DNA मराठी

ताज्या बातम्या

Ahmednagar News: धडाकेबाज कारवाई! दोन फुटी तलवारीसह आरोपी जेरबंद

Ahmednagar News: 07 मार्च 2024 रोजी शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, इसम नामे संदीप नवनाथ माळी रा. मळेगाव ता. शेवगाव याने वाढदिवसानिमीत्त तलवारीने केक कापलेचा स्टेटस मोबाईलला ठेवला होता.  व समाजात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर प्रसिद्ध करून दहशत करत आहे.  या माहितीवरून पोनि/ दिगंबर भदाणे यांनी  पोहेकाँ/नाकाडे, पोहेकॉ दराडे, पोशि/शाम गुजाळ, पोशि/बप्पासाहेब धाकतोडे, पोशि/ संपत खेडकर, नगर दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुडू,नितीन शिंदे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने तांत्रिक व लोकेशन मदतीने सदर इसमाचा शोध घेऊन त्याला  बोधेगाव ता. शेवगाव मधून अटक केली. त्याची दोन पंचासमक्ष  अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात एक पितळी मुठ असलेली दोन फुट लांबीची एक पांढरे रंगाची लोखंडी तलवार मिळून आली. यानंतर आरोपी व तलवार ताब्यात घेउन शेवगाव पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले.   सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगाव  उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांचे आदेशाने पोहेकाँ/नाकाडे, पोहेकॉ दराडे, पोशि/शाम गुजाळ, पोशि/बप्पासाहेब धाकतोडे, पोशि/ संपत खेडकर, नगर दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुडू,नितीन शिंदे यांनी कारवाई केली.  तसेच पोलीस निरीक्षक शेवगाव यांनी शेवगाव तालुक्यातील जनतेस आव्हान केले आहे की वाढदिवसानिमित्त तलवारीने केक  कापत असेल व  हत्यार बाळगून समाजामध्ये दहशत निर्माण करत असेल व अवैधरित्या गावठी कट्टा व तलवारी चाकू व चोरीच्या उद्देशाने कुणी संशयितरित्या फिरत असतील तर  शेवगाव पोलिसांच्या ०२४२९ २२१२३३ या क्रमांकावर ती संपर्क करावा खबर देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आव्हान पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी केले.

Ahmednagar News: धडाकेबाज कारवाई! दोन फुटी तलवारीसह आरोपी जेरबंद Read More »

Loksabha Election 2024 : निलेश लंके लोकसभेची तुतारी फुंकणार… तनपुरे यांनी सांगूनच टाकलं

Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये नगर दक्षिण लोकसभा जागेवर अजित पवार गटात असलेले आमदार निलेश लंके शरद पवार गटाकडून लोकसभा लढवणार का याबाबत तर्क वितर्क लावले जात असतानाच यावर आमदार प्राजक तनपुरे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.  अनेक लोक हातातील घड्याळ काढून तुतारी वाजविण्यास सज्ज असतील असा आम्हाला आशा आहे असा विश्वास यावेळी आमदार तनपुरे यांनी व्यक्त केला. निलेश लंके देखील लवकरच शरद पवार गटात येतं लोकसभा निवडणूक लढवतील असा विश्वास यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना आमदार तनपुरे म्हणाले की, लोकसभेसाठी माझं नाव चर्चेत नसून मी स्वतः लोकसभा लढवणार नाही मी विधानसभा लढवणार आहे असं तनपुरे यांनी स्पष्ट केलं तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, लंके यांनी घेतलेल्या महानाट्य मोठा जनप्रतिसाद मिळाला.  तसेच येणाऱ्या काळामध्ये अनेक लोक हातातली घड्याळ काढून तुतारी फंकण्यास सज्ज राहतील अशी आशा आम्हाला आहे.  लंकेचा पक्षप्रवेश होणार काय यावरती बोलताना ते म्हणाले की लंके का येणार नाही असे म्हणतच एक प्रकारे लंकेंचा लवकरच पक्ष प्रवेश होणार असं असं सुचक विधान यावेळी तनपुरे यांनी केलं.  महाविकास आघाडीकडून नगर दक्षिणेसाठी अगदी तोला मोलाचा उमेदवार दिला जाईल  याबाबत कुठलेही शंका नाही असं देखील यावेळी बोलताना प्राजक्ता तनपुरे यांनी स्पष्ट केले.

