DNA मराठी

ahmednagar news

Ahmednagar News: हॉस्पिटलमध्ये कुटुंबाला मारहाण करून महिलांची छेड काढणार्‍या आरोपी विरोधात कारवाई करा

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील नगर मनमाड रोडवरील झोपडी कॅन्टीन येथील आठरे हॉस्पिटलमध्ये घुसून साहित्याची तोडफोड करत  कुटुंबाला मारहाण करून महिलांची छेड काढणार्‍या गणेश सर्जेराव फसले यांच्यासह आलेल्या 30 ते 40 जणांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी डॉ. अनिल आठरे यांनी पत्रकार परिषदेत केली.  गणेश फसले व त्यांच्यासोबत असलेल्या 30 ते 40 जणांनी हॉस्पिटल मध्ये जबरदस्ती प्रवेश करून प्रवेश हॉस्पिटलमधील आय. सी. यू,ऑपरेशन थिएटर, अंतररुग्ण विभाग, लॅबरोटरी, संगणक कक्ष व इतर भागातील कुलपे तोडून कॉट्स, मॉनिटर्स, एसी युनिट, वेंटीलेटर, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नासधूस केली व त्याबरोबरच तोडफोड करून डॉ. अनिल आठरे पाटील यांच्या कुटुंबावर हल्ला केला आणि अब्रुनुकसानिकारक कृत्य केले. गणेश सर्जेराव फसले आणि त्याच्या गुंडांकडून वारंवार होणा-या हिंसक कृत्यां‌द्वारे माझ्या परिवाराला आणि हॉस्पिटलच्या स्टाफला अत्यंत धोका होत आहे. त्याचे हे कृत्य असेच चालू राहिले तर माझ्या परिवाराच्या जीवीतास धोका आहे. संबंधित वरिष्ठ अधिका-यांनी गणेश सर्जेराव फसले आणि त्याच्या गुंडांवर योग्य ती कडक कारवाई करावी, व माझ्या परिवाराला व आठरे पाटील मेमोरीयल हॉस्पिटल स्टाफच्या सुरक्षिततेसाठी योग्य तो न्याय दयावा अशी मागणी डॉ. आठरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

Ahmednagar News: हॉस्पिटलमध्ये कुटुंबाला मारहाण करून महिलांची छेड काढणार्‍या आरोपी विरोधात कारवाई करा Read More »

Ahmednagar News: सावेडी उपनगरात पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई

Ahmednagar News: सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्यालगत असणाऱ्या नरहरी नगरमधील ओढ्यावर पाईप टाकून बुजविण्यात आला होता. पावसाने परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिस बंदोबस्तात बुधवारी सायंकाळी ओढ्यातील पाईप हटवून पाण्याला मोकळी वाट केली. अधिक्रमण विरोधी पथकाने अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांच्या आदेशानुसार आज काढण्यात आले अधिक्रमण युवक विभाग कर्मचारी ज्यावेळी अतिक्रमण काढण्यास गेले असता त्या नागरिकाने त्यांना विरोध केला यावेळी तोफखाना पोलीस स्टेशनचा बंदोबस्त मागवण्यात आला.   शहरातील 45 ओढे-नाले पाईप टाकून बुजविण्यात आले आहेत. त्याचे महापालिकेतर्फे सर्वेक्षण करण्यात आले असून महापालिकेच्या अधिकारी व तक्रारांनी संयुक्त पाहणी केली आहे.   नगरमध्ये ओढ्यावरच प्लॉटिंग करण्यात आली आहे. प्लॉटधारकाने पाईप टाकून ओढा बुजविला होता. त्यामुळे गुलमोहर रोड, वसंत टेकडी परिसरातून येणारे पावसाचे पाणी तुंबले जात होते.

