DNA मराठी

ताज्या बातम्या

PM Kisan Yojana : आनंदाची बातमी, ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये

PM Kisan Yojana: पुढील महिन्यात देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये देशातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. समोर आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार पीएम किसान योजनेची रक्कम वाढवू शकते. सध्या देशातील अंदाजे 11 कोटी शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जात आहेत. म्हणजेच वर्षातून तीन वेळा हप्ते म्हणून प्रत्येकी 2,000 रुपये देते. मात्र सरकार आता ते 12 हजारांपर्यंत वाढवण्याच्या तयारीत आहे. या शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळू शकतो मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार पीएम किसान लाभार्थ्यांची रक्कम 8 हजार रुपयांवरून 9 हजार रुपयांपर्यंत वाढवू शकते. अहवालानुसार, सरकार योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात चार हप्त्यांमध्ये 2,000 रुपये किंवा तीन हप्त्यांमध्ये 3,000 रुपये हस्तांतरित करण्याची तयारी करत आहे. महिला शेतकऱ्यांना सरकारकडून अतिरिक्त लाभ दिला जाऊ शकतो. पीएम किसान योजनेंतर्गत महिला शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकार 10,000 ते 12,000 रुपये हप्ता म्हणून पाठवू शकते. शेतकऱ्यांच्या खात्यावर 2.8 लाख कोटी रुपये पाठवले केंद्र सरकारने 2019 मध्ये पहिल्या टर्ममध्ये ही योजना जाहीर केली होती आणि आता मार्चच्या पहिल्या आठवड्यात ती शेतकऱ्यांच्या खात्यावरही पाठवली आहे.  ही योजना सरकारसाठी अत्यंत प्रभावी ठरली. गेल्या 5 वर्षात सरकारने 15 हप्त्यांमधून 2.8 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले आहेत. अर्थसंकल्पात आणखी व्यवस्था करावी लागेल या आर्थिक वर्षात सरकारने पीएम किसानसाठी 60 हजार कोटी रुपयांचे बजेट निश्चित केले आहे. केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचे हप्ते वाढवले ​​तर बजेटही वाढणार हे नक्की. शेतकऱ्यांना 8 हजार रुपये भरायचे असतील तर 88 हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करावी लागेल. तर 9 हजार रुपयांच्या बाबतीत 99 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करावा लागेल. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

PM Kisan Yojana : आनंदाची बातमी, ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये Read More »

नागरिकांनो सावधान, UPI पेमेंट करताना चुकूनही ‘या’ 3 चुका करू नका, नाहीतर…..

UPI Rules: जर तुम्ही देखील फोन पे, गुगल पे किंवा पेटीएम सारखे UPI आयडी वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास करणार आहे.  हे जाणुन घ्या की, काही दिवसापूर्वी UPI बाबत NCPI ने एक नवा नियम बनवला आहे. यामुळे आता UPI पेमेंट करणाऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त फायदे मिळतील. नवीन नियमानुसार, UPI वापरकर्ते आता हॉस्पिटल आणि शिक्षणासाठी एका दिवसात 5 लाख रुपये देऊ शकतात. याशिवाय, तुम्ही सिंगापूरमधून थेट पेमेंट देखील स्वीकारू शकता.  मात्र या लेखात आम्ही तुम्हाला,  काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत ज्यादा तुम्ही फॉलो करून तुमचा नुकसान टाळू शकतात. चला मग जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर माहिती.  क्रेडीट कार्ड UPI अॅप वापरकर्त्यांना क्रेडिट कार्ड जोडण्याचा पर्याय देखील देते. पण हे करताना तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. बँक खात्यात पैसे नसल्यास वापरकर्ते अॅपमध्ये क्रेडिट कार्ड जोडू शकतात हे विशेषतः पाहिले जाते. यामुळे लोकांना खूप त्रास होऊ शकतो. कारण यामुळे पत शिल्लक बिघडते. वास्तविक, तुम्ही पैशांशिवाय खात्यातून पेमेंट करत राहता, जे चुकीचे असू शकते. कन्व्हेयन्स फी पेटीएम आणि फोन पे संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. यामध्ये अॅप्सद्वारे वाहतूक शुल्क आकारले जाते. जर तुम्ही कोणतेही रिचार्ज केले तर तुम्हाला बँक खात्यातून जास्त पैसे द्यावे लागतील. मात्र, अनेक वेळा कन्व्हेयन्स फीची रक्कम खूपच कमी असल्याने जास्त पैसे भरताना आपण त्याकडे लक्ष देत नाही. म्हणूनच आम्ही लक्ष देत नाही पण यामुळे तुमचे खूप नुकसान होऊ शकते. पेमेंट चार्ज तुम्ही Yipi अॅप्सवर निश्चित रकमेपेक्षा जास्त पैसे भरल्यास, तुम्हाला पेमेंट चार्ज भरावे लागेल. पण जेव्हा तुम्ही कार्डच्या मदतीने पेमेंट करता तेव्हा हे चार्ज आकारले जाते. हे चार्ज तुमच्याकडून फ्रीचार्जद्वारे आकारण्यास सुरुवात केली होती. या शुल्काकडे लोक फारसे लक्ष देत नाहीत. परंतु जर तुम्ही 10,000 रुपयांपेक्षा जास्त पेमेंट केले तर तुम्हाला हे पेमेंट करावे लागेल. त्यामुळे तुम्हालाही याबाबत काळजी घ्यावी लागेल.

