DNA मराठी

ahmednagar news

Accident News: भीषण अपघात, 4 जण जागीच ठार, 2 गंभीर जखमी

Accident News:  देशात दररोज अपघताच्या घटना घडत आहे. यातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माहितीनुसार, मध्य प्रदेशामधील शाहडोल जिल्ह्यातील बुधर पोलीस स्टेशन हद्दीतील लालपूर येथे कोळसा भरलेल्या ट्रेलरने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ऑटोला धडक दिली. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला, तर 2 जणांना गंभीर अवस्थेत वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. बुधर पोलीस ठाण्याचे प्रभारी संजय जयस्वाल यांनी सांगितले की, अनुपपूर येथून कोळसा भरून ट्रेलर शहडोलकडे जात होता. दरम्यान, लालपूरजवळील क्रशरजवळ भरधाव वेगात आलेल्या ट्रेलरने ऑटोला जोरदार धडक दिली. या घटनेत ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. 4 जणांची प्रकृती गंभीर असताना पोलिसांनी त्यांना त्यांच्याच वाहनातून वैद्यकीय महाविद्यालयात नेले, तेथे 4 पैकी 2 जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर 2 जण गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत. बिट्टू, रिया, रोशनी आणि ममता अशी या भीषण रस्ता अपघातात जीव गमावलेल्यांची नावे आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की ऑटो शहडोलहून धनपुरीच्या दिशेने जात होता, ज्यामध्ये 35 वर्षीय नेमचंद वडील हरिशंकर, 40 वर्षीय रोशनी पती मज्जू साकेत, 30 वर्षीय कुंज बिहारी त्रिपाठी, सर्व धनपुरी येथील रहिवासी आणि इतर वाहनात होते. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. कागदपत्रांशिवाय कोळसा वाहतूक सुरू होती मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक कोळसा भरला होता, जो अनुपपूर येथील रामनगर येथून भरून रेवा येथे जात होता. मात्र, ट्रकची झडती घेतली असता कोळशाशी संबंधित कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. अपघातानंतर बुरहार येथील कोळसा व्यापारी घटनास्थळी पोहोचले होते. अपघातानंतर कोळसा व्यापारी वाहतुकीशी संबंधित कागदपत्रे तयार करण्यासाठी तातडीने खाणीवर पोहोचले होते, असेही सांगण्यात येत आहे.

Accident News: भीषण अपघात, 4 जण जागीच ठार, 2 गंभीर जखमी Read More »

Ahmednagar News : नंदाच्या जमिनीत पेरलेल्या कपाशी व तूर पिकाची भावजाईने केली नासाडी, गुन्हा दाखल

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील रहिवासी असलेल्या महिला शेतकरी सोफिया फिरोज शेख यांची बालमटाकळी येथे असणाऱ्या गट नंबर १३५ मधील दीड एकर शेतीमध्ये कपाशी व तूर पिकाची लागवड केली होती. हे पीक मोठी झाल्याने सोफिया फिरोज शेख व त्यांचे पती फिरोज शेख हे दोघे शनिवार दिनांक २९ जुलै रोजी दुपारी आपल्या शेतात खुरपण करत होते. तेव्हा  अचानक सोफिया शेख यांची भावजाई हुमेरा युनुस शेख राहणार अहमदनगर यांनी सोफिया फिरोज शेख व त्यांचे पती फिरोज शेख यांना   शेतामध्ये येऊन शिवीगाळ करत दीड एकर शेतीमधील उभे असलेले कपाशी व तुरीचे पीक हे आमच्या डोळ्यादेखत उपटून फेकून दिले. त्यामुळे फिर्यादीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.  याबाबत हुमेरा युनूस शेख यांना आम्ही आमची कपाशी व तुर पीक का उपटले अशी विचारणा केली असता त्यांनी मला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.  याबाबत महिला शेतकरी सोफिया फिरोज शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हुमेरा युनुस शेख यांचे विरोधात शेवगाव पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तसेच आम्हाला न्याय न मिळाल्यास व आमच्या पिकांची झालेली नुकसान भरपाई न मिळाल्यास उपोषणास बसण्याचा इशाराही महिला शेतकरी सोफिया फिरोज शेख यांनी दिला आहे.