Ahmednagar News: सावेडी उपनगरात पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई Read More »

Ahmednagar News: मुकुंद नगरमध्ये कचरा गाडी बंद! जमा होत आहे कचऱ्याचे ढीग, पालिकेकडून दुर्लक्ष

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील मुकुंद नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून कचरा गाडी बंद असल्याने घाणीचे साम्राज्य वाढताना दिसत आहे. परिसरातील बहुतेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा आहे आणि कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.  पावसाळा सुरू झाला असून अहमदनगर शहरात मागच्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसाचा आगमन झालं आहे.  कचरा गाडी बंद असल्याने परिसरातील बहुतेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले असल्याने आणि पाऊस सुरू असल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र तरही देखील या प्रकरणात महापालिकेकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही तसेच समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात ठेकेदार देखील लक्ष देत नाही आहे.  तर दुसरीकडे 17 जूनला बकरा ईद असल्याने महापालिका आणि ठेकेदारने लक्ष घालून परिसरात जमा झालेल्या कचऱ्याचे ढीग उचलावे अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे तसेच पुन्हा एकदा लवकरात लवकर परिसरात कचरा गाडी सुरू करावे असे देखील स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

Ahmednagar News: मुकुंद नगरमध्ये कचरा गाडी बंद! जमा होत आहे कचऱ्याचे ढीग, पालिकेकडून दुर्लक्ष Read More »

Ahmednagar Accident News: एसटी बस व कारचा भिषण अपघात, तीन तरुणाचा मृत्यू

Ahmednagar Accident  News: जामखेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या खर्डा रोडवर बटेवाडी शिवारात रविवारी रात्री एसटी बस व शेरोलेट बीट या कारचा भिषण आपघात होऊन तिन जणांचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहेत.  मृत्यू झालेल्या तिन जणांपैकी दोन जण जागीच जागीच ठार झाले तर एकाचा दवाखान्यात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला असून या घटनेने संपुर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.  या अपघातात विजय गंगाधर गव्हाणे, पंकज सुरेश तांबे, मयूर संतोष कोळी, अशी मृत्यू पावलेल्या तरूणांची नावे असून सचिन दिलीप गीते,  अमोल बबन डोंगरे,हे दोघे जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी साईदीप हॉस्पिटल, अहमदनगर येथे पाठवण्यात आल्याची माहिती जामखेड पोलीसांकडून देण्यात आली आहे.   सर्व तरूण नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता, MIDC, नगर येथील रहिवासी आहेत. जखमींवर समर्थ हॉस्पिटल, जामखेड येथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी साईदीप हॉस्पिटल, अहमदनगर येथे पाठविण्यात आले आहे. सदर अपघातील बसचालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

Ahmednagar Accident News: एसटी बस व कारचा भिषण अपघात, तीन तरुणाचा मृत्यू Read More »

Ahmednagar Police: हुक्का पार्लरवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 14 हजारांचा मुद्देमाल जप्त

Ahmednagar Police: अहमदनगर शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले होते.  या आदेशावरून आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार संदीप पवार, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ, संभाजी कोतकर यांचे पथक नेमुन अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेला 05 जून रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सर्जेपुरा भागात इंगळे आर्केडचे तळघरामध्ये कृष्णा अशोक इंगळे हा सार्वजनीकरित्या मानवी जिवीतास धोका निर्माण होईल असा तंबाखुजन्य पदार्थ स्वत:कडे बाळगुन हुक्का पार्लर चालवित आहेत.  या माहितीवरून पथकाने बातमीतील ठिकाणी जावुन छापा टाकुन हुक्का पार्लर चालविणारे व हुक्का पिणारे इसम 1) कृष्णा अशोक इंगळे (वय – 31 वर्षे), 2) प्रशांत गजानन सोनवणे (वय 34 वर्षे), 3) परेश सुर्यकांत डहाळे (वय 34)   यांना ताब्यात घेतले.  ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांचे कब्जामध्ये शासनाने बंदी घातलेले हुक्क्यासाठी आवश्यक तंबाखुजन्य पदार्थ, विविध कंपनीचे फ्लेवर व साधने असा 14,850 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला.  आरोपींविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात सिगारेट व इतर तंबाखु जन्य उत्पादने (जाहिरातीस प्रतीबंध आणि व्यापार वाणीज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण विनिनियम) अधि.2003 चे सुधारित अधिनियम 2018 चे कलम 4 (अ) /21 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagar Police: हुक्का पार्लरवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 14 हजारांचा मुद्देमाल जप्त Read More »

