DNA मराठी

ताज्या बातम्या

Suresh Dhas : धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर मीटिंग अन् अवादा कंपनीकडे तीन कोटी रुपयांची मागणी, सुरेश धस यांचा धक्कादायक दावा

Suresh Dhas : 14 जून 2024 वाल्मिक कराड, नितीन बिक्कड, अवादा कंपनीचे शुक्ला या सर्वांची बैठक धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झाली असल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. माध्यमांशी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, 14 जून 2024 वाल्मिक कराड, नितीन बिक्कड, अवादा कंपनीचे शुक्ला या सर्वांची बैठक धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झाली आणि त्यावेळी धनंजय मुंडे यांचे पीए जोशी त्यांच्या माध्यमातून अवादा कंपनीचे वरिष्ठ हे त्यांच्याबोरबर संधान साधत होते परंतु तोपर्यंत आय एनर्जी नावाच्या कंपनीचे वाल्मिक कराड यांनी काम बंद पाडले. तसेच धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर अवादा कंपनीकडे तीन कोटी रुपयांची मागणी केली गेली त्यापैकी दोन कोटींच्या खंडणीची डील झाली असल्याचा दावा देखील यावेळी त्यांनी केला. पुढे बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, नितीन बिक्कड याला लवकरात लवकर उचलण्याची गरज आहे, पोलिसांनी त्याला पकडले तर यातील बरेचसे राज बाहेर येईल आणि 50 लाख रुपये निवडणूक काळात यांनी त्या कंपनीकडून घेतले, उर्वरीत दीड कोटीच्या मागणीसाठी गेले तेव्हा वॉचमनला मारले तेव्हा संतोष देशमुख तिथे मध्ये गेला आणि त्यांचा अमानवीय कृत्य करुन मर्डर केला असल्याचा आरोपही त्यांनी केला. नितीन कुलकर्णी नावाचा आका वाल्मिक कराड यांचा पीए आहे तो 17 मोबाईल नंबर वापरतो, नितीन कुलकर्णीला अटक करुन 17 मोबाईल जप्त करा अशी मागणी देखील माध्यमांशी बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी केली.

Suresh Dhas : धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर मीटिंग अन् अवादा कंपनीकडे तीन कोटी रुपयांची मागणी, सुरेश धस यांचा धक्कादायक दावा Read More »

Manipur CM N Biren Singh :  I Am Sorry… मणिपूर प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी, म्हणाले, संपूर्ण वर्ष…

Manipur CM N Biren Singh : मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी गेल्या एक वर्षापासून राज्यात सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल माफी मागितली आहे. येत्या वर्षभरात राज्यात शांतता प्रस्थापित होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे, 3 मे पासून राज्यात जे काही घडत आहे त्याबद्दल मला राज्यातील जनतेची माफी मागायची आहे आणि हे संपूर्ण वर्ष अत्यंत दुर्दैवी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. बिरेन सिंग यांनी गेल्या एक वर्षापासून राज्यात सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल माफी मागितली आणि येत्या वर्षभरात राज्यात शांतता प्रस्थापित होईल, अशी आशा व्यक्त केली. सीएम बिरेन सिंह म्हणाले, ‘मला खरोखरच खेद वाटतो. मला माफी मागायची आहे, मला आशा आहे की नवीन वर्ष 2025 मध्ये राज्यात सामान्यता आणि शांतता पूर्ववत होईल.   मणिपूरमध्ये दीर्घकाळ चाललेल्या हिंसाचारात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, मणिपूरच्या लोकसंख्येपैकी सुमारे 53 टक्के लोकसंख्या मेईतेई समुदायाची आहे, तर नागा आणि कुकी लोकसंख्या सुमारे 40 टक्के आहे आणि हा समुदाय पर्वत येथे राहतो. मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्तमणिपूरमधील इंफाळ पश्चिम जिल्ह्यात शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. सोमवारी जिल्ह्यातील सगाईशाबी रोआ परिसरातून ही वसुली करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जप्त केलेल्या वस्तूंमध्ये पिस्तूल, बंदुका, रायफल, एक कार्बाइन आणि हातबॉम्ब यांचा समावेश आहे. अद्याप तपास सुरू आहे.