नागरिकांनो सावधान, UPI पेमेंट करताना चुकूनही ‘या’ 3 चुका करू नका, नाहीतर….. Read More »

PM Modi: ‘लेक लाडकी योजने’चा शुभारंभ! ‘या’ मुलींना मिळणार 1 लाख रुपये

PM Modi: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला अनेक योजनांची भेट आहे. त्यांनी तब्बल 30,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.  याच बरोबर त्यांनी ‘लेक लाडकी योजने’चा शुभारंभ केला आणि काही लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत पहिला हप्ता दिला. तुमच्या माहितीसाठी जाणुन घ्या,  या योजनेंतर्गत राज्यातील मुलींना 1 लाख 1 हजार रुपये मिळणार आहेत.  एकनाथ शिंदे सरकारने ऑक्टोबर महिन्यात मुलींना मोठी भेट दिली होती. मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. लेक लाडकी योजना मार्च 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर करण्यात आली होती. त्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ‘लेक लाडकी योजने’च्या माध्यमातून  गरीब कुटुंबातील मुलींना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेंतर्गत मुलींना 1 लाख 1 हजार रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. ही आर्थिक मदत मुलीच्या जन्मानंतर ती 18 वर्षांची होईपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांत दिली जाईल. मुलींना सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे. लेख लाडकी योजना विशेषतः राज्यातील पिवळे आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील मुलींसाठी आहे. या योजनेंतर्गत मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये दिले जातील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्य सरकारकडून थेट खात्यात पैसे पाठवले जातील. पैसे कधी मिळणार? लेक लाडकी योजनेंतर्गत  सरकार मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये देणार आहे. त्यानंतर जेव्हा मुलगी पहिली प्रवेश करेल तेव्हा तिला 6000 रुपये मिळतील. तिसरा हप्ता मुलगी सहाव्या इयत्तेत पोहोचल्यावर दिला जाईल. त्यानंतर राज्य सरकारकडून 7000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. तसेच, मुलगी अकरावीत पोहोचल्यावर 8000 रुपयांची मदत दिली जाईल. मुलगी 18 वर्षांची झाल्यावर शेवटचा हप्ता मिळेल. मुलगी पूर्ण झाल्यानंतर तिला महाराष्ट्र सरकारकडून 75000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. योजनेचा लाभ कोणाला मिळणार? 1 एप्रिल 2023 नंतर एका कुटुंबात 1 किंवा 2 मुली किंवा 1 मुलगा आणि 1 मुलगी जन्माला आल्यास त्या मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. जर दुस-या प्रसूतीदरम्यान जुळी मुले जन्माला आली तर एक मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. परंतु ‘लेक लाडकी योजने’चा लाभ घेण्यासाठी आई किंवा वडिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागेल. 1 एप्रिल 2023 पूर्वी मुलगी किंवा मुलगा जन्माला आला असेल आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यासही या योजनेचा लाभ मिळेल. दोन्ही जुळ्या मुलींना स्वतंत्रपणे योजनेचा लाभ दिला जाईल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

