DNA मराठी

Home Big News

‘माझा महाराष्ट्र कुठे चाललाय

padalkar awhad विधानभवनात गोंधळाचे राजकारण: लोकशाहीचा अपमान

padalkar awhad :- नागपूर :- महाराष्ट्र विधिमंडळ हे राज्याच्या लोकशाही व्यवस्थेचे सर्वोच्च मंदिर. या मंदिरात जनतेच्या प्रश्नांवर गंभीरपणे चर्चा होणे अपेक्षित असते. मात्र १७–१८ जुलै रोजी जे काही घडले ते या संस्थेच्या लोकशाहीला कलंक ठरावे असेच आहे. भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद गट) (NCP) चे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यातील वैयक्तिक राजकीय वैर विधानभवनाच्या चार भिंतींमध्ये दारुण राड्याचे कारण ठरले. समर्थकांनी एकमेकांवर शिवीगाळ आणि धक्काबुक्कीसारखे प्रकार करत लोकशाहीच्या सर्वोच्च संस्थेच्या प्रतिष्ठेचा विध्वंस केला. हे प्रकरण केवळ राजकीय असभ्यता नसून ती राज्यकारभाराच्या गंभीरतेवरच गदा आणणारी घटना आहे. या घटनांमुळे विधानसभेचे कामकाज काही काळासाठी थांबवावे लागले. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी घेतलेला निर्णय — आता केवळ आमदार, आमदारांचे वैयक्तिक सहाय्यक, विधान परिषद सदस्य आणि अधिकृत शासकीय अधिकारी यांनाच विधानभवनात प्रवेश असेल — हा आवश्यक असला, तरी लोकशाही प्रक्रियेमधील खुलेपणावर प्रश्न उपस्थित करणारा ठरतो. लोकशाहीत वाद होणं सहाजिक आहे, पण तो वाद संवादाच्या चौकटीतच होणं अपेक्षित असतं. ‘मी कोणत्या पक्षाचा’ हे सांगण्यापेक्षा ‘मी जनतेचा प्रतिनिधी’ या भूमिकेचा विसर गेल्यानेच अशा घटना घडत आहेत. ही केवळ पक्षीय कुरघोडी नव्हे, तर जनतेच्या विश्वासाला तडा देणारी राजकीय बेशिस्त आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे,(Eknath Shinde)  आणि विरोधी पक्षनेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मिळून अशा घटना रोखण्यासाठी आचारसंहिता आखावी. केवळ व्यक्तिकेंद्रित राजकारणाने विधिमंडळाचा अपमान होतो, आणि या अपमानाचे दुष्परिणाम सर्वसामान्य जनतेवर उमटतात. तर ‘माझा महाराष्ट्र कुठे चाललाय? राज्य विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हाणामारी झाली, आणि त्या गोंधळात सहभागी असलेल्यांपैकी काही जणांवर आधीपासूनच गंभीर गुन्हे दाखल असल्याचं समोर येतं. अशा व्यक्तींना राजकीय नेत्यांकडून खुलेआम पाठींबा दिला जातो, त्यांच्यासह विधानभवनात किंवा सभागृह परिसरात वावरण्याची मुभा दिली जाते — हे लोकशाहीच्या अंगावर काटा आणणारे चित्र आहे. जर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना आमदारांचे समर्थन लाभत असेल आणि तेच लोक मारहाणीच्या घटनांमध्ये सक्रिय असतील, तर ‘माझा महाराष्ट्र कुठे चाललाय?’ हा प्रश्न प्रत्येक जागरूक नागरिकाच्या मनात उमटल्याशिवाय राहत नाही. हे दृश्य सामान्य माणसाच्या दृष्टीने नुसते चिंताजनकच नाही, तर भविष्याबद्दल असुरक्षिततेची जाणीव निर्माण करणारे आहे. जर विधिमंडळात गुन्हेगारांचा ठसा उमटू लागला, तर कायदा आणि सुव्यवस्थेची व्याख्याच मोडीत निघेल. मग रस्त्यावर न्याय मागणाऱ्या सामान्य नागरिकासाठी कोणता दरवाजा उरेल? शेवटी एकच प्रश्न राहतो: जर विधिमंडळातच कायदा-संविधानाची पायमल्ली होत असेल, तर रस्त्यावर सामान्य नागरिकाकडून काय अपेक्षा ठेवायची? राजकारणाला पुन्हा शिस्त, संवाद आणि शिष्टाचार या मार्गावर आणणं ही सध्याची काळाची गरज आहे. नाहीतर जनता मतदान करताना ‘नेते नाही, तर नाटके’ या शब्दातच आपला उद्वेग व्यक्त करेल.

padalkar awhad विधानभवनात गोंधळाचे राजकारण: लोकशाहीचा अपमान Read More »

sebastian bennett

Sawedi land Scam “दस्तऐवजीकरणाआधीच हस्तक्षेपाचा खेळ! सावेडी प्रकरणात मंडल अधिकारी ऐवजी अप्पर तहसीलदार पाठवणारा अहवाल

