DNA मराठी

राजकीय

Maharashtra Congress: काँग्रेसमध्ये होणार मोठी कारवाई, ‘या’ आमदारांना बसणार धक्का

Maharashtra Congress:  राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर  सर्व राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. आगामी निवडणुकीत कोणाचा विजय होणार? हे लवकरच समजेल.  दरम्यान, काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला महाराष्ट्रात सर्वात जास्त जागांवर यश आलं आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचा आता आत्मविश्वास वाढला असून आगामी विधानसभा निवडणुकीत ते आपले उमेदवार निवडून रिंगणात उतरवू शकतात.  पण सूत्रांच्या माहितीनुसार काही विद्यमान आमदारांचं कामकाज पाहून काँग्रेस पक्ष विधानसभेच्या तिकीट कापण्याची शक्यता आहे. ज्यांचं मतदारसंघात काम चांगलं त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार आहे. यासाठी आमदारांच्या कामाचा अहवाल जमा केला जाणार आहे. “विधानसभा निवडणुकीत कोणत्याही बदमाशाला तिकीट दिलं जाणार नाही,” असं मोठं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. “हायकमांडने हा निर्णय घेतला आहे की, कोणत्याही बदमाशांना आता विधानसभेचं तिकीट द्यायचं नाही. काही लोकं व्यापारासाठी येतात. त्यामुळे अशा कोणत्याही बदमाशांना या पक्षात स्थान दिलं जाणार नाही. तशी भूमिका काँग्रेसची आहे. आम्ही कोणालाही अभय दिलं नाही. ज्यांची चूक समोर आली आहे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. चुकीला माफी नाही,” अशी भूमिका काँग्रेस हायकमांडची असल्याचे नाना पटोले यांनी केले आहे. सध्या शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे  तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले असून उद्धव ठाकरे दिल्लीत इंडिया आघाडीच्या काही प्रमुख नेत्यांची भेट घेतली. यात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा समावेश असेल.

Maharashtra Congress: काँग्रेसमध्ये होणार मोठी कारवाई, ‘या’ आमदारांना बसणार धक्का Read More »

Hezbollah Attack On Israel : हिजबुल्लाहकडून इस्रायलवर मोठा हल्ला केला, 70 रॉकेट डागले

Hezbollah Attack On Israel:  हिजबुल्लाने आपल्या कमांडरच्या मृत्यूनंतर बदला म्हणून इस्रायलवर मोठा हल्ला केला आहे. हिजबुल्लाने इस्रायलवर एकामागून एक 70 रॉकेट डागले आहेत. हा हल्ला इस्रायलच्या पश्चिम गॅलीलीमध्ये झाला. या हल्ल्याबाबत हिजबुल्लाहने अधिकृत वक्तव्यही केले आहे. हिजबुल्लाहने सांगितले की, “चामाला लक्ष्य करून अनेक नागरिकांच्या हौतात्म्याला प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायली लष्करी लक्ष्यांवर रॉकेट हल्ले केले आहेत.” इस्रायलने 15 रॉकेट रोखले दरम्यान, लेबनीज लष्करी सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, लेबनीज सैन्याने दोन वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये इस्रायलवर डागलेल्या सुमारे 70 रॉकेटचे निरीक्षण केले आणि त्यातील काही इस्रायली आयर्न डोम क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीने रोखले. इस्रायलच्या सरकारी टीव्ही चॅनल कानने वृत्त दिले की, रॉकेट पश्चिम गॅलीलीच्या दिशेने डागण्यात आले, त्यापैकी 15 रोखण्यात आले आणि उर्वरित रिकाम्या भागात पडले. यात कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. हिजबुल्लाहचा टॉप कमांडर इस्रायलने मारला मंगळवारी बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगर दहीह येथे इस्रायली हल्ल्यानंतर हिजबुल्ला आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला आहे, ज्यात हिजबुल्लाह लष्करी कमांडर फौद शोकोर ठार झाला आहे. इस्त्रायली हल्ल्याला योग्य वेळी आणि ठिकाणी प्रत्युत्तर देण्याची धमकी हिजबुल्लाचे नेते हसन नसरल्लाह यांनी दिली. दुसरीकडे, इस्रायली सैन्याने गाझा शहरातील एका अपार्टमेंट ब्लॉकवर बॉम्बफेक केली आहे, ज्यामध्ये किती लोक मारले गेले हे समोर आलेले नाही. पॅलेस्टाईन रेड क्रिसेंट सोसायटीच्या सूत्रांनी सांगितले की अपार्टमेंटच्या ढिगाऱ्यातून अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले, जे अबू हाशेम कुटुंबाचे होते आणि गाझा शहरातील अल-जाला स्ट्रीटवर होते.

