DNA मराठी

ताज्या बातम्या

शालेय पोषण आहारात मृत उंदीर सापडला, कारवाई करणार? विजय वडेट्टीवारांचा सवाल

Vijay Wadettiwar : रायगड जिल्ह्यातील वडखळ ग्रामपंचायत येथील अंगणवाडीमध्ये बालकांसाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदीर आढळला. या प्रकरणी पुरवठादार वर कारवाई करणार का? असा प्रश्न काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बालकांच्या पोषण आहाराचे प्रश्न उपस्थित करण्यात आले. वडखळ इथे ज्या पाकिटात मृत उंदीर सापडले त्याचे नमुने दोन प्रयोगशाळा देऊन त्यांनी तपासणी केली नाही, हे गंभीर आहे. या प्रयोगशाळा या सरकारच्या असून जर ते ही नमुने तपासात नाही तर काय कारवाई करणार? अशी पाकीट जे पुरवठादार बनवतात त्यांच्यावर काय कारवाई करणार? पोषण आहारात जर असे अन्न असेल तर तो बालकांच्या आरोग्याला धोका आहे. त्यामुळे या प्रकरणी कोणाला जबाबदार धरणार, असे सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्याची घोषणा महिला आणि बालविकास मंत्री यांनी केली. ही समिती झालेल्या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदराचे अवशेष सापडले, पण प्रयोगशाळांनी ही नमुने तपासले नाही, या प्रकरणी देखील समिती चौकशी करणार. या प्रकरणात जो कोणी दोषी आढळले त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. पुरवठादार यात जबाबदार असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल अस महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या.

शालेय पोषण आहारात मृत उंदीर सापडला, कारवाई करणार? विजय वडेट्टीवारांचा सवाल Read More »

काँग्रेसला धक्का, माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेत

Ravindra Dhangekar : हिंदुह्रयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा नकली आवाजातील व्हिडिओ करण्यापेक्षा त्यांचे विचार जपले असते तर कोणी कुठे गेले नसते, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. काँग्रेसचे पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी कार्यकर्त्यांसह शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.  यावेळी शिवसेना उपनेते डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री उदय सामंत, आमदार शरद सोनावणे, आमदार प्रकाश सुर्वे, माजी खासदार आनंदराव अडसूळ उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा धनुष्यबाण उचलला आणि भगवा हाती घेतला. रवींद्र धंगेकर हे पुण्यातले लोकप्रिय लोकनेता म्हणून त्यांची ओळख आहे. कामातून त्यांनी ओळख निर्माण केली. ते 25 वर्ष नगरसेवक होते. त्यापैकी शिवसेनेचे 10 वर्ष नगरसेवक होते. शिवसेनेत आल्याने आता लोकांना कळेल धंगेकर कोण, असे शिंदे म्हणाले. तुमचा जनसंपर्क पाहता लवकरच पुण्यातून हजारो कार्यकर्ते शिवसेनेत येतील, असा विश्वास यावेळी शिंदे यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत धंगेकर यांना 4 लाख 60 हजार मते मिळाली. यातून तुमचे काम आणि लोकप्रियता दिसून येते, अशा शब्दांत शिंदे यांनी धंगेकर यांचे कौतुक केले.   उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता पण मला लोकांनी हलक्यात घेतलं. त्यानंतर जे घडलं त्याची देशाने नाही तर जगातील 33 देशांनी दखल घेतली. एक सामान्य कार्यकर्ता काय करु शकतो हे जगाने पाहिले. शिवसेनेकडून 80 पैकी 60 आमदार निवडून आले आणि खरी शिवसेना कोणाची यावर जनतेने शिक्कामोर्तब केले. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार आपण पुढे घेऊन चाललोय, असे ते म्हणाले. कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्याला बळ देणारे आपण आहोत कपडे सांभाळणारे नाहीत, असे शिंदे म्हणाले. खुर्चीसाठी 2019 मध्ये ज्यांनी मोह केला त्यांना जनतेने विधानसभा निवडणुकीत धडा शिकवला. आपल्याला खुर्चीचा मोह नाही महाराष्ट्राला पुढे न्यायचे हा एकच ध्यास आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही तर सर्वसामान्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालाय असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, बाळासाहेबांच्या नकली आवाजातील व्हिडिओ दाखवण्यात आला. बाळासाहेबांचे जुन्या रेकॉर्ड्स जपून ठेवल्या आहेत असे ते सांगतात पण नकली लोक नकलीच कामे करणार असा टोला त्यांनी यावेळी उबाठावर लगावला. याऐवजी बाळासाहेबांचे विचार जपले असते तर फायदा झाला असता, कोणी कुठे गेले नसते, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.   धंगेकर म्ङणाले की, शिवसेनेचा 10 वर्ष नगरसेवक होतो. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम महाराष्ट्राने पाहिले. कॉमन मॅन म्हणून शिंदे यांनी काम केले त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करु, अशी भावना धंगेकर यांनी व्यक्त केली. धंगेकर यांच्यासमवेत सुरेश जैन, बाळासाहेब आंबरे,  प्रणव धंगेकर, गोपाळ आगरकर, मिलिंद अहेर, अजित ढोकरे, रवींद्र खेडेकर, संजय पासोलकर, सतीश ढगे, राजू नाणेकर आदी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत यावेळी प्रवेश केला.  यामुळे पुण्यात काँग्रेसला खिंडार पडले आहे.

