DNA मराठी

ताज्या बातम्या

Sujay Vikhe Patil : आम्ही सदैव मराठा बांधवांच्या पाठीमागे! मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार लवकरच तोडगा काढणार: डॉ. सुजय विखे पाटील

Sujay Vikhe Patil :  खासदार डॉ. सुजय विखे पाटील आज शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथे साखर वाटपाच्या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी सकल मराठा समाज, बोधेगाव यांनी त्यांची भेट घेऊन सकल मराठा समाज बाधवांना ओबीसी मधून सरसकट आरक्षण मिळावे हा मुद्दा लोकसभेत मांडून आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी निवेदन दिले. खासदार विखेंनी त्यांचे निवेदन स्वीकारून सकारात्मक संवाद साधला. यावेळी मराठा आरक्षणावर भाष्य करताना ते म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या संदर्भात यापूर्वीही नामदार राधाकृष्ण विखे पाटील व मी सकारात्मक भूमिका मांडली आहे. आमचं समर्थन प्रत्येक वेळी सकल मराठा समाजाच्या बाजूने राहिले असून मराठा बांधवांच्या पाठीमागे आम्ही सदैव खंबीरपणे उभे आहोत. पालकमंत्री म्हणून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व खासदार म्हणून मी यापूर्वीही मराठा समाजाची भूमिका स्पष्ट मांडली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच मराठा आरक्षणावर योग्य तो तोडगा काढण्यात येईल असे मत त्यांनी व्यक्त केले. शेवगाव तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिकाताई यांच्या माध्यमातून आजवर कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिलेला नाही व इथून पुढेही निरनिराळ्या विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असे मत मांडून आपण माझ्यावर जो विश्वास दाखवून मतदान केलं, या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही.  विशेष म्हणजे याची प्रचिती आपल्याला विविध विकासकामांच्या माध्यमातून वेळोवेळी आलीच आहे असे खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केले. आज बोधेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या साखर वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.  खासदार विखे पुढे म्हणाले, बोधेगाव गावासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या माध्यमातून विविध विकास कामे पूर्णत्वास आली आहेत. यापुढे देखील भरीव निधी उपलब्ध करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे स्पष्ट केले. दरम्यान २२ जानेवारीला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होणार असून याच पार्श्वभूमीवर साखर व चणाडाळ वाटपाचे नियोजन चालू आहे असे सांगून २२ जानेवारीला आपण दुसरी दिवाळी साजरी करणार आहोत असे मत मांडले.  सर्व लाभधारकांनी या साखरेतून दोन लाडू बनवावे आणि श्रीरामाच्या चरणी नैवेद्य म्हणून ठेवावेत असे देखील आवाहन खासदार सुजय विखे यांनी उपस्थितांना केले. यावेळी ताराभाऊ लोंढे, बापूसो पाटेकर, नितीन भाऊ काकडे, रजाक शेख, बाबा सावळेकर, बाळासो कोळगे, महादेव घोरतळे, मयूर हुंडेकरी, बाळासाहेब कोळगे, संजय खेडकर, भगवान मिसाळ, बाळासाहेब डोंगरे, रामकाका केसभर, अमोल सागडे आदी मान्यवरांसह भाजपाचे विविध पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sujay Vikhe Patil : आम्ही सदैव मराठा बांधवांच्या पाठीमागे! मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार लवकरच तोडगा काढणार: डॉ. सुजय विखे पाटील Read More »