Hezbollah Attack On Israel : हिजबुल्लाहकडून इस्रायलवर मोठा हल्ला केला, 70 रॉकेट डागले Read More »

Maharashtra Vidhansabha Election 2024 : संगमनेरमध्ये विखे विरुद्ध थोरात? सुजय विखेंकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत

Sujay Vikhe:  येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार तयारी देखील सुरू झाली आहे. यातच आता अहमदनगरचे माजी खासदार सुजय विखे देखील विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  मला जर संधी मिळाली तर मी विधानसभा निवडणूक लढवणार अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना माजी खासदार सुजय विखे यांनी दिली त्यामुळे आता अहमदनगर जिल्ह्यातसह राज्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे. विधानसभा निवडणुकीत श्रीरामपूर किंवा संगमनेरमधून निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवल्याने सुजय विखे  बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढवणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागू नये.  माध्यमांशी बोलताना सुजय विखे म्हणाले की, मला आता वेळ आहे, शेजारी कुठे संधी मिळाली तर विधानसभा लढविण्याचा माझा प्रयत्‍न असणार आहे. ज्या तालुक्यात उमेदवारी बाबत समन्‍वय होणार नसेल अशा मतदार संघात माझ्या नावावर एकमत झाल्‍यास मी निश्चित निवडणूक लढविण्‍यास तयार आहे असं माध्‍यमांशी बोलताना सुजय विखे म्हणाले.  तर शिर्डी विधानसभा मतदार संघातून राधाकृष्ण विखे पाटील निवडणूक लढवणार असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. लोकतांत्रिक प्रक्रीयेत सर्वांनाच उमेदवारी मागण्‍याचा आधिकार आहे. भारतीय जनता पक्षाचे वैशिष्‍ट हेच आहे. पक्षाकडे सामान्‍य कार्यकर्ता उमेदवारी मागू शकतो. नगर दक्षिणमध्‍ये आ.राम शिंदे यांच्‍यासह अनेकजण इच्‍छुक होते. त्‍याच पध्‍दतीने विधानसभेला कोणी उमेदवारी बाबत इच्‍छा व्‍यक्‍त केली असेल तर, यात गैर काही नाही अशी प्रतिक्रीया त्‍यांनी व्‍यक्‍त केली.  विधानसभा निवडणूक लढविण्‍याच्‍या प्रश्‍नावर बोलताना डॉ.सुजय विखे पाटील म्‍हणाले की, उत्‍तर भागामध्‍ये श्रीरामपूर मतदार संघ हा राखीव आहे. कोपरगावचे राजकाराण खुप क्लिष्‍ट आहे. त्‍यामुळे राहुरी आणि संगमनेर हेच पर्याय माझ्यासमोर आहेत. कारण याही तालुक्‍यात अनेकजण इच्‍छुक आहेत. त्‍यांच्‍यात एकमत झाले नाही आणि माझ्या नावावर एकमत होत असेल तर आपण तयार आहोत. माझे काम फक्‍त  अर्ज करण्‍याचे आहे. पक्षाने आदेश दिला तर, त्यानुसार आपण पुढे निर्णय करणार असल्‍याचे सुचक वक्‍तव्‍य यांनी केले.

Maharashtra Vidhansabha Election 2024 : संगमनेरमध्ये विखे विरुद्ध थोरात? सुजय विखेंकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत Read More »

Maratha Reservation: लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार,  सरकारला मराठा समाजाचा इशारा