Manipur CM N Biren Singh :  I Am Sorry… मणिपूर प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी, म्हणाले, संपूर्ण वर्ष… Read More »

Ahilyanagar News : वाढणार सुरक्षा अन् गुन्हे होणार कमी, वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे आवाहन

Ahilyanagar News : वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे आणि रस्त्यावर धावणाऱ्या वाहनाची ओळख पटविण्याकरिता १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (एचएसआरपी)बसविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील वाहनांना नंबर प्लेट बसविणे करीता सेवा पुरवठादार एफटीए एचएसआरपी सोल्युशन्स या संस्थेची यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. सेवापुरवठादार यांचे अधिकृत संकेतस्थळ htttp://maharashtrahsrp.com या संकेतस्थळावर जाऊन वाहन क्रमांकाची ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ नोंदणी करणे आवश्यक आहे. कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील श्रीरामपूर, नेवासा, राहुरी, राहाता, कोपरगांव, संगमनेर, अकोले या तालुक्यांकरीता सेवापुरवठादार यांच्याकडून श्रीरामपूर येथील मुळे मोटर्स, बेलापुर रोड श्रीरामपूर, राहुल ट्रॅक्टर्स श्रीरामपूर, शिरोडे ऑटोमोबाईल्स प्रा.लि. श्रीरामपूर हे अधिकृत फिटमेंटर सेंटर नियुक्त करण्यात आलेले आहेत. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी दुचाकी वाहन व ट्रॅक्टर्ससाठी ४५० रुपये, तीनचाकी वाहनांसाठी ५०० रुपये आणि चारचाकी, प्रवासी चारचाकी, ट्रक, ट्रेलर्स व इतर वाहनांसाठी ७४५ रुपये इतका दर निश्चित करण्यात आलेला आहे. सर्व वाहनधारकांनी ३१ मार्च २०२५ पर्यंत अधिकृत फिटमेंट सेंटरद्वारे जुन्या नोंदणीकृत वाहनांना एचएसआरपी बसविण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन श्रीरामपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी यांनी केले आहे.

Ahilyanagar News : वाढणार सुरक्षा अन् गुन्हे होणार कमी, वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे आवाहन Read More »

Pushpa 2 ची बॉक्स ऑफिसवर क्रेझ, मोडले अनेक विक्रम अन् केली बंपर कमाई

Pushpa 2 : सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ आता देखील बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. याच बरोबर आता या चित्रपटाने अनेक विक्रम देखील स्वतःच्या नावावर केले आहे. माहितीनुसार, पुष्पा 2 ने पहिल्या आठवड्यात 725.8 कोटींची कमाई केली तर दुसर्‍या आठवड्यात 264.8 कोटी रुपये कमावले आणि तिसऱ्या आठवड्यात तब्बल129.5 कोटी रुपये जमा केले. तर चौथ्या शुक्रवारी 8.75 रुपये कोटीचा व्यवसाय केला. यामुळे 1700 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा तिसरा भारतीय सिनेमा ठरला आहे. तर दुसरीकडे नुकतंच रिलीज झालेले ‘वनवास’, ‘मुफासा’ आणि ‘बेबी जॉन’ या सिनेमांना देखील पुष्पा 2 ला टक्कर देता आली नाही. पुष्पा 2 ने सगळ्यात अगोदर देशातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ‘बाहुबली 2: द कन्क्लूजन’ला मागे टाकलं. 2017 मध्ये रिलीज झालेल्या प्रभासच्या या सिनेमाने 1030.42 कोटींचा गल्ला जमवला होता. पुष्पा 2 नं यापेक्षा जवळपास 120 कोटी रुपये जास्त कमावले आहेत. तसेच पुष्पानं किंग खानलाही मागे टाकलं आहे.

Pushpa 2 ची बॉक्स ऑफिसवर क्रेझ, मोडले अनेक विक्रम अन् केली बंपर कमाई Read More »

Valmik Karad : मोठी बातमी, संतोष देशमुख हत्या प्रकरण, वाल्मिक कराडला अटक?

Valmik Karad : एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने मोठी कारवाई करत पुण्यातून वाल्मिक कराडला अटक करण्यात आली असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी होत होती. तर दुसरीकडे या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सीआयडीला दिले होते. त्यामुळे वाल्मिक कराडला कधी अटक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील या प्रकरणात वाल्मिक कराड आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 21 दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे.

Valmik Karad : मोठी बातमी, संतोष देशमुख हत्या प्रकरण, वाल्मिक कराडला अटक? Read More »

Bank Holidays January 2025: तब्बल 13 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या नेमकं कारण काय?