Sawedi land Scam धक्कादायक वळण मिळाले आहे. सर्वे नं. २४५/ब-१ (०.७२ हेक्टर) व २४५/ब-२ (०.६३ हेक्टर) या एकूण १.३५ हेक्टर भूखंडावर गेल्या ३५ वर्षांपासून कोणताही कायदेशीर किंवा अधिकृत व्यवहार झाला नसल्याचा संशय. नगर प्रतिनिधी | अहमदनगरSawedi land Scam सावेडी येथील अत्यंत महत्त्वाच्या आणि बहुमूल्य जमिनीच्या प्रकरणाला आता एक धक्कादायक वळण मिळाले आहे. सर्वे नं. २४५/ब-१ (०.७२ हेक्टर) व २४५/ब-२ (०.६३ हेक्टर) या एकूण १.३५ हेक्टर भूखंडावर गेल्या ३५ वर्षांपासून कोणताही कायदेशीर किंवा अधिकृत व्यवहार झाला नसल्याचा संशय. मात्र अलीकडेच या जमिनीवर मोठा आर्थिक व्यवहार करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती समोर आली असून, त्यासाठी महसूल यंत्रणेकडे दबाव टाकण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे, संबंधित व्यक्तींनी हे प्रकरण हातात घेतल्यावर तातडीने भूमाफियांना पाठीशी घालणारी लॉबी सक्रीय झाली असून, चौकशीची दिशा वळवण्यासाठी नियोजित पद्धतीने दबाव आणला जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. जिल्हा प्रशासन, उपनिबंधक कार्यल्यावर रोष व्यक्त होऊ लागला आहे.नगरचे प्रांताधिकारी सुधीर पाटील त्यांच्याकडे या प्रकरणात तक्रार दाखल झाली होती, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले होते. मंडळ अधिकारी शैलेजा देवकते यांच्याकडे वस्तुनिष्ठ अहवाल मागवण्यात आला. त्यानंतर सावेडी मंडलाधिकारी यांनी वादी व प्रतिवादी दोघांनाही नोटिसा बजावण्यात आल्या. तसेच या जमिनीवरील कोणतेही व्यवहार प्रांत अधिकारी सुधीर पाटील यांचा निर्णय होईपर्यंत व्यवहार होऊ नये असे पत्र दिले होते, दक्षिण-१, उत्तर-२ आणि अहिल्यानगर-३ उपनिबंधक कार्यालयांना देण्यात आले होते.परंतु, या कडक चौकशीतून बचाव करण्यासाठी आणि सत्य बाहेर येण्याआधीच तपासाला वेगळा मोड देण्यासाठी एक संपूर्ण संगनमताने यंत्रणा रचली गेल्याचा संशय व्यक्त होत आहे. भूखंडाशी संबंधित मुक्त्यार अर्जदार पाचरणे यांनी या प्रकरणात पोलिसांकडेही अर्ज करत थेट प्रांताधिकारी यांच्यावरच पत्राद्वारे प्रश्न उपस्थित करत, ही चौकशी अप्पर तहसीलदारांकडे वर्ग करावी अशी मागणी केली. विशेष म्हणजे, ही मागणी झाल्यानंतर अवघ्या काहीच दिवसांत तपास अप्पर तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आला! ही ‘वेगवान कार्यवाही’ अनेक प्रशासकीय वर्तुळात संशयास्पद ठरत आहे.या चौकशीची अचानक बदललेली दिशा म्हणजे वस्तुनिष्ठ तपासाची दिशा बदलण्याचा प्रयत्न की?या प्रकरणातील महसूल मधील अधिकाऱ्यांच्या स्पष्ट व निःपक्षपाती भूमिकेने काहीजण अस्वस्थ झाले होते हे उघड आहे. आता अहवालाची सूत्रे अप्पर तहसीलदारांकडे दिली गेल्यानंतर, नेमका कोणता निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण नगर शहरासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. हे प्रकरण इतके गंभीर आहे की त्यात केवळ जमिनीचा व्यवहार नाही, तर प्रशासन, दस्तावेज फर्जीवाडा, आणि भूमाफियांचा संगनमत असा सगळा गुंता आहे. जर अप्पर तहसीलदारांनी पूर्वीच्या तपासाचा आदर न करता नव्याने प्रकरणाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला, तर यामागे असलेले राजकीय हस्तक्षेप आणि आर्थिक हितसंबंध आणखी उघडे पडतील. ही फक्त भूखंडाची लूट नाही, तर कायदा आणि प्रशासन यांची विश्वासार्हता धोक्यात आणणारी साजिश आहे.प्रांताधिकाऱ्यांनी यांनी मंडलाधिकारी यांना वस्तुनिष्ठ अहवाल मागवला होता मात्र सर्व प्रयत्न करूनही मंडळ अधिकारी यांनी आपली भूमिका कायम ठेवली म्हणून याचा वस्तुनिष्ठ अहवाल आता अप्पर तहसीलदारांकडे अचानकपणे तपास वर्ग करणे म्हणजे केवळ कायदेशीर प्रक्रियेचा खेळ मांडण्याचा प्रयत्न असून, आता या प्रकरणात सत्य समोर येईल का, की पुन्हा एकदा दलाल आणि दबावतंत्र यांच्या राजकारणात प्रशासन झुकणार? हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या आणि महसूल यंत्रणेच्या निष्पक्षतेची खरी परीक्षा आता लागणार आहे.