काँग्रेसला धक्का, माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेत Read More »

सरकारकडून सेव्हन हेवन अर्थसंकल्प सादर ; जयंत पाटलांचा हल्लाबोल

Jayant Patil : उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 2025 – 26 साठी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक जयंत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. जे गाडीतून फिरणार आहेत त्यांच्यासाठी असंख्य पूल, टनेलच्या घोषणा पण एसटी बसने, रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याची टीका त्यांनी केली आहे. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्राचे महसुली तूट ही 20 हजार कोटी वरून वाढून 45 हजार 892 कोटी दाखवली आहे. मागच्या वर्षी 20 हजार कोटींची तूट दाखवलेली ती 26 हजार 536 कोटींवर सुधारित अंदाजाने पोहोचली. म्हणेज एकूण तूट 60 हजार कोटींपर्यंत जाईल. राजकोषीय तूट देखील 1 लाख 10 हजार कोटीवरून आज ती 1 लाख 36 हजार कोटींवर गेली आहे. हा आकडा सुद्धा दीड लाख कोटींपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. असं जयंत पाटील म्हणाले. तसेच अधिक्याचे बजेट करण्याची परंपरा या सरकारने गेल्या काही काळात तोडलेली आहे. त्याचा फटका सर्वांनाच विशेषता आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागातील योजनांवर होत आहे. सरकारने जाहीर केलेल्या योजना सेव्हन हेवन सारख्या आहेत. जे गाडीतून फिरणार आहेत त्यांच्यासाठी असंख्य पूल, टनेलच्या घोषणा आहेत. पण एसटी बसने, रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीय लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. असेही यावेळी ते म्हणाले. शिवभोजन योजनेचा कुठेही उल्लेख नाहीया अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनीशिवभोजन योजनेचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे ती बंद करण्याचा सरकारचा दृष्टिकोन दिसतोय अशी आमची शंका आहे. तसेच आनंदाचा शिधा यावर देखील भर देण्यात आलेला नाही. कारण आता निवडणुका नाहीत. त्यामुळे या योजनांची गरज फारशी राहिलेली नाही. अशी टीका त्यांनी यावेळी केली. निवडणुकीत केल्या गेलेल्या कुठल्याही घोषणेची पूर्तता या बजेटमध्ये केली गेलेली नाही. लाडकी बहीण योजनेचे अनुदान 1500 वरून 2100 होण्याची अपेक्षा होती पण तेही घडले नाही. 25 लाख रोजगार निर्माण करू अशी घोषणा केली होती प्रत्यक्षात फक्त 90 हजार रोजगार निर्मितीचे अर्थसंकल्पात नमूद केल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.