Bank Holidays January 2025 : नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात देशात तब्बल 13 दिवस बँका बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. जाणून घ्या जानेवारी महिन्यात कधी आणि कुठे देशात बँका बंद राहणार आहे. 1 जानेवारी 2025: बँकेला सुट्टी असेल का?बुधवार, 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाचे उत्सव साजरे केले जातील. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने अद्याप जानेवारीचे अधिकृत कॅलेंडर जारी केले नसले तरी, या दिवशी देशभरात बँकांना सुट्टी असण्याची शक्यता आहे. म्हणजेच नववर्षानिमित्त बँकांमधील कामकाज बंद राहणार आहे. जानेवारी महिन्यात बँकेला किती दिवस सुट्ट्या असतात?जानेवारी 2025 मध्ये बँकांसाठी एकूण 13 सुट्ट्या असू शकतात. यामध्ये 2 शनिवार आणि 4 रविवार तसेच अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुट्ट्यांचा समावेश आहे. चला, जानेवारी महिन्यात बँकांना कोणत्या दिवशी सुट्ट्या असतील हे जाणून घेऊया. जानेवारी 2025 च्या बँक सुट्ट्यांची संभाव्य यादी1 जानेवारी 2025 (बुधवार): नवीन वर्षाचा दिवस : संपूर्ण देशात5 जानेवारी 2025 (रविवार): संपूर्ण देश6 जानेवारी 2025 (सोमवार): गुरु गोविंद सिंग जयंती – चंदीगड, हरियाणा11 जानेवारी 2025 (शनिवार): दुसरा शनिवार – संपूर्ण देश आणि मिशनरी दिवस – मिझोराम12 जानेवारी 2025 (रविवार): स्वामी विवेकानंद जयंती – पश्चिम बंगाल13 जानेवारी 2025 (सोमवार): लोहरी – पंजाब, जम्मू, हिमाचल प्रदेश14 जानेवारी 2025 (मंगळवार): मकर संक्रांती आणि पोंगल – विविध राज्ये15 जानेवारी 2025 (बुधवार): तिरुवल्लुवर दिवस – तामिळनाडू19 जानेवारी 2025 (रविवार): संपूर्ण देश23 जानेवारी 2025 (गुरुवार): नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती – ओडिशा, त्रिपुरा, पश्चिम बंगाल24 जानेवारी 2025 (शनिवार): चौथा शनिवार – संपूर्ण देश26 जानेवारी 2025 (रविवार): प्रजासत्ताक दिन – संपूर्ण देश30 जानेवारी 2025 (गुरुवार): सोनम लोसार – सिक्कीम लक्षात ठेवण्याच्या गोष्टीबँकेच्या सुट्ट्या राज्यानुसार बदलू शकतात. त्यामुळे, तुम्हाला तुमच्या स्थानिक बँकेच्या शाखेतून सुट्ट्यांची माहिती अगोदर मिळणे योग्य ठरेल. हे जाणून घेतल्यास, तुम्ही तुमची बँकिंगशी संबंधित कामे सहजपणे समायोजित करू शकता, जेणेकरून कोणत्याही अडचण येणार नाही.

Bank Holidays January 2025: तब्बल 13 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या नेमकं कारण काय? Read More »

Happy New Year: नवीन वर्षात होणार मोठे बदल, 1 जानेवारीपासून ‘हे’ नियम बदलणार

Happy New Year: नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 1 जानेवारी 2025 पासून देशात अनेक नियम बदलणार आहे. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. कर आणि अनुदानांमध्ये बदलआता 1% TCS (टॅक्स कलेक्शन ॲट सोर्स) 10 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या हँडबॅग आणि घड्याळे यांसारख्या लक्झरी वस्तूंवर लागू होईल. कारच्या किमतीत वाढमारुती सुझुकीने आपल्या वाहनांच्या किमतीत 4% पर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे.Hyundai ने 25,000 पर्यंत आणि Mahindra ने 3% ने किमती वाढवल्या आहेत. Mercedes-Benz, BMW आणि Audi सारख्या लक्झरी कार कंपन्या देखील किमती 3% पर्यंत वाढवत आहेत. जुन्या फोनवर व्हॉट्सॲप सपोर्ट नसणारव्हॉट्सॲप काही जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणे बंद करेल. याचा परिणाम Samsung Galaxy S3, Motorola Moto G (1st Gen), HTC One X आणि Sony Xperia Z सारख्या मॉडेल्सवर होईल. UPI पेमेंटची नवीन मर्यादाफीचर फोन वापरकर्त्यांसाठी UPI पेमेंट मर्यादा 5,000 वरून 10,000 करण्यात आली आहे. या बदलामुळे 123Pay सेवेअंतर्गत ग्रामीण भागातील लहान व्यापारी आणि वापरकर्त्यांना फायदा होईल. या बदलाचा काय परिणाम होतो?2025 चे हे बदल सामान्य ग्राहक आणि बाजाराची दिशा ठरवतील. एकीकडे कर आणि डिजिटल पेमेंटमुळे जीवन सुकर होणार आहे, तर दुसरीकडे रिअल इस्टेट आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील किमती वाढल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे.