Maruti Jimny खरेदी करा ‘इतक्या’ स्वस्तात! मिळत आहे बंपर डिस्काउंट; पहा ऑफर

Maruti Jimny  :  मारुती सुझुकीने भारतीय बाजारात काही दिवसापूर्वी ऑफ-रोड SUV जिमनी लाँच केली आहे. यावेळी कंपनीने या ऑफ रोड एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 12.74 लाख रुपये ठेवली होती.  मात्र आता कंपनी या कारवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर देत आहे. ज्याच्या तुम्ही फायदा घेत स्वस्तात ही ऑफ रोड एसयूव्ही कार घरी आणू शकता.   आम्ही तुम्हाला सांगतो कंपनीने, आपल्या SUV – Thunder Edition  नवीन आणि स्वस्त व्हर्जन लाँच केला आहे. या एसयूव्हीचे हे मर्यादित-रन मॉडेल आहे. Maruti Jimny Thunder Edition तपशील कंपनीने 10.74 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत मारुती जिमनी थंडर एडिशन बाजारात लॉन्च केले आहे. त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 14.05 लाख रुपयांपर्यंत जाते.  कंपनीने थंडर एडिशन जिमनी लाइनअपच्या चारही व्हेरियंटमध्ये उपलब्ध करून दिली आहे. मात्र, त्याची विक्री डिसेंबर 2023 पर्यंतच केली जाईल.  जर आपण थंडर एडिशनची नियमित जिमनीच्या सुरुवातीच्या किंमतीशी तुलना केली तर त्याची किंमत 2 लाख रुपये कमी आहे. कंपनीने थंडर एडिशन जिमनीमध्ये फ्रंट बंपर, साइड डोअर क्लॅडिंग आणि डोअर व्हिझरवर सिल्व्हर गार्निश जोडले आहेत. त्याच्या ORVM, हुड आणि फ्रंट/साइड फेंडर्सवर देखील गार्निश केले गेले आहे.  इंटीरियर आकर्षकपणे डिझाइन केलेले आहेत आणि त्यात फ्लोअर मॅट्स (मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटसाठी वेगळे), आणि टॅन-फिनिश स्टिअरिंग व्हील देखील आहेत.  ही SUV 9-इंच टचस्क्रीन, क्रूझ कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, सहा एअरबॅग्ज आणि ऑटो क्लायमेट कंट्रोल यांसारख्या आधुनिक फीचर्ससह आहे. यात 1.5-लिटर K15B नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. ज्याची कमाल 104 bhp पॉवर आणि 134 Nm पीक टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. यामध्ये कंपनीने 5-स्पीड मॅन्युअल किंवा 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय दिला आहे.

Maruti Jimny खरेदी करा ‘इतक्या’ स्वस्तात! मिळत आहे बंपर डिस्काउंट; पहा ऑफर Read More »

T20 World Cup: रोहित-हार्दिकला बीसीसीआय देणार धक्का; ‘या’ खेळाडूला मिळणार टीम इंडियाचा कर्णधार पद

T20 World Cup:  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या टी – 20 मध्ये धमाकेदार विजय मिळूवुन भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका 1-1 ने बरोबरीत राखली.  या मालिकेनंतर आता सूर्यकुमार यादव 2024 मध्ये होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकात टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून उदयास आला आहे. सध्या कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची सातत्याने चांगली कामगिरी लक्ष वेधून घेत आहे. जून 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. स्पर्धेची तयारी सुरू असताना संघाचे नेतृत्व कोण करणार या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही. अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या, ज्यांना यापूर्वी टी-20 संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते, ते अनिश्चिततेचा सामना करत आहेत. दुखापतीमुळे हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीमुळे T20 संघातील नेतृत्व शून्य झाले आहे. एकदिवसीय विश्वचषकादरम्यान त्याच्या दुखापतीमुळे तो खेळापासून दूर राहिला आणि त्याच्या पुनरागमनाबद्दल प्रश्न कायम आहेत. रोहित शर्मा देखील नियमितपणे T20 सेटअपचा भाग नसल्यामुळे, निवडकर्त्यांसमोर T20 विश्वचषकासाठी कर्णधार निवडण्यात पेचप्रसंग आहे. या परिस्थितीत, सूर्यकुमार यादवने कर्णधार म्हणून वचन दिले आहे, ज्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध T20 मालिकेत 4-1 असा विजय मिळवला. यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत राखली.  सूर्यकुमारचे कर्णधारपद यशस्वी ठरले आहे आणि त्याने बॅटनेही आपला फॉर्म कायम ठेवला आहे, त्यामुळे त्याच्या कामगिरीवर अतिरिक्त दडपणाच्या परिणामाची चिंता दूर केली आहे. भारत अफगाणिस्तानविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मायदेशात टी-20 मालिकेसाठी तयारी करत असताना, कर्णधारपदाचा प्रश्न चर्चेत आहे.  सूर्यकुमार यादव टी-20 विश्वचषकात संघाचे कर्णधारपद भूषवणार की नाही आणि केवळ तीन टी-20 मालिकेनंतर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवणे हा योग्य निर्णय आहे की नाही, या निवडकर्त्यांसाठी महत्त्वाच्या बाबी आहेत.  अफगाणिस्तानविरुद्धची आगामी मालिकेमध्ये टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचा कर्णधार कोण होणार हे चित्र स्पष्ट होऊ शकते.