सरकारकडून सेव्हन हेवन अर्थसंकल्प सादर ; जयंत पाटलांचा हल्लाबोल Read More »

भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला दिला धक्का, ‘या’ 5 चुका अन् स्वप्न भंग

Champions Trophy Final: आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव करत चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद जिंकले आहे. मात्र या स्पर्धेच्या सुरवातीपासून जबरदस्त फॉर्मात असलेल्या न्यूझीलंड संघाला फायनलमध्ये पाच चुका भारी पडल्या ज्यामुळे त्यांना अंतिम सामन्यात भारताकडून पराभव पत्करावा लागला. मॅट हेन्री अंतिम सामन्यातून बाहेरन्यूझीलंडच्या आशांना सर्वात मोठा धक्का सामन्यापूर्वीच बसला कारण या स्पर्धेत सर्वाधिक 10 बळी घेणारा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री दुखापतीमुळे अंतिम सामना खेळू शकला नाही. त्याच्या जागी खेळणाऱ्या नाथन स्मिथने 2 षटकांत 22 धावा दिल्या. फिरकी गोलंदाजी खेळता आली नाहीया सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय वेगवान गोलदाजांवर हल्लाबोल केला मात्र त्यानंतर फिरकी गोलंदाजी सुरू होताच विकेट पडू लागल्या. पहिल्या 75 धावांमध्ये, फॉर्ममध्ये असलेले तिन्ही फलंदाज यंग, रॅचिन आणि विल्यमसन फिरकीच्या जाळ्याचे बळी पडले. मधल्या षटकांच्या फलंदाजी स्लोमधल्या षटकांच्या टप्प्यात किवी फलंदाजांना एकेरी आणि दुहेरी धावा करता आल्या नाहीत. डॅरिल मिशेलने 63 धावा केल्या असतील, पण त्यासाठी त्याला 101 चेंडू लागले. अशा परिस्थितीत, धावगती बरीच कमी झाली आणि त्यानंतर, न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. वेगवान गोलंदाजी निराशाजनक कामगिरीजेव्हा किवी गोलंदाज गोलंदाजी करायला आले तेव्हा रोहित शर्माने त्यांच्यावर वर्चस्व गाजवले आणि त्यांना बॅकफूटवर नेले. त्यानंतर वेगवान गोलंदाजांना विकेट घेण्यात अपयश आले आणि पहिल्या 10 षटकांत त्यांनी भरपूर धावा दिल्या. त्यामुळे 252 चा स्कोअर आणखी कमी झाला. श्रेयस अय्यरचा महत्त्वाचा झेल सोडलाएकेकाळी लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया अडचणीत सापडल्याचे दिसत होते, परंतु श्रेयस अय्यरने शानदार पुनरागमन केले. त्यानंतर, जेव्हा भारताला जिंकण्यासाठी 100 पेक्षा जास्त धावांची आवश्यकता होती, तेव्हा 44 धावांवर अय्यरचा सोपा झेल सोडला. त्यानंतर गती भारताकडे सरकली आणि किवींचे खांदे झुकले.

भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला दिला धक्का, ‘या’ 5 चुका अन् स्वप्न भंग Read More »

विराट कोहली निवृत्त होणार? चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर जिंकल्यानंतर सोडलं मौन, म्हणाला…