PM Modi: ‘लेक लाडकी योजने’चा शुभारंभ! ‘या’ मुलींना मिळणार 1 लाख रुपये Read More »

Aurangabad News : भीषण अपघात! पोहताना 2 भावांसह 4 मुलांचा मृत्यू

Aurangabad News: छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगरातील बनकरवाडी येथे 12 ते 14 वर्षे वयोगटातील चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.  ही दुर्दैवी घटना काल सायंकाळी सातच्या सुमारास घडली. विश्वजितकुमार सुखदेव उपाध्याय (वय-12 वर्षे), अबरार जावेद शेख (वय-12 वर्षे), अफरोज जावेद शेख (वय-14 वर्षे), कुणाल अनिल दळवी (वय-13 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मुले गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी येथील दत्तनगर भागातील रहिवासी आहेत.  दुपारी सर्वजण पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत मुले घरी न परतल्याने त्यांच्या पालकांनी त्यांचा शोध सुरू केला. यावेळी त्यांना मुले पाझर तलावावर गेल्याचे समजले. त्याचे आई-वडील तेथे गेले असता तलावाच्या काठावर कपडे व मोबाईल आढळून आले. मात्र मुले सापडली नाहीत. चारही मुले खोलात गेल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अबरार आणि अफरोज हे सखे भाऊ होते. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अग्निशमन दलाच्या मदतीने चार मुलांचे मृतदेह तलावातून बाहेर काढले. पोलिसांनी मुलांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून घाटी रुग्णालयात नेले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Aurangabad News : भीषण अपघात! पोहताना 2 भावांसह 4 मुलांचा मृत्यू Read More »

सनसनाटी आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतः आत्मपरीक्षण करावे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस शेख आरीफ पटेल यांचे प्रत्युत्तर

Ahmednagar News: ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुरोगामी विचार आणि सर्व समाज घटकांना एकत्रित बांधण्याचे विचार महाराष्ट्राला तसेच देशाला माहिती आहेत.‌ माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी मागील 45 वर्षांपासून याच विचारांशी एकनिष्ठ राहून शरद पवार यांना साथ दिली आहे.   त्यांच्या वाढदिवसानिमित्त नगरमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, वंचित बहुजन आघाडी, रिपाइं अशा सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना समक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरमधील स्थानिक राजकारणाबाबत एक ज्येष्ठ आणि प्रगल्भ विचारांचे नेते म्हणून दादाभाऊ कळमकर यांनी काही भूमिका मांडली.  त्याचा विपर्यास करून कॉंग्रेसच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ज्यांना अजिबात जनाधार नाही अशा पदाधिकाऱ्यांनी कळमकर यांच्या विषयी पूर्णतः चुकीचे आणि हेतूपुरस्सर गैरसमज निर्माण करणारी भूमिका मांडली.  भाजपच्या विचारसरणीशी कळमकर कधीही जुळवून घेणार नाही हे निर्विवाद सत्य आहे. अशा वेळी केवळ सनसनाटी निर्माण करून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याच्या हेतूने कळमकर यांच्या विषयी चुकीचे पत्रक काढण्यात आहे. त्यांच्या भूमिकेवर कोणीही विश्वास ठेवणार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शेख आरीफ पटेल यांनी व्यक्त केले आहे. शेख आरीफ पटेल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,  महाराष्ट्राच्या राजकारणाला यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्या सारख्या दिग्गज नेत्यांमुळे प्रगल्भता आलेली आहे. त्यामुळे राजकीय अथवा वैचारिक विरोधक असला तरी वैयक्तिक पातळीवर एकमेकांशी संवाद, सलोखा कायम राखला जातो. हीच परंपरा आदरणीय दादाभाऊ कळमकर यांनी कायम जतन केली आहे. भाजप काय किंवा कोणत्याही विरोधी पक्षाचे नेते, पदाधिकारी असो दादांनी नेहमीच वैयक्तिक स्तरावर चांगले संबंध ठेवले आहेत व अभिषेक कळमकर सुध्दा तेच तत्व पाळत आहे. दादांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अभिष्टचिंतन केले. त्यावेळी त्यांनी स्थानिक परिस्थितीनुसार काही भूमिका मांडली. त्याचा विपर्यास करण्याचं काहीच कारण नाही. परंतु सध्या सनसनाटी वक्तव्य करीत काही जण माध्यमातून हेडलाईन मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. यातून त्यांच्या अर्धवट अभ्यासाची आणि बालिश बुद्वीची प्रचिती येते. आरोप करताना त्यांनी आपल्या राजकीय कोलांट्या उड्यांचा इतिहास तरी आठवायचा. दादाभाऊ कळमकर यांच्या राजकीय, सामाजिक कार्यकीर्दीचि इतिहास पाहिला तर ते कदापिही चुकीच्या विचारसरणीशी तडजोड करणार नाही, हे सर्व समाज घटकांना चांगले माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीत गैरसमज निर्माण करून स्वतः चमकोगिरी करणारांनी आधी आरशात पाहून स्वतःच्या निष्ठा कुठं कुठं वाहिल्या हे पाहावे अशी टीका शेख आरीफ पटेल यांनी केली आहे.