Maratha Reservation: सत्ताधारी आणि विरोधक गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. त्यांना लोकांचे भावना समजत नाही. समाजाला हे वारंवार आश्वासन देत आहे मात्र ते पाडले जात नाही. ज्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचे आयोजन केले आहे. अशी प्रतिक्रिया डीएनए मराठीशी बोलताना गजेंद्र दांगट यांनी दिली. मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात दाखल होणार आहे.  अहमदनगर शहरात 12 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.  यासाठी अखंड मराठा समाज अहमदनगर यांच्या वतीने साईमुरली लॉन येथे जिल्हास्तरीय बैठक आयोजन करण्यात आली होती. यावेळी डीएनए मराठीशी बोलताना गजेंद्र दांगट म्हणाले की, सत्ताधारी आणि विरोधक गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. त्यांना लोकांचे भावना समजत नाही. समाजाला हे वारंवार आश्वासन देत आहे मात्र ते पाडले जात नाही. ज्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचे आयोजन केले आहे.  या रॅलीला मराठवाड्यात मोठा समर्थन मिळाला आहे तर आता आपल्या भागात या रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. नगर शहरात होणाऱ्या या रॅलीत दहा लाख लोक येणार आहे. सध्या लोकांमध्ये सरकार आणि विरोधकांबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे. 12 तारखेला लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही आरक्षण मिळवून राहणार. असं यावेळी गजेंद्र दांगट म्हणाले.  असा असणार रॅलीचा मार्ग  12 ऑगस्त रोजी मनोज जरांगे पाटील यांची रॅली दिल्लीगेट, कापड बाजारहून शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ संपणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

Maratha Reservation: लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार,  सरकारला मराठा समाजाचा इशारा Read More »

Manoj Jarange Patil: 12 ऑगस्तला जरांगे पाटील अहमदनगर शहरात! ‘या’ मार्गाने निघणार शांतता रॅली

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात दाखल होणार आहे.  अहमदनगर शहरात 12 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.  यासाठी अखंड मराठा समाज अहमदनगर यांच्या वतीने साईमुरली लॉन येथे जिल्हास्तरीय बैठक आयोजन करण्यात आली होती.  सत्ताधारी आणि विरोधक गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. त्यांना लोकांचे भावना समजत नाही. समाजाला हे वारंवार आश्वासन देत आहे मात्र ते पाडले जात नाही. ज्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचे आयोजन केले आहे.  या रॅलीला मराठवाड्यात मोठा समर्थन मिळाला आहे तर आता आपल्या भागात या रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. नगर शहरात होणाऱ्या या रॅलीत दहा लाख लोक येणार आहे. सध्या लोकांमध्ये सरकार आणि विरोधकांबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे. 12 तारखेला लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही आरक्षण मिळवून राहणार. अशी प्रतिक्रिया डीएनए मराठीशी बोलताना गजेंद्र दांगट यांनी दिली. असा असणार रॅलीचा मार्ग  12 ऑगस्त रोजी मनोज जरांगे पाटील यांची रॅली दिल्लीगेट, कापड बाजारहून शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ संपणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

Manoj Jarange Patil: 12 ऑगस्तला जरांगे पाटील अहमदनगर शहरात! ‘या’ मार्गाने निघणार शांतता रॅली Read More »

पूजा खेडकर प्रकरण अन् UPSC ने घेतला मोठा निर्णय,परीक्षेचा पॅटर्न बदलला

UPSC Exam :  वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर हिला अपंगत्व कोट्यातून UPSC मध्ये स्थान मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने एक मोठे पाऊल उचलले आहे.  UPSC आपल्या परीक्षा पद्धतीत बदल करणार आहे. आता परीक्षेतील हेराफेरी आणि फसवणूक रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यामध्ये आधार फिंगरप्रिंट प्रमाणीकरण, उमेदवारांच्या चेहऱ्याची ओळख आणि थेट एआय आधारित सीसीटीव्ही मॉनिटरिंग इत्यादींचा समावेश आहे. एआय तंत्रज्ञानाने UPSC परीक्षा मॉनिटरिंग केले जाईल मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेदरम्यान तंत्रज्ञान सेवांसाठी PSUs च्या संपर्कात आहे. नोटीसनुसार, नमूद केलेल्या गोष्टींमध्ये आधार आधारित बोट प्रमाणीकरण, ई-ॲडमिट कार्डचे क्यूआर कोड स्कॅनिंग आणि थेट एआय आधारित सीसीटीव्ही स्क्रीनिंग यांचा समावेश आहे. यूपीएससीच्या नोटीसमध्ये काय आहे? “मुख्य परीक्षा/मुलाखत/पडताळणी प्रक्रियेच्या वेळी, सेवा प्रदात्याला परीक्षेच्या प्राथमिक टप्प्यात मिळालेल्या डेटावरून उमेदवारांची ओळख व्हेरिफाय करावी लागेल,” UPSC नोटिसमध्ये म्हटले आहे. तसेच, परीक्षार्थी आणि इतर व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही लावले जातील, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. अशी असेल तयारी  या सूचनेनुसार, परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेच्या ठिकाणांची तपशीलवार यादी आणि प्रत्येक ठिकाणासाठी उमेदवारांची संख्या परीक्षेच्या दोन ते तीन आठवड्यांपूर्वी तांत्रिकदृष्ट्या तयार केली जाईल. फिंगरप्रिंट आणि चेहर्यावरील ओळखीसाठी उमेदवाराचे तपशील (नाव, रोल नंबर, फोटो इ.) परीक्षेच्या सात दिवस आधी देखील प्रदान केले जातील. NEET, CUET सारख्या अनेक परीक्षांवर प्रश्न उपस्थित   UPSC चा हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा NEET UG, CUET UG यासह अनेक परीक्षा वादांनी घेरल्या आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने NEET UG फेरपरीक्षेबाबत आपला निर्णय दिला आहे. पण लाखो लोकांच्या मनात अजूनही अनेक प्रश्न आहेत.  दुसरीकडे, तथाकथित बनावट कागदपत्रे सादर करून अपंग कोट्यातून यूपीएससीमध्ये प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरला यूपीएससीच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे.

