DNA मराठी

ताज्या बातम्या

Rahul Gandhi: राहुल गांधी आजपासून मिशन महाराष्ट्रावर, करणार मोठी घोषणा?

Rahul Gandhi:  लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आजपासून मिशन महाराष्ट्रावर आहे. येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यापूर्वी राहुल गांधी यांचा महाराष्ट्र दौरा खूप महत्त्वाचा मानला जात आहे. राहुल गांधी 4 आणि 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये असणार आहे.  ते कोल्हापुरातून निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते आज सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. यानंतर 5 ऑक्टोबर रोजी राहुल संविधान वाचवा परिषदेत सहभागी होणार आहेत. कोल्हापुरातून निवडणूक प्रचाराला सुरुवात करण्यामागे एक ऐतिहासिक कारण आहे. खालच्या जातींना 50 टक्के आरक्षण देण्याचे पहिले काम शाहूजी महाराजांनी 1902 साली कोल्हापुरात केले. आरक्षण देणाऱ्या भूमीवरून राहुल गांधी आपल्या प्रचाराची सुरुवात करत आहेत, त्यामुळे मोठा राजकीय संदेश जाईल, असे म्हणता येईल. घोषणा होण्यापूर्वीच तिकीट मागणाऱ्यांचा महापूर काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच काँग्रेसकडे तिकिटांसाठी हजारो अर्ज येत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे राज्यभरातून 1830 हून अधिक अर्ज आले आहेत. सर्वाधिक तिकीट अर्ज विदर्भ आणि मराठवाड्यातून प्राप्त होत आहेत. या भागात दलित, मुस्लिम आणि मराठा काँग्रेस आणि आघाडीला पाठिंबा देत आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस 288 पैकी 100 ते 110 जागांवर निवडणूक लढवू शकते. अर्जाचा आकडा हरियाणापेक्षा जास्त अर्जांचा हा आकडा हरियाणाच्या तुलनेत खूपच जास्त आहे. हरियाणाच्या विधानसभेच्या 19 जागांसाठी सुमारे अडीच हजार अर्ज आले होते. तर महाराष्ट्रात हा आकडा घोषणेपूर्वीच 2000 च्या आसपास पोहोचला आहे. महाराष्ट्रात तिकिटासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीलाही नोंदणी शुल्क भरावे लागते. SC/ST उमेदवारांना 10,000 रुपये आणि सामान्य उमेदवारांना 20,000 रुपये भरावे लागतील. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसची कामगिरी चांगली होती. काँग्रेसने 13 जागा जिंकल्या. तर 65 टक्के विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आघाडीवर होती. लोकसभा निवडणुकीची आकडेवारी आणि अर्जदारांची वाढलेली संख्या पाहता महाराष्ट्रात काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्याचवेळी हरियाणातील प्रचार संपताच राहुल गांधींची महाराष्ट्रात सक्रियता काँग्रेसला येथेही विजयाचा वास येऊ लागल्याचा स्पष्ट संदेश आहे.

Rahul Gandhi: राहुल गांधी आजपासून मिशन महाराष्ट्रावर, करणार मोठी घोषणा? Read More »

Mukesh Ambani : मुकेश अंबानींचे एका दिवसात बुडाले 77,606 कोटी रुपये, ‘हे’ आहे कारण