Sawedi land Scam “दस्तऐवजीकरणाआधीच हस्तक्षेपाचा खेळ! सावेडी प्रकरणात मंडल अधिकारी ऐवजी अप्पर तहसीलदार पाठवणारा अहवाल Read More »

sawedi land scam, the role of two 'heroes' of revenue

Sawedi land Scam सावेडी भूखंड घोटाळा: ३५ वर्षांनंतर जिवंत झालेलं प्रकरण, महसूलच्या दोन ‘महानायकांची’ भूमिका

Sawedi land Scam हे खरेदीखत ३५ वर्षांनंतर २९ एप्रिल २०२५ रोजी नोंदवले गेले आणि १७ मे २०२५ रोजी या नोंदीस कायदेशीर मान्यता दिली गेली.३५ वर्षांनंतर जिवंत झालेलं प्रकरण, महसूलचे दोन ‘महानायकांची’ भूमिका अहिल्यानगर – Sawedi land Scam सावेडी परिसरातील बहुचर्चित भूखंड घोटाळा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, तब्बल ३५ वर्षांनंतर या प्रकरणाला नवा धागा मिळाला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत, अहिल्यानगरचे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे एक या संदर्भात तक्रार आली आहे, यावर प्रांताधिकारी यांनी वस्तुनिष्ठ अहवाल मंडळ अधिकारी यांच्याकडे मागवला आहे. या प्रक्रियेला चालना देणारे मंडल अधिकारी आणि तलाठी हे दोन महसूल यंत्रणेतले ‘महानायक’ असल्याची सध्या चर्चेत आहेत. हे प्रकरण  १५ एप्रिल १९९१ रोजी १.९० लाख रुपयांना झालेल्या खरेदीखताच्या नोंदणीवरून उफाळून आला आहे. आश्चर्य म्हणजे, हे खरेदीखत ३५ वर्षांनंतर २९ एप्रिल २०२५ रोजी नोंदवले गेले आणि १७ मे २०२५ रोजी या नोंदीस कायदेशीर मान्यता दिली गेली. यामध्ये वादाला कारणीभूत ठरले तत्कालीन तलाठी प्रमोद गायकवाड यांनी संबंधित जमिनीची नोंद भरली. आणि सावेडी मंडल अधिकारी दिलीप जायभाय यांनी नोंदीस मान्यता देण्यात आली, परंतु, महत्त्वाचा मुद्दा असा की, जर या दस्तऐवजावर ३५ वर्षांनंतर नोंद घेतली गेली, तर त्या कालावधीत प्रत्यक्ष खरेदीदारांना किंवा मूळ मालकांना नोटीस का पाठवली गेली नाही? कायदेशीर प्रक्रियेचा भंग करत, मागच्या तारखेचा पंचनामा कसा केला गेला, आणि तो करताना गंभीर त्रुटी का राहिल्या, हे अनेक प्रश्न उपस्थित करतो. या सगळ्या प्रक्रियेतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, खरेदीखत बनावट असल्याचा संशय आहे तर मग . DNA मराठीला मिळालेल्या माहिती नुसार, हि जमीन विक्रीसाठी ७० लाखांचे फ्रँकिंग उपनिबंधक कार्यालयात झाले आहे. यावरून हे लक्षात येते की, खरेदीखताच्या नोंदी मागे एक मोठा आर्थिक व्यवहार दडलेला आहे. या जमिनीत लागलेलं रक्कम वसूल करून यातूनच हा व्यवहार दुसऱ्याला हस्तांतरित करून, मोठ्या प्रमाणात रक्कम मिळवण्याचा डाव आखण्यात आला का, हा संशय अधिक गडद होतो. शहा पारसमल मश्रीलाल यांनी २५ एप्रिल २०२५ रोजी नोंदणीसाठी अर्ज दिला होता, मात्र नोंदीसाठी नोटीसा कशा बजावल्या गेल्या नाहीत , याचे स्पष्टीकरण प्रशासनाकडे नाही. इतकंच नव्हे, तर त्या नोटीसा खरंच पाठवल्या होत्या का, की त्या नुसत्याच दाखल्यात वापरल्या गेल्या, याचंही उत्तर अजून गुलदस्त्यात आहे. डायाभाई यांना किवा यांच्या वारसांना का कळविले, या सगळ्या प्रक्रियेत जेव्हा चौकशी सुरू आहे, तेव्हा या जमिनीची विक्री करण्यात घाई का करण्यात येत आहे. ही विक्री झाल्यास त्याचे गंभीर परिणाम कोणाला भोगावे लागतील? मूळ मालक, खरेदीदार की तिसरा पक्ष? यासारखे अनेक अनुत्तरित प्रश्न आजही उभे आहेत. यापूर्वी अशा अनेक प्रकरणांमध्ये बनावट खरेदीखत तयार करून जमिनीची विक्री केल्याचे समोर आले असून, त्यातून संबंधितांनी मोठ्या प्रमाणावर रक्कम उकळली आहे. शासनाचे नियम डावलून झालेली ही नोंदणी आणि त्यामागे महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा सहभाग, ही गोष्ट गंभीरपणे तपासण्याची गरज आहे. कारण, सामान्य माणसासाठी त्याची जमीन ही आयुष्याची पुंजी असते. आणि जर शासन यंत्रणा त्याच्याविरोधात उभी राहिली, तर न्याय मिळण्याची आशाही मावळते. या सर्व प्रक्रियेमध्ये मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी घेतलेल्या निर्णयांचे योग्य आहे का, हे पाहणे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. तपास सुरू असतानाही गुपचूप व्यवहार झाले असल्यास, यामागे भूमाफिया आणि शासकीय यंत्रणेमधील साटेलोटे स्पष्ट होतात. त्यामुळे ‘सावेडी घोटाळा’ ही केवळ एक जमीन घोटाळ्याची कथा नसून, ती प्रशासनातील पारदर्शकतेवर उठलेला मोठा प्रश्न आहे.