Virat Kohli : आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 जिंकल्यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली निवृत्त होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून याबाबत स्वतः विराट कोहलीने स्पष्टीकरण दिले आहे. चॅम्पियन ट्रॉफी 2025 जिंकल्यानंतर विराट कोहलीने पुष्टी केली आहे की तो कुठेही जाणार नाही आणि देशासाठी खेळत राहील. कोहलीला निवृत्तीबद्दल थेट विचारण्यात आले नसले तरी, माजी भारतीय कर्णधाराने त्याच्या भविष्याबद्दलचे त्याचे हेतू स्पष्ट केले. या प्रश्नाचे उत्तर देताना कोहली म्हणाला, “हो, नक्कीच. म्हणजे, शुभमनने म्हटल्याप्रमाणे, मी शक्य तितके या मुलांशी बोलण्याचा प्रयत्न करतो, माझा अनुभव सांगण्याचा प्रयत्न करतो, मी इतका वेळ कसा खेळू शकलो, जिथे शक्य असेल तिथे त्यांचा खेळ सुधारण्यास मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि हो, जसे ते बरोबर म्हणतात, जेव्हा तुम्ही निघता तेव्हा तुम्हाला ते ठिकाण चांगल्या स्थितीत सोडायचे असते.” “आमचा हाच प्रयत्न आहे, तुम्हाला माहिती आहे, आम्हाला हेच हवे आहे की जेव्हा आम्ही कोणत्याही टप्प्यावर खेळ पूर्ण करतो, तेव्हा आमचा संघ पुढील 8 -10 वर्षे जगाशी सामना करण्यास सज्ज असेल आणि या खेळाडूंमध्ये निश्चितच ते करण्याची प्रतिभा आहे आणि खेळाची जाणीव देखील आहे आणि तुम्हाला माहिती आहेच की, त्यांनी आधीच काही प्रभावी खेळी केल्या आहेत, श्रेयसने ती भूमिका बजावली आहे, सुंदर, केएलने सामने संपवले आहेत तरहार्दिक एक मॅच विनर खेळाडू आहे.” ‘ऑस्ट्रेलियाच्या कठीण दौऱ्यानंतर पुनरागमन करायचे होते’चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत ब्लॅककॅप्सवर चार विकेटनी संस्मरणीय विजय मिळवल्यानंतर, कोहलीने खुलासा केला की बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निराशाजनक कामगिरीनंतर त्याचा संघ पुनरागमन करू इच्छित होता, जिथे भारताने पाच सामन्यांची मालिका 1-3 अशी गमावली होती. ऑस्ट्रेलियामध्ये कोहलीला स्वतः आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना संघर्ष करावा लागला, पण आज रात्रीचा विजय ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाचे दुःख कमी करण्यास मदत करेल. कोहली म्हणाला, “सर्वप्रथम, आम्हाला ऑस्ट्रेलियाच्या कठीण दौऱ्यानंतर पुनरागमन करायचे होते, एक मोठी स्पर्धा जिंकायची होती आणि आम्ही ते केले. म्हणून, ही एक अद्भुत भावना आहे, इतक्या अद्भुत तरुणांसोबत खेळणे खूप छान आहे, चेंजिंग रूममध्ये खूप प्रतिभा आहे आणि तुम्हाला माहिती आहेच की, ते भारतीय क्रिकेटला योग्य दिशेने घेऊन जात आहेत.” “आम्हाला मदत करायला, आमचा अनुभव शेअर करायला आणि संधी मिळेल तेव्हा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करायला आनंद होतो. हे खेळाडू मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहेत आणि म्हणूनच आमचा संघ इतका मजबूत आहे.” या स्पर्धेत कोहलीने पाच सामन्यांमध्ये 218 धावा केल्या, ज्यात एक शतक आणि एक अर्धशतक होते.कोहली म्हणाला, “मला वाटते की भूतकाळात हरवलेले विजेतेपद जिंकण्यासाठी संपूर्ण संघाला वेगवेगळ्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल आणि जर तुम्ही या स्पर्धेकडे पाच सामन्यांच्या आधारे पाहिले तर प्रत्येकाने कुठेतरी योगदान दिले आहे आणि म्हणूनच आम्ही ही स्पर्धा जिंकण्यात यशस्वी झालो.” लोकांनी खूप प्रभावी खेळी खेळल्या आहेत, खूप प्रभावी स्पेल आहेत आणि केवळ सामूहिक प्रयत्नांमुळेच तुम्हाला विजेतेपद मिळू शकते आणि मला खूप आनंद आहे की आम्ही एक संघ म्हणून खेळू शकलो आणि आम्हाला ते खरोखर आवडले.