सनसनाटी आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतः आत्मपरीक्षण करावे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस शेख आरीफ पटेल यांचे प्रत्युत्तर Read More »

Ahmednagar News: अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची चौकशी करा – AIMIM  जिल्हाध्यक्ष

Ahmednagar News: अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी कर्तव्यात कसूर केले असल्याने यांची चौकशी करून त्यांना निलंबित करा अशी मागणी डॉ परवेज अशरफी,एम आय एम जिल्हाध्यक्ष ,अहमदनगर यांनी पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे केली आहे.   त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्हा गुन्हेगारी आणि जाती दंगलीचा अड्डा झाले असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. जेव्हा पासून अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक या पदावर राकेश ओला साहेब यांची नियुक्ती झाली आहे तेव्हा पासून अहमदनगरमध्ये एक दिवस असे गेले नाही त्या दिवशी काही गंभीर गुन्हा झाले नाही.  पोलिस अधीक्षक राकेश ओला साहेब हे आल्यापासून जिल्ह्यात जातीय दंगली, दोन समाजात तेढ निर्माण होऊन दंगली, छोट्याशा कारणाने जातीय दंगली, काही कारण नसतांना मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर हल्ले, मुस्लिम अल्पसंख्यांक समजाच्या धार्मिक स्थळांवर हल्ले, धार्मिक ग्रंथाची विटंबना, मुस्लिम महिलांना खोट्या गुन्ह्यात फसवणे, असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे रोज जिल्ह्यात सरास घडत आहे. चोरी, डकैती, महीलाची छेडछाड, छोटे मोठे गुन्हे हे तर  किरकोळ सारख्या होत आहे. जेव्हा पासून राकेश ओला साहेब अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक पदावर विराजमान झाले तेव्हांपासून अहमदनगर येथील काही जातीवादी आतंकी संघटनेला तसेच सरकारच्या जवळीक संघटनेला कायद्या हातात घेण्याचे  जणूकाही प्रमाण पत्र भेटले.  शेवगाव, राहुरी उंब्रा, राहुरी गुहा, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, अकोला, कर्जत, अहमदनगर शहर या सर्व ठिकाणी मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर अत्याचार करण्यात आले.  एकीकडे जातीवादी आतंकी संघटनेने मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर हल्ले करत आहे आणि दुसरी कडे पोलिस प्रशासनाने ज्या प्रकारे मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर गुन्हे दाखल केले जसे सर्व काही पूर्ण नियोजित कट रचण्यात आले आहे. दोन समाजात दंगली झाल्यावर एका समाजावर असे गुन्हे दाखल करायचे की त्यांची ताबडतोब जमीन होईल किंवा न्यायालयात दुसऱ्या दिवशी जामीन होईल आणि त्याच गुन्ह्यात मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर असे गंभीर गुन्हे दाखल करायचे की त्यांची  महिनो जामीन होणार नाही.  