Sawedi land Scam सावेडी भूखंड घोटाळा: ३५ वर्षांनंतर जिवंत झालेलं प्रकरण, महसूलच्या दोन ‘महानायकांची’ भूमिका Read More »

शनेश्वर बनवतात

शनैश्वर देवस्थान बनावट अ‍ॅप प्रकरण : पोलिस झाले फिर्यादी, मदत करणाऱ्यांवरही कारवाई

या प्रकरणात कोणताही संबंधित व्यक्ती फिर्याद देण्यास पुढे न आल्याने अखेर पोलिस उपनिरीक्षक सुदाम काकडे यांनी स्वतः फिर्याद दाखल केली. अहिल्यानगर – शनैश्वर देवस्थानच्या ( Shanaishwar Temple) नावाने तयार करण्यात आलेल्या बनावट अ‍ॅप आणि संकेतस्थळांमुळे झालेल्या फसवणुकीप्रकरणी शनिशिंगणापूर पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा गंभीर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात पाच यूआरएल धारकांसह (अ‍ॅप तयार करणारे) त्यांना साथ देणाऱ्या अज्ञात व्यक्तींवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याने तपासासाठी विशेष पथके नियुक्त केली आहेत. देवस्थानच्या विश्वस्त मंडळासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली आहे. विशेष बाब म्हणजे, या प्रकरणात कोणताही संबंधित व्यक्ती फिर्याद देण्यास पुढे न आल्याने अखेर पोलिस उपनिरीक्षक सुदाम काकडे यांनी स्वतः फिर्याद दाखल केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही संशयित व्यक्तींनी शनैश्वर देवस्थानच्या नावाने बनावट अ‍ॅप्स (Fake apps) व संकेतस्थळ तयार करून, देवस्थानची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता, ऑनलाईन पूजा, अभिषेक, तेल अर्पण, तसेच व्हीआयपी दर्शनासाठी नोंदणी सुरू केली होती. यामार्फत त्यांनी भक्तांकडून अनियमित शुल्क आकारले. आरोपींनी स्वतःचे पुजारी नेमून हे व्यवहार सुरू ठेवले होते आणि यामार्फत अवैध मार्गाने पैसे उकळण्यात आले. त्यामुळे या संपूर्ण प्रकारातून शनैश्वर भक्तांची व देवस्थानची आर्थिक फसवणूक झाली असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी अ‍ॅप तयार करणाऱ्या यंत्रणेशी संबंधित युआरएल्स आणि त्यांचा वापर करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी तांत्रिक तपास सुरू केला आहे. यासोबतच, आरोपींना मदत करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवरही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकारामुळे सध्या भक्तांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, देवस्थानने अधिकृत अ‍ॅप अथवा सेवा सुरू केली आहे की नाही, याबाबत प्रशासनाने लवकरात लवकर स्पष्टता देण्याची मागणीही भक्तांकडून होत आहे.

शनैश्वर देवस्थान बनावट अ‍ॅप प्रकरण : पोलिस झाले फिर्यादी, मदत करणाऱ्यांवरही कारवाई Read More »

ujjwal nikam elected to rajya sabha dna news marathi

मोठी बातमी – उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड यांची राज्यसभेवर निवड

उज्ज्वल निकम, हरषवर्धन श्रृंगला, इतिहासकार डॉ. मीनाक्षी जैन आणि सामाजिक कार्यकर्ते सी. सदानंदन मास्टर यांनाही नामनिर्देशित करण्यात आले आहे. नवी दिल्ली – ज्येष्ठ विधिज्ञ आणि देशातील अनेक गाजलेल्या खटल्यांचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड केली आहे. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ८० अन्वये कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा किंवा सार्वजनिक जीवनातील विशेष कर्तृत्वासाठी राष्ट्रपतींना राज्यसभेसाठी १२ सदस्य नामनिर्देश करण्याचा अधिकार आहे. याच अधिकाराचा वापर करत निकम यांच्यासह आणखी तीन तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायदेशीर क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवउज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी मुंबई दहशतवादी हल्ला, १९९३ बॉम्बस्फोट, प्रभाकरन हत्याकांड, तेलगी बनावट शिक्के प्रकरण, गुलशन कुमार हत्या प्रकरण यांसारख्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या गुन्ह्यांत सरकारी पक्षाचे प्रतिनिधित्व करत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या या दीर्घ अनुभवामुळे राज्यसभेतील कायदा, न्याय, आणि गुन्हेगारी न्यायव्यवस्था संबंधित चर्चांना एक नवा आयाम मिळणार आहे. निवडीचे व्यापक महत्त्वराज्यसभेवर अशा तज्ज्ञांची नियुक्ती केल्याने संसदेमध्ये अधिक व्यावसायिक व अभ्यासपूर्ण चर्चेला चालना मिळते. उज्ज्वल निकम यांची कारकीर्द, त्यांचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन, आणि न्यायव्यवस्थेतील प्रगल्भ समज यामुळे विधीविषयक धोरणांमध्ये अधिक चांगले योगदान मिळण्याची शक्यता आहे. इतर नामनिर्देशित सदस्यनिकम यांच्यासह परराष्ट्र क्षेत्रातील जाणकार हरषवर्धन श्रृंगला, इतिहासकार डॉ. मीनाक्षी जैन आणि सामाजिक कार्यकर्ते सी. सदानंदन मास्टर यांनाही नामनिर्देशित करण्यात आले आहे. या चौघांची नियुक्ती ही संसदेत विविध क्षेत्रांतील विचार व तज्ज्ञता समाविष्ट करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले जात आहे. परराष्ट्र धोरणातील जाणकार — हरषवर्धन श्रृंगलासंयुक्त राष्ट्रांत भारताचे प्रतिनिधित्व आणि माजी परराष्ट्र सचिव म्हणून कार्यरत राहिलेल्या श्रृंगला यांनी परराष्ट्र धोरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांची नियुक्ती जागतिक घडामोडींच्या चर्चेत मोलाची भर घालेल. संस्कृती व इतिहास अभ्यासक — डॉ. मीनाक्षी जैनभारतीय संस्कृती, इतिहास व सामाजिक विषयांवर संशोधन करणाऱ्या डॉ. जैन यांचे लेखन व विचार समाजप्रबोधनासाठी प्रसिद्ध आहे. राज्यसभेत त्यांच्या विद्वत्तेचा उपयोग धोरणांच्या सांस्कृतिक पैलूंमध्ये होईल. समाजसेवा व शिक्षण क्षेत्रातील कार्य — सी. सदानंदन मास्टरग्रामीण शिक्षण व सामाजिक न्यायासाठी झटणारे मास्टर यांनी शैक्षणिक सुधारणा व लोकसहभागाच्या माध्यमातून ठसा उमटवला आहे. समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचणारे धोरण तयार करण्यात त्यांचा सहभाग उपयुक्त ठरे उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती ही केवळ त्यांच्या वैयक्तिक कर्तृत्वाची पावती नसून, भारतीय संसदेच्या गुणवत्तापूर्ण आणि सखोल चर्चेसाठी एक नवा टप्पा ठरणार आहे. न्यायव्यवस्थेतील त्यांच्या अनुभवाचा लाभ देशाच्या विधीविषयक धोरणनिर्मितीस निश्चितच होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