Vastu Tips : सावधान! ‘या’ 5 गोष्टी कधीही शेअर करू नका, नाहीतर …

Vastu Tips :  आजच्या काळात शेअरिंग ही चांगली गोष्ट मानली जाते. पण  वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवायचा असेल तर अनेक गोष्टी एकमेकांसोबत शेअर करणे तुमच्यासाठी कठीण ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या वास्तुशास्त्रानुसार शेअर करणे टाळावे. अन्यथा, त्याचा तुमच्या आनंदी जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. वास्तूनुसार या 5 गोष्टी कधीही शेअर करू नका शूज आणि चप्पल अनेकदा लोक मैत्रीदरम्यान एकमेकांचे शूज शेअर करतात किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत त्यांची देवाणघेवाणही करतात. पण वास्तूमध्ये ती वाटू नये असा उल्लेख आहे. शूज आणि चप्पल शेअर केल्याने जीवनात नकारात्मकता येते. अंगठी अंगठी न वाटण्याबाबतही वास्तुमध्ये सांगितले आहे. जर तुम्ही अंगठी शेअर करून ती घातली तर त्याचा तुमच्या आयुष्यावर वाईट परिणाम होतो. वैवाहिक जीवन, आर्थिक स्थिती आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. शेअर करून अंगठी कधीही घालू नका. घड्याळ आणि ब्रेसलेट अनेक लोक शुभेच्छांसाठी हातात बांगड्या घालतात. तुम्ही ब्रेसलेट शेअर केल्यास, याचा अर्थ तुम्ही शुभेच्छा शेअर करत आहात. घड्याळे देखील अशा प्रकारे सामायिक करू नयेत. जर एखादी व्यक्ती वाईट काळातून जात असेल तर त्याचे घड्याळ घातल्याने तुमच्यासाठी देखील परिस्थिती खराब होऊ शकते. कपडे लोक सहसा मित्रांसह कपडे बदलतात आणि ते घालतात. मात्र, वास्तुनुसार असे करणे चुकीचे आहे. वेगवेगळे कपडे परिधान केल्याने, एका व्यक्तीचे दुर्दैव दुस-याकडे हस्तांतरित केले जाऊ शकते. म्हणून, हे न करणे चांगले आहे. परफ्यूम आणि पेन तुम्ही कोणाशीही परफ्यूम शेअर करणे टाळावे. याचा व्यक्तीच्या मूडवर चांगला परिणाम होतो. शेअर केल्याने नुकसान होऊ शकते. यासोबतच पेनही शेअर करू नयेत. पेन शेअर करणे म्हणजे तुम्ही तुमचे यश शेअर करत आहात.

Vastu Tips : सावधान! ‘या’ 5 गोष्टी कधीही शेअर करू नका, नाहीतर … Read More »

Loksabha Election Result: अवघ्या 48 मतांनी रवींद्र वायकर विजय, जाणून घ्या ‘इनसाइट स्टोरी’

