिसांच्या ०२४२९ २२१२३३ या क्रमांकावर ती संपर्क करावा खबर देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आव्हान पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी केले.

Ahmednagar News: धडाकेबाज कारवाई! दोन फुटी तलवारीसह आरोपी जेरबंद Read More »