Ahmednagar News : नंदाच्या जमिनीत पेरलेल्या कपाशी व तूर पिकाची भावजाईने केली नासाडी, गुन्हा दाखल Read More »

Dhananjay Munde : … तर आम्ही तुमच्या गाड्या फोडणार, गोरख दळवींचा धनजय मुंडेंना इशारा

Dhananjay Munde : संपूर्ण राज्यात सध्या आरक्षणावरून चांगलंच राजकीय वातावरण तापल आहे. यातच आता मराठा समाजाचे कार्यकर्ता गोरख दळवी यांनी पत्रकार परिषद घेत लक्ष्मण हाके ओबीसी नसून धनगर असून त्यांनी त्यांच्या समाजाचा पाहावा छगन भुजबळ यांचे प्यादे बनू नये आणि छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांचे प्यादे बनू नये अशी टीका केली. मनोज जरांगे यांची राज्यात कोणी बरोबरी करु शकत नाही असं देखील ते म्हणाले. तसेच त्यांनी राज्याचे मंत्री धनजय मुंडे यांना इशारा देत तुम्ही दोन समाजामध्ये भांडण लावू नये अशी देखील विनंती केली.  धनजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या गाड्यांची तोडफोड केली असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.  तुम्हाला एका मराठ्याने घडवलं आहे. आम्ही देखील राज्यात फिरणाऱ्या तुमच्या गाड्या फोडू शकतात असा इशारा देखील यावेळी त्यांनी धनजय मुंडे यांना दिला.

Dhananjay Munde : … तर आम्ही तुमच्या गाड्या फोडणार, गोरख दळवींचा धनजय मुंडेंना इशारा Read More »

Ahmednagar News: मोठी बातमी! अटकपूर्व जामीनसाठी पंकज जावळे यांचा अर्ज, आज होणार सुनावणी

Ahmednagar News: अहमदनगर महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांनी आठ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीनसाठी अहमदनगर न्यायालयामध्ये अर्ज केला आहे. पंकज जावळे यांच्या या अर्जावर आज (4 जुलै) दुपारनंतर अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.   एसीबीने एका बांधकाम व्यवसायिकाला आठ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी आयुक्त पंकज जावळे आणि स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून आयुक्त पंकज जावळे आणि देशपांडे दोघेही फार आहेत. सध्या पोलीस त्यांचा शोध घेत आहे.  छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यातील एसीबीचे पथकाने अहमदनगर महापालिकेत कारवाई करून पंकज जावळे आणि स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सुनवाईत त्यांना अटकपूर्व जामीन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Ahmednagar News: मोठी बातमी! अटकपूर्व जामीनसाठी पंकज जावळे यांचा अर्ज, आज होणार सुनावणी Read More »

Ahmednagar News: नगर जिल्ह्यात हप्त्यासाठी खुनी हल्ला? अनेक चर्चांना उधाण

Ahmednagar News:  पारनेर तालुक्यातील निघोज येथे अज्ञात चोरट्यांनी जेवणाच्या उद्देशाने निघोज – वडगाव रस्त्यावर असलेल्या गणेश भुकन व प्रविण भुकन यांच्या मालकीच्या  जत्रा या हॉटेलमधील प्रविण भुकन या़च्यावर हल्ला केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.   यामध्ये प्रविण भुकन हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रात्री दोन वाजता नगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.   या प्रकरणानंतर गणेश भुकन यांनी रात्री निघोज पोलीसांना संपर्क केला मात्र पोलिसांनी याची दखल न घेता टाळाटाळ केली असा आरोप गणेश भुकन यांच्याकडून करण्यात आला आहे. हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला की आम्हाला महिन्याकाठी हप्ता दे या उद्देशाने झाला याची सध्या निघोज परिसरात चर्चा सुरू असून हल्लेखोर निघोज आणि परिसरातील असून भुकन हे सध्या नगर येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे.  त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले असून आज सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ते शुद्धीवर आल्यावर पोलीसांना काय जबाब देतात यावर बरेच काही अवलंबून आहे.  गेली काही दिवसांत निघोज आणी परिसरात गुन्हेगारी वाढली असून गुन्हेगारीला राजकीय आश्रय आहे की काय यावर निघोज परिसरात चर्चा सुरू आहे.

Ahmednagar News: नगर जिल्ह्यात हप्त्यासाठी खुनी हल्ला? अनेक चर्चांना उधाण Read More »

Ahmednagar News: महानगरपालिकेच्या आयुक्तांवर 8 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई, आयुक्त पंकज जावळे फरार