 Mukesh Ambani : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना मोठा धक्का बसला आहे. मुकेश अंबानी यांना अवघ्या एका दिवसात तब्बल 77,606 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेअर बाजारात होणाऱ्या चढउतारामुळे मुकेश अंबानी धक्का लागला आहे.  रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअर्समध्ये 4% ची घसरण नोंदवण्यात आली आहे. यामुळे मुकेश अंबानी यांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.   गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीज अनेक क्षेत्रात आपला व्यवसाय करते. तेल, नैसर्गिक वायू, एफएमसीजीसह रिलायन्सच्या अनेक शेअर्समध्ये घसरण झाली आहे. मुकेश अंबानींना एकाच दिवसात अनेक क्षेत्रातील समभाग घसरल्याने 77,606 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या (3 ऑक्टोबर) रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य 19,04,762.79 रुपये झाले आहे. मुकेश अंबानींचे नुकसान का? या तोट्याचे मुख्य कारण म्हणजे मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रमुख शेअर्समध्ये 4% घसरण. मध्यपूर्वेतील देशांमध्ये सुरू असलेले युद्ध हे त्याचे प्रमुख कारण आहे. इस्रायल, लेबनॉन आणि इराणसह आसपासच्या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम गॅस आणि तेल बाजारावर झाला आहे. याचा परिणाम रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स ऑईल आणि नैसर्गिक वायूवरही झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअर्समध्ये घसरण सुरू आहे. बीएसई सेन्सेक्समध्ये 2.10% घसरण नोंदवली गेली तर रिलायन्सच्या शेअर्समध्ये 7.76% ची घसरण नोंदवली गेली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये घसरण होऊनही मुकेश अंबानींच्या वैयक्तिक संपत्तीत कोणताही बदल झालेला नाही. सध्या मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 93,0836 कोटी रुपये आहे. यासह, मुकेश अजूनही भारतासह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. हमास, इराण, लेबनॉनसह अनेक देशांनी इस्रायलवर हल्ले केले आहेत. याचा तेल बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. युद्ध असेच सुरू राहिल्यास भारतासह अनेक देशांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याचा पहिला परिणाम शेअर बाजारातील घसरणीच्या रूपाने दिसून आला.

Mukesh Ambani : मुकेश अंबानींचे एका दिवसात बुडाले 77,606 कोटी रुपये, ‘हे’ आहे कारण Read More »

Ahmednagar News: सीना नदी, भिंगार नाल्याचे भाग्य उजाळणार, खोलीकरण व रुंदीकरणासाठी 20 कोटी मंजूर