मोठी बातमी – उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड यांची राज्यसभेवर निवड Read More »

ashish chanchlani and elli avram's instagram post created a stir on social media dna marathi

“Finally!” पोस्टमुळे आशीष-एली चर्चेत; प्रेमसंबंध जाहीर की नव्या प्रोजेक्ट हिंट?

मात्र, त्यानंतर आशीष चंचलानी (Ashish Chanchlani)  आणि एली अवराम (Elli AvRam)  यांनी त्यांच्या नात्याबाबत कोणताही खुलासा केला नाही. मुंबई : – प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आशीष चंचलानी (Ashish Chanchlani) आणि अभिनेत्री एली अवराम (Elli AvRam) यांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. आशीषने जुलै १२ रोजी इंस्टाग्रामवर एलीसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करत केवळ “Finally!” असे लिहिले आहे. हा फोटो आणि त्यावरील शब्द सध्या चर्चेचा विषय ठरले असून त्यावर नेटकऱ्यांमध्ये जोरदार चारच्या सुरु झाली आहे आहे . या पोस्टनंतर सोशल मीडियावर दोघांच्या नात्याविषयी अफवा पुन्हा एकदा गडद झाल्या आहेत. काही चाहत्यांनी याला “प्रेमसंबंधाची अधिकृत कबुली” मानले आहे, तर काहींनी हा नवीन म्युझिक व्हिडीओ, वेब सिरीज किंवा ब्रँड प्रमोशन असण्याची शक्यता वर्तवली आहे. दोघांनी याआधी फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या Elle List Awards इव्हेंटमध्ये एकत्र हजेरी लावली होती. तेव्हापासून त्यांच्यातील मैत्री आणि जवळीक यावर नेटकरी चर्चा करत होते. मात्र, त्यानंतर आशीष चंचलानी (Ashish Chanchlani)  आणि एली अवराम (Elli AvRam)  यांनी त्यांच्या नात्याबाबत कोणताही खुलासा केला नाही. या पोस्टनंतर काही तासांतच Instagram वर लाखोंच्या संख्येने लाईक्स आणि हजारो कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. चाहते “Congratulations”, “Finally together” अशा प्रतिक्रिया देत असून काही बॉलिवूड कलाकारांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एली अवराम ही “मिकी व्हायरस”, “किस किसको प्यार करूं” (“kis kisako pyaar karoon”) या चित्रपटांमधून ओळख मिळवलेली अभिनेत्री असून ती बिग बॉस  (big boss ) च्या एका सिझनमध्येही झळकली होती. आशीष चंचलानी हा युट्यूबवरील एक लोकप्रिय विनोदी कंटेंट क्रिएटर असून त्याचे व्हिडीओ जगभरात पाहिले जातात. सध्या तरी दोघांकडून कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही. ही पोस्ट केवळ वैयक्तिक प्रेम व्यक्त करणारी आहे की कोणत्यातरी प्रोजेक्टचा भाग, याविषयी स्पष्टता नसली तरी सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. https://www.instagram.com/p/DL__mwju1Up/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MTBoeGV0cmprajlycA== थोडक्यात  अफवा नव्हे, स्पष्ट संकेत? गेल्या काही महिन्यांपासून आशीष आणि एली अवरामच्या मैत्रीविषयी अनेक चर्चा रंगत होत्या. फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या Elle List या ग्लॅमरस इव्हेंटमध्ये दोघेही एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या अफवा पुन्हा एकदा चर्चेत आल्या. मात्र, त्यानंतर आशीष – एली यांनी कोणताही खुलासा केला नाही. आता जुलै १२ रोजी आशीषने इंस्टाग्रामवर एक रोमँटिक फोटो शेअर केला असून, त्यात दोघेही एकमेकांच्या मिठीत आहेत. पोस्टखाली लिहिलं आहे – “Finally”. या एकाच शब्दाने नेटकऱ्यांना संभ्रमात टाकलं आहे – ही रिलेशनशिपची अधिकृत घोषणा आहे की फक्त एखाद्या नव्या कोलॅबोरेशनची झलक? चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या पोस्टवर काही तासांतच लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्स आल्या आहेत. अनेक चाहत्यांनी हार्ट इमोजी, शुभेच्छा, आणि ‘कॉन्ग्रॅच्युलेशन्स’चा वर्षाव केला आहे. काही प्रसिद्ध कलाकारांनीही या पोस्टखाली “So happy for you both!”, “Finally Indeed!” अशा कमेंट्स केल्या आहेत. सोशल मीडियावर काही चाहत्यांनी या पोस्टला ‘इंटरनेटवरचं नवीन IT कपल’ असं बिरूद दिलं आहे. ट्विटर आणि इंस्टाग्राम स्टोरीजवर चाहत्यांनी #AshEl आणि #Finally ट्रेंड सुरू केला आहे. काही चाहत्यांनी लग्नाचीही शक्यता बोलून दाखवली आहे. रिलेशनशिप की प्रोफेशनल स्टंट? तथापि, अनेक जाणकार आणि डिजिटल माध्यम तज्ज्ञांचे मत आहे की ही पोस्ट एखाद्या नव्या डिजिटल प्रोजेक्टचा भाग असू शकते — कदाचित म्युझिक व्हिडीओ, वेब सिरीज किंवा ब्रँड कोलॅबरेशन! कारण आशीष चंचलानी ही सोशल मीडियावर सर्जनशील आणि युनिक प्रमोशनल स्टंटसाठी ओळखला जातो. या आधीही अनेक कलाकारांनी त्यांच्या रिलेशनशिपच्या अफवांद्वारे आपल्या आगामी प्रोजेक्ट्सचा प्रचार केला आहे, त्यामुळे काही युझर्स याकडे साशंकतेने पाहत आहेत. कोण आहेत हे दोघे? आशीष चंचलानी हे नाव सोशल मीडियावर नवीन नाही. त्यांच्या विनोदी व्हिडीओज, स्केचेस आणि वेब सिरीज यांमुळे ते घराघरात पोहोचले आहेत. ३० दशलक्षांहून अधिक युट्यूब सब्स्क्राइबर्स असलेला आशीष हा देशातील अग्रगण्य डिजिटल क्रिएटर्सपैकी एक आहे. एली अवराम ही एक स्वीडिश-भारतीय अभिनेत्री असून, “मिकी व्हायरस”, “किस किसको प्यार करूं” यांसारख्या चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. बिग बॉस मध्ये भाग घेतल्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. पुढे काय? सध्या तरी या दोघांपैकी कुणीही अधिकृतरित्या रिलेशनशिप जाहीर केलेली नाही. पोस्टवरून हा खरोखर प्रेमाचा स्वीकार आहे की फक्त एखाद्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा भाग — याबाबत स्पष्टता नाही. मात्र सोशल मीडियावरील उत्साह पाहता, या विषयावर अधिक माहिती लवकरच उघड होण्याची शक्यता आहे. एका साध्या “Finally” कॅप्शनने आंतरजालावर एवढी मोठी चर्चा निर्माण होईल, याचा प्रत्यय या पोस्टने दिला आहे. आशीष आणि एली यांच्यात खरंच प्रेम आहे की हा फक्त प्रमोशनल गिमिक आहे, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. मात्र, चाहत्यांच्या मनात मात्र ही जोडी घर करून बसली आहे. पुढील अपडेट्सकडे सगळ्यांचे डोळे लागून आहेत!