आपण अहमदनगर मध्ये झालेल्या सर्व घटनेची चौकशी केली तर आपल्या स्पष्ट दिसेल की पोलिस अधीक्षक साहेब यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग कसे केले आणि आपल्या सोबत पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना कसे चुकीच्या काम करण्याचे आदेश दिले.  अहमदनगर येथील कसूर केलेल्या पोलिस अधिकाऱ्याची चौकशी करण्यात आली असेल तर त्यांनी कितीही गंभीर गुन्हा केले असो, त्यांनी केलेला काम मुस्लिम अल्पसंख्यांक विरोधात केले असेल तर ते कसुरवार नाही किंवा समज देऊन सोडण्यात येते.  याचा उत्तम उदाहरण म्हणजे मागील वर्षी कोटला घास गल्ली येथे दोन समाजात झालेल्या दंगली आणि त्यात त्या वेळची तोफखाना पोलिस निरीक्षक मॅडम यांनी केलेले कार्य हा मुस्लिम अल्पसंख्यांक विरोधी होती.  शेवगाव येथे दर्ग्याचे उर्स दरम्यान कोणताही कारण नसतांना शेवगाव पोलिस निरीक्षक यांनी केलेला लाठीचार्ज. संगमनेर येथे एका जातीवादी संघटनेचा पदाधिकारी आणि एका वृत्तवाहिनीचे संपादक यांनी केलेल्या चीतावनीखोर भाषणं नंतर अकोले येथे झालेल्या एका मुस्लिम अल्पसंख्यांक सामजाच्या तरुणाची हत्या आणि आणि पोलिसांचा मुख्य आरोपी वाचवण्याचा प्रयत्न, राहुरी उंब्रे येथे मुस्लिम धार्मिक स्थळांवर जातीवादी आतंकी संघटनेने हल्ला केल्याने त्या जातीवादी आतंकी संघटनेच्या लोकांना वाचवण्यासाठी फिर्यादीवर दबाव तयार करण्याचा काम पोलिस निरीक्षक यांनी केल्याचे चित्र व त्यांनतर मुस्लिम महीलावर खोटे गुन्हे दाखल करणे.   तसेच राहुरी गुहा गावात काही जातीवादी आतंकी संघटनेच्या लोकांनी मुस्लिम दर्ग्यावर कब्जा करण्याच्या हेतूने बनावट कागदपत्रे तयार करून धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंद केले परंतु सदर दर्गा वक्फ येथे नोंद आहे. तरी देखील पोलिस प्रशासन या जातीवादी संघटनेला पाटबल देत असल्याचे चित्र आहे. गुहा येथील या जातीवादी आतंकी संघटनेच्या लोकांची मजल इतकी झाली की त्यांनी पोलिस अधिकारी, तलाठी,  तहसीलदार यांना हाताशी धरून दर्ग्यामध्ये अनधिकृत मूर्ती बसवली. विशेष म्हणजे या जागेवर कोणतीही धार्मिक विधी करण्याचा न्यायालयाचा मनाई हुकूम असताना पोलिसांच्या मदतीने हा सर्व प्रकार घडला याची कल्पना तातडीने पोलिस अधीक्षक साहेब राकेश ओला यांना दिली तर त्यांनी नेहमी प्रमाणे काहीच केले नाही.  या सर्व बाबी वरून असे दिसते की अहमदनगर पोलिस अधीक्षक साहेब हे  अकार्यक्षम अधिकारी आहे किंवा हे सर्व काही ते अहमदनगरचे पालक मंत्री यांचे आदेशाने करत आहे किंवा पोलिस अधीक्षक राकेश ओला साहेब हे स्वतः या जातीवादी आतंकी संघटनेचे कार्यकर्ते आहे जे पोलिस खात्यात राहून या जातीवादी आतंकी संघटनेला मदत करत आहे. या सर्व बाबींचा आपण घांभिर्यापूर्वक चौकशी करून अहमदनगर पोलिस अधीक्षक राजेश ओला यांच्यावर आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने कारवाई करावी.