Ahmednagar News:  अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे आणि त्यांचे स्वीय साहाय्यकाने लाच मागितल्या प्रकरणी जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीने महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचे महानगरपालिकेतील कार्यालय आणि राहते शासकीय घर सील केलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, यामुळे शहर खळबळ उडाली आहे तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला आहे. अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे आणि त्यांचे स्वयं सचिव श्रीधर देशपांडे यांनी बांधकाम व्यवसायिक यांच्याकडे नऊ लाख तीस हजार रुपयाची मागणी केली होती तडजोडीनंतर हे प्रकरण आठ लाख रुपयांमध्ये मिटवण्याचा ठरलं होते.  त्यानंतर तक्रार यांनी जालना कार्यालयात 19 जून 24 रोजी तक्रार अर्ज दिला होता या प्रकरणांमध्ये  19 जून आणि 20 जून रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली आहे.  संभाजीनगर येथील एसीबी कार्यालय आणि जालना येथील एसीबी कारल्याने संयुक्त कारवाई केली आहे. याप्रकरणी अहमदनगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र पंकज जावळे यांच्यावर कारवाई झाल्यानंतर भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोर फटाके फोडून आनंद साजरा केला.  आयुक्त भ्रष्टाचारी आहेत यांच्यावर यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती मात्र उशीर झाला आहे पण कारवाई झाल्यामुळे आम्हाला समाधान असल्याची प्रतिक्रिया भाजपा कार्यकर्त्यांनी दिली.  तर शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी या प्रकरणांमध्ये आयुक्त पंकज जावळे यांच्यासह नगर रचना आयोगाच्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांचेही पोलीस चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Ahmednagar News: महानगरपालिकेच्या आयुक्तांवर 8 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई, आयुक्त पंकज जावळे फरार Read More »

Election 2024 : नाशिक शिक्षक निवडणुकीसाठी 93.48 टक्के मतदान

Election 2024- नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे मतदान प्रक्रिया विभागात शांततेत सुरळीतपणे पार पडली.नाशिक विभागात एकूण 90 मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. विभागातील  69 हजार 368 मतदानापैकी  64 हजार 846 इतके मतदान झाले असून 93.48  टक्के मतदान झाल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा व अपर आयुक्त निलेश सागर यांनी दिली. विभागातील नाशिक जिल्ह्यात एकूण 25 हजार 302 मतदारापैंकी हजार 23 हजार 184  इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून नाशिक जिल्ह्यात 91.63 टक्के मतदान झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात एकूण 17 हजार 392 मतदारापैंकी 16 हजार 327 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून अहमदनगर जिल्ह्यात 93.88 टक्के मतदान झाले आहे.  धुळे जिल्ह्यात एकूण 8 हजार 159 मतदारापैंकी  7 हजार 651 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 93.77 टक्के मतदान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण 13 हजार 122 मतदारापैंकी 12 हजार 500 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून जिल्ह्यात 95.26 टक्के मतदान झाले आहे. नंदूरबार जिल्ह्यात एकूण  5 हजार 393 मतदारापैंकी 5 हजार 184 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 96.12 टक्के इतके मतदान नंदूरबार जिल्ह्यात झाले आहे.

Election 2024 : नाशिक शिक्षक निवडणुकीसाठी 93.48 टक्के मतदान Read More »

Ahmednagar Police: जुगार अड्ड्यावर छापा, एक आरोपी ताब्यात, अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Ahmednagar Police: अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली नाका, संगमनेर येथे कल्याण  मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून मुद्देमालासह एका आरोपीला अटक केली आहे. माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत, एक इसम दिल्ली नाका, संगमनेर येथील देशी दारु दुकानाचे पाठामागे बोळीमध्ये कल्याण नावाचा हारजितीचा मटका, जुगार लोकांना चिठ्यांवर आकडे लिहुन देवुन त्यांचेकडून पैसे देवुन घेवुन खेळत व खेळवत आहे अशी बातमी मिळाली होती. या माहितीवरून, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी  पोहेकॉ सचिन अडबल,पोहेकॉ रवींद्र कर्डिले,पोहेकॉ/ मनोज गोसावी,पोहेको ज्ञानेश्वर शिंदे,पोना/ विशाल गवांदे,पोकॉ/बाळासाहेब गुंजाळ,पोकॉ/ अमृत आढाव यांचे पथक खासगी वाहनाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री केली असता एक इसम दिल्ली नाका, संगमनेर येथील देशी दारु दुकानाचे पाठामागे बोळीमध्ये लोकांना चिठ्यांवर आकडे लिहुन देवुन त्यांचेकडुन पैसे देवुन घेवुन खेळत व खेळवताना दिसला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकुन चिठ्या देणा-या इसमास जागीच पकडले. बशीर इसाक शेख (वय 30 वर्षे, रा. मोमीनपुरा, संगमनेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.  त्यास सदर मटाका मालकाबाबत विचारपुस करता तो स्वतः मालक असल्याचे सांगुन तो स्वतःचे अर्थीक फायद्या करीता मटका घेत असल्याचे सांगितल्याने, सदर इसमाची अंगझडती घेतली असता रोख रक्कम व मटका खेळण्यासाठी लागणारे साधने मिळुन आली.