“Finally!” पोस्टमुळे आशीष-एली चर्चेत; प्रेमसंबंध जाहीर की नव्या प्रोजेक्ट हिंट? Read More »

sawedi plot scam police entry

Sawedi land Scam सावेडी भूखंड घोटाळा : पोलिसांची एन्ट्री, महसूल अधिकार्‍यांवर दबावाचं वातावरण

Sawedi land scam  – तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल; चौकशी पूर्ण होईपर्यंत व्यवहार स्थगित अहिल्यानगर | प्रतिनिधी Sawedi land scam  – सावेडी येथील वादग्रस्त भूखंड प्रकरणात आता पोलिसांचीदेखील एन्ट्री झाली असून महसूल यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू असून मंडळ अधिकारी शैलेजा देवकते यांनी वादी-प्रतिवादींना नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान, या जमिनीचे कोणतेही व्यवहार चौकशी पूर्ण होईपर्यंत होऊ नयेत, अशा सूचनाही सह दुय्यम निबंधक अहिल्यानगर (दक्षिण-१, उत्तर-२ आणि अहिल्यानगर-३) यांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. पाचरणे यांनी तक्रार करताना “जमिनीच्या व्यवहारात अडथळे निर्माण केले जात आहेत” असा आरोप केला आहे. त्यामुळे आता प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले असून, चौकशीवर दबाव आणण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. कोण आहेत पाचरणे? या प्रकरणात पाचरणे हे शिरूर तालुक्यातील रहिवासी असून त्यांनीच ही पोलीस तक्रार दिली आहे. त्यांचा दावा आहे की, डायाभाई अब्दुल आजीज यांच्याकडून पारसमल शहा यांनी विकत घेल्याचा दावा केलाय, शहा  यांच्याकडून जनरल मुखत्यारपत्रावरून जमिनीचा व्यवहार पाचरणे यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र, या खरेदी खताच्या कायदेशीरतेवर संशय व्यक्त होत असून त्यावरच संपूर्ण वाद उद्भवला आहे. नेमकं काय आहे प्रकरण? (Sawedi land scam ) सावेडीच्या भूखंड नोंदणी प्रकरणाने नगर शहराला हादरवून सोडले आहे. तीन दशके झोपलेल्या कागदांनी अचानकच ‘जिवंत’ होण्याचा प्रकार समोर आला आहे. सर्वे नंबर २४५/ब १ (०.७२ हेक्टर) आणि २४५/ब २ (०.६३ हेक्टर) असा एकूण १ हेक्टर ३५ आर क्षेत्रफळाचा भूखंड – ज्या जमिनीची ३५ वर्षांपूर्वी कोणतीही व्यवहार प्रक्रिया झाली नाही, ती अचानक नोंदणीसाठी समोर आली, या प्रकरणांमध्ये अजित दादाभाई आणि साजिद दयाभाई यांचे जनरल मुखत्यार म्हणून रमाकांत सोनवणे राहणार स्टेशन रोड अहिल्यानगर यांनी तक्रार केली आहे त्यावरून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे सावेडी भागातील एक भूखंड 1991 मध्ये खरेदी करण्यात आल्याचं खरेदी खत सादर करण्यात आलं आहे. मात्र, तब्बल ३० वर्षांनंतर म्हणजेच २०२५ मध्ये ही नोंद करण्यात आली. त्यात काही बाबी संशयास्पद असून बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी केल्याचा संशय वर्तवला जात आहे. हे लक्षात आल्यानंतर महसूल विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली असून, प्रांताधिकारी सुधीर पाटील अंतिम निर्णय घेईपर्यंत कोणताही व्यवहार होऊ नये, असे पत्र देण्यात आले आहे .