Loksabha Election 2024 : निलेश लंके लोकसभेची तुतारी फुंकणार… तनपुरे यांनी सांगूनच टाकलं Read More »

Ahmednagar News:  जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पाथर्डी येथे आयोजित कार्यक्रमास महिलांची ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दी..

Ahmednagar News:  काल जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला दिनाच्या निमित्ताने पाथर्डी येथे आयोजित करण्यात आलेला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि सांस्कृतिक महोत्सव 2024 मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  पाथर्डी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला असून यावेळी महिला भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाथर्डी येथे पाहायला मिळाली. सदर कार्यक्रमात विविध क्षेत्रांमध्ये आपल्या बहुमूल्य योगदानाने समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सन्मानित करण्यात आलेल्या सर्व महिला भगिनींचे खासदार विखेंनी मनापासून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या कार्याला सदिच्छा दिल्या. तसेच उपस्थित महिला भगिनींना देखील या सन्मानित करण्यात आलेल्या महिला भगिनिंकडून प्रेरणा घेत वाटचाल करण्याचे आवाहन केले.  या सांस्कृतिक महोत्सवात महिलांचे मनोरंजन करण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात आले. भव्य लकी ड्रॉ, पैठणी आणि बरच काही.. या थीम अंतर्गत विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या नृत्याने उपस्थित सर्वच महिलांची मने जिंकत या सोहळ्याचा उत्साह अधिक वाढवला.  पाथर्डी मध्ये या अगोदर देखील बरेच कार्यक्रम झाले परंतु कोणत्याच कार्यक्रमाला इतक्या प्रचंड प्रमाणात महिलांची गर्दी उसळली नव्हती. ‘न भूतो न भविष्यती’ असा हा सोहळा पार पडला. जणू काही महिलांसाठी ही एक विशेष पर्वणीच होती असा भास सगळ्यांनाच झाला. अगदी आनंदमय वातावरणात सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी होत आपल्या धावपळीच्या आयुष्यातून वेळ काढत हा क्षण अविस्मरणीय केला. दरम्यान जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची संपूर्ण तालुक्यात चर्चा होत आहे. उत्कृष्ट नियोजन आणि महिलांचे संघटन काय असते हे खासदार सुजय विखे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाकडे पाहून सर्वांनाच समजले. यावेळी आमदार मोनिका राजळे आणि रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्ष धनश्री विखे पाटील देखील उपस्थित होत्या. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा फुंदे, पाथर्डीत रुग्ण सेवा सुरू करणाऱ्या प्रथम महिला डॉ. सुरेखा लोखंडे, युवा कीर्तनकार ह.भ.प. वैष्णवी मुखेकर, पैठणी विणकामाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार मिळवून देणाऱ्या शितल टेके, महिला उद्योजक उमामहेश्वरी बजाज, समाजहित जोपासणाऱ्या मा. नगरसेविका सुरेखा गोरे, शैक्षणिक कार्यात महत्वाचे योगदान देणाऱ्या मुख्याध्यापिका विजया चोरमले, महिला उद्योजक मिरा बडे, महिला उद्योजक सिंधू आहेर, महिला उद्योजक पार्वती शिंदे, डॉ. आयेशा पठाण, आरोग्यमाता केंद्राच्या माध्यमातून रुग्ण सेवा करणाऱ्या समाजसेविका शिला जाधव आदी कर्तृत्ववान महिलांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. सोनाली कुलकर्णी यांनी कार्यक्रमादरम्यान दादांबद्दल काढले गौरवोद्गार… अभिनेत्री सोनाली कुलकर्णी खासदार सुजय दादांबद्दल म्हणाल्या की, एरवी नेते मंडळी पुढच्या रांगेत सोफ्यावर बसून कार्यक्रमाचा आनंद घेतात. परंतु दादांचे तसे नाही, कुठलाही बडेजावपणा न करता कार्यक्रमात प्रेक्षकांमध्ये कुठेतरी हरवलेले असतात. दादा आहेत की नाही कार्यक्रमात याची शोधाशोध आम्हाला करावी लागते आणि म्हणूनच दादांना जनतेचे नेते म्हणतात. वारंवार त्यांच्या कार्यातून आणि वागणुकीतून हे दिसून येते.