Loksabha Election Result: लोकसभा निवडणूक 2024 चे निकालामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. राज्यात देखील  भाजपच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी महायुतीला मोठा धक्का बसला आहे.  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबईत सहापैकी तीन जागा जिंकल्या आहेत, तर भाजपने एक आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एक जागा जिंकली आहे. तर एक जागा काँग्रेसच्या खात्यात गेली आहे. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र वायकर (एकनाथ शिंदे गट) अवघ्या 48 मतांनी विजयी झाले. वायकर यांनी अत्यंत निकराच्या लढतीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे (यूबीटी) उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा पराभव केला आहे. निकराच्या लढतीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे रवींद्र वायकर यांनी उद्धव गटाचे अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव केला, जो राज्यातील सर्वात कमी फरकाने विजयी झाला आहे. मात्र, या निकालाला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी उद्धव गटाने चालवली आहे. बातम्यांनुसार, कीर्तिकर दुपारपर्यंत बहुतेक ईव्हीएम मतांच्या मोजणीत पुढे होते, दुपारी 4 वाजेपर्यंत ते 1700 मतांच्या फरकाने आघाडीवर होते. पण काही वेळाने टेबल उलटले. त्यांची आघाडी केवळ एका मताची झाली. यानंतर पोस्टल मतपत्रिका जोडण्यात आल्यावर वायकर विजयी होऊ लागले. यानंतर दोन्ही उमेदवारांनी रिटर्निंग ऑफिसरकडे फेरमतमोजणीसाठी अपील केले. त्यानंतर, नियमानुसार, निवडणूक अधिकाऱ्यांनी 111 अवैध किंवा नामंजूर पोस्टल मतपत्रिकांची पुनर्तपासणी केली.  पोस्टल मतपत्रिकेवर चुकीची खूण केली असेल किंवा फाटली असेल तर ती अवैध घोषित केली जाते. तथापि, अशा मतांची (अवैध मते) छाननी केली जाते जेव्हा ईव्हीएमद्वारे मिळालेल्या मतांमधील विजयाचे अंतर अवैध पोस्टल मतांच्या संख्येपेक्षा कमी असते. परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी ती मते बेकायदेशीर मानली, परिणामी वायकर थोड्या फरकाने विजयी झाले. निवडणूक आयोगाच्या अंतिम निकालानुसार शिवसेनेचे अमोल कीर्तिकर (उद्धव ठाकरे) यांना एकूण 4,52,596 मते मिळाली, तर शिवसेनेचे रवींद्र वायकर यांना 4,52,644 मते मिळाली. कोण आहेत रवींद्र वायकर? कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या चौकशीला सामोरे जाणारे रवींद्र वायकर काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे कॅम्पमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. अमोल कीर्तिकर यांचे वडील गजानन कीर्तिकर हे देखील शिंदे गटात आहेत आणि 2019 मध्ये मुंबई उत्तर-पश्चिममधून खासदार म्हणून निवडून आले होते. उद्धव यांचे विश्वासू मानले जाणारे वायकर सध्या मुंबईतील जोगेश्वरी (पूर्व) चे आमदार आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) वायकरशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते. वायकर हे बीएमसीचे माजी स्थायी समिती अध्यक्ष, चार वेळा नगरसेवक आणि जोगेश्वरीतून चार वेळा आमदार राहिले आहेत.

Loksabha Election Result: अवघ्या 48 मतांनी रवींद्र वायकर विजय, जाणून घ्या ‘इनसाइट स्टोरी’ Read More »

Exit Poll 2024 : महाराष्ट्रात भाजपला धक्का! एक्झिट पोलनुसार मिळणार फक्त ‘इतक्या’ जागा

Exit Poll 2024 : गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी आज शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडले. यानंतर आता वेगवेगळ्या एक्झिट पोलचे निकाल जाहीर होताना दिसत आहे.  या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सुरुवातीपासूनच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये टप फाईट असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत होती. ही शक्यता आता एक्झिट पोलमध्ये देखील दिसत आहे.  ABP-CVoter ने जाहीर केलेल्या एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या एक्झिट पोल नुसार राज्यात महायुतीला 24 तर महाविकास आघाडीला 23 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.  4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या एक्झिट पोल नुसारच जर निकाल जाहीर झाला तर राज्यात भाजपला मोठा धक्का बसू शकतो. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीने 42 जागांवर विजय मिळवला होता. मात्र या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  या एक्झिट पोल नुसार राज्यात महाविकास आघाडीला 23 ते 25 आणि महायुतीला 22 ते 26 मिळण्याचा अंदाज  आहे.  एक्झिट पोल नुसार  भाजपला 17 शिंदे गटाला 06 आणि अजित पवार गटाला 01 जागा मिळणार तर  ठाकरे गटाला 09 काँग्रेसला 08 आणि शरद पवार गटाला 06 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Exit Poll 2024 : महाराष्ट्रात भाजपला धक्का! एक्झिट पोलनुसार मिळणार फक्त ‘इतक्या’ जागा Read More »