विराट कोहली निवृत्त होणार? चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर जिंकल्यानंतर सोडलं मौन, म्हणाला… Read More »

भारताचा ‘शानदार’ विजय, न्यूझीलंडला धक्का देत पटकावले चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद

Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद पटकावले आहे. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 251 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 6 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. कर्णधार रोहित शर्माने 76 धावा केल्या, तर श्रेयस अय्यरने 48 धावांचे योगदान दिले. पहिल्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. रोहितने डावाच्या पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार मारून न्यूझीलंडला बॅकफूटवर नेले. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये 105 धावांची भागीदारी झाली, पण त्यानंतर ग्लेन फिलिप्सने गिलचा एक शानदार झेल घेतला. 50 चेंडूत 31 धावा काढून गिल बाद झाला. यानंतर, विराट कोहलीने फलंदाजीला आला पण तो फक्त 1 धाव करून बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माने श्रेयस अय्यरसह डावाला पुढे नेले मात्र मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात तो यष्ट्यांच्या मागे बाद झाला. रोहित शर्माने 83 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकारांसह 76 धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरने 62 चेंडूत 48 धावा केल्या, पण रचिन रवींद्रने एक शानदार झेल घेतला. यानंतर अक्षर पटेलने 20 चेंडूत 29 धावा केल्या, पण तोही बाद झाला. हार्दिक पांड्या 18 चेंडूत 18 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. शेवटी केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियाला विजय मिळवून दिला. राहुलने 33 चेंडूत 34 धावा केल्या, तर जडेजा 6 चेंडूत 9 धावा केल्या.

भारताचा ‘शानदार’ विजय, न्यूझीलंडला धक्का देत पटकावले चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद Read More »

Pankaj Asia : नूतन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया रुजू

Pankaj Asia : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागी शासनाने नव्याने नियुक्त केलेले जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया आज रुजू झाले. प्रभारी जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना पदभार सोपवला. डॉ.आशिया हे २०१६ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. येथे रुजू होण्यापूर्वी ते यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी डॉ. आशिया जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त, नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. डॉ.आशिया यांच्या भारतीय प्रशासकीय सेवेची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातून झाली आहे. या सेवेत आल्यानंतर एक वर्ष परिविक्षाधीन कालावधीत आर्णी येथे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, तहसीलदार व बाभुळगाव येथे गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.

Pankaj Asia : नूतन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया रुजू Read More »

शेअर मार्केटच्या नावाखाली कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपींना अटक

Stock Market Scam: शेवगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली गुंतवणूकदारांना कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपींना बारा तासाच्या आता अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरख सिताराम वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेअर मार्केट ट्रेडिंग कंपणी क्लासिक ब्रीज वर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कंपनीच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करुन फसवणुक करण्यात आली असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. या प्रकरणात तपास करत असताना पोलीस निरीक्षक समाधान नागरे, शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुन्ह्यातील आरोपी संदीप मधुकर थोरात (वय-35 रा.पाईपलाईन रोड अहिल्यानगर, दिलीप तात्याभाऊ कोरडे (वय-35 रा.घोगरगाव ता.श्रीगोंदा जि.अहील्यानगर) यांची गुप्त माहीती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलिसांचे पथके तयार करून आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. आरोपी संदीप मधुकर थोरात याला त्याचे रहाते घरी जात असताना अटक केली तर आरोपी दिलीप तात्याभाऊ कोरडे याला सुपा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. वरील आरोपी विरुध्द इतर कोणीही व्यथीत अगर बळीत अशा जनतेची फसवणुक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोस्टेला बिनधास्तपणे संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी पोलिसांनी केले आहे.

शेअर मार्केटच्या नावाखाली कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपींना अटक Read More »

मोठी बातमी! शेतकऱ्यांना आकारी पड जमिनी परत मिळणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय

Maharashtra News : शेतकऱ्यांनी आकारी पड जमिनीच्या चालू वर्षाच्या प्रचलित बाजारमूल्याच्या प्रस्तावित २५ टक्के रक्कम ऐवजी ५ टक्के रक्कम शासनास जमा केल्यास, हस्तांतरणास निर्बंध या अटीवर ही जमीन त्यांना परत करण्यात येईल. याचा लाभ राज्यातील ९६३ शेतकऱ्यांना मिळणार आहे. आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतूदीत सुधारणा करण्याबाबतचे विधेयक विधीमंडळाच्या कनिष्ठ सभागृहात मान्यतेसाठी आज सादर करण्यात आले. तगाई किंवा तत्सम थकबाकी न भरल्याने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम २२० नुसार अशा जमिनींचा लिलाव होऊन त्या आकारी पड म्हणून शासन जमा करण्यात येतात. राज्यात अशा ४ हजार ८४९ एकर जमिनी शासन जमा झाल्या होत्या. अशा जमिनी थकबाकीची देय रक्कम आणि त्यावरील व्याज १२ वर्षांच्या आत भरणा केल्यास मूळ खातेदारांना परत करण्याची तरतूद कायद्यात आहे. तथापि, १२ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर अशा जमिनी मूळ मालकांना परत करण्याची तरतूद नव्हती. ही तरतूद बदलण्यात येणार आहे. या सुधारणेमुळे आकारीपडची कार्यवाही तातडीने होऊन शासनाकडे जमा झालेल्या एकूण १०९३ आकारीपड प्रकरणांत साधारण ४ हजार ८४९.७१ एकर क्षेत्र आकारीपड जमिनी मूळ शेतकऱ्यांना तसेच त्यांच्या वारसांना माफक दरात परत मिळणार आहेत. आकारीपड जमिनी म्हणजे काय?शेतजमीन मालकांनी शेतसारा भरला नाही, पिके घेतली नाहीत, अशा जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर सरकारने मालकी हक्क लावला. मात्र, या जमिनी मूळ मालकाकडेच ठेवण्यात आल्या. त्यामुळे जमिनी मालकाची वहिवाट असली, तरी या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर सरकारी मालकी असल्यामुळे त्यांना आकारीपड जमीन म्हटले जाते. पड जमिनींचा तपशील कलम २२० अन्वये कारवाई झालेली एकूण प्रकरणेकोकण विभाग : ३१पुणे विभाग: ५९७नाशिक विभाग: ४६५ सरकारचा ताबा असलेली प्रकरणेकोकण विभाग :१७पुणे विभाग: ६९नाशिक विभाग: ४४ माझी सुरूवातच माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्याने झाल्याचा मला आनंद आहे. दुष्काळ अथवा अनेक अडचणींनी ज्या शेतकऱ्यांनी सरकारला महसूल दिला नाही, त्यामुळे या जमिनी सरकारने ताब्यात घेतल्या होत्या. किमान पन्नास वर्षांपासून याबाबतचा निर्णय प्रलंबित होता. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मंत्रिमंडळात निर्णय घेतल्यावर आज कायद्यात सुधारणा करणे शक्य झाले. शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. असं यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

मोठी बातमी! शेतकऱ्यांना आकारी पड जमिनी परत मिळणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय Read More »

Satyajeet Tambe : नवीन अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव रद्द करा, सत्यजीत तांबे आक्रमक

Satyajeet Tambe : संगमनेर तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मात्र, जनतेची कोणतीही मागणी नसताना महसूल विभागाने हा प्रस्ताव प्रस्तावित केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. आश्वी बुद्रुक येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा घाट घातला जात असून, याला आमदार सत्यजीत तांबे यांनी विरोध केला असून हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी सभागृहात केली आहे. आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करणे सोयीचे नसून, अनेक गावांतील नागरिकांसाठी ते गैरसोयीचे ठरणार आहे. या कार्यालयाला जोडण्यात येणाऱ्या गावातील नागरिकांना शहर ओलांडून पुढे 20-25 किलोमीटर अंतरावर असलेल्या आश्वी बुद्रुकला जावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जाणार असून, त्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी या प्रस्तावाला सभागृहात तीव्र विरोध केला आहे. “जनतेची कोणतीही मागणी नसताना महसूल विभागाने हा प्रस्ताव प्रस्तावित करणे, हे प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. त्यामुळे हा प्रस्ताव तातडीने रद्द करण्यात यावा,” अशी मागणी त्यांनी सभागृहात केली आहे. प्रस्तावावर नागरिकांची नाराजीसंगमनेर तालुक्यातील नागरिकांनी या प्रस्तावावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “प्रशासनाने जनतेच्या सोयीसुविधांचा विचार न करता हा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे,” असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Satyajeet Tambe : नवीन अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव रद्द करा, सत्यजीत तांबे आक्रमक Read More »