Ahmednagar News: अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची चौकशी करा – AIMIM  जिल्हाध्यक्ष Read More »

Mudassar Sheikh : …अन्यथा अंदोलन करण्यात येईल! ‘त्या’ प्रकरणात माजी नगरसेवक मुदस्सर शेख आक्रमक

 Mudassar Sheikh : मुदस्सर शेख माजी नगरसेवक महानगरपालिका अहमदनगर यांनी अहमदनगर जिल्हा अधिकारी निवेदन देऊन ऑनलाइन शिधापत्रिका प्रणाली व्यवस्थित करुन नागरिकांना लाभ मिळून देण्याची मागणी केली आहे.   अहमदनगर अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या गलथ्य कारभारामुळे प्रात्र कुटुंबांना रेशन (धान्य) व आयुष्यमान भारत योजने पासुन वंचित रहावे लागत आहे यामुळे ऑनलाइन शिधापत्रिका प्रणाली व्यवस्थित करुन नागरिकांना लाभ मिळुन द्यावा नाहीतर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.   त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 16 मे 2023 रोजी सामान्य प्रशासन शासन निर्णय अन्वये, ई शिधापत्रिका सुविधा विनामुल्य उपलब्ध करुन देण्याकरीता RCMSmahafood हि प्रणाली उपलब्ध करुन देण्यात आली होती मात्र अन्न धान्य वितरण कार्यालय येथे सदर शासन निर्णयाची अमलबजावणी होत नाही.   जे नागरीक अंत्योदय योजना (AYY), प्राधान्य कुटुंब योजनेचे (PHH) लाभार्थी आहे अश्या नागरीकांचे Public Login वरुन ऑनलाईन प्रकरण सादर करण्यास नागरीकांना शासनाने मुभा करुण दिलेली आहे. तरीही जिल्हा पुरवठा अधिकारी अहमदनगर यांनी सहाय्यक पुरवठा अधिकारी कार्यालय येथे DEO Officer प्रत्येकी 3 अधिकारी, Supply Inspector 3 अधिकारी व TFSO 1 अधिकारी दिलेला असुन सदर कार्यालयत वरिल अधिकारी ऑनलाईन शिधापत्रिकाची नोंदणी करत नाही व रास्त भाव दुकानदार किंवा सेतु कार्यालय येथे पाठतात.  यामुळे नागरिकांची खुप पळापळ होत आहे. जे नागरिक प्राधान्य कुटुंब यांजनाचे लाभार्थी साठी कागदपत्राची पुरतता करतील तर त्यांना PHH योजनेचा लाभ द्यावा कारण PHH योजनेचे शिधापत्रिकाचे नाव हे आयुष्यमान भारत योजने मध्ये येत आहे. यामुळे सदर प्रणाली व्यवस्तीत चालवण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा अंदोलन करण्यात येईल.

Mudassar Sheikh : …अन्यथा अंदोलन करण्यात येईल! ‘त्या’ प्रकरणात माजी नगरसेवक मुदस्सर शेख आक्रमक Read More »