RBI Gold Storage: बाबो.. तब्बल ब्रिटनमधून RBI ने परत आणले 100 टन सोने; ‘हे’ आहे कारण

RBI Gold Storage : देशाची सर्वात मोठी बँक आरबीआय ने आता परदेशात जमा केलेले सोने देशात परत आणण्यास सुरुवात केली आहे.  1991 मध्ये ब्रिटनमध्ये तत्कालीन केंद्र सरकारने सोने गहाण ठेवल्यानंतर प्रथमच आरबीआयने तेथून 100 टन सोने परत आणले आहे. रिझर्व्ह बँकेने एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने परत आणण्याची गेल्या 31 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. हे सोने बँक ऑफ इंग्लंड आणि ब्रिटनमधील बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्सकडे ठेवण्यात आले होते, जिथे आरबीआयने सोन्याचा निम्मा साठा ठेवला होता. तथापि, या बदल्यात आरबीआयला या बँकांना स्टोरेज फी भरावी लागेल. हे सोने तारण ठेवल्यानंतर प्रथमच आरबीआयने ते आपल्या स्टॉकचा भाग बनवले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने कुठे ठेवणार? आरबीआयने ब्रिटनमधून 100 टन किंवा सुमारे 1,000 किलो सोने परत आणले आहे. हे सोने मिंट रोडवरील आरबीआयच्या जुन्या कार्यालयात आणि नागपुरातील आरबीआय व्हॉल्टमध्ये ठेवलेले आहे, जिथे रिझर्व्ह बँक तिच्या सोन्याच्या साठ्यापैकी एक तृतीयांश उच्च सुरक्षा निगराणीखाली ठेवते. हे सोने भारतात कसे आणले गेले ब्रिटनमधून सोने भारतात आणण्यासाठी वित्त मंत्रालय, आरबीआय आणि सरकारच्या इतर अनेक विभागांनी एकत्रितपणे काम केले आहे. उच्च सुरक्षेत विशेष विमानात हे सोने परत आणण्यात आले आहे. यासाठी केंद्र सरकारने आरबीआयला या सोन्यावरील सीमा शुल्कात सूट दिली आहे, परंतु त्याला एकात्मिक जीएसटी भरावा लागेल. नुकताच वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचा एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की 2023 च्या अखेरीस जगातील एकूण सोन्यापैकी 17 टक्के सोने केंद्रीय बँकांकडे असेल. हा सोन्याचा साठा 36,699 मेट्रिक टनांपेक्षा जास्त आहे. यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्टेकबद्दल बोलायचे झाले तर त्यात जवळपास 822.10 टन सोने आहे.  31 मार्च 2024 रोजी ही माहिती देताना आरबीआयने सांगितले होते की, परकीय चलनाच्या साठ्याच्या रूपात हे सोने गेल्या वर्षी 31 मार्चला म्हणजे 2023 मध्ये 794.63 टन होते. चलन जोखीम टाळण्यासाठी, आरबीआय डिसेंबर 2017 पासून सतत सोन्यात गुंतवणूक करत आहे. एप्रिल 2024 अखेर, देशाच्या एकूण परकीय चलनाच्या साठ्यात सोन्याचा वाटा 8.7 टक्क्यांवर पोहोचला आहे. 1991 मध्ये, जेव्हा भारत आर्थिक संकटात अडकला होता, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने 4 ते 8 जुलै 1991 दरम्यान बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपानकडे 46.91 टन सोने गहाण ठेवले होते. तथापि, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एकूण सोन्याच्या साठ्यापैकी सुमारे 50 टक्के सोने परदेशात जमा आहे. यामध्ये केवळ सोने गहाण ठेवले जात नाही, तर देशात गृहयुद्धासारखी कोणतीही आपत्ती किंवा राजकीय उलथापालथ झाल्यास आरबीआयने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपले सोने परदेशात ठेवले आहे. खरे तर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत सोन्याच्या साठ्याचे नुकसान होऊ शकते. या कारणास्तव संपूर्ण सोने एकाच ठिकाणी न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी साठवले जाते.