Ahmednagar News:  जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पाथर्डी येथे आयोजित कार्यक्रमास महिलांची ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दी.. Read More »

Health Tips: फ्रीजमध्ये अंडी ठेवता? मग ‘या’ 5 गोष्टी जाणून घ्या

Health Tips: आज अनेकजण स्वतःला फिट ठेवण्यासाठी या बिझी लाईफस्टाईल मध्ये रोज सकाळी किंवा रात्री अंडी खातात मात्र आपल्याला हे माहित आहे का ? फ्रीज मध्ये ठेवलेले अंडी हे आपले आरोग्य बिघडवू शकतात.    संसर्ग होण्याचा धोका बऱ्याच वेळा अंडींच्या सालांवर बाहेरची घाण लागलेली असते. ज्यामुळे फ्रीज मध्ये ठेवल्याने इतर पदार्थांमध्ये देखील संसर्ग पसरण्याचा धोका असतो. हेच कारण आहे की अंडी फ्रीज मध्ये ठेवणे टाळावे. फ्रीज बाहेर ठेवलेली अंडी जास्त आरोग्यवर्धक आहे   फ्रीज मध्ये ठेवलेली अंडी बाहेरच्या अंडींपेक्षा जरी जास्त दिवस चांगले राहत असेल तरी फ्रीज मध्ये ठेवलेली अंडी जास्त थंड झाल्यामुळे आपले पोषक घटक गमावतात.  अशा परिस्थितीत जर आपण आरोग्याबद्दल सज्ज आहात तर हे जाणून घ्या की खोलीच्या तापमानात ठेवलेली अंडी, फ्रीज मध्ये ठेवलेल्या अंडींच्या तुलनेत जास्त आरोग्यदायी आहे.  बॅक्टेरियांचा धोका अंडींना फ्रीज मध्ये ठेवल्यावर त्यांना सामान्य तापमानात ठेवल्याने कंडेनसेशन म्हणजे गॅस मधून द्रव होण्याची प्रक्रिया ची शक्यता वाढते. कंडेनसेशनमुळे अंडींच्या सालींवरील असलेले बॅक्टेरिया झपाट्याने वाढतच नाही तर अंडींच्या आत देखील प्रवेश करू शकतात. अश्या अंडींचे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. तापमान  जर आपण अंडींचा वापर बेकिंग उत्पादन साठी करू इच्छिता तर हे फ्रीज मध्ये ठेवू नये. कारण फ्रीज मधील ठेवलेल्या अंडींना फेणायला त्रास होतो. एवढेच नव्हे तर फ्रीज मधील ठेवलेल्या अंडींना वापरल्याने त्यांच्या चवीमध्ये आणि रंगात बदल होऊ शकतो. तुटण्याची भीती  बाजारातून आणलेले अंडी त्वरितच उकडण्यासाठी ठेवल्याने त्यांची फुटायची भीती कमी असते. तर फ्रीज मधील अंडींना उकडल्याने ती अंडी फुटायची भीती असते.