पूजा खेडकर प्रकरण अन् UPSC ने घेतला मोठा निर्णय,परीक्षेचा पॅटर्न बदलला Read More »

Nilesh Lanke: मोठी बातमी! खासदार लंके यांच्या मागण्या मान्य, उपोषण सोडला

Nilesh Lanke: एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार गेल्या चार दिवसांपासून पोलीस खात्यात होत  असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात अहमदनगरचे खासदार नीलेश लंके अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालया बाहेर उपोषणाल बसले होते. आज निलेश लंके यांच्या मागण्या मान्य झाले असून नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेरकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याने लंके यांनी उपोषण मागे घेतले आहे. नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेरकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि ही चौकशी इन्कॅमेरा होणार असल्याचे लेखी आश्वासन नाशिक विभागीय पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिले आहे.बाळासाहेब थोरात यांची यशस्वी मध्यस्थीमुळे उपोषण सुटला आहे.

Nilesh Lanke: मोठी बातमी! खासदार लंके यांच्या मागण्या मान्य, उपोषण सोडला Read More »

Kangana Ranaut: कंगना राणौतची खासदारकी रद्द होणार? हायकोर्टाने ‘त्या’ प्रकरणात बजावली नोटीस

Kangana Ranaut:  बॉलीवूडची क्वीन आणि भाजप खासदार कंगना रणौतच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगनाला कायदेशीर आव्हान देण्यात आले आहे. सिमला उच्च न्यायालयाने त्यांची निवडणूक रद्द करण्याच्या याचिकेवर नोटीस बजावली. याचिकाकर्ते लायक राम नेगी यांनी आरोप केला आहे की मंडीतून निवडणूक लढवण्यासाठी त्यांचा उमेदवारी अर्ज रिटर्निंग ऑफिसरने चुकीच्या पद्धतीने नाकारला. नोटीस जारी करत न्यायमूर्ती ज्योत्स्ना रेवाल यांनी कंगना राणौतकडून 21 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितले आहे. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण? माजी सरकारी कर्मचारी आणि किन्नौरचे रहिवासी असलेले लायक राम नेगी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. नेगी म्हणाले की त्यांनी 14 मे रोजी निवडणूक अर्ज दाखल केला आणि 15 मे रोजी इतर सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली. मात्र, इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, रिटर्निंग ऑफिसरने त्यांना स्वीकारले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यायमूर्ती ज्योत्स्ना रेवाल यांनी नोटीस बजावली आणि रणौत यांना 21 ऑगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. कंगना रणौतच्या निवडीला लायक राम नेगी यांनी आव्हान दिले आहे, ज्यांनी म्हटले आहे की त्यांचा उमेदवारी अर्ज मंडीच्या उपायुक्तांनी रिटर्निंग ऑफिसर म्हणून चुकीच्या पद्धतीने नाकारला होता. वनविभागातील निवृत्त कर्मचारी नेगी यांनी उपायुक्तांनाही या प्रकरणात पक्षकार बनवले आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत मंडी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाली होती. हिमाचलच्या सुखू सरकारमधील कॅबिनेट मंत्री विक्रमादित्य सिंह यांचा त्यांनी पराभव केला होता. या दोघांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक होती. कंगनाने विक्रमादित्य सिंगचा सुमारे 74 हजार मतांनी पराभव केला. सध्या या प्रकरणाची सुनावणी आता 21 ऑगस्टला होणार आहे.