Ahmednagar News: जास्त पाऊस पडला की पूर येऊन नगर शहरातील नदीच्या आजूबाजूच्या सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरणे हे दरवषच्या पावसाळ्यात नियम झालेल्या सीना नदीला आता पाणी पोटात साठवून ठेवण्याचे भाग्य लाभणार आहे. तसेच भिंगार नाल्याचाही चेहरा उजाळणार आहे.  सीना नदीच्या पूररेषेची फेरआखणी करण्याची आमदार संग्राम जगताप यांची मागणी रुंदीकरण व खोलीकरण केल्याशिवाय करता येत नव्हती. तेव्हा आमदार जगताप यांनी त्यासाठी लागणाऱ्या निधीकरिता पाठपुरावा केला व त्या पाठपुराव्याला यश येऊन राज्या शासनाच्या 15 व्या वित्त आयोगातून आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन योजनेअंतर्गत 20 कोटी 66 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसे पत्र अहमदनगर महापालिकेला ऐन नवरात्रीच्या प्रारंभीच प्राप्त झाले आहे. नगर शहराच्या सीमेला लागून सीना नदी वाहते. नगर शहराभोवती तिची लांबी सुमारे 14 किलोमीटर आहे. परंतु सीना नदीच्या काठाने मानवी वस्त्या वाढत गेल्या तसेच नदीकाठच्या जमीनधारकांनी अतिक्रमणही केले आणि नदीचे पात्र आकसत गेले. त्यातून नदीला एखाद्या ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले. सीना नदीला पूर येणे हे तशी औत्सुक्याची बाब. एक तर नगर जिल्ह्यात एखाद्या वषच पावसाची कृपा असते. नेहमी अवर्षणच असते. कधी तरी सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडला की सीना नदीला पूर येतो.  पाऊस जास्त झाला की आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरते व तेथील रहिवाशांची त्रेधातिरपीट उडते. यंदाच्या पावसाळ्यातही तशी परिस्थिती उद्भवली होती. वारंवार होणारी ही स्थिती व नागरिकांचे हाल टाळण्यासाठी सीना नदीची पूररेषा आखून नियोजन करणे आवश्यक होते. त्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी नगर महापालिका व जिल्हाधिकारी यांच्यासह 2023 मध्ये संयुक्त बैठक घेतली होती. त्या बैठकीत सांगोपांग चर्चाही झाली.  आमदार जगताप यांनी महसूल व वनविभागाच्या अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडे याबाब कैफीयत मांडली. या विभागाने राज्याच्या जलसंपदा विभागाकडे याबाबत मत मागविले होते. जलसंपदा विभागाने पूररेषेची फेरआखणी करण्यासाठी काय करावे लागणार याबाबत सूचना केल्या. सीना नदीचे रुंदीकरण व खोलीकरण अगोदर करायला हवे तरच पूररेषेची आखणी करता येईल असे या विभागाने सांगितले. या नदीवर शहर व शहराजवळ असलेल्या पुलांच्या लांबीरुंदीचे गणितही पाहणे गरजेचे आहे. सीना नदीची मूळ वहनक्षमता पुनर्स्थापित करावयाची असल्यास नदीपात्रात साचलेला गाळ काढणे, अतिक्रमण काढणे, गरजेचे आहे. काढलेला गाळ नदीकिनारी टाकून नगर शहराचे सुशोभिकरण करता येईल असे महापालिकेने म्हटले होते. त्यावरून किनारी रस्ता (कोस्टल रोड) तयार करता येऊ शकतो. त्यातून नदीचे मूळ पात्र पुनर्स्थापित होऊन त्या पात्रात पाऊस व अन्य पाण्याचा विसर्ग किती बसू शकतो ही लक्षात येईल. त्यासाठी महापालिकेच्या हद्दीतील 10 किलोमीटर लांब नदीचे खोलीकरण व रुंदीकरण होणे अत्यंत गरजेचे असल्याचे महापालिकेने म्हटले होते.  तशी शहराभोवतालची नदीची लांबी 14 किलोमीटर आहे. या भागात तिची प्रस्तावित रुंदी 20 ते 30 मीटर व प्रस्तावित खोली चार मीटर आहे. पूव 09.70 किलोमीटर लांबीचे काम झाले असले तरी उर्वरीत पुरे करावयाचे आहे. नदीचे रुंदीकरण व खोलीकरणासंदर्भात प्रकल्प मूल्यमापन समिती, राज्य कार्यकारी समिती, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, तांत्रिक मूल्यमापन समिती यांच्या बैठका झाल्या. दिल्लीतील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना आदींचा विचार करून 15व्या वित्त आयोगामार्फ आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन योजनेअंतर्गत सीना नदीचे खोलीकरण व रुंदीकरण तसेच भिंगार नाल्याचेही खोलीकरण व रुंदीकरण या कामांसाठी 20 कोटी 66 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आमदार संग्राम जगताप यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून सीना नदी व भिंगार नाल्याचे भाग्य त्यामुळे उजाळणार आहे. नगरमध्ये विकास कामांचा महासंग्राम कोरोना काळात नगर शहरातील विकास कामे काही प्रमाणात थांबली होती. परंतु, त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नगर शहरात विविध कामांसाठी भरीव निधी आणला. या निधीतून वाडिया पार्क, शहरातील अंतर्गत रस्ते, उपनगरातील रस्त्यांची कामे सुरु झाली आहेत. उद्यानांसाठी सहा कोटींचा निधी मिळाल्यामुुळे शहराच्या विकासात मोठी भर पडणार आहे. तसेच सीना नदी, भिंगारनाला सुशोभिकरणासाठी 20 कोटींचा निधी मिळाल्याने नगर शहराचे रुपडे बदलणार असल्याचे दिसून येत आहे. सीना नदी अतिक्रमणमुक्त होणार सीना नदी पात्रातील अतिक्रमण व गाळामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी नागरी वसाहतींमध्ये शिरते. यंदाही पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरलेे. पुराच्या पाण्याची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणीही केली होती. पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याची आ. जगताप यांनी गांभीर्याने दखल घेत सीना नदी सुशोभिकरण व अतिक्रमण मुक्त, रुंदीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मदत पुर्नवसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. याबाबत आ. जगताप तीन वर्षांपासून प्रयत्नशील होते. सीना नदीतील गाळ व अतिक्रमणे काढल्यास पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरणार नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पूर नियंत्रण निळ्या व लाल रेषेचा विषय मार्गी नागपूर, बोल्हेगाव, सावेडी, बालिकाश्रम रोड, नालेगाव, ठागणे मळा, काटवण खंडोबा रोड, स्टेशन भाग, पुणे महामार्ग, फुलसौंदर मळा, बाबर मळा या भागात पूर नियंत्रण रेषेचा विषय माग लागत नव्हता. परंतु, आमदार संग्राम जगताप यांच्या अथक प्रयत्नानंतर सीना नदी लगत असलेल्या पूर नियंत्रण निळ्या व लाल रेषेचा विषय माग लागला आहे. त्यामुळे जागा मालकांना आता जागा डेव्हलप करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Ahmednagar News: सीना नदी, भिंगार नाल्याचे भाग्य उजाळणार, खोलीकरण व रुंदीकरणासाठी 20 कोटी मंजूर Read More »