RBI Gold Storage: बाबो.. तब्बल ब्रिटनमधून RBI ने परत आणले 100 टन सोने; ‘हे’ आहे कारण Read More »

Maharashtra News: पुणे प्रकरणात गुन्हेगारांना वाचवण्याचा फडणविसांचा प्रयत्न : नाना पटोले

Maharashtra News: राज्यात सध्या दुष्काळाचा प्रश्न गंभीर आहे तर दुसरीकडे दारू आणि ड्रग्जचे सेवन करुन सर्वसामान्य लोकांना गाडीखाली चिरडण्याचे प्रकार वाढत आहेत. नागपूर, जळगाव व पुण्यात अशा घटना घडल्या पण अत्यंत संताप आणण्याचा प्रकार म्हणजे यातील गर्भश्रीमंत आरोपींना तातडीने जामीन कसा मिळेल यासाठी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न झाले. पुण्याच्या प्रकरणात गर्भश्रीमंत व्यक्तींना वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाल्याचे दिसत असल्याने राज्याच्या यंत्रणेवर विश्वास नाही, पुण्याच्या अपघात प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फतच झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.  टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा सरकारचा समाचार घेतला. ते पुढे म्हणाले की, पुण्यात गर्भश्रीमंत व्यक्तीच्या अल्पवयीन मुलाने कारखाली दोघांना चिरडले, त्याआधी त्याने मद्यपान केले होते, यावेळी त्याच्यासोबत एका आमदाराचा मुलगाही होता, तो कोण हे समजले पाहिजे. पुण्यातील घटनेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या वकीलीचा वापर आरोपींना वाचवण्यासाठी केला. पुण्यात ड्रग्जचा अवैध धंदा जोरात सुरु आहे. पुणे व नागपूर शहरातही अवैध पबने थैमान घातले आहे. कार अपघात प्रकरणानंतर पुण्यातील ३६ अवैध पब पाडावे लागले.  गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज महाराष्ट्रात आणून तरूण पिढीला बरबाद करण्याचे पाप भाजपाने केले आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी खुलासा करावा व या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका संशयास्पद वाटते, त्यांचा राजीनामा घ्यावा. नागपूर या गृहमंत्र्यांच्या शहरातही दोन मुलींनी दोन युवकांना गाडीखाली चिरडून मारले तरीही त्यांना १० तासात जामीन मिळाला. जळगावातही गाडीखाली चिरडण्यात आले व त्यातही आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न झाला. पुण्याच्या ससून हॉस्पिटमधील डॉ. तावडेने आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले. ससूनमध्ये ड्रग माफिया ललित पाटीलला सर्व सोयी सुविधा पुरवण्यात आल्या होत्या, येथून ललित पाटील पळूनही गेला होता. ससूनचे डॉक्टर तावडे यांना अधिक्षक पदासाठी नियुक्त करावे यासाठी एक मंत्री व आमदार यांनी शिफारस केली होती. तो मंत्री व आमदार कोण हे जनतेला समजले पाहिजे. सत्ताधारी पक्षाचा हस्तक्षेप सर्व क्षेत्रात वाढला असून गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. इंदापूरमध्ये तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गुन्हेगारांची अशी हिम्मत होतेच कशी, राजकीय आशिर्वाद असल्याशिवाय असे होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांच्या राज्याला बदनाम करण्याचे पाप भाजपाने केले आहे असेही नाना पटोले म्हणाले.  अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्यास काँग्रेसचा विरोध.. शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्याचा डाव भाजपाने रचला असून कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस हे होऊ देणार नाही. मनुस्मृतीत महिलांना काहीच स्थान नाही. संविधान हटवून त्या जागी मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न आहे तो कदापी यशस्वी होणार नाही. मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश खपवून घेणार नाही, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे. या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा, माजी खासदार हुसेन दलवाई, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

Maharashtra News: पुणे प्रकरणात गुन्हेगारांना वाचवण्याचा फडणविसांचा प्रयत्न : नाना पटोले Read More »