T20 World Cup: रोहित-हार्दिकला बीसीसीआय देणार धक्का; ‘या’ खेळाडूला मिळणार टीम इंडियाचा कर्णधार पद Read More »

Dunki Advance Booking: काय सांगता! Shahrukh Khan ची ‘डिंकी’ पहिल्या दिवशी करणार ‘इतक्या’ कोटी रुपयांची कमाई; जाणून व्हाल थक्क

Dunki Advance Booking: सुपर स्टार शाहरुख खानचा  ‘डंकी’ हा चित्रपट 21 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र आतापासून या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे.  हे जाणून घ्या कि, राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ हा चित्रपट  शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. या चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. ‘डिंकी’चे अॅडव्हान्स बुकिंग कधी सुरू होत आहे ते या लेखात जाणून घ्या.  पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, ‘डिंकी’च्या तिकिटांची प्री-सेल शनिवार, 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. काही ठिकाणी शुक्रवार, 15 डिसेंबरपासून आंशिक बुकिंग सुरू करू शकतात, परंतु अधिकृतपणे चित्रपटाचे पूर्ण बुकिंग शनिवार म्हणजेच 16 डिसेंबरपासून सुरू होईल.  परदेशात ‘डिंकी’चे अॅडव्हान्स बुकिंग गेल्या आठवड्यातच सुरू झाले असून, या चित्रपटाला प्री-सेल्समध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जगभरात ‘डिंकी’ची अॅडव्हान्स बुकिंग सुरू  चित्रपटाची जगभरातील अॅडव्हान्स बुकिंग लक्षात घेता, त्याला US$2.50 दशलक्ष किंवा त्याहून अधिकची ओपनिंग मिळण्याची अपेक्षा आहे. परदेशी बाजारात ते US$3 दशलक्ष ओलांडण्याची शक्यता आहे.  याव्यतिरिक्त, चार दिवसांच्या वीकेंडमध्येही, चित्रपटाने US$15 दशलक्ष पेक्षा जास्त कमाई करणे अपेक्षित आहे. रिपोर्टनुसार, शाहरुख खानचा ‘डिंकी’ जवळपास 80 कोटींची कमाई करू शकतो, असे बोलले जात आहे. तथापि, ही अंदाजे आकडेवारी आहे. यामध्ये आकडेवारी वाढू शकते किंवा कमी होऊ शकते.   हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदारपणे उभा राहण्यासाठी सज्ज झाला आहे. जर हा चित्रपट देखील ब्लॉकबस्टर राहिला तर 2023 मध्ये पठाण, जवान आणि नंतर डंकी असे ब्लॉकबस्टर चित्रपट देण्याची शाहरुख खानची हॅटट्रिक असेल. आता ‘डिंकी’ बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करते हे पाहायचे आहे.  शाहरुख खान व्यतिरिक्त तापसी पन्नू आणि विकी कौशलसह अनेक कलाकारांनी ‘डंकी’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

Dunki Advance Booking: काय सांगता! Shahrukh Khan ची ‘डिंकी’ पहिल्या दिवशी करणार ‘इतक्या’ कोटी रुपयांची कमाई; जाणून व्हाल थक्क Read More »

Maharashtra Women Rape News :  धक्कादायक, विधवेला काम मिळवून देण्याच्या बहाण्याने राजस्थानला नेले अन् घडलं असं काही …..