LPG Gas Price Hike: ग्राहकांना धक्का, व्यावसायिक LPG सिलेंडर 48.50 रुपयांनी महाग, जाणून घ्या नवीन दर

LPG Gas Price Hike: ऑक्टोबर 2024 ची आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र या महिन्याच्या पहिल्याच दिवशी लोकांना महागाईचा मोठा धक्का बसला आहे. होय, आजपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये झाली आहे. 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 48.50 रुपयांनी महागला आहे. त्यामुळे आता दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1691.50 रुपयांवरून 1740 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचली आहे. नवरात्री, दसरा, दिवाळी या सणांच्या आधी महागडे सिलिंडर लोकांना त्रास देणार आहेत. IOCL वेबसाइटनुसार, हे दर आज 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू झाले आहेत. तेल कंपन्यांनी 14 किलोग्रॅमच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. ऑक्टोबर 2024 पासून गॅस सिलिंडरच्या नवीन किमती तेल विपणन कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 48.50 रुपयांनी वाढ केली आहे. दिल्लीत सिलेंडरची किंमत 1740 रुपये झाली आहे, जी आधी 1691 रुपये होती. कोलकातामध्ये, सिलिंडर 1850.50 रुपयांना मिळेल, जो पूर्वी 1802 रुपयांना मिळत होता. मुंबईत हा सिलेंडर 1692.50 रुपयांना मिळेल, जो पूर्वी 1644 रुपयांना मिळत होता. चेन्नईमध्ये सिलिंडर 1903 रुपयांना मिळेल जे आधी 1855 रुपये होते. जुलै महिन्यापासून 19 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमती सातत्याने वाढ गेल्या जुलै 2024 पासून 19 किलो LPG सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. 1 जुलै 2024 रोजी दिल्लीत या सिलिंडरची किंमत 30 रुपयांनी कमी झाली. पण ऑगस्ट 2024 मध्ये 19 किलोग्रॅमचा गॅस सिलिंडर 8.50 रुपयांनी महागला. सप्टेंबर महिन्यात दिल्लीत त्याची किंमत थेट 39 रुपयांनी वाढली होती.

LPG Gas Price Hike: ग्राहकांना धक्का, व्यावसायिक LPG सिलेंडर 48.50 रुपयांनी महाग, जाणून घ्या नवीन दर Read More »

Govinda Health Update: मोठी बातमी, अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात दाखल

Govind Helath Update: एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदा याच्या पायाला बंदुकीची गोळी असल्याची माहिती समोर आली आहे.  माहितीनुसार, स्वतःकडील बंदूक साफ करत असताना अनावधानाने स्ट्रीगर दाबले गेल्याने बंदुकीतून गोळी सुटली आणि गोविंदा याच्या पायाला लागली.  यानंतर जखमी झालेल्या गोविंदाला जवळच्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गोविंदाच्या पायावर शस्त्रक्रिया झाली असून तो आता सुखरूप असल्याची देखील माहिती समोर आली आहे.  तर दुसरीकडे याप्रकरणी जुहू पोलीसने पुढील तपास सुरू केला आहे.

Govinda Health Update: मोठी बातमी, अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात दाखल Read More »

Gondia News :  हजारो आदिवासी बांधव उतरले रस्त्यावर, सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा केला विरोध