Health Tips: फ्रीजमध्ये अंडी ठेवता? मग ‘या’ 5 गोष्टी जाणून घ्या Read More »

Ahmednagar News: मोठी बातमी! माळीवाडा बस स्थानकासमोर लागली आग

Ahmednagar News : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार अहमदनगर शहरातील माळीवाडा बस स्थानकासमोर दुपारी साडेबारा – एकच्या दरम्यान आग लागली. या लागलेल्या आगीमुळे माळीवाडा परिसरामध्ये एकच खळबळ उडाली.  मिळालेल्या माहितीनुसार परिसरातील उज्वल नगर येथील मोकळ्या पटांगणात ही आग लागली होती. ही आग उष्णतेमुळे लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.  आग लागल्याची माहिती मिळतात अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले व काही वेळेतच आग आटोक्यात आणण्यात यशस्वी झाले.

Ahmednagar News: मोठी बातमी! माळीवाडा बस स्थानकासमोर लागली आग Read More »

Sujay Vikhe News: खा. डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते दोन कोटी रुपयांचे साहित्य व कर्ज वाटप

Sujay Vikhe News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नारीशक्ती वंदन या कार्यक्रमाच्या अंतर्गत कर्जत मंडलामधील महिलांना दुरदृष्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला मोर्चा अध्यक्ष यांनी केले. कर्जत तालुक्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज बचत गटातील महिलांना सक्षमीकरणासाठी कर्ज व साहित्य वाटपाचे वितरण खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. दरवर्षी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून अनेक आश्वासने दिली जातात.  पण महिला सक्षमीकरणासाठी कोणतेही काम झाले नव्हते. मात्र यावेळी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन अंतर्गत महिलांना 40 कोटी रुपयांचा निधी देऊन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. जोपर्यंत महायुती सरकार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील तोपर्यंत जिल्ह्यातील महिला बचत गटांना कुठल्याही निधीची कमतरता पडणार नाही अशी ग्वाही खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. शिवपार्वती लॉन्स येथे संपन्न होत असलेल्या बचत गटातील महिलांना साहित्य व कर्ज वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले, शेखर खरमरे, प्रतिभाताई, अर्चनाताई, शबनम इनामदार, प्रभा पाटील, शामल थोरात, नीता कचरे, विक्रम भोसले, संजय तापकीर आदींची प्रमुख उपस्थिती होती. कर्जत तालुक्यासाठी मागील जिल्हा नियोजन अंतर्गत 13 महिला बचत गटांना 65 लाख रुपयांचे साहित्य वाटप केले होते. यावेळी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन विकास योजनेच्या अंतर्गत 40 महिला बचत गटांना दोन कोटी रुपयांचे साहित्य व कर्ज वाटप करण्यासाठीच्या निधीची तरतूद केली आणि प्रत्यक्षात वाटप देखील सुरू आहे. यामध्ये मसाला कांडप, शेवया मशीन, पिठाची गिरणी, स्टॉल आदी वस्तूंचा समावेश आहे. तसेच पुढच्या वर्षी ज्या जिरायत