Maharashtra Women Rape News : महाराष्ट्रातील एका विधवा महिलेसोबत राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार या महिलेने वर्षभर लैंगिक छळ सहन केला आणि कशीतरी त्या क्रूरांच्या तावडीतून सुटून थेट वर्धा जिल्ह्यात आली आणि तिने हिंगणघाट पोलिसांना आपला त्रास कथन केला.   हिंगणघाट शहरातील रहिवासी असलेल्या पीडित महिलेच्या पतीचा चार वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर ती इतर लोकांच्या घरात भांडी धुवून आपला उदरनिर्वाह करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, एके दिवशी पीडित मंगला छाया नावाच्या महिलेच्या घरी भेटली. त्याने पीडितेला राजस्थानमध्ये घरगुती मदतीची गरज असल्याचे सांगून आमिष दाखवले. यासाठी निवास आणि भोजनाच्या सुविधांसोबतच तुम्हाला चांगले पैसेही मिळतील. त्यानंतर पीडित महिला मंगला आणि पूनमसह प्रथम राजस्थानमधील रतलाम गावात पोहोचली. तेथे आरोपीने स्टॅम्प पेपरवर त्यांची सही घेतली. तक्रारीनुसार, काही दिवसांनी शंकर राठोड आणि दिलीप राठोड त्या गावात पोहोचले. त्यांनी पीडितेचे आधार कार्ड आणि मोबाईल हिसकावून घेतला. शंकरने ते दोन लाख रुपयांना विकले. यादरम्यान तिचा लैंगिक छळ करण्यात आला. त्याचा छळ आणि मारहाणही होऊ लागली. सुमारे एक वर्ष हे सर्व सहन केल्यानंतर पीडितेने आईची तब्येत बिघडल्याचे सांगून तेथून पळ काढला. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आनंदसह मंगला, पूनम, शंकर आणि दिलीप राठोड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Maharashtra Women Rape News :  धक्कादायक, विधवेला काम मिळवून देण्याच्या बहाण्याने राजस्थानला नेले अन् घडलं असं काही ….. Read More »

Madhi Devasthan : मढी देवस्थानच्या अध्यक्ष निवडीवरुन जबरदस्त राडा; वाचा सविस्तर

Madhi Devasthan : आज श्री क्षेत्र मढी देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये अध्यक्ष बदलाच्या मुद्द्यावरून जबरदस्त राडा झाला.   समोर आलेल्या माहितीनुसार अध्यक्ष बदलासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीदरम्यान विश्वस्तांमध्ये हाणामारी झाली.  या घटनेमध्ये अध्यक्ष संजय मरकड यांना जबरदस्त मारहाण झाली. त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे. श्रीक्षेत्र मढी देवस्थानच्या अध्यक्षपदावरून दोन गटात मागील काही दिवसांपासून धूसफूस सुरू होती. यामुळे आज गुरुवार दि. 14 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेच्या दरम्यान देवस्थानच्या सभागृहामध्ये विश्वस्तांच्या बैठक ठेवण्यात आली होती. या बैठकीत बहुमताने अध्यक्ष बदलाबाबत निर्णय घेण्यात येणार होता. अध्यक्ष बदलाची चर्चा सुरू असतानाच तेथे दोन गटात राडा झाला. विश्वस्तांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक सुरू झाली असताना काही स्थानिक युवक पडले. अखेर या शाब्दिक चकमकीचे रुपांतर लाठ्या-काठ्यांनी हाणामारी झाले.  दोन गटात सुरू झालेल्या हाणामारीने उपस्थितांमध्ये चांगलीच धांदल उडाली. दोन्ही गटाने एकमेकांना मारहाण केल्याने काहीजण जखमी झाले. या सर्व जखमींना उपचारासाठी पाथर्डी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी पाथर्डी ग्रामीण रुग्णालय व पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती.  जखमींवर उपचार सुरू असून पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Madhi Devasthan : मढी देवस्थानच्या अध्यक्ष निवडीवरुन जबरदस्त राडा; वाचा सविस्तर Read More »