Gondia News :  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला असून धनगरांना अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याला आदिवासींनी विरोध दर्शवला आहे.  त्यातच सोमवार 30 सप्टेंबर रोजी आदिवासी बहुल गोंदिया जिल्ह्यात हजारो आदिवासी बांधवांनी रस्त्यावर उतरत विशाल आक्रोश मोर्चा काढून विरोध दर्शवला. तर आदिवासी समाजाच्या आरक्षणात घुसखोरी खपवून घेतली जाणारा नाही असा इशारा शासनाला दिला. त्यामुळे राज्य शासनापुढे आता मोठे पेच निर्माण झाले आहे. सकल धनगर समाजाने एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी एक समिती नेमण्याची घोषणा केली होती. तसेच धनगड व धनगर हा शब्द एकच असल्याचा जीआर काढण्याचीही तयारी दर्शवली होती. पण त्यांच्या या घोषणेला आदिवासी आमदारांकडून कडाडून विरोध केला जात आहे. त्यातच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी देखील धनगरांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण दिल्यास आपण मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा देणार, असा इशारा दिला आहे.  असे असतानाच आता आदिवासी समाजकडूनही सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला जात आहे.  या अनुषंगाने सोमवारी गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी आदिवासी हक्क कृती समितीच्या माध्यमातून शासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल आक्रोश मोर्चा काढत विरोध दर्शवला. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयापुढे मोर्चाचे सभेत रुपांतर करण्यात आले. यावेळी आदिवासी हक्क कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सभेला मार्गदर्शन केल्यानंतर जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

Gondia News :  हजारो आदिवासी बांधव उतरले रस्त्यावर, सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा केला विरोध Read More »

Post Office Scheme: सर्वात भारी योजना, मिळणार 2 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न, फक्त करा ‘हे’ काम

Post Office Scheme:  जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट या योजनेत गुंतवणूक करु शकतात.  किती व्याज मिळत आहे  पोस्ट ऑफिस योजना सर्व श्रेणीतील लोकांसाठी चालवली जात आहे. या योजनेबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये गुंतवणूकदारांना जोरदार परतावा मिळत आहे. यासोबतच कर सवलतीही मिळतात. ही योजना खूप लोकप्रिय आहे. या योजनेत 5 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. व्याजाबद्दल बोलायचे झाले तर गुंतवणूकदारांना 7.5 टक्के दराने व्याज मिळत आहे. त्यानंतर तुम्हाला रिटर्नही मिळू शकतात. कोणत्या कालावधीसाठी किती व्याज मिळते? पोस्ट ऑफिसच्या या योजनेत वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळे व्याज मिळते. यामध्ये 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. 1 वर्षासाठी गुंतवणूक केल्यास 6.9 टक्के व्याज मिळते. त्याचबरोबर 2 ते 3 वर्षांच्या गुंतवणुकीवर 7 टक्के व्याज दिले जात आहे. 5 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास 7.5 टक्के व्याज मिळत आहे. व्याजातून तुम्हाला लाखो रुपये मिळतील जर तुम्ही पोस्ट ऑफिस टीडी स्कीममधील व्याजाबद्दल बोललो तर, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये गुंतवले असतील. त्यामुळे त्या गुंतवणुकीवर 7.5 टक्के व्याज मिळते. त्यानंतर केवळ 2 लाख 24 हजार 974 रुपयेच व्याजातून मिळतील. मुदतपूर्तीनंतर ही रक्कम 7 लाख 24 हजार 974 रुपये होईल. किती व्याज मिळत आहे ते जाणून घ्या पोस्ट ऑफिस योजना सर्व श्रेणीतील लोकांसाठी चालवली जात आहे. या योजनेबद्दल बोलायचे झाले तर गुंतवणूकदारांना यामध्ये जोरदार परतावा मिळत आहे. यासोबतच कर सवलतीही मिळतात. ही योजना खूप लोकप्रिय आहे. या योजनेत 5 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. व्याजाबद्दल बोलायचे तर गुंतवणूकदारांना 7.5 टक्के दराने व्याज मिळत आहे. त्यानंतर तुम्हाला रिटर्नही मिळू शकतात. कोणत्या कालावधीसाठी किती व्याज मिळते? पोस्ट ऑफिसच्या या योजनेत वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळे व्याज मिळते. यामध्ये 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. 1 वर्षासाठी गुंतवणूक केल्यास 6.9 टक्के व्याज मिळते. त्याचबरोबर 2 ते 3 वर्षांच्या गुंतवणुकीवर 7 टक्के व्याज दिले जात आहे. 5 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास 7.5 टक्के व्याज मिळत आहे. व्याजातून तुम्हाला लाखो रुपये मिळतील जर तुम्ही पोस्ट ऑफिस टीडी स्कीममधील व्याजाबद्दल बोललो तर, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये गुंतवले असतील. त्यामुळे त्या गुंतवणुकीवर 7.5 टक्के व्याज मिळते. त्यानंतर केवळ 2 लाख 24 हजार 974 रुपयेच व्याजातून मिळतील. मुदतपूर्तीनंतर ही रक्कम 7 लाख 24 हजार 974 रुपये होईल.