पट्ट्यामध्ये किंवा तालुक्यात जे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते. त्या पिकासाठी आपण उमेद व महावीग यांना सांगून आपणास जे काही साहित्य अपेक्षित राहील त्याबाबत कळवावे. लागेल ते साहित्य पुरवण्याचे काम खा. डॉ. विखे पाटील करेल असे देखील उपस्थितांना त्यांनी आश्वासित केले. निस्वार्थ भावनेने तालुक्याच्या विकासासाठी वारंवार काम करण्याचा प्रयत्न केला आहे. एक सुशिक्षित व्यक्ती निवडून दिल्यानंतर आपल्या भागाचा विकास कसा होतो याचे उदाहरण खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले आहे. नगर करमाळा अंतर कापण्यासाठी पूर्वी चार तास लागत होते.  मात्र आता काम मार्गी लावून वेळेची बचत कशी झाली याचे उदाहरण खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले आणि नगर करमाळाचे काम अवघ्या 18 महिन्यात पूर्ण करून तो रस्ता नागरिकांसाठी खुला केला.  सध्या काही लोक आम्ही किती गरीब हे समाजापुढे दाखवत असतात. पण ती नंतर कसे श्रीमंत होतात कळत सुद्धा नाही. एक सुशिक्षित व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला लोकप्रतिनिधी निवडून दिला तर तो कुठल्याही कामांमध्ये टक्केवारी न घेता काम कसे पूर्ण होईल याकडे जास्त लक्ष देतो.  दरम्यान विखे यांनी यावेळी विरोधकांना चांगलेच खडे बोल सुनावले व सुजय विखे पाटील हे कामातून उत्तर देत असतात. तालुक्याची विकासक गती कशी वाढवता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न सर्वांनी केले पाहिजेत असे मत देखील खासदार विखेंनी यावेळी मांडले. भारतीय जनता महिला मोर्चाच्या संयुक्त विद्यमानाने कर्जत मंडल येथे आयोजित नारी शक्ती वंदन या कार्यक्रमाअंतर्गत विश्वनेते नरेंद्र मोदी साहेब यांनी दुरदृष्य प्रणालीद्वारे महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी नरेंद्र मोदींनी प्रथमतः भारत माता की जय, जय मां काली, जय माँ दुर्गा अशा जयघोषाने भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, देशातील लाखो भगिनीही या कार्यक्रमात दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आहेत. मी त्या सर्व महिलांना आणि उपस्थित महिला भगिनींना नमस्कार करतो. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सर्व भगिनींचे मला अभिनंदन करायचे आहे. कारण मी पुरुषांच्या मॅरेथॉनबद्दल ऐकले होते, परंतु आमच्या महिला कार्यकर्त्या नारी शक्ती वंदनाच्या माध्यमातून गावोगावी जात आहेत. न थकता पायपीट करत आहेत. या माता, या बहिणी आणि मुली मोदींच्या रक्षणासाठी चिलखताप्रमाणे उभ्या आहेत. आज प्रत्येक देशवासी स्वत:ला मोदींचे कुटुंब म्हणवत आहे.  आज देशातील प्रत्येक गरीब, प्रत्येक शेतकरी, प्रत्येक तरुण, प्रत्येक बहीण आणि मुलगी म्हणत आहे मी मोदींचे कुटुंब आहे. या कुटुंबाला पुढे घेऊन जाण्यासाठी माझ्यासह संपूर्ण भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते सक्षम आहेत असे उपस्थितांना त्यांनी सांगितले.