Gutkha Ban : गुटखाबंदीने पोलिसांचे हप्ते वाढले…हेरंब कुलकर्णींचा थेट निशाणा

Gutkha Ban – दोन महिन्यापूर्वी अहमदनगर शहरामध्ये दारूबंदी चळवळीचे कार्यकर्ते  हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता.  कुलकर्णी ज्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत त्या शाळेच्या आजूबाजूला असलेल्या गुटखा आणि अवैध्य व्यवसायाच्या विरोधात त्यांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाला पत्र देऊन कारवाईची मागणी केली होती.  हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा देखील उपस्थित झाला मात्र नगर जिल्ह्यातील परिस्थिती काही बदलली नाही, यामुळे राज्यातील गुटखा बंदी हि फसलेली बंदी आहे. तसेच ही जी शासनाने गुटखाबंदी केली आहे. त्यामुळे गुटखा विक्री करण्याचे प्रमाणही वाढले असून यामध्ये पोलिसांचे हप्ते वाढले असा थेट आरोप सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे.  शाळा व महाविद्यालय परिसरातील गुटखा, तंबाखू अशा अवैद्य टपऱ्या काढण्याची मागणी कुलकर्णी यांनी नगर जिल्हा प्रशासनाकडे केली होती. या कारणावरून हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची  घटना घडली होती. या घटनेला दोन महिने होऊन गेले व नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सुमारे 32 आमदारांनी या हल्ल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता व याबाबत शिक्षक  आमदार विक्रम काळे यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला आहे.  मात्र या हल्ल्याच्या घटनेनंतरही अहमदनगर जिल्ह्यातील परिस्थिती बदलली नसून जिल्ह्यातील अवैद्य गुटखा विक्री आणि अवैध धंदे तसेच सुरू असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.सध्याची नगर जिल्ह्यातील परिस्थिती पाहता गुटखाबंदी ही फसलेली बंदी असल्याचे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.  गुटखाबंदीने पोलिसांचे हप्ते वाढले… ही जी शासनाने गुटखाबंदी केली आहे. त्यामुळे गुटखा विक्री करण्याचे प्रमाणही वाढले असून यामध्ये पोलिसांचे हप्ते वाढले असा थेट आरोप सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे. गुटखा हा शरीराला घातक असल्यामुळे तरुणांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. माझ्यावर हल्ला झाल्यानंतर प्रशासनामध्ये थोडी चलबीचाल झाली मात्र कुठल्याही प्रकारचं धोरणात्मक निर्णय किंवा ॲक्शन सरकारकडून होताना दिसत नाही असे खंतही त्यांनी व्यक्त केली.  प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष राज्यातील सर्वच भागात गुटखा आणि मावा खुलेआम विक्री जोरात सुरू आहे. मात्र अन्न औषध प्रशासन याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत असून या मावा आणि गुटखा विक्री करणाऱ्या या महानगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून लावण्यात येत असताना महानगरपालिका ही याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करत.  संपूर्ण जिल्ह्यात याच प्रकारे सर्व अवैद्य धंदे सुरू असून प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे? हा प्रश्न हेरंब कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.

Gutkha Ban : गुटखाबंदीने पोलिसांचे हप्ते वाढले…हेरंब कुलकर्णींचा थेट निशाणा Read More »