Sawedi land Scam सावेडी भूखंड घोटाळा : पोलिसांची एन्ट्री, महसूल अधिकार्‍यांवर दबावाचं वातावरण Read More »

mjtaio radhika yadav split

Radhika Yadav – वडिलांकडून राष्ट्रीय टेनिसपटू राधिकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

तिच्या वडिलांनी पाच गोळ्या झाडल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तीन गोळ्या तिच्या पाठीवर लागल्या आणि ती जागीच कोसळली. गुरुग्राम | प्रतिनिधी  Radhika Yadav – हरियाणामधील उदयोन्मुख टेनिसपटू आणि आयटीएफ क्रमवारीत उल्लेखनीय स्थान पटकावलेल्या राधिका यादव (२५) हिची तिच्याच वडिलांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुग्राम येथे घडली. न्यायालयाने आरोपी वडील दीपक यादव यांना शुक्रवारी एक दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायलयाने दिले आहेत. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. राधिका घरात नाश्ता तयार करत असताना, तिच्या वडिलांनी पाच गोळ्या झाडल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तीन गोळ्या तिच्या पाठीवर लागल्या आणि ती जागीच कोसळली. तपासानंतर, स्वतःची टेनिस अकादमी सुरू करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनलेल्या राधिकाच्या यशावरून वडिलांना गावकऱ्यांकडून टीका सहन करावी लागत होती, अशी माहिती समोर आली आहे. “मुलीच्या कमाईवर जगतो,” अशा ताशेरे गावातून झेलावे लागल्यामुळे त्यांनी राधिकावर गोळी झाडण्याचा निर्णय घेतल्याची कबुली दीपक यादव यांनी दिली आहे. सुरुवातीस सोशल मीडियावर काही अफवा पसरल्या होत्या की, रील्समुळे किंवा मुलीच्या वागणुकीमुळे ही घटना घडली. मात्र, पोलिसांनी यावर स्पष्टपणे स्पष्टीकरण देत सांगितले की अकादमीशी संबंधित वाद व सामाजिक दबावच यामागील प्रमुख कारण आहे. राधिकाचा खेळातील प्रवास राधिका यादव हिने अल्पवयातच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली होती. या घटनेने क्रीडा व सामाजिक क्षेत्रात पुरुषप्रधान मानसिकतेविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. एक यशस्वी मुलगी आपला व्यवसाय उभा करत असतानाही, तिच्या स्वतःच्या वडिलांनी तिचं आयुष्य संपवलं, ही बाब धक्कादायक आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, वापरलेली बंदूक, उर्वरित काडतुसे, तसेच राधिकाच्या आईची साक्षही घेतली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Radhika Yadav – वडिलांकडून राष्ट्रीय टेनिसपटू राधिकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या Read More »

sebastian bennett

Sawedi land Scam कुणाच्या मरणाची वाट पाहत होते?