Earthquake News : पाकिस्तानसह देशातील ‘या’ भागात भूकंपाचे धक्के

Earthquake News : देशाची राजधानी दिल्ली आणि परिसरात पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसल्याने एकच खळबळ उडाली आहे.   दिल्लीशिवाय नोएडा आणि आसपासच्या काही जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.1 एवढी होती आणि त्याचे केंद्र अफगाणिस्तानच्या हिंदुकुश भागात असल्याचे प्राथमिकरित्या सांगण्यात येत आहे. भारताव्यतिरिक्त पाकिस्तानच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पाकिस्तानी मीडियानुसार, लाहोर, इस्लामाबाद आणि खैबर पख्तुनख्वा शहरातही भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटर ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 एवढी होती. हा भूकंप दुपारी 2:50 वाजता झाला आणि भूकंपाचे केंद्र जमिनीपासून 220 किलोमीटर खाली होते. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानजवळ होता. पाकिस्तानी मीडियानुसार, लाहोर, इस्लामाबाद आणि खैबर पख्तुनख्वा शहरातही भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटर ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 एवढी होती. हा भूकंप दुपारी 2:50 वाजता झाला आणि भूकंपाचे केंद्र जमिनीपासून 220 किलोमीटर खाली होते. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानजवळ होता.  पाकिस्तानातही भूकंप झाला पाकिस्तानच्या हवामान खात्याने (पीएमडी) सांगितले की, दुपारी 2:20 वाजता (स्थानिक वेळेनुसार) झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंदुकुश प्रदेशात 213 किलोमीटर खोलीवर होता.  ‘डॉनन्यूज’ टीव्ही चॅनलनुसार, इस्लामाबाद, लाहोर आणि त्याच्या आसपासच्या भागात आणि खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. पंजाबमधील सरगोधा, खुशाब, मंडी बहाउद्दीन, भाकर आणि नौशेरा येथेही भूकंपाचे धक्के जाणवले.

Earthquake News : पाकिस्तानसह देशातील ‘या’ भागात भूकंपाचे धक्के Read More »

Gondia News : मोठी बातमी! शहरात माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर गोळीबार

Gondia News : गोंदियात माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे.  गोळीबारात लोकेश यादव हे गंभीर जखमी असून त्यांना तातडीने नागपूरला हलवण्यात आलं आहे. ही घटना आज गुरुवारी सकाळी 11 वाजे सुमारास घडली. गोळीबाराच्या या घटनेनंतर गोंदिया शहरात खळबळ उडाली.  दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व सर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी व पोलीस दल घटनास्थळी पोहोचवून आरोपीच्या शोध घेण्यास सुरुवात केली आहे तर विविध मार्गाने पोलीस टीमला आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहे . पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे की नागरिकांनी कोणत्याही अफेला बळी पडू नये.

Gondia News : मोठी बातमी! शहरात माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर गोळीबार Read More »

Ahmednagar News: राधाकृष्ण विखे पाटील ॲक्शन मोडमध्ये; विद्यार्थ्याची मागणी काही तासात पूर्ण!

Ahmednagar News: महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या मागणीची दखल घेवून देहरे येथे महामंडळाच्या बस  थांबविण्यासाठी परीवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याच्या सूचना महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांंनी दिल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. महायुतीच्या बैठकीसाठी नगरकडे जाताना देहेरे येथे विद्यार्थ्यांनी रास्तारोको केला असल्याची बाब मंत्री विखे पाटील यांच्या निदर्शनास आली. मंत्री विखे पाटील यांनी गाडीतून  उतरून थेट विद्यार्थ्यांच्या आंदोलनात जावून उभे राहात त्यांचा प्रश्न समाजावून घेतला. देहरे येथून नगर येथील विविध महाविद्यालयात जाणारी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.परंतू नगरकडे जाणारी एकही बस देहरे येथे थांबवली जात नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. विद्यार्थ्यांच्या समस्येच गांभार्य लक्षात घेवून विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांना शहरातील बंधन लाॅन्समध्ये येण्यास सांगितले. युतीचा मेळावा संपताच त्यांनी विद्यार्थी आणि महामंडळाच्या अधिकार्यांशी चर्चा घडवून आणली.विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे नगरकडे जाणाऱ्या बसपैकी सात बस उद्यापासून थाबतील आशा पध्दतीची कार्यवाही उद्या पासून सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच काही अडचण आल्यास माझ्याशी थेट संपर्क करा असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. सकाळी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्याची मागणी काही तासात पूर्ण झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Ahmednagar News: राधाकृष्ण विखे पाटील ॲक्शन मोडमध्ये; विद्यार्थ्याची मागणी काही तासात पूर्ण! Read More »