Nilesh Lanke : जलजीवन योजनेत घोटाळा…लंकेकडून कारवाईची मागणी; अनेक चर्चांना उधाण

Nilesh Lanke : – अहमदनगर जिल्ह्यात जलजीवन मिशन अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या पाणी योजनांच्या निविदा प्रक्रियेत मुख्य कार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी संगनमताने घोटाळा केल्याचा आरोप विधानसभेत आमदार नीलेश लंके यांनी केला आहे.  यामुळे जिल्ह्यात अनेक चर्चांना उधाण आला आहे. या प्रकरणात कारवाईची मागणी देखील त्यांनी विधानसभेमध्ये केली आहे.   विधानसभेत लंके म्हणाले, ठेकेदारास काम देण्यासाठी गैरमार्गाचा अनेकदा अवलंब करण्यात आला आहे. खोटी कागदपत्रे जोडणे, ठेका मिळाल्यानंतर काम पुर्ण नसणे, कॅपॅसिटीपेक्षा कोटींची जास्त कामे देण्यात आली.  एका ठेकेदारास सुरूवातील अपात्र ठरविणे व त्याच ठेेकेदाराला लगेच दोन दिवसांत पात्र ठरविण्यात आले आहे. टेेंडर रद्द करून पुन्हा करणे, टेेंडर नोटीसमधील अटी बदलणे अशा गैरमार्गाचा अवलंब केल्याच्या तक्रारी कार्यकारी अभियंता यांच्याकडे करूनही काहीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे लंके यांनी नमुद केले.   जल जीवन कार्यक्रमांतर्गत पारनेर-नगर मतदारसंघातील मौजे जामगांवसह सहा गावांची पाणी पुरवठा योजनेचे काम घेताना ठेकेदारांनी खोटी व बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केली आहे. ठेकेदाराकडे कोणतीही कागदपत्रे नसताना काम देण्यात आले आहे. या ठेकेदाराने काम पुर्ण झाल्याचे दाखलेही खोटे सादर केले असून त्यावर संबंधित विभागाच्या जावक क्रमांकाचा उल्लेख नाही तसेच सही देखील बनावट आहे. शासन निर्णयाप्रमाणे प्रक्रिया राबविण्यात आलेली नसल्याचे लंके यांनी सांगितले.   ठेका घेतलेली सर्व कामे 25 ते 30 टक्के पुर्ण आहेत. टेंडर प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या व्यक्ती, संस्था यांच्याविषयी नगर जिल्हयातील लोकप्रतिनिधीनींनी जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे पुराव्यासह वारंवार तक्रारी करण्यात येऊनही चौकशी करण्यात येत नाही.  ठेकेदारासबंधी माहीती मागविल्यानंतर माहीती देण्यात येत नाही. बनावट कागदपत्रे सादर करून ठेकेदाराने कामे मिळविली आहेत. या ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजे अशी आग्रही मागणी आ. लंके यांनी यावेळी बोलताना केली.

Nilesh Lanke : जलजीवन योजनेत घोटाळा…लंकेकडून कारवाईची मागणी; अनेक चर्चांना उधाण Read More »

Bachchu Kadu : ..अन्यथा प्रहार कार्यालयात घुसून मुक्काम आंदोलनं करणारं!! ‘त्या’ प्रकरणात प्रहार आक्रमक

Bachchu Kadu: आ.बच्चू कडू आपल्या आक्रमक आंदोलने आणि रोखठोक भूमिकेमुळे संपूर्ण राज्यात चर्चेत राहतात. राज्यात त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अनेक वेळा आंदोलने करण्यात आली आहे.  आता नगरमध्येही प्रहारच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.  अहमदनगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायती, आणि महानगरपालिका मधील  दिव्यांगांसाठी असलेला राखीव निधि आठ दिवसात वितरित करा अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मुक्काम व ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा आ.बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.  जिल्हाप्रमुख अभिजीत दादा पोटे यांनी अहमदनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना दिलेल्या निवेदनात, केंद्र शासनाने दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अपंग व्यक्ती समान संधी हक्कांचे संरक्षण व संपूर्ण सहभाग अधिनियम लागू केला आहे.  दिव्यांगांना समाजात सहजतेने जगता यावे यासाठी शासनाने विविध योजना लागू केल्या आहेत तथापि ग्रामपंचायत पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपंचायती, महानगरपालिका तसेच संजय गांधी निराधार योजना आदी विभाग आजही दिव्यांगंच्या बाबत उदासीन आहेत. यामुळे दिव्यांगांच्या योजना व त्यासाठी असलेल्या राखीव निधी वाटपाबाबत दिरंगाई होऊन प्रशासनाकडून शासन निर्णयाला केराची टोपली दाखविली जात होती. त्यामुळे अनेक दिव्यांगांना त्यापासून वंचित राहावे लागत होते.  ही बाब शासनाचे निदर्शनास आल्यानंतर शासनाने कठोर पावले उचलून दिव्यांग अधिनियम 2016 नव्याने पारित केला आहे. ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना त्यांच्या अर्थसंकल्पाच्या तीन टक्के निधी दिव्यांगांचे कल्याण व पुनर्वसनासाठी राखीव ठेवून दिव्यांगाना वाटपाबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. ग्रामपंचायतींनी त्यांच्या गावातील ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांगांची माहिती विहित नमुन्यात अद्यावत भरून ठेवण्याच्या शासनाने सूचना दिलेल्या आहेत. तसेच पंचायत राज संस्थांनी त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या पाच टक्के निधी राखीव ठेवून तो वाटपाबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.  तसेच सदरील निधी हा दिव्यांगाना रोख स्वरूपात देण्यात यावा वस्तू स्वरूपात दिल्यास त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरोवर होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या असून दिव्यांगांना गरज नसलेली वस्तू वारंवार वाटप होताना आढळून आलेले आहे. त्यामुळे या निधीचा अपव्यय होत आहे.तरी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपंचायत व महानगरपालिका यांनी दिव्यांगांसाठी असलेला राखीव निधी आठ दिवसात वितरित करावा अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सर्व कार्यालयांचा ताबा घेवुन दिव्यांगांसह मुक्काम व ठिय्या आंदोलन उभारण्यात येईल इशारा प्रहारचे जिल्हाप्रमुख अभिजीत  पोटे यांनी दिला आहे.