Post Office Scheme: सर्वात भारी योजना, मिळणार 2 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न, फक्त करा ‘हे’ काम Read More »

Maharashtra Election : परवेज अशरफी निवडणुकीच्या रिंगणात, पक्षाकडे उमेदवारीची मागणी

Maharashtra Election :  राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी तसेच पक्षांनी देखील जोरदार तयारी सुरू केली आहे.   तर दुसरीकडे एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी इच्छुक उमेदवार यांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून अर्ज भरण्यासाठी औरंगाबाद येथे इच्छुक उमेदवारांची गर्दी होत आहे.  अहमदनगर जिल्ह्यातून ही इच्छुक उमेदवारांनी आपले नामांकन पक्षाकडे सादर केले. त्यात अहमदनगर शहरातून एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल केला आहे. तसेच नेवासा आणि राहुरी विधानसभा येथून ही पक्षाकडे अर्ज दाखल करण्यात आले आहे. परवेज अशरफी यांनी लोकसभेसाठी देखील अहमदनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र पक्षाने दिलेल्या आदेशानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. नुकतेच पैगंबर साहेब यांच्याविरोधात अपशब्द वापरणारे आणि भाजप नितेश राणे यांच्यावर कारवाईची मागणी साठी औरंगाबाद येथून मुंबई रॅली यशस्वी झाल्याने अहमदनगरच्या वतीने इम्तियाज जलील यांचा सत्कार करण्यात आले. यावेळी डॉ परवेज अशरफी, ताहर शेख, ऍड सलीम सय्यद, अमीर खान, इम्रान शेख, सफवान कुरेशी, बिलाल शेख, इस्माईल शेख आदी उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यावर डॉ परवेज अशरफी यांनी पत्रकारांशी बोलतांना संगितले की अहमदनगर जिल्ह्यातून सर्वच 12 विधानसभेतील इच्छुक पक्षाकडे दावेदारी अर्ज दाखल करणार आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने महाविकस आघाडीला भरभरून मतदान केले. परंतु मविआ ने लोकसभेत एकही उमेदवार मुस्लिम समाजाचा दिलेला नाही.आणि औरंगाबाद मधून इम्तियाज जलील यांना पराभव करण्यासाठी दोन्ही गटबंधनने पूर्ण शक्ती लावली.  तसेच विधान परिषदेतही मुस्लिम समाजाला माविआ ने निराशा केले. एकही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली नाही. याचाच अर्थ माविआला मुस्लिम अल्संख्यांक समाजाचे मत पाहिजे परंतु मुस्लिम समाजाचा नेता नको. महायुती बद्दल बोलतांना डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले की हे तर महाविकास आघाडी पेक्षा एक पाऊल पुढे आहे. यांना मुस्लिम अल्पसंख्यांक समाजच नको मुख्यमंत्री ज्या व्यक्तीने प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल अपशब्द वापरले त्यांचे सवरक्षण करतात.  तर गृहमंत्री त्यांची सुरक्षेत वाढ करून हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की जो मुस्लिम समजविरोधत बोलेल त्यांना सरकार पूर्ण सुरक्षा देईल. यांचे आमदार मुस्लिम समजला घुसून मारण्याची धमकी देतात आणि गृहमंत्री त्यांची पाठ राखण करतात. यावरून स्पष्ट दिसते की ना महाविकास आघाडी ना महायुती यांना मुस्लिम समाजाची गरज आहे.  जर मुस्लिम समाज आपल्या सोबत इतर समाज घेऊन इतर समाजाचे लोकांना एकत्र घेऊन येणारे विधान सभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत असेल तर चांगलेच आहे. प्रत्येक समाजाचा नेतृत्व विधानसभेत असणे गरजेचे असल्याने उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. सध्या अहमदनगर मध्ये सामान्य नागरिकांत चर्चा आहे की अहमदनगरचा भावी आमदार सामान्य जनतेला पाहिजे. वर्षानुवर्ष जी घराणेशाही चालली आहे त्याला कुठे तरी थांबवणे गरजेचे आहे. अहमदनगर शहराला असा आमदार पाहिजे जो प्रत्येक समाजाला एकत्र घेऊन चालेल. जाती जातीत तेढ निर्माण करून दंगल घडवणारा आणि स्वतःची राजकीय पोळी भाजवणार लोक प्रतिनिधी नको. यामुळे पक्षाकडे मी उमेदवारी मागितली आहे. मला आशा आहे की पक्ष अहमदनगर मधून उमेदवारी देताना माझा विचार करेल.