Ahmednagar Police: जुगार अड्ड्यावर छापा, एक आरोपी ताब्यात, अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई Read More »

Ahmednagar News: ट्रॅक्टर ट्रॉली ट्रक घेऊन मंत्रालयावरती मोर्चा काढणार… शेतकऱ्यांसाठी प्रहार आक्रमक

Ahmednagar News- जिल्ह्यातील ऊस बागायतदार शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे तर दुसरीकडे कारखान्यांकडून त्यांची देयके थकीत ठेवली जात आहे. शेतकरी उसाचे बिल व त्यावरील व्याज वेळेवर मिळत नसल्याने कर्जबाजारी होत चालला असल्याने आर्थिक हदबल होत आहे.  धक्कादायक म्हणजे शेतकऱ्यांचीच असणारे जिल्हा बँक ही कर्ज बुडवणाऱ्या साखर कारखानदारांना कर्ज देण्याची चुकीचे धोरण अवलंबत आहे. या गोष्टीचा निषेध व शेतकऱ्यांना त्यांची थकीत देयके हे तातडीने मिळावी यासाठी येत्या काळात ट्रॅक्टर ट्रॉली, ट्रक भरून मंत्रालयावरती मोर्चा काढणार आहे अशी माहिती यावेळी प्रहारच्या वतीने देण्यात आली.  प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे पत्रकार परिषद घेत हम कडून शेतकऱ्यांची देयके ही थकीत ठेवले जात असल्याचं म्हणत जिल्हा बँकेच्या कारभारावर देखील ताशेरे ओढले. यावेळी बोलताना पोटे म्हणाले की हंगाम सुरू करण्यापूर्वी भाव जाहीर न करणे, भाव जाहीर न करता कारखाने तीन-चार महिने चालवू नये. भाव जाहीर केल्याप्रमाणे पैसे न देता एफआरपी कायद्यानुसारच पैसे देणे. तसेच शेतकऱ्यांचीच असणारे जिल्हा बँक बुडवणाऱ्यांनाच साखर कारखानदारांनाच कर्ज देण्याची चुकीचे धोरणे जिल्हा बँकेकडून आखले जात आहेत.  ऊस असूनही उसाला वेळेवर तोड न देता कार्यक्षेत्राच्या बाहेरून ऊस आणणे एच एन टी मध्ये भ्रष्टाचार असा आरोप देखील यावेळी पोटे यांनी केला.

Ahmednagar News: ट्रॅक्टर ट्रॉली ट्रक घेऊन मंत्रालयावरती मोर्चा काढणार… शेतकऱ्यांसाठी प्रहार आक्रमक Read More »

Ahmednagar News: आरोपींवर कारवाई करा नाहीतर जन आंदोलन करू परवेज अशरफी यांचा इशारा

Ahmednagar News: शहरातील रामवाडी परिसरात 18 जून रोजी झालेल्या   वादाला जाणून बुजून धार्मिक रंग देऊन शहरात मोठी दंगल घडून आण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांनी केला आहे. तसेच पोलिसांकडून आरोपींवर कारवाई झाली नाही तर जन आंदोलन उभारू असं देखील अशरफी म्हणाले. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, रामवाडी भागात स्थानिक नागरिकांत 18 जुन 2024 रोजी किरकोळ वाद झाले होते मात्र ते मिटून घेण्यात आली होती.  मात्र तरही बजरंग दल आणि काही जातीवादी संघटनेचे  पदअधिकारी यांनी 40-50 गुंड हत्यारे, दांडके घेऊन रामवाडीत आले होते त्यावरून या लोकांना शहरात दंगल घडून आणण्याचा प्रयत्न करत होते हे दिसून येत आहे. परंतु पोलिसांच्या सतर्कते मुळे या गुंड्यांचा डाव फसला असं अशरफी यांनी निवेदनात म्हटले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे या गुंड्यांचा डाव फसल्याने त्यांनी शहरातील अनेक ठिकाणी शहराचा वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला.  या सगळ्या घेटने मागील  मास्टर माईंड बजरंग दलाचा पदाधिकारी असल्याने 4 दिवसात या आरोपीला अटक करावी   नाहीत तर कोणतीही पूर्व सूचना न देता पुणे औरंगाबाद महामार्गावर आम्ही समस्त भारतीय संविधान प्रेमी समाजातर्फे रास्तारोको आंदोलन करणार असा इशारा अशरफी यांनी दिला आहे.

Ahmednagar News: आरोपींवर कारवाई करा नाहीतर जन आंदोलन करू परवेज अशरफी यांचा इशारा Read More »