Bachchu Kadu : ..अन्यथा प्रहार कार्यालयात घुसून मुक्काम आंदोलनं करणारं!! ‘त्या’ प्रकरणात प्रहार आक्रमक Read More »

Satyajit Tambe :  सरकाने शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीत टाकले… ‘त्या’ प्रकरणात तांबेंचा सरकारवर निशाणा

Satyajit Tambe : केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयानंतर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात कांद्यामुळे तापमान वाढला आहे.  केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत कांदा निर्यातीवर बंदी लावली आहे. यामुळे राज्यातील हजारो शेतकरी आंदोलन करत आहे यातच आता आमदार सत्यजीत तांबे या प्रकरणात केंद्र सरकारवर निशाणा साधत कांद्याच्या निर्यातीवरील बंदीवर तातडीने फेर विचार करण्याची शिफारस राज्य शासनाने केंद्र शासनाकडे करावी, अशी मागणी सभागृहात केली. आमदार सत्यजीत तांबे यांनी अधिवेशनात शेतकरी प्रश्न, महावितरण व महापारेषणमधील कंत्राटी वीज कामगारांच्या प्रश्नांकडे  सरकारचे लक्ष वेधले. तसेच कांदा निर्यात बंदीवर राज्य शासनाने केंद्र सरकारकडे फेर विचार करण्याची मागणी करावी असे मुद्दे आमदार सत्यजीत तांबे यांनी मांडले.  वीज कंपन्यांमध्ये रिक्त जागांवर कंत्राटी कामगारांची नियुक्ती केली जाते. तसेच आजच्या घडीला 42 हजार कंत्राटी वीज कामगार कार्यरत असून कंत्राटी वीज कामगार विजेची कामे करत असतात. कामगारांना कोणतीही सुरक्षा साधनांचा पुरवठा कंपनीमार्फत केला जात नाही. मागील तीन वर्षांत विजेचा धक्का (शॉक) लागल्यामुळे 80 वीज कामगारांना जीव गमवावा लागला, अशी खंत आ. तांबे यांनी सभागृहात बोलून दाखवली.  या कामगारांना वीजेपासून संरक्षण करणाऱ्या साहित्याचा वाटप होते का? याकडे सरकारने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे, असा कंत्राटी वीज कामगारांचा सुरक्षेसंदर्भातील गंभीर मुद्दा अधिवेशनात आमदार तांबे यांनी मांडला.  मुलभूत सुविधांपासून वीज कामगार वंचित लाईनमन व अन्य कामगारांना सुरक्षेच्या साधनाशिवाय खांबांवर चढणे, बिघाड दुरुस्त करणे, अशी जोखमीची कामे करावी लागतात. सुरक्षा संदर्भातील साधने पुरविणे हे कंपनीचे काम असते. मात्र, कंपनी याकडे दुर्लक्ष करते. तसेच कामगारांना वेळेवर पगार दिला जात नसून, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी व विमा काढला जात नाही. अशा मुलभूत गरजांपासून कामगारांना वंचित राहावं लागत आहे असं आमदार सत्यजीत तांबे म्हणाले.

Satyajit Tambe :  सरकाने शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीत टाकले… ‘त्या’ प्रकरणात तांबेंचा सरकारवर निशाणा Read More »