Sujay Vikhe News: खा. डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते दोन कोटी रुपयांचे साहित्य व कर्ज वाटप Read More »

Facebook down: मोठी बातमी! अखेर फेसबुक पुन्हा सुरू मात्र इंस्टाग्राम बंद

Facebook down : अचानक जगभरातील मेटाची सर्व्हिस डाऊन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. देशासह जगभरात अनेकांचे फेसबुक अकाउंट आपोआप लॉग आउट झाले होते. मात्र आता फेसबुक पुन्हा एकदा सूरु झाले आहे तर इंस्टाग्राम अद्याप देखील बंद आहे. नेमकी काय तांत्रिक अडचण आलीय, हे फेसबुक कडून आद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

Facebook down: मोठी बातमी! अखेर फेसबुक पुन्हा सुरू मात्र इंस्टाग्राम बंद Read More »

Chandrapur Crime : महाराष्ट्र हादरला! तिहेरी हत्याकांडाने खळबळ

Chandrapur Crime : चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.  या माहितीनुसार कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलींची निर्घृण हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मौशी गावात रविवारी ही घटना घडली. 50 वर्षीय अंबादास तलमले यांनी त्यांची 42 वर्षीय पत्नी अलका, 19 वर्षांची मुलगी प्रणाली तलमले आणि 17 वर्षांची मुलगी तेजू तलमले यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. मारेकरी पती अद्याप पोलिसांच्या ताब्यात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पती अंबादास याचा पत्नीसोबत वाद सुरू होता. दरम्यान, काल पहाटे क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. यादरम्यान अंबादासचा संयम सुटला आणि त्याने शिवीगाळ सुरू केली. दरम्यान, रागाच्या भरात अंबादासने पत्नी व दोन मुलींवर कुऱ्हाडीने वार केले. त्याचा जागीच मृत्यू झाला. या खुनाची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील कायदेशीर कारवाई केली. पोलिसांनी तिन्ही महिलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. तसेच आरोपी अंबादास याला अटक केली. पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत. घटना घडली त्यावेळी अंबादास यांचा मुलगा घरी नव्हता, तो कामावर गेला होता.

Chandrapur Crime : महाराष्ट्र हादरला! तिहेरी हत्याकांडाने खळबळ Read More »

Amit Shah : महायुतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार? अमित शहा आज घेणार मोठा निर्णय

Amit Shah : सत्ताधारी भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जोरात तयारी सुरू केली आहे. भाजपने आगामी लोकसभे निवडणूकसाठी आपली पहिली उमेदवारांची यादी देखील जाहीर केली आहे. या यादीमध्ये 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील 195 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.   मात्र या यादीमध्ये राज्यातील एकाही उमेदवाराचे नाव नाही. यावरून अद्याप महायुतीमध्ये जागावाटपाबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट झालं आहे.   भाजप,  शिवसेना (एकनाथ शिंदे गट)आणि  राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 30 हून अधिक जागांवर उमेदवार उभे करायचे आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जागांवर निवडणूक लढवायची आहे. मात्र भाजप त्यांना 04 जागा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे  अजित गटाचा 16 जागांवर डोळा असल्याच्या बातम्या येत आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 22 जागांवर निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे भाजपच टेन्शन वाढला असून जागावाटपाचा मुद्दा गुंतागुंतीचा बनत चालला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने यापूर्वी 10 जागांवर निवडणूक लढवण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र आता त्यात आणखी 6 जागांची भर पडली आहे. आज आणि उद्या राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत एकूण 16 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. यामध्ये सध्या एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर, नाशिक आणि भाजपच्या अहमदनगर दक्षिण, भंडारा, गोंदिया, नाशिक, दिंडोरी या जागांचा समावेश आहे. अजित पवार गटला अहमदनगर दक्षिणची जागा हवी आहे. तेथून भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय पाटील हे सध्या खासदार आहेत. अजित पवार यांचे समर्थक आमदार नीलेश लंके यांना या जागेवरून निवडणूक लढवायची असून त्यांना तिकीट न मिळाल्यास ते पुन्हा शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर भंडारा गोंदिया हा प्रफुल्ल पटेल यांचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे ती जागाही राष्ट्रवादीला हवी आहे. तर दिंडोरीतून विद्यमान केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या जागी अजित पवारांना आपल्या गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांना संधी द्यायची आहे. सध्या नाशिकमधून शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार आहेत, मात्र येथे छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. 2019 मध्ये ईशान्य मुंबईची जागा राष्ट्रवादीने जिंकली होती. त्या जागेचाही राष्ट्रवादी आढावा घेणार आहे. शिवसेनेचे संजय मंडलिक हे सध्या कोल्हापुरात खासदार आहेत. 2014 ते 2019 दरम्यान ही जागा राष्ट्रवादीकडे होती. या सहा जागांव्यतिरिक्त अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणखी दहा जागांवर उमेदवार उभे करायचे आहेत. ज्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या धाराशिव, परभणी या जागेचा समावेश आहे. तर, गडचिरोली, माढा या जागा भाजपने गेल्या निवडणुकीत जिंकल्या होत्या आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या हिंगोली, बुलढाणा या जागांचा समावेश आहे. याशिवाय बारामती, शिरूर, सातारा, रायगड या जागांचाही समावेश आहे. अमित शहा आज निर्णय घेणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज (5 मार्च) महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यावेळी राज्यातील लोकसभेच्या जागा वाटपाच्या सूत्रावर चर्चा होऊ शकते. त्यामुळे सत्ताधारी महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न सुटू शकतो. भाजप आपल्या मित्रपक्षांना जास्त जागा देऊ शकेल, अशी चर्चा आहे, पण कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची अट असेल.