Kangana Ranaut: कंगना राणौतची खासदारकी रद्द होणार? हायकोर्टाने ‘त्या’ प्रकरणात बजावली नोटीस Read More »

Manoj Jarange Patil : सरकारला 13 ऑगस्टपर्यंत वेळ, मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अचानक स्थगित

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी 20 जुलैपासून पाचव्यांदा उपोषणाची सुरुवात केली होती मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे.  या बातमीनुसार मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा विचार करण्यासाठी राज्य सरकारला 13 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला आहे. याच बरोबर त्यांनी 20 जुलैपासून सुरू असणारा उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.  आज (24जुलै) माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आता सलाईन लावून उपोषण करण्याला काहीही अर्थ नाही. मी येत्या 13 ऑगस्टपर्यंत सरकारला वेळ देतो, तो पर्यंत सरकारने आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil : सरकारला 13 ऑगस्टपर्यंत वेळ, मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अचानक स्थगित Read More »

Sharad Pawar: अजित – शरद पवार पुन्हा एकत्र येणार? पवारांनी दिला उत्तर, म्हणाले, मी…

Sharad Pawar: ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा अजित पवार यांना पक्षात घेणार का? यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.  जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले होते. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटातील अनेक नेते आणि आमदार शरद पवार गटात येणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र आज याबाबत स्वतः शरद पवारांनी भाष्य केले आहे.  माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, त्यांच्या पक्षातील कोणत्याही नेत्याच्या संभाव्य प्रवेशाचा निर्णय सामूहिक असेल. मात्र, अजित पवार यांना पुन्हा यायचे असेल तर त्यांना पक्षात सामावून घेणार का, याची पुष्टी करण्यास त्यांनी नकार दिला. वैयक्तिक पातळीवर निर्णय घेता येत नाही पुण्यात पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. राष्ट्रवादी-सपामध्ये अजित पवारांना स्थान आहे का, असा सवाल पत्रकारांनी केला असता शरद पवार म्हणाले, वैयक्तिक पातळीवर असे निर्णय घेता येत नाहीत. संकटकाळात माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या माझ्या सहकाऱ्यांना आधी विचारले जाईल. अजित पवार यांनी अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेतली आणि जुलै 2023 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारमध्ये सामील झाले. त्यांनी पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हही घेतले होते.  लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने चारपैकी तीन जागा गमावल्यानंतर अजित पवारांच्या गटात खळबळ माजली आहे. शरद पवारांचा सरकारवर टीकास्त्र त्याचवेळी शरद पवार म्हणाले की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या दणक्यानंतर महायुती सरकारला नवनवीन योजना सुरू करून ‘भाई-भगिनी’च्या हिताचा विचार करणे भाग पडले.  पत्रकारांशी बोलताना पवारांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवर चिंता व्यक्त करत राज्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील युती सरकारने राज्यात ‘माझी लाडकी बहिन योजना’ सुरू केली आहे, ज्यात पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे आणि ‘लाडका भाऊ’ या योजनेअंतर्गत रोजगार प्रशिक्षण आणि मानधन देण्याची तयारी आहे. आता बंधुभगिनींच्या हिताकडे लक्ष द्या पवार म्हणाले की, जयंत पाटील आणि अजित पवार यांना राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी अनेकवेळा मिळाली, पण त्यांच्या अर्थसंकल्पात बहीण-भावांसाठीच्या अशा योजना कधीच दिसल्या नाहीत. बंधू-भगिनींच्या हिताकडे लक्ष दिले जात आहे ही कौतुकास्पद बाब आहे, मात्र ही जादू केवळ लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांमुळे आहे,  मतदारांनी हुशारीने मतदान केल्यास बहीण, भाऊ आणि इतर सर्वांच्या लक्षात राहील.असा टोला देखील त्यांनी यावेळी लावला.

Sharad Pawar: अजित – शरद पवार पुन्हा एकत्र येणार? पवारांनी दिला उत्तर, म्हणाले, मी… Read More »