Happy New Year: नवीन वर्षात होणार मोठे बदल, 1 जानेवारीपासून ‘हे’ नियम बदलणार Read More »

Rohit Sharma होणार निवृत्त, मुख्य निवडकर्ता आगरकर घेणार मोठा निर्णय?

Rohit Sharma: भारतीय कर्णधार रोहित शर्माची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये बॅट आतापर्यंत खूप फ्लॉप ठरली आहे. त्याने आतापर्यंत 3 सामन्यात केवळ 22 धावा केल्या आहेत. रोहितच्या या खराब फॉर्ममध्ये एक मोठी बातमी समोर येत आहे. सातत्याने धावा न केल्याने निराश झालेल्या रोहितने आता कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित निवृत्तीची घोषणा करू शकतोमीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर निवृत्तीची घोषणा करू शकतो. अशा स्थितीत सिडनीतील शेवटचा सामना हिटमॅनच्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी ठरू शकतो. रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा झाला आहे. रिपोर्टनुसार, भारतीय संघाचा मुख्य निवडकर्ता आणि माजी खेळाडू अजित आगरकर मेलबर्नमध्ये असून तो रोहित शर्माशी त्याच्या भविष्याबद्दल बोलू शकतो. रिपोर्टनुसार, जर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला नाही, तर रोहित शर्मा टेस्ट फॉरमॅट सोडू शकतो. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सध्या 1-1अशी बरोबरीत आहे. अशा स्थितीत रोहितचे कसोटी भवितव्य त्याच्या फॉर्मवर आणि भारताच्या विजयावर अवलंबून आहे. रोहितला कारकीर्द वाचवायची असेल तर त्याला मेलबर्न आणि सिडनीमध्ये अप्रतिम कामगिरी करावी लागेल. त्याच्या कारकिर्दीतील हा सर्वात महत्त्वाचा सामना असणार आहे. रोहित टी-20आधीच निवृत्त झाला आहेरोहित शर्माने पहिल्यांदाच T20I ला अलविदा केला आहे. भारताने यावर्षी ऐतिहासिक T20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. रोहितच्या निवृत्तीनंतर चाहते खूपच निराश झाले होते. आता हा रिपोर्ट जाणून हिटमॅनच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. आता रोहितने आगामी डावात फलंदाजीने खळबळ माजवावी आणि भारतासाठी महत्त्वाची खेळी खेळून संघाला विजयाकडे नेले पाहिजे, अशी चाहत्यांची इच्छा आहे. हिटमॅन रोहित बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना खेळला नव्हता. यानंतर त्याने फलंदाजीचा क्रमही बदलला आणि मधल्या फळीत फलंदाजी केली. मात्र, रोहितच्या खराब फॉर्मने त्याची साथ सोडली नाही आणि तो आतापर्यंत बॅटने मोठी खेळी खेळू शकला नाही.

Rohit Sharma होणार निवृत्त, मुख्य निवडकर्ता आगरकर घेणार मोठा निर्णय? Read More »

Mumbai Caught Fire: मोठी बातमी, प्लास्टिक आणि भंगाराच्या गोदामाला आग

Mumbai Caught Fire: एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार मुंबईतील कुर्ला येथे शनिवारी सकाळी आग लागल्याची घटना समोर आली आहे. जिथे प्लास्टिक आणि भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी आग विझवण्यात व्यस्त आहेत. कुर्ल्यातील वाजिद अली कंपाऊंडमध्ये बांधलेल्या गोदामात ही आग लागली. गोदामाला सकाळी सहा वाजता अचानक आग लागली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

Mumbai Caught Fire: मोठी बातमी, प्लास्टिक आणि भंगाराच्या गोदामाला आग Read More »

Manmohan Singh Death: माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन, सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Manmohan Singh Death: भारत सरकारने दु:ख व्यक्त करत भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाची घोषणा केली आहे. त्यांचे निधन 26 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात झाले. डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे भारत सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. हा दुखवटा 26 डिसेंबर 2024 पासून 1 जानेवारी 2025 पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) पाळला जाईल. या काळात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल आणि कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. डॉ. मनमोहन सिंग यांना शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. तसेच, त्यांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी देश-विदेशातील सर्व भारतीय दूतावासांमध्येही राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येईल.

Manmohan Singh Death: माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन, सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर Read More »