Amit Shah : महायुतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार? अमित शहा आज घेणार मोठा निर्णय Read More »

Travel Tips: प्रवासाच्या दरम्यान अस्वस्थ असाल, तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Travel Tips : बऱ्याच वेळा असं होत की आपण प्रवास करतो परंतु आपले आरोग्य पूर्णपणे चांगले नसते.एखाद्या ग्रुपसह प्रवास करतांना देखील ही समस्या उद्भवू शकते की प्रवासाची संपूर्ण योजना आखल्यावर देखील थोडं आजारी पडल्यावर प्रवासाच्या योजनेत बदल करण्या ऐवजी सर्वांची सोय बघून प्रवासात निघून जातो. बऱ्याच वेळा आपले आरोग्य हवा आणि पाणी बदल झाल्यामुळे चांगले होते.बऱ्याच वेळा स्थिती अशी होते की आपल्यामुळे प्रवाशांना देखील त्रास होतो. म्हणून स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचे आहे.या साठी आपण आजारी असल्यावर प्रवासात काळजी काय घ्यावी जाणून घ्या. अतिरिक्त औषधे जवळ बाळगा  आपण अस्वस्थ असाल तर सर्वप्रथम, प्रवासाला जाण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करून घेणं महत्त्वाचे आहे. डॉक्टर जे काही औषधें देतील त्या औषधांची यादी आपल्या सह घ्यावीच या व्यतिरिक्त औषधे आपल्या जवळ ठेवा.  जर एखादं औषध  दोन वेळा घ्यावयाचे आहे तर दोनच्या ऐवजी चार घेऊन जा. असं केल्यानं आपण जिथे जाता तिथे जाऊन औषधाची शोधाशोध होणार नाही. आपली स्थिती स्पष्ट करा आपल्या आरोग्याबद्दल लोकांना आधीपासूनच कळवा,असं केल्याने त्यांना आपल्या आरोग्या विषयी माहिती होऊन त्यांचा व्यवहार तसा राहील. जसं एखाद्या लांब पल्ल्यातून जायचे असेल तर त्यानुसार व्यवस्था करतील.जर आपण स्वस्थ असाल तर व्यवस्था करण्याचा प्रश्न नाही आपण हसत खेळतच एका ठिकाण्यावरून दुसऱ्या ठिकाणी गेला असता. पण अस्वस्थ असाल तर आता ते आपली चांगली काळजी घेतील. अन्ना बद्दल विशेष काळजी घ्या जर आपण अस्वस्थ असाल तर डॉक्टरांनी ज्या गोष्टींना घेण्यास नकार दिला आहे त्याचे सेवन करू नये. अन्यथा आपल्याला समस्यांना सामोरी जावे लागू शकतं. आपल्या आवडीचे पदार्थ बघून जर आपण आहार ठरवाल तर आपल्याला त्रास होऊ शकतो.म्हणून चमचमीत आणि चटपटीत खाण्या ऐवजी आरोग्याला सांभाळून आरोग्याची काळजी घेऊन आहार घ्यावा. ऑनलाईन माहिती घ्या आपण जिथे जात आहात त्या जागेची ऑनलाईन माहिती घ्या. आपल्याला काहीही आरोग्य विषयक त्रास झाल्यास त्याच्याशी निगडित डॉक्टर कोण आहे ? त्यांचे रुग्णालय कुठे आहेत? असं केल्यानं जास्त त्रास झाल्यास आपल्याला काहीच त्रास होणार नाही आणि गरज असल्यास वैद्यकीय सल्ला घेऊ शकाल.

Travel Tips: प्रवासाच्या दरम्यान अस्वस्थ असाल, तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा Read More »