Sawedi land scam – अहिल्यानगर – अहिल्यानगरच्या सावेडी भागातील गाजत असलेल्या भूखंड नोंदणी प्रकरणाने सध्या शहराचे नुसते कान नव्हे तर अंत:करण ढवळून काढले आहे. ३५ वर्षांपूर्वीचा खरेदीखत, पावर ऑफ अ‍ॅटर्नी, हिबाबनामे आणि नोटरीच्या नोंदी आज अचानक कोणाच्या तरी मृत्यूमुळे बाहेर येतात आणि सर्वांनी ‘हे माझं’, ‘मी याचा वारस’, ‘ते माझं’ म्हणून उचल खाल्ल्याची लक्तरं वेशीवर टांगली जातात. मग इतके दिवस हे सगळे नक्की कुणाच्या मरणाची वाट पाहत होते? हे केवळ प्रश्‍न नाही; हा एका प्रामाणिक व्यवस्थेच्या मरणाचाही हुंकार आहे. एखादा वारसदार मरण पावतो आणि त्या पाठोपाठ एकामागोमाग एक भूमाफिया, कागदांचे माहेरघर बनलेले दस्तऐवज, खोटी पावती आणि सरकारी यंत्रणेतील बेशरम शांतता यांचा भयंकर नाट्यप्रयोग सादर होतो. मग प्रश्न हा पडतो की नेमकी ही भूखंड माफिया कुणाच्या मरणाची वाट पाहत होते… सर्व्हे नं. २४५/ब १ आणि २४५/ब २ — एकूण १ हेक्टर ३५ आर — ही जमीन, ३५ वर्षांनंतर अचानक नोंदणीसाठी पुढे काढली जाते आणि म्हणे १९९१ साली खरेदीखत झाले होते! पण त्या काळात तर २४५/ब २ हा गट क्रमांक अस्तित्वातच नव्हता. गट विभाजनच १९९२ मध्ये झाले, तर वर्षभर आधी खरेदीखत लिहिणाऱ्यांनी कोणते गूढ भविष्य पाहिले होते?याहून भयावह म्हणजे हे खरेदीखत लिहून देणारा ‘अब्दुल अजीज डायभाई’ — त्याच्या नावावर त्या काळात जमीनच नव्हती! मग हे सगळे “खरे” दस्तऐवज तयार झाले तरी कसे? की काहीजणांची सही, काहीजणांचा मृत्यू, काहीजणांची आठवण आणि काहीजणांचे स्वार्थ — हे सगळं एकाच ‘खता’त गाडलं गेलं? या सगळ्या खेळात सर्वात मोठा खलनायक ठरतो तो म्हणजे – ‘गप्प बसलेली यंत्रणा‘. निबंधक, महसूल कार्यालयाला हे प्रश्न पडत नाहीत का? की त्यांनाही या बनावट दस्तऐवजांचं वजन लक्ष्मी-दर्शनाच्या तुला मोजूनच समजतं? अहो तुम्ही आज अधिकारी असला म्हणून काय झालं शेवटी तुम्हीही एक माणूस आहात हे विसरू नका, या प्रकरणात फक्त जमीनच लुटली जात नाहीये, तर नीतिमत्तेची हत्या, कायद्याचा अपमान आणि सामान्य जनतेच्या विश्वासाचा खून झालेला आहे. अशी सडकी व्यवस्था चालू राहिली, तर उद्या तुमच्या-आमच्या जमिनीही कुणाच्या तरी “काही वर्षांपूर्वी”च्या खरेदीखतावर हरवल्या जातील. त्यावेळेस तुमची पुढील पिढी ही अधिकारी नसेल हे लक्षात ठेवा, प्रशासन आणि कायदा यंत्रणांनी आता तरी जागं व्हावं, अन्यथा जनता विचारेल — हे सगळे खरेदीखत, नोटरी, हिबाबनामे फक्त माणसाच्या मरणाची वाट पाहूनच बाहेर काढायचे का? आता कुणी मरेल याची वाट न पाहता, कायदा जिवंत आहे हे दाखवून द्या. नाहीतर पुढची वाट फक्त अराजकतेकडेच जाते. * हे सगळे पुढे आले याचे कारण पुण्यात दोन-तीन महिन्यापूर्वी एका वर्षाचे निधन झाले.*

Sawedi land Scam कुणाच्या मरणाची वाट पाहत होते? Read More »

sawedi land

Sawedi land Scam सावेडी जमीन व्यवहारात पुन्हा सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयावर खरेदीखतासाठी दबाव; ‘लक्ष्मी दर्शन’चे आमिष?

land Scam Sawedi – अहिल्यानगर : सावेडी येथील तब्बल ३५ वर्षांपूर्वीच्या जमिनीच्या संशयास्पद व्यवहारात नवे वळण आले आहे. या प्रकरणात बनावट खरेदीखताच्या आधारे पुन्हा एकदा नवीन खरेदीखत करण्यासाठी सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याची गंभीर माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, यासाठी आर्थिक आमिषाचे – ‘लक्ष्मी दर्शनाचे’ – प्रस्ताव दिल्याचेही समजते. सदर प्रकरणात २४५/ब२ या गट क्रमांकाची ०.६३ हेक्टर क्षेत्राची जमीन चर्चेचा विषय ठरली आहे. या भूखंडावर ३५ वर्षांपूर्वीचे खरेदीखत खरे की बनावट, याचा तपास सुरू असतानाच, त्याच खरेदीखताच्या आधारे नवी नोंदणी करण्याचा प्रयत्न होत आहे. संबंधित पक्षांनी दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन कर्मचारी व अधिकाऱ्यांवर नोंदणीसाठी दबाव आणल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, या नोंदणी प्रक्रियेत अडथळा नको म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांना ‘लक्ष्मी दर्शन’ देण्याचे सुचवले गेल्याचे संकेत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून, सरकारी यंत्रणेवर बाह्य हस्तक्षेपाचा गंभीर प्रकार म्हणून पाहिली जात आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी संबंधित व्यवहाराची चौकशी सुरू केली असून, मंडळ अधिकारी शैलजा देवकते यांनी वादी-प्रतिवादी पक्षांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच या गट नंबरवरील कोणताही व्यवहार चौकशी पूर्ण होईपर्यंत थांबवावा, असे आदेश सहाय्यक दुय्यम निबंधकांना दिले गेले आहेत. या सर्व घडामोडींमुळे भू-माफियांची धडकी भरली असून, प्रशासनावर दबाव आणण्याचे प्रकार आणि त्याला मिळणारी शासकीय यंत्रणांची साथ, या मुद्द्यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पुढील काळात ही चौकशी कुठपर्यंत जाते आणि दोषींवर कारवाई होते का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Sawedi land Scam सावेडी जमीन व्यवहारात पुन्हा सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयावर खरेदीखतासाठी दबाव; ‘लक्ष्मी दर्शन’चे आमिष? Read More »