Maharashtra Election : परवेज अशरफी निवडणुकीच्या रिंगणात, पक्षाकडे उमेदवारीची मागणी Read More »

IPL 2025 मध्ये होणार 94 सामने? जाणून घ्या बीसीसीआयचा निर्णय

IPL 2025 :  येत्या काही दिवसात IPL 2025 साठी मेगा लिलाव होणार आहे. मात्र त्यापूर्वी IPL 2025 मध्ये 94 सामने होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.  IPL 2022,  IPL 2023 आणि IPL 2024 मध्ये 74 सामने झाले होते यंदा देखील 74 सामने होणार असल्याची माहिती समोर आली आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने सामन्यांच्या संख्येत कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.  2022 मध्ये नवीन मीडिया अधिकारांच्या लिलावादरम्यान, बीसीसीआयने 2023 आणि 2024 मध्ये 74 सामने, 2025 आणि 2026 मध्ये 84 सामने आणि 2027 मध्ये जास्तीत जास्त 94 सामन्यांबद्दल बोलले होते. पण सलग सामन्यांसाठी भारतीय स्टार खेळाडूंचा दबाव कमी करण्यासाठी बीसीसीआयने आयपीएलच्या पुढील आवृत्तीत केवळ 74 सामने आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय 2025 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताची पोहोचण्याची शक्यता खूप जास्त आहे. 11 जूनपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आयपीएल दीर्घकाळ सुरू राहिल्यास खेळाडूंना पुरेशी विश्रांती घेता येणार नाही, त्यामुळे सामन्यांची संख्या न वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे. आयपीएल फ्रँचायझींना लिलावापूर्वी पाच खेळाडूंना कायम ठेवण्याची संधी? मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुढील आयपीएल लिलावापूर्वी बीसीसीआय फ्रँचायझीला प्रत्येकी पाच खेळाडूंना संघात ठेवण्याची परवानगी देऊ शकते. याबाबत बीसीसीआयने फ्रँचायझीशी चर्चा केली आहे. काही फ्रँचायझींनी 5 ते 6 खेळाडूंना कायम ठेवण्याची मागणी केली होती.  सध्या बीसीसीआय जास्तीत जास्त पाच खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी देणार असल्याची बातमी आहे. मात्र, त्यात किती परदेशी खेळाडू आहेत, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. त्याचवेळी, लिलावात राईट टू मॅच (RTM) पर्याय नसल्याचं सांगण्यात येत आहे.

IPL 2025 मध्ये होणार 94 सामने? जाणून घ्या बीसीसीआयचा निर्णय Read More »

Nirmala Sitharaman : मोठी बातमी! अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश

Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने दिले आहे.  माहितीनुसार, निवडणूक बाँडच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश देण्यात आले आहे. जन अधिकार संघर्ष परिषदेचे आदर्श आर. अय्यर यांनी तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने शुक्रवारी एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आणि पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली. कोर्टाने टिळक नगर पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.  मंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र, भाजप नेते नलिन कुमार कटील, केंद्रीय आणि राज्य भाजप कार्यालये आणि ईडी विभागाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  एप्रिल 2019 पासून ऑगस्ट 2022 पर्यंत, उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या कंपनीकडून सुमारे 230 कोटी रुपये आणि अरबिंदो फार्मा कंपनीकडून 49 कोटी रुपये निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून वसूल करण्यात आले आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे.  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावरही निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून वसुली केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आधी निर्मला सीतारामन यांना खुर्चीवरून हटवावे. त्यानंतर माझा राजीनामा मागा, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले आहेत.

Nirmala Sitharaman : मोठी